Latest Post


आर्थिक परिभाषित आणि शास्त्रीय बाबी वेगळे करुन सरळ सरळ पद्धतीने पाहिले तर मानवाची आर्थिक समस्या आम्हाला ही दृष्टीस येते की, सभ्यतेच्या विकासाचा वेग कायम ठेवत. कशाप्रकारे सर्वच लोकापर्यंत जीवनाच्या आवश्यक वस्तू पोहोचविण्याचा प्रबंध व्हावा आणि कशाप्रकारे समाजात प्रत्येक व्यक्तीला आपले सामर्थ्य आणि योग्यतेनुसार प्रगती करणे, आपल्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करणे आणि आपल्या पूर्णतेला प्राप्त होईपर्यंतचा कालावधी उपलब्ध राहावा. प्राचीन काळात मनुष्याची आर्थिक समस्या जवळजवळ तितकीच सोपी होती, जितकी की जनावरांसाठी सोपी आहे. अल्लाहच्या या धर्तीवर जीवनाच्या अगणित वस्तू पसरलेल्या आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी जीविकेची जितकी गरज आहे ती सुद्धा पूरक प्रमाणात अस्तित्वात आहे. प्रत्येक जण आपली जिविका शोधण्यासाठी निघतो आणि तिला जिविकेच्या खजिन्यामधून प्राप्त करून घेतो. कुणाला ना त्याची किंमत चुकवावी लागते आणि त्याची रोजी कोणा दुसऱ्या प्राण्याच्या ताब्यात आहे. जवळ जवळ हीच व्यवस्था मानवाची सुद्धा होती. प्राकृतिक जीविका ती जरी फळाच्या रूपात असो अथवा शिकारीच्या प्राण्याच्या रूपात, प्राप्त करून घेतले जात होते. प्राकृतिक उत्पादनातून अंग झाकण्याचा प्रबंध करून घेतला आणि जमिनीत जिथे ही अवकाश पाहिला डोके लपवायला आणि पडून राहण्यास जागा बनवून घेतली. परंतु ईश्वराने मानवाला यासाठी निर्माण केले नव्हते की, तो अधिक काळापर्यंत याच स्थितीत राहावा. त्याने मानवामध्ये अशी प्राकृतिक प्रेरणा ठेवली होती की तो एकाकी जीवन सोडून सामूहिक जीवनाचा स्विकार करू लागला आणि आपल्या कामगिरीने आपल्यासाठी त्या साधना पेक्षा चांगले साधन निर्माण करावे जे प्रकृतीने उपलब्ध केले होते. स्त्री आणि पुरुषांमध्ये सततसंबंधाची स्वभाविक इच्छा, मानवी अपत्यांचे अधिक वेळेपर्यंत आई-वडिलांच्या पालन-पोषणाचे गरजवंत राहाणे, आपल्या वंशासंबंधी मानवाची खोलवर आवड आणि रक्तातील नात्यांशी प्रेम, या वस्तू आहेत ज्या मानवाला सामाजिकजीवन अंगी कारण्यास विवश करण्यासाठी स्वंय प्रकृतीनेच त्याच्यात ठेवून दिल्या होत्या. अशाप्रकारे मनुष्याचे आपोआप उपजनाच्या उत्पादनावर न थांबणे आणि शेती वाढीने आपल्यासाठी धान्य निर्माण करणे, पानांनी शरीर झाकणावर न थांबता, आपल्यासाठी वस्त्र तयार करणे, आपल्या गरजांसाठी यंत्राचा आविष्कार करणे, गुहा आणि भट्ट्यामध्ये राहण्यास राजी न होणे आणि आपल्यासाठी स्वतः घर बनविणे इत्यादी या सर्वांची प्रेरणा प्रकृतीनेच त्याच्या ठेवली होती. याचा सुद्धा अनिवार्य परिणाम हाच होता की हळूहळू तो सभ्य व्हावा. अंततः मनुष्य सभ्य आणि सुसंस्कृत झाला त्याच्या प्रकृतीची हीच मागणी आणि सृष्टीची हीच इच्छा होती.

अशा प्रकारे विभिन्न व्यवसायांचे निर्माण होणे, क्रय-विक्रय, वस्तूंच्या मूल्यांचे निर्धारण, मूल्यांच्या मापदंडाच्या स्वरूपावरून रुपयांचे चलन, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि आयात निर्यातीपर्यंत बाब पोहोचणे, उत्पादनाची नवीन साधने आणि यंत्रांचे वापरात येणे, मिळकतीचे अधिकार आणि वारसा हक अस्तित्व येणे हे सर्व स्वभाविक रूपाने झाले.मग नागरिकता आणि सभ्यतेच्या विकासासोबत हे आवश्यक होते की विभिन्न मनुष्यांच्या शक्तींचे आणि योग्यतेच्याआत जे अंतर प्रकृतीने ठेवले आहे, त्याच कारणामुळे काही लोकांना आपल्या मुळ गरजेपेक्षा अधिक कमावण्याची संधी मिळावी, काहींना आपल्या गरजेपुरते आणि काहींनी त्यापेक्षा कमी कमवावे.

काही लोकांना वारसाहक्कद्वारे जीवनाची सुरुवात करायला चांगली संसाधने उपलब्ध व्हावीत. काही कमी साधना सोबत आणि काहींनी विना साधनांच्या साह्याने जीवन क्षेत्रात पाय ठेवावा. प्राकृतिक कारणाने प्रत्येक लोकवस्तीत असे लोक अस्तित्वात राहावे जे अर्थार्जनाच्या कामात भाग घेण्याची आणि विनिमय कार्यात सहभागी होण्यास पूर्णपणे असमर्थ असावेत. जसे मुले, वृद्ध, आजारी आणि अपंग इत्यादी. काही लोक सेवा घेणारे आणि काही लोक सेवा करणारे असावेत आणि अशा प्रकारे मुक्त कला कौशल्य, व्यापार, कृषी आणि नोकरी तसेच मजुरीची अवस्था सुद्धा निर्माण व्हावी.

हे सर्व सुद्धा स्वंय मानवी समतेचे स्वाभाविक प्रतीक आणि प्राकृतिक भाग आहेत. या बाबींची निर्मिती होणे देखील आपल्या जागी काही गुन्हा किंवा वाईट नाही की यांच्या ऊन्मुलनाची चिंता केली जावी. सभ्यतेच्या बिघाडाच्या दुसऱ्या कारणाने जे बिघाड निर्माण करतात, त्यांच्या मौलिक कारणांना न जाणता खूप लोक घाबरून उठतात. ते कधी वैयक्तिक मिळकतीला, कधी पैशांना, कधी मशीनला, कधी मनुष्याच्या स्वभाविक समानतेला आणि कधी स्वंय सभ्यतेलाच दोष देऊ लागतात. परंतु वास्तवात रोगाचे हे निर्धारण आणि हा इलाजच चुकीचा आहे. मानव स्वभावाच्या फळ स्वरुप जो विकास होतो आणि यामुळे स्वभाविकरुपाने ज्या परिस्थिती निर्माण होतात. त्यांना थांबविण्याचा प्रत्येक प्रयत्न नादानी आहे. त्याचा परिणाम सुधारा ऐवजी सर्वनाशाची संभावना अधिक आहे. मनुष्याची वास्तविक आर्थिक समस्या हि नाही कि सभ्यतेच्या विकासाला कशाप्रकारे रोखले जावे आणि तिच्या स्वभाविक प्रतीकांना कशाप्रकारे बदलविले जावे. वास्तविक समस्या ही आहे की सभ्यतेच्या विकासाच्या स्वाभाविक गती कायम ठेवत सामाजिक अत्याचार व अन्यायाला कशाप्रकारे थांबवावे आणि निसर्गाचा हा उद्देश आहे की, प्रत्येक प्राण्याला त्याची जीविका पोहोचावी आणि त्या अडचणींना कशाप्रकारे दूर केले जावे. ज्यांच्यामुळे कित्येक लोकांची शक्ती आणि योग्यता संसाधनाचा अभाव असल्या कारणामुळे नष्ट होते.

अर्थव्यवस्थेच्या बिघाडाची कारणे

  आता आपणास पाहायला हवे की आर्थिक बिघाडाची मूळ कारणे कोणती आहेत आणि कोणत्या प्रकार चे आहेत. अर्थव्यवस्थेच्या बिघडण्याचा प्रारंभ आहे अमर्याद स्वार्थी वृत्ती मग दुसरा प्रकार वैयक्तिक र्‍हास आणि विकृत व्यवस्थेच्या सहयोगाने ही गोष्ट वाढते आणि पसरते. इथपर्यंत की संपूर्ण अर्थव्यवस्थेला बिघडवून जीवनाच्या उर्वरित भागांमध्ये ही आपले विष पसरवून टाकते. व्यक्तिगत मिळकत आणि काही लोकांचे काही लोकांपेक्षा उत्तम आर्थिक स्थितीत असणे या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत, आणि त्यांच्यात आपल्या जागी कोणती खराबी नाही. जर मनुष्याच्या सर्व नैतिक गुणांना संतुलित रुपात संधी मिळाली असता आणि बाह्य रूपानेहि असे सरकार अस्तित्वात असते ज्याने आपल्या शक्ती ते न्यायाची स्थापना केली असती तर त्यामुळे कोणतीही खराबी निर्माण झाली नसती.परंतु ज्या कारणांनी या बिघडाना जन्म दिला, ते म्हणजे स्वभावतः ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, ते स्वार्थपरता, संकीर्णता, अदूरदर्शिता, लोभ, कंजुषी, बेइमानी आणि आपल्या इच्छांच्या पुजेत मग्न राहिले.

    सैतानाने त्यांची समजूत घातली की तुमच्या वास्तविक आवश्यकतेपेक्षा अधिक जीवनाचे संसाधन जे तुम्हाला मिळतात आणि जे तुमच्या मिळकतीत आहेत, त्यांचे योग्य आणि उचित उपयोग फक्त दोनच आहेत. एक हे की यांना आपल्या सुख सुविधा, मनोरंजन आणि ऐशोआरामा मध्ये लावा आणि दुसरे हे की यांच्या आणखी अधिक संसाधनावर कब्जा करण्यासाठी उपयोग करा आणि झालेच तर त्यांच्याच मदतीने मानवांचे देव, भगवान बनवून बसा.

  पहिल्या शैतानी मार्गदर्शनाचा परिणाम हा झाला की भांडवलदारांनी समाजाच्या त्या लोकांचा अधिकार मानण्यास विरोध केला जे संपत्तीच्या वाटपात हिस्सा मिळण्यापासून वंचित राहतात किंवा आपल्या मूलभूत आवश्यकता पेक्षा कमी हिस्सा मिळवतात. त्यांनी याला वैध समजले की त्या लोकांना उपासमार आणि दयनीय अवस्थेत सोडून दिले जावे. ते आपल्या संकीर्ण दृष्टीच्या कारणामुळे हे पाहू शकले नाहीत. या वागणुकीने समाजाचे बरेचसे लोक अपराधाच्या मार्गावर चालू लागतात, अज्ञान आणि नैतिक पतनाची शिकार होतात. शारीरिक अशक्तपणा आणि रोगामध्ये ग्रस्त होतात. त्यांची शारीरिक शक्ती न विकसित होऊ शकते न मानव सभ्यतेच्या विकासात आपले योगदान देऊ शकतात. त्यामुळे समस्त समाजाला सामूहिक हानी पोहोचते.

ज्याचे भांडवलदार सुद्धा एक अंग आहेत. यावरच फक्त नाही तर या संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवा मध्ये लावले जाऊ शकले असते. भांडवलदारांनी आपल्या वास्तविक आवश्यकता पेक्षा पुढे जाऊन अगणित आवश्यकताची अभिवृद्धी केली. जेंव्हा की त्या मानवांच्या योग्यतांना, सभ्यतांना आणि संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवांमध्ये लावले जाऊ शकले असते. आपल्या स्वतःच्या वाढलेल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी मानवाने वापर करण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासाठी व्याभीचार एक आवश्यकता बनली. त्यांच्यासाठी व्यभिचारिणी स्त्रिया आणि निर्लज्ज व्यक्तींचे एक सैन्य तयार झाले, त्यांच्यासाठी संगीताचीही आवश्यकता भासू लागली, यासाठी गायकांचा, नर्तक नर्तिकांचा, नृत्यांगनाचा, वादक आणि वाद्ययंत्र तयार करणार्‍यांचा एक गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी नाना प्रकारच्या मनोरंजनाची सुद्धा आवश्यकता होती. ज्यांच्यासाठी कथनकरांचा, चित्रकारांचा, विदूषककांचा, सोंगाड्याचा, अभिनेत्यांचा, अभिनेत्रींचा तसेच अनेक फाजील धंदेवाईकाचा आणखी एक खूप मोठा गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी शिकार सुद्धा आवश्यक होती, ज्यांच्या साठी अनेक लोकांना चांगल्या कामावर लावण्याऐवजी त्यांना जंगलांमध्ये जनावरांना हाकण्यात लावून दिले. त्यांच्यासाठी आनंदरस आणि आत्मविस्मृतीही एक गरज होती. यासाठी अनेक माणसे, दारू, कोकेन, अफिम आणि दुसरे मादक पदार्थ निर्माण करण्यावर लावले गेले, सारांश हा की सैतानाच्या या बांधवांनी एवढ्यावरच दया केली नाही तर निर्दयतेने समाजाच्या एका मोठ्या भागाला नैतिक, शारीरिक आणि अध्यात्मिक भ्रष्टतेत ग्रस्त होण्यासाठी सोडून दिले.

(क्रमशः)

(भाग - १)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



मुस्लिमास मुस्लिम असण्यास सर्वप्रथम ज्याची आवश्यकता आहे ते म्हणजे इस्लामचे ज्ञान. प्रत्येक मुस्लिमाला हे माहीत असणे आवश्यक आहे की पवित्र कुरआनची शिकवण काय आहे?प्रेषित मुहम्मद (स.) यांची पद्धत काय आहे? इस्लाम कशाला म्हणतात आणि अनेकेश्वरवाद व इस्लाममध्ये मौलिक फरक कोणत्या गोष्टीमुळे आहे?याचे ज्ञाान असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मुस्लिम असू शकत नाही. परंतु खेदाची गोष्ट अशी की आम्हाला सत्य ज्ञानप्राप्तीची चिंता राहिली नाही, तसेच आम्हाला या गोष्टीची जाणीव नाही की आम्ही केवढ्या मोठ्या देणगीपासून वंचित राहिलो आहोत. माझ्या बंधुनो, आईसुद्धा आपल्या बाळाला तोपर्यंत दूध पाजत नाही जोपर्यंत ते रडून त्याची मागणी करीत नाही. तहानलेल्यास जेव्हा तहान लागते तेव्हा तो स्वत: पाण्याचा शोध करतो. अल्लाह त्याच्यासाठी पाणी उपलब्ध करतो. तुम्हाला स्वत:लाच तहान नसेल तर पाण्याने भरलेली विहीर जरी तुमच्याजवळ आली तरी व्यर्थ आहे. प्रथमत: तुम्हाला स्वत:ला कळले पाहिजे की धर्मापासून अनभिज्ञ राहणे तुमच्यासाठी किती हानिकारक आहे. अल्लाहचा ग्रंथ तुमच्यापाशी आहे परंतु तुम्हाला कल्पना नाही की त्यात काय लिहिले आहे. याच्यापेक्षा अधिक हानिकारक अन्य कोणती गोष्ट असू शकेल? तुम्ही नमाज अदा करता, परंतु तुम्हाला कळत नाही की या नमाजमध्ये तुम्ही आपल्या ईश्वरापुढे काय विनवणी करता. यापेक्षा मोठे नुकसान काय असू शकेल? ज्या कलम्याच्याद्वारे (पवित्र वचन) तुमचा प्रवेश इस्लाममध्ये होतो त्याचा अर्थदेखील तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला याचीदेखील कल्पना नाही की या कलम्याचे (कलमा म्हणजे इस्लाम स्वीकारण्याचे वचन) पठण केल्याने तुमच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या येतात. काय एखाद्या मुस्लिमाच्या दृष्टीने याच्यापेक्षाही एखादी मोठी हानी असू शकते? शेती वाळून गेल्याने होणाऱ्या हानीची तुम्हाला कल्पना आहे. रोजगार न मिळाल्याने होणाऱ्या नुकसानीची तुम्हाला कल्पना आहे, तुमच्या स्वत:चा व्यापारी माल नष्ट होण्याच्या नुकसानीची तुम्हाला कल्पना आहे. परंतु इस्लामचे ज्ञान नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची तुम्हाला कल्पना नाही. जेव्हा तुम्हाला या हानीची जाणीव होईल तेव्हा तुम्ही स्वत: येऊन म्हणाल की आम्हाला या हानीपासून वाचवा. जेव्हा तुम्ही असे सांगाल तेव्हा तुम्हाला या नुकासनीपासून वाचविण्याचीदेखील व्यवस्था होईल.


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.


अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अल्लाह! मी एक मनुष्य आहे. मी ज्या कुणा मुस्लिमास वाईट म्हणेन अथवा त्याचा धिक्कार करीन, मार देईन तर यास त्याच्यासाठी उत्कृष्ठता व दयालुता बनव.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

मी एक मनुष्य आहे आणि मनुष्य असल्याने कमतरता व उणिवा माझ्यात असू शकतात. शक्यतो रागाच्या भरात एखाद्या मुस्लिमास भले-बुरे म्हणावे, धिक्कार करावा किंवा त्यास मार दिल्यास, हे प्रभो! यास त्या व्यक्तीसाठी तुझ्या दयेचे व कृपेचे निमित्त बनव. माझे रागावणे त्या व्यक्तीसाठी वरदान ठरो. एका हदीसमध्ये आले आहे,

‘‘हे अल्लाह! ज्या कोणा मुस्लिमास मी भले-बुरे म्हटले असेल तर यास कयामतच्या दिवशी त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : बुखारी)



कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 

ये पहला सबक था किताबे हुदा का

के मखलूक सारी है कुन्बा खुदा का

एक काळ होता जेव्हा मुस्लिम हे जागतिक महासत्तेच्या ठिकाणी होते. औद्योगिक क्रांतीनंतर त्यांचे हे स्थान ब्रिटिशांनी हरवून घेतले. कालांतराने अमेरिकन्स त्यांच्या जागी आले आणि सुपर पॉवर झाले. आज त्यांच्या स्थानाला चीन धक्के देत आहे. या घटनाचक्राच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम उम्माहच्या पतनाची कारण मिमांसा करून त्यावर काही उपाय सुचविता येतील का हा या आठवड्याचा चर्चेचा विषय आहे. 

इस्लामला पृथ्वीवर का आणले गेले

मिटाया कैसरो किसरा के इस्तब्दाद को जिसने 

वो क्या था जोरे हैदर, फकरे बुज़र, सिद्दीके सलमानी

या पृथ्वीवर अवतरित झालेले पहिले जोडपे म्हणजे अ‍ॅडम आणि ईव्ह यांच्यापासून आजतागायत सात अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्येचा विस्तार झालेला आहे. हजारो वर्षांच्या कालखंडात मानवाने अनेक चढउतार पाहिले, अनेक चांगली कामं केली, अनेक वाईट कामं केली, पुण्य केले, पाप केले, जेव्हा-जेव्हा पाप जास्त झाले, माणूस पथभ्रष्ट झाला, नेकीपासून लांब गेला, त्या-त्या वेळी ईश्वराने त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी पैगंबर पाठविले. ज्यांची संख्या 1 लाख 24 हजार मानली जाते. शेवटी मानवाने एवढी प्रगती केली की पुढे प्रेषित पाठविण्याची गरज उरली नाही. म्हणून ईश्वराने शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यानंतर प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केला. परंतु हा सिलसिला बंद करण्यापूर्वी त्यांच्यापासून ते प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जीवन जगण्याची एक आचारसंहिता ईश्वराने ठरवून दिली. प्रेषित सल्ल. यांनी ती अरबस्थानामध्ये प्रत्यक्षात लागू केली आणि शेवटच्या हजच्या समापनाच्या दिवशी अराफातच्या मैदानातील टेकडीवर उभे राहून शेवटचे संबोधन करताना सांगितले की, ’’इस्लामचा हा जो संदेश मी तुम्हाला दिलेला आहे आज पूर्ण झाला. आज जे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे हे कर्तव्य आहे की, जे या ठिकाणी हजर नाहीत त्यांच्यापर्यंत हा संदेश जसाचा तसा पोहोचवावा.’’ येणेप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेल्या एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाने प्रेषितांचा तो आदेश शिरसावंद्य मानला व जगात विखुरले गेले. भारतातही केरळच्या समुद्रकिनारी मलबार येथे सन 51 हिजरी मध्ये सहाबा रजि. यांचा एक काफिला हजरत तमीम अन्सारी रजि. यांच्या नेतृत्वाखाली आला व त्यांनी इस्लामचा संदेश केरळमधील लोकांपर्यंत पोहोचविला. राजा चिरामन पेरूमल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तो स्विकारला. आजही त्यांच्या काळात मालिक बिन दिनार यांनी बांधलेली चिरामन जामा मस्जिद आबाद आहे.

थोडक्यात इस्लामला पृथ्वीवर आणण्याचे एकमेव कारण होते मानवकल्याण. म्हणून मुस्लिमांचे ही जगण्याचे एकमेव कारण मानवकल्याणच आहे. नैतिकतेचा आदेश देणे आणि अनैतिक कामांपासून रोखणे हेच इस्लामचे म्हणजेच पर्यायाने मुसलमानांचे प्राथमिक कर्तव्य आहे, यालाच कुरआनच्या भाषेत अम्रबिल मारूफ व नही अनिल मुनकर असे म्हणतात. (संदर्भ : सुरे आलेइम्रानः110)   

आजच्या मुस्लिमांची अवस्था

परंतु इस्लाम स्थापनेच्या 1442 वर्षानंतर मुस्लिमांची अवस्था काय आहे? याचा आपण जेव्हा मागोवा घेतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, इस्लाम आहे तसाच आहे मात्र मुसलमानांतील बहुसंख्य लोक हे इस्लामच्या शिकवणीपासून लांब गेलेले आहेत. दूरची गोष्ट सोडा भारतीय मुस्लिम समाजाची काय अवस्था आहे हे पहा. मुस्लिम सदृश्य नाव असलेल्या मात्र इस्लामची सर्व गुणवैशिष्ट्य हरवलेला हा समाज म्हणजे फक्त 20 कोटी लोकांची गर्दी बणून राहिला आहे. काही हजार, फारतर काही लाख लोक इस्लामी चारित्र्याचे आहेत असे म्हणता येईल. बाकी 20 कोटी लोक इस्लामचा इबादतींपुरता भाग घेऊन त्यातच संतुष्ट राहून बाकी इस्लामचा त्यांनी व्यवहारातून त्याग केलेला आहे. मानवतेचे कल्याण तर सोडा आज मुस्लिमांना स्वतःचेच कल्याण करता येत नाही. आपसात प्रचंड तंटे आहेत, बहुसंख्य मुस्लिम संधी मिळेल तिथे भ्रष्ट आचरण करतात, अन्याय व अत्याचार करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, गटातटात विखुरलेले आहेत, त्यांना भारतात सत्तेत स्थान नाही, त्यांच्या हातात सत्ता असती तर त्यांनी भारताची अवस्था ही पाकिस्तानसारखी करून टाकली असती यात शंका नाही. त्यांचे आपसातील हितसंबंधही चांगले नाहीत. मसलकी (स्कूल ऑफ थॉट) कलह एवढा मोठ्या प्रमाणात आहे की, अफगानिस्तानसारखी खुली आर्म पॉलिसी असती तर यांनी  अफगानिस्तान आणि पाकिस्तानसारखा आपसात हिंसाचार केला असता, यातही शंका नाही. त्यांची सामाजिक अवस्थाही फारशी चांगली नाही. जवळ-जवळ प्रत्येक लग्नात इस्लामी निकाह संहितेच्या विरूद्ध जावून वरपक्ष, वधूपक्षाकडून जमेल तेवढी लूट करतो. व्यसनाधिनता कमी जरी असली तरी ती आहे. प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये मुस्लिमांचा सहभाग दखलपात्र असा आहे. याच स्थितीला पाहून इ्नबालनी म्हटले होते की, 

रह गई रस्मे अजां रूहे बिलाली न रही

फलसफा रह गया तलकीने गजाली न रही

इस्लाम धर्मच नव्हे एक जीवन व्यवस्था

मुस्लिम असे म्हणताना थकत नाहीत की इस्लाम फक्त धर्मच नाही तर एक जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था आहे पण त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर उत्कृष्टता तर सोडा ती सरासरी दर्जाची सुद्धा नसल्याचे दिसून येते. मग बिगर मुस्लिमांनी का बरे त्यांच्या या तथाकथित (अल्लाह क्षमा करो) सर्वोत्कृष्ट जीवन पद्धतीच्या दाव्यावर विश्वास ठेवावा? दूसरी महत्त्वाची बाब अशी की, सामाजिक शिष्टाचार हा इस्लामी जीवन पद्धतीचा पाया आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या जीवनातून तोच गायब आहे. मग बिगर मुस्लिमांनी त्यांच्या उत्कृष्टतेच्या दाव्यावर का विश्वास ठेवावा? पहा ! इस्लामी जीवन शैलीचा त्याग केल्याने आपण आपली तर हानी करूनच घेत आहोत उलट आपल्या वागण्याने आपणच आपल्याच दाव्याला सुरूंग लावत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही. यापेक्षा दुर्दैव ते कोणते? 

केवळ इस्लाम महान आहे व इस्लामी जीवनशैली परिपूर्ण आहे म्हणून भागणार नाही. इस्लामचा उदोउदो केल्याने काहीच बदलणार नाही. उलट आपण खोटारडे आहोत हे सिद्ध होईल. नुकतीच ईदुल अजहा झाली किती लोकांना या ईदचा मूळ गाभा माहित आहे? ईदुल अजहाला बकरी ईद म्हणणारे हे अज्ञानी लोक या ईदवर पशुबळी दिला जातो, असा आरोप करणाऱ्यांना नीट उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांना हे म्हणता आले नाही की पशुबळी आणि कुर्बानी याच्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करता आलेला नाही? म्हणून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सदस्याला इस्लाम आणि इस्लामी जीवनशैलीकडे केवळ भावनाशील होवून पाहून जमणार नाही तर त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रयत्न करावे लागतील. 

कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 

मुस्लिम आपले जन्मजात कर्तव्य विसरले आणि त्याची त्यांना ईश्वरीय शिक्षा मिळत आहे. सत्तेत असो की नसोत, बहुसंख्य असो की अल्पसंख्यांक असोत ते सर्व क्षेत्रात अयशस्वी होत आहेत नव्हे पराजित होत आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक एकत्रितरित्या हा निर्णय करणार नाहीत की, व्यवहार्यरित्या आपल्यामधील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या प्रवृत्तींची (जाणीवपूर्वक) जोपासना करू व इस्लामचा संदेश इतरांपर्यत पोहोचवू तोपर्यंत समाजसुधारणेचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल.

त्यांच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली व त्यांनी इस्लामच्या मानवतेचा संदेश व्यापक प्रमाणात आपल्या वर्तणुकीतून देशबांधवांना दिला तरच बहुसंख्य हिंदू बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवतील नसता फाळणीला जबाबदार नसूनही आजच्या मुस्लिम पीढिला ज्या तिरस्काराचा सामना करावा लागत आहे तो पुढेही करावा लागेल, यात शंका नाही.

ही झाली भारतीय मुस्लिमांची अवस्था. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांची अवस्था काय आहे हे पाहू. जगात एकूण 56 मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हणावे असे एकही राष्ट्र नाही. आज त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वैयक्तिक वर्तणूक ही बिगर इस्लामीच आहे. जोपर्यंत ती इस्लामी होणार नाही तोपर्यंत ते यशस्वी होणार नाहीत व दुसऱ्यांना संदेश देण्याचा तर प्रश्नच उत्पन्न होणार नाही. 

बिगर इस्लामी वर्तणुकीमागची कारणे

हो मुबारक तुम्हे बातील की परस्तीश लेकीन

हक का खुर्शीद जरा देर सही चमकेगा

इस्लामी वर्तणुकीपासून लांब जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुस्लिमांवर झालेला पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होय. कारण या जीवनशैलीमध्ये माणसाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही इच्छापूर्तींची कशाही मार्गाने पूर्ती करण्याची मूभा आहे. माणूस प्रवृत्तीनेच आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीकडे प्राधान्याने पाहत असतो. इस्लामी जीवनशैलीमध्ये हलाल, हरामची कैद असल्यामुळे व पाश्चात्य जीवनशैलीमध्ये ती नसल्यामुळे ज्यांची श्रद्धा कमकुवत आहे असे लोक इस्लामी जीवनशैलीपासून दूर गेलेले आहेत. 

दुसरे कारण मुस्लिाम समाजातील एका मोठ्या गटाने इस्लामी आदेशांची प्रत्यक्षात जवळ-जवळ अवहेलना केलेली आहे. मुस्लिमांमध्येही पुरोहितवाद वाढलेला आहे. केवळ 4 टक्के मुस्लिम मदरशात जातात म्हणून त्यांच्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हेच 4 टक्के तरूण धर्माचा अभ्यास करतात आणि समाजाचे धार्मिक नेतृत्व करतात. प्रत्येक मस्जिदीवर त्यांचे वर्चस्व असते आणि सामान्य लोक त्यांचेच ऐकतात. भारतीय मदरशातून शिकवला जाणारा इस्लाम हा परिपूर्ण नाही हे खेदाने म्हणावे लागते. या 4 टक्क्यांमधील अर्धेअधिक मुलं केवळ कुरआन मुखोद्गत करून बाहेर पडतात व जे आलीम, मुफ्ती होतात त्यांचा अभ्यासही कालबाह्य झालेल्या पारंपारिक पद्धतीने करवून घेतला जातो म्हणून त्यांच्यात आधुनिक सामाजिक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होत नाही. मदरश्यातून बाहेर पडल्यानंतर हे विद्यार्थी दैनंदिन आणि जनाजाची नमाज पढविणे तसेच लग्न लावण्यापुरते मर्यादित होऊन राहिले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम समाजात प्रचंड बिगर इस्लामी रूढी-परंपरा रूजलेल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध हे मदरश्यातून निर्माण झालेले नेतृत्व चळवळ उभी करू शकत नाहीत. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याचे फक्त वाचन करून व करवून घेऊन हे धार्मिक नेतृत्व संतुष्ट आहे. नमाजमध्ये इमाम काय पठण करत आहे? काय दुआ मागत आहे? हे नमाजींना माहितच नाही आणि ते समजून सांगण्याची इमामांना गरजही वाटत नाही. कुरआन कळत नाही म्हणून जीवन वळत नाही. कलमा आणि इबादती गळ्याखाली उतरत नाहीत. हृदयापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून त्या आचरणात येत नाहीत. मुस्लिम जनता ही न कळणाऱ्या भाषेत इबादतीकरून संतुष्ट झाल्यामुळे, त्या इबादतींचा खोलवर परिणाम न झाल्यामुळे, भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहते आणि इस्लामी जीवनशैलीपासून लांब जाते. त्यामुळे त्यांना इस्लामी आचरण करण्याचे व तिचा संदेश इतरांना देण्याचे कर्तव्य पार पाडता येत नाही. 

मुस्लिम ही इतरांप्रमाणे सतत भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मानवतेची मोठी हानी होत आहे. यातून एक अशी विचित्र कोंडी निर्माण झालेली आहे की, मुस्लिम मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींना उत्तेजन जरी देत नसले तरी ईश्वराला अपेक्षित असा विरोधही करतांना दिसत नाहीत. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय  मुस्लिम समुदाय हा ईश्वरीय सैन्य आहे जे की, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट गोष्टी आजूबाजूला घडत असतांना हे सैन्य जर मूक दर्शक बणून त्याकडे कानाडोळा करत असेल तर या लष्कराला निलंबित करणे हाच एक मार्ग उरतो. म्हणून मुस्लिम उम्मा ही ईश्वराकडून निलंबित केलेली गेलेली उम्मा आहे. निलंबित अधिकारी जसे तिरस्कारास पात्र असतात तसेच मुस्लिमही तिरस्काराला पात्र झालेले आहेत. म्हणून सर्वत्र त्यांचा तिरस्कार केला जातोय. या तिरस्कारातून सुटका करून घ्यावयाची झाल्यास काय करावे लागेल? याची चर्चा खालीलप्रमाणे -

उपाय

1. इस्लामच्या दृष्टीने मृतप्राय झालेल्या या उम्माहमध्ये पुन्हा जीव फुंकावयाचा झाल्यास सर्वप्रथम त्यांना कुरआन समजून वाचण्याचे आंदोलन सुरू करावे लागेल. हे सहजशक्य आहे. फक्त त्याची जाणीव समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. नियोजनपूर्वक जनजागृती केल्यास कुरआन समजून वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि एकदाका बहुतेक मुस्लिमांनी कुरआन समजून घेतला तर ईश्वराला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपोआपच त्यांना कळेल. मग आपोआपच त्यांच्या मनात वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार व चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होईल. कारण वाईट गोष्टी करणाऱ्यांनासुद्धा शेवटी चांगल्याच गोष्टी आवडतात. कुठल्याही चोराला वाटत नाही की आपली मुले चोर व्हावीत. तद्वतच कुरआन समजून वाचल्यावर वाईट मुस्लिम माणसाला सुद्धा वाटणार नाही की, आपली मुलं वाईट व्हावीत. त्याच्या मनातसुद्धा पश्चातापाची भावना निर्माण होईल व त्याचे परिमार्जन करण्यासाठी तो पेटून उठेल व मुल्ला-मौलवींपेक्षा जास्त तीव्रतेने इस्लामी जीवनशैली प्रमाणे वागू लागेल. कुरआन समजून घेण्याची व्यक्तीगत पातळीवर सुरू झालेली ही मोहीम  बघता-बघता सामाजिक होईल. कारण निलंबित जरी असला तरी शेवटी तो ईश्वरीय फोर्समधील शिपाई आहे. एकदा का त्यानं चांगलं वागण्याचा निश्चय केला व कुरआनला कवटाळले की त्याचा मार्ग आपोआप सुखर होईल. ईश्वरीय मदत वेगाने त्याच्याकडे आकर्षित होईल व अम्र बिल मआरूफ व नही अनिल मुनकर या मिशनचा मार्ग सुकर होईल आणि मुस्लिम उम्माह गतवैभवाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही. 

सदाचाराने वागा असा सल्ला, मॉबलिंचिंग करू नका असा सल्ला देण्याइतपतसोपा आहे पण त्याची अमलबजावणी करण्याच्या मार्गात इतक्या अडचणी आहेत. इतक्या की ईश्वरी मदतीशिवाय सदाचारी समाजाची स्थापना होणे शक्य नाही. उदाहरणार्थ 10 बाय 10 च्या खोलीमध्ये अंगार फुलवून त्यात मधोमध एका परातीमध्ये बर्फ ठेवण्यासारखे आहे. बर्फ हा सदाचार असून अंगार हा दुराचार आहे. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. ईश्वरीय मदतीशिवाय बर्फ हा मोठ्या प्रमाणात खोलीत पसरलेल्या विस्तवाला थंड करू शकणार नाही. तसेच प्रचंड संख्येत पसरलेल्या दुराचाऱ्यांच्यामध्ये परातभर मुस्लिमांनी एकदा का सदाचाराचा निश्चय केला तर ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर मुठभर मुसलमानांची मोठ्या लष्कराच्या तुलनेत कशी मदत करतो याचे दाखले जंगे बदर पासून ते अफगानिस्तानच्या ताज्या परिस्थितीपर्यंत विखुरलेले आहेत. प्रश्न फक्त विश्वासाचा आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’मुस्लिम समाजाला कुरआन समजून इस्लामी जीवनशैली प्रमाणे जीवन जगण्याचा व इस्लामचा संदेश इतर लोकांना देण्याची समज व शक्ती देओ’’ (आमीन) 

- एम.आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget