Latest Post


हे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व  दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाला स्थलांतरित केले जाऊ शकेल. मग हे आवश्यकता भासते की मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह मध्ये पैसे लावले जावेत आणि अतिरिक्त माल खपविण्यासाठी बाजार शोधले जावेत.

या जागतिक संघर्षात बँका पतपेढ्या आणि उद्धव व्यापाऱ्यांची, भांडवलदारांची लहान अशी टोळी सर्व जगाची आर्थिक सामग्री आणि संसाधनावर या प्रकारे प्रभावी झालेली आहे. समस्त उपाय त्यांच्याविरोधात पूर्णपणे निरुपाय झालेले आहे. आता कोण्या व्यक्तीसाठी हे असंभव झालेले आहे की तो आपल्या कष्टाने आणि आपल्या बुद्धीच्या योग्यतेने एखादे काम स्वतंत्र रूपाने करू शकेल. तसेच ईश्वराच्या धरतीवर अस्तित्वात असलेल्या जीवन साधने स्वतः काही भाग प्राप्त करू शकेल. लहान व्यापारी, लहान कारागीर आणि लहान शेतकऱ्यांसाठी आज जगात हात-पाय मारण्याची काही एक संधी बाकी राहिलेली नाही. सर्वच्या सर्व भांडवलदारांचे गुलाम, नौकर, मजूर बनण्यास विवश आहेत. हे लोक कमीत कमी जीवन सामग्रीच्या मोबदल्यात त्यांच्या शरीर आणि बुद्धीच्या सर्व शक्तीआणि त्यांचा पूर्ण वेळ घेतात. या कारणास्तव सर्व मानव जात एक आर्थिक पशु बनून राहिलेली आहे खूप कमी भाग्यशाली लोकांना या आर्थिक संघर्षामध्ये इतका वेळ मिळू शकतो की आपल्या आध्यात्मिक विकासासाठी काही करू शकतील. कोण अशा उद्देशा कडे लक्ष देऊ शकेल जो पोट भरण्याच्या उद्देशा पेक्षा श्रेष्ठ आहे.आपल्या व्यक्तीत्वाच्या त्या तत्त्वांना विकसित करू शकेल जे उपजीविकेच्या शोधा पेक्षा दुसऱ्या पवित्र उद्देशासाठी ईश्वराने त्याच्या मध्ये ठेवले होते. वास्तवात या सैतानी व्यवस्थेमुळे आर्थिक संघर्ष इतके कठोर रूप धारक करते की, जीवनाचे इतर दुसरे विभाग निष्क्रिय हो होऊन बसतात.यापेक्षाही मोठे मानवाचे दुर्भाग्य हे आहे की जगाचे नैतिक दर्शन राजनीतिक व्यवस्था आणि कायदे सिद्धांत या सैतानी अर्थव्यवस्थेने प्रभावित झालेले आहेत. पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत नैतिकतेचे आचार्य अतिरिक्त खर्चापासून वाचण्यावर जोर देत आहेत. जितके कमवायचे तितकाच खर्च करून टाकणे एक मूर्खता समजली  जाते . प्रत्येक व्यक्तीला शिकवण दिली जाते की, आपल्या मिळकतीतून काही न काही वाचवून बँकेत डिपॉझिट ठेवावे अथवा विमा पॉलिसी खरेदी करावी अथवा कंपन्याचे शेअर खरेदी करावेत. म्हणजे जी गोष्ट मानवतेचा विनाश करणारी आहे तीच नैतिकतेच्या दृष्टीत चांगुलपणाचे मापदंड करणारी ठरली आहे. राहिली राजनीतिक शक्ती तर ती व्यवहारतः पूर्णपणे एका सैतानी व्यवस्थेच्या ताब्यात आलेली आहे. ती या अत्याचारापासून मनुष्याला वाचविण्या ऐवजी स्वतः अन्याय करणारी मशीन झालेली आहे. जगाचे कायदे सुद्धा या व्यवस्थेच्या प्रभावात संयोजित होत आहेत.

या कायद्यांनी लोकांना व्यवहारतः पूर्ण सूट देऊन ठेवली आहे की ते ज्याप्रकारे इच्छितील समाजहिताच्या विपरीत आपल्या आर्थिक उद्देशासाठी प्रयास करतील. पैसे कमविण्याच्या पद्धतीत वैथ आणि अवैधतेचा फरक जवळजवळ लुप्त झालेला आहे. प्रत्येक ती पद्धत जिच्याने व्यक्ती दुसऱ्यांना लुटून अथवा नष्ट करून धनवान बनवू शकतो, कायद्याच्या दृष्टीत पात्र आहे दारू बनवा आणि विका व्यभिचाराचे अड्डे स्थापन करा, कामोत्तेजक चित्रपट बनवा, अश्लिल निबंध लिहा वासनालय, भावना भडकवणारी चित्रे प्रकाशित करा, सटृयाचा व्यवहार पसरवा, व्याजखोरीच्यासंस्था स्थापन कराजुगाराच्या नवनवीन पद्धती काढा. सारांश हा की वाटेल ते करा. कायदा फक्त याची परवानगीच देणार नाही तर तुमच्या अधिकारांचे रक्षण ही करेल.

इस्लामी उपाय-

1: इस्लामने जीवनाच्या सर्व समस्यांना या नियमात समोर ठेवले आहे की, जीवनाचे जे सिद्धांत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत, त्यांना शिल्लक ठेवले जावे आणि जिथे नैसर्गिक मार्गाने विचलित झाले आहे, तेथूनच त्याला वळवून नैसर्गिक मार्गावर लावून दिले जावे.

2: दुसरा महत्वपूर्ण नियम ज्यावर त्याची सर्वच सुधारात्मक कार्य निर्भर असतात, तो हा आहे की समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये केवळ काही वरवरचे उपाय लागू करण्यावर न थांबता, सर्वात जास्त जोर नाही नैतिक आणि मानसिक सुधारावर दिला जावा. कारण मानवी मनात निर्माण होणाऱ्या बिघाडाची मुळे कापली जावीत.

3: तिसरा मौलिक नियम ज्याची झलक आपणास संपूर्ण इस्लामी जीवन प्रणालीत मिळेल, हा आहे की शासनाच्या बळावर आणि कायद्यांच्या शक्तीने फक्त तीच कामे घेतली जावीत जिथे याशिवाय काम चालू शकत नसेल. या तिन्ही नियमांना दृष्टीसमोर ठेवते इस्लाम जीवनाच्या आर्थिक विभागामध्ये त्या सर्वच अभाविक सिद्धांतांना अधिकाहुन अधिक नैतिक सुधार आणि कमीत कमी प्रशासनिक हस्तक्षेपाद्वारे मिटवीत असतो, जे सैतानाच्या प्रभावाने मानवाने अंगीकारले आहेत. मानव आपल्या जिविकेसाठी प्रयास करण्यास स्वतंत्र असावा. मानव आपल्या श्रमाने जे काही प्राप्त करेल ती त्याची मिळकत स्वीकार केली जावी आणि मानवामध्ये योग्यतांच्या आणि त्यांच्या परिस्थितीच्या प्रमाणानुसार अंतर असावे. या सर्व बाबींना इस्लाम त्याच मर्यादेपर्यंत स्वीकार करतो ज्या मर्यादेपर्यंत हे निसर्ग अनुकूल असते. मग तो यांच्यावर असे प्रतिबंध लावीत असतो ज्यांच्यामुळे न ही निसर्गाच्या सीमेच्या पुढे वाढू शकते आणि न अन्याय आणि अत्याचाराचे कारण बनते.

सर्वात अगोदर धन कमविण्याच्या प्रश्नाला घ्या इस्लामने मनुष्याच्या या अधिकाराला स्वीकारले आहे. अल्लाहच्या धरतीवर आपल्या रुची, क्षमता आणि योग्यतेनुसार स्वतः आपली जीविका त्याने शोधावी. परंतु तो त्याला हा अधिकार देत नाही की त्याने आपली जीवीका प्राप्त करण्यासाठी नैतिकतेला बीघडविणारी व सभ्यतेच्या व्यवस्थेला बिघडविणारी साधने वापरावीत. तो धन कमविण्याच्या साधनांमध्ये अवैध आणि वैधतेचे अंतर निर्धारित करतो. अत्यंत विस्तारासहीत वेचून वेचून प्रत्येक हानिकारक पद्धतीला अवैध करून टाकतो. त्याच्या कायद्यामध्ये दारू आणि दुसरे मादक पदार्थ केवळ आपल्या जागेवर अवैध आहेत तर त्यांचे बनविणे, विकणे, विकत घेणे आणि बाळगणे सर्व अवैध आहे. तो व्यभिचार, संगीत आणि याच प्रकारच्या इतर दुसऱ्या साधनांना सुद्धा संपत्तीच्या कमाईचे वैध साधन मानत नाही. तो अशा सर्व साधनांना अवैध ठरवितो, ज्यात एका व्यक्तीचा लाभ दुसऱ्या लोकांच्या अथवा समाजाच्या हानीवर निर्भर करीत असेल.

लाच, चोरी, जुगार ,सट्टा तसेच धोका, दगाबाजी चे व्यवहार जमा खोरी अर्थात गरजेच्या साधनांना यासाठी रोखून ठेवणे की किमती वाढाव्यात. उत्पादनाच्या साधनांना एक व्यक्ती अथवा काही व्यक्तीचा अधिकारी ठरविणे की दुसऱ्यासाठी प्रयास क्षेत्र तंग व्हावे. या सर्व पद्धतींना त्यांनी अवैध ठरवले आहे. या व्यतिरिक्त व्यवसायाच्या अशा सर्व प्रकारांना त्याने वेचून वेचून अवैध घोषित केले आहे जे आपल्या आकाराच्या दृष्टीने विवाद निर्माण करणारे आहेत इस्लामच्या या व्यापारी कायद्यांचे विस्तृत रूपाने अध्ययन कराल तर आपणास माहित होईल की आज ज्या पद्धतीने लोक करोडपती बनत आहेत. त्यांच्यातून अधिकांश त्या पद्धती आहेत ज्याच्यावर इस्लामने अत्यंत कडक कायदेशीर प्रतिबंध लावले आहेत. तो धन कमविण्याच्या ज्या साधनांना अवैध ठरवितो, त्यामध्ये सीमित राहून काम केले तर लोकांसाठी अपार धन जमा करत जाण्याची खूप कमी संभावना शेष राहते.

आता पहा, मनुष्य मान्य पद्धतीने जे काही प्राप्त करेल, त्याला इस्लाम त्या व्यक्तीची मिळकत म्हणून परवानगी देतो. परंतु तिच्या उपभोगात त्याला पूर्णतः हा स्वतंत्र सोडत नाही तर त्यावरही अनेक बंधने घालतो. विदित आहे की या कमाविलेल्या संपत्तीच्या वापराचे तीन प्रकार संभव आहेत. एक तर ती खर्च करून टाकावी, किंवा तिला लाभदायक कामावर लावावे, अथवा ती जमा करावी. यामधून एक एकावर इस्लामने जी बंधने घातली आहेत संक्षेपात अशी आहेत. खर्च करण्याचे जितके प्रकार नैतिकतेला हनी पोचवितात अथवा ज्यांच्यामुळे समाजाला नुकसान पोहोचते ते सर्व वर्जित आहेत. आपण आपली संपत्ती जुगारात उडवू शकत नाही व दारू पिऊ शकत नाही. आपण व्याभिचार करू शकत नाही. आपण गाणे वाजविणे, नाच रंग आणि विलासितेच्या दुसऱ्या प्रकारांमध्ये आपला पैसा वाहू शकत नाही. तुम्ही रेशमी वस्त्र परिधान करू शकत नाही. सोने व जवाहीर यांच्या दागिन्यांचा वापर करू शकत नाही. असे दागिने फक्त स्त्रिया घालू शकतात. आपण छायाचित्रांनी आपल्या भिंतींना समजू शकत नाही. सारांश हा की इस्लामने त्या सर्व दारांना बंद करून टाकले ज्यांच्यामुळे मांनवाच्या संपत्तीचा अधिकांश भाग आपल्या विलासितेवर खर्च होत असतो. तो खर्चाच्या ज्या पद्धतींना मान्य करतो त्या या प्रकारच्या आहेत की माणसाने फक्त एका सामान्य दर्जाचे शिष्टता पुर्ण आणि पवित्र जीवन व्यतीत करावे. त्याहून अधिक जर काही शिल्लक राहत असेल तर त्याला खर्च करण्याचा मार्ग इस्लामने हा सुचविला आहे की त्याला पुण्य आणि भलाईच्या कामांमध्ये जनहितार्थ आणि त्या लोकांच्या सहाय्यता कार्यात खर्च करावे जे आर्थिक संपत्ती मधून आपल्या गरजांनुसार वाटा मिळविण्यापासून वंचित राहिले आहेत. इस्लामच्या दृष्टीत सर्वात अधिक योग्य पद्धती आहे की माणूस जे काही कमवितो त्याला आपल्या मान्य आणि उचित गरजांवर खर्च करावे आणि मग जे काही शिल्लक राहील त्याला दुसऱ्यांना देऊन टाकावे. म्हणजे ते आपल्या या गुणाला इस्लामने उच्चतम स्तराच्या नैतिकतेत सम्मिलित केले आहे. एका आदर्शाच्या रूपात याला इतक्या शक्तीनिशी प्रस्तूत केले आहे की जेव्हा कधी समाजात इस्लामच्या नैतिकतेचा गाजावाजा असेल सामाजिक जीवनामध्ये ते लोक अधिक आदराच्या दृष्टीने पाहिले जातील जे कमवितात खर्च करून टाकतात आणि त्या लोकांना चांगल्या दृष्टीने पाहिले जाणार नाही जी संपत्तीला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतील किंवा कमिविलेल्या संपत्तीतून शिल्लक राहिलेल्या वाट्याला पुन्हा कमविण्याच्या कामी लावतील.तरीसुद्धा विशुद्ध नैतिक शिकवणी द्वारा आणि समाजाच्या नैतिक प्रभाव आणि दबावाने अत्याधिक लोभ आणि लोलुपता ठेवणाऱ्या लोकांच्या कमतरतेचे पूर्णतः उन्मूलन केले जाऊ शकत नाही. असे असताना सुद्धा अनेक असे लोक बाकी राहतील जे आपल्या गरजा पेक्षा अधिक असलेल्या संपत्तीला आणखीन जास्त संपत्ती कमविण्यात लावू इच्छितात. यासाठी इस्लामने त्यांच्या वापराच्या पद्धतीवर काही कायदेशीर प्रतिबंधलावलेले आहेत. इस्लामी कायद्यात पूर्णतः निषिद्ध आहे आपण कोणाला आपला माल कर्जावर देत आहात जरी त्याने ते कर्ज आपल्या गरजा वर खर्च करण्यासाठी घेतले असेल अथवा जिविकेच्या साधन निर्मिती साठी इत्यादी, प्रत्येक दशेत आपण त्याच्याकडून केवळ आपली मूळ रक्कम परत घेण्याचे अधिकारी आहेत. या प्रकारे इसलाम अन्याया वर आधारित भांडवलदारी ची कंबर तोडून टाकतो आणि त्या सर्वात मोठ्या शास्त्राला बोथट करून टाकतो. ज्याला आपण व्याज म्हणतो. ज्याच्या द्वारे भांडवलदार केवळ आपल्याच बळावर आसपासच्या आर्थिक धनसंपत्तीला साठवत जातो. शिल्लक धन व्यक्ती वाटेल तर आपल्या व्यापार उद्योग अथवा दुसऱ्या व्यवसायात लावू शकतो अथवा दुसऱ्याच्या सोबत लाभा मध्ये सामील होऊन त्याने संपत्ती जमा करावी याला इस्लाम वैध करार देतो आणि यापेक्षा जी आवश्यकतेपेक्षा अधिक धन लोकांजवळ साठत जाते त्याचा उपाय   दुसऱ्या प्रकारे करीत असतो.

(क्रमशः, भाग - ३)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



’’इस्लाम तहेजीबो अख्लाक (सांस्कृतिक शिष्टाचार) और तकमिले फजाईल (ईश्वरीय कृपा) की शहेंशाही है’’ - अल्लाम्मा शिबली नोमानी रह.

ऑगस्ट 2021 रोजी तालीबानकडून अफगानिस्तानचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ’’ते देशामध्ये पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही व्यवस्था लागू करणार नाहीत तर शरई व्यवस्था लागू करतील.’’ या घोषणेनंतर साहजिकच जागतिक स्तरावर खळबळ माजली. 1999 ते 2001 या कालावधीत तालीबानच्या काळात या व्यवस्थेच्या नावाखाली अनेक अत्याचार केले गेले होेते. त्यामुळे यावेळी पुन्हा तसेच अत्याचार अफगानी जनतेवर केले जातील, अशी साधार भीती संयुक्त राष्ट्र संघापासून ते लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणूनच या आठवड्यात या व्यवस्थेबद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.  

शरई व्यवस्थेबद्दल एका लेखात सर्व काही लिहिणे शक्य नाही परंतु या व्यवस्थेसंबंधी सर्वात मोठा हरकतीचा  जो मुद्दा उपस्थित केला जातो तो त्यातील दंड संहितेचा आहे. जगाच्या मते ही दंड प्रक्रिया रानटी आहे, अश्मयुगीन आहे, मानवाधिकाराचे हनन करणारी आहे. खरेच असे आहे का? हे तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. 

या संदर्भात एक रोचक घटना वाचकांच्या समोर मांडावीशी वाटते. ती अशी की, अमेरिकेच्या पत्रकारांचा एक समूह सऊदी अरबमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या काळाचे शासक शहा फैसल यांना तो भेटला. त्या भेटीदरम्यान एका महिला पत्रकाराने तावातावाने शहा फैसल यांना विचारले की, तुम्ही चोरांचे हात कापता, व्याभिचार किंवा बलात्कार करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारता, छोट्या मोठ्या कारणासाठी फटके मारता ते ही भर बाजारात. जग कुठे पोहोचले आहे आणि तुम्ही कोठे आहात? त्यावर काही क्षणासाठी शहा फैसल गप्प बसले. इकडे पत्रकाराच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिला वाटले की आपण बादशाहाला निरूत्तर करून टाकले आहे. तेवढ्यात शाह फैसल त्या व तिच्या सोबत असलेल्या महिला पत्रकारांना संबोधित करून म्हणाले की, ’’तुम्ही रियादच्या सराफ मार्केटमध्ये जा. तेथून कोणत्याही दुकानातून तुम्हाला जेवढे दागिने घ्यायचे तेवढे घ्या. त्याचे बिल मी अदा करतो आणि ते दागिने घालून सऊदी     -(उर्वरित पान 2 वर)

अरबच्या कोणत्याही शहरात एकट्या फिरून या. तुमच्या केसालाजरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी माझी. पण माझी एक शर्त आहे तेच दागिने घालून तुम्हाला तुमच्या देशात एकट्याने फिरून दाखवावे लागेल.’’ त्यावर सर्व पत्रकार भांबावून गेले. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, ’’शहरात तर सोडा विमानतळावरून दागिने घातलेली एकटी महिला तिच्या घरापर्यंत सुद्धा सुरक्षित जाऊ शकणे शक्य नाही.’’ ही आहे शरई व्यवस्थेतील शिक्षा आणि लोकशाही व्यवस्थेतील शिक्षांमधील फरक. ही घटना आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सर्च करून वाचावी. 

सप्टेंबर 2019 मध्ये मदिनाच्या एका मोठ्या बिन-दाउद नावाच्या मॉलमध्ये खरेदी करतांना, एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की तेथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे. एका बांग्लादेशी विक्रेत्याला ज्याला हिंदी येत होती, मी या संबंधी विचारणा केली असता तो म्हणाला, ’’सहाब ये सऊदी अरब है, यहां मिलावट करनेवाले को चौक में कत्ल किया जाता है. यहां किसी भी दुकानपर आपको हर चीज शुद्ध मिलेगी.’’ 

ही झाली विदेशातील उदाहरणे. आता आपल्या देशातील फक्त या आठवड्यात देशभरात घडलेल्या शेकडो गुन्ह्यांच्या घटनांपैकी फक्त दोन घटनांचा या ठिकाणी उल्लेख करून थांबतो. पहिली घटना दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरातील आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाने आपली सून आणि भाडेकरू कृष्णा तिवारी यांच्यातील आक्षेपार्ह जवळीक पाहून कृष्णा तिवारीसह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. या संबंधीची मीडियाला माहिती पोलीस उपायुक्त दीपक सहारण यांनी दिली. दुसरी घटना मुंबईच्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. पोलीस इन्स्पे्नटर प्रकाश बेळे यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या एका तरूणीला तिच्या वडिलांनी ऑनलाईन्नलाससाठी स्मार्ट फोन घेऊन दिला त्यातून तिला पॉर्न पाहण्याची इतकी सवय जडली की तिने स्वतःच्या 13 वर्षाच्या भावाला पॉर्न्निलप्स दाखवून उत्तेजित करून स्वतःशी लैंगिक संबंध स्थापित करण्यास बाध्य केले व त्यातून ती पाच महिन्याची गर्भवती झाली. या बातमीत असेही म्हटलेले आहे की, हे बहिण-भाऊ रोज रात्री एकत्रच झोपत होते. या पार्श्वभूमीवर शरियतची ही तरतूद किती उपयुक्त ठरते की, शरितयने म्हटलेले आहे, मुलं 8 ते 10 वर्षाची होताच त्यांचे बिछाने वेगळे करा. ह्या दोन्ही बातम्या सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत. या दोन घटनांची निवड यासाठी केलेली आहे की, अशा घटनांमुळे समाजाच्या नैतिक स्थितीचा अंदाज येतो. आज कुठलाही दिवस, कुठलेही वर्तमानपत्र आणि कुठलेही चॅनल अनैतिक संबंधातून होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या वर्णनाशिवाय प्रकाशितच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी बहुसंख्या अशाच कैद्यांची आहे जे नैतिक अधःपतनामुळे गुन्हेगारीकडे वळले आहेत. आज अशा गुन्हेगारांचे समर्थन तिरंगा झेंडा घेऊन करण्याइतपत प्रगती आपल्या लोकशाहीने साधलेली आहे. 

शरई शिक्षांचे प्रकार

शरई शिक्षा एकूण तीन प्रकारच्या असतात. 1. ताज़ीर, 2. हद, 3. कफ्फारा.

1. ताज़ीर : ही किरकोळ गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा असते. ही सौम्य असते. स्थानिक काझी (न्यायाधीश) आरोपीला, पती-पत्नीला, आई-वडिल आपल्या पाल्यांना, मालक आपल्या गुलामांना, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात. रागाने, तुच्छतेने पाहणे, गोश्माली (कान दुमडणे), तंबी करणे आणि फटके मारणे इत्यादी शिक्षा देण्याचा समावेश या गटात होतो. या शिक्षेचे वैशिष्ट्ये असे की, या शिक्षा किती द्याव्यात याची निश्चिती शरियतने केलेली नाही. हा अधिकार शरियतने शिक्षा देणाऱ्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडला आहे.  ही गोष्ट किती सुंदर आहे पहा. 

2. हद - ही शिक्षा निश्चित अशी शिक्षा आहे. यामध्ये चोरी, डाका, देशद्रोह, व्याभिचार, भ्रष्टाचार, भेसळ, बलात्कार, हत्या इत्यादी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. कुरआनच्या विविध आयातींमधून अशा गुन्ह्यात लिप्त गुन्हेगारांना किती शिक्षा द्यावी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. यात काझीला शिक्षा कमी करण्याचे अधिकार नाहीत. 

3. कफ्फारा : या प्रकारच्या शिक्षा म्हणजे नुकसान भरपाई करून देणे होय. यात फिर्यादीला आरोपीकडून किंवा आरोपीची ऐपत नसेल तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अधिकार कोर्टाला देण्यात आलेले आहेत. ही नुकसान भरपाई द्यावीच लागते. त्यातून कुठली पळवाट नाही. अपवाद फक्त जखमी झालेल्या फिर्यादीचा किंवा खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. त्यांनी जर गुन्हेगाराला क्षमा केली तर कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकत नाही. आपल्याकडे खुन्यातील गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ही अतिशय अतार्किक आणि आश्चर्याची बाब आहे. वास्तविक पाहता शरियतने माफीचा अधिकार मयताच्या जवळच्या नातेवाईकाला दिलेला आहे. हीच बाब सद्सद्विवेक बुद्धीला पटणारी आहे. 

शरई शिक्षा तार्किक आहेत

मेरे किरदार में मुज्मर है तुम्हारा किरदार

देखकर क्यूं मेरी तस्वीर खफा हो तुम लोग

कल्पना करा की आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अ ने ब च्या वडिलांचा खून केला तर त्याचे तीन संभाव्य परिणामांपैकी एक परिणाम होतो. पहिला परिणाम असा की, त्याला शिक्षाच होत नाही. दूसरा परिणाम असा की, त्याला फाशी होऊ शकते. पण असे फार क्वचितच होते. तीसरा परिणाम त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि सर्वसाधारणपणे अशीच शिक्षा होते. यातील गंमत पहा. अ ने ब च्या वडिलांचा खून केला आणि अ ला जन्मठेप झाली. आता जन्मभर अ तुरूंगामध्ये ब ने दिलेल्या वेगवेगळ्या करातून (टॅक्स) पोसल्या जातो. म्हणजे एक तर ब चे वडील गेले आणि दूसरे अ गुन्हेगाराला पोसण्याची जबाबदारी ब वर आली. किती हा उरफाटा न्याय? या उलट शरई शिक्षांमध्ये एक तर अ ला तात्काळ मृत्यूदंड दिला जातो किंवा त्याला ब कडून क्षमादान मिळू शकते. येथे आयुष्यभर गुन्हेगाराला पोसण्याची व्यवस्था नाही. वाचकांनी स्वतः निर्णय करावा की शिक्षेची कोणती पद्धती योग्य आहे? 

दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

लोकशाहीमध्ये बलात्काराला शिक्षापात्र अपराध मानले गेलेले आहे व्याभिचाराला नाही. मात्र शरियतमध्ये दोन्ही गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंटची तरतूद आहे. यातील आरोपी अविवाहित असतील तर 100 फटके आणि विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारणे. बलात्काराला बळी पडलेल्या महिलेला अर्थातच शिक्षा होत नाही. 

या शिक्षेची खूप चर्चा होत असते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती ही की, व्याभिचार असो का बलात्कार हे असे सामाजिक अपराध आहेत की ज्यामुळे समाज उध्वस्त होतो म्हणून याची शिक्षाही कठोर आहे. 

इस्लामी शिक्षांसंबंधीची कारण मिमांसा

इस्लामी शिक्षांना भले ही रानटी म्हटले जात असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही की माणसं जर रानटी असतील त्यांना शिक्षा सुद्धा रानटीच देणे योग्य होईल ना? एका निरपराध तरूणीवर बलात्कार करणे रानटीपणा नव्हे काय? मग त्याला भर चौकात लटकविले तर तो रानटीपणा कसा? त्याने केलेले कृत्य रानटी नाही आणि शिक्षा मात्र रानटी. हा उरफाटा तर्क त्याच लोकांच्या गळी पडू शकतो ज्यांना इस्लामोफोबिया नामक आजार झालेला आहे. बलात्कार आणि व्याभिचार हे किती घृणित अपराध आहेत हे दिल्ली येथील वर उल्लेखित घटनेमधून स्पष्ट झालेले आहे. कृष्णा तिवारी आणि त्या सैनिकाच्या पुत्रवधू यांच्यातील अनैतिक संबंधाचे मुल्य कृष्णा तिवारीच्या पत्नी आणि तीन मुलांना आपले जीव देवून चुकवावे लागले, शिवाय हे हत्याकांड करणाऱ्या माजी सैनिकाला शिक्षा होईल ती वेगळीच. समाजामध्ये बदनामी झाली त्याचा तर काही हिशोबच नाही, असे हत्याकांड देशात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे घडतच असतात. प्रचलित कायदा, कोर्ट, पोलीस, वकील आणि न्यायाधीश हे सर्व मिळून अशा गुन्ह्यांना नियंत्रणात आणू शकत नाहीत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा परिस्थितीत सऊदी अरबसारख्या देशात जेथे शरई शिक्षांची तरतूद आहे. तिथल्या महिलाच नव्हे तर सगळा समाज गुन्हेगारांपासून सुरक्षित आहे, याची नोंद सुजान वाचक घेतीलच. असेही नाही की सऊदी अरबमध्ये सगळीकडे हात तुटके लोक दिसत असतात किंवा रोज कोणाला ना कोणाला दगडाने ठेचून मारले जाते. एकाचा हात कापला तर अनेक वर्षे कोणी चोरी करण्याचे धाडस करू शकत नाही. मक्का आणि मदिना दोन्ही ठिकाणी हरम शरीफ (परिसर) ला खेटूनच अनेक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. ते लोक अजान होताच शटर न डाऊन करता नमाजला जातात व परत येतात. पण एक गुंज सोन्याची चोरी होत नाही. आपल्याकडे साध्या अपघात झालेल्या ट्रकमधील दारूच्या बाटल्या अपघात स्थळाजवळच्या गावातील संभ्रांत लोक लुटून नेतात. हा लोकशाही व्यवस्था आणि शरई व्यवस्थेमधील फरक आहे.

शरई शिक्षा कठोर आहेत यात वाद नाही. पण त्या देण्यापूर्वी ईश्वराने लोक गुन्हेगारीकडे वळू नयेत याची तरतूद करण्याची जबाबदारी शासन तसेच जनतेवर टाकलेली आहे. इस्लामी इबादती विशेषतः पाच वेळेसची नमाज अनिवार्य करून अगोदर सामाजिक वातावरण पवित्र करण्याची जबाबदारी सरकार आणि नागरिकांवर आहे. त्यानंतर नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सर्व सोयी सुविधा मिळूनही जर कोणी गुन्हे करत असेल तर मात्र त्याला कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे, यात चुकीचे काय आहे? उदा. पुरूषांच्या पॉलिगामस प्रवृत्तीचा विचार करून चार विवाह करण्याची सोय करून दिलेली आहे. मात्र या सोयीचा लाभ घेऊनही कोणी बलात्कार किंवा व्याभिचार करत असेल तर मात्र त्याला दगडाने ठेचल्याशिवाय पर्याय नाही. अशा लिंगपिसाटांसाठी हीच शिक्षा योग्य आहे की नाही? याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा. रोजगार देण्याची जबाबदारी शरियतने सरकारवर टाकलेली आहे. रोजगार उपलब्ध असूनही जर कोणी चोरी करत असेल तर त्याचा हात कापण्याशिवाय कुठली योग्य शिक्षा होऊ शकेल? याचाही विचार वाचकांनी करावा. 

थोडक्यात मणुष्यप्राणी हा ईश्वरीय प्रॉड्नट आहे व तो किती गुणी आहे हे ईश्वराला माहित आहे. तसेच शरई व्यवस्था ही ईश्वरीय व्यवस्था आहे म्हणून ती त्रुटीविरहित आहे. कायदा आणि शिक्षा यांच्या बाबतीत एक अंतिम सत्य येथे नमूद करतो ते असे की, अशा शिक्षांची भीती सज्जनाला असण्याची गरजच नाही आणि दुर्जनाला ती असायलाच हवी, तरच समाज सुरक्षित राहील अन्यथा नाही. मला आशा आहे शरई व्यवस्थेअंतर्गत कठोर शिक्षेचा भाग वाचकांच्या लक्षात आलेला असेल. ज्यांच्या लक्षात आला नाही त्यांच्या बाबतीत दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह ! त्यांना क्षमा कर ते भौतिकतेमध्ये एवढे गुरफटलेले आहेत की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा बाधित झालेली आहे.’’ खरे पाहता मटेरियालिस्टीक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एवढी उच्च आणि पवित्र संवेदनाच नसते जी की इस्लामी आयडियालॉजीला समजण्यासाठी आवश्यक असते. ’’अल्लाह आपल्या सर्वांना अशी पवित्र संवेदना आणि सद्बुद्धी देओ.’’ आमीन.

- एम.आय.शेख



एखाद्या रोग्याने वैद्यकशास्त्राचा ग्रंथ घेतला व वाचत बसला आणि अशी कल्पना केली की केवळ या ग्रंथाचे वाचन केल्याने माझा रोग दूर होईल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही असे म्हणणार नाही का की पाठवा याला मनोरुग्णालयात! याचे डोके फिरले आहे. परंतु पूर्णत: रोगमुक्त करणाऱ्या अल्लाहने जो ग्रंथ तुमच्या रोगांच्या उपचारासाठी पाठविला आहे. त्याच्याशी तुमचा असाच व्यवहार आहे! तुम्ही याचे पठण करता आणि अशी कल्पना करता की केवळ याच्या पठणाने सर्व रोगराई दूर होईल? याच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याची गरज नाही? आणि त्या गोष्टीचेही पथ्य पाळण्याची गरज नाही ज्यांना हा ग्रंथ अपमानकारक ठरवितो? मग जी गोष्ट तुम्ही त्या माणसाला लागू करता की जो केवळ वैद्यकीय ग्रंथाचे पठण रोग दूर करण्यासाठी पुरेसे मानतो तीच गोष्ट तुम्ही स्वत:वर का लागू करीत नाही?

एखादे पत्र अशा भाषेत आले की जी तुम्हाला येत नाही तर तुम्ही त्या भाषेच्या जाणकाराकडे पत्राचा मजवूâर समजून घेण्यासाठी धाव घेता. जोपर्यंत तुम्हाला पत्राचा मजवूâर काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. ही तुमची अस्वस्थता ह्या साध्या व्यवहाराच्या पत्रातील मजकुराबद्दल आहे की ज्यात तुम्हाला चार पैशांचा लाभ होणार आहे. परंतु संपूर्ण जगाच्या पालनकर्त्या अल्लाहकडून जे पत्र तुमच्याकडे आले आहे आणि ज्यात तुमच्यासाठी या जगातील आणि पारलौकिक जीवनातीचे सर्व लाभ आहेत ते पत्र मात्र तुम्ही स्वत:जवळ तसेच ठेवून देता. त्याचा मजवूâर समजून घेण्यासाठी तुमच्या मनात कसलीही अस्वस्थता उत्पन्न होत नाही, काय ही कुतुहल व आश्चर्याची गोष्ट नव्हे? 


माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.


आम्ही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत अबू  सैफ लोहार यांच्याकडे गेलो (जे पैगंबरांचे पुत्र इब्राहीम यांना दूध पाजणाऱ्या मातेचे पती होते.) पैगंबरांनी इब्राहीम यांना कडेवर घेऊन त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा अबू सैफ यांच्याकडे गेलो, त्या वेळी इब्राहीम हे मरणासन्न अवस्थेत होते. हे पाहून पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले. अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘हे इब्ने औफ! ही कृपाशीलता आहे.’’

यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. पैगंबर म्हणाले, ‘‘डोळे अश्रुंनी डबडबलेले आहेत आणि हृदय दु:खी झाले आहे. तरीसुद्धा आमच्या तोंडून तेच निघेल ज्यामुळे आमचा प्रभु प्रसन्न होईल. हे इब्राहीम, निश्च्ति आम्ही तुझ्या विरहात शोकाकुल आहोत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पुत्र इब्राहीम यांना प्रेम केले. त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. आपल्या तोंडासह नाक इब्राहीमच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवले जसे कोणी फुलाचा वास घेत आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम तेव्हा सोळा-सतरा महिन्यांचेच होते की त्यांचे देहावसान झाले. येथे त्यांच्या आजारपणाचा व मरणासन्न अवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे. पैगंबरांनी जेव्हा पाहिले की हृदयाचा तुकडा नेहमीसाठी विलग होत आहे, तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले.

माननीय अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’ याचा अर्थ होतो की अशा परिस्थितीत मनुष्य दु:खी होतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे महानतेच्या प्रतिकूल अजिबात नाही. पैगंबर जगात यासाठी तर पाठविले जात नाहीत की त्यांनी लोकांना भावनाशून्य व संवेदनाहीन बनवावे. पैगंबर तर लोकांना जीवनाचा स्वाभाविक व सत्य मार्ग दाखविण्यासाठी येतो. मानवी जीवनात सुख व दु:खाचे अवसर येतच राहतात. दु:खाच्या समयी मनुष्याने दु:ख प्रकट करावे, परंतु त्याला ईश्वराच्या निर्णयावर काही तक्रार असू नये. मनुष्यासाठी सर्वाधिक उत्तम व योग्य नीती हीच आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या नातवाच्या निधनावरसुद्धा आपली मुलगी फातिमा (रजि.) यांच्या घरी गेले होते. जाण्यासाठी निघण्यापूर्वी एक निरोप पाठविला होता, ‘‘ते अल्लाहचेच आहे जे त्याने परत घेतले आणि तेसुद्धा अल्लाहचेच आहे जे त्याने दिलेले आहे. म्हणून तुम्हाला धैर्य राखले पाहिजे आणि प्रतिदान (सदका) इच्छुक होणे आहे.’’

पुत्रीच्या आग्रहाखातर जेव्हा पैगंबर त्यांच्याकडे गेले आणि मुलाला त्यांच्या कडेवर देण्यात आले तेव्हा ते मूल मरणासन्न अवस्थेत होते. पैगंबरांचे डोळे पानावले गेले. माननीय साद (रजि.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर!हे काय आहे?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘ही कृपाशीलता आहे, ज्यास अल्लाहने आपल्या दासांच्या मनात ठेवली आहे. म्हणून अल्लाह त्याच्या त्याच दासांवर कृपावर्षाव करतो ज्यांच्या मनात दयाभाव असतो.’’

(हदीस : बुखारी, मुस्लिम) अर्थात, हा दयाभाव आहे जो प्रशंसनीय आहे, अप्रशंसनीय नाही. अशा स्थितीत जे अवैध आहे ते म्हणजे कपडे फाडणे, मातम करून रडणे इ. दु:खाचा मनुष्यावर जो स्वाभाविक परिणाम होतो त्यास तुच्छ समजणे संकुचित दृष्टिकोन आहे आणि धर्माच्या मूळ स्वभावाशी अनभिज्ञ होण्याव्यतिरिक्त आणखीन काहीही नाही.



अन्याय हा सुद्धा केला की, समाजाच्या आणखीन एका मोठ्या भागाला योग्य आणि उपयोगी कामापासून हटवून अशिष्ट, अपमानजनक आणि हानिकारक कामामध्ये लावून दिले आणि सभ्यतेच्या गतीला योग्य मार्गाशी वेगळे करून अशा मार्गाकडे वळवून दिले जे मानवांना भ्रष्टतेकडे घेऊन जाणारे आहेत. मग या बाबीचा अंत तिथेच झाला नाही. मानव संपत्तीला नष्ट करण्यासोबतच त्यांनी भौतिकसंपत्तीचा अयोग्य प्रकारे उपयोग केला. त्यांना महालांची, फुलवाडयांची, मनोरंजनाच्या स्थळांची, नाचघरांची आदीची गरज पडली, इथपर्यंत की मेल्यानंतर जमिनीवर या महाशयांना शेकडो एकर जमीन आणि अलिशान भावनांची गरज भासली. या प्रकारे ती जमीन, ते निर्मितीचे सामान, तो मानवी श्रम जो अनेक लोकांच्या राहण्याचा प्रबंध करण्यासाठी पुरेपूर होता. एकेका विलासी माणसाच्या आवास आणि स्थायी ठिकाणावर लावला गेला. त्यांना आभूषणांची, उत्तम वस्त्रे, उत्कृष्ट यंत्र, भांडी, शृंगार आणि साज सज्जतेचा वस्तू, शानदार सवारी आणि न जाणो कोणकोणत्या वस्तू ची गरज भासली. इथपर्यंत की या अत्याचारर्‍यांचे दरवाजे सुद्धा किमती पडद्या वीणा विवस्त्र समजले जात होते, त्यांच्या भिंती सुद्धा शेकडो आणि हजारो रुपयांच्या चित्रांनी सुसज्जित झाल्या शिवाय राहू शकत नव्हत्या, त्यांच्या खोल्यांची जमीन सुद्धा हजारो रुपयांची कालीन पांघरु इच्छित होती. त्यांच्या कुत्र्यांना देखील मखमली गाद्या आणि सोन्याच्या पट्ट्यांची गरज होती. या प्रकारे ती खूप अशी सामुग्री आणि प्रचुर मानवी श्रम जे हजारो लोकांचे शरीर झाकण्यासाठी आणि पोट भरण्याच्या कामी येऊ शकत होते, त्यास एक एका व्यक्तीच्या विलासिता आणिअय्याशितेवर लावून दिले गेले. हा सैतानी मार्गदर्शनाच्या एका भागाचा परिणाम होता. दुसऱ्या मार्गदर्शनाचे परिणाम या पेक्षा अधिक भयानक आहेत. हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात त्याच्या आपल्या गरजेपेक्षा जास्त जीवीकांची साधने असलेली असतील तर त्यांना तो एकत्रित करत चालला आणि मग अधिकजिविकेची साधने प्राप्त करण्यासाठी वापर करीत राहिला. हे तर स्पष्ट व चुकीचे आहे. विदित आहे की ईश्वराने जीवीकेची जी सामग्री पृथ्वीवर निर्माण केली आहे तिला सजीवांच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केले आहे. तुमच्याजवळ सुदैवाने आज जर अधिक सामग्री आलेली आहे तर तो दुसऱ्यांचा वाटा होता, जो तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. याला एकत्र करण्यास कुठे चालले आपल्या चौफेर बघा लोक, सामुग्रीतून आपला वाटा प्राप्त करण्यास अयोग्य दिसतील किंवा त्यास प्राप्त करण्यात असफल राहुल गेलेले असतील किंवा ज्यांनी आपल्या गरजेपेक्षा कमी मिळविलेआहे, समजून घ्या की हेच ते लोक आहेत त्यांचा वाटा तुमच्या पर्यंत पोहोचला आहे. ते प्राप्त करू शकले नाही तर तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. हे योग्य काम करण्याऐवजी तुम्ही त्या माणसांना आणखी अधिक आर्थिक संसाधन प्राप्त करण्यासाठी उपयोग कराल तर हे चुकीचे काम होईल. कारण कोणत्याही परिस्थितीत ती अतिरिक्त सामग्री जी तुम्हीमिळवाल तुमच्या गरजेपेक्षा आणखी जास्त होईल. मग यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहणे आणि आम्ही आपल्या वाढीव इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे यापेक्षा अधिक भ्रष्टतेचा मार्ग कोणता असू शकतो. जिविकेच्या वस्तू प्राप्त करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा वेळ,श्रम आणि योग्यतेचा जितका भाग आपल्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करता त्याचा व्यय तर उचित रूपात होत असतो. पण या मौलिक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंना या कामात लावण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आर्थिक पशु नव्हे तर धन निर्माण करण्याचे यंत्र बनत अहात. परंतु तुम्हाला वेळ, श्रम, मानसिक आणि शारीरिक शक्तीसाठी अर्थोपार्जनाशिवाय आणखीन चांगली कामे सुद्धा आहेत. बुद्धी आणि निसर्गाच्या प्रमाणानुसार हा सिद्धांत संपूर्ण चुकीचा आहे. जो सैतानाने आपल्या शिष्यांना शिकविला आहे. परंतु या सिद्धांताच्या आधारावर ज्या व्यापारीक पद्धती बनविल्या गेल्या आहेत त्यांचे परिणाम इतके भयानक आहेत की त्यांचा योग्य अंदाज करणे अत्यंत कठीण आहे. 

गरजेपेक्षा जास्त अर्थसाधनांना व अधिकाधिक संसाधनांनी ताब्यात आणण्यासाठी उपयोग करण्याचे दोन प्रकार आहेत. 

या साधनांना व्याजावर कर्ज दिले त्यांना व्यापारी आणि औद्योगिक कार्यामध्ये लावले जावे. या दोन्ही विधी जर निसर्गात एक दुसऱ्या पेक्षा वेगळे जरूर आहेत. परंतु दोन्हीचा संयुक्त रूपाने व्यवहरात असण्याचा स्वाभाविक परिणाम हा होत असतो की समाज दोन्ही वर्गामध्ये विभागला जातो.एक तो अल्प वर्ग जो आपल्या गरजांपेक्षा अधिक संसाधन बाळगतो आणि आपल्या साधनांना आणखी संसाधन प्राप्त करण्यासाठी लावून देतो दुसरा तो मोठा वर्ग जो आपल्या आवश्‍यकतेनुसार किंवा त्यापेक्षा कमी संसाधन ठेवत असतो किंवा काहीच ठेवत नाही या दोन्ही वर्गाचे हित फक्त एक दुसऱ्यांच्या विरुद्धच राहत नाही तर त्यांच्यात संघर्ष आणि वाद उभा राहात असतो. अशा प्रकारे मानवाची अर्थव्यवस्था निसर्गाने विनिमय आणि पारंपारिक देवान-घेवाणाला ज्याचा आधार वाढविला होता. तो एक प्रकारे पारस्परिक युद्धात स्थापित होऊन राहून जातो. मग हा संघर्ष इतका वाढत जातो की, श्रीमंत वर्ग संख्येत कमी आणि गरीब वर्ग अधिक होत जातो, कारण हा संघर्ष आहेच काही अशा प्रकारचा की जो जास्त श्रीमंत आहे तो आपल्या धनाच्या जोरावर कमी धनवान लोकांचे संसाधन सुद्धा ओढून घेतो आणि त्याला गरीब वर्गात लोटून देतो. याप्रकारे पृथ्वीचे आर्थिक संसाधन दिवसेंदिवस लोकसंख्येच्या कमीत कमी भागाजवळ जमा होते आणि दिवसेंदिवस लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग गरीब किंवा धनवानांचा आश्रित होत जातो.

प्रारंभी हे युद्ध आणि संघर्ष लहान प्रमाणावर सुरू होते. मग वाढत वाढत देश आणि राष्ट्रापर्यंत पसरते. इथ पर्यंत कि सर्व जगाला आपल्या सापळ्यात घेऊन सुद्धा त्याचे पोट भरत नाही. प्रकार हा आहे की जेव्हा एका देशाचा सार्वत्रिक कायदा हा होऊन जातो की ज्या लोकांजवळ आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल त्यांनी आपला अतिरिक्त माल लाभकारी कामांमध्ये लावावा आणि हा माल गरजेच्या सामग्री निर्माणावर खर्च व्हावा. तर त्यांच्या लावलेल्या पूर्ण रकमेचे लाभा सोबत परतणे या गोष्टीवर अवलंबून असते की जितक्या वस्तू देशात तयार झाल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व त्याच देशात विकत घेतल्या जाव्यात. परंतु व्यवहारतः असे होत नाही आणि वास्तवात हे होऊही शकत नाही. कारण गरजेपेक्षा कमी माल ठेवणाऱ्यांनाची क्रयशक्ती कमी असते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त धन ठेवणाऱ्यांना ही चिंता असते की, जितकी मिळकत व्हावी त्यातून एक भाग वाचवून लाभकारी कामात लावावा. यासाठी ते आपले सर्व धन खरेदीवर खर्च करत नाहीत. या प्रकारे अनिवार्य रुपाने तयार केलेल्या मालाचा एक भाग न विकता राहून जातो. याचा दुसरा अर्थ हा आहे की भांडवलदारांनी लावलेल्या रकमेचा एक भाग न गुंतविता राहून गेला आणि ही रक्कम देशाच्या उद्योगावर कर्ज म्हणून राहिली. ही केवळ एका चक्राची परिस्थिती आहे. तुम्ही अनुमान करू शकता की अशी जितकी चक्रे होतील त्यातून प्रत्येकात श्रीमंत वर्ग आपल्या प्राप्त आवकेचा एक भाग पुन्हा लाभकारी कामांमध्ये लावत जाईल, आणि जी रक्कम परत मिळण्यापासून राहिलेली आहे त्याचे प्रमाण प्रत्येक चक्रात वाढत जाईल. तसेच देशाच्या उद्योगावर अशा कर्जाचे ओझे दुप्पट, चौपट, हजारपट होत जाईल. ज्याला तो देश स्वतः कधीही फेडू शकत नाही. आज सर्वत्र हीच परिस्थिती आहे. या प्रकारे एका देशाला दिवाळखोरीचा जो धोका येऊन उभा राहतो त्यापासून वाचण्याचा उपाय याशिवाय काही नाही की जितका माल देशात विकण्याचा राहून जातो त्याला दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकावा. म्हणजे असे देश शोधावेत ज्यांच्याकडे हे देश आपल्या दिवाळखोरीला स्थलांतरित करून टाकतील. या प्रकारे हे युद्ध किंवा संघर्ष देशांच्या सीमा पार करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाय ठेवतात. आता हे स्पष्ट आहे की कोणी एक देश असा नाही की जो या सैतानी व्यवस्थेवर चालत असेल. जगाच्या सर्वच देशांची ही स्थिती आहे. ते स्वतः आपल्याला दिवाळखोरी पासून वाचविण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांत आपल्या दिवाळखोरीला एखाद्या दुसऱ्या देशा वर टाकून देण्यासाठी विवश झाले आहेत. या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धा सुरू होते आणि ती काही रूपामध्ये विभागली जाते.

1- प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय बाजारात आपला माल विकण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी लागवडीवर अधिकाधिक माल तयार करावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांचे वेतन खूप कमी ठेवले जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारात देशाच्या सामान्य जनतेला इतका कमी वाटा मिळतो की तिच्या मौलिक गरजाही पूर्ण होत नाहीत.

2- प्रत्येक देश आपल्या सीमेत आणि त्या क्षेत्रात जे त्याच्या प्रभावात असतात दुसऱ्या देशाचा माल येण्यावर प्रतिबंध लावतो. कच्च्या मालाच्या उत्पादनाची जितकी साधने त्याच्या अधिकारात आहेत त्यांच्यावरही पहारा बसवितो, कारण दुसरा त्यापासून लाभ घेऊ शकणार नाही. याने आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतो. याचा परिणाम युद्ध आहे.

3- जे देश या दिवाळखोरीच्या संकटाला आपल्या डोक्यावर येण्यापासून रोखू शकत नाहीत त्यांच्यावर लुटारू तुटून पडतात आणि फक्त आपल्या देशाचा उरलासुरला माल त्यांच्यात विकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर ज्या धनाला स्वतः आपल्या इथे लाभकारी कामांमध्ये लावण्याची आवश्यकता राहत नाही, त्यालाही या देशामध्ये नेऊन लावतात. याप्रकारे शेवटी त्या देशांमध्येही हीच समस्या निर्माण होऊन जाते जो प्रारंभी पैसा लावणाऱ्या देशांमध्ये निर्माण झाली होती. म्हणजे जितका पैसा तिथे लावला जातो तो सर्वच्या सर्व वसुली होऊ शकत नाही त्या पैशाने जितकी मिळकत होते तिचा एक मोठा भाग पुन्हा त्यापेक्षा अधिक लाभकारी कामांमध्ये लावून दिला जातो इथपर्यंत की त्या देशावर कर्जाचे ओझे इतके वाढत जाते की त्या देशात स्वतःस विकून दिले गेले तरी सुद्धा लावलेल्या एकूण रकमेची परतफेड होऊ शकत नाही.

(क्रमशः, भाग - २)

 

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget