Latest Post


’’इस्लाम तहेजीबो अख्लाक (सांस्कृतिक शिष्टाचार) और तकमिले फजाईल (ईश्वरीय कृपा) की शहेंशाही है’’ - अल्लाम्मा शिबली नोमानी रह.

ऑगस्ट 2021 रोजी तालीबानकडून अफगानिस्तानचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ’’ते देशामध्ये पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही व्यवस्था लागू करणार नाहीत तर शरई व्यवस्था लागू करतील.’’ या घोषणेनंतर साहजिकच जागतिक स्तरावर खळबळ माजली. 1999 ते 2001 या कालावधीत तालीबानच्या काळात या व्यवस्थेच्या नावाखाली अनेक अत्याचार केले गेले होेते. त्यामुळे यावेळी पुन्हा तसेच अत्याचार अफगानी जनतेवर केले जातील, अशी साधार भीती संयुक्त राष्ट्र संघापासून ते लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणूनच या आठवड्यात या व्यवस्थेबद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.  

शरई व्यवस्थेबद्दल एका लेखात सर्व काही लिहिणे शक्य नाही परंतु या व्यवस्थेसंबंधी सर्वात मोठा हरकतीचा  जो मुद्दा उपस्थित केला जातो तो त्यातील दंड संहितेचा आहे. जगाच्या मते ही दंड प्रक्रिया रानटी आहे, अश्मयुगीन आहे, मानवाधिकाराचे हनन करणारी आहे. खरेच असे आहे का? हे तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. 

या संदर्भात एक रोचक घटना वाचकांच्या समोर मांडावीशी वाटते. ती अशी की, अमेरिकेच्या पत्रकारांचा एक समूह सऊदी अरबमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या काळाचे शासक शहा फैसल यांना तो भेटला. त्या भेटीदरम्यान एका महिला पत्रकाराने तावातावाने शहा फैसल यांना विचारले की, तुम्ही चोरांचे हात कापता, व्याभिचार किंवा बलात्कार करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारता, छोट्या मोठ्या कारणासाठी फटके मारता ते ही भर बाजारात. जग कुठे पोहोचले आहे आणि तुम्ही कोठे आहात? त्यावर काही क्षणासाठी शहा फैसल गप्प बसले. इकडे पत्रकाराच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिला वाटले की आपण बादशाहाला निरूत्तर करून टाकले आहे. तेवढ्यात शाह फैसल त्या व तिच्या सोबत असलेल्या महिला पत्रकारांना संबोधित करून म्हणाले की, ’’तुम्ही रियादच्या सराफ मार्केटमध्ये जा. तेथून कोणत्याही दुकानातून तुम्हाला जेवढे दागिने घ्यायचे तेवढे घ्या. त्याचे बिल मी अदा करतो आणि ते दागिने घालून सऊदी     -(उर्वरित पान 2 वर)

अरबच्या कोणत्याही शहरात एकट्या फिरून या. तुमच्या केसालाजरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी माझी. पण माझी एक शर्त आहे तेच दागिने घालून तुम्हाला तुमच्या देशात एकट्याने फिरून दाखवावे लागेल.’’ त्यावर सर्व पत्रकार भांबावून गेले. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, ’’शहरात तर सोडा विमानतळावरून दागिने घातलेली एकटी महिला तिच्या घरापर्यंत सुद्धा सुरक्षित जाऊ शकणे शक्य नाही.’’ ही आहे शरई व्यवस्थेतील शिक्षा आणि लोकशाही व्यवस्थेतील शिक्षांमधील फरक. ही घटना आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सर्च करून वाचावी. 

सप्टेंबर 2019 मध्ये मदिनाच्या एका मोठ्या बिन-दाउद नावाच्या मॉलमध्ये खरेदी करतांना, एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की तेथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे. एका बांग्लादेशी विक्रेत्याला ज्याला हिंदी येत होती, मी या संबंधी विचारणा केली असता तो म्हणाला, ’’सहाब ये सऊदी अरब है, यहां मिलावट करनेवाले को चौक में कत्ल किया जाता है. यहां किसी भी दुकानपर आपको हर चीज शुद्ध मिलेगी.’’ 

ही झाली विदेशातील उदाहरणे. आता आपल्या देशातील फक्त या आठवड्यात देशभरात घडलेल्या शेकडो गुन्ह्यांच्या घटनांपैकी फक्त दोन घटनांचा या ठिकाणी उल्लेख करून थांबतो. पहिली घटना दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरातील आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाने आपली सून आणि भाडेकरू कृष्णा तिवारी यांच्यातील आक्षेपार्ह जवळीक पाहून कृष्णा तिवारीसह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. या संबंधीची मीडियाला माहिती पोलीस उपायुक्त दीपक सहारण यांनी दिली. दुसरी घटना मुंबईच्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. पोलीस इन्स्पे्नटर प्रकाश बेळे यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या एका तरूणीला तिच्या वडिलांनी ऑनलाईन्नलाससाठी स्मार्ट फोन घेऊन दिला त्यातून तिला पॉर्न पाहण्याची इतकी सवय जडली की तिने स्वतःच्या 13 वर्षाच्या भावाला पॉर्न्निलप्स दाखवून उत्तेजित करून स्वतःशी लैंगिक संबंध स्थापित करण्यास बाध्य केले व त्यातून ती पाच महिन्याची गर्भवती झाली. या बातमीत असेही म्हटलेले आहे की, हे बहिण-भाऊ रोज रात्री एकत्रच झोपत होते. या पार्श्वभूमीवर शरियतची ही तरतूद किती उपयुक्त ठरते की, शरितयने म्हटलेले आहे, मुलं 8 ते 10 वर्षाची होताच त्यांचे बिछाने वेगळे करा. ह्या दोन्ही बातम्या सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत. या दोन घटनांची निवड यासाठी केलेली आहे की, अशा घटनांमुळे समाजाच्या नैतिक स्थितीचा अंदाज येतो. आज कुठलाही दिवस, कुठलेही वर्तमानपत्र आणि कुठलेही चॅनल अनैतिक संबंधातून होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या वर्णनाशिवाय प्रकाशितच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी बहुसंख्या अशाच कैद्यांची आहे जे नैतिक अधःपतनामुळे गुन्हेगारीकडे वळले आहेत. आज अशा गुन्हेगारांचे समर्थन तिरंगा झेंडा घेऊन करण्याइतपत प्रगती आपल्या लोकशाहीने साधलेली आहे. 

शरई शिक्षांचे प्रकार

शरई शिक्षा एकूण तीन प्रकारच्या असतात. 1. ताज़ीर, 2. हद, 3. कफ्फारा.

1. ताज़ीर : ही किरकोळ गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा असते. ही सौम्य असते. स्थानिक काझी (न्यायाधीश) आरोपीला, पती-पत्नीला, आई-वडिल आपल्या पाल्यांना, मालक आपल्या गुलामांना, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात. रागाने, तुच्छतेने पाहणे, गोश्माली (कान दुमडणे), तंबी करणे आणि फटके मारणे इत्यादी शिक्षा देण्याचा समावेश या गटात होतो. या शिक्षेचे वैशिष्ट्ये असे की, या शिक्षा किती द्याव्यात याची निश्चिती शरियतने केलेली नाही. हा अधिकार शरियतने शिक्षा देणाऱ्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडला आहे.  ही गोष्ट किती सुंदर आहे पहा. 

2. हद - ही शिक्षा निश्चित अशी शिक्षा आहे. यामध्ये चोरी, डाका, देशद्रोह, व्याभिचार, भ्रष्टाचार, भेसळ, बलात्कार, हत्या इत्यादी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. कुरआनच्या विविध आयातींमधून अशा गुन्ह्यात लिप्त गुन्हेगारांना किती शिक्षा द्यावी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. यात काझीला शिक्षा कमी करण्याचे अधिकार नाहीत. 

3. कफ्फारा : या प्रकारच्या शिक्षा म्हणजे नुकसान भरपाई करून देणे होय. यात फिर्यादीला आरोपीकडून किंवा आरोपीची ऐपत नसेल तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अधिकार कोर्टाला देण्यात आलेले आहेत. ही नुकसान भरपाई द्यावीच लागते. त्यातून कुठली पळवाट नाही. अपवाद फक्त जखमी झालेल्या फिर्यादीचा किंवा खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. त्यांनी जर गुन्हेगाराला क्षमा केली तर कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकत नाही. आपल्याकडे खुन्यातील गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ही अतिशय अतार्किक आणि आश्चर्याची बाब आहे. वास्तविक पाहता शरियतने माफीचा अधिकार मयताच्या जवळच्या नातेवाईकाला दिलेला आहे. हीच बाब सद्सद्विवेक बुद्धीला पटणारी आहे. 

शरई शिक्षा तार्किक आहेत

मेरे किरदार में मुज्मर है तुम्हारा किरदार

देखकर क्यूं मेरी तस्वीर खफा हो तुम लोग

कल्पना करा की आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अ ने ब च्या वडिलांचा खून केला तर त्याचे तीन संभाव्य परिणामांपैकी एक परिणाम होतो. पहिला परिणाम असा की, त्याला शिक्षाच होत नाही. दूसरा परिणाम असा की, त्याला फाशी होऊ शकते. पण असे फार क्वचितच होते. तीसरा परिणाम त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि सर्वसाधारणपणे अशीच शिक्षा होते. यातील गंमत पहा. अ ने ब च्या वडिलांचा खून केला आणि अ ला जन्मठेप झाली. आता जन्मभर अ तुरूंगामध्ये ब ने दिलेल्या वेगवेगळ्या करातून (टॅक्स) पोसल्या जातो. म्हणजे एक तर ब चे वडील गेले आणि दूसरे अ गुन्हेगाराला पोसण्याची जबाबदारी ब वर आली. किती हा उरफाटा न्याय? या उलट शरई शिक्षांमध्ये एक तर अ ला तात्काळ मृत्यूदंड दिला जातो किंवा त्याला ब कडून क्षमादान मिळू शकते. येथे आयुष्यभर गुन्हेगाराला पोसण्याची व्यवस्था नाही. वाचकांनी स्वतः निर्णय करावा की शिक्षेची कोणती पद्धती योग्य आहे? 

दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

लोकशाहीमध्ये बलात्काराला शिक्षापात्र अपराध मानले गेलेले आहे व्याभिचाराला नाही. मात्र शरियतमध्ये दोन्ही गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंटची तरतूद आहे. यातील आरोपी अविवाहित असतील तर 100 फटके आणि विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारणे. बलात्काराला बळी पडलेल्या महिलेला अर्थातच शिक्षा होत नाही. 

या शिक्षेची खूप चर्चा होत असते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती ही की, व्याभिचार असो का बलात्कार हे असे सामाजिक अपराध आहेत की ज्यामुळे समाज उध्वस्त होतो म्हणून याची शिक्षाही कठोर आहे. 

इस्लामी शिक्षांसंबंधीची कारण मिमांसा

इस्लामी शिक्षांना भले ही रानटी म्हटले जात असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही की माणसं जर रानटी असतील त्यांना शिक्षा सुद्धा रानटीच देणे योग्य होईल ना? एका निरपराध तरूणीवर बलात्कार करणे रानटीपणा नव्हे काय? मग त्याला भर चौकात लटकविले तर तो रानटीपणा कसा? त्याने केलेले कृत्य रानटी नाही आणि शिक्षा मात्र रानटी. हा उरफाटा तर्क त्याच लोकांच्या गळी पडू शकतो ज्यांना इस्लामोफोबिया नामक आजार झालेला आहे. बलात्कार आणि व्याभिचार हे किती घृणित अपराध आहेत हे दिल्ली येथील वर उल्लेखित घटनेमधून स्पष्ट झालेले आहे. कृष्णा तिवारी आणि त्या सैनिकाच्या पुत्रवधू यांच्यातील अनैतिक संबंधाचे मुल्य कृष्णा तिवारीच्या पत्नी आणि तीन मुलांना आपले जीव देवून चुकवावे लागले, शिवाय हे हत्याकांड करणाऱ्या माजी सैनिकाला शिक्षा होईल ती वेगळीच. समाजामध्ये बदनामी झाली त्याचा तर काही हिशोबच नाही, असे हत्याकांड देशात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे घडतच असतात. प्रचलित कायदा, कोर्ट, पोलीस, वकील आणि न्यायाधीश हे सर्व मिळून अशा गुन्ह्यांना नियंत्रणात आणू शकत नाहीत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा परिस्थितीत सऊदी अरबसारख्या देशात जेथे शरई शिक्षांची तरतूद आहे. तिथल्या महिलाच नव्हे तर सगळा समाज गुन्हेगारांपासून सुरक्षित आहे, याची नोंद सुजान वाचक घेतीलच. असेही नाही की सऊदी अरबमध्ये सगळीकडे हात तुटके लोक दिसत असतात किंवा रोज कोणाला ना कोणाला दगडाने ठेचून मारले जाते. एकाचा हात कापला तर अनेक वर्षे कोणी चोरी करण्याचे धाडस करू शकत नाही. मक्का आणि मदिना दोन्ही ठिकाणी हरम शरीफ (परिसर) ला खेटूनच अनेक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. ते लोक अजान होताच शटर न डाऊन करता नमाजला जातात व परत येतात. पण एक गुंज सोन्याची चोरी होत नाही. आपल्याकडे साध्या अपघात झालेल्या ट्रकमधील दारूच्या बाटल्या अपघात स्थळाजवळच्या गावातील संभ्रांत लोक लुटून नेतात. हा लोकशाही व्यवस्था आणि शरई व्यवस्थेमधील फरक आहे.

शरई शिक्षा कठोर आहेत यात वाद नाही. पण त्या देण्यापूर्वी ईश्वराने लोक गुन्हेगारीकडे वळू नयेत याची तरतूद करण्याची जबाबदारी शासन तसेच जनतेवर टाकलेली आहे. इस्लामी इबादती विशेषतः पाच वेळेसची नमाज अनिवार्य करून अगोदर सामाजिक वातावरण पवित्र करण्याची जबाबदारी सरकार आणि नागरिकांवर आहे. त्यानंतर नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सर्व सोयी सुविधा मिळूनही जर कोणी गुन्हे करत असेल तर मात्र त्याला कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे, यात चुकीचे काय आहे? उदा. पुरूषांच्या पॉलिगामस प्रवृत्तीचा विचार करून चार विवाह करण्याची सोय करून दिलेली आहे. मात्र या सोयीचा लाभ घेऊनही कोणी बलात्कार किंवा व्याभिचार करत असेल तर मात्र त्याला दगडाने ठेचल्याशिवाय पर्याय नाही. अशा लिंगपिसाटांसाठी हीच शिक्षा योग्य आहे की नाही? याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा. रोजगार देण्याची जबाबदारी शरियतने सरकारवर टाकलेली आहे. रोजगार उपलब्ध असूनही जर कोणी चोरी करत असेल तर त्याचा हात कापण्याशिवाय कुठली योग्य शिक्षा होऊ शकेल? याचाही विचार वाचकांनी करावा. 

थोडक्यात मणुष्यप्राणी हा ईश्वरीय प्रॉड्नट आहे व तो किती गुणी आहे हे ईश्वराला माहित आहे. तसेच शरई व्यवस्था ही ईश्वरीय व्यवस्था आहे म्हणून ती त्रुटीविरहित आहे. कायदा आणि शिक्षा यांच्या बाबतीत एक अंतिम सत्य येथे नमूद करतो ते असे की, अशा शिक्षांची भीती सज्जनाला असण्याची गरजच नाही आणि दुर्जनाला ती असायलाच हवी, तरच समाज सुरक्षित राहील अन्यथा नाही. मला आशा आहे शरई व्यवस्थेअंतर्गत कठोर शिक्षेचा भाग वाचकांच्या लक्षात आलेला असेल. ज्यांच्या लक्षात आला नाही त्यांच्या बाबतीत दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह ! त्यांना क्षमा कर ते भौतिकतेमध्ये एवढे गुरफटलेले आहेत की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा बाधित झालेली आहे.’’ खरे पाहता मटेरियालिस्टीक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एवढी उच्च आणि पवित्र संवेदनाच नसते जी की इस्लामी आयडियालॉजीला समजण्यासाठी आवश्यक असते. ’’अल्लाह आपल्या सर्वांना अशी पवित्र संवेदना आणि सद्बुद्धी देओ.’’ आमीन.

- एम.आय.शेख



एखाद्या रोग्याने वैद्यकशास्त्राचा ग्रंथ घेतला व वाचत बसला आणि अशी कल्पना केली की केवळ या ग्रंथाचे वाचन केल्याने माझा रोग दूर होईल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही असे म्हणणार नाही का की पाठवा याला मनोरुग्णालयात! याचे डोके फिरले आहे. परंतु पूर्णत: रोगमुक्त करणाऱ्या अल्लाहने जो ग्रंथ तुमच्या रोगांच्या उपचारासाठी पाठविला आहे. त्याच्याशी तुमचा असाच व्यवहार आहे! तुम्ही याचे पठण करता आणि अशी कल्पना करता की केवळ याच्या पठणाने सर्व रोगराई दूर होईल? याच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याची गरज नाही? आणि त्या गोष्टीचेही पथ्य पाळण्याची गरज नाही ज्यांना हा ग्रंथ अपमानकारक ठरवितो? मग जी गोष्ट तुम्ही त्या माणसाला लागू करता की जो केवळ वैद्यकीय ग्रंथाचे पठण रोग दूर करण्यासाठी पुरेसे मानतो तीच गोष्ट तुम्ही स्वत:वर का लागू करीत नाही?

एखादे पत्र अशा भाषेत आले की जी तुम्हाला येत नाही तर तुम्ही त्या भाषेच्या जाणकाराकडे पत्राचा मजवूâर समजून घेण्यासाठी धाव घेता. जोपर्यंत तुम्हाला पत्राचा मजवूâर काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. ही तुमची अस्वस्थता ह्या साध्या व्यवहाराच्या पत्रातील मजकुराबद्दल आहे की ज्यात तुम्हाला चार पैशांचा लाभ होणार आहे. परंतु संपूर्ण जगाच्या पालनकर्त्या अल्लाहकडून जे पत्र तुमच्याकडे आले आहे आणि ज्यात तुमच्यासाठी या जगातील आणि पारलौकिक जीवनातीचे सर्व लाभ आहेत ते पत्र मात्र तुम्ही स्वत:जवळ तसेच ठेवून देता. त्याचा मजवूâर समजून घेण्यासाठी तुमच्या मनात कसलीही अस्वस्थता उत्पन्न होत नाही, काय ही कुतुहल व आश्चर्याची गोष्ट नव्हे? 


माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.


आम्ही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत अबू  सैफ लोहार यांच्याकडे गेलो (जे पैगंबरांचे पुत्र इब्राहीम यांना दूध पाजणाऱ्या मातेचे पती होते.) पैगंबरांनी इब्राहीम यांना कडेवर घेऊन त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा अबू सैफ यांच्याकडे गेलो, त्या वेळी इब्राहीम हे मरणासन्न अवस्थेत होते. हे पाहून पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले. अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘हे इब्ने औफ! ही कृपाशीलता आहे.’’

यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. पैगंबर म्हणाले, ‘‘डोळे अश्रुंनी डबडबलेले आहेत आणि हृदय दु:खी झाले आहे. तरीसुद्धा आमच्या तोंडून तेच निघेल ज्यामुळे आमचा प्रभु प्रसन्न होईल. हे इब्राहीम, निश्च्ति आम्ही तुझ्या विरहात शोकाकुल आहोत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पुत्र इब्राहीम यांना प्रेम केले. त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. आपल्या तोंडासह नाक इब्राहीमच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवले जसे कोणी फुलाचा वास घेत आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम तेव्हा सोळा-सतरा महिन्यांचेच होते की त्यांचे देहावसान झाले. येथे त्यांच्या आजारपणाचा व मरणासन्न अवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे. पैगंबरांनी जेव्हा पाहिले की हृदयाचा तुकडा नेहमीसाठी विलग होत आहे, तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले.

माननीय अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’ याचा अर्थ होतो की अशा परिस्थितीत मनुष्य दु:खी होतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे महानतेच्या प्रतिकूल अजिबात नाही. पैगंबर जगात यासाठी तर पाठविले जात नाहीत की त्यांनी लोकांना भावनाशून्य व संवेदनाहीन बनवावे. पैगंबर तर लोकांना जीवनाचा स्वाभाविक व सत्य मार्ग दाखविण्यासाठी येतो. मानवी जीवनात सुख व दु:खाचे अवसर येतच राहतात. दु:खाच्या समयी मनुष्याने दु:ख प्रकट करावे, परंतु त्याला ईश्वराच्या निर्णयावर काही तक्रार असू नये. मनुष्यासाठी सर्वाधिक उत्तम व योग्य नीती हीच आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या नातवाच्या निधनावरसुद्धा आपली मुलगी फातिमा (रजि.) यांच्या घरी गेले होते. जाण्यासाठी निघण्यापूर्वी एक निरोप पाठविला होता, ‘‘ते अल्लाहचेच आहे जे त्याने परत घेतले आणि तेसुद्धा अल्लाहचेच आहे जे त्याने दिलेले आहे. म्हणून तुम्हाला धैर्य राखले पाहिजे आणि प्रतिदान (सदका) इच्छुक होणे आहे.’’

पुत्रीच्या आग्रहाखातर जेव्हा पैगंबर त्यांच्याकडे गेले आणि मुलाला त्यांच्या कडेवर देण्यात आले तेव्हा ते मूल मरणासन्न अवस्थेत होते. पैगंबरांचे डोळे पानावले गेले. माननीय साद (रजि.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर!हे काय आहे?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘ही कृपाशीलता आहे, ज्यास अल्लाहने आपल्या दासांच्या मनात ठेवली आहे. म्हणून अल्लाह त्याच्या त्याच दासांवर कृपावर्षाव करतो ज्यांच्या मनात दयाभाव असतो.’’

(हदीस : बुखारी, मुस्लिम) अर्थात, हा दयाभाव आहे जो प्रशंसनीय आहे, अप्रशंसनीय नाही. अशा स्थितीत जे अवैध आहे ते म्हणजे कपडे फाडणे, मातम करून रडणे इ. दु:खाचा मनुष्यावर जो स्वाभाविक परिणाम होतो त्यास तुच्छ समजणे संकुचित दृष्टिकोन आहे आणि धर्माच्या मूळ स्वभावाशी अनभिज्ञ होण्याव्यतिरिक्त आणखीन काहीही नाही.



अन्याय हा सुद्धा केला की, समाजाच्या आणखीन एका मोठ्या भागाला योग्य आणि उपयोगी कामापासून हटवून अशिष्ट, अपमानजनक आणि हानिकारक कामामध्ये लावून दिले आणि सभ्यतेच्या गतीला योग्य मार्गाशी वेगळे करून अशा मार्गाकडे वळवून दिले जे मानवांना भ्रष्टतेकडे घेऊन जाणारे आहेत. मग या बाबीचा अंत तिथेच झाला नाही. मानव संपत्तीला नष्ट करण्यासोबतच त्यांनी भौतिकसंपत्तीचा अयोग्य प्रकारे उपयोग केला. त्यांना महालांची, फुलवाडयांची, मनोरंजनाच्या स्थळांची, नाचघरांची आदीची गरज पडली, इथपर्यंत की मेल्यानंतर जमिनीवर या महाशयांना शेकडो एकर जमीन आणि अलिशान भावनांची गरज भासली. या प्रकारे ती जमीन, ते निर्मितीचे सामान, तो मानवी श्रम जो अनेक लोकांच्या राहण्याचा प्रबंध करण्यासाठी पुरेपूर होता. एकेका विलासी माणसाच्या आवास आणि स्थायी ठिकाणावर लावला गेला. त्यांना आभूषणांची, उत्तम वस्त्रे, उत्कृष्ट यंत्र, भांडी, शृंगार आणि साज सज्जतेचा वस्तू, शानदार सवारी आणि न जाणो कोणकोणत्या वस्तू ची गरज भासली. इथपर्यंत की या अत्याचारर्‍यांचे दरवाजे सुद्धा किमती पडद्या वीणा विवस्त्र समजले जात होते, त्यांच्या भिंती सुद्धा शेकडो आणि हजारो रुपयांच्या चित्रांनी सुसज्जित झाल्या शिवाय राहू शकत नव्हत्या, त्यांच्या खोल्यांची जमीन सुद्धा हजारो रुपयांची कालीन पांघरु इच्छित होती. त्यांच्या कुत्र्यांना देखील मखमली गाद्या आणि सोन्याच्या पट्ट्यांची गरज होती. या प्रकारे ती खूप अशी सामुग्री आणि प्रचुर मानवी श्रम जे हजारो लोकांचे शरीर झाकण्यासाठी आणि पोट भरण्याच्या कामी येऊ शकत होते, त्यास एक एका व्यक्तीच्या विलासिता आणिअय्याशितेवर लावून दिले गेले. हा सैतानी मार्गदर्शनाच्या एका भागाचा परिणाम होता. दुसऱ्या मार्गदर्शनाचे परिणाम या पेक्षा अधिक भयानक आहेत. हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात त्याच्या आपल्या गरजेपेक्षा जास्त जीवीकांची साधने असलेली असतील तर त्यांना तो एकत्रित करत चालला आणि मग अधिकजिविकेची साधने प्राप्त करण्यासाठी वापर करीत राहिला. हे तर स्पष्ट व चुकीचे आहे. विदित आहे की ईश्वराने जीवीकेची जी सामग्री पृथ्वीवर निर्माण केली आहे तिला सजीवांच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केले आहे. तुमच्याजवळ सुदैवाने आज जर अधिक सामग्री आलेली आहे तर तो दुसऱ्यांचा वाटा होता, जो तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. याला एकत्र करण्यास कुठे चालले आपल्या चौफेर बघा लोक, सामुग्रीतून आपला वाटा प्राप्त करण्यास अयोग्य दिसतील किंवा त्यास प्राप्त करण्यात असफल राहुल गेलेले असतील किंवा ज्यांनी आपल्या गरजेपेक्षा कमी मिळविलेआहे, समजून घ्या की हेच ते लोक आहेत त्यांचा वाटा तुमच्या पर्यंत पोहोचला आहे. ते प्राप्त करू शकले नाही तर तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. हे योग्य काम करण्याऐवजी तुम्ही त्या माणसांना आणखी अधिक आर्थिक संसाधन प्राप्त करण्यासाठी उपयोग कराल तर हे चुकीचे काम होईल. कारण कोणत्याही परिस्थितीत ती अतिरिक्त सामग्री जी तुम्हीमिळवाल तुमच्या गरजेपेक्षा आणखी जास्त होईल. मग यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहणे आणि आम्ही आपल्या वाढीव इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे यापेक्षा अधिक भ्रष्टतेचा मार्ग कोणता असू शकतो. जिविकेच्या वस्तू प्राप्त करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा वेळ,श्रम आणि योग्यतेचा जितका भाग आपल्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करता त्याचा व्यय तर उचित रूपात होत असतो. पण या मौलिक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंना या कामात लावण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आर्थिक पशु नव्हे तर धन निर्माण करण्याचे यंत्र बनत अहात. परंतु तुम्हाला वेळ, श्रम, मानसिक आणि शारीरिक शक्तीसाठी अर्थोपार्जनाशिवाय आणखीन चांगली कामे सुद्धा आहेत. बुद्धी आणि निसर्गाच्या प्रमाणानुसार हा सिद्धांत संपूर्ण चुकीचा आहे. जो सैतानाने आपल्या शिष्यांना शिकविला आहे. परंतु या सिद्धांताच्या आधारावर ज्या व्यापारीक पद्धती बनविल्या गेल्या आहेत त्यांचे परिणाम इतके भयानक आहेत की त्यांचा योग्य अंदाज करणे अत्यंत कठीण आहे. 

गरजेपेक्षा जास्त अर्थसाधनांना व अधिकाधिक संसाधनांनी ताब्यात आणण्यासाठी उपयोग करण्याचे दोन प्रकार आहेत. 

या साधनांना व्याजावर कर्ज दिले त्यांना व्यापारी आणि औद्योगिक कार्यामध्ये लावले जावे. या दोन्ही विधी जर निसर्गात एक दुसऱ्या पेक्षा वेगळे जरूर आहेत. परंतु दोन्हीचा संयुक्त रूपाने व्यवहरात असण्याचा स्वाभाविक परिणाम हा होत असतो की समाज दोन्ही वर्गामध्ये विभागला जातो.एक तो अल्प वर्ग जो आपल्या गरजांपेक्षा अधिक संसाधन बाळगतो आणि आपल्या साधनांना आणखी संसाधन प्राप्त करण्यासाठी लावून देतो दुसरा तो मोठा वर्ग जो आपल्या आवश्‍यकतेनुसार किंवा त्यापेक्षा कमी संसाधन ठेवत असतो किंवा काहीच ठेवत नाही या दोन्ही वर्गाचे हित फक्त एक दुसऱ्यांच्या विरुद्धच राहत नाही तर त्यांच्यात संघर्ष आणि वाद उभा राहात असतो. अशा प्रकारे मानवाची अर्थव्यवस्था निसर्गाने विनिमय आणि पारंपारिक देवान-घेवाणाला ज्याचा आधार वाढविला होता. तो एक प्रकारे पारस्परिक युद्धात स्थापित होऊन राहून जातो. मग हा संघर्ष इतका वाढत जातो की, श्रीमंत वर्ग संख्येत कमी आणि गरीब वर्ग अधिक होत जातो, कारण हा संघर्ष आहेच काही अशा प्रकारचा की जो जास्त श्रीमंत आहे तो आपल्या धनाच्या जोरावर कमी धनवान लोकांचे संसाधन सुद्धा ओढून घेतो आणि त्याला गरीब वर्गात लोटून देतो. याप्रकारे पृथ्वीचे आर्थिक संसाधन दिवसेंदिवस लोकसंख्येच्या कमीत कमी भागाजवळ जमा होते आणि दिवसेंदिवस लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग गरीब किंवा धनवानांचा आश्रित होत जातो.

प्रारंभी हे युद्ध आणि संघर्ष लहान प्रमाणावर सुरू होते. मग वाढत वाढत देश आणि राष्ट्रापर्यंत पसरते. इथ पर्यंत कि सर्व जगाला आपल्या सापळ्यात घेऊन सुद्धा त्याचे पोट भरत नाही. प्रकार हा आहे की जेव्हा एका देशाचा सार्वत्रिक कायदा हा होऊन जातो की ज्या लोकांजवळ आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल त्यांनी आपला अतिरिक्त माल लाभकारी कामांमध्ये लावावा आणि हा माल गरजेच्या सामग्री निर्माणावर खर्च व्हावा. तर त्यांच्या लावलेल्या पूर्ण रकमेचे लाभा सोबत परतणे या गोष्टीवर अवलंबून असते की जितक्या वस्तू देशात तयार झाल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व त्याच देशात विकत घेतल्या जाव्यात. परंतु व्यवहारतः असे होत नाही आणि वास्तवात हे होऊही शकत नाही. कारण गरजेपेक्षा कमी माल ठेवणाऱ्यांनाची क्रयशक्ती कमी असते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त धन ठेवणाऱ्यांना ही चिंता असते की, जितकी मिळकत व्हावी त्यातून एक भाग वाचवून लाभकारी कामात लावावा. यासाठी ते आपले सर्व धन खरेदीवर खर्च करत नाहीत. या प्रकारे अनिवार्य रुपाने तयार केलेल्या मालाचा एक भाग न विकता राहून जातो. याचा दुसरा अर्थ हा आहे की भांडवलदारांनी लावलेल्या रकमेचा एक भाग न गुंतविता राहून गेला आणि ही रक्कम देशाच्या उद्योगावर कर्ज म्हणून राहिली. ही केवळ एका चक्राची परिस्थिती आहे. तुम्ही अनुमान करू शकता की अशी जितकी चक्रे होतील त्यातून प्रत्येकात श्रीमंत वर्ग आपल्या प्राप्त आवकेचा एक भाग पुन्हा लाभकारी कामांमध्ये लावत जाईल, आणि जी रक्कम परत मिळण्यापासून राहिलेली आहे त्याचे प्रमाण प्रत्येक चक्रात वाढत जाईल. तसेच देशाच्या उद्योगावर अशा कर्जाचे ओझे दुप्पट, चौपट, हजारपट होत जाईल. ज्याला तो देश स्वतः कधीही फेडू शकत नाही. आज सर्वत्र हीच परिस्थिती आहे. या प्रकारे एका देशाला दिवाळखोरीचा जो धोका येऊन उभा राहतो त्यापासून वाचण्याचा उपाय याशिवाय काही नाही की जितका माल देशात विकण्याचा राहून जातो त्याला दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकावा. म्हणजे असे देश शोधावेत ज्यांच्याकडे हे देश आपल्या दिवाळखोरीला स्थलांतरित करून टाकतील. या प्रकारे हे युद्ध किंवा संघर्ष देशांच्या सीमा पार करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाय ठेवतात. आता हे स्पष्ट आहे की कोणी एक देश असा नाही की जो या सैतानी व्यवस्थेवर चालत असेल. जगाच्या सर्वच देशांची ही स्थिती आहे. ते स्वतः आपल्याला दिवाळखोरी पासून वाचविण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांत आपल्या दिवाळखोरीला एखाद्या दुसऱ्या देशा वर टाकून देण्यासाठी विवश झाले आहेत. या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धा सुरू होते आणि ती काही रूपामध्ये विभागली जाते.

1- प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय बाजारात आपला माल विकण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी लागवडीवर अधिकाधिक माल तयार करावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांचे वेतन खूप कमी ठेवले जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारात देशाच्या सामान्य जनतेला इतका कमी वाटा मिळतो की तिच्या मौलिक गरजाही पूर्ण होत नाहीत.

2- प्रत्येक देश आपल्या सीमेत आणि त्या क्षेत्रात जे त्याच्या प्रभावात असतात दुसऱ्या देशाचा माल येण्यावर प्रतिबंध लावतो. कच्च्या मालाच्या उत्पादनाची जितकी साधने त्याच्या अधिकारात आहेत त्यांच्यावरही पहारा बसवितो, कारण दुसरा त्यापासून लाभ घेऊ शकणार नाही. याने आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतो. याचा परिणाम युद्ध आहे.

3- जे देश या दिवाळखोरीच्या संकटाला आपल्या डोक्यावर येण्यापासून रोखू शकत नाहीत त्यांच्यावर लुटारू तुटून पडतात आणि फक्त आपल्या देशाचा उरलासुरला माल त्यांच्यात विकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर ज्या धनाला स्वतः आपल्या इथे लाभकारी कामांमध्ये लावण्याची आवश्यकता राहत नाही, त्यालाही या देशामध्ये नेऊन लावतात. याप्रकारे शेवटी त्या देशांमध्येही हीच समस्या निर्माण होऊन जाते जो प्रारंभी पैसा लावणाऱ्या देशांमध्ये निर्माण झाली होती. म्हणजे जितका पैसा तिथे लावला जातो तो सर्वच्या सर्व वसुली होऊ शकत नाही त्या पैशाने जितकी मिळकत होते तिचा एक मोठा भाग पुन्हा त्यापेक्षा अधिक लाभकारी कामांमध्ये लावून दिला जातो इथपर्यंत की त्या देशावर कर्जाचे ओझे इतके वाढत जाते की त्या देशात स्वतःस विकून दिले गेले तरी सुद्धा लावलेल्या एकूण रकमेची परतफेड होऊ शकत नाही.

(क्रमशः, भाग - २)

 

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



बंधुनो, सध्या या जगात केवळ मुस्लिमच ते भाग्यवान आहेत ज्यांच्याजवळ अल्लाहची वाणी अगदी सुरक्षित, सर्व प्रकारच्या फेरफारापासून मुक्त, अगदी त्याच शब्दांत उपस्थित आहे ज्या शब्दांत ती अल्लाहचे अंतिम प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यावर उतरली होती. असे असूनदेखील या वेळी जगात मुस्लिमच ते दुर्दैवी लोक आहेत जे स्वत:जवळ अल्लाहची वाणी बाळगतात आणि तरीसुद्धा तिच्या समृद्धी व असीम आणि असंख्य देणग्यांपासून वंचित आहेत. पवित्र कुरआन त्यांच्याकडे अशासाठी पाठविला गेला होता की त्याचे पठण करावे, समजून घ्यावे, त्यानुसार कृती करावी आणि त्याच्या आधारे अल्लाहच्या पृथ्वीवर अल्लाहच्या कायद्यानुसार राज्य स्थापित केले जावे. तो त्यांना सन्मान व शक्ती प्रदान करण्यासाठी आला होता. तो त्यांना पृथ्वीवर अल्लाहचा उत्तराधिकारी बनविण्यासाठी आला होता. इतिहास साक्ष आहे की जेव्हा त्यांनी त्याच्या आदेशानुसार कृती केली तेव्हा त्याने त्यांना जगाचा मार्गदर्शक व प्रमुखसुद्धा बनवून दाखविले. परंतु आता त्यांच्या दृष्टीने कुरआनची उपयुक्तता याशिवाय काही उरली नाही की घरात त्याला ठेवून भूत-पिशाच्यांना पळवून लावावे, त्याच्या आयती लिहून गळ्यात बांधाव्यात आणि घोळून प्यावे आणि केवळ पुण्यप्राप्तीसाठी काहीही आकलन न होता त्याचे पठण केले जावे.

आता हे कुरआनकडे आपल्या जीवनाच्या प्रश्नावर मार्गदर्शनाची याचना करीत नाहीत. त्याच्याकडे विचारणा करीत नाहीत की, आमच्या श्रद्धा काय असाव्यात? आमची कर्मे काय असावीत? आमची चारित्र्ये कशी असावीत? आम्ही देवाण-घेवाण कशाप्रकारे करावी? मैत्री व शत्रुत्वात कोणत्या नियमांचे पालन करावे? अल्लाहच्या दासांचे व आमच्या स्वत:चे आमच्यावर कोणते हक्क आहेत व आम्ही ते कोणत्या प्रकारे द्यावेत?आमच्यासाठी सत्य काय आहे व असत्य काय? आम्हाला कोणाच्या आज्ञेचे पालन करावयास हवे आणि कोणाची अवज्ञा? कोणाशी संबंध ठेवावा आणि कोणाशी ठेवू नये? आमचा कोण मित्र व कोण शत्रु? आमचा विचार करता आमची प्रतिष्ठा, कल्याण व लाभ कोणत्या गोष्टीत आहे आणि अपमान व अपयश कोणत्या गोष्टीत आहे?

या सर्व गोष्टींची विचारणा पवित्र कुरआनकडे करण्याचे मुस्लिमांनी सोडून दिले आहे. आता हे नास्तिक व अनेकेश्वरवाद्याना, मार्गभ्रष्ट व स्वार्थी लोकांना व स्वत: आपल्या मनातील शैतानाला या गोष्टी विचारतात आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार वागतात. म्हणून अल्लाहला सोडून दुसऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचे जे परिणाम व्हावयास हवे होते तेच झाले. आणि तेच परिणाम आज हे हिंदुस्तानमध्ये, चीन व जावामध्ये, पलेस्टाईन व सीरियात, अल्जीरिया व मोरोक्कोमध्ये, सर्व ठिकाणी अत्यंत वाईटप्रकारे भोगत आहेत.

पवित्र कुरआन तर मांगल्याचा स्रोत आहे. जितक्या व जशा मांगल्याची मागणी तुम्ही त्याच्याकडून कराल हा तुम्हाला देईल. तुम्ही याच्याकडे केवळ भूत पिशाच्चांना पळविणे व खोकला आणि तापाचा इलाज व खटल्यात यश व नोकरीची प्राप्ती आणि अशाच प्रकारच्या तुच्छ व हलक्या गोष्टींची मागणी कराल तर त्याच तुम्हाला मिळतील. जगातील बादशाही व पृथ्वीतलाच्या राज्याची मागणी कराल तर तीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, आणि तुमची सर्वांत उंच आठव्या स्वर्गापर्यंत पोहचण्याची मनोकामना असेल तर हा तुम्हाला तेथपर्यंतसुद्धा पोहचवील. ही तर तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी आहे की तुम्ही समुद्राकडे दोन थेंबांची मागणी करता, नाहीतर समुद्र तुम्हाला नदीच प्रदान करण्यास तयार आहे.

सज्जनहो, आमचे मुस्लिम बंधु हसून हसून अल्लाहच्या पवित्र ग्रंथावर जे अत्याचार करत आहेत ते इतके निंदनीय आहेत की स्वत: यानीच जर एखाद्या व्यक्तीला असले चाळे करताना पाहिले तर त्याची टिंगल उडवतील. एवढेच नव्हे तर त्याला वेडा ठरवतील.

तुम्हीच सांगा, एखाद्या माणसाने ‘प्रिस्क्रीप्शन’ म्हणजे औषधाची चिठ्ठी डॉक्टरकडून लिहून आणली आणि चिठ्ठीला कापडात गुंडाळून स्वत:च्या गळ्यात बांधले अथवा ती चिठ्ठी पाण्यात कोळून प्याला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्हाला त्याच्या कृत्यावर हसू येईल की नाही? आणि तुम्ही त्याला मूर्ख समजणार नाही का? परंतु सर्वांत महान डॉक्टराने तुमच्या रोगावर उपचार व कृपेचे जे अनुपम ‘प्रिस्क्रीप्शन’ (औषध योजना) लिहून दिले आहे, त्याच्याशी तुमच्या डोळ्यांदेखत असा दुव्र्यवहार होत आहे!आणि कोणालाही त्याची खंत नाही? कोणीही विचार करीत नाही की औषध-योजनेची चिठ्ठी गळ्यात अडकविण्याची अथवा कोळून पिण्याची वस्तु नव्हे, तर ती अशासाठी असते की तिच्यात दिलेल्या सूचनेनुसार औषधाचा प्रयोग केला जावा.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget