Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की अत्याचार करणअयास मी स्वतःवर देखील निषिद्ध केले आहे. तुम्ही एकमेकांवर अत्याचार करता कामा नये. तुम्ही सर्व भरकटलेले आहात. ज्याला मी मार्ग दाखवला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्याकडे विनंती करा, मी तुम्हाला मार्ग दाखवीन. ज्याला मी अन्न-पाणी दिले, त्या व्यतिरिक्त तुम्ही सर्व भुकेलेले आहात. मला मागा मी तुमच्या जेवणाची सोय करेन. मी ज्याला वस्त्रं दिली त्याशिवाय तुम्ही सर्व निर्वस्त्र आहात. तुम्ही मला विनंती करा, मी तुम्हाला वस्त्रं देईन. माझ्या भक्तांनो! तुम्ही रात्रंदिवस गुन्हा (पाप) करीत असता, तरी मी तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही माझ्याकडे याचना करा मी तुम्हाला क्षमा करेन. तुम्ही मला काही केल्या नुकसान पोहचवू शकतन नाही. तसेच माझं काही भलं करण्याची क्षमता देखील तुमच्यात नाही. माझ्या भक्तोहो, जगातील सुरुपातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्यांनी जरी सदाचार केला तरी देखील माझ्या अधिराज्यात यामुळे काही वाढ होणार नाही. तसेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्या माणसांनी वाईट माणसासारखे वागले तरी देखील माझ्या अधिराज्यामध्ये कोणती कसर होणार नाही. सुरुवातीपासून या जगाच्या अंतापर्यंतच्या साऱ्या माणसांनी एखाद्या मैदानात एकत्र येऊन आपापल्या इच्छेनुसार जे काही मागितले ते सर्व मी त्यांना देऊन टाकले. तरीदेखील समुद्रात एखादी सुई बुडवून बाहेर काढल्यावर तिच्या टोकाला जेवढे पाणी लागले असेल तेवढीदेखील कमी माझ्या खजिन्यात होणार नाही. माझ्या भक्तहो, तुमचे कर्म मी मोजून ठेवत असतो आणि त्यानुसारच तुम्हाला मोबदला देतो. तेव्हा ज्या कुणाला जे काही भलं लाभलं असेल त्यांनी माझे आभार मानावे आणि ज्याला दुसरं काही मिळेल त्यासाठी त्याने स्वतःचीच निंदा करावी.           (संदर्भ – हजरत अबू जर (र), मुस्लिम)

पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो,

‘‘मी मानवांवर अत्याचार करणारा नाही.’’ (सूरह – काफ : ३९)

‘‘अल्लाहला आपल्या दासांवर अत्याचार करण्याची कोणती इच्छा नाही.’’

(सूरह – अलमोमिन : ३१)

‘‘जगवासीयांवर अत्याचार करण्याची अल्लाहची मुळीच इच्छा नाही.’’

(सूरह – आलेइमरान : १०)



बेटी के लिए वक्त-ए-बधाई है

माँ के लिए वक्त-ए-जुदाई है

रस्मे तआम जबसे निकाह में आयी है

इस रस्म ने बडी तबाही मचाई है

ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है

दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है. 

लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.

इस्लाममध्ये निकाहची संकल्पना

रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई

गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई

 प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)

की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).

आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अ‍ॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत. 

विवाह सोपा करा

ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है

ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है

विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.

         मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! ... प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले. 

     भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.  ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे. 

अल-मारूफ वल-मशरूत

         एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.

निकाह सोपा करा 

       इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत. 

इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत. 

      काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की -  

         एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.

 एक अनाहुत संकट  

         ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही. 

केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे. 

        एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील. 

         आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.  

काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.

        मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.

           लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक - वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल. 

शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,  ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.) 

- एम. आय. शेख



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि हाताने मुस्लिम सुरक्षित आहेत ती व्यक्ती मुस्लिम आहे. म्हणजे एक मुस्लिम कुणाला वाईट बोलत नसेल आणि कुणाला शारीरिक त्रास देत नसेल तर अशी व्यक्ती मुस्लिम आहे.

ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात, एका व्यक्तीने प्रेषितांकडे इस्लामच्या बाबतीत विचारणा केली असता प्रेषित (स.) म्हणाले, ‘तुम्ही ज्या लोकांना ओळखता आणि ज्यांच्याशी तुमची ओळख नसेल तर अशांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा उच्चतम इस्लाम आहे.’

ह. हुरैरा यांनी म्हटले आहे की रात्री रस्ता दिसण्यासाठी जसे गावात, शहरांमध्ये प्रकाशाची सोय करण्यासाठी लाईटचे खांब असतात. तसेच इस्लामची वाट दाखवण्यासाठी अल्लाहची भक्ती, त्याच्याबरोबर कुणाला भागीदार न जोडणे, नियमित नमाज अदा करणे, जकात देणे, रोजे ठेणे या सर्व गोष्टी इस्लामचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशाचे दिवे आहेत. याचबरोबर भल्या गोष्टी लोकांना सांगत राहाणे, वाईटापासून त्यांना रोखणे. आदम (अ.) यांच्या सतती (सबंध मानवजातीतील लोकांना) सलाम करणे, घरात गेल्यावर घरच्या लोकांना सलाम करणे हे सर्व इस्लामचे दीपस्तंभ आहेत. मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. एकमेकांनी दुसऱ्यावर अत्याचार करू नये. त्याला अपमानित करू नये. जर कुणी दुसऱ्या मुस्लिमाचा अपमान करत असेल तकर त्याला वाईट समजण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. प्रत्येक मुस्लिमावर दुसऱ्या मुस्लिमाचे रक्त सांडणे, त्याची मालमत्ता हडप करणे आणि त्याची मानहानी करणे निषिद्ध आहे.

ह. उमरो बिन अतबा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना विचारले, इस्लाम म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, ‘सभ्य बोलणे आणि लोकांना जेवू घालणे.’ मी परत विचारले, ईमान (श्रद्धा) काय आहे? ‘संयम ठेवणे आणि मनाची उदारता.’ कोणता इस्लाम उच्चतम आहे? मी पुन्हा विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतील. तसेच उदार मनाने लोकांशी संभाषण करणे.’ (हदीस : मुस्नद अहमद)

सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम तो जो चारित्र्यसंपन्न असेल. प्रेषित म्हणतात, सर्वश्रेष्ठ ईमान (श्रद्धा) ही आहे की तुम्ही जिथे कुठे असाल अल्लाह तुमच्या संगे आहे याची जाणीव ठेवणे होय.

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा असा उच्चा केला की ‘अल्लाहची शपथ, ती व्यक्ती श्रद्धावंत होऊच शकत नाही ज्याच्या वाईट वृत्ती आणि इजा पोहोचण्यापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.’



1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही.

ती खूप आनंदात होती. तिला बाबांसोबत बाहेर जायचे होते ना. आईने तिला छान तयार केले होते. बाबांचा हात धरून बाहेर पडताना तिला व तिच्या आईला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार? कदाचित थोडाही संशय आला असता तर तिच्या आईने तिला बाबांसोबत जावू दिले नसते. बाबांसोबत चालता-चालता ती एका सुनसान रानात आली होती. तेथे बाबांनी माती खणायला सुरुवात केली. ते खणत असताना जी माती बाबांच्या कपड्यांवर, तोंडवर लागत होती ते तिला बघवत नव्हते. आपल्या लहानशा हातांनी ती बाबांच्या अंगावरची माती झटकत, तोंडावर लागलेली माती आपल्या चिमुकल्या हातांनी साफ करत. हे करत असताना तिचे प्रश्न चालू होते की बाबा आपण कोठे आलो आहोत ? आपल्याला तर फिरायला जायचे होते ना? ही मध्येच आपण काय काम काढलात? बाबा ! हा खड्डा कशासाठी? बाबा लवकर चला ना कधी जायचंय? पण बाबा काही न सांगता आपल्या कामातच मग्न होते. खड्डा पूर्ण करून झाल्यावर त्यांनी त्या चिमुकलीला खड्ड्याच्या कडेला उभी करून त्यात तिला ढकलून दिले. ती ओरडत होती परंतु, बाबा तिच्या अंगावर सरसर माती टाकत होता, ती रडत होती, ओरडत होती बाबा हे काय करता, मला वाचवा ना!  बाबा असे करू नका म्हणत तिने आपले प्राण सोडले. अशा सत्य घटना प्रेषित सल्ल. जगात येण्याच्या पूर्वी सतत होत असत. 

स्वतःच्या मुलीला खड्डा खणून जिवंत पुरणे किती ही क्रूरता? त्या माणसाला दया नाही का आली? एवढे निर्दयी कसे होऊ शकते कोणी? ही सत्य घटना त्या इसमाने येऊन प्रेषित मुहम्मद  सल्ल. यांना सांगितली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सलम् यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्यालाही डोळ्यांत आले असेल अश्रू नसेल आले तर आणण्याचा प्रयत्न करा, तरी येत नसतील तर रडल्यासारखा चेहरा करून आपले संवेदनशीलतेचे पुरावा द्या, स्त्री जातीसाठी. स्त्रीची अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. काही कबिले आपल्या मुलींना जिवंत पुरून टाकायचे तर काही प्रसूतीच्या वेळेस एक खड्डा तयार ठेवायचे. मुलगी जन्मल्याबरोबरच तिला पुरून टाकायचे.  आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खंडा खाण्याची गरज नाही नऊ महिने वाट पहायची सुद्धा गरज नाही. चौथा महिना झाला की तपासणी करून स्त्री भ्रून हत्या करण्यात येते.  यावर कायदेशीर प्रतिबंध असले तरी हे कुकर्म थांबत नाही. केवळ आपल्या भारतातच दरवर्षी पाच लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात आणि जगात याबाबतीत भारत सर्वप्रथम येतो. लग्नाच्यावेळी भली मोठी भीक (हुंडापद्धती) मुळे लोक लेकीला ओझे समजतात व या जगात येण्याचा त्यांचा अधिकार देत नाहीत. भारताच्या मागे चीन आणि पाकिस्तान चा नंबर येतो. भारतातही आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यातही परळी वैजनाथ ते गर्भपात केंद्राचे गाव म्हणून कुख्यात आहे. 

महाराष्ट्रातील सहा वर्षाखालील बालिकांचे दरहजारी प्रमाण 913 मुली असे होते. 2001 साली हे प्रमाण 883 पर्यंत घसरले. गेल्या दहा वर्षात 4 लाख 68 हजार 480 स्त्री भ्रूणहत्या झाल्याचे नमूद केले आहे. 1994 मध्ये गर्भलिंगनिदान करणे हे फौजदारी कृत्य म्हणून घोषित केले गेले. व सोनोग्राफी करतांना लिंग सांगणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद केली गेली. पीसीपीएनडीटी अ‍ॅ्नट गर्भधारणापूर्वी व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध करणारा कायदा 1994 असे म्हणतात. केंद्र सरकारचा निर्णय 1 जानेवारी 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला तरी आजही स्त्रीला अशक्त तुच्छ समजलं जातं. जावईचे नखरे उचलणे पसंत करत नाही. अरबमध्ये रोजच्या युद्धामध्ये लेकिला कैदी बनविले जायचे. स्त्रीची सुरक्षा करावी लागते आणि ती सुरक्षित नव्हती म्हणून तिला पसंत नाही करायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार बंद झाला. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ आणि स्मरण करा ती वेळ जेव्हा जीवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली.’’ (सुरे अलत्नवीर आयत क्र.9). एकीकडे मुलीसोबत अत्याचार करण्यास नरकाचे यातनामय जीवन तर दूसरीकडे त्या लोकांना आनंदाची वार्ता देण्यात आली ज्यांनी मुलीवर अत्याचार न करता सद्व्यवहार केला आणि मुला-मुली दोघांनाही समान वागणूक दिली. त्यांच्याशी वागतांना कुठलाही भेदभाव केला नाही किंवा करत नाही. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास रजि. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे कथन कथित करतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्या माणसाला मुलगी झाली त्याने न तिला जीवंत पुरावे न गाडावे न तिला अपमानास्पद वागणूक द्यावी न तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे तेव्हा ईश्वर त्याला जन्नतमध्ये दाखल करेल. (अबु दाऊद)

म्हणजेच 1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही. इस्लाममध्ये मुलीच्या पालनपोषणास विशेष प्रोत्साहन दिले आहे व या कामाला एक पवित्र कर्तव्य घोषित केले आहे. बुखारी व मुस्लिमच्या हदीसमध्ये आलेले आहे की, कन्या देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमाविले आणि त्या माणसाने आपल्या मुलीशी सद्व्यवहार केला तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार त्याच्या नरकाग्नीपासून बचावाचे साधन होईल.’’ जो माणूस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरूण होईपर्यंत करील निवाड्याच्या दिवशी मी आणि तो असे असतील हे सांगतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली दोन बोटे जोडली. (मुस्लिम)

ज्ञान नसेल तर जगून काय उपयोग

स्त्री म्हणजे निम्मी मनुष्य जात. मानव समाजाचा अर्धा वाटा तिचाच. स्त्री ज्ञानी तर पुढची पीढिही ज्ञानी. म्हणून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणावरही जोर देण्यात येतो. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी महिलांना दीन आणि दुनिया दोघांचेही ज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले. ज्ञानाशिवाय, आचरण अशक्य असते. म्हणून धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे स्त्री पुरूष दोघांवरही अनिवार्य आहे. ज्ञान प्राप्त करणे स्त्रीचा कायदेशीर हक्क आहे. स्त्री जर अज्ञानी असेल तर लग्नाआधी तिच्या पित्याचे व लग्नानंतर तिच्या पतीचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी तिला ज्ञान द्यावे. अथवा अशी व्यवस्था करावी की तिला शिक्षण मिळावे. नैतिक मर्यादांचे पालन करून शिक्षण मिळविण्यासाठी ती घराबाहेरही पडू शकते आणि तिच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही. प्रेषित सल्ल. यांच्या काळात एकीकडे मुलांना कुरआन तोंडपाठ असायचे तर दूसरीकडे घुडस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजीतही त्या तज्ञ असायच्या. एवढेच नव्हे तर वैद्यकीय ज्ञानही मुलींना अवगत होते. इलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या 1847 मध्ये जगातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आनंदीबाई जोशी कल्याण या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून 1886 मध्ये पुढे आल्या. हजरत आएशा रजि. यांच्या विवाहावर आक्षेप घेणाऱ्यांना माहीत असायला हवे की, आनंदीबाईचा विवाह ही वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे गोपाळरावांशी झाला होता. असो त्या एकच वर्षे डॉ्नटर म्हणून जगल्या. 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

रूफैदा अल असलमिया या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉ्नटर. खरं तर जगातल्याच पहिल्या महिला डॉ्नटर म्हटले तरी बरोबर होईल. कारण त्या आजपासून 1400 वर्षापासून मस्जिदे नबवीजवळ आपली वैद्यकीय सेवा देत. शिक्षणाच्या क्षेत्रात माननीय आएशा रजि. माननीय सफिया रजि., माननीय आसमा बिन बिन्ते अबुबकर रजि., माननीय फातेचा बिन कैस रजि., माननीय उम्मे हबीबा रजि., माननीय खौला रजि. यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो स्त्रिचा विवाह. अनादी काळापासून स्त्रीला विवाहाच्या बाबतीत तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिच्या परिवारातील आई-वडिल आणि बुजूर्ग मंडळी ज्या व्यक्तीबरोबर विवाह करवून देतील निमुटपणे तिला तो निर्णय स्वीकारावा लागेल. त्याविरूद्ध एक शब्दही बोलण्यास तिला अधिकार नव्हता. कोणत्याही मुलीचे आईवडिल तिच्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि मुलीचे शत्रू नसतात आणि शुभचिंतक असतात. मुलींपेक्षा मुलीच्या चांगल्या-वाईटाची त्यांना जास्त काळजी असते. म्हणून तिच्या चांगल्या भविष्याचे निर्णय तेच घेऊ शकतात ही धारणा काही प्रमाणात सत्य असली तरी ही गोष्ट कधीच योग्य नाही की स्त्रीवर तिच्या आवडीविरूद्ध विवाहाचा निर्णय थोपवावा. इस्लाममध्ये विवाहाच्या बाबतीत पालकाच्या मर्जीला महत्व जरूर दिलेले आहे परंतु, विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेमध्ये मुलींच्या पसंतीचीही नोंद घेण्यास      -(उर्वरित आतील पान 7 वर)

समाजाला बाध्य केलेले आहे. माननीय अबु हुरैरा रजि. प्रेषितांचे कथन करतात की, त्यांनी एकवेळेस सांगितले, ’’ विधवा आणि तलाकपीढित स्त्रीचा विवाह त्यांचे मत माहित होईपर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगीशिवाय होवू शकत नाही. (बुखारी व मुस्लिम). यावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सोबती (रजि.) यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तीची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तीचे मौन धारण करणे हीच तिची परवानगी समजण्यात येईल. जर एखाद्या स्त्रीच्या पालकाने तिचा विवाह केला व त्यास स्त्रीने या विवाहास मान्यता दिली नाही तर हा विवाह रद्दबातल ठरणार. माननीय खन्सा (रजि.) यांचा विवाह त्यांच्या मर्जीविरूद्ध वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी तो रद्दबातल ठरविला.

आपल्याला कोणी भेट वस्तू दिली तर काय होते? खूप आनंद होतो आणि भेट देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण होते. मग आपणही त्याला काही भेट द्यावी, असे वाटते. महेर एक सुंदर भेट आहे. जी पती आपल्या पत्नीला देतो. नवीन जीवनाची सुरूवात या प्रकारे एका सुंदर पद्धतीने होते. 

’’ आणि स्त्रीयांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः  स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता’’ महेर हा केवळ स्त्रीचाच अधिकार आहे. शरियतद्वारे महेर किती असावे याची काही मर्यादा निश्चित केलेली नाही. ती माणसाच्या आर्थीक कुवतीच्या प्रमाणात कमी जास्त असू शकते. इस्लामने महिलांवर पैसा कमाविण्याची जबाबदारी अजिबात टाकली नाही. लग्नाआधी पिता व लग्नानंतर पती यांच्यावर तिच्या खर्चाची जबाबदारी टाकलेली आहे. घराचे काम करणे बंधनकारक नाही. उलट जर कोणती स्त्री ते करत असेल तर तर हे तीचे कुटुंब प्रमुखावर उपकार समजण्यात येईल व तिलाही पुन्य मिळेल. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य व संपत्ती बाळगण्याचा अधिकार तिला आहे. आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क आहे. हा अधिकार इस्लामने 1443 वर्षापूर्वी दिला. तर भारतात आपल्या घटनेद्वारे 1956 मध्ये तो महिलांना मिळाला. 

स्त्रीच्या अब्रूवर दोन प्रकारे हल्ले होतात. एक तिच्यावर व्याभीचाराचा आरोप लावून तिच्यावर मानसिक हल्ला केला जातो आणि दूसरे म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक अत्याचार दिला जातो. आपल्या देशात दररोज साधारणपणे 77 बलात्काराच्या घटना होतात. एखाद्या स्त्रीवर व्याभीचाराचा आरोप सिद्ध झाला तर तिला 80 फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. जबरी लैंगिक अत्याचार केल्यास बलात्काराला तो अविवाहित असेल तर 100 फटके व विवाहित असेल तर रजम म्हणजे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने दिलेली आहे. जी शिक्षा नैसर्गिक आहे. याचा अंदाज अनेक धर्मनिरपेक्ष लोकांनी याच शिक्षेची मागणी निर्भया, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डी, आसिफा इत्यादींच्या वेळी केली होती. या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास बलात्काराचे प्रमाण निश्चित कमी होणार हे एक सत्य आहे. ज्या देशात या शिक्षेची अंमलबजावणी होते त्या देशाचे बलात्काराचे प्रमाण शुन्यवत आहे. प्रेषित सल्ल. यांच्या काळात तर एक महिला अंगभर सोन्याचे दागिने घालून प्रवास करीत होती. तेव्हा तिला जनावराव्यतिरिक्त कोणाची भीती नव्हती. 

प्रेषित सल्ल. यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहेत. त्यांना अल्लाहच्या आदेशावरून जे बदल समाजामध्ये घडवून आणले त्याचे दूसरे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच मिळणार नाही. 

घडस्फोटाला भयानक समजणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, कोणत्याही दाम्पत्याच्या जीवनात अगदी शेवटच्या टोकाचा क्षण येतो. जेव्हा पती व पत्नीच्या स्वभावात अनुकूलता व समन्वय नसल्याने संसाराची गाडी चालविणे अवघड होते. दररोजच्या भांडणामुळे बळजबरीने एकत्र राहून जीवन नरकासारखे होते. तेव्हाच शरियतने घडस्फोटाची परवानगी दिली. जेणेकरून दोघांना वेगळे होवून नवीन जोडीदार निवडून शांतीने जगता यावे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल किती जरी लिहिले तरी मन भरत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. वाचकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सखोल अभ्यास केल्याशिवाय, त्यांनी स्त्रीयांवर केलेले उपकार कळू शकत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की वाचकांनी प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा खोल अभ्यास करावा. अल्लाह सर्व पुरूषांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून स्त्रीयांचे अधिकार देण्याची सद्बुद्धी देवो, आमीन. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक उगवणाऱ्या सू्र्यासोबतच तुमच्यावर दानधर्म करणे अनिवार्य होते. दोन माणसांमध्ये न्याय करणे, एखाद्याला गाडीत स्वार होताना मदतीचा हात देणे, त्यांचे सामान उचलून गाडीत ठेवणे, लोकांना भलाईच्या गोष्टी सांगणे ही सर्व जणू दानधर्माची कार्ये आहेत. तसेच नमाजसाठी मशिदीकडे जाणे. जाताना रस्त्यात कुणाला इजा होईल अशी वस्तू रस्त्यावर दिसल्यास ती बाजुला सारणे या सगळ्या गोष्टी दान करण्यासारख्या आहेत. कुणाला वाईट कृत्यापासून रोखणे हेदेखील दान केल्यासारखे आहे. (संदर्भ – अबु हुरैरा, बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”

नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget