Latest Post

आदर्श इस्लामी निकाहची पहिल्यांदाच प्रचिती : प्रा.डॉ.रणजित जाधव


लातूर (बशीर शेख) 

लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट आणि कठीन असेल, वायफळ खर्च करून झालेला असेल तर ते कुटुंब, समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही. इस्लाममध्ये लग्न फक्त एक इबादत (उपासना) आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांची सुन्नत (अनुकरण) आहे. आणि एक सामाजिक करार आहे. याचीच प्रचिती लातूर येथे मुहम्मद युनूस पटेल यांच्या मुलीच्या निकाह दरम्यान उपस्थितांना आली. दोन मुस्लिम गवाह, दोन हिंदू निरीक्षक आणि दोन खजुरांच्या अल्पोपहारात साधा, सोपा आणि अध्यात्मिक वातावरणात निकाह संपन्न झाला

लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या महेबुबीया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदचे सदस्य युनूस पटेल यांची सुकन्या अनम जोहरा आणि बीदरचे रहिवाशी मुहम्मद जहीर यांचे चिरंजीव मुहम्मद सुलेमान यांचा निकाह 22 नोव्हेंबर रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्ये असे की, अतिशय पवित्र वातावरणात मस्जिदीत निकाह झाला. यात कुठल्याही प्रकारचा आवाजवी खर्च झाला नाही. मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला नाही. दहेजच्या नावाखाली कुठल्याही वस्तू दिल्या नाहीत उलट वर सुलेमान यांनी 50000 रुपये रोख वधू अनम जोहरा हिला महेर (भेट) म्हणून दिले. याप्रसंगी इस्लामी लग्न हा एक सामाजिक करार आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वधर्मीय 50-55 बांधवांच्या उपस्थितीत, अल्पोपहार म्हणून फक्त दोन खजूर आणि पाणी देण्यात आले. निकाह-ए-खुत्बा (विवाह विधी) वधूचे पिता मुहम्मद युनूस पटेल यांनी पठण केला. 

विवाहात प्रारंभी वधू अनम जोहरा हिची सम्मती वकील आणि साक्षीदार यांनी घेतल्याची घोषणा वकील अश्फाक अहमद (अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद लातूर) यांनी केली. त्या नंतर करार पत्रावर वर मोहम्मद सुलेमान मोहम्मद जहीर अहमद  यांनी सही केली. यावेळी साक्षीदार म्हणून सय्यद अब्दुल रऊफ लातूर आणि शहरीयाज पटेल बिदर हे उपस्थित होते. या निकाहचे विशेष निरीक्षक म्हणून शाहू महाविद्यालयातील प्रा.डॉ. रणजीत जाधव  (अध्यक्ष कबीर प्रतिष्ठान लातूर) आणि  प्रा.डॉ. अनिल जायभाये (समाजशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर) उपस्थित होते. 

या प्रसंगी औरंगाबादहुन आलेले जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र संदेश विभागाचे सचिव प्रा. वाजिद अली खान, यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यात इस्लामी निकाह म्हणजे काय असतो? तो कसा असतो? या प्रसंगी काय वाचले जाते? कुरानच्या आयतींचा अर्थ वगैरे समजून सांगितला.

यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान म्हणाले, ’’विवाह एक सोहळा नसून ती एक प्रार्थना आहे. विवाहाला इस्लामने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचे आवाहन करत तो कसा असावा याची नियमावली सांगितली आहे. विवाह त्याच पुरूषाला करण्याचे आवाहन केले आहे जो त्याला निभावण्याची ऐपत राखतो. ज्याला वाटते की आपण विवाह व त्यानंतर येणारी जबाबदारी पार पाडू शकत नाही त्याने विवाह न केलेलाच बरा. कारण विवाहानंतर सगळी जबाबदारी पुरूषावरच असते. आज आपण पाहिलात की विवाहाप्रसंगी मुलीच्या पित्याकडून मुलाला काहीही देणेघेणे झाले नाही. उलट वराने मुलीला 50 हजार रूपये नगदी मेहरची रक्कम दिली आणि मुलीला विचारले गेले की तुम्हाला ही रक्कम मंजूर (कुबुल) आहे का, वर कबुल आहे का? ज्यावेळी मुलीने ’कबुल है’ असे साक्षीदार आणि वकीलासमोर म्हटल्यानंतर पुढील विवाहाची कार्यवाही करण्यात आली. मुलीने निकाहनाम्यावर हस्ताक्षर केले. म्हणजेच मुलीच्या मर्जीनुसार विवाह करावा. कारण या विवाहातून पुढील समाजाची, आपआपसातील नात्यांची विण घट्ट बसत असते. या जोडप्यांमध्ये प्रेम, आपुलकीची भावना अधिक निर्माण होते. या दोघांत सामंजस्य असेल तर हे दोघे घराला, समाजाला, देशाला अधिक फायदा पोहोचवू शकतात. त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना ते चांगले संस्कार, शिक्षण देऊन ते देशाला चांगले नागरिकही देवू शकतात.’’ 

निकाहाचे विशेष निरीक्षक प्रा. रणजीत जाधव  याप्रसंगी म्हणाले की, ’’एवढ्या सोप्या पद्धतीने असा विवाह मी पहिल्यांदाच पाहिला आहे. त्यामुळे मी युनूस पटेल आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करतो. आपल्या समाजात जी वाईट पद्धती आहे ती म्हणजे हुंडा पद्धत. आणि जो विवाहात अकारण खर्च होतो ती एक चुकीची पद्धत आहे. मोठ्या व्यक्तींच्या लग्नात होणारा खर्च पाहून गरीब मुलीचा पिता आपल्या मुलीसाठी आपण काहीच करू शकत नसल्याची खंत मनात बाळगून असतो. तो तिच्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावून पैसे जमा करत असतो. त्यालाही वाटते की आपण खर्च करावा, तो व्याजाने पैसे काढतो. मुलीचे लग्न करतो. पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलीचा निकाह केला त्या पद्धतीने जर समाजातील इतर बांधवांनी आपल्या मुलीचे विवाह केले तर अनेक समस्या मिटू शकतील. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येत एक कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे नसणे हे ही आहे.’’ आदर्श इस्लामी निकाहाची आज मला पहिल्यांदाच प्रचिती आल्याचेही प्रा.डॉ. रणजित जाधव म्हणाले. 

उर्दूचे प्रसिद्ध शायर अजय पांडे ’बेवक्त’ याप्रसंगी म्हणाले की, ’’आमचे मित्र मो. युनूसभाई पटेल यांच्या मुलीचे इस्लामी परंपरेनुसार लग्न झाले. अत्यंत साधेपणाने हा विवाह पार पडला. या विवाहाला उपस्थित राहून आम्हाला सुद्धा लग्नामधील नवीन प्रकार पहायला मिळालेला आहे. पटेल परिवाराचे याप्रसंगी अभिनंद करतो. शुभेच्छा देतो.’’ 

याप्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख म्हणाले की, ’’आमचे मित्र युनूस पटेल यांच्या मुलीचा विवाह मस्जिद मध्ये आमच्या उपस्थितीत झाला.  त्यांना व नववधू-वरांना शुभेच्छा. ज्या साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला ते पाहून फार आनंद झाला. मालमत्ता अल्लाहने दिलेली देणगी आहे. समाजात असे होत आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानेच मोठे विवाह करावे आणि ज्याच्याकडे नाही तो करण्यास असमर्थ ठरतो. यासाठी ईश्वराने आम्हाला साध्या पद्धतीने विवाह करण्याची जी शिकवण दिली त्यावर पूर्णरूपाने अमल झाला पाहिजे. या मस्जिदीतील विवाहाप्रसंगी आमचे काही हिंदू बांधवही उपस्थित होते. वधूपिता युनूस पटेल यांच्या स्वभावानुसार ते सर्वधर्मीय बांधवांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहातही सर्वांना बोलावून मस्जिदीत साध्या पद्धतीने विवाह केला. विशेष बाब तर ही आहे की त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात दोन निरीक्षकही हिंदू बांधव होते. ही एकोप्याची दृष्टी पाहूनही फार आनंद झाला. खरे तर लातूर कौमी एकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात पाहत आहोत. या एकतेचा संदेश दूरवर पोहचेल. जो आमच्या मनाला फार आनंद देऊन गेला आहे.’’   

या निकाहसाठी लातूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मोईज शेख, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे माधव बावगे, कवी योगिराज माने, प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रयोगशील शिक्षक नजिउल्लाह शेख यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिलांची उपस्थिती होती. तौफिक  असलम खान (सदस्य केंद्रीय प्रतिनिधी मंडळ जमाते इस्लामी हिंद) यांनी शेवटी दुआ मागितली. युनूस पटेल यांनी आभार मानले.



एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना त्यास काही उपदेश द्यावयास विनंती केली. प्रेषित म्हणाले, ‘‘रागावू नका.’’ त्या व्यक्तीने अनेकदा ही विनंती केली. प्रत्येक वेळी प्रेषितांनी रागावू नका असेच म्हटले. (हदीस – अबू हुरैरा)

तसेच एक दुसरी व्यक्ती प्रेषितांकडे आली आणि म्हणाली, हे प्रेषिता! मला काही शिकवण द्या. पण थोडक्यात सांगा, मला सजता येण्यासारखे. प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (हदीस – अबू हसीन, तिर्मिजी)

हजरत अब्दुल्लाह बिन उमरो म्हणतात, मी प्रेषितांना अल्लाहच्या प्रकोपापासून बचाव करण्यास काय करावे, असे विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (मुसनद अहमद)

तसेच हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक म्हणतात की रागावर नियंत्रण हे सर्वोत्कृष्ट चारित्र्याचे प्रतीक आहे.

एक व्यक्ती प्रेषितांकडे येऊन विचारले की कोणते कर्म सर्वश्रेष्ठ आहे? प्रेषित म्हणाले, ‘‘उच्चतम चारित्र्य.’’ त्यांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर प्रेषित म्हणाले, ‘‘कुणावर रागावू नये.’’

प्रेषितावच्या या शिकवणीचा अर्थ असा की अशी कर्मं करणे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे दर्शन होते. म्हणजे मनाची उदारता, लोकांशी आपुलकी, लाज, नम्रता, कुणास त्यास न देणे, क्षमेचा व्यवहार करणे, कुणाला भेटताना दिलखुलासपणे त्याचे स्वागत करणे.

पवित्र कुरआनात अल्लाह अशा लोकांविषयी म्हणतो की त्यांना राग आला तर त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्यांकडून झालेल्या चुका माफ करतात. अशा प्रकारचे नेक लोक अल्लाहला आवडतात. (पवित्र कुरआन-३:१३४)

प्रेषितावचे एक सेवक हजरत अनस यांनी लहानपणापासून सुमारे दहा वर्षे त्यांची सेवा केली. या दहा वर्षांच्या काळात प्रेषितांनी एकदाही त्यांच्यावर थोडादेखील राग केला नाही. एखादे काम का झाले नाही, असा प्रश्न कधी विचारला नाही. घरातल्यांनी हजरत अनस यांना एकदा कामाबाबतीत विचारले तर प्रेषित म्हणायचे, ‘‘जाऊ द्या, अल्लाहची इच्छा असती तर ते काम झाले असते.’’

प्रेषित म्हणाले, ‘‘राग माणसाच्या मानेभोवतीच्या रिंगीसारखा आहे. अशा परिस्थितीत तो जर उभा असेल तर खाली बसावे, बसलेला असेल तर जमिनीवर झोपावे.’’

प्रेषित म्हणाले, ‘‘रागावणे सैतानाचे कृत्य आहे. सैतानाला आगीपासून निर्माण केले आहे. तेव्हा कुणाला राग आवरला नाही तर त्याने थंड पाण्याने वुजू करावी.’’



पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय.  आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तुलनेत जास्त चालतात. याचाच अर्थ तेथे आणि आता येथेही मनोरूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. म्हणून किमान मुस्लिमांनी आपल्या मुलांचे संगोपन शरियतनुसार करावे.कारण इस्लाम आलाच मुळी सभ्यतेची स्थापना करण्यासाठी आणि ही सुरूवात लहान मुलांपासून करणे अपेक्षित आहे.


वो जिनके होते हैं खुर्शिद आस्तीनों में 

उन्हें कहीं से बुलाओ बडा अंधेरा है

भारतीयांना या गोष्टीचा मोठा अभिमान आहे की, युरोप व अमेरिकेमध्ये आपल्या नागरिकांनी मोठी झेप घेतलेली आहे. सिलीकॉन व्हॅली तर जवळ-जवळ भारतीयांच्या ताब्यात आहे. पण असे का आहे? याचा फारसा कोणी विचार करतांना दिसत नाही. वास्तविक पाहता आम्हा भारतीयांची मागील पिढी कष्टाळू, प्रामाणिक, पापभिरू आणि उच्च नैतिक मुल्यांनी नटलेली शेवटची पिढी होती, म्हणून त्यांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला व स्थानिकांच्या नाकर्तेपणामुळे रिक्त झालेल्या महत्त्वाच्या खुर्च्या आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर मिळविल्या. मात्र त्यांचीच पुढची पिढी त्यांच्यासारखी कर्तृत्वान न निपजता वाया जातांना दिसून येत आहे. नव्या पिढीने समकालीन स्थानिक पिढीचे संस्कार आत्मसात केले असून आता ही पिढी आळशी, उद्धट, अप्रमाणिक असल्याचे दिसून येते. उच्च नितीमुल्यांचा त्यांनी त्याग केलेला आहे. शालेय स्तरापासूनच ड्रग्जचे सेवन व लैंगिक सक्रीयता त्यांना निष्क्रिय करून टाकत आहे. दळणवळणाच्या साधनांची सहज उपलब्धता, सोशल मीडिया, ओटीटी प्लेटफॉर्ममुळे जग एकवटलेले आहे. दर्जेदार मनोरंजनाच्या नावाखाली अनैतिक संबंधांचे उदात्तीकरण करणाऱ्या मालिकांचा सुळसुळाट झालेला आहे. एकंदरित पाश्चिमात्य (अ) सभ्यता युरोप आणि अमेरिकेमधून विस्तारित होऊन आता भारतामध्ये पूर्ती स्थिरावलेली आहे. हे मुंबई क्रूझ ड्रग पार्टीच्या घटनेतून नुकतेच स्पष्ट झालेले आहे. 

चांगली युवा पिढी महागड्या शाळा महाविद्यालयातून नव्हे तर चांगल्या कुटुंबातून निपजते व चांगले कुटुंब चांगल्या मात्यापित्यामुळे निर्माण होते आणि त्यांची वाणवा आजकाल सर्वत्र दिसून येत आहे. जीवनमान उंचावण्याच्या नादात पती-पत्नी दोघेही ’जॉब’ करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतात व रात्री उशीरा घरी येतात. साहजिकच त्यांच्या या दिनचर्येचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. मुलं चांगली निपजावीत म्हणून महागड्या शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. तेथे त्यांना भौतिक शिक्षण जरूर मिळते पण नैतिक शिक्षण मिळत नाही. याचा एकंदरित परिणाम मुलं सुशिक्षित तर होतात पण सुसंस्कृत होत नाहीत. म्हणून आजची तरूण पिढी व्याभिचारी, बलात्कारी, भ्रष्ट, संकीर्ण, जेमतेम योग्यता असलेली पुढे येतांना दिसून येते आणि हा भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेचा अपरिहार्य परिणाम आहे. या व्यवस्थेतून चांगले व्यापारी उद्योजक तर मोठ्या संख्येने निर्माण होतात पण चांगली माणसं निर्माण होत नाहीत. 

मुलांच्या बाल्यवस्थेतील संगोपनाची नैसर्गिक जबाबदारी मातेची असते. पण काही महिन्याच्या मेटर्निटी लिव्ह शिवाय तिला मुलांच्या संगोपनासाठी पुरेशी सुट्टी मिळू शकत नाही. अनेक मातांना दूध पिणारे बाळ पाळणाघरात सोडून ऑफिसला जावे लागते आणि छातीत दाटून आलेले अमृतसमान दूध अक्षरशः पिळून वॉसबेसनमधून वाहून टाकावे लागते. त्यातून बाळाच्या मुलभूत अधिकारांचे हनन तर होतेच स्त्रीला आपल्या मातृत्वाशी तडजोड करावी लागते, हे मोठे दुर्दैव आहे. दूध पिण्याच्या आणि पाजण्याच्या प्रक्रियेतून आई अन् बाळाची जी जवळीक निर्माण होत असते त्यातून मातेचे बाळाप्रती वात्सल्य वाढते. दूध बेसीनमध्ये वाहवल्याने बाळाची आईशी जी शारीरिक सलगी असते ती कमी होते. त्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दोघांनाही भविष्यात भोगावे लागते. मूल आणि मातेमध्ये एका प्रकारचा अदृश्य दुरावा निर्माण होतो, जो मूल जसजसे मोठ होत जाईल तसतसा वाढत जातो.

भ्रष्टाचारातून मिळविलेल्या मिळकतीतून मुलांचे संगोपन

मुलांचे शिक्षण महाग आहे. आई-वडिल दोघेही कमावल्याशिवाय ते पूर्ण करणे शक्य नाही. असा समज व्यापक प्रमाणात निर्माण झाल्यामुळे आई-वडिल मुलांच्या प्राथमिक आयुष्याशी तडजोड करून पैसा कमावण्यासाठी सातत्याने घराबाहेर राहतात. त्यामुळे मुलांचा त्यांच्या जवळीकीचा नैसर्गिक हक्क हिरावल्या जातो. एवढेच नव्हे तर रात्रंदिवस काम व भ्रष्टाचार करून जो प्रचंड पैसा आई-वडिल कमावतात त्यातून मुलं चांगली निपजण्यापेक्षा वाईट निपजतात याची असंख्य उदाहरण आपल्या आजुबाजूला पसरलेली आहेत. भ्रष्टाचार करून मिळविलेल्या संपत्तीतून शिकून मोठे झालेली मुलं पुढे तिसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून पुढे येतात. या संबंधित सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांचे विचार चिंतनीय असे आहेत. ते खालीलप्रमाणे - 

राष्ट्रीय उन्नती का रहस्य

’’राष्ट्रों की उन्नती के लिए ये बात लाभदायक नहीं बल्कि अति हानिकारक है कि उनकी नस्लों की शिक्षा-दिक्षा तमाम की तमाम सुख एवं वैभव के वातावरण में हो और उनको कठिनाइयों, विपत्तियों, धनहीनता तथा अथक परिश्रम का सामना ही न करना पड़े. ये चीज़ उस सब से बड़े प्रशिक्षालय (ट्रेनिंग सेंटरों) को बन्द कर देगी जिस में मनुष्य की शिक्षा-दिक्षा, तुम्हारे स्कुलों और कॉलेजों से अत्युत्तम ढंग पर होती है. वो प्रशिक्षालय समय का प्रशिक्षालय है जिस को श्रेष्ठ अल्लाह ने स्थापित किया है, ता कि मनुष्य की सहनशीलता, सहिष्णुता, साहस तथा उत्साह की परीक्षा करे और उन्हीं को पास करे जो परीक्षा में पूरे उतर आयें. ये एक ऐसी भट्टी है जो अशुद्ध को शुद्ध से विभेदित करती है और तपा-तपा कर खोट निकालती है. यहां विपदायें इसलिए डाली जाती हैं कि हमारे अंदर उन से मुक़ाबले की शक्ति पैदा हो, कठिनाइयां इस लिए पैदा की जाती हैं कि मनुष्य उन पर अधिकार प्राप्त करने का प्रयास करे, कठोरता इसलिए होती है कि मनुष्य की कमजोरियां दूर हों और उस की छिपी हुई शक्तियां व्यवहारिक-क्षेत्र में प्रकट हों. जो लोग इस प्रशिक्षालय से निवृत्त होकर निकलते हैं, वही संसार में कुछ कर के दिखाते हैं, और संसार में आज तक जितने बड़े-बड़े काम किए गए हैं, वो इस प्रशिक्षालय की सनद हासिल किए हुए लोगों ने ही किए हैं. तुम इस प्रशिक्षालय को बन्द कर के संसार को सुख-गृह में परिवर्तित करना चाहते हो, ता कि तुम्हारी नस्लें सुखार्थी, दुस्साहसी, कामचोर और डरपोक बनकर उठें. तुम चाहते हो कि तुम्हारी सन्तान भोगविलास के पालने में आंख खोले, ऊंचे स्कूलों और विराट निवास स्थानों में रह कर शिक्षा प्राप्त करे और युवक होकर जीवन-क्षेत्र में कदम रखे तो इस प्रकार कि उनके पास एक ’उपयुक्त आरम्भ’ के लिए पर्याप्त पूंजी मौजूद हो. तुम आशा रखते हो कि इस प्रकार वे संसार में सफल होंगे और उन्नति के आसमानों पर चमकेंगे. परन्तु तुम को मालूम होना चाहिए कि ऐसी शिक्षा-दिक्षा के साथ तुम तीसरी श्रेणी के पशु पैदा कर सकते हो या अधिक से अधिक द्वितीय श्रेणी के, प्रथम श्रेणी के मनुष्य तुम्हारी नस्लों में कभी न उठेंगे. विश्वास न आये तो विश्व का इतिहास और महान विभूतियों की जीवन-चर्या उठा कर देख लो, तुम को प्रथम श्रेणी के जितने भी मनुष्य मिलेंगे, उन में कम से कम नब्बे प्रतिशत ऐसे होंगे जो दीन व अकिंचन (ग़रीब) माता-पिता के यहां पैदा हुए, विपदाओं की गोद में पल कर उठे, इच्छाओं के खून और कामनाओं के त्याग के साथ युवावस्था व्यतीत किया, जीवन रूपी समुद्र में बिना किसी साधन-सामग्री के फेंक दिए गए, लहरों से तैरना सीखा, थपेड़ों से बढ़ने का पाठ पढ़ा और अन्ततः सफलता-तट पर अपनी उच्चता की पताका लहरा कर ही छोड़ा.’’ (इस्लाम और बर्थ कंट्रोल सफा नं 119-121)

ईश्वराने स्त्री पुरूषांची शारीरिकच नव्हे तर मानसिक रचना सुद्धा अशी केलेली आहे की पुरूष घराबाहेरील कष्टाची कामे करण्यासाठी अनुकूल असतात तर महिला घरातील कामांसाठी अनुकूल असतात. महिलांना अर्थार्जनापासून पूर्णपणे मुक्त ठेवण्यामागे ईश्वरीय इच्छा हीच आहे की तिने बालसंगोपन (जे की तिच्यासाठी उत्तम आणि अनुकूल आहे) व्यवस्थित करावे. पण पाश्चिमात्यांच्या मूर्ख विचारसरणीचा एवढा जबरदस्त परिणाम झालेला आहे की, अनेक पिढ्यांचे उध्वस्तीकरण, याची देही याची डोळा पाहूनही आपल्याला अजून अक्कल आलेली नाही. उदा. जी गृहिणी अंगभर कपड्यात राहून घरातील कामे करते त्या गृहिणीला तुच्छ लेखणारे आपण तेच काम, परपुरूषांच्या बिभत्स नजरेच्या कैदेत राहून विमानातील महिला तोकड्या कपड्यात करतात तेव्हा त्यांना हवाई सुंदरी म्हणून आपण खोटा सम्मान देतो. केवढा हा दांभिकपणा? कुठलेही तर्कसंगत कारण नसताना गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आपली तरूण पिढी केवळ यासाठी घालून फिरते की युरोप आणि अमेरिकेतील लोक तशा जिन्स घालतात. अशा मूर्खपणापासून आपल्या पिढीला विनाशाकडे ढकलणारेही आपणच. ही मानसिक गुलामगिरी ज्यांना करावयाची आहे त्यांनी खुशाल करावी. किमान गंभीर प्रवृत्तीच्या हिंदू बांधवांनी आपल्या गुरूकुल परंपरेची लाज बाळगून व मुस्लिम बांधवांनी आपल्या शरई परंपरेची लाज बाळगून आपापल्या पाल्यांचे संगोपन आपापल्या पद्धतीने जरी केले तरी आपण देशाला पर्यायाने जगाला चांगल्या नागरिकांचा पुरवठा करू शकतो. नसता कुठलाही अणुबॉम्बचा न वापरता हे पिसाळलेले तरूण पृथ्वीचा नाश करतील. 

पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय.  आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तुलनेत जास्त चालतात. याचाच अर्थ तेथे आणि आता येथेही मनोरूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. म्हणून किमान मुस्लिमांनी आपल्या मुलांचे संगोपन शरियतनुसार करावे.कारण इस्लाम आलाच मुळी सभ्यतेची स्थापना करण्यासाठी आणि ही सुरूवात लहान मुलांपासून करणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास कशी पिढी निर्माण होते याचे प्रात्यक्षिक आपण आपल्या अवतीभोवती रोजच पाहतोय. सभ्यतेचे मेरूमनी म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने एक रोल मॉडेल आपल्यासमोर उपलब्ध आहे. त्यांच्या बाबतीत कुरआनने घोषणा केलेली आहे की, ’’आणि निःसंशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.’’  (कुरआन : सुरे अलकलम : आयत नं.4). दुसऱ्या एकेठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’’प्रत्येक धर्माचे एक वैशिष्ट्ये असते आणि इस्लामचे वैशिष्ट्ये लज्जा आहे.’’ या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपण आपल्या मुलांचे संगोपन करून तेव्हा देशात व विदेशात चारित्र्यसंपन्न, संयमी, दृढ निश्चयी, आपल्या इच्छा-आकांक्षावर (नफ्स) नियंत्रण ठेऊन जबाबदारीची कामे करण्यासाठी तरूणांची सर्व क्षेत्रीय मागणी वाढेल तेव्हा मागणी प्रमाणे आपण पुरवठा करू शकू. असा पुरवठा करण्यासाठी जग मुस्लिमांकडूनच अपेक्षा ठेवेल हे लक्षात असू द्या. कारण बालसंगोपनाचे सर्वंकष योजना (कुरआन आणि हदीसच्या स्वरूपात) फक्त तुमच्याकडे आहे दुसऱ्यांकडे नाही. विशेषतः मुस्लिम महिलांनी कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तुमच्या पदराखाली भविष्यातील अबुबकर रजि., उमर रजि., उस्मान रजि., अली रजि., सुमैय्या रजि., आएशा रजि. आकार घेत आहेत. पुढच्या पिढीला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आणि बलवान बनविण्यामध्ये तुमची भूमिका तुमच्या पुरूषांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. 

बालसंगोपन एक दुर्लक्षित विषय

कुठल्याही देशाला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श मनुष्यबळाची सातत्याने गरज भासत असते. ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी त्या-त्या देशातील नागरिकांची असते. ती जबाबदारी कुठल्याही कारणाने जर एखाद्या देशाचे नागरिक पूर्ण करू शकत नसतील तर त्या एवढा राष्ट्रीय कृतघ्नापणा दूसरा कोणता असू शकतो बरे ! आपल्याच देशातील सध्याची स्थिती पहा गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अधिकाऱ्यांची सातत्याने कमतरता भासत आहे, ती पूर्ण करण्यासाठी पुरेसे पात्र तरूण आपल्याकडे नाहीत. आज आयटी क्षेत्राला ज्या दर्जाचे अभियंते पाहिजेत त्या दर्जाचे अभियंते मिळत नाहीत. त्यांच्याकडे पदव्या आहेत पण कौशल्य नाही. इच्छा आहे पण लायकी नाही. म्हणून अनेक कंपन्यांची कामगिरी खालावलेली आहे अनेक अभियांत्रिकी विद्यालये बंद पडलेली आहेत. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. शिकूनही रोजगार मिळत नसल्याने तरूणांमध्ये वैफल्य वाढत आहे. अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत. या सर्वासाठी त्यांचे आई-वडिल जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांचे संगोपन व्यवस्थित केलेले नाही. मागची पिढी स्वार्थी ठरल्याने नवीन पिढीची अडचण झालेली आहे.

चंगळवादी जीवन पद्धती माणसाला ऐशआरामी व निरूद्देश्य जगण्याकडे प्रेरित करत असते. आणि एकदा का माणूस चंगळवादाच्या चक्रव्यूवहात अडकला की त्यातून तो सुटू शकत नाही. म्हणूनच आपण पाहतो एकीकडे कृषी सारखा महत्त्वाचा जीवनावश्यक व्यवसाय धोक्यात आलेला असतांना सिनेमा, टीव्ही, ओटीटी, यू ट्यूब, फेसबुक, फॅशन, कॉस्मॅटिक्स सारख्या निरूपयोगी व्यवसायांची भरभराट होत आहे. देशाला दृढनिश्चयी संयमित पिढीची गरज असतांना कंबर हलवून डान्स करणाऱ्या नाच्यांचा पुरवठा मात्र जोरात सुरू आहे. ही परिस्थिती जगात सर्वत्र वाढत असून, लवकरच ही आपल्या शेवटच्या टोकाला पोहोचणार आहे. किंबहुना पश्चिमेत ती पोहोचलेली सुद्धा आहे. अफगानिस्तानमध्ये 41 देशाच्या सर्वसाधन संपन्न फौजांचा झालेला लाजीरवाना पराभव हे याचे ताजे उदाहरण आहे. 

माणसांच्या मनात जे काही चांगले वाईट मुल्यं रूजतात ते बालपणीच रूजतात आणि नेमक्या त्याच काळात आई-वडिल दोघेही जॉबनिमित्त बाहेर असतील आणि मोलकरणींकडे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असेल तर अशाच पिढ्या आकार घेणार जश्या आज घेत आहेत. 

उपाय

आपल्या प्रिय भारत देशाला भविष्यात लागणाऱ्या संयमी आणि चारित्र्यवान नागरिकांचा सर्वक्षेत्रीय पुरवठा करण्यासाठी मुस्लिमांना उभे रहावे लागेल. त्यासाठी कुठली नवी योजना तयार करण्याची गरज नाही. फक्त शरीयतमध्ये दिलेल्या तरतुदींची मुलांच्या वयानुसार कालबद्ध अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गरीबीमुळे ज्यांना या जबाबदारीची जाणीव नाही त्यांच्या पाल्यांची जबाबदारी श्रीमंत शेजाऱ्यांनी तसेच मुस्लिम संस्था संघटनांनी उचलावी. ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. 

विस्तार भयामुळे शरई संगोपनाचा तपशील देणे शक्य नाही. कारण कुरआनमध्ये बाळ जन्मताच त्याला आईने किती वर्ष दूध पाजवावे? त्याचे नाव कसे ठेवावे? त्याच्यावर संस्कार कोणते करावेत? त्यांचे अंथरूण कधी वेगळे करावे? त्याला कुठल्या वयात नमाजची सक्ती करावी? भींतीवर चाबूक कधी लटकवून ठेवावा? इथपासून ते मुलांना शिक्षण कधी, कोणते आणि कसे द्यावे? याचा सविस्तर तपशील उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन सुरे लुकमानमध्ये केलेले आहे. त्याचा वाचकांनी अभ्यास करावा आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श नागरिकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी उचलावी. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’हे अल्लाह! आम्हाला व आमच्या देशबांधवांना देशासाठी भविष्यात लागणारे योग्य नागरिक घडविण्याची समज आणि शक्ती दे.’’ (आमीन.)


- एम. आय. शेख



प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की अत्याचार करणअयास मी स्वतःवर देखील निषिद्ध केले आहे. तुम्ही एकमेकांवर अत्याचार करता कामा नये. तुम्ही सर्व भरकटलेले आहात. ज्याला मी मार्ग दाखवला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्याकडे विनंती करा, मी तुम्हाला मार्ग दाखवीन. ज्याला मी अन्न-पाणी दिले, त्या व्यतिरिक्त तुम्ही सर्व भुकेलेले आहात. मला मागा मी तुमच्या जेवणाची सोय करेन. मी ज्याला वस्त्रं दिली त्याशिवाय तुम्ही सर्व निर्वस्त्र आहात. तुम्ही मला विनंती करा, मी तुम्हाला वस्त्रं देईन. माझ्या भक्तांनो! तुम्ही रात्रंदिवस गुन्हा (पाप) करीत असता, तरी मी तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही माझ्याकडे याचना करा मी तुम्हाला क्षमा करेन. तुम्ही मला काही केल्या नुकसान पोहचवू शकतन नाही. तसेच माझं काही भलं करण्याची क्षमता देखील तुमच्यात नाही. माझ्या भक्तोहो, जगातील सुरुपातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्यांनी जरी सदाचार केला तरी देखील माझ्या अधिराज्यात यामुळे काही वाढ होणार नाही. तसेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्या माणसांनी वाईट माणसासारखे वागले तरी देखील माझ्या अधिराज्यामध्ये कोणती कसर होणार नाही. सुरुवातीपासून या जगाच्या अंतापर्यंतच्या साऱ्या माणसांनी एखाद्या मैदानात एकत्र येऊन आपापल्या इच्छेनुसार जे काही मागितले ते सर्व मी त्यांना देऊन टाकले. तरीदेखील समुद्रात एखादी सुई बुडवून बाहेर काढल्यावर तिच्या टोकाला जेवढे पाणी लागले असेल तेवढीदेखील कमी माझ्या खजिन्यात होणार नाही. माझ्या भक्तहो, तुमचे कर्म मी मोजून ठेवत असतो आणि त्यानुसारच तुम्हाला मोबदला देतो. तेव्हा ज्या कुणाला जे काही भलं लाभलं असेल त्यांनी माझे आभार मानावे आणि ज्याला दुसरं काही मिळेल त्यासाठी त्याने स्वतःचीच निंदा करावी.           (संदर्भ – हजरत अबू जर (र), मुस्लिम)

पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो,

‘‘मी मानवांवर अत्याचार करणारा नाही.’’ (सूरह – काफ : ३९)

‘‘अल्लाहला आपल्या दासांवर अत्याचार करण्याची कोणती इच्छा नाही.’’

(सूरह – अलमोमिन : ३१)

‘‘जगवासीयांवर अत्याचार करण्याची अल्लाहची मुळीच इच्छा नाही.’’

(सूरह – आलेइमरान : १०)



बेटी के लिए वक्त-ए-बधाई है

माँ के लिए वक्त-ए-जुदाई है

रस्मे तआम जबसे निकाह में आयी है

इस रस्म ने बडी तबाही मचाई है

ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है

दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है. 

लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.

इस्लाममध्ये निकाहची संकल्पना

रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई

गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई

 प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)

की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).

आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अ‍ॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत. 

विवाह सोपा करा

ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है

ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है

विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.

         मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! ... प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले. 

     भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.  ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे. 

अल-मारूफ वल-मशरूत

         एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.

निकाह सोपा करा 

       इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत. 

इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत. 

      काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की -  

         एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.

 एक अनाहुत संकट  

         ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही. 

केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे. 

        एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील. 

         आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.  

काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.

        मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.

           लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक - वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल. 

शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,  ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.) 

- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget