Latest Post

- आर. एस. विद्यार्थी
या पुस्तिकेत दलित वर्गाच्या ज्वलंत मूळ प्रश्नांचे समाधान प्रस्तुत करून अचूक व कायम स्वरूपी मार्गदर्शन करण्यात आले आहे. यासाठी एक सशक्त, साहसी व यथार्थवादी आणि अत्यंत यथार्थवादी दृष्टिकोन स्वीकारला गेला आहे.
लेखक आर. एस. विद्यार्थी यांनी सलग दहा वर्ष भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश कार्यकारणीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब द्वारा निरूपित व निर्धारीत उद्देश प्राप्त करण्यासाठी ही पुस्तिका निश्चितच सहाय्यक सिद्ध होईल.

आयएमपीटी अ.क्र. 36   -पृष्ठे -32    मूल्य - 16  आवृत्ती - 9 (2013)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/zehin6cffa2rfnqj1nc7jzpb6iuszuen

सटीप मराठी भाषांतर

मौलाना सय्यद आला मौदूदी

(यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून)

मराठी भाषांतर
अब्दुल जबार कुरैशी
कुतुबुद्दिन हुसैन मनियार
मुबारक हुसैन मनियार

प्रकाशक

इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट

डाऊनलोड लिंक :   https://app.box.com/s/f8avicxu2qbq3l9rng1vrn1rtmdivmy8

परोक्षावर श्रद्धा ठेवणे -
आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्‍वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु, त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया दुसरी गुणवत्ता ‘परोक्षावर  श्रद्धा’ म्हणजे अदृश्य ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणे. शब्दश:, अदृश्याचा संदर्भ असा होतो की अश्या गोष्टी ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित (अनुपस्थित) आहेत. ’अल्लाहने त्याचे मार्गदर्शन व संरक्षण प्राप्त करण्यासाठी याला प्रमुख अट का बरे ठरविले आहे? अदृश्य काय आहे? जसे मनुष्यात प्रामुख्याने, पाच मुख्य इंद्रिय असतात   (ऐकणे, दृष्टी, गंध, चव आणि स्पर्श ) ज्या  गोष्टी  आपल्या या इंद्रियांपासून कळतात, अश्या गोष्टीं बद्दल कोणतेही वाद नाही, कारण आपण त्या वस्तू पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, स्वाद घेऊ शकतो आणि गंध करू शकतो. अगदी तसेच आपण अदृश्य भावनांना सामोरे जाऊ शकत नाही व त्याची अनुभुती करु शकत नाहीत.
    याव्यतिरिक्त आपल्याकडे  ज्ञानेंद्रियांच्या  क्षमतेशिवाय  अनेक अशा क्षमता आहेत ज्या आपल्याला गोष्टी समजून घेण्यास, अनुभुती करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,जेंव्हा तुम्हाला भूक लागते तेंव्हा तुम्ही भुकेले आहात हे तुम्हांला कोणते इंद्रीय  सांगत आहे? कोणता इंद्रीय आपल्याला झोपेतून जाग आणतो? तसेच, स्त्रीला गर्भ राहिल्यास तो गर्भ तिच्या शरिराचा भाग असूनदेखील ती जाणू शकत नाही की तिच्या गर्भात काय वाढत आहे? म्हणून एक अदृश्य शक्ती जी आपल्या पाच इंद्रीयांना समजत नाही व दिसत नाही म्हणून ती उद्भवत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून या (आयात) वचनात ज्या अदृश्य शब्दांचा उल्लेख आहे ते सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमते पलीकडचे आहे.
    चला एक पाऊल पुढे जाऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितचे समीकरण सोडवण्यासाठी दिले गेले, आणि नंतर तो किंवा तीने सोडवून उत्तर काढले, तर आपण म्हणतो की या विद्यार्थ्याने अदृश्य शोधून काढले आहे? अजीबात नाही, कारण विद्यार्थ्यांनी ठराविक नियम आणि तत्त्वे यावर आधारित उपाय योजले व उत्तर काढले. त्याचप्रमाणे, हवामानशास्त्राच्या केंद्राने उद्या पावसाळा घोषित केला असेल, तर हवामानशास्त्रज्ञांनी अनदेखीचा खुलासा केला आहे का? पुन्हा, उत्तर नाही असेच आहे, कारण त्यांनी ज्ञान आणि संशोधनावर त्यांचे निष्कर्ष काढले आहेत. तसे नसल्यास कुठल्या मनुष्य /प्रेषित /अवताराने सूर्य पूर्वेकडुन पश्‍चिमेकडे उगविन्याचे धाडस दाखविले?  पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर मनुष्य समुद्र, विहीर, तलाव, नदी याची निर्मिती करु शकतो का? हे प्रश्‍न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की मनुष्य यासाठी असमर्थ आहे. म्हणून या कुरआनच्या (आयात) वचनात उल्लेख केलेल्या अदृश्य शब्दांचे अर्थ निष्कर्ष आणि संशोधन या ज्ञानाने काढता येत नाही.
    आणि अखेरीस, जर एखाद्या मित्राने आपल्याला सूचित केले की आपला चोरीस गेलेला मोबाईल फोन अमक्याकडे  आणि अमूक ठिकाणी आहे, याचा अर्थ आपल्या मित्राला अदृश्य गोष्टीची माहिती आहे का? उत्तर नाही असेच आहे. तसे नसल्यास मनुष्य स्वत: व इतरांचे जन्म-मृत्यू सांगू शकतो का? अर्थातच नाही. कारण अदृश्य तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या कोणालाही ज्ञात नाही. म्हणून या आयात (वचनात)मधील उल्लेखित ‘ अदृश्य’ शब्द आपल्यासाठी ज्ञात नाही. या अर्थानेच घ्यावा लागेल.
    त्याचप्रमाणे, अगदी संदेष्टे (प्रेषित) आणि दूत यांना देखील अदृश्याबद्दल  ज्ञान व जाणिव नसते. खरं तर, अदृश्याचे ज्ञान अल्लाह  सर्वशक्तिमान वगळता कोणालाही नाही. आणि फक्त अल्लाहच स्वत: निवडतो ज्यास त्याला याचे ज्ञान द्यायचे आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,”तो परोक्षाचा(अदृश्य) ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही” (72:26).
    ’त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो’ (72:27)
    ईश्‍वर त्याच्या ज्ञानापैकी काही  अंश आपल्या प्रेषितांना  सामायिक (शेअर) करतो आणि ते त्यांच्यासाठी पाठोपाठ जगात एक चमत्कार बनते. याचा अर्थ असा होत नाही एखाद्या प्रेषितांना परोक्षाचे पूर्ण ज्ञान आहे व आपण त्यांची उपासना करावी. कदापि नाही! !! ईश्‍वर पैगंबर मुहम्मद (स.) यांना कुरआनात म्हणतो, ”हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा.” ”त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.” हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणू काही तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, ”त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.” ( कुरआन 7:187)
    ”हे पैगंबर (सल्ल.), यांना सांगा की, मी (अर्थात पैगंबर सल्ल.) स्वत:करिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वत:साठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे, त्या लोकांसाठी  जे  माझे  म्हणणे  मान्य  करतील.”(कुरआन 7:188)
    अल्लाहवर विश्‍वास म्हणजे अदृश्य गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचे सर्वात उच्च स्वरूप, म्हणजे त्याचे स्वर्गदूत, ग्रंथ आणि न्यायाचा दिवस ह्यांवर विश्‍वास. जरी या सर्व गोष्टी आपल्यापासून पड्द्याआड ठेवल्या आहेत. तरी, आपण देवदूतांच्या उपस्थितीवर विश्‍वास करतो कारण अल्लाहने  त्यांच्या अस्तित्वाविषयी आपणास प्रेषित व ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसावरही(स्वर्ग-नर्क) विश्‍वास करतो कारण अल्लाहने याची पण माहिती आपणास दिलेली आहे.
    आता आणखी एका जिव्हाळ्याच्या गोष्टीचे उदाहरण बघूया. जे तुम्हाला अदृश्य ईश्‍वर कळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील  आत्मा तुम्हाला जीवन प्रदान करतो. मग विचार करा तुम्ही तुमचे प्राण पाहीलेले आहे का? किंवा आपण त्याची चव घेउन पाहिली किंवा सुगंध घेतला किंवा त्याला स्पर्श करुन पाहिले आहे का? नक्कीच नाही! परंतु ईश्‍वराने आपल्या शरीराला जीवन देण्याच्या त्याच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल कळणे शक्य झाले. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या  शरीरातल्या काही गोष्टी शोधणे आणि समजून घेणे कठीण व अशक्य  आहे, तर तुम्ही  तुमच्या इंद्रीयांमार्फत ईश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव कशा प्रकारे करू शकता? विचारात पडलात ना! परंतु, अल्लाहने आपण सर्वाना  असेच सोडून दिलेले नाही. आपणास विवेकशील मन  दिले आणी अनेक संकेत दिलेत जेणेकरून आपण त्यावर विचार करावा. अल्लाहने आपल्यासाठी (परिसरात) आजूबाजूला अशी चिन्हे मांडली व दर्शविली आहेत. त्यांचे बारकाईने निरक्षण करा, जाणीव करा आणी निष्कर्षावर पोहोचा. या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे. इतके तंतोतंत व काटेकोरपणे निर्माण केलेली  निर्मिती योगायोगाने स्वत:हून निर्माण होऊ शकली असती का? उलट योगायोगाने स्वत:हून तयार झालेल्या  गोष्टी यादृच्छिक असंगठित अल्पायुषी असतात. जर विश्‍वाची निर्मिती आणि परिरक्षणामागे ब्रह्मरुप शक्ती नसली असती तर सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी एकमेकांपासून दुभंगले असते आणि एक निर्मात्या विना, जीवन आणि संपूर्ण प्रणाली नष्ट झाली असती.
    वरील उदाहरणांवर विचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि मी या निष्कर्षावर पोहचले आहे की या विश्‍वाची तंतोतंत व काटेकोर निर्मिती, त्यातले जीवन आणि सौंदर्य फक्त आणि फक्त अल्लाह/परमेश्‍वर  मुळेच आहे व फक्त तोच या विश्‍वाचा निर्माता आहे. म्हणून जर प्रेषित सल्ल. यांनी  आपल्याला सांगितले की अल्लाह (एकेश्‍वरत्व) हाच विश्‍व निर्माण करणारा आहे आणि  चमत्कारांचा दावा करीत आहे तर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनात ही निश्‍चितता कायम होते तेव्हा तुमची श्रद्धा, तुमचे आचार-विचार सुद्धा हाच दावा करतात की अल्लाहकडून मिळणारे सर्वस्व हेच अंतिम सत्य आहे, आणि मी त्याच्याच नियमावलीच्या मार्गानुसार जीवन व्यतीत करेन. मग मला पर्वा नाही आपल्या संवेदनांना (नफ्स) ते समजून घेऊ शकते किंवा नाही. पण आज मनुष्य त्याच्या हृदयावर  आपल्या संवेदनांचे आपल्या वाडवडिलांच्या विचारांचे व या दुनियावी आकर्षकतेचे आवरण घातले आहे व तो कळतनकळत पणे आपल्या अदृश्य ईश्‍वराला विसरून गेला आहे. कारण तो आज सर्वात जास्त भीती बाळगतो त्याच्या मृत्यूची. त्यामुळे तो याच संभ्रमात पडलाय की हेच अंतीम जीवन आहे. पण हे जीवन तर क्षणभंगुर आहे. ईश्‍वर म्हणतो ’आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते (कुरआन 29:64.)
    जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहतो तेव्हा आपल्याला पदोपदी त्याना भेटण्याची आस लागते व त्यांच्या गैरहजेरीत आपण त्यांची आठवण व त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नियमांचे पालन करतो. हेच प्रेमाचे आवरण आपण आपल्या पालनकर्त्याविषयी का बाळगत नाही? का आपण मृत्युला घाबरतो? आपण का बरे विचार करत नाही की माझा मृत्यु हा शेवट नसून त्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात आहे आणि तिथे मला माझ्या ईश्‍वराला भेटायचे आहे. ही विचारसरणी आपणास मृत्युची भीती बाळगू देत नाही तर ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करते व त्याच्या नियमाचे पालन करण्यास भाग पाडते. ईश्‍वराची सदैव इच्छा हीच आहे की त्याचे भक्त श्रद्धा-विचार-आचारणाने चांगले बनावेत व मृत्युनंतर स्वर्गात जावेत.
    अशाप्रकारे, जोपर्यंत कुठलाही मनुष्य परोक्षावर श्रद्धा ठेवत नाही व न्यायाच्या दिवसाचे भय बाळगत नाही तोपर्यंत तो मोमीन बनू शकत नाही. ईश्‍वर म्हणतो, ’त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.’  (कुरआन 2:281)
    उर्वरित गुण पाहूया पुढील लेखात.

- सीमा देशपांडे
7798981535

माननीय अबू बकर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,‘‘दु:खी-कष्टी मनुष्याने ही प्रार्थना (दुआ) करावी– ‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत)’ अर्थात- हेअल्लाह! मी तुझ्या कृपेचा इच्छुक आहे. तू मला क्षणभरदेखील माझ्या इच्छा-वासनेच्या हवालीकरू करू नकोस (आपल्या देखरेखीत ठेव) आणि माझी वाणी, अहवाल व व्यवहार व्यवस्थित कर, तुझ्याशिवाय कोणीही उपासनेस योग्य नाही.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण :
जोपर्यंत एखादा भक्त अल्लाहच्या संरक्षणात व देखरेखीत असतो इच्छा- वासनांचात्याच्यावर कसलाही प्रभाव पडत नाही आणि त्याच्याकडून कसलेही पापकृत्य करवू शकत नाही.परंतु जेव्हा अल्लाहच्या संरक्षणापासून भक्त स्वत:ला वंचित करून घेतो तेव्हा इच्छा-वासनात्याला विनाशाच्या मार्गावर सोडतात. म्हणून मोमिन दुआ (प्रार्थना) करतो की ‘‘हे अल्लाह!मला इच्छा-वासनांच्या हवाली करू नकोस अन्यथा माझा विनाश होईल आणि माझ्या संपूर्णजीवनाला पवित्र बनव, व्यवस्थित कर.’’

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ पठणकरीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो संकटांपासून, दु:खापासून, त्रासापासून, आळस व सुस्तीपासून, कर्जाच्या ओझ्यापासून आणिमानवांनी प्रभुत्व मिळविण्यापासून.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : अल्लाहच्या आश्रयात स्वत:ला देण्याचा अर्थ आहे की दासाला आपल्या दुर्बलतेचीव विवशतेची जाणीव आहे. त्याला वाटते की आपण दुर्बल आहोत म्हणून शक्तिशाली स्वामीचाआश्रय मागतो जेणेकरून त्याने त्या दुष्टव्यांपासून वाचवावे.
येणाऱ्या संकटांना जो त्रास व काळजी संलग्न असतात त्यास ‘हम’ म्हणतात आणि‘हु़ज्न’ दु:खाला म्हणतात जे संकट आल्यानंतर पोहोचते. ‘अज़्ज’ म्हणजे एखादे काम करू न  शकणे आणि ‘मूर्खपणा’ व ‘बेसावधपणा’ या अर्थानेदेखील घेतला जातो. म्हणजे असे की मनुष्याला वाटते की ‘हे तर सोपे काम आहे, रात्री करू’, परंतु रात्र निघून जाते आणि तो ते काम करू शकला नाही तर म्हणतो, ‘बरे चला, उद्या होईल.’ अशाप्रकारे कामाची मूळ संधी वाया जाते. या दुआचा सार असा आहे की मोमिन आपल्या पालनकर्त्याला म्हणतो, ‘‘हे अल्लाह! माझे रक्षण व देखरेख कर. येणाऱ्या संकटांमुळे माझ्या मनाला त्रास होऊ नये. जेव्हा संकटयेईल तेव्हा मला संयम दे, जी वस्तू हरवली जाईल त्यावर मला दु:ख होऊ नये आणि तुझ्यामार्गावर चालण्यात आळस व सुस्ती माझ्यापाशी फिरकू नये आणि माझ्यावर लोकांचे इतके कर्जहोऊ नये जेणेकरून मला त्याची परतफेड करता येणे शक्य न व्हावे आणि काळजीने ग्रासला जाऊ नये आणि वाईट लोकांना माझ्यावर प्रभुत्व प्रदान करू नकोस.’’

माननीय ज़ैद बिन अरकम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! तू माझ्या वासनेला असे बनव की तिने तुझी अवज्ञा करू नये आणि तुझ्या शिक्षेचे भय वाटावे, दुर्गुणांपासून पवित्रकर, तू त्यास उत्तमप्रकारे पवित्र करणारा आहेस, तू त्याचा संरक्षक आणि स्वामी आहेस, हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो त्या ज्ञानापासून जे मला लाभ देणार नाही आणि त्या हृदयापासून जे तुझ्यासमोर नतमस्तक होणार नाही आणि त्या वासनेपासून जी संतुष्ट न व्हावी आणि अशा दुआपासून जी कबूल न व्हावी.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : ‘लाभ देणारे ज्ञान’ मनुष्याला ईशपरायणता शिकविते, अनुसरणासाठी प्रोत्साहित करते आणि जग व परलोकात अल्लाहच्या कृपेचा हक्कदार असते. ‘वासनेपासून संतुष्ट न होणे’ म्हणजे त्याला जगातील कितीही मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती प्राप्त झाली तरी संतुष्ट न होता त्याची भूक वाढत जाते आणि दुआ कबूल न होण्याची अनेक कारणे आहेत ज्यापैकी एक कारण असे आहे की मनुष्याची मिळकत अवैध असणे, जसे- व्यवहारांच्या बाबतीत ‘वैधमिळकती’च्या बाबतीत वर्णन आले आहे.माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) हीदुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो या गोष्टीपासून की जी देणगी तू मला दिली आहे (माझ्या दुष्कर्मांमुळे) हिसकावून घेतली जावी आणि जी खुशाली मला प्राप्त झाली आहे त्यापासून मी वंचित व्हावे आणि असे की तुझा कोप कोसळावा आणि असे की तू माझ्यावर निराश व्हावा, मी या गोष्टींपासून तुजा आश्रय मागतो.’’ (हदीस : मुस्लिम)

- डॉ. आयशा पठाण, नांदेड
9158805927


इस्लामी महिना रमजान, ज्यात रोजे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून मनात ईशभय निर्माण व्हावे. पवित्र ईशवाणी, दिव्य कुरआनात म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले. मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यानी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (2ः185)
    रमजान पवित्र ग्रंथ कुरआनचा महिना याच महिन्यात संपूर्ण मानवजातीसाठी कुरआनचे अवतरण अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ल. यांच्यावर झाले. म्हणजेच कुरआन-रोजा- रमजान या महत्त्वपूर्ण तीन सुत्रांचा जर विचार केला तर कुरआनातील पहिला श्‍लोक (आयात) सर्व सृष्टीचा पालनकर्ता, विश्‍वाचा कर्ता आहे. कुरआन हा ईशवाणीचा ग्रंथ धरतीवरच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शन आहे.
    मानवाने जीवन कसे व्यतीत करावे, जीवन कसे जगावे, सत्य व अत्याची कसोटी,मानवसेवेसाठी, समर्पित समाज निर्माण करण्यासाठीची जीवन पद्धती आहे. अल्लाह रब्बूल आलमीन आहे. म्हणजे संपूर्ण मानवजातीचा पालनकर्ता आहे.
    ईशग्रंथ पवित्र कुरआनचे अवतरण याच रमजान महिन्यात पूर्णत्वाला आले. याच महिन्यात तीस दिवसाचा रोजा जो अल्लाहसाठी करतात जेणेकरून त्यांच्या मनात ईशभय निर्माण व्हावे. आत्मीक बळ वाढवणारे विनय नम्रता अंगी येणे पापकृत्या विरूद्ध ढाल शरीरासाठी, उत्तम आरोग्यासाठी वरदान, रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो सत्याधिष्ठित नियम ज्यामुळे वैयक्तिक व सामाजिक जीवनात सुख समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच उत्तम रीतीने जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सदाचारी आचरण व ईशभयानेच निर्माण होते. ईशभयासाठीच इमानधारक रोजे करतात. अल्लाहशी जवळीक साधण्यासाठीच अल्लाहपुढे नतमस्तक होऊन (प्रार्थना)  नमाज पढतात. निःस्वार्थ वृत्तीने संपूर्ण मानवजातीचा विचार करायला लावणारे धैर्य, संयम, सहनशीलता, विचार करायला भूकेची जाणीव होते. गोरगरीब, निराधार, अनाथाशी आपुलकी व मदतीसाठी हात पुढे येतात. मदत फक्त मुसलमानांच नाही तर धरतीवरच्या प्रत्येक मानवाच्या सुख, दुःखात सामील होण्यासाठी पुढे येतो तो इमानधारकच ! आपल्या कुटुंबातल्या शिवाय शेजारी मग तो कोणीही असो निःस्वार्थ वृत्तीने मदतीसाठी पुढे येतो. सत्य-असत्याची जाण ठेवतो. चांगले वाईट, वैध-अवैध याची जाण मनात ईशभय ठेवतो व जीवन जगण्यास तत्पर होतो.
    ईशभय ठेवणार्‍यावर कृपाप्रसादाचा वर्षाव होतो, रोजा माणसाला माणूस बनवतो. चारित्र्यशील निष्ठावान बनतो रोजामुळेच मानव!
    सर्वशक्तीमान अल्लाहने आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनात वारंवार आदेश दिलेले आहेत. ”नमाज कायम करा, जकात द्या. तुम्ही जमिनीवर वावरणार्‍यावर दया करा. अल्लाह तुमच्यावर दया करील. ही श्रद्धा उदात्त सत्कृत्याचा नैतिकतेचा संग्रह करीत असतो. माणसाच्या मनावर उदात्त अध्यात्मिक जीवनाची वस्तुनिष्ठ वास्तवता बिंबवण्यासाठीच हा आदेश दिला गेला आहे. रमजान महिन्यात रोजा तर करतात त्याबरोबर आध्यात्मिक व नैतिक प्रशिक्षणाबरोबर सह्योग, सेवा, त्याग, बलिदान, आत्मीक शुद्धता करतो, रोजा वाईट कृत्यापासून अलिप्त दहशतवादापासून गुन्हेगारीपासून दूर करतो.
    आम्ही सर्व मानवजात एकाच माता-पित्याची संतान. अल्लाहचे अनंत उपकार आहेत आमच्यावर परिपूर्ण जीवन व्यवस्थेत एक अल्लाहचा ईशग्रंथ पवित्र कुरआन व प्रेषित मोहम्मद सल्ल. यांचे आचरण आमच्यासाठी आदर्श नमुना आहे.
कुरआनात म्हटले आहे, ’तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्टीला तो जाणतो आहे.’
    आकाश, पृथ्वीची निर्मिती, रात्रं-दिवसाचे परिवर्तन, नद्या-सागर, पाऊस, मृत जमिनीला पुनरूज्जीवन करणे, एक बियापासून हजारो दाने तयार करणे ह्या निशाण्या कुरआनात व्यक्त केल्या आहेत. पालनकर्ता अल्लाह सर्व साक्षी आहे. जीवनाच्या वास्तवाची जाण या स्पर्धात्मक युगात ठेवायची आहे. मृत्यू पश्‍चात जीवनाचा धाक व न्यायासाठी करावयाची तयारी, पवित्र कर्माची शिदोरी तयार करण्यासाठी मानव मनात ईशभयाची नित्तांत आवश्यकता आहे. अल्लाह जवळ प्रार्थना आहे, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी. आम्हा सर्व मानवांना सरळ मार्ग दाखव व मनात ईशभय ठेवणारे बनव. आमीन!

- बशीर अमीन मोडक, रत्नागिरी

मुस्लिमांना सर्वाधिक आनंद देणारा महिना रमजान होय. या महिन्याच्या  आगमनापासूनच आनंद पुढील 29/30 दिवस वाढतच जात असतो. शबे कद्र त्यास रमजानच्या पूर्णता समीप असल्याची जाणीव करून देणारी असली तरी ही रात्र संपूर्ण वर्षातील रात्रीपेक्षा आणि दिवसापेक्षाही अमर्याद आनंद देणारी असते. या रात्री पासूनचा आनंद रमजान महिना संपला तरी लगत पहिल्या दिवशी तो साजरा करूनच विश्रांती घेतात. या कालावधीत श्रीमंत किंवा गरीब यांच्या आनंदात कसलाही फरक नसतो. समानतेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार मुसलमान स्वतः अनुभवतात आणि तो इतरांनाही देतात.
    हा आनंद असण्यामागच्या कारणां पैकी प्रमुख कारणे 1) कुरआन 2) रोजे. तेव्हा कुरआन आणि रोजे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे. 1) कुरआन अल्लाहने हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्यावर याच रमजान महिन्यात अवतरित केले ते सत्य जाणून सर्वत्र व्यापून असलेला जुलूम नष्ट व्हावा म्हणून आणि हे ही स्पष्ट करून की कुरआनद्वारे दिले जात असलेले मार्गदर्शन हे अंतिम असेल. अल्लाहची ताकीद आणि ही हिकमत एवढी यशस्वी ठरली की कुरआन अवतरित होताच जुलूम, अशांतता, अमानुषता नष्ट होऊन मानवता अस्तित्वात आली. इस्लाम मानवीय धर्म म्हणून आज सर्वमुखी आहे. कोणी याला मानवता धर्म म्हणो की इस्लाम एकच. कारण निरपराध माणसाची हत्या म्हणजे समस्त मानवतेची हत्या. कुरआनात स्पष्ट नमूद आहेच. सुरा 2 आयत 3 मधून दीन (धर्म) इस्लाम स्पष्ट होतो.
    शिवाय नमाज, जकात, हज आणि हे रोजे हे या मानवतेचे जपणुकीसाठीचे प्रशिक्षणासाठीच आहेत. कसे ते पाहू. या सर्वांचे महत्त्व कुरआनमध्ये तपशीलवार आहे. आज रमजान आणि रोजे याबाबत विवरण आहे ते रमजानमुळे आणि म्हणून रोजे आणि कुरआन बाबत प्राथमिकता उचित ठरावी.
    कुरआन नुसार एकमेव अल्लाहची इबादत आणि सदाचार (चारित्र्य) या बाबी अल्लाहला अधिक प्रिय आहेत. तर या दोनही बाबी रोजांद्वारे सहज आत्मसात होऊ शकतात. जसे रोजा असताना ठरवून दिलेल्या बाबी उदा. खोटे बोलणे, चहाड्या करणे, जाणीवपूर्वक रोजा तोडणे, विडी, सिगारेटचे सेवन या सर्वांपासून मुक्त असल्याने आणि ते सतत 29/30 दिवस घडून आल्याने दुराचार सहजरित्या निघून जातो आणि आपल्या ठायी असलेले सदाचार कायम राहतात. अल्लाह सदाचार्‍याना पसंत करत असल्यामुळे त्याची प्रसन्नता लाभते. थोडक्यात अल्लाहच्या प्रसन्नतेतून आपल्याला शांंती लाभते. शांती ही प्रगती करण्यास मोलाचे सहकार्य करते. शांती आणि प्रगतीतून मुक्तीचा मार्ग सुकर होतो. अल्लाहने रोजा माझा आहे आणि मी त्यास जबाबदार आहे.
    बरे ही प्रसन्नता ही होते ती रमजानच्या रोजाबरोबर अदा केलेला सदका, अदा केलेली जकात यामुळे ही शिवाय रोजांमधून मानवता ही अंमलात येते आणि शेजार धर्मही दोन्ही बाबी मानवतेची हाक आहे. आणि हाकेला ओ देणे इस्लामने इबादतमध्ये समाविष्ट केले आहे.
    रमजानमधील रोजे त्यातून लाभणारे सर्वोत्तम आचरण, तिलावत, शबेकदरची रहमत तसेच शेजारी सहेरी किंवा इफ्तार याची वाहिली जाणारी काळजी जिच्यामुळे मिळणारी आत्मीक शक्ती आणि समाधान, जकात, सदका यामुळे संपत्तीची होणारी शुद्धता. रोजामुळे वेळेची झालेली जाण आणि शिस्त आणि इबादतमध्ये उद्दिष्ट अशा सर्वच बाबी अल्लाहचे प्रेम यातून पूर्णत्वास जाऊन अल्लाहप्रती असलेले कर्तव्य व ते पार पाडण्याची जबाबदारी सर्व काही सुरळीत घडून येण्यासाठी एकमेव कालावधी म्हणजे रमजान होय. आणि अल्लाहस त्याच्या दासाचे शारीरिक स्वास्थ्याचा लाभ होवून जीवन सुखी समाधानी राहते व याचाच आनंद रमजानला अलविदा करूनही टिकत असतो. ईद त्याचेच प्रतीक. ईद मुबारक.

- शकील शेख
येवला


रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
    इस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.
    या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकात आणि फित्र
1. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज्य असते, असे पुर्ण महिनाभर 30 दिवस चालते.
    या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणार्‍या मशीनला/गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे/मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची पचन व्यवस्था आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
    1. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.
    रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर आदी), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत-कमी सात वर्षे/अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.
    2. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असरची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.
    नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहु अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते.
    3. शब-ए-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ’आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. ’(दिव्य कुरआन 97:1)
    या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
    कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
(दिव्य कुरआन 97:3)
    या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खर्‍या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्‍चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.
    4. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
    जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
    कुराण हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज 1438 वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि इन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.
    ’उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन 15:9)
    5. जकात- फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 1.75 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे.
    फित्र्याशिवाय, प्रत्येक सधन व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या एकूण नगदी आणि सोनेनाणे धरून 7.5 तोळे सोने किंवा 52.5 तोळे चांदी. यापैकी कोणताही एक संपत्ती असेल व त्यावर एक वर्षे पूर्ण झालेले असेल तर त्याला 2.5 टक्के जकात द्यावी लागेल.
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात व फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात व सदकतुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
    वरील सर्व बाबीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजानचा रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे. जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
    महिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फित्रची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget