Latest Post

प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘ला कतअअला खाइनिन’’ खयानत (धोकाधडी) करणाऱ्या माणसाचे हात  कापले जाऊ नयेत.
स्पष्टीकरण- उपरोक्त हदीसवरून माहित होते की चोरीमध्ये धोकाधडी (खयानत) याचा समावेश नाही. चोरी म्हणजे एखाद्या मालाला  (धनाला) एखाद्याच्या कब्जातून काढून आपल्या कब्जात घेणे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे की एका ढालीच्या  किमतीपेक्षा कमी रकमेच्या चोरीसाठी हात कलम करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात अब्दुल्लाह बिन अब्बास यांच्या  कथनानुसार एका ढालीची किंमत दहा दिरहम, इब्ने उमर (रजी.) यांच्यानुसार, तीन दिरमह, तर अनस बिन मालिक (रजी.) यांच्या  मतानुसार पाच दिरहम तर माननीय आयशा (रजी.) यांच्या कथनानुसार एकचतुर्थांश दिनार होती. याच मतभेदाच्या आधारावर 
धर्मशास्त्रींच्या मते चोरीची कमीतकमी मात्राबद्दलसुद्धा मतभेद आहेत. इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, चोरीची मात्रा दहा दिरहम  आहे तर इमाम मालिक, शाफई आणि अहमद यांच्यानुसार एकचतुर्थांश दिनार आहे. अनेक अशा वस्तू आहेत ज्यांच्या चोरीबद्दल हात कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकत नाही.प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे की, ‘‘फळे आणि भाज्यांच्या चोरीत हात कापला जाऊ शकत नाही.’’ खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. माननीय आएशा (रजी.) यांचे कथन आहे की, तुच्छ वस्तूंच्या चोरीत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात हात कापला जात नसे. माननीय हजरत अली व हजरत उस्मान (रजी.) यांचा निर्णय आहे आणि सहाबांचा याविषयी मतभेदसुद्धा नाही की पशूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. या स्त्रोतांच्या आधारावर इस्लामी धर्मशास्त्रींनी अनेक वस्तूंना हात कापण्याच्या शिक्षेतून वगळले आहे.
इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, फळभाज्या, मटण, धान्य, जेवण, खेळ आदि वस्तूंच्या चोरीमध्ये हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच जंगलात चरणारी जनावरे आणि बैतुलमालची  चोरी करण्यात हात कापण्याची शिक्षा नाही. परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोऱ्यांविषयी बिल्कुल काही शिक्षा दिली जाऊ शकत नाही. म्हणजेच अपराधामध्ये हात कापला  जाणार नाही परंतु योग्य शिक्षा होईल. हात कापल्यानंतर जो मनुष्य क्षमायाचना करतो आणि आपल्या मनाला चोरीच्या अपराधाने पवित्र करतो तोच अल्लाहचा सदाचारी दास बनून  राहतो. तो अल्लाहच्या कोपापासून वाचला जाईल आणि अल्लाह त्याच्या त्या अपराधाचा डाग धुवून टाकील. एखाद्याने हात कापल्यानंतरसुद्धा आपल्या स्वत:ला वाईट संकल्पापासून  पवित्र केले नाही आणि त्याच दुष्ट भावनांना आपल्या मनात घर करून ठेवले ज्यांच्यामुळे त्याने चोरी केली व त्याचा हात कापला गेला होता तर याचा अर्थ असा होतो की हात तर  त्याच्या देहापासून वेगळा झाला परंतु चोरी त्याच्या मनात पूर्वीसारखीच राहून गेली. म्हणून तो अल्लाहच्या कोपाला पात्र राहील जसा पूर्वी होता. म्हणून अपराध्याने अल्लाहची क्षमा  मागावी आणि आपल्या मनाचा सुधार करावा कारण हात कापणे सामाजिक शिस्तपालन करण्यासाठी आवश्यक आहे. तथापि या शिक्षेपासून मन पवित्र होऊ शकत नाही. मनाचे पावित्र्य  फक्त क्षमायाचनेने व अल्लाहकडे परत येण्यातच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हदीसमध्ये असा आदेश आहे की, एका चोराचा हात जेव्हा त्यांच्या आदेशाने कापला गेला तेव्हा  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्याला आपल्या जवळ घेतले व सांगितले, ‘‘सांग! मी अल्लाहची माफी मागतो आणि क्षमायाचना करतो.’’ प्रेषितांच्या आदेशानुसार त्या व्यक्तीने क्षमायाचना  केली. नंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्या माणसासाठी अल्लाहजवळ प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह! याला क्षमादान दे.’’

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)
    या पुस्तिकेत दिनांक 13 एप्रिल 1939 रोजी या विषयावर मौलाना साहेबांनी दिलेले भाषण आहे. यात त्यांनी जिहादचा खरा अर्थ आणि विरोधकांनी काढलेला चुकीचा अर्थ आणि त्यांचा त्या मागील हेतु विशद करून जिहाद बाबत गैरसमज होण्याची कारण दिली आहेत. इस्लामी जिहाद केवळ जिहाद नसून अल्लाहच्या मार्गातील जिहाद आहे आणि त्या बाबतच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
    जिहाद का व कसा, विश्वव्यापी इस्लामी क्रांती आणि तिचे स्वरूप वर्णन केले आहे आणि या संदर्भात साम्राज्यवादाची आशंका व्यक्त केली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 93   -पृष्ठे - 24    मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/7vxp3dho80ov1p8woxjjo3gt16fzegpg

‘हिजरत’ (मदीना स्थलांतर) च्या सहाव्या वर्षाच्या शेवटी घडलेल्या एका महत्त्वाच्या घटणेकडे वाचकांचे लक्ष आम्ही वेधत आहोत. या घटनेचे इस्लामी आंदोलनावर अतिशय दूरगामी परिणाम झालेले आहेत.
त्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) यांना एक असे स्वप्न पडले की, ते आपल्या काही सोबत्यांना घेऊन शांतीपूर्वक मक्केस गेले आणि उमरा (काबादर्शन) केला. या स्वप्नाचा त्यांनी आपल्या सोबत्यांसमोर उल्लेख करताच सर्वांच्या मनात ‘उमरा’ (काबादर्शन) करण्याची तीव्र कामना निर्माण झाली.
शेवटी एके दिवशी म्हणजेच हिजरी सन सहामध्ये ‘जीकादा’ महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरबानीसाठी काही उंट घेऊन चौदाशे सोबत्यांसह मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषितांसह सर्वांनीच केवळ रक्षणात्मक हत्यार सोबत घेतले. मक्कातील कुरैशजणांना आपल्या ‘उमरा’ करण्याच्या उद्देशाची सूचना देण्यासाठी प्रेषितांनी ‘माननीय बिशर बिन सुफियान(र)’ यांना पुढे पाठविले. ‘माननीय बिशर(र)’ मक्कावरून परत आले आणि प्रेषितांना खबर दिली की, ‘कुरैश’ जणांनी प्रेषितांना मक्का शहरात दाखल होण्यास मज्जाव करण्यासाठी लष्कर जमविले असून याच्या तयारीचा भाग म्हणून खालिद बिन वलीद दोनशे स्वारांना घेऊन प्रेषितांशी दोन हात करण्यासाठी ‘गनीम’ या ठिकाणी पोहोचला आहे.
या वार्ता मिळाल्यावर प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपला मार्ग बदलून दुसर्या मार्गाने ‘सनीयतुल मरार’ या स्थानावर पोहोचले. तेथून जवळच ‘हुदैबिया’ नावाची एक विहीर आणि वसती होती. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या सोबत्यांसह येथेच पडाव टाकला. विहिरीत पाणी कमी होते, परंतु ईश्वरी चमत्काराने या विहिरीचे पाणीसुद्धा वाढले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय खिराश(र) यांना मक्कावासीयांशी बोलणी करण्यासाठी पाठविले. परंतु मक्कावासीयांनी त्यांच्याशी बोलणी करण्याऐवजी त्यांची स्वारी असलले उंट ठार केले व त्यांचीदेखील हत्या करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मध्यस्थी केल्यावर मात्र त्यांची हत्या टळली. मग मध्यस्थीसाठी प्रेषितांनी माननीय उस्मान(र) यांना मक्केस पाठविले. माननीय उस्मान(र) यांना परत येण्यास उशीर झाल्याचे पाहून प्रेषितांना वाटले की, कदाचित मक्कावासीयांनी त्यांची हत्या केली आणि ते शोकसागरात बुडाले. सर्वजण चिताग्रस्त झाले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी बाभळीच्या एका झाडाखाली आपल्या सोबत्यांसह प्रतिज्ञा केली की, माननीय उसमान(र) यांच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय येथून हलणारदेखील नाही. सर्वांनी एकमताने प्रेषितांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली. या झाडाचे नाव ‘रिजवान’ असल्यामुळे या प्रतिज्ञाकर्मास इस्लामी इतिहासात ‘बैतुर्रिजवान’ (रिजवान येथील प्रतिज्ञा) या नावाने ओळखले जाते. दिव्य कुरआनात ‘सूरह-ए-फतह’मध्ये या प्रतिज्ञा समारंभात सामील झालेल्यांना ईश्वराची प्रसन्नता लाभल्याची शुभवार्ता देण्यात आली आहे. मक्कामध्ये कुरैशजणांना या बदल्याच्या प्रतिज्ञेची खबर मिळताच ते घाबरले. शेवटी माननीय उस्मान(र) परत आले आणि प्रेषित व त्यांच्या सोबत्यांची चिता दूर होऊन आनंदाचे वातावरण पसरले.
मक्कावरून ‘खुजाआ’ कबिल्याच्या बुदैल बिन वरका या माणसाने हितैषीच्या स्वरुपात आदरणीय प्रेषितांना कुरैशजणांच्या भावना आणि लष्करी तयारी कळविली. उत्तरादाखल प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘आम्ही लढण्याच्या उद्देशाने मुळीच आलो नसून आमचा हेतु केवळ काबादर्शन करण्यचाच आहे.’’ मग प्रेषित मुहम्मद(स) परत म्हणाले, ‘‘कुरैशजण’ सतत लढाया करून खूप कमजोर झाले आहेत. त्यांनी एका ठराविक मुदतीकरिता युद्धबंदीचा आमच्याशी समझोता केल्यास हे त्यांच्या हिताचे ठरेल.’’ बुदैल बिन वरका याने प्रेषितांचा हा संदेश कुरैशजणांना कळविला. ‘कुरैश’च्या इतर काही बड्या नेत्यांसह उरवा बिन मसऊद सखफीनेसुद्धा म्हटले की, ‘‘मुहम्मद(स) यांनी पाठविलेला प्रस्ताव योग्यच आहे. मी स्वतः त्यांची भेट घेतो.’’
उर्वा बिन मसऊद प्रेषितदरबारी हजर झाला आणि प्रेषितांनी त्याच्यासमोरही आपला युद्धबंदी प्रस्ताव बोलून दाखविला. तो प्रेषित आणि त्यांच्या स्नेही सोबत्यांना पाहून खूप प्रभावित झाला. तो कुरैशजणांना जाऊन भेटला आणि म्हणाला, ‘‘हे कुरैशच्या सरदारांनो! मी रोमन सम्राट कैसर आणि पर्शियन सम्राट किसरा आणि ‘नेगूस’ यांच्या दरबारीसुद्धा जाऊन आलो. परंतु यापैकी कोणत्याच सम्राटाचा असा सन्मान करताना मी मुळीच पाहिला नाही, जेवढा सन्मान आणि आदर मुहम्मद(स) यांचे सोबती करतात. हे कुरैशच्या सरदारांनो! मुहम्मद(स) यांनी तुमच्याविषयी कोणतेच अपशब्द काढले नाहीत. त्यांचा संदेश स्वीकार करा!’’
मग मक्केतील ‘कनाना’ कबिल्याचा ‘हुलैस’ हा माणूस आला. त्याला लांबून पाहताच प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘कुरबानीसाठी आणलेल्या उंटांची रांग लावा. हा माणूस कुरबानीसाठी आणलेल्या प्राण्यांचा आदर करतो.’’ हुलैसने कुरबानीच्या उंटांची लांबलाचक रांग पाहताच कुरैशजणांकडे धावत जाऊन म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! मुहम्मद(स) आणि त्यांचे अनुयायी केवळ उमरा (काबादर्शन) करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना यापासून रोखने योग्य ठरणार नाही!’’ कुरैशजणांनी त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याला संताप चढला आणि त्याने स्पष्ट शब्दांत त्यांना ठणकावले की, ‘‘जर तुम्ही प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायांना या पुण्य कर्मांपासून रोखले तर मी आपल्या कबिल्यासह तुमच्यापासून विभक्त होईन!!!’’
शेवटी सुहैल बिन अम्र आले आणि काही वेळ बोलणी झाल्यानंतर समझोत्याच्या अटी निश्चित झाल्या. माननीय अली(र) हे समझोत्याचा करारनामा लिहिण्यासाठी बसले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘‘असीम दयाळू व कृपाळू ईश्वराच्या नावाने’’ लिहिण्यास सांगताच सुहैल बिन अम्र यांनी आक्षेप घेतला की, ‘‘आम्ही रहमान व रहीम (असीम दयाळू व कृपाळू) वर श्रद्धा ठेवीत नाहीत. त्यामुळे अरब समाजात प्रचलित असेलल्या परंपरेनुसार करारपत्र लिहावे.’’ म्हणून माननीय अली(र) यांनी त्याऐवजी ‘‘ईश्वराच्या नावाने’’ ने सुरवात केली. दुसर्या ओळीत दोन्ही पक्षांची नावे लिहिण्यात आली, तेव्हा माननीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नावाचा ‘‘ईश्वराचे प्रेषित’’ असा उल्लेख केला, त्यावर परत सुहैल याने आक्षेप घेताना म्हटले, ‘‘आम्ही जर मुहम्मद(स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकारले असते, तर मग आपल्यात कलह आणि वैर निर्माण होण्याचा प्रश्नच कुठे येतो? म्हणून तुम्ही ‘मुहम्मद बिन अब्दुल्लाह’ असे लिहावे. प्रेषितांनी त्यांची ही अटसुद्धा मान्य केली. या समझोत्याच्या निश्चित झालेल्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
  1. दहा वर्षांपर्यंत दोन्ही पक्ष आपसात युद्ध करणार नाहीत.
  2. प्रेषित मुहम्मद(स) यांचे जे सोबती काबादर्शन, ‘हज’ अथवा व्यापार किवा इतर कोणत्याही हेतुस्तव मक्का शहरात येतील त्यांच्या प्राण, वित्त आणि अब्रूचे रक्षण व्हावे. त्याचप्रमाणे ‘कुरैश’जणांच्या प्रत्येक व्यक्तीस मदीना शहरातून जाताना प्राण, वित्त व अब्रूचे संरक्षण मिळेल.
  3. कुरैशजणातील जो मनुष्य रक्षकाशिवाय मुहम्मद(स) कडे येईल त्यास सुरक्षितपणे परत जाता येईल आणि याउलट मुहम्मद(स) च्या अनुयायांपैकी जो मनुष्य ‘कुरैश’जणाकडे जाईल त्याला परत केले जाणार नाही.
  4. समझोत्यातील जवाबदार्यांमध्ये ज्या माणसास मुहम्मद(स) बरोबर राहावयाचे त्याने त्यांच्याबरोबर राहावे आणि ज्याला कुरैशबरोबर राहावयाचे त्याने कुरैशबरोबर रहावे.
  5. या वर्षी मुहम्मद(स) उमरा (काबादर्शन) केल्याविनाच परत जातील, मात्र पुढील तीन दिवस तीन रात्रीपर्यंत ते मक्का शहरात राहू शकतील आणि नंतर त्यांना मक्का सोडावे लागेल.
हा समझोता अजून पूर्णही झाला नव्हात, एवढ्यात ‘सुहैल बिन अम्र’चे पुत्र ‘माननीय अबू जुंदल(र)’ साखळदंडासहित कैदेतून बाहेर आले (माननीय अबू जुंदल(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला असल्याने कुरैशजणांनी त्यांना साखळदंडाने बांधून कैद केले होते.) ‘सुहैल’ त्यांना पाहताच म्हणाले की,
‘‘समझोता कराराच्या अट क्र. तीनप्रमाणे या माणसास आमच्या स्वाधीन करावे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘अजून तर करारपत्र लिहूनही झाले नाही.’’ ‘‘अशा प्रकारे तर कोणत्याही अटीवर करार पूर्ण होऊ शकणार नाही.’’ सुहैल उत्तरले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दुःखाचे घोट गिळत मोठ्या संयमाने ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना शत्रूच्या स्वाधीन केले आणि ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांचे सांत्वन करीत दुःखद स्वरात म्हणाले, ‘‘ईश्वर तुमच्या मुक्तीचा मार्ग अवश्य काढेल.’’ ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना आपल्या हाताने शत्रूच्या विळख्यात देताना प्रेषितांच्या अनुयायांचे दुःख अनावर झाले. त्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटत होता आणि ‘माननीय उमर(र)’ यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘‘आपण सत्यमार्गावर आहात काय? आणि असल्यास शत्रूसमोर आपण एवढे नमते कशासाठी घ्यायेच?’’
‘‘मी ईश्वराचा सच्चा प्रेषित आहे. त्याच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही!’’ प्रेषितांनी शांत स्वरात ‘माननीय उमर(र)’ यांना उत्तर दिले.
समझोतापत्र तयार झाल्यावर रिवाजानुसार प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना शीरमुंडनाचा आदेश दिला. परंतु मुस्लिमांमध्ये एवढा संताप होता की कोणीच जागेवरून हलण्याच्या मनःस्थितीतही नव्हते. सर्वजणांवर निराशेचे सावट पसरले होते. या प्रसंगी माननीय उम्मे सलमा(र) यांनी आपले अवसान एकवटून गहिवरल्या स्वरात प्रेषितांना म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! हा समझोता मुस्लिमांसाठी असह्य होत आहे. तुम्ही यांना काहीही म्हणू नका, स्वतःच कुरबानी करून स्वतःचे शीर मुंडन करावे. आपले सर्व अनुयायी आपले अनुकरण करण्यास्तव शीर मुंडन करतील.’’
आणि नेमके असेच घडले. दोन आठवडे थांबल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या चौदाशे सवंगड्यांसह हुदैबियावरून कूच केले. रस्त्यात दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-फतह’ अवतरली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांना जमवून या ‘सूरह’ मधील ईश्वराचा संदेश ऐकविला की ‘हुदैबिया’चा तह हाच आपला स्पष्ट विजय होय!’’ ही ईशवाणी ऐकताच सर्वांनी आश्चर्यचकित होऊन प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! खरंच हा विजय आहे?’’ ‘‘त्या पवित्र ईश्वराची शपथ की, ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहे! निश्चितच हा शानदार विजय आहे! प्रेषित गंभीरपणे उत्तरले. इतिहासात पुढे घडणार्या घटनेवरून हे सिद्ध झाले की, हीच घटना पुढे चालून इस्लामप्रचार, शत्रूवर विजय आणि मक्काविजयाची मुख्य आधारशिला ठरली.

आपल्या सभोवताली पसरलेले हे अनंत विश्व अगणित तारे, सूर्यमालिका व आकाशगंगा यांनी व्यापलेले असून, ज्यांच्या प्रकाशाची गती प्रती सेकंदास तीन लक्ष कि.मी. (1,86,000 miles/sec.) असून त्यास पृथ्वीवर पोहोचण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. हे ब्रह्मांड अनादी नसून काही अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. हे ब्रह्मांड आकस्मित किंवा अपघाती अस्तित्वात आलेले नाही, किबहुना असे होणे अशक्यप्राय आहे ! याचा एक निर्माता आहे व तो ‘अल्लाह’ आहे. या विश्वाच्या कानाकोपऱ्यात एकाच प्रकारचे समान कायदे, व्यवस्था लागू आहेत. म्हणजेच येथे अनेक ईश्वर नसून एकच ईश्वर आहे. हे विश्व ना देव-देवतांची लीला आहे आणि ना ही मायाजाळ. वास्तविक ही अल्लाहची विशिष्ट व ठोस विचारपूर्वक केलेली निर्मिती आहे. ईश्वराने विश्वाला ज्ञान, विवेक व बुध्दिचातुर्याने निर्माण केले आहे आणि याच्या प्रत्येक कणाकणांमध्ये शिस्त, नियमबद्धता, समतोलता, बुध्दिचातुर्य व विशिष्ट उद्देश दिसून येतो.
मनुष्य हा योगायोगाने, अपघाती किंवा स्वयंभू जन्मलेला नाही. तो मोकाट सुटलेला प्राणी पण नाही. अल्लाहने त्याला मनुष्य म्हणूनच निर्माण केलेले आहे. अल्लाहने त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये संपूर्ण श्रेष्ठता प्रदान केलेली आहे. पृथ्वीतलावर ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून आणि त्याच्या मर्जीप्रमाणे जीवन व्यतीत करण्याचा हक्क त्याला दिला आहे. अल्लाहने त्याला स्वातंत्र्य, स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता प्रदान केली असून त्यानुसार तो पुण्य आणि पाप यांसारखे कर्म करु शकतो. त्या अधिकार व स्वातंत्र्यामुळे तो अल्लाह आणि त्याच्या दासांजवळ आपल्या कृत्याला जबाबदार आहे.
ईश्वराने त्याच्या अंतर्मनामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट ओळखण्याची पारख व क्षमता दिलेली आहे. मनुष्य जन्मतःच गुन्हेगार वा पापी नसतो किंवा असा निष्पापही नसतो. ज्याकडून पुन्हा पाप घडणार नाही त्याच्याकडून पाप किंवा पुण्य घडू शकते आणि असे घडतेसुद्धा. एवढेच नव्हे तर केलेल्या चुकांची, पापांची क्षमायाचना करुनसुद्धा तो सन्मार्गाकडे वळू शकतो आणि तो तसे करतोदेखील.
प्रत्येक मानव, मग काळा असो वा गोरा, पाश्चिमात्य असो वा पौर्वात्य, एकाच ईश्वराची निर्मिती आणि भक्त आहे. त्याच्यामध्ये ईश्वराचा अंश नसून तो ईश्वराचे अपत्यही नाही. सर्व मानव आदम व हव्वा या एकाच आईवडिलांची अपत्ये आहेत. अखिल मानवजातीतील प्रत्येक व्यक्ती आपआपसात भाऊ-भाऊ आहे. वर्ण, जात, वंश, देश, भाषा, व्यवसाय, भाऊबंदकी यांच्या फरकावरुन त्यांच्यामध्ये भेदभाव करणे योग्य नाही. कोणत्याही जाती, वंश, भाऊबंदकी किंवा व्यवसायाशी त्यांचा संबंध असला तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून ते सर्व एकसारखे, समान व एकरुप आहेत आणि तो सत्प्रवृत्त, सदाचारी किंवा ईशभिरु, पापभिरु असेल तर तो ईश्वराजवळ व मानवाजवळ दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठित व आदरणीय आहे. उच्च-नीच आणि स्पृश्य अस्पृश्यता, समाजाने वाळीत टाकणे हा धार्मिक व नैतिक गुन्हा आणि संपूर्ण मानवतेवर होणारा अन्याय आहे. प्रत्येक मानवाचा देह पवित्र आहे. कोणा मानवाला स्पर्श केल्याने कोणी अपवित्र होत नाही. पण त्याच्या हाताला व शरीराला घाण लागलेली असेल तर तो अस्वच्छ होऊ शकतो. तसेच प्रत्येक मानवाचे उष्टे पवित्र आहे. मग तो कोणत्याही जाती, जमातीचा किंवा धर्माचा असो, प्रत्येक मनुष्याबरोबर बसून तो निर्धास्तपणे खाऊ-पिऊ शकतो. परंतु त्या खाण्या-पिण्याच्या वस्तू, स्वच्छ, पवित्र आणि वैध असाव्यात.
स्त्री ना सैतानाची एजंट आहे ना पापाचे मूळ, ना ती तिरस्करणीय वा अपवित्र आहे. ती मानवतेच्या व कायदेव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन ईश्वराजवळ हिशोब देण्यास जबाबदार आहे आणि ईश्वराचा कोप, शिक्षा, बक्षीस आणि चांगले फळ यांस पुरुषाएवढीच पात्र आहे. मातेचे स्थान मानवांमध्ये सर्वोच्च आहे आणि सर्वांमध्ये सद्वर्तन आणि सेवा यासाठी तिचे स्थान उच्च पातळीवर आहे.

- मर्कजी मकतबा
    या पुस्तिकेत दिव्य कुरआनच्या ज्या चोवीस आयतींवर आक्षेप घेण्यात आला होता त्याचे समर्पक उत्तर देण्यात आले आहे. यासाठी कुरआनच्याच आयतींना आधार बनविले आहे. संदर्भविहीन अर्थाचा अनर्थ लावून देण्याच्या कुप्रवृत्तील सडेतोड उत्तर देतांना पुस्तिकेत प्रथम स्पष्ट केले आहे -
    कुरआनने अखिल मानवजातीचा निर्माता एकमेव अल्लाह आहे आणि सर्व मानवजात एकाच आईवडीलांची संतती आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व मानव बंधु आहेत, असा उद्घोष केला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 91    -पृष्ठे - 16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2011)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/tmrxlej9c4zl19ag7acuqv348g2rja20
 
 

समलिंगी संभोग अत्यंत घृणास्पद पाप आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हा एक असा अपराध आहे ज्यापासून समाजाला पवित्र ठेवण्याचे दायित्व इस्लामी शासनाचे  अनिवार्य कर्तव्य आहे.’’ तसेच या अपराध करणाऱ्याला कडक शिक्षा दिली गेली पाहीजे. हदीस कथन आहे की, ‘‘भोगी आणि भोग्य दोघांना ठार करा. ते विवाहित असोत की  अविवाहीत.’’ प्रेषित लुत (अ.) यांच्या काळातील जनसमुहास, कौमे लूत असे म्हणतात. लूत जनसमुह एका किळसवाण्या विकृतेने पछाडला होता. आणि ती किळसवाणी विकृती  म्हणजे, पुरुषांनी पुरुषांशी शारिरीक संबंध (होमो सेक्स्युअ‍ॅलिटी) ठेवणे. या अनैतिकतेने जणू सांसर्गिक रोगाचे स्वरूप धारण केले होते. मानवी इतिहासात हा पहिला जनसमूह होय,  ज्याने जगात निर्लज्जतेचे अत्यंत हीन उदाहरण कायम केले. घृणायोग्य काम या जनसमुहाने केल्याने मानवी इतिहासात ते कुप्रसिद्ध आहेत. या कुकृत्याने हे लोक कधीही थांबले नाहीत. परंतु युनानच्या (सध्याच्या ग्रीसच्या) तत्त्वज्ञानी लोकानी या घृणास्पद अपराधाला नैतीक गुणात समावेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी जी उणीव शिल्लक राहिली  होती, तिला आजच्या चंगळवादी पाश्चात्य देशांनी पूर्ण केली आहे. यावरून समजते की नैतीक पतनाच्या आणि दुष्टतेच्या सर्व सीमा या लोकांनी पार केल्या होत्या. सुधारणा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नव्हता. ह्याच सीमेला पोहोचल्यानंतर, अल्लाहकडून त्यांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय झाला. ज्या समाजाच्या सामुहिक जीवनात पावित्र्याचा लवलेशही शिल्लक राहत नाही, त्या समाजास जमिनिवर जिवित राहण्याचे कारण राहत नाही.
‘‘आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले व त्यांच्यावर भाजलेल्या मातीच्या, दगडांचा वर्षाव केला, ज्यापैकी प्रत्येक दगड चिन्हांकित होता. तेव्हा पहा त्या अपराध्यांचा शेवट कसा  झाला?’’ (दिव्य कुरआन, सु. हिज्र, आयत- ७३ ते ७५)
स्वत:च्या पत्नीशी कुकर्म करणे हराम आहे.- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘जो आपल्या पत्नीशी, लूत जनसमुहांसारखा कुकर्म करील त्यावर धिक्कार आहे.’’ (हदीस : अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ‘‘अल्लाह त्या पुरुषांवर आपली कृपादृष्टी करणार नाही, जो आपल्या पत्नीशी असे कुकर्म करतो.’’ (हदीस : इब्ने माजा, अहमद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे, ‘‘ज्याने मासीक पाळी आलेल्या पत्नीशी शारिरीक सहवास केला किंवा पत्नीशी लुत लोकांसारखे कुकर्म केले तर अशा माणसाने प्रेषित  मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित शिकवणींना नाकारले आहे.’’ हदीस : तिर्मिजी)
शिक्षा- प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात असा कुकर्माचा दावा कोणी पेश केला नाही म्हणून पूर्णत: याविषयी शिक्षा कशी दिली जाते, हे कळू शकले नाही. माननीय अली (रजी.) यांच्या मतानुसार अपराध्यांना तलवारीने ठार केले जावे व त्याचे प्रेत जाळून टाकावे. याच मताला माननिय अबुबकर (रजी.) यांनी सहमती दर्शविली होती. माननिय उमर (रजी.) आणि  माननिय उस्मान (रजी.) मतानुसार, जुन्या पडक्या इमारतीच्या खाली अपराध्यांना उभे करून त्यांच्यावर ती इमारत पाडून टाकावी.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget