Latest Post

- अबुल आला मौदूदी
   
    या पॉकेट साईझ पुस्तकात इस्लाम हाच एकमेव व मार्ग मुक्ती व कल्याणाचा आहे, हे सांगितले गेले आहे. वास्तविकता ही आहे की या जगाच्या सफलते सह किंबहुना यापेक्षा अतिमहत्त्वाचे म्हणजे पारलौकिक जीवन साफल्यप्राप्तीसाठी आणि नरकाग्नीपासून वाचण्यासाठी या जगात सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.
    यासाठी म्हणजेच मनुष्यजीवनाचे कल्याण होण्यासाठी एकमेव मार्ग अल्लाहचा दीन इस्लामला जीवनातील दैनंदिन व्यवहारात पूर्णपणे आचरले जावे.

आयएमपीटी अ.क्र. 128   -पृष्ठे- 08      मूल्य - 10            आवृत्ती - 3 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/x7ynvbm6sa2o3e4buzapvpflcn35j7jj

ह. अब्बास (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘इमानाची (श्रद्धेची) गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून,  इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून आनंदित झाला.’’ (हदीस - बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञापालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्र-नियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित ह.  मुहम्मद (स.) याच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ठ आहे, त्याचा फैसला आहे की मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत  इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही मानसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या माणसाची अशी व्यवस्था   होईल तेव्हा समजून घ्या की त्याने ईमानची गोडी चाखली. माननिय उमर (रजी.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘तुम्ही अल्लाहला, त्याच्या  फरिश्त्यांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, अल्लाहच्या प्रेषितांना आणि आखिरतला (मरणोत्तर जीवनाला) सत्य जाणा आणि सत्य माना आणि या गोष्टीस ही मान्य करा की, जगात जे  काही घडते, ते ईश्वरातर्फे घडत असते. मग ते चांगले असो की वाईट असो.’’ (हदीस - मुस्लिम)

भावार्थ- इमान (श्रद्धा) चा शाब्दिक अर्थ एखाद्यावर भरवसा करणे, मन:पुर्वक विश्वास राखणे आणि त्याचे म्हणणे खरे मानणे. ‘इमान’चा मूळ आत्मा हाच भरवसा व विश्वास आहे.   इमानचे वेगवेगळे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण -
१) ‘ईमानबिल्लाह’ अर्थातच अल्लाहवर ईमान राखणे म्हणजे त्याला सृष्टीनिर्माता, रचनाकार व समस्त सृष्टीचा व्यवस्था राखणारा मानणे. मन:पुर्वक हे मान्य केले जावे की या सर्व  बाबीमध्ये अल्लाहचा कोणीही सहभागी नाही. आणि हे मानले जावे की सर्व प्रकारच्या व्यंगदोष, उणीवापासून अल्लाह मुक्त आहे, पवित्र आहे. तो सद्गुणांचा स्वामी आणि चांगुलपणाचा  मूल स्रोत आहे.
२) ‘प्रेषितांवर’ इमान राखणे म्हणजे, समस्त प्रेषितांना सच्चे, खरे मानणे. समस्त प्रेषितांनी किंचितही उणे अधीक न करता, ईश्वराचे आदेश व मार्गदर्शन लोकापर्यंत पोहोचविले. प्रेषित  शृंखलेची अंतीम कडी प्रेषित मुहम्मद (स.) होत. आता प्रलयकाळापर्यंतील मानवांना मुक्ती केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मार्गाचे अनुसरण केल्यानेच लाभेल.
३) फरिश्त्यांवर इमान राखणे म्हणजे त्यांचे अस्तित्व मान्य करणे, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत. सदा सर्वदा अल्लाहच्या उपासनेत व आज्ञापालनात ते मग्न असतात.
४) ग्रंथावर इमान राखणे म्हणजे अल्लाहने प्रेषितांद्वारे वेळोवेळी जे मार्गदर्शक ग्रंथ अवतरिले, त्या सर्व ग्रंथांना सत्य मानावे. त्या ईशग्रंथात अंतीम मार्गदर्शक ग्रंथ ‘पवित्र कुरआन’ आहे.  पूर्वीच्या जनसमुहांनी आपल्या काळातील ईशग्रंथामध्ये फेरबदल करून, त्याचे मूळ स्वरूप बिघडविले. अंतीम ग्रंथ कुरआन कसल्याही व्यंग-दोषापासून मुक्त आहे. तो सर्व प्रकारच्या   बिघाडापासून सुरक्षित आहे. या कुरआनाखेरीज जगात असा कोणताही ग्रंथ नाही. ज्याद्वारे ईश्वराप्रत पोहोचले जाऊ शकते.
५) आखीरतवर इमान म्हणजे, अंतीम न्यायनिवाड्यासंबंधी मान्य करणे. त्या दिवशी मानवाच्या संपूर्ण जीवनाचा हिशेब घेतला जाईल. ज्याचे आचरण ईश्वराच्या नजरेत पसंत ठरेल तो  बक्षिसपात्र ठरेल (जन्नतवासी), ज्याची कर्मे नापसंत तो शिक्षापात्र (नरकवासी) ठरेल. ही शिक्षा अमर्याद असेल आणि बक्षिसही अमर्याद असेल.
६) भाग्यावर इमान राखणे म्हणजे, जगात जे काही होत आहे ते ईश्वराच्या आदेशाने होत आहे. अल्लाहच्या कृतज्ञशील दासांवर जी आपत्ती कोसळते, ज्या अडचणींना त्यांना तोंड   द्यावे लागते, ही सर्व परिस्थिती अल्लाहच्या हुकुमौने आणि आधीपासूनच निर्धारित केलेल्या विधीनियमानुसार येत असते.

जे लोक इस्लामला गतकाळाची गोष्ट समजतात व वर्तमानकाळातील त्याची उपयुक्तता, तसेच आवश्यकता यांचा इन्कार करतात ते वास्तवात इस्लामचे खरे स्वरुप जाणत नाहीत व जीवनातील त्याच्या खऱ्या संदेशासी व ध्येयाशी अनभिज्ञ आहेत. लहानपणी साम्राज्यवाद्यांच्या एजंटांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातून त्यांना जे काही शिकविले गेले तोच शिकविलेला धडा ते आजही गिरवीत आहेत. त्यांच्यामते इस्लामच्या उदयाचा हेतू मानवाला मूर्तीपूजेपासून मुक्त करण्याचा होता. तसेच परस्पराशी वैरभाव बाळगणाऱ्या अरबी टोळ्यांची एकजूट करुन त्यांच्यात बंधुत्व निर्माण करण्याचा होता. तसेच दारु पिणे, जुगार खेळणे, मुलींना जिवंत पुरणे व याप्रकारच्या अनेक नैतिक दोषांपासून मुक्त करण्याचा होता. म्हणून इस्लामने अरबांमधील आपापसातील झगडे व लढाया समाप्त करुन त्यांची शक्ती नष्ट होण्यापासून वाचवली व नंतर जगामध्ये आपल्या संदेशाचा प्रचार करण्याकरिता या शक्तीचा उपयोग केला. या ध्येयासाठी मुस्लिमांना इतर जातीशी अनेक युद्धे करावी लागली. परिणामस्वरुप इस्लामी जग आपल्या वर्तमान मर्यादांसह या विश्वपटला वर उभे राहिले. हा एक असा ऐतिहासिक संदेश व ध्येय आहे ज्याचे कार्य आता पूर्ण झाले आहे. जगात मूर्तिपूजा संपली आहे. अरब टोळ्यांनी आता मोठमोठ्या राष्ट्रांचे रुप धारण केले आहे, म्हणून आता इस्लामची काही गरज उरली नाही. कारण जेथपर्यंत जुगार खेळण्याचा व मदिरा प्राशन करण्याचा संबंध आहे, त्यावर आजच्या संस्कृतीच्या व संस्काराच्या युगात कोणताही पायबंद घालणे शक्य नाही. याचा अर्थ असा की या लोकांमध्ये इस्लाम एका विशेष काळापुरता अतिउचित जीवनव्यवस्था देणारा धर्म होता. पण आज जग इतके पुढे गेले आहे की आज इस्लामच्या मार्गदर्शनाची काही गरज उरली नाही. म्हणून मार्गदर्शन व प्रकाशाकरिता आम्ही त्याच्याकडे पाहू नये. उलट सिद्धान्त व जीवनदर्शनापासून हा प्रकाश व उपदेश घ्यावयास पाहिजे. यातच आमची मुक्ती होऊ शकते व यातच आमचे कल्याण सामावलेले आहे.
पाश्चिमात्यांचे हे पौर्वात्य चेले आपल्या गुरुंच्या वाक्यांचा पुनरुच्चार करुन अनिच्छेने व अज्ञानाने आपल्या संकुचितपणाची जाणीव करुन देतात. हे बिचारे इस्लामला जाणतही नाहीत, तसेच जीवनातील त्याचे वास्तविक उद्देशही त्यांना ठाऊक नाहीत. म्हणून पुढे जाण्यापूर्वी ‘इस्लाम’, त्याचा अर्थ व उद्देश यावर थोडीशी चर्चा आवश्यक आहे.

धर्म आणि फक्त धर्मच जगाला गमावलेली सुख-शांती देऊ शकतो. तो माणसाच्या मनात खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण करुन त्याला अन्यायाशी सामोरे जाऊन मुकाबला करण्याचे धैर्य प्रधान करतो आणि त्याला दर्शवितो की जर तो आपल्या पालनकर्त्या स्वामीच्या प्रसन्नतेचा इच्छुक आहे, तर त्याने दुष्टपणाचे अधिपत्य करणाऱ्या दैत्यांना नष्ट करून केवळ आपल्या पालनकर्त्याचे शासन स्थापित केले पाहिजे. या मार्गात येणाऱ्या सर्वप्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि केवळ परलोकीय यशावर दृष्टी ठेवली पाहिजे. काय आजच्या जगाला सुख, शांती, समाधान याकरिता धर्माची गरज नाही काय?
धर्माविना जीवनाला आरंभापासून काही अर्थ उरत नाही. परलोकावरील दृढ विश्वास ही धर्माची बहुमोल विशेषता आहे. हा विश्वास प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवन एका नव्या श्रद्धेचे बोट पकडते व त्याच्यासमोर नवनवी क्षितिजे उभी राहतात. परलोकावरील दृढविश्वासाविना मानव नीचतेच्या कष्टदायी अनुभूतीचे लक्ष्य बनतो. मरणोत्तर जीवनाच्या इन्काराचा अर्थ असा होतो की समाजातील एकत्र जीवनाचा, मानवी आयुष्याचा भाग केला जावा व मानवाला आपल्या आंधळ्या व बहिऱ्या वासना, इच्छा, तसेच अंधविश्वास यांच्या दयेवर मोकळे सोडून देण्यात यावे. त्यानंतर माणूस आपल्या इच्छापूर्तीमध्ये स्वतःला हरवून बसतो. जितके अधिक सुख तो मिळवू शकतो, तितके गोळा करावे आणि त्यात इतर कोणालाही वाटेकरी होऊ देऊ नये, हेच त्याच्या सर्व प्रयत्नांचे व पराकष्टेचे ध्येय व लक्ष्य बनते. येथूनच हेवेदावे, झगडे व रक्तरंजित युद्धांचा आरंभ होतो व इच्छादासांनी भरलेल्या या जगामध्ये आपल्यासमोर पसरलेल्या सुखद गोष्टीवर तुटून पडून प्रत्येकजण ते जास्तीतजास्त हस्तगत करु इच्छितो. अधिकाधिक फायदे कमीतकमी वेळात तो एकटा गोळा करु इच्छितो. त्याच्या मनात कोणत्याही उच्चतम सत्तेचे भय असत नाही, कारण त्यांच्यानुसार या जगाचा कोणी ईश्वर नसतो व कोणतीही न्याय व्यवस्था नसते.
पारलौकिक जीवनाच्या इन्कारामुळे माणूस इच्छांच्या खोल गर्तेत बुडून जातो. त्याच्या विचाराची व चितनाची भरारी उदात्ततेपासून वंचित होते आणि त्याचे हेतू व कार्यभाग साधून घेण्याचे मार्ग अधःपतनाचे लक्ष्य बनतात. मानवता आपापसातील झगड्यांचा व लढायांचा आखाडा बनते. त्यानंतर माणसाला इतकी उसंतच मिळत नाही की त्याने उच्च व उदात्त जीवन उद्देशांचा पाठपुरावा करावा. या नवीन जगात प्रेम व सहानुभूतीला काही स्थान नसते. भौतिक सुखाची लालसा व इच्छा वासनांचे अधिपत्य यामुळे जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा व सद्भावांचा आदर करण्याची माणसाची क्षमता लोप पावून असा आदर करण्यापासून तो अक्षम केला जातो.
भौतिक जडवादाचा परिणाम
भौतिकवादी माणसांना काही भौतिक फायदेही मिळून जातात यात शंका नाही, पण भौतिकवादात एक असा शाप आहे की वरपांगी दिसणारे हे फायदेही नाश पावतात. माणूस त्यांच्या लालसेने आंधळा बनून आपल्याच बांधवाशी लढत असतो. इच्छाशक्ती, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार या कुभावनांवर त्याचा ताबा नसतो आणि तो त्यांच्या बंधनातून कधीही मुक्त होऊ शकत नाही.
ज्या लोकजाती भौतिकतेचा अंगीकार करतात त्यांच्यावर निरंतर एक प्रकारच्या दडपणाचे व गृहकलहाचे वातावरण आच्छादित असते. परिणामस्वरुप समस्त मानवी जीवन अस्तव्यस्त होऊन जाते आणि विज्ञान व त्याची भयानक अस्त्रे मानवी वंशाची सेवा करण्याऐवजी माणसाचा सर्वनाश व संहार करण्यात व्यतीत होऊ लागतात.
संकुचितपणावर उपाय
भौतिकता माणसाच्या संकुचितपणाचे प्रतीक आहे. यातील बिघाडापासून वाचण्याकरिता मानवतेच्या मानसिक क्षितिजांचा विस्तार करण्याची गरज आहे. हा उद्देश केवळ धर्मानेच प्राप्त होऊ शकतो. केवळ तोच मानवतेला नवा विस्तार व नवी उदात्तता प्रदान करु शकतो, कारण धर्माच्या दृष्टीने मानवी जीवन फक्त इहलोकापुरतेच मर्यादित नसून ह्यानंतरचीही परंपरा निरंतर चालू राहत असते. हा विश्वास माणसाच्या मनात एका नवीन आशेची ज्योत प्रफुल्लित करतो, त्याला दुष्टपणा, अत्याचार, तसेच दडपण याविरुद्ध धैर्याने झगडण्याचे साहस प्रदान करतो आणि त्याला हे दाखवून देतो की सारी मानवजात एकमेकांचे बंधू आहेत. प्रेम आपापसांतील सहानुभूती व विश्वबंधुत्व या गोष्टीचे शिक्षण मानवतेला सुखशांती व वास्तविक समृद्धी, तसेच विकास व उन्नती यांनी वैभवसंपन्न करुन टाकतो. अशी वस्तुस्थिती व सत्य असतांना धर्म ही माणसाची अंतिम गरज नाही आणि मानव आजही तिचा गरजवंत नाही, जसा शतकानुशतकापूर्वी होता, असे कोण म्हणू शकतो? जीवनक्षेत्रात धर्म ज्याप्रकारे माणसाला घडवून तयार करतो, त्याप्रकारे दुसरी कोणतीही शक्ती माणसाला घढवू शकत नाही.
दीपस्तंभ
धर्म माणसाला स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगण्याचे शिकवितो, त्याला एक उदात्त व पवित्र लक्ष्य देतो आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गांत येणाऱ्या कष्टांचे व संकटाचे, खुल्या मनाने स्वागत करण्याचे शिकवितो. धर्मांने प्रदान केलेल्या त्या ईमान (श्रद्धा) व विश्वास यापासून जर मानव वंचित झाला, तर तो स्वतःखेरजी दुसऱ्या कोठल्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही. सर्व जीवन स्वार्थ व स्वभक्ती याची प्रतिमा होऊन जाते. त्यांच्यात व जंगली श्वापदात काही अंतर उरत नाही. इतिहासात अशा असंख्य व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी आयुष्यभर न्याय व सत्य याच्या रक्षणार्थ ढालीचे कार्य केले आणि त्यामध्ये आपल्या प्रिय प्राणाचीही आहुती व बलिदान केले. त्यांना आपल्या दीर्घ प्रयत्नाचे व त्यागाचे कसलेही फळ या जगात मिळाले नाही. प्रश्न असा आहे की कोणत्या दृष्टीने या लोकांना असा लढा देण्यास उद्युक्त केले? ज्याचा परिणाम असा निघाला की त्यामध्ये त्यांना कसलेही भौतिक यश प्राप्त झालेच नाही, परंतु जे काही त्यांच्यापाशी होते तेही या लढ्यानंतर त्यांच्या हातून निसटले. याचे उत्तर केवल एकच आहे आणि ते म्हणजे श्रद्धा या पवित्र मानवी जीवांचे अस्तित्व याच श्रद्धेचा एक छोटा चमत्कार आहे. याउलट लोभ, मोह, कपट, द्वेष, स्वार्थ तसेच तिरस्कार हे असे नीचतेचे प्रेरक आहेत की ज्यांच्याद्वारा कसलेही वास्तविक व सुदृढ यश प्राप्त होऊ शकत नाही. त्याचा झगमगाट बाह्यत्कारी व क्षणभर होत असतो. त्यांच्या प्रभावाखाली असलेली माणसे तत्काळ लाभाची इच्छा करतात. त्यामुळे माणसात कधीही स्वास्थ्यपूर्ण चारित्र्य वाढीस लागू शकत नाही. तसेच त्यामध्ये एखाद्या उच्च ध्येयासाठी, जगाचा त्याग करुन सोशिकपणाने, सहनशीलतेने व भक्कमपणे सतत प्रयत्न करीत राहण्याची भावना टिकून ती वाढीस लागू शकत नाही.
तिरस्काराचे भक्त
आम्हाला हे माहीत आहे की काही तथाकथित सुधारक प्रेमाऐवजी द्वेष व तिरस्कारद्वारा जगाची सुधारणा करु इच्छितात. द्वेषातच ते सतत गुरफटलेले असतात. त्यापासूनच ते पोषण व शक्ती प्राप्त करतात व त्याच्याच सहाय्याने, दुःखांनी आणि कष्टांनी वेढलेले असतानासुद्धा भक्कमपणे व साहस करुन आपले सुधारणाअभियान चालू ठेवतात. या लोकांच्या तिरस्काराचे लक्ष्य मानवी वंशाचा एखादा विशेष समूहही होऊ शकतो आणि हेही संभव आहे की सामूहिकरुपाने अखिल मानवजात अथवा तो ऐतिहासिक काल त्याचे लक्ष्य होतो, ज्यामध्ये तिरस्काराच्या भक्तास जाग येते. मानवतेपासून दूर असलेले हे वैफल्यग्रस्त ‘सुधारक’ व त्यांचा समूह, आपले उद्देश प्राप्त करणे निश्चतच संभवनीय आहे. तिरस्काराची आग त्यांच्या दुष्ट स्वभावाशी व उपजत अत्त्याचाराची सवय असल्याने हे लोक आपल्या उद्देशपूर्तीकरिता पूर्ण एकोपाही दाखवू शकतात व सर्व प्रकारच्या उणिवाही व वंचितपणा पसंत करु शकतात. परंतु जी श्रद्धा प्रेमाऐवजी तिरस्कारावर आधारलेली असेल त्यापासून, मानवतेला कसलेही कल्याण व यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यापासून वर्तमान अन्यायाची, तसेच समाजातील प्रचलित वाईट गोष्टीचे परिमार्जन करुन झालेले नुकसान व त्याची भरपाई निसंदेह पुरी केली जाऊ शकते. पण त्याचा हात मानवतेच्या या आजाराच्या रामबाण उपायापासून बिलकूल रिकामा असतो. याच कारणस्तव समाजाचे वर्तमान दोष नष्ट करण्याच्या नावावर केले जाणारे हे सुधारणेचे इलाज व उपाय, त्या दोषांना कमी करुन त्यांना नष्ट करण्याऐवजी, त्यामध्ये अनेक पटीने वृद्धी करतात आणि अशी अवस्था निर्माण होऊन जाते की -
‘जो जो उपाय केला गेला तो तो आजार वाढतच गेला.

आपल्या आजोबाप्रमाणेच आदमच्या संततीवरही अल्लाहची कृपा आहे. आपल्या अपराधानंतरही आदरणीय आदम (अ) जसे अल्लाहच्या कृपेपासून वंचित झाले नाहीत तसेच त्यांची संतती ही गुन्हा व पाप घडल्याकारणाने अल्लाहच्या कृपेपासून वंचित होत नाही. कारण अल्लाह मानवी स्वभावधर्मातील कमकुवतपणा व त्याच्या मर्यादा चांगल्या रीतीने जाणतो व जेवढा भार ते पेलू शकतात तेवढाच भार त्यांच्यावर टाकतो -
‘‘अल्लाह कोणत्याही प्राण्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे लादत नाही.’’ (कुरआन,२:२८६)
सर्व मानव (आदम (अ) ची संतती) अपराधास व चुकास पात्र आहेत व जे आपल्या अपराधासाठी (लज्जित होऊन) क्षमा याचना करतात, ते लोक अपराध्यांमध्ये महान आहेत.’ (तिर्मिजी)
अल्लाहच्या कृपेची व्यापकता
अल्लाहच्या दयेक्षमेबाबत तर कुरआनमध्ये अनेक आयती आहेत, पण आम्ही येथे एकच उदाहरण देतो
‘‘तुमच्या पालनकर्त्यांची क्षमा व स्वर्गाकडे नेणाऱ्या मार्गांने दौडत चला व स्वर्ग, जमीन व आकाशाप्रमाणे विशाल असून ते अशा संयमी जनांसाठी निर्माण केलेले आहे जे, सुस्थितीत तसेच कुस्थितीत संपत्ती खर्च करतात जे क्रोधाला जाळून टाकतात व इतरांच्या चुकांची क्षमा करतात. असे भले व सज्जन ईश्वराला अतिप्रिय असतात. त्यांची अवस्था अशी असते की एखादे कुकर्म त्यांच्या हातून घडते, अगर एखादे पाप करुन स्वतःवर ते अत्याचार करुन बसतात, तेव्हा तात्काळ त्यांना अल्लाहचे स्मरण होते व आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमायाचना भाकू लागतात. कारण अल्लाहखेरीज अपराधाची क्षमा कोण करू शकतो व ते हेतुपुरस्सर आपल्या अपराधाचे समर्थन करीत नाहीत. अशा लोकांना त्यांचा पालनकर्ता क्षमा करून, त्यांच्या क्षमायाचनेचा मोबदला देईल व त्यांना स्वर्गांच्या अशा उद्यानात दाखल करील तेथे खालून पाण्याचे कालवे वाहात असतील व तेथे ते चिरकाल राहातील. सद्वर्तन करण्यासाठी किती छान मोबदला आहे.’’ (३:१३३-१३६)
अल्लाहची कृपा किती व्यापक आहे, हे यावरून स्पष्ट होते. तो आपल्या दासांची क्षमायाचना स्वीकारतो एवढेच नाही तर त्या पापाच्या घाणीतून वर काढून व त्याला निर्मळ व शुचिर्भूत बनवून, आपल्या वेचक दासांच्या समूहात त्याचा समावेश करून टाकतो.
अल्लाहच्या कृपेचा एक आश्चर्यजनक पैलू
अशा कृपाळू व मेहेरबान अल्लाहच्या दये व क्षमेबाबत थोडासुद्धा संशय उरतो काय? अल्लाहच्या कृपेच्या अशा व्यापक धारणेमुळे आध्यात्मिक कष्ट व अस्वस्थपणा नष्ट होऊन जातो. तो माणसाला दाखवून देतो की तो आजन्म अपराधी नाही. तसेच त्याच्या पालनकर्त्याची कृपाही त्याच्या अवस्थेबद्दल गाफील नाही. उलट तो जेंव्हा पापाकरिता त्याची अंतःकरणपूर्वक क्षमायाचना भाकतो तेव्हा तो त्याला आपल्या आश्रयस्थानात घेतो. त्याकरिता खरोखरीने व निष्ठेने लज्जित व खजील होण्याखेरीज दुसरी कसलीही अट नाही. ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की तिचे समर्थनार्थ आणखी अधिक पुरावे देण्याची गरज नाही, तरी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या अनुपम वचनावर एक दृष्टिक्षेप टाकू या. मुस्लिमनुसार त्यांनी असे सांगितले,
‘‘ज्याच्या ताब्यात माझा प्राण आहे त्या शक्तिची शपथ, जर तुम्ही कसलेही पाप केले नसते, तर अल्लाहने तुम्हाला नष्ट करुन तुमचे जागी अशा लोकांना निर्माण केले असते, जे पापे करुन त्याची क्षमायाचना भाकीत आहेत व त्याने त्यांना क्षमा केली असती.’’ (मुस्लिम)
असे समजा की, माणसांच्या चुकांकडे डोळेझाक करुन त्यांना क्षमा करणे हाच जणू अल्लाहचा मानस आहे, कुरआनची ही शानदार आयतही हीच गोष्ट उघड करते,
‘‘जर तुम्ही कृतज्ञ भक्त होऊन श्रद्धेच्या मार्गाने गेलात तर शेवटी तुम्हाला अकारण शिक्षा करण्यात अल्लाहला काय स्वारस्य आहे. अल्लाह मोठा गुणग्राही आहे व सर्वांची अवस्था चांगल्या तऱ्हेने जाणतो.’’ (कुरआन ४:१४७८)
निःसंशय अल्लाह माणसाला कष्टात खितपत असलेला पाहू इच्छित नाही. उलट त्याला आपली कृपा व क्षमा प्रदान करतो.

आज विज्ञानाच्या आश्चर्यजनक यशाने पाश्चिमात्य लोकांना असे काही भारून टाकले आहे की त्यांच्यात असा शीघ्रगतीने विचार पसरला आहे, की विज्ञानाने धर्माला कायमचे परागंदा करून टाकले आहे. कारण त्याची उपयुक्तता संपली आहे. मानसशास्त्राच्या तसेच समाजशास्त्राच्या प्रसिद्ध तज्ञापैकी जवळजवळ सर्वांनी अशाप्रकारचे विचार व्यक्त केले आहेत. उदाहरण द्यावयाचे म्हटले तर युरोपमधील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ ‘फ्राईड’ने धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नावर हल्ला व उपहास करताना असे लिहिले की मानवी जीवन तीन प्रकारच्या स्पष्ट मानसशास्त्रीय कालातून जात असतो. रानटीकाल, धर्मकाल आणि वैज्ञानिक काल, आता विज्ञानाचे युग आहे म्हणून धर्माच्या गोष्टीत काही अर्थ व तथ्य नाही, तो संपला आहे व आपले मूल्य हरवून बसला आहे.
धर्माशी वैरभावाचे खरे कारण
धर्माच्या बाबतीत युरोपियन वैज्ञानिकांच्या विरोधी भूमिकेचे खरे कारण तो संघर्ष होता जो त्यांना युरोपीय चर्चच्या विरुद्ध करावा लागला. त्या संघर्षात चर्चने ज्या प्रकारच्या आचरणाचे प्रदर्शन केले ते पाहून ते लोक हेच सत्य आहे असे समजू लागले की धर्म हा प्रतिगामीत्व, रानटीपणा, अंधविश्वास निर्मूल व बिनबुडाच्या विचारांचा परिपाक आहे. म्हणून श्रेयस्कर असे आहे की धर्म कायमचा नष्ठ केला जावा. विज्ञानाला पुष्टी दिली जावी व त्याच्या मार्गदर्शनात मानवजातीची, तसेच संस्कृतीचा विकास चालू राहू शकेल.
युरोपीयन वैज्ञानिकांचे धर्माशी वैर असण्याचे खरे कारण हे होते. धर्माविरुद्ध असणारे काही मुस्लिम या खऱ्या कारणाला समजून घेत नाहीत, तसेच पूर्व व पश्चिमेतील परिस्थितीचा फरक लक्षात घेत नाहीत व धर्माला विरोध करीत असतात. त्यांचा विरोध एखाद्या गंभीर चितन व विचारांती नसतो, किबहुना तो युरोपच्या अंधानुकरणाचे अपत्य आहे. त्यांच्यासमीप विकास व उन्नतीचा तोच एकमेव मार्ग आहे ज्या मार्गाने युरोपियन राष्ट्रे जात आहेत. म्हणून आम्हालाही धर्माची कास सोडून दिली पाहिजे. असे नाही केले तर लोक आम्हाला प्रतिगामी व मागासलेले म्हणून टोमणे मारतील.
दुर्दैवाने हे लोक विसरतात की युरोपियन विद्वानांमध्येही धर्मविरोधाच्या बाबतीत पूर्वी एकमत आढळत नाही. तसेच आताही पूर्ण एकमत आढळत नाही. याउलट काही मोठे विद्वान या निरीश्वरवादी संस्कृतीला विटून हे सत्य उघडपणे बोलू लागले आहेत, की धर्म ही मानवाची अनिवार्य मानसशास्त्रीय व बौद्धिक गरज आहे.
युरोपियन विद्वानांची साक्ष
या विद्वानात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जेम्स जीन्स प्रमुख आहे. जेम्सच्या जीवनाचा आरंभ एक निरीश्वरवादी व प्रत्येक विषयात शंकादृष्टी ठेवणाऱ्या युवकाच्या रुपात झाला. पण आपल्या अनेक वैज्ञानिक शोधांनंतर शेवटी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचला की धर्म ही मानवी जीवनातील अनिवार्य गरज आहे, कारण ईश्वरावर आस्था बाळगल्याविना विज्ञानाच्या मूळ समस्या उलगडल्या जाऊ शकत नाहीत. हा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जेम्स जीन्ज धर्माच्या समर्थनार्थ इतका पुढे गेला, की त्याने जडवाद व अध्यात्मावाद या दोघांच्या समन्वयावरील विश्वास व आचरण यांचा समतोल एकत्रित करण्याच्या पद्धतीवर इस्लामची उघडपणे स्तुती केली. इंग्लंडचे प्रसिद्ध साहित्यिक ‘समर्सेटमॉम’ने धर्माच्या बाबतीत आजच्या युरोपातील नकारात्मक भूमिकेला या शब्दांत संबोधिल आहे, ‘‘युरोपने आपल्याकरिता एक नवीन ईश्वर ‘विज्ञान’ शोधून काढले आहे आणि जुन्या ईश्वरापासून तोंड फिरविले आहे.’’
युरोपचा नवा ईश्वर
परंतु युरोपचा हा नवीन ईश्वर मोठा ‘‘परिवर्तनवादी’’ निघाला आहे. हा प्रत्येक क्षणी बदलत असतो व त्याचा दृष्टिकोन नेहमी बदल व स्थित्यंतर करण्याकडे असतो. एखाद्या गोष्टीला तो आज ‘सत्य’ मानतो, तर उद्या खोटे, असत्य व फसगत असे म्हणून टाकतो. परिवर्तनाचे हे चक्र असे चालतच राहते. ते कधी संपत नाही आणि त्याचे भक्त नेहमी त्रासलेले असतात. अशा तऱ्हेच्या परिवर्तनशील व प्रत्येकक्षणी बदलणाऱ्या ईश्वराच्या छत्राखाली ते आणखी वेगळी कसली आशा करू शकतात. आजचे पाश्चिमात्य जगत बेचैनी व असंतोषाच्या मेघांनी झाकोळलेले आहे. ते अनेक मानसिक व मानसशास्त्रीय रोगांचे बळी होत आहेत. ती त्यांच्या मूळ आध्यात्मिक रोगाची बाह्यचिन्हे होत.
विज्ञानाचे नवे जग
विज्ञानाला ईश्वरपद बहाल करण्याच्या कृतीचा आणखी एक असा परिणाम निघाला आहे की जेथे तुम्ही आम्ही राहतो, हे जग कुठल्याही स्पष्ट उद्देशापासून अथवा ध्येयापासून बिलकूल वंचित झाले आहे. त्याचा कुठलाही उच्च उद्देश नाही, व्यवस्था नाही तसेच कोणतीही श्रेष्ठ सत्ता वा शक्ती येथे अस्तित्वात नाही, जिच्याद्वारे जगाचे मार्गदर्शन होऊ शकेल. येथे परस्परविरोधी शक्तींमध्ये सतत संघर्ष चालू आहे व येथील प्रत्येक वस्तू परिवर्तनाचे लक्ष्य आहे. आर्थिक पद्धती असो की राजनैतिक तसेच राज्य आणि व्यक्तीचे संबंध असो, येथील प्रत्येक गोष्ट बदलत असते इथपर्यंत की वैज्ञानिक सत्येही बदलतात. उघड आहे की या अंधकारमय व भयानक जगात, मानवाला सततच्या त्रास, बेचैनी व असंतोषाखेरीज काही प्राप्त होऊ शकत नाही. विशेषकरुन अशावेळी जेव्हा वातावरण एखाद्या उच्चतम सत्तेच्या कल्पनेशीही अनभिज्ञ आहे. गुंतागुंतींनी जीवनातील अडचणींनी, दुखांनी पीडित झालेल्यांना व गांजलेल्यांना त्याच्या पदराखाली शरण जावून आश्रय घेतल्याने सुख व शांती प्राप्त होऊ शकेल.

- प्रेमचंद मुन्शी
    प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप' (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले नाहीत.
    आजही हिंदुसाठी मुस्लिम एक रहस्य आहे तसेच मुस्लिमांसाठी हिंदु एक रहस्य आहे. ते दोन्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेत नाहीत. ही चिंता या पुस्तकात वर्णन करण्यात आली आहे. संस्कृतीचे तीन प्रकार न्याय, समानता, विश्वबंधुत्व तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची आणखी काही वैशिष्ट्यें वर्णन केली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 127    -पृष्ठे - 08  मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/p9x27qwhzzkr7evsmku9s53o8tx2o4lz

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget