Latest Post

संकलन - बी. एस. कांबळे
   
    जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते.
    आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि `सत्यमेव जयते' या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होते. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनसमूह म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरांवाचे स्वप्न साकारेल.

आयएमपीटी अ.क्र. 178     -पृष्ठे - 40     मूल्य - 20                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/orntyzfmrpg64umsdrmbp3xcj9i6snx8

जगामध्ये अनेकजण ज्ञानाचा उपयोग हत्यारासारखा करतात. आपल्याला नशीबाने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या बळावर अज्ञानी लोकांचे शोषण करतात. त्यात त्यांना वाईटही वाटत नाही. ज्यांना ज्ञान नाही त्यांना तुच्छ लेखतात. स्वतः ज्ञानी असल्याचा गर्व बाळगतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अशा प्रवृत्तीवर सक्त नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी अज्ञानी समुहांना आपल्याला प्राप्त असलेले ज्ञान मोफत देण्याचे आदेश दिलेले आहेत. आज कोट्यावधी रूपये घेऊन जे ज्ञान देण्यात येते चुकीचे असून, ज्ञानावर सर्वांचाच अधिकार आहे ते मोफत असायला हवे. एवढेच नव्हे तर ते छोटे-छोटे सामाजिक गट मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांचा उत्साह वाढविण्याचेही आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिलेले आहेत. आपल्या सर्वांना त्यांच्या या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
    कल्पना करा की, आपण मोठे आहात, लहान भाऊ, बहिणींना उपदेश देण्याचा हक्क आपला आहे. तसेच त्यांची काळजी वाहण्याचे कर्तव्यही आपले आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाला शक्ती समजून त्या शक्तीच्या बळावर दुसर्‍यांना रोखणे, त्यांचा पाणउतारा करणे हे सभ्यपणाचे लक्षण नव्हे. उलट अशी कृती करणे इस्लामच्या दृष्टीने गुन्हा आहे. ज्ञान शक्ती जरूर आहे मात्र बोलतांना आणि दुसर्‍यांच्या चुका दुरूस्त करतांना विनयशीलता आवश्यक आहे. प्रेषित सल्ल. यांची कृती अशी आहे की, ते ज्यांना संबोधित करत किंवा ज्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांच्याशी अतिशय प्रेमाने आणि विनयशिलतेने बोलत. त्यांनी कधीच अशा लोकांना कमी लेखलेले नाही किंवा त्यांचा उपमर्द केलेला नाही. त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणताना जे ज्ञान प्रेषितांनी त्यांना दिले ते अतिशय प्रेमभावनेने दिले. त्यामागे त्या लोकांचे उत्कर्ष घडवून आणणे हाच एकमेव हेतू होता.
    खरा ज्ञानी तोच असतो जो ज्ञानदान करत असतांना ज्ञान ग्रहण करणार्‍यावर आपले मोठेपण लादत नाही. डोळे वटारून दिले गेलेले ज्ञान ज्ञानार्जन करणार्‍याच्या मनामध्ये ज्ञान देणार्‍याच्या विषयी कलुषित भावना उत्पन्न करते. ज्ञानाचे अवास्तव प्रदर्शन करणार्‍याला अल्लाह कधीच पसंत करत नाही. इस्लाममध्ये स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी हस्तगत केलेल्या  ज्ञानाला चांगले समजले गेलेले नाही. खरा ज्ञानी तोच जो आपल्या वडिलधार्‍यांच्या अनुभवाचीही कदर करतो.
    अल्लाहच्या कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाला हत्यार बनविण्यापेक्षा त्याची विजेरी बनवा आणि प्रेषित सल्ल. यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या विजेरीचा उपयोग करून लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करा. तेव्हा पहा लोक तुमच्याशी जोडले जातील. तुमच्या सोबत बसण्यामध्ये लोकांना आनंद मिळेल. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांशी प्रेमाने वागा. तुमचं प्रेम आणि करूणा त्यांना जाणवेल इतपत स्पष्ट असावी. तुम्ही जर कठोरपणे वागाल तर त्यांच्यामध्ये तुमच्यापासून दूर जाण्याची भावना निर्माण होईल आणि ते दूर जातील. त्यामुळे ते ज्ञानापासून वंचित राहतील. त्यांच्या काही चुका असतील तर त्यांना त्या अशा सकारात्मक पद्धतीने निदर्शनास आणून द्या की त्याचे त्यांना वाईट वाटणार नाही. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या उणीवांची कुठेच चर्चा करू नका.
    स्वतःविषयी अहंकार बाळगणे अतिशय वाईट आहे. इस्लाममध्ये तर तो गुन्हाच आहे. ही बाब श्रद्धा कमकुवत असल्याची निशाणी आहे. निर्विवादपणे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला आयुष्याची वाटचाल करावी लागेल. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. हाच दृष्टीकोन माणसाला आपण कायम अपूर्ण असल्याची जाणीव करून देत राहतो व त्यातून माणसात अहंकार निर्माण होत नाही. शेवटी एवढेच म्हणावेशे वाटते की ज्ञानाला हत्यार बनवून दुसर्‍यांचे शोषण करण्यापेक्षा त्याची विजेरी बनवून दुसर्‍यांचे आयुष्य प्रकाशमान करा. हीच यशाची गुरूकिल्ली आहे.

- फेरोजा तस्बीह -9764210789

माननीय अबू कतादा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (व्यापाऱ्यांना सावधान करताना) सांगितले, ‘‘आपल्या मालाची विक्री करताना अधिक शपथा घेऊ नका, ही गोष्ट  व्यवसायात (तात्पुरती) वाढ करते, परंतु शेवटी समृद्धी नष्ट करते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
व्यापाऱ्याने गिऱ्हाईकाला किंमत वगैरेच्या बाबतीत शपथेद्वारे पटवून सांगणे की त्याची किंमत अमूक आहे आणि हा माल खूप चांगला आहे, तेव्हा तात्पुरते कस्रfचत काही गिऱ्हाईक  धोक्याने मान्यही करतील आणि तो माल खरेदी करतील, परंतु जेव्हा त्यांना सत्य लक्षात येईल तेव्हा ते पुन्हा कधी त्याच्या दुकानात येणार नाहीत आणि अशाप्रकारे या व्यापाऱ्याचा  व्यवसाय डबघाईला येईल.

माननीय अबू ज़र ग़फ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक असे आहेत की ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी  बोलणार नाही, त्यांच्याकडे पाहणार नाही आणि त्यांना पवित्र करून नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल न करता त्यांना शिक्षा देईल.’’
माननीय अबू ज्ज़र ग़फ्फारी (रजि.) यांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हे अपयशी आणि दुर्दैवी लोक कोण आहेत?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘एक घमेंड आणि अहंकारामुळे आपली  विजार (किंवा लुंगी) पायाच्या घोट्याच्या खाली लटकविणारा मनुष्य, दुसरा उपकाराची जाणीव करून देणारा मनुष्य आणि तिसरा खोटी शपथ घेऊन आपल्या व्यवसायात वृद्धी करणारा  मनुष्य.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

न बोलणे आणि न पाहण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह त्याच्यावर निराश (क्रोधित) होईल, त्याच्याशी प्रेम व दया करणार नाही. तुम्हीदेखील एखाद्यावर नाराज होता तेव्हा त्याच्याकडे पाहात नाही की त्याच्याशी बोलत नाही. विजार किंवा लुंगी पायाच्या घोट्याच्या खाली लटकविण्याची ही ताकीद त्या मनुष्यासाठी आहे जो घमेंड आणि अहंकारामुळे असे  करतो. पायाच्या घोट्याखाली विजार किंवा लुंगी परिधान करतो परंतु त्याला मोठेपणाचा गर्व नाही, अशा मनुष्याचे हे कामदेखील गुन्हा ठरतो कारण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  ईमानधारकांना (कमरेखालील वस्त्र) घोट्याच्या खाली परिधान करण्यास मनाई केली आहे. म्हणून तो मनुष्यदेखील गुन्हेगार ठरतो. खरे तर ईमानधारक कोणत्याही अपराधाला क्षुल्लक  समजत नाही. प्रामाणिक गुलामासाठी मालकाची क्षुल्लक नाराजीदेखील कयामतपेक्षा कमी नसते.

माननीय कैस (रजि.) अबू ग़रजा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात आम्हा व्यापाऱ्यांना ‘समासिरा’ म्हटले जात होते. पैगंबर जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा  त्यांनी त्या नावापेक्षा उत्तम नाव दिले. पैगंबर म्हणाले, ‘‘हे व्यापाऱ्यांच्या समूहा! माल विकताना वाईट गोष्ट बोलण्याचे आणि खोटी शपथ घेण्याचे अतिशय भय असते, तेव्हा तुम्ही  आपल्या व्यवसायात ‘सदका’चा समावेश करा.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की व्यवसायात अधिकांश असे घडत असते की मनुष्य नकळतदेखील चुकीचे काम करतो आणि खोटी शपथ घेतो; म्हणून  व्यापाऱ्यांनी विशेषत: अल्लाहच्या मार्गात दानधर्म (सदका) द्यावा जेणेकरून या सत्कर्मामुळे त्यांच्या चुका आणि त्रुटींचे प्रायश्चित्त होईल.

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोजमाप करणाऱ्या व्यापाऱ्यांना उद्देशून सांगितले, ‘‘तुम्हाला दोन अशा कामांबाबत जबाबदार धरले जाईल  ज्यांच्यामुळे तुमच्या पूर्वी होऊन गेलेले जनसमुदाय नष्ट व विनाश पावले.’’ (हदीस : तिर्मिजी)

मनुष्य उघड अनाचार व स्पष्ट कुकृत्याकडे फार कमी आकृष्ट होतो. ईश्वराने मानवाला दिलेल्या उत्तम शारिरीक रचना व योग्यता या अद्भुत चमत्कारांपैकीच हा एक चमत्कार आहे. याच कारणाने अव्यवस्था आणि दुराचाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सदाचार आणि चांगुलपणाचे फसवे वस्त्र घालून माणसापुढे प्रस्तुत करण्याकरिता सैतान नेहमीच विवश होत असतो. स्वर्गात आदम (अ) यांना, ‘‘मी तुमच्याकडून ईश्वराची अवज्ञा करवू इच्छितो, की ज्यामुळे तुम्ही स्वर्गाबाहेर काढले जाल.’’ असे सांगून सैतान कदापि धोका देऊ शकत नव्हता. त्याऐवजी त्याने हे सांगून धोका दिला.
‘‘काय मी तुम्हाला असा वृक्ष दाखवू जो अमर करणारा आणि शाश्वत सत्ता बहाल करणारा वृक्ष आहे.’’ (कुरआन २०: १२०)
माणसाचा हाच स्वभाव आजही आहे. आजही जितक्या चुका आणि अज्ञानात त्याला सैतानाने गुरफटले आहे त्या कोणत्या ना कोणत्या फसव्या घोषणा आणि कोणत्या ना कोणत्या खोटया पोषाखाच्या सहाय्याने अंगीकारल्या जात आहेत.

या संक्षिप्त लेखात मी आपणापुढे सर्वंकष न्यायव्यवस्था म्हणजे काय व ती कशा प्रकारे अंमलात आणली जावी याबाबत खुलासा करीत आहे. मात्र जे लोक साम्यवादास सामाजिक न्यायव्यवस्था कायम करण्याचा एकमेव मार्ग मानून तिचाच अवलंब करण्याचा आग्रह करीत आहेत, ते आपली चूक मान्य करून आपला हट्ट सोडून देतील. याबद्दल मी साशंक आहे. कारण जोपर्यंत अज्ञानी केवळ अज्ञानी वा असमंजस असतो तोपर्यंत त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता असते. मात्र अज्ञानी जेव्हा अधिकारपद ग्रहण करतो तेव्हा त्याच्यात मी सांगतो तेच खरे असा अहंभाव निर्माण होतो व तो कोणाचेच म्हणणे ऐकूण घेण्यास(वा समजून घेण्यास) तयार होत नाही. मात्र सर्वसामान्य जनता योग्यरीत्या समज दिल्यास ऐकूण घेण्यास व दुष्ट लोकांच्या प्रभावात न येण्याची खबरदारी बाळगू लागते. वाममार्गी लोकांचा गट अशाच सामान्य जनतेची मोठ्या शिताफीने दिशाभूल करून आपल्या दुष्ट विचारांचा प्रचार करीत असतात.
आम जनतेसमोर सत्य परिस्थिती प्रस्तुत करून त्यांच्यात जागृती निर्माण करावी हाच या वक्तव्याचा खरा उद्देश आहे.
इस्लाम म्हणजेच सर्वंकष न्यायव्यवस्था होय
‘इस्लाम धर्मातसुध्दा सामाजिक न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे’ असा जे लोक प्रचार करतात तो पूर्णतः असत्य आहे. खरे म्हणजे ‘इस्लाम हीच सामाजिक न्यायव्यवस्था आहे.’
सृष्टीचा सृजनकर्ता व संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता अल्लाहने मानवसमाजाच्या मार्गदर्शनाकरिता इस्लाम अवतरित केला आहे. लोकांमध्ये न्यायबुध्दी निर्माण करणे व कोणती बाब न्यायोचित वा अन्यायकारक आहे हे निश्चित करणे केवळ अल्लाहच्या अधिकारातील बाब आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी न्याय व अत्याचाराची व्याख्या करून वास्तविक न्यायव्यवस्था स्थापित करू शकेल असा विश्वास करणे ही चुकीची भावना आहे. मनुष्य स्वतः आपलाच मालक व शासक होऊ शकत नाही. जगात मानवाचे अस्तित्व अल्लाहच्या प्रजेसमान आहे, म्हणून न्यायव्यवस्था कायम करणे मानवाच्या अधिकारात नसून त्याचा मालक व सृष्टीला नियंत्रित करणार्या अल्लाहच्या अधिकारात आहे. मानवाची बौध्दिक क्षमता सीमित आहे. त्याची आकलनशक्ती कमकुवत आहे, त्याच्या आशाआकांक्षाचे दडपण त्याच्या बुध्दीवर असते त्यामुळे कितीही बुध्दिमानाने प्रयत्न केल्यास तो ईश्वरी अधिकार प्राप्त करू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत मनुष्य स्वतः आपल्या समाजाकरिता अशी व्यवस्था स्थापित करू शकत नाही, जी पूर्णतः न्यायोचित ठरू शकेल. मानवाने तयार केलेली व्यवस्था सुरूवातीला कितीही योग्य व न्यायोचित दिसत असली तरी अल्प काळातच ती न्यायोचित नाही हे सिध्द होते. म्हणून मानवनिर्मित समाजव्यवस्था अल्पावधीतच निरर्थक सिध्द होते व मनुष्य निराश होऊन दुसर्या समाजव्यवस्थेचा प्रयोग करू लागतो. ईश्वर(अल्लाह) जो सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आहे तोच सर्वंकष न्यायोचित समाजव्यवस्था निर्माण करू शकतो.
न्याय हेच इस्लामचे उद्दिष्ट
‘इस्लाममध्ये न्याय आहे’ असे मत मांडणारा अर्धसत्य व्यक्त करीत असतो. खरे सांगायचे म्हणजे ‘न्याय हेच इस्लामचे उद्दिष्ट आहे.’
इस्लामचे अवतरण मूलतः जगात न्याय स्थापित करण्याकरिता झाले आहे.
कुरआनोक्ती आहे,
‘‘आम्ही प्रेषितांना अगदी स्पष्ट संकेतचिन्हे व सूचनांसहित पाठविले आहे व त्यांच्यासोबत ग्रंथ व तुला(न्याय) पाठविली आहे, जेणेकरून मनुष्याने न्यायाने वागावे व आम्ही लोखंडही पाठविले(पुरविले) आहे जे अत्यंत मजबूत असून ते लोकांच्या उपयोगाचे आहे. याकरिता की अल्लाह जाणून घेऊ इच्छितो की त्याला न पाहताही कोण त्याची व त्याच्या प्रेषितांची सहायता करतो. निश्चितच अल्लाह शक्तिमान व जबरदस्त आहे.(कुरआन, अलहदीद – २५)
या दोन गोष्टींबाबत जर मुस्लिमांनी दुर्लक्ष केले नाही, तर त्यास अल्लाह व त्याचे प्रेषित(मुहम्मद स.) यांच्याशिवाय इतर कोणाकडे सर्वंकष न्याय शोधण्याची गरज भासणार नाही. ज्या क्षणी त्याला न्यायाची गरज भासेल त्याच क्षणी त्याच्या लक्षात येईल की न्याय अल्लाह व त्याच्या प्रेषिता(मुहम्मद स.) शिवाय इतर कोणाकडून मिळूच शकत नाही. न्यायोचित समाजव्यवस्था कायम करण्याकरिता दुसरे कोणतेच उपाय न करता, इस्लाम(संपूर्ण इस्लाम जरासुध्दा उणे अधिक न करता) अंमलात आणायला हवा. न्याय इस्लामशिवाय इतर कोणत्याच व्यवस्थेत आढळणार नाही.
इस्लाम म्हणजेच न्याय, इस्लाम अंमलात येणे म्हणजेच न्यायोचित व्यवस्था कायम होणे होय!
सर्वंकष न्याय
सर्वंकष न्याय वस्तुतः आहे तरी काय व ते कसे अंमलात येऊ शकते?
मानवी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व
हजारो लाखो व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका समाजाची निर्मिती होते. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे आपले एक स्वतंत्र अस्तित्व असते. आपली वैचारिक व आचरणाची शैली असते. प्रत्येक व्यक्ती आपले व्यक्तिमत्त्व प्रभावकारी सिध्द करण्याच्या प्रयत्नात असते. प्रत्येकाच्या आपल्या विशिष्ट आवडी निवडी असतात, त्याच्या वेगवेगळ्या आशा-आकांक्षा असतात. त्याच्या स्वतःच्या शारीरिक व मानसिक गरजा असतात. त्याचे अस्तित्व निर्जीव मशीनसारखे नसून त्याच्या प्रत्येक अंगप्रत्यंगाचे महत्त्व असते.
त्याचे अस्तित्व जितके महत्त्वाचे असते तितकेच त्याच्या प्रत्येक अंगप्रत्यंगाचे अर्थात अवयवाचे महत्त्व असते. उलट असे म्हणता येईल की समाजातील प्रत्येक घटक एक संवेदनशील सजीव प्राणी असतो. व्यक्ती समाजाकरिता नसून समाज व्यक्तीसाठी असतो. कारण एकमेकांस सहकार्य प्राप्त व्हावे म्हणूनच समाजाची निर्मिती केली जाते. अशा सामाजिक सहजीवनाने व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक गरजांची पूर्तता करणे सुकर होते.
वैयक्तिक जबाबदारी
प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीशः अल्लाहसमोर जाऊन जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीस जगात एका ठराविक मुदतीसाठी परीक्षाकाल व्यतीत करावा लागेल व ते पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याकाळातील कर्मांचा ईश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल. त्याला प्राप्त झालेल्या शक्ती व क्षमतेचा उपयोग करून उपलब्ध साधन-सामुग्रीच्या आधारे त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वास किती वैभव प्राप्त करून दिले आहे हे दाखवून द्यावे लागेल. अल्लाहसमोर स्वतः व्यक्ती जबाबदार असेल. समाज व्यक्तीच्या वतीने जबाब देणार नाही. तेथे कुटूंब, जमात वा समाजाकडून हिशोब न घेता प्रत्येक व्यक्तीस त्याच्या नात्या-गोत्यातून मुक्त करून ईश्वर त्याला आपल्या समोर उभा करील व त्याच्या कृत्यांबद्दल विचारणा केली जाईल आणि त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वास कोणते स्वरूप दिले आहे हे प्रकट करावे लागेल.
व्यक्तीस्वातंत्र्य
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची घडण व जगाच्या अंतानंतर मानवाकडून घेतला जाणारा हिशोब या दोन्ही गोष्टींतून असा निष्कर्ष निघतो की प्रत्येक व्यक्तीस जगात व्यक्तीस्वतंत्र्य प्राप्त आहे. जर समाजात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्कर्ष साधण्याची पुरेशी संधी मिळाली नाही तर त्या व्यक्तीमधील क्षमता गोठली जाईल व त्याचे अस्तित्व गुदमरले जाईल. त्याची शक्ती व योग्यता निष्क्रिय होईल. तो स्वतःस बंदिस्त व असहाय्य जाणून नैराश्याच्या आहारी जाईल. जगाच्या अंता(कयामत) नंतर व्यक्तीला बंदिस्त व निराश करण्याची जबाबदारी समाजाच्या त्या लोकांवर लादण्यात येईल ज्यांनी समाजाची दुर्दशा केली असेल. अशा जबाबदार लोकांकडून केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्मांचा हिशोब न घेता त्यांच्या सामाजिक जबाबदार्यांबद्दलसुध्दा विचारणा केली जाईल. त्यांच्या स्वनिर्मित समाजव्यवस्थेमुळे समाजातील व्यक्तींना विवश होऊन स्वतःच्या इच्छेविरुध्द वागावे लागले होते व आपले व्यक्तिमत्त्व उजळ करण्यास ते असमर्थ झाले होते. निश्चितच कोणताही श्रध्दावान(ज्याचा अंतिम दिनावर विश्वास आहे) आपल्या खांद्यावर इतके मोठे ओझे घेऊन अल्लाहसमोर जाण्याचे धैर्य करणार नाही. तो जर ईशभय बाळगत असेल तर तो निश्चितच प्रत्येक व्यक्तीस जास्तीतजास्त स्वातंत्र्य देऊन स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वास हवे तसे स्वरुप देण्याची मुभा देईल, जेणेकरून व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैफल्याचे आरोप समाजव्यवस्था संचालित करणार्यांवर लादली जाणार नाही.
सामाजिक संस्था व त्यांचे वर्चस्व
व्यक्तीस्वातंत्र्यानंतर आता आपण समाजाकडे वळू या. कुटुंबे, जाती-जमाती, विविध धर्मांच्या मानवाच्या एकत्रित अस्तित्वाने समाज निर्माण होतो. समाजनिर्मितीच्या कार्याची सुरूवात स्त्री-पुरूषाच्या एका जोडप्यापासून झाली. त्याचे रूपांतर एका कुटुंबात झाले, अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन गट(जात) व वंश निर्माण केले आणि पुढे त्यांचा विस्तार होऊन एक समाज निर्माण झाला. समाजाने आपल्या सामूहिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी राज्यव्यवस्थेची स्थापना केली. या राज्य संस्थांची स्थापना केल्याने व्यक्तींना सुरक्षा व सहाय्यता प्राप्त झाली, ज्याच्या आधारे त्यास आपली वैयक्तिक उद्दिष्टे प्राप्त करता आली जी त्याला एकट्याला प्राप्त करता आली नसती. मात्र ही व्यवस्था सफल होण्याकरिता प्रत्येक संस्थेस व्यक्तींवर, प्रत्येक मोठ्या संस्थेस छोट्या संस्थेवर वर्चस्व प्राप्त असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे व्यक्तीच्या स्वातंत्र्यास लगाम लावून तिच्यापासून इतरांना होणार्या अत्याचारास आळा घालता येईल व व्यक्तीच्या सेवेने संपूर्ण समाजाचा उत्कर्ष साधता येईल. येथूनच सामाजिक न्यायव्यवस्थेच्या प्रश्नाचा उगम होतो व वैयक्तिक व सामाजिक विरोधात्मक मागण्यांचा गुंता निर्माण होऊ लागतो. एका बाजूला अशी अपेक्षा केली जाते की मानवी कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीला इतके स्वातंत्र्य प्राप्त असावे की त्याला आपल्या योग्यते व इच्छेप्रमाणे आपली प्रगती करता यावी. याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबास, वंशास, जाती-जमातीस व विविध गटांस आपापल्या कक्षेत राहून स्वतंत्र वातावरणात जास्तीतजास्त उन्नती करता यावी. मात्र त्याचबरोबर अशी अपेक्षा केली जाते की व्यक्तीवर कुटुंबाचे, कुटुंबांवर जाती-जमातीचे व सर्व व्यक्ती व संस्थांवर राज्य शासनाचे वर्चस्व व नियंत्रण असायला हवे, जेणेकरून कोणीही दुसर्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करून त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करू शकणार नाही. पुढे जाऊन अशीच समस्या संपूर्ण मानवजातीच्या बाबतीतसुद्धा निर्माण होते की प्रत्येक समाजाचे व राज्याचे सार्वभौमत्व व स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे व त्या सर्वांवर अधिक शक्तिमान संस्थेचे नियंत्रण असणेसुद्धा आवश्यक असते. या व्यवस्थेमुळे सामाजिक गट व राज्यव्यवस्था कोणावरही नाहक अत्याचार करू शकणार नाहीत.
व्यक्ती, कुटुंब, जाती-जमाती व समाजाला आवश्यक स्वातंत्र्य प्राप्त असावे व जुलूम-जबरदस्तीला आळा बसावा म्हणून सामाजिक संस्थाना नियंत्रण करण्याचे अधिकार प्राप्त असतात. सामाजिक संस्था व व्यक्तीकडून जनकल्याणाच्या सेवाही प्राप्त करता येतात. अशा प्रकारे समाजव्यवस्था स्थापित होते.
भांडवलदारी व साम्यवादातील त्रुटी
उपरोक्त विवरण ज्याला समजले असेल त्याच्या सहज लक्षात येईल की व्यक्तीस्वातंत्र्य, उदारमतवाद, भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाही(जी फ्रान्सच्या क्रांतीनंतर अस्तित्वात आली होती) ज्याप्रमाणे न्यायोचित समाज व्यवस्थाविरोधी आहे त्यापेक्षा अधिक कार्ल माक्र्स व एंजेल्स तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला साम्यवादही त्याच्या विरोधात आहे. पहिल्या समाजव्यवस्थेने व्यक्तीस घटनेपेक्षा जास्त स्वातंत्र्य देऊन कुटुंब, जमात व समाजावर अतिरेकी वृत्तीने वागण्याची सूट दिली होती. त्यामुळे समाजाची सार्वजनिक कल्याणकारी सेवा प्राप्त करण्याची नियंत्रणशक्ती क्षीण झाली होती. दुसर्या समाजव्यवस्थेत असा दोष होता की त्याने शासनव्यवस्थेस इतके सशक्त करून टाकले होते की त्यामुळे व्यक्ती, कुटुंब, जाती-जमातीचे स्वातंत्र्य जवळजवळ हिरावून घेतले होते व लोकांना राबवून घेण्याचे इतके जबरदस्त अधिकार शासकास प्राप्त झाले होते की व्यक्ती सजीव प्राणी न राहता यंत्राच्या निर्जीव साहित्य-सामुग्रीसमान झाली होती. अशा प्रकारच्या समाजव्यवस्थेने न्यायोचित समाजव्यवस्था स्थापित करता येते, असे विधान असत्य असल्याचे निदर्शनास येते.

- प्रा. उमर हयात खान गौरी
   
    विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.
    पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर भयानक आहे. वधुपक्षाकडून वरपक्षाला एक भली मोठी रक्कम आगाऊ दिली जाते आणि ही मागणी वरपक्षाची असते. आज ह्या कुप्रथेमुळे अनेक मुलींचे लग्नाचे वय निघून गेले आहेत. याचे दु:खदायक वर्णन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 177      -पृष्ठे - 64    मूल्य - 30                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bvqooxtbo0cxgnhtftmokl9ye98vhmw2

Makkah
भूतलावर जेव्हापासून मानवी जीवनाची सुरुवात झाली, त्याच वेळी मनुष्यासाठी ‘इस्लाम’ चा आरंभ झाला. ‘इस्लाम’ चा अर्थ अल्लाहचे आज्ञापालन करणे आहे. इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे. मनुष्यजातीचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता अल्लाहच आहे. मनुष्यांसाठी मुलभूत कर्तव्य हेच आहे की त्यांनी रचयिताचे आज्ञापालन करावे. अल्लाह पृथ्वीवर व प्रथम पुरुष हजरत आदम, पत्नी हव्वा (अ.) यांना अवतरविले. त्याच दिवसांपासून त्यांना आदेश दिला, की सर्वांची सर्वांगिण उन्नती केवळ माझ्या मार्गदर्शनाद्वारे जीवन व्यतीत करण्यात लाभेल. माझ्या आज्ञेचे पालन करा. ज्या गोष्टीची मी मनाई करतो त्यापासून दूर रहा. यावर तुम्ही अंमलबजावणी केली तर बक्षिसास पात्र व्हाल. विरुद्ध वर्तन केले तर माझा क्रोध व अप्रसन्नता लाभेल. हाच ‘इस्लाम’ चा उगम आहे.
पिता आदम व माता हव्वा यांनी हिच शिकवण आपल्या संततीस दिली. काही काळ यांवर लोक दृढ राहीले. नंतर असे लोक जन्मास आले ज्यांनी आपल्या निर्माणकर्ता अल्लाहची अवज्ञा केली. कांही लोकांनी एक अल्लाहच्या अस्तित्वामध्ये वा गुणामध्ये अन्य भागिदार नेमले. कोणी स्वतःच भगवान झाला. कोणी म्हणाला जीवन माझ्या परीनं आवडीनं जगण्यास मी स्वतंत्र आहे. माझ्या इच्छेप्रमाणे मी करीन, ईश्वराचे जे काही हुकुम असतील ते असोत पण मी मात्र माझ्या मनाप्रमाणे करीन. त्या हुकुमांना जुमानणार नाही. अशा पद्धतीने जगात कुफ्र (नकार देणे) ची उत्पत्ती झाली. याचाच अर्थ आहे, ‘‘एक अल्लाहशिवाय अन्य भिन्न भिन्न ईश्वर मानणे.’’
ज्यावेळी कुफ्र (एक अल्लाहस नकार देणे) वृद्धींगत होत गेला त्यामुळे जमिनीवर जुलुम, दंगे, हिसाचार, गुन्हे वाढत गेले. त्यावेळी अल्लाह ने आपल्या सद्वर्तनी दासांना या दुवर्तनी लोकांना समज देण्यास नियुक्त केले. त्यांना एकेश्वरवादाच्या सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यास नेमले. हे सज्जन दास प्रेषित (पैगंबर) म्हटले गेलेत. प्रेषितांचा क्रम थोड्या थोड्या अंतराने तर कधी दीर्घ मुदतीनं जगाच्या निरनिराळ्या भूभागात, वंशात अंमलात आला. हे सर्व प्रेषित सत्यवादी, श्रद्धाधारक व सज्जन लोक होते. सर्व प्रेषितांनी एकाच धर्माची हाकं दिली. हाच इस्लाम होय. निश्चितच आपण नुह, इब्राहीम, मुसा व येशु यांची नावं ऐकलीत, हे सर्व एक अल्लाहचे पैगंबर आहेत. शिवाय हजारोच्या संख्येने प्रेषित होऊन गेलीत. गत हजारो वर्षाच्या इतिहासात हेच घडलं की जेव्हा अनेकेश्वरवाद (बहुदेववाद) वाढत गेला त्या त्या वेळी प्रेषित नियुक्त होत गेले. प्रेषितांनी लोकांना अनेकेश्वरवादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. इस्लाम स्वीकारण्याची हांक दिली. काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. काही लोक आपल्या अनेकेश्वरवादाच्या श्रद्धेतच राहीले. ज्यानी इस्लाम स्वीकार केला, ते ‘मुस्लिम’ होत. याच लोकांनी प्रेषिताद्वारे उच्चतम् नितीमत्ता स्वीकारली व आदर्श चारित्र्य जोपासण्याचा प्रसार केला. नंतर असं पण घडलं की या मुस्लिमांची पिढी ‘इस्लाम’ विसरुन कुफ्र (बहुदेववादी) च्या तावडीत सापडली. क्रमशः तद्नंतर पुढील प्रेषितांनी परत इस्लामची बीजं पुन्हा रोवली. हा क्रम वर्षानुवर्षे चालत राहीला. इस्लाम श्रद्धेत ताजं व्हायचं परत श्रद्धेत कोमोजुन जायचं. अल्लाहने सरतेशेवटी अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना नेमलं. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा संदेश असा पुनरुज्जीवीत केला जो आजपर्यंत ताजातवाना आहे, कायम आहे. अल्लाहच्या इच्छेनुसार इस्लामचा संदेश पृथ्वीच्या अंतापर्यंत दृढ राहील.
प्रेषित मुहम्मद (स.) १४७५ वर्षापुर्वी अरबस्थानात प्रसिद्ध शहर मक्केत जन्मले. त्याकाळी अरबस्थानाच काय, जगात कुठंही इस्लामचं अस्तित्व राहीलं नव्हतं. पुर्वीच्या प्रेषितांच्या शिकवणीचे थोडंफारं परिणाम सद्गुणी लोकांत आढळून येत. परंतु शुद्ध स्वरुपात एक ईश्वराची शुद्ध श्रद्धा भूतलावर आढळून येत नसे. या कारणास्तव लोकांचे जीवन चारित्र्यहीन होते. एक ईश्वरास विसरुन लोकं विभिन्न विशुद्ध धर्मात भोगी होते. या परिस्थितीत मुहम्मद (स.) जन्मले. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत मक्का येथे शांत, एकांत, जीवन व्यतीत केलं. मक्कावासी आपणास सत्यवादी व प्रामाणिकपणामुळे प्रतिष्ठा देत असे. कोणी पण हे जाणू शकत नव्हतं की हीच व्यक्ती भविष्यात महान मार्गदर्शक बनणारी होती. प्रेषित मुहम्मद (स.) जगाच्या या बिघडलेल्या स्थितीस पाहून हळहळत. स्तब्ध होत. यापासून मानव समाज मुक्त होण्यास मार्ग काय? जगातील हा विध्वंस कसा संपेल? वयाच्या चाळीसाव्या वर्षी अल्लाहने मुहम्मद (स.) यांना प्रेषित नियुक्त केले. प्रथमतः सभोवतालच्या समाजास, तद्नंतर जगात अखिल मानवतेसाठी कुफ्र (अनेकेश्वरवाद) पासून अलिप्त होऊन इस्लाम (एकेश्वरवाद) स्वीकारण्यास मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी मिळाल्यानं मक्केतील लोकांना स्पष्ट सांगणं सुरु केलं की एक अल्लाह शिवाय अन्य कोणाचीही भक्ति करु नका. तुम्हा सर्वांचा स्वामी व निर्माता केवळ एक अल्लाह आहे. त्या एकमेव अस्तित्वाचीच पुजा करावी, त्या एकमेव अल्लाहच्या आदेशाचं पालन करावं सर्वसाधारण लोकांनी विरोध केला. मुहम्मद (स.) यांचा आवाज बंद करण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण समाजातील प्रामाणिक व सद्गुणी लोकांनी हळूहळू मुहम्मद (स.) यांची साथ दिली. मक्केच्या बाहेर अरबस्थानातील विविध ठिकाणी इस्लामची शिकवण पोहोचु लागली. तेथे पण असेच घडले, अज्ञानी लोकांनी विरोध केला, सुजाण व खुल्या मनाच्या लोकांनी इस्लामच्या प्राकृतिक शिकवणींवर विश्वास ठेवला. मक्का शहरी तेरा वर्षे हा क्रम सातत्याने लोकांसमोर प्रस्तुत झाला. एकीकडे साऱ्या भूभागात हा संदेश पोहोचत होता आणि लोक इस्लामचा स्वीकार करत होते. तर दुसरीकडे अज्ञानी लोकांनी तीव्र विरोध केला व मुस्लिमांचा छळ सुरु केला. अंततः मक्का शहरातील सरदारांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याचा कट केला. रात्रीची वेळ निवडली, तद्नंतर कदाचित मुस्लिम संपून जातील. अशी घटकासमोर येऊन ठेपली. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) व मुस्लिमांना मक्केतुन मदिनेस स्थलांतर करण्याचा आदेश दिला. मदिनेत अनेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला होता. इस्लामसाठी त्याग करण्यास त्यांची तयार होती. त्या रात्री प्रेषित मुहम्मद (स.) मक्केहून मदिनेस रवाना झाले. ह्या घटनेस ‘हिजरत’ म्हणतात. याच्या स्मरणार्थ ‘हिजरी’ सना ची सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद (स.) मदिनेस पोहोचल्यानंतर अरबस्थानाच्या कानाकोपऱ्यातुन मुस्लिम मदिनेस येऊ लागले. येथे तत्वतः इस्लामी राजवट स्थापन झाली. इस्लामचे विरोधक संतप्त झाले आणि विचार केला की ज्यावेळी मुसलमान विखुरलेले होते त्यांना संपविणं सोपे होते. परंतु आता मुसलमान एके ठिकाणी एकवटले, त्यांची सत्ता स्थापन झाली, आता यांना जर उसंत मिळाली तर एक प्रबळ शक्ती निर्माण होईल, म्हणून लवकरात लवकर असा प्रयत्न करणं अगत्याचं आहे की त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना संपवावं. या विचारानं मक्काच्या सरदारांनी प्रेषित मुहंमद (स.) च्या विरुद्ध युद्ध छेडलं, अरबच्या अन्य साथीदारांना इस्लाम विरुद्ध एकत्रित केलं. परिणामतः ते मुहमंद (स.) चा पराजय करु शकले नाही. इस्लामचा प्रसार रोखू शकले नाही. निकराचा विरोध करुन देखील इस्लामचा प्रचार प्रसार वाढू लागला. विरोधकामधून अनेक चांगली माणसं इस्लामकडे आकर्षित जाली. आठच वर्षात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का काबीज केलं. मक्केच्या यशामुळे साऱ्या अरबस्थानात कुफ्र (अनेकेश्वरवाद) ची कंबर तुटली. तद्नंतर एक वर्षाच्या अल्पकाळात अरबस्थान इस्लाममय झाले. बारा लक्ष चौरस मैलापर्यंत शक्तिसाली इस्लामी राष्ट्र उदयास आलं. ज्यात सत्ताधिश ‘‘अल्लाह’’ आहे. शरीयतचे कायदे आहे, व्यवस्था अल्लाहच्या दासाकडे आहे. या राजवटीत जुलुम, अत्याचार, अनैतिकतेस थारा नव्हता. चोहीकडे शांती, समाधान, न्याय, कल्याण, प्रामाणिकता होती. अल्लाहच्या आज्ञापालनामुळे लोकांमध्ये उत्तम नैतिक चारित्र्य निर्माण झाले होते. २३ वर्षाच्या अल्पकाळात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानात अमुलाग्र बदल घडविला. अरब भूभागच केवळ इस्लाममय झाला असे नसुन साऱ्या जगात इस्लामची पताका घेऊन उभे राहीले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या दैदिप्यमान यशानंतर वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
तद्नंतर मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी हे काम सांभाळले, ज्या कार्यासाठी मुहम्मद (स.) यांनी भूतलावर प्रयत्न केला. ह्या कतृत्ववान सहकाऱ्यानी इस्लामची शिकवण अखिल जगात पसरविली. प्रतिकार करणाऱ्यांचा बिमोड केला. हा प्रवाह कोणी थोपवु शकला नाही. अल्पकाळात सिधपासून स्पेनपर्यंत पसरले. परिणामतः विशाल लोकसमुहाने इस्लामचा स्वीकार केला. जेथे जेथे पोहोचले, अन्याय आणि अनैतिकता नाहीशी झाली. अल्लाहच्या विद्रोहींना अल्लाहचे अधीन बनविले. क्रुर व रानटी लोकांना ज्ञानाचा प्रकाश दिला. अमानवीय कृती करणाऱ्यांना नैतिक आदर्शाच्या कळसावर पोहोचवले. क्रुर सत्ताधिकाऱ्यांना नमविले. न्यायनिवाड्याचा असा आदर्श समोर ठेवला ज्याची इतिहासात तुलना नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी अल्लाह कडून अवतरित झालेल्या पवित्र कुरआन मुखोद्गत केले. शब्द न शब्द पाठ केला. लिहून ठेवलं व कायमस्वरुपी सुरक्षित केले. सुरक्षित ठेवण्यास घेण्यात आलेली काळजी, ही अल्लाहकडून हमी आहे. पवित्र कुरआनचे शब्द न शब्द त्याचप्रमाणे आहेत जे चौदाशे वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) वर अल्लाहकडून अवतरले. यात कानामात्रा अनुस्वारचा कमी अधिकपणा नाही. दुसरे महान कार्य जे सहकाऱ्यानी केले, त्यात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र, उक्ति-कृती, वचने, कथनं, आज्ञा, शिकवणी, जागोगाजी पवित्र कुरआन आदेशाचे स्पष्टीकरण, आदर्श नैतिकता, संवयी अशी प्रत्येक गोष्ट व तपशीलवार विवरण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित केली. यामुळे जगात नंतर प्रत्येक काळात लोकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीस जणु काही समोर पाहात आहोत असे अनुभवले. चौदाशे वर्षानंतर देखिल अल्लाहचा आज्ञाधारक दास कसा असावा जो अल्लाहच्या प्रसन्नतेस पात्र होता ते माहीत होते. ह्या दोन गोष्टीद्वारे अर्थात पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र सुरक्षित असल्याने ‘इस्लाम’ जगात सदासर्वदा सुरक्षित झाला.
प्रेषित मुहम्मद (स.) पूर्वी ‘इस्लाम’ त्या पूर्वीच्या प्रेषिताद्वारे होत असे, तदनंतरच्या प्रेषितांच्या मरणोत्तर लोक त्यांना विसरत असत. त्या लोकांनी देखील अल्लाहच्या आज्ञा व त्यावेळच्या प्रेषितांची चारित्रं सांभाळली नाहीत. त्यामुळे पुढील पिढ्यां हापाठ विसरत जात असे. परंतु आता अल्लाहची वाणी ‘पवित्र कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र हे सुरक्षित, शाबुत आहेत. या कारणास्तव ‘इस्लाम’ सदैव सुरक्षित झाला आहे. कुरआन व हदीस (पैगंबर वचनं) द्वारा इस्लाम सदैव ताजंतवानं, सुरक्षित आहे. या कारणास्तव आता जगाला नवीन प्रेषितांची आवश्यकता राहीली नाही. ‘इस्लाम’ समजण्यासाठी असे लोक भरपुर आहेत जे कुरआन व मुहम्मद (स.) यांचे गाढे अभ्यासक आहेत, त्यासाठी ते जीवन अर्पण करतात. प्रत्येक आदेशावर कृती (अंमलबजावणी) करतात व लोकांना त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त करतात.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget