Latest Post

वाचकाने सर्वप्रथम कुरआनची वास्तवता जाणून घेतली पाहिजे. वाचकाने, या ग्रंथावर आपले इमान आपली श्रद्धा ठेवो अथवा न ठेवो, परंतु हा ग्रंथ समजून घेण्यासाठी, त्याला या ग्रंथाची वास्तवता स्वीकारावी लागेल. या ग्रंथाला प्रस्तुत करणाऱ्याने (अर्थात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी) ती सांगितलेली आहे. ती वास्तवता अशी आहे,
(१)  विश्वस्वामी, जो सबंध सृष्टीचा निर्माणकर्ता आणि मालक व शासकही आहे. त्याने अनंत व असीम अशा त्याच्या राज्यातील या विभागात त्याला पृथ्वी म्हणतात, मानवाला निर्माण केले आहे. त्याला जाणण्याच्या, विचार करण्याच्या व समजून घेण्याच्या शक्ती दिल्या आहेत. मानवाला त्याने भल्या व बुऱ्यातील ओळख दिली आहे. त्याला निवडीचे व इराद्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विनियोगाचे अधिकारही त्याला दिलेले आहेत. असे एकंदरीतपणे मानवाला त्याने एकप्रकारची स्वायत्तता  देऊन पृथ्वीवर आपला खलीफा (नायब) बनविलेला आहे.
(२)  मानवाला सदरहू पदावर नियुक्त करताना विश्वस्वामीने चांगल्या प्रकारे त्याची कानउघाडणी केली व त्याच्या लक्षात आणून दिले की तुमचा व सर्व जगाचा मालक, उपास्य आणि शासक मीच आहे. माझ्या या राज्यात तुम्ही स्वतंत्रही नाही व इतर कुणाचे दासही नाही. तसेच माझ्याव्यतिरिक्त इतर कोणीही आज्ञापालनास, बंदगी आणि पूजा, उपासनेस पात्रही नाही. जगातील हे सर्व जीवन ज्यात अधिकार देऊन तुम्हाला पाठविले जात आहे, वास्तविकपणे तुमच्यासाठी परीक्षेचा कालावधी आहे. त्यानंतर तुम्हाला माझ्याकडे परत यावे लागेल व मी तुमच्या कामाची तपासणी करून निर्णय देईन की तुमच्यापैकी कोण परीक्षेत यशस्वी झाला आहे व कोण अयशस्वी ठरला आहे. तुमच्यासाठी योग्य वर्तन हेच आहे की आपला एकमेव उपास्य आणि शासक तुम्ही मलाच माना. जे मार्गदर्शन मी पाठवीन त्यानुसार जगात काम करा आणि जगाला परीक्षाक्षेत्र समजून विवेकानिशी जीवन व्यतीत करा. तुमचे खरे उद्दिष्ट, माझ्या अंतिम निर्णयात यशस्वी ठरणे आहे. याउलट तुमच्याकरिता ते प्रत्येक वर्तन चुकीचे व अयोग्य आहे जे याविरूद्ध असेल. जर पहिल्या वर्तनाचा तुम्ही अवलंब कराल (ज्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे) तर तुम्हाला जगात शांती व समाधान प्राप्त होईल. जेव्हा परतून तुम्ही माझ्याजवळ याल तेव्हा मी तुम्हाला चिरसुखाचे व आनंदाचे ते घर देईन ज्याचे नाव जन्नत (स्वर्ग) आहे. परंतु जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने चालाल (ज्यावर चालण्याचेही तुम्हाला स्वातंत्र्य आहे) तर जगात तुम्हाला उपद्रव आणि अशांततेचा आस्वाद घ्यावा लागेल. जेव्हा जगातून निघून तुम्ही परलोकात याल तेव्हा चिरदु:ख व संकटांच्या त्या खाईत तुम्ही लोटले जाल जिचे नाव दोजख (नरक) आहे.
(३) अशा प्रकारे समजावून सृष्टीच्या स्वामीने मानवजातीला भूतलावर जागा दिली. मानवजातीच्या प्रथम व्यक्तींना (आदम व हव्वा) ते मार्गदर्शनही देऊन टाकले ज्यानुसार त्यांना व त्यांच्या संततीला पृथ्वीतलावर काम करावयाचे होते. ही प्रथम माणसे अज्ञान आणि अंधकाराच्या स्थितीत निर्माण झाली होती असे नाही तर ईश्वराने जमिनीवरील त्यांच्या जीवनाचा प्रारंभ पूर्ण प्रकाशात केलेला होता. वस्तुस्थितीही त्यांना माहीत होती. त्या माणसांना त्यांचा जीवनकायदा सांगितलेला होता. ईशआज्ञापालन (अर्थात इस्लाम) हीच त्याची जीवनपद्धती होती. आपल्या संततीलाही त्यांनी शिकविले होते की त्याने ईश्वराचे आज्ञाधीन (मुस्लिम) बनून राहावे. परंतु नंतरच्या शतकात हळूहळू त्या खऱ्या जीवनपद्धतीपासून (दीन-धर्मापासून) विमुख होऊन माणसे निरनिराळ्या प्रकारच्या चुकीच्या वर्तनाकडे निघाली. त्यांनी गाफील होऊन त्या खऱ्या जीवनपद्धतीला हरवूनही टाकले आणि खोडसाळपणा करून तिला विकृतही केले. त्या माणसांनी ईश्वराबरोबर पृथ्वी व आकाशातील विभिन्न मानवी व अमानवी, काल्पनिक आणि भौतिक अस्तित्वांना ईशत्वात भागीदार ठरवून घेतले. ईश्वराने दिलेल्या सत्य ज्ञानात (अलइल्म) नाना तNहेच्या भ्रामक कल्पनांची आणि दृष्टिकोनांची व तत्त्वज्ञानाचीही भेसळ करून त्यांनी असंख्य धर्म घडवून आणले. त्या लोकांनी, ईश्वराने ठरवून दिलेल्या न्यायपूर्ण नैतिक नियमांना व संस्कृतीला (शरियतला) सोडून दिले. त्यांना विकृत करून आपल्या मनोवासनांनुसार आणि आपल्या पूर्वग्रहदोषानुसार जीवनाचे असे कायदे रचून घेतले. त्यामुळे ईश्वराच्या भूमीवर सर्वत्र अन्याय व अत्याचार माजला.
(४)  ईश्वराने मानवाला मर्यादित स्वरूपाची स्वायत्तता दिली आहे तिच्याशी हे सुसंगत नाही की त्याने आपल्या सर्जनात्मक हस्तक्षेपाचा उपयोग करून त्या बिघडलेल्या माणसांना जबरदस्तीने योग्य वर्तनाकडे आणावे. जगात काम करण्यासाठी जी सवड मानवजातीला व विविध राष्ट्रांना जो कालावधी त्याने ठरवून दिलेला होता त्याच्याशीदेखील हे सुसंगत नव्हते की अशा प्रकारची बंडाळी उत्पन्न होताक्षणीच त्याने माणसांना नष्ट करून टाकावे. याशिवाय निर्मितीच्या प्रारंभापासून ईश्वराने माणसांच्या स्वायत्ततेला अबाधित ठेवले. त्यांच्यासाठी ठरलेल्या कार्यकालावधी दरम्यान तो त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था करीत राहिला आहे. तद्नुसार स्वत: होऊन घेतलेली आपली सदरहू जबाबदारी पार पाडण्यासाठी ईश्वराने मानवांपैकीच अशा माणसांना उपयोगात आणणे सुरू केले जे त्याच्यावर इमान बाळगणारे व त्याच्या इच्छेचे अनसुरण करणारे होते. ईश्वराने अशा माणसांना आपले प्रतिनिधी बनविले.
आपला संदेश त्यांच्याजवळ पाठविला, त्यांना वास्तवतेचे ज्ञान दिले. त्यांना खरा जीवनकायदा प्रदान केला व अशा प्रतिनिधींना या कामासाठी त्याने नियुक्त केले की त्यांनी आदमच्या संततीला त्याच सरळ मार्गाकडे परतण्याचे आवाहन करावे ज्यापासून ती भरकटली होती.
(५)  असे पैगंबर निरनिराळ्या समाजांत व देशांत येत राहिले. हजारो वर्षांपर्यंत त्यांच्या आगमनाचा क्रम सुरू होता. हजारोंच्या संख्येत त्यांची नियुक्ती झाली. त्या सर्वांचा धर्म एकच होता, अर्थात तीच खरी जीवनपद्धती जी प्रथमदिनीच मानवाला सांगितलेली होती. ते सर्व पैगंबर एकाच मार्गदर्शनाचे अनुयायी होते. अर्थात नीती, सदाचार आणि उद्दिष्टही तेच अनादी व अनंत. नियम व तेच तत्त्वज्ञान जे प्रारंभीच माणसासाठी योजलेले होते. त्या सर्व पैगंबरांचे ध्येय व उद्दिष्टही एकच होते. म्हणजे त्याच एका धर्माकडे व मार्गदर्शनाकडे मानवजातीस आवाहन करावे. जे आवाहन स्वीकारतील त्यांना संघटित करून एक असे राष्ट्र (उम्मत) बनवावे जे स्वत:ही अल्लाहचे कायदे पाळणारे असतील आणि जगातही ईशकायद्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व त्या कायद्यांची अवज्ञा रोखण्यासाठी झटणारे असतील. सदरहू पैगंबरांनी आपापल्या कारकिर्दीत आपले उद्दिष्ट पूर्ण क्षमतेनिशी पार पाडले. परंतु नेहमी असेच घडले की माणसांची एक मोठी संख्या तर त्यांचे आवाहन स्वीकारण्यास तयारच झाली नाही. ज्यांनी ते आवाहन स्वीकारून ‘उम्मते मुस्लिम’ (मुस्लिम राष्ट्र) चे स्वरूप धारण केले तेही स्वत: हळूहळू बिघडत गेले. इथपावेतो की त्यांच्यापैकी काही राष्ट्रांनी ईशमार्गदर्शन पूर्णपणे हरवून टाकले, तर काहींनी ईशवचनांत व आदेशात स्वहस्ते फेरफार आणि भेसळ करून त्यांना विकृत करून टाकले.
(६)  सरतेशेवटी विश्वस्वामीने (अल्लाहने) अरबभूमीत पैगंबर मुहम्मद (स.) यांना त्याच कामासाठी नियुक्त केले ज्यासाठी पूर्वीचे पैगंबर येत असत. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन सर्व मानवजातीला होते त्यात पूर्वीच्या पैगंबरांचे मार्गभ्रष्ट अनुयायीही होते. सर्वांना खऱ्या व योग्य जीवनपद्धतीचे आवाहन करणे, सर्वांना पुनरपि ईशमार्गदर्शन पोहोचविणे व जे सदरहू आवाहनाचा व मार्गदर्शनाचा स्वीकार करतील त्यांचे एक असे राष्ट्र बनविणे हे त्यांचे काम होते. त्या राष्ट्राने एकीकडे स्वत:च्या जीवनाची व्यवस्था ईशमार्गदर्शनानुसार उभी करावी तर दुसरीकडे जगाच्या सुधारणेसाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. याच आवाहनाचा व मार्गदर्शनाचा ग्रंथ, हा कुरआन आहे. अल्लाहने तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित केला आहे.

इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था काय आहे आणि जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम आम्ही त्या फरकाला चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे जो आध्यात्माचा दृष्टीकोन आणि इतर धर्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनामध्ये आढळून येतो. हा फरक चांगल्या प्रकारे अवगत न झाल्याने पुष्कळदा असे होते की इस्लामच्या आध्यात्मिक व्यवस्थेवर चर्चा करीत असताना माणसाच्या मनात पुष्कळशा अशा कल्पना वावरू लागतात ज्या सर्वसाधारणत: "आध्यात्मिकता' या शब्दाशी संबंधित आहेत. या गोंधळात पडून माणसाला हे समजणे कठीण होते की शेवटी ही कसली आध्यात्मिक व्यवस्था आहे जी आत्म्याच्या सुपरिचित अशा क्षेत्रामधून जाऊन अस्तित्व व शरीराच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते आणि केवळ हस्तक्षेप करत नसून त्यांच्यावर अधिकार गाजवू इच्छिते.
तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही. आत्म्यासाठी शरीर आणि जडत्वाचे विश्व हा एक तुरूंग आहे. ऐहिक जीवनाच्या गरजा व आवडीनिवडी या त्या हातकडçा व बेडçा आहेत ज्यामध्ये आत्मा जखडला जातो. जगाचे व्यवहार व कारभार ही ती दलदल आहे, ज्यामध्ये रूतून आत्म्याची झेप संपुष्टात येते. या कल्पनेचा अनिवार्य परिणाम हा आहे की आध्यात्मिकता आणि भौतिकता यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. ज्या लोकांनी भौतिकतेचा अंगीकार केला आहे ते पहिल्या पावलालाच निराश होतात की आध्यात्मिकतेचा अवलंब करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. या गोष्टीने त्यांना भौतिकतेमध्ये गुरफूटन टाकलेले आहे. सामाजिक व्यवहार, संस्कृती, राजकारण, अर्थकारण वगैरे जीवनाची सारी क्षेत्रे आध्यात्मिकतेपासून वंचित झाली आणि त्यांनी आत्म्याच्या उन्नतीसाठी असे मार्ग शोधून काढले जे भौतिक जीवनाच्या बाहेरूनच निघून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक उन्नतीचा असा मार्ग तर शक्यच नाही जो सांसारिक जीवनामधून जातो. त्यांच्याजवळ आत्म्याच्या विकासासाठी शरीराला दुर्बल करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अशा शारीरिक कष्टाच्या पद्धती शोधून काढल्या ज्या मनाला आणि शरीराला अचेतन किंवा निर्जव करणाऱ्या होत्या. आत्म्याच्या प्रशिक्षणासाठी अरण्य, पर्वत आणि एकांतवासाला त्यांनी उचिततम स्थाने समजली. यासाठी संस्कृतीच्या गोंगाटाने ज्ञानध्यान साधनेमध्ये व्यत्यय न येवो, आत्म्याच्या विकासाची याशिवाय दुसरी कोणतीही पद्धत त्यांना आढळून आली नाही की जग आणि भौतिकतेपासून दूर व्हावे आणि या सर्व संबंधांना तोडून टाकावे जे तिला भौतिकतेच्या विश्वाशी निगडित ठेवतात.
शरीर व आत्म्याच्या या विरोधाने माणसाच्या पूर्णत्वाचेसुद्धा दोन वेगवेगळे अर्थ व उद्दिष्टे निर्माण केले. एकीकडे ऐहिक जीवनाचे पूर्णत्व, याचा अर्थ हा ठरला की माणसाने फक्त भौतिक साधनाने समृद्ध व्हावे. आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला पक्षी, एक चांगली सुसर, एक उमदा घोडा व एक यशस्वी लांडगा बनावे. दुसरीकडे आध्यात्मिक जीवनाचे पूर्णत्व, ज्याचा अर्थ हा ठरला की माणसाने काही अलौकिक शक्ती¨चा स्वामी बनावे आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला रेडिओ सेट, एक सामथ्र्यशाली दुर्बण आणि एक नाजुक सूक्ष्मदर्शक यंत्र बनावे किंवा त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या शब्दांनी एका परिपूर्ण अशा दवाखान्याचे कार्य करावे.
इस्लामचा दृष्टिकोन याबाबतीत जगातील सर्व धार्मिक व तात्विक पद्धतीपासून वेगळा आहे. तो म्हणतो की मानवी आत्म्याला अल्लाहने जमिनीवर आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्यावर काही जबाबदाऱ्या व काही कर्तव्ये सोपविली गेली आहेत आणि त्या पार पाडण्यासाठी त्याला एक उत्कृष्ट व अनुरूप असे शरीर दिलेले आहे. हे शरीर त्याला फक्त यासाठी दिले गेले आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर आणि आपल्या संबंधित सेवेचे पालन करण्यासाठी त्याचा उपयोग करावा आणि म्हणून हे शरीर आत्म्याचा तुरूंग नसून त्याचा तो कारखाना आहे आणि या आत्म्याचा काही विकास जर शक्य आहे तर तो याच पद्धतीने शक्य आहे की त्याने या कारखान्यातील उपकरणे व शक्ती¨चा वापर करून आपली योग्यता प्रकट करावी आणि हे जगही एखादी शापित जागा नव्हे, ज्यामध्ये मानवी आत्मा येऊन फसलेला आहे, याउलट जग हे एक असे कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये कार्य करण्यासाठी अल्लाहने त्याला पाठविलेले आहे. येथील अगणित वस्तू त्याच्या अधिकारात दिल्या गेल्या आहेत. येथे प्रतिनिधीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी इतर अनेक माणसेही त्याच्याबरोबर निर्माण केली गेली आहेत. येथे स्वाभाविक गरजेपोटी संस्कृती, समाज जीवन, व्यावहारिक जीवन, राजकारण आणि जीवनाची दुसरी क्षेत्रे त्याच्यासाठी अस्तित्वात आणली गेली आहेत. येथे जर आध्यात्मिक प्रगती शक्य असेल तर तिचे स्वरूप हे आहे की त्याने कार्यक्षेत्रात राहून कार्य करून आपली पात्रता सिद्ध करावी. हे जग म्हणजे त्याच्यासाठी एक परीक्षागृह आहे. जीवनाचा प्रत्येक पैलू आणि प्रत्येक क्षेत्र जणू एक प्रश्न पत्रिका आहे. घर, मोहल्ला, बाजार, मंडई, कार्यालय, कारखाना, शाळा, कचेरी, ठाणे, छावणी, संसद व रणमैदान या सर्व वेगवेगळ्या विषयावर प्रश्नपत्रिका आहेत. यापैकी एखादी जरी प्रश्नपत्रिका त्याने सोडविली नाही किंवा पुष्कळशा प्रश्नपत्रिका तशाच सोडून दिल्या तर परिणाम त्याला शून्य मिळण्याखेरीज दुसरा काय होऊ शकतो? यशाची आणि प्रगतीची शक्यता जर होऊ शकते तर ती याचप्रकारे होऊ शकते की त्याने त्याला देण्यात आलेला सर्व कालावधी आणि आपले सर्व लक्ष परीक्षा देण्यासाठी वापरावे आणि जितक्या प्रश्नपत्रिका त्याला दिल्या गेल्या असतील त्यामध्ये त्याने काही ना काही करून दाखवावे.
अशाप्रकारे इस्लाम जीवनाबद्दलच्या वैराग्याच्या कल्पनेला रद्द करतो आणि माणसासाठी आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जीवनाबाहेर नसून तो जीवनामध्येच आहे हे स्पष्ट करतो. आत्म्याचा विकास, वृद्धी कल्याण व सफलतेची खरी जागा त्याच्या दृष्टीने जीवनाच्या ऐन प्रवाहामध्ये आहे, त्याच्या किनाऱ्यावर नव्हे. आता आम्हाला हे पाहिले पाहिजे की तो आमच्या प्रगती व अधोगतीची कसोटी काय ठरवितो? या प्रश्नाचे उत्तर याच प्रतिनिधीत्वाच्या कल्पनेमध्ये सामाविलेले आहे, ज्याचा मी नुकताच उल्लेख केलेला आहे. प्रतिनिधीच्या नात्याने माणूस आपल्या जीवनातील कृतीबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. त्याचे कर्तव्य हे आहे की जमिनीवर जे अधिकार आणि जी साधने त्याला दिली गेली आहेत त्याचा वापर त्याने अल्लाहच्या इच्छेनुसार करावा. ज्या निरनिराळ्या प्रकारच्या संबंधानी त्याला दुसऱ्या माणसांच्याबरोबर निगडित केले गेले आहे त्यांच्याबाबतीत त्याने अशी वर्तणूक ठेवावी जी अल्लाहला पसंत आहे आणि आपले एकूण एक प्रयत्न व श्रम या मार्गात कारणी लावावेत की ही पृथ्वी आणि त्याच्या जीवनाची व्यवस्था जितकी उत्कृष्ट व्हावी असे अल्लाह इच्छितो तितकी ती उत्कृष्ट व्हावी. या सेवेला माणूस जबाबदारी, कर्तव्यपालन, भक्ती व आज्ञापालन आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे इ. गोष्टीसह जितक्या जाणिवेने पार पाडील त्याचप्रमाणात तो अल्लाहच्या निकट होईल आणि अल्लाहची जवळीक इस्लामच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगती आहे. याउलट तो जितका आळशी, कामचुकार व कर्तव्यविन्मुख होईल किंवा तो जितका बंडखोर, द्रोही व अवज्ञाकारी होईल तितका तो अल्लाहपासून दूर होईल आणि ईश्वरापासून दूरत्वाचे नाव इस्लामी परिभाषेत आध्यात्मिक अवनती आहे.
या विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामी दृष्टिकोनानुसार धार्मिक व भौतिकवादी या दोघांचे कार्यक्षेत्र एकच आहे जेथे दोघे कार्य करतील, तथापि धार्मिक माणूस भौतिकवादी माणसांपासून अधिक तन्मयतेने कार्यम¾ असेल. घराच्या चार भिंतीपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत जितके म्हणून जीवनाचे प्रश्न आहेत, धार्मिक माणूस भौतिकवादी माणसाप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याच्यापेक्षा काही अधिक प्रश्नाचा तो विचार करील. तथापि जी गोष्ट त्या दोघांचे मार्ग वेगवेगळे करील ती त्यांचे अल्लाहसंबंधाने स्वरूप ही आहे. धार्मिक माणूस जे काही करील ते या जाणिवेने करेल की तो अल्लाहसमोर जबाबदार आहे. या गरजेपोटी करील की त्याला अल्लाहची प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि या कायद्यानुसार करील जो अल्लाहने त्याच्यासाठी ठरवलेला आहे. याउलट भौतिकवादी माणूस जे काही करील ते बेजबाबदारीने करील. अल्लाहबद्दल बेपर्वा राहून करेल आणि आपल्या मनाला पटेल त्याच पद्धतीप्रमाणे करील. हाच फरक धार्मिक माणसाचे सारे भौतिक जीवन पूर्णपणे आध्यात्मिक जीवन बनवितो आणि भौतिकवादी माणसाचे सारे जीवन आध्यात्म्याच्या प्रकाशापासून वंचित करतो.
आता मी थोडक्यात आपणास दाखवून देईन की इस्लाम ऐहिक जीवनाच्या या बिकट मध्यप्रवाहातून माणसाच्या आध्यात्मिक उत्कर्षाचा मार्ग कसा तयार करतो.
1)    पहिला टप्‌पा- या मार्गाचे पहिले पाऊल ईमान आहे. म्हणजे माणसाच्या मनात व डोक्यात हा विचार कायम होतो की अल्लाहच त्याचा स्वामी, शासक व अल्लाह आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे आणि अल्लाहचीच आज्ञा हा त्याच्या जीवनाचा कायदा आहे. हा विचार जितका दृढ व प्रभावी होईल तितकीच दृढ इस्लामी विचारसरणी बनेल आणि त्या प्रमाणात दृढनिश्चर्याने माणूस आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालू शकेल.
2)    दुसरा टप्‌पा - या मार्गाचा दुसरा टप्‌पा आज्ञापालन हा आहे म्हणजे माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडावी, प्रत्यक्षात त्या अल्लाहची ताबेदारी पत्करावी ज्याला श्रद्धेने आपला ईश्वर मानतो. याच आज्ञापालनाचे नाव कुरआनच्या भाषेत "इस्लाम' आहे.
3)    तिसरा टप्‌पा- "तक्‌वा' संयम व विवेकाचा आहे. याला सर्वसामान्य भाषेत ""कर्तव्यपरायणता व जबाबदारीची जाणीव'' म्हणून ओळखले जाऊ शकते. तक्‌वा हा आहे की माणसाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये हे समजून कार्य करावे की त्याला आपल्या विचारांचा, वचनाचा आणि कृतीचा अल्लाहसमोर जाब द्यावयाचा आहे. अल्लाहने मनाई केलेल्या प्रत्येक कामापासून त्याने स्वत:ला रोखावे. अल्लाहने आज्ञा केलेली प्रत्येक सेवा पार पाडण्यासाठी त्याने तयार व्हावे आणि पूर्ण सावधानतेने हलाल व हराम, योग्य व अयोग्य आणि चांगले व वाईट यांच्यामध्ये भेदभाव करून तारतम्याने वागावे.
    शेवटचा व सर्वात उंच टप्‌पा "एहसान' (समर्पण) आहे. एहसानचा अर्थ हा आहे की माणसाची इच्छा अल्लाहच्या इच्छेशी एकरूप व्हावी जी काही अल्लाहची आवड आहे, माणसाची पण आवड तीच व्हावी आणि जे काही अल्लाहला नापसंत आहे त्यास त्यानेही मनापासून नापसंत करावे. अल्लाह आपल्या जमिनीवर ज्या वाईट गोष्टींना पाहू इच्छित नाही त्यापासून दासाने स्वत: वाचावे, इतकेच नव्हे तर त्यांना जगातून मिटवून टाकण्यासाठी त्याने आपली सारी शक्ती आणि आपली सारी साधने वापरावीत आणि ज्या चांगल्या गोष्टीनी अल्लाह आपल्या जमिनीला अलंकृत पाहू इच्छितो त्या चांगल्या गोष्टीनी माणसाने फक्त आपल्या स्वत:चे जीवनच अलंकृत करण्यात समाधान न मानता आपल्या प्राणाची बाजी लावून त्या चांगल्या गोष्टी जगामध्ये रुजविण्याचा व त्या प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न करावा. या स्थानावर पोहोचल्यावर दासास अल्लाहची अगदी जवळची निकटता प्राप्त होते आणि म्हणून हे माणसाच्या आध्यात्मिक विकासाचे उच्चतम स्थान आहे.
आध्यात्मिक प्रगतीचा हा मार्ग फक्त व्यक्तीसाठी नाही. तो जातिजमातीसाठी, समाजासाठी, देशासाठीसुद्धा आहे. एका व्यक्तीप्रमाणे एक समाजदेखील श्रद्धा, पुरेपूर पालन व ईशपरायणता या टप्‌प्यांवरून पुढे जाऊन "एहसान' च्या शेवटच्या टप्‌प्यांपर्यंत पोहचू शकतो आणि शासनदेखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेसह श्रद्ध, आज्ञाधारक, संयमी व मोहसीन बनू शकते. इतकेच नव्हे तर वस्तुत: इस्लामचा हेतू त्याचवेळी पूर्णपणे पुरा होऊ शकतो जेव्हा एखादा देश संपूर्णपणे या मार्गावर चालू लागेल आणि एक संयमी व समर्पित असे शासन प्रस्थापित होईल.
आता आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेवरदेखील एक नजर टाका जी व्यक्ती व समाज यांना याप्रकारे तयार करण्यासाठी इस्लामने निश्चित केली आहे. या व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत.
1)    पहिला स्तंभ "नमाज' आहे. ही रोज पाच वेळा माणसाच्या मनात अल्लाहची आठवण ताजी करते, त्याचे भय दाखवते, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करते, त्याचे आदेश वरचेवर समोर आणते आणि त्याच्या आज्ञापालनाचा सराव घडविते. ही नमाज केवळ वैयक्तिक नाही तर तिला सामूहिकपणे अदा करणे बंधनकारक ठरविले गेले आहे. म्हणजे सारा समाज सामूहिकरीत्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास तयार होतो.
2)    दुसरा स्तंभ "रोजा' आहे. तो प्रत्येक वर्ष संपूर्ण एक महिना मुस्लिम व्यक्तीला वैयक्तिकपणे व मुस्लिम समाजाला सामूहिकरीत्या संयमाचे प्रशिक्षण घडवितो.
3)    तिसरा स्तंभ "जकात' आहे. जी मुस्लिमांमध्ये संपत्तीचा त्याग एकमेकाबद्दल सहानुभूती व सहकार्याची भावना निर्माण करते. आजकाल लोक चुकीने "जकात' ला "कर' म्हणून संबोधितात. तथापि "जकात' कराहून अगदी भिन्न आहे. जकातचा अर्थ विकास व शुद्धी हा आहे. या शब्दाद्वारे इस्लाम ही वस्तुस्थिती माणसाच्या मनावर बिंबवू इच्छितो की अल्लाहच्या प्रेमापोटी आपल्या बांधवाचे जे आर्थिक साहाय्य तुम्ही कराल त्याने तुमच्या आत्म्याचा विकास घडून येईल व तुमचे आचरण शुद्ध होईल.
4)    चौथा स्तंभ "हज' आहे. जे ईशभक्तीच्या केंद्रबिंदूवर ईमानधारकांचा विश्वसमाज बनविते आणि असे एक आंतरराष्ट्रीय आंदोलन चालविते जे शेकडो वर्षांपासून सत्याच्या आवाहनाचा स्वीकार करण्याची तत्परता दाखवित आले आहे आणि अल्लाह इच्छिल तर शेवटपर्यंत ही तत्परता दाखवित राहील.

- मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर
- सय्यद ज़ाकिर अली






आयएमपीटी अ.क्र. 197      पृष्ठे - 96    मूल्य - 35                आवृत्ती - 1 (December 2010)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nptj7aw5zbm3i5bp7pw7q6rxtlt43cpo

एक काळ होता जेव्हा स्त्री अबला नारी होती, समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखली जात होती. तिला स्वत:चे असे काही अस्तित्व नव्हते, स्वातंत्र्य नव्हते, तिच्यावर होणारे  अत्याचार स्त्रीत्वाचे एक अविभाज्य अंग म्हणून तिने स्वीकारले होते. मुलीचा जन्म अपशकून, विधवा स्त्री अपशकून या घटनांचे खापरदेखील स्त्रीत्वाच्या माथी फोडले गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले.
अठवाव्या दशकात स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. स्त्री-स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल खूपच  यशस्वी ठरले. या कामात त्यांच्या सहकारी फातिमाताई शेख यांनी त्यांची खूप मदत केली. शाळेसाठी जागा दिली. अशा तऱ्हेने महिलांसाठी शिक्षणाची घरे उघडण्यात आली. रमाबाई  रानडे यांच्यासारख्या शूर महिलांनी हे काम पुढे नेण्यास मदत केली.
एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात जागतिक स्तरावर स्त्री-स्वातंत्र्य चळवळीचा उदय झाला. अमेरिका व यूरोपसारख्या मोठ्या खंडात स्त्रीचळवळी उदयास आल्या. याचा परिणाम म्हणून  स्त्रियांना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क या सर्व गोष्टी मिळाल्या. विसाव्या शतकात तिला नोकरी व शिक्षणाच्या क्षेत्रात आरक्षण सुद्धा मिळाले. या मिळालेल्या संधीचे तिने सोने  केले. स्त्री शिकली, सुशिक्षित झाली, घराबाहेर पडली, पैसे कमाऊ लागली... म्हणजेच मॉडर्न झाली आणि आधुनिक झाली!
आजमितीला आपण एकविसाव्या शतकात पाऊल टाकले आहे. या शतकाच्या सुरवातीला आपणास स्त्रीचे एक नवे रूप पाहायला मिळते. या आधुनिक युगात स्त्रियांची राजकीय व  सामाजिक प्रगल्भता वाढल्याची दिसून येते. त्या आता सामाजिक समस्यांसंदर्भात प्रश्न विचारू लागल्या आहेत. चार भिंतींत कोंडून घातलेल्याचा आरोप असलेल्या आणि आपल्या  कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या बुरखाधारी मुस्लिम स्त्रिया आज आपल्याला रस्त्यावर उतरून सामाजिक व्यवस्थेला जाब विचारू लागल्या आहेत. जामिया मिल्लिया, जेएनयू,  शाहीनबाग, लखनौतील घंटाघर आणि भारतभर झालेल्या आंदोलनातील अन्यायाविरूद्ध आवाज उठवणाऱ्या जवळपास सर्वच क्षेत्रांतील स्त्रिया ज्या प्रकारे बोलत आहेत त्यातून त्यांची  प्रगल्भता सिद्ध होते. अठराव्या शतकातील अशिक्षित स्त्री आणि विसाव्या शतकातील नोकरी करणारी शिकलेले मॉडर्न स्त्री या समूहाव्यतिरिक्त स्त्रीचा एक नवीन समूह एकविसाव्या  शतकात दिसून येतो आणि तो म्हणजे ‘शिक्षित पण नोकरी न करणारी स्त्री’... असे का? कारण जेव्हा स्त्री शिक्षित झाली तेव्हा तिचा अभिमान उंचावला, तिचे अस्तित्व जगापुढे आले,  पण हे अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात तिने स्वत:चे हाल करवून घ्यायला सुरवात केली. नोकरी केल्याने वा पैसे कमावल्यानेच माझे अस्तित्व सिद्ध होणार या अनाठायी हट्टापायी  तिला घर व ऑफिस ही तारेवरची कसरत करावी लागली. यात तिच्या तब्बेतीची हेळसांड आणि नात्यातील दुरावा कुठेन् कुठे तिने अनुभवला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रीला तिच्या  स्त्रीत्वाची ओळख करून देणारे सर्वांत मोठे नाते म्हणजे मातृत्वाचे नाते. कमकुवत झाले. येणाऱ्या लहान पिढीवर याचा परिणाम दिसू लागला. मातृत्वाच्या नात्याला न्याय न देऊ शकणारी अपराधीपणाची भावना तिला सतावू लागली. हे स्त्रीसह तिच्या पावलोपावली साथ देणाऱ्या यजमानांनी व घरातल्या इतर सदस्यांनीदेखील अनुभवले. यावर विचार करून  स्त्रीस्वातंत्र्याच्या एका नव्या पर्वाला सुरवात झाली. या नवीन पर्वाचेच नाव आहे ‘स्वातंत्र्यातील मॉडर्निझम’. यामध्ये ती वैचारिक ती वैचारिक पातळीवर मॉडर्न झाली, खऱ्या अर्थाने मॉडर्न झाली.
नोकरी व पैसे कमावूनच स्त्री स्वतंत्र होते या विचाराला तिने बदलले, नव्या ढाच्यात ढळून दाखविले. म्हणजे या विचारांची स्त्रियांची एक नवी श्रेणी उदयास आली ती म्हणजे उत्तम  शिक्षण, पदवी मिळवणारी पण नोकरीचा हट्ट न करणारी स्त्री. तिने मोठमोठ्या पदव्या मिळवून स्वत:ला सिद्ध तर केले, पण नोकरीत तडजोड करण्यात तिला कमीपणा नाही वाटला.  ‘गृहिणी’ किंवा ‘हाऊसवाइफ’ या शीर्षकाला खूप महत्त्व दिले गेले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांनी या श्रेणीतील स्त्रियांचा खूप आदर केला. कारण स्त्रीच्या नोकरीमुळे मुलांची होणारी  हेळसांड त्यांनीही जवळून अनुभवली होती. त्यामुळे आता या श्रेणीबद्दल त्यांच्या मनात खूप आदर निर्माण झाला. स्त्रीचे हे रूप तिच्या या गुणांचे संगम ठरले- तिची शैक्षणिक पात्रता,  नोकरी शक्य असूनही केलेला त्याग, मातृत्वाकडे लगाव आणि त्यातून समाधानी राहणाची वृत्ती. आजसुद्धा आपल्या मोबाइलवर ‘गृहिणी’च्या कार्याचा आदर करणारे संदेश फिरतात आणि त्यांना पसंतसुद्धा केले जातात. तर ही आहे स्त्री-स्वातंत्र्याच्या आधुनिकतेची नवीन व्याख्या... या व्याखेत स्त्रीचे शिक्षण, तिचे अस्तित्व, तिचे व्यक्तिमत्त्व या गोष्टींना खूप  महत्त्व दिले गेले आहे. याचा अर्थ स्त्रीने कमावण्याच्या वा आर्थिक उत्पन्नाच्या सर्व वाटा बंद करून टाकल्या असे नाही, तर तिने पर्यायाने कमी वेळेत किंवा घरबसल्या आर्थिक  उत्पन्नाच्या ज्या काही संधी आहेत त्या निवडल्या. ऑनलाइन व्यवसाय सुरू केले, शिकवण्या सुरू केल्या आणि साहजिकच तिच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली. ती होणार हे तिला  ग्राह्य पण होते. मात्र ती आता खूश राहू लागली. कुटुंबाच्या आनंदात, मुलांच्या सहवासात तिचा आनंद द्विगुणित झाला. तसेच किटी पार्टी, विविध महिला मंडळे, महिलांच्या सहली,  सामाजिक कार्ये यासारख्या तिच्या हक्कांच्या, आनंदाच्या गोष्टी करण्यात त्यांच्या घरधन्यांनीही कसर ठेवली नाही. अशा तऱ्हेने मध्यंतरी असुरक्षित झालेले तिचे घरटे तिने मायेने,  आपुलकीने पुन्हा कवेत घेतले.
ही आहे स्त्री-स्वातंत्र्याची नवीन व्याख्या, मॉडर्निझम... स्त्रीच्या या शक्तीलाही सलाम...! सलाम!!!

-  मिनाज शेख

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, माझ्याकडे एक महिला आली. तिच्याबरोबर दोन मुली होत्या. ती मला काही मागण्याकरिता आली होती. त्या वेळी माझ्याकडे एका खजुरीशिवाय काहीही नव्हते. ती खजूर मी तिला दिली. तिने ती खजूर त्या दोन मुलींना अर्धी-अर्धी वाटून दिली आणि स्वत: काहीही खाल्ले नाही. मग ती उठली आणि निघून गेली.  त्यानंतर जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) माझ्याकडे आले तेव्हा मी त्या महिलेची घटना त्यांना सांगितली (की उपाशी असूनसुद्धा तिने स्वत:ऐवजी दोन्ही मुलींना प्राधान्य दिले). पैगंबर   म्हणाले, ‘‘ज्या व्यक्तीची त्या मुलींद्वारे परीक्षा घेतली गेली, मग त्या व्यक्तीने त्या मुलींशी चांगला व्यवहार केला तर त्या मुली त्या व्यक्तीसाठी नरकापासून वाचविणारा पडदा बनतील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
ज्या व्यक्तीला अल्लाह फक्त मुलीच देतो, तेदेखील अल्लाहकडून बक्षीसच असते आणि अल्लाह पाहू इच्छितो की आई-वडील त्या मुलींशी कसा व्यवहार करतात, ज्या त्यांना कमवून  देणार नाहीत की सेवेसाठी त्यांच्याबरोबर कायमचे राहणारही नाहीत. तरीही त्यांच्याशी चांगली वर्तणूक करण्यात आली तर त्या मुली आपल्या आईवडिलांच्या पुरस्काराचे सबब बनतील.

माननीय नुअमान बिन बशी यांच्या कथनानुसार, ते म्हणाले की माझे वडील (बशीर) मला घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! एक गुलाम  माझ्याकडे होता. मी या मुलाला दिला.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही आपल्या सर्व मुलांना गुलाम दिला आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तो गुलाम परत
घ्या.’’
दुसऱ्या एका कथनानुसार, ‘‘तुम्ही आपल्या सर्व मुलांशी असाच व्यवहार केला आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या मुलाबाळांमध्ये समसमान व्यवहार करा.’’ तेव्हा माझे वडील घरी आले आणि त्यांनी तो गुलाम परत घेतला.

आणखी एका कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘सर्व मुलांनी तुमच्याशी चांगली वर्तणूक करावी, ही गोष्ट तुम्हाला आवडेल काय?’’ माझे वडील म्हणाले, ‘‘होय.’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘मग असे करू नका.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
मुलाबाळांशी समसमान वर्तणूक केली पाहिजे अन्यथा जोरजबरदस्ती व अन्याय होईल आणि जर असे केले गेले तर त्यांची हृदये आपसांत वितुष्टित होतील आणि ज्या मुलांना दिले  गेले नाही त्याच्या हृदयात पित्याविरूद्ध द्वेष निर्माण होईल.

माननीय उम्मे सलमा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘अबू सलमाच्या मुलींवर खर्च करण्याचे मला पुण्य मिळेल काय? आणि मी त्या मुलांना अशाप्रकारे वंचित व उपेक्षितासारखे वन वन भटकण्यासाठी सोडू शकत नाही, कारण तीदेखील माझीच मुले आहेत?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय, जे काही तुम्ही त्यांच्यावर खर्च कराल त्याचा  बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
उम्मे सलमा (रजि.) यांच्या पहिल्या पतीचे नाव अबू सलमा (रजि.) आहे. त्यांच्या मृत्यूनंतर उम्मे सलमा (रजि.) यांचा विवाह पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी झाला होता. म्हणून अबू  सलमा (रजि.) यांच्यापासून त्यांना जी मुले झाली होती त्यांच्या बाबतीत त्यांनी वरील प्रश्न विचारला.

सामान्यपणे आम्हाला अशाच प्रकारची पुस्तके वाचण्याची सवय आहे ज्यांच्यात एखाद्या विशिष्ट विषयावरील माहिती असते, त्यासंबंधीचे विचार व युक्तिवादांना एका विशिष्ट लेखनात्मक मांडणीनिशी निरंतरपणे सांगितलेले असते. याच कारणाने असा मनुष्य जो कुरआनशी अपरिचित आहे तो जेव्हा पहिल्यांदाच हा ग्रंथ वाचण्याचा विचार करतो तेव्हा तो अशी अपेक्षा धरूनच वाचू लागतो की ‘पुस्तक’ म्हणून या ग्रंथातही इतर पुस्तकांप्रमाणे प्रथम विषय निश्चित केलेला असेल. नंतर त्यातील मूळ निबंधाला अनेक प्रकरणात आणि पोटभागांत विभागून क्रमवार एकेका प्रश्नावर चर्चा केलेली असेल. त्याचप्रकारे जीवनाच्या एकेका क्षेत्रालाही वेगवेगळे करून त्यासंबंधीच्या सूचना व आज्ञा क्रमवार लिहिलेल्या असतील. परंतु जेव्हा वाचकाला पूर्णपणे अपरिचित अशी एक वेगळीच वर्णनशैली प्रत्ययास येते. येथे तो पाहतो की श्रद्धात्मक नियम, नैतिक आदेश, शास्त्रीय आज्ञा, आवाहन, उपदेश, धडा, टीका, निर्भत्र्सना, भीती, शुभवार्ता, सांत्वन, युक्तिवाद, पुरावे व प्रमाण, ऐतिहासिक कथा, सृष्टी-चिन्हांकडे संकेत, असे सर्वच विषय पुन्हा पुन्हा एकमेकानंतर येत आहेत.
एकच विषय निरनिराळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या शब्दांत पुन्हा पुन्हा उच्चारला जात आहे. तो पाहतो की एका विषयानंतर दुसरा व दुसऱ्यानंतर तिसरा अकस्मातपणे सुरू होत आहे. विंâबहुना एका विषयामध्येच दुसरा विषय अचानक येत आहे. वाचक पाहतो की संबोधक आणि संबोधित वरचेवर बदलत असून संबोधण्याचा रोख राहूनराहून विभिन्न दिशांत वळत आहे. निबंधाची विविध प्रकरणांत आणि पोटभागांत विभागणीचे कोठेही नावनिशाण आढळत नाही. तो पाहतो की इतिहास असला तरी ऐतिहासिक पद्धतीने सांगितलेला नाही. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म असले तरी तर्वâशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेत ते मांडलेले नाहीत. मानव आणि विश्वसृष्टीचा उल्लेख असला तरी भौतिकशास्त्राच्या पद्धतीने ते सांगितलेले नाही. वाचक पाहतो की या ग्रंथात संस्कृती, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावरील संवाद असला तरी जीवनशास्त्राच्या शैलीत तो सांगितलेला नाही. त्यात कायद्यात्मक नियम आणि आज्ञा सांगितलेल्या असल्या तरी कायदे रचणाऱ्यांच्या पद्धतीशी त्या पूर्णपणे विभिन्न आहेत. त्यात नैतिक शिकवण सांगितली आहे तरी तिची शैली नैतिकशास्त्राच्या सबंध वाङ्मयापेक्षा वेगळ्या स्वरूपाची आहे. अशा सर्व गोष्टी पुस्तकासंबंधीच्या आपल्या पूर्वीच्या कल्पनेच्या अगदी विरूद्ध असल्याचे पाहून मनुष्य गोंधळात सापडतो. त्याला असे वाटू लागते की हे तर एक असंपादित, असमन्वयीत आणि विस्कळीत स्वरूपाचे साहित्य आहे. त्यात प्रारंभापासून ते शेवटपर्यंत असंख्य लहानमोठ्या विविध प्रकारच्या पुâटकळ स्वरूपाच्या लेखांचा समावेश केलेला आहे. तथापि निरंतर मजकुराच्या स्वरूपात ते सर्व लिहिलेले आहेत. विरोधात्मक दृष्टिकोनातून पाहणारा याच आधारावर अनेक प्रकारचे आक्षेप घेऊ लागतो. त्याच्याशी अनुकूल दृष्टिकोन बाळगणारा कधी तर अर्थाकडे डोळेझांक करून आपल्या शंकांना बगल देण्याचा प्रयत्न करतो, तर कधी सदरहू विस्कळीतपणाचा सोयीस्कर अर्थ लावून आपल्या मनाची समजूत घालू लागतो. कधी तो अस्वाभाविक पद्धतीने त्यांच्यातील समन्वय शोधून विचित्र प्रकारचे निष्कर्ष काढतो. तर अनुकूल दृष्टिकोन बाळगणारा हा वाचक कधी कुरआन म्हणजे पुâटकळ लेखांचा संग्रह, असे मत स्वीकारतो. त्यामुळे त्यातील प्रत्येक ‘आयत’ तिच्या मागील व पुढील संदर्भापासून वेगळी होऊन अर्थाचे अनर्थ करण्याचे लक्ष्यस्थान बनते व तसले सर्व अर्थ मूळ सांगणाऱ्याच्या पूर्णपणे हेतूविरूद्ध असतात.

माणसाच्या आर्थिक व्यवहाराला न्याय व सचोटीवर कायम ठेवण्यासाठी इस्लामने काही तत्वे व काही मर्यादा ठरविलेल्या आहेत. संपत्तीचे उत्पादन, तिचा विनियोग व तिचे चलन यांची सारी व्यवस्था या तत्वांद्वारे व याच मर्यादेत झाली पाहिजे. संपत्तीच्या उत्पादनाच्या पद्धती आणि तिच्या चलनाचे स्वरूप काय असावे यासंबंधी इस्लामचा काही आग्रह नाही. या गोष्टी तर निरनिराळ्या काळात संस्कृतीच्या विकासाबरोबरच बनत व बदलत असतात. परिस्थिती व गरजेनुसार त्यांची निश्चिती आपोआप होत असचे. इस्लाम यासंबंधी फक्त ही गोष्ट इच्छितो की सर्व काळात व सर्व परिस्थितीत माणसाच्या आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काही का असेना, ही तत्वे सतत कायम राहावीत आणि या मर्यादांचे पालन केले जावे.
इस्लामचा दृष्टिकोन हा आहे की ही पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू अल्लाहने मानव जातीसाठी बनविल्या आहेत आणि प्रत्येक माणसाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे की त्याने पृथ्वीपासून आपली उपजीविका प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. या हक्कांत सर्व मानव समान भागीदार आहेत. कोणासही या हक्कापासून वंचित केले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत एकास दुसऱ्यावर प्राधान्य दिले जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती वंश किंवा वर्गावर शरियतीनुसार असा कोणताही प्रतिबंध केला जाऊ शकत नाही की तो उपजीविकेच्या साधनापैकी काही साधने अवलंबण्याचा हकदार नाही अथवा काही धंद्याची दारे त्याच्यासाठी बंद आहेत. त्याचप्रमाणे शरियतनुसार असा भेदभावही केला जाऊ शकत नाही की एखादे अर्थार्जनाचे किंवा उपजीविकेचे साधन ठराविक वर्ग, वंश वा घराण्याची मिरासदारी बनून राहावे. अल्लाहच्या जमिनीवर त्याने निर्माण केलेल्या उपजीविकेच्या साधनांमधून आपला हिस्सा प्राप्त करण्याचा सर्व मानवांना समान हक्क आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची संधी सर्वांना सारखी मिळाली पाहिजे.
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या सर्व देणग्या जर उपयुक्त बनविण्यामध्ये वा तयार करण्यामध्ये कोणाच्या मेहनतीचा वा कुशलतेचा संबंध नसेल तर त्या सर्वांसाठी मुक्त आहेत. प्रत्येक माणसाला हा हक्क आहे की त्याने आपल्या गरजेनुसार त्यांचा वापर करावा. नद्या, विहिरी व झऱ्यांचे पाणी, जंगलातील लाकूड, नैसर्गिक झाडांची फळे, आपोआप येणारे गवत व चारा हवा व पाणी, जंगलातील जनावरे, जमिनीच्या पुष्ठभागावर निघालेल्या खाणी- अशाप्रकारच्या वस्तूवर न कोणाची मिरासदारी कायम होऊ शकते न त्यांच्यावर असा प्रतिबंध लावला जाऊ शकतो की, ईश्वराच्या प्रजेने काही दिल्याशिवाय त्याचा उपयोग घेऊ नये. पण जे लोक व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर करू इच्छित असतील तर त्यांच्यावर कर बसविता येईल.
अल्लाहने माणसाच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी बनविल्या आहेत त्यांना ताब्यात घेऊन निष्कारण साठवून ठेवणे बेकायदेशीर. एक तर त्याचा स्वत: लाभ घ्या नाहीपेक्षा त्या सोडून द्या. म्हणजे निदान इतर लोक तरी त्याचा फायदा घेतील. याच तत्वांधारे कायदा हा निर्णय देतो की तीन वर्षांपेक्षा अधिक कालापर्यंत तुम्ही तुमची जमीन पडीक ठेवू शकत नाही. तिचा उपयोग शेतीसाठी, इमारतीसाठी व दुसऱ्या इतर कोणत्याही कामासाठी न कराल तर तीन वर्षानंतर ती जमीन तुम्ही सोडून दिलेली जमीन समजली जाईल आणि दुसरा कोणी तिचा वापर केला तर त्याविरूद्ध दावा चालणार नाही आणि इस्लामी शासनाला ही जमीन दुसऱ्या कोणासही देण्याचा अधिकार राहील.
जो माणूस प्रत्यक्षरीत्या निसर्गाच्या खजिन्यामधून एखादी वस्तू घेईल आणि आपल्या कष्टाने व कौशल्याने त्या वस्तूला उपयुक्त बनवील तर तो अशा वस्तूचा धनी आहे. उदा. एखादी पडीक जमीन जिच्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही, ताब्यात घेऊन तिचा एखाद्या चांगल्या कामासाठी वापर केला तर अशा जमिनीवरून त्याला हकलले जाऊ शकत नाही. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामधील सर्व मालकी हक्काची सुरुवात अशाचप्रकारे झालेली आहे. सुरूवातीला जेव्हा जमिनीवर माणसाची वस्ती होऊ लागली तेव्हा सर्व वस्तू सर्वांच्यासाठी खुल्या होत्या. नंतर जेव्हा एखाद्याने एखाद्या खुल्या वस्तूला ताब्यात घेऊन तिला उपयुक्त बनविले तेव्हा तो तिचा मालक झाला म्हणजे त्याला हा हक्क प्राप्त झाला की त्याचा वापर त्याने निव्वळ स्वत:साठी करावा आणि इतर तिचा वापर करू इच्छित असतील तर त्यांचेकडून त्याने मोबदला घ्यावा. ही गोष्ट माणसाच्या साऱ्या आर्थिक व्यवहाराची स्वाभाविक अशी आधारशीला आहे आणि या आधारशीलेला आपल्या स्थानी कायम ठेवले पाहिजे. योग्य वैधानिक पद्धतीने जगामध्ये एखाद्याला जे मालकी हक्क प्राप्त होतात ते आदरास पात्र आहेत. प्रश्न होऊ शकतो तो फक्त या बाबतीत होऊ शकतो की एखादी मालकी वैधानिकरित्या योग्य आहे किंवा नाही? जी मालकी वैधानिकदृष्ट्या अनुचित असेल तिला नि:संशय रद्द केले गेले पाहिजे परंतु ती मालकी वैधानिकरीत्या योग्य व उचित असेल, तिला ताब्यात घेण्याचा किंवा त्यांच्या मालकांच्या वैधानिक हक्कांमध्ये कमीजास्त करण्याचा कोणत्याही शासनास किंवा कोणत्याही विधीमंडळास हक्क नाही. सार्वजनिक हिताचे नाव घेऊन एखादी अशी व्यवस्था प्रस्थापित केली जाऊ शकत नाही जी शरियतने दिलेल्या हक्कांना पायदळी तुडवते, समाजाच्या फायद्यासाठी व्यक्तीच्या मालकीवर जे प्रतिबंध शरियतने स्वत:च लावलेले आहेत त्यामध्ये कमी करणे हा जितका मोठा अत्याचार आहे तितकाच मोठा अत्याचार त्याच्यामध्ये वाढ करणे हा आहे. इस्लामी शासनाच्या कर्तव्यामध्ये हे आहे की त्याने व्यक्तीच्या वैधानिक हक्कांचे संरक्षण करावे आणि त्याच्याकडून समाजाचे ते हक्क प्राप्त करावेत ज्यांची जबाबदारी शरियतने त्यांच्यावर टाकलेली आहे.
अल्लाहने आपल्या देणग्यांच्या विभागणीमध्ये समानता अवलंबिलेली नाही परंतु बुद्धिमत्तेच्या आधारावर काही माणसांना दुसऱ्या काही माणसांच्यावर प्राधान्य दिलेले आहे. सौदर्य, चांगला आवाज, आरोग्य शारीरिक सामथ्र्य, बौद्धिक पात्रता, जन्मजात परिस्थिती आणि अशाचप्रकारच्या इतर गोष्टी साऱ्या माणसांना सारख्या लाभत नसतात. असाच प्रकार उपजीविकेचासुद्धा आहे. अल्लाहने बनविलेल्या प्रकृतीची ही निकड आहे की माणसांच्यामध्ये उपजीविकेबाबतीत फरक असावा आणि म्हणून त्या सर्व उपाययोजना इस्लामी दृष्टिकोनानुसार उद्दिष्ट व सिद्धान्त या दोहोबाबतीत चुकीच्या आहेत. या माणसामध्ये एक कृत्रिम समानता प्रस्थापित करण्यासाठी अवलंबिल्या जातात. इस्लाम जी समानता इच्छितो ती आजीविकेची समानता नव्हे तर आजीविका प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी. तो इच्छितो की समाजामध्ये असा कायद्यांचे वा रूढींचे बंधन असू नये ज्यांच्या आधारावर एखादा माणूस आपली शक्ती व सामथ्र्यानुसार आर्थिक प्रयत्न करू शकत नाही आणि असा भेदभावही कायम राहू नये जो काही वर्गांना वांशिक आणि कौटुंबिक जन्मजात सुदैवाला कायमच्या कायदेशीर संरक्षणामध्ये बदलतो. या दोन्हीही पद्धती नैसर्गिक असमानतेच्या जागी जबरदस्तीने एक कृत्रिम समानता प्रस्थापित करतात आणि म्हणून इस्लाम त्यांना मिटवून समाजाच्या आर्थिक व्यवस्थेला अशा स्वाभाविक स्थितीवर आणून सोडू इच्छितो ज्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रयत्नांची दारे खुली असतील. पण जे लोक इच्छितात की प्रयत्नांची साधने व परिणाम या बाबतीतदेखील सर्व लोकांना सक्तीने सारखे केले जावे, त्यांच्याशी इस्लाम सहमत नाही कारण ते स्वाभाविक असमानतेला कृत्रिम समानतेमध्ये बदलू इच्छितात. मानवी स्वभावाशी तीच व्यवस्था अधिक जवळची होऊ शकते ज्यामध्ये प्रत्येकजण आजीविकेच्या मैदानात आपल्या प्रयत्नांची सुरवात त्याच स्थानावरून आणि त्याच स्थितीमध्ये करील ज्यामध्ये अल्लाहने त्याला जन्मास घातले आहे. जो मोटार घेऊन आलेला आहे तो मोटारमधून जाईल. जो फक्त दोन पाय घेऊन आलेला आहे तो पायीच जाईल आणि जो लंगडा जन्मलेला आहे तो लंगडतच चालावयास सुरवात करील. समाजाचा कायदा ना असा झाला पाहिजे की मोटारवाल्याची मोटारीची कायमची मिरासदारी व्हावी आणि लंगडयासाठी मोटार प्राप्त करणे दुरापास्त व्हावे आणि ना तो असा असावा की सर्वांची दौड सक्तीने एका स्थानावरून व एका स्थितीत सुरू व्हावी आणि पुढे पावेतो त्यांना अनिवार्यपणे एक दुसऱ्याबरोबर जखडूनच जावे लागेल. याउलट कायदा असा असला पाहिजे की ज्यामध्ये या गोष्टीची उघड शक्यता असावी की ज्याने आपली दौड लंगडत सुरू केली होती तो आपल्या प्रयत्नाने व पात्रतेने मोटार मिळवू शकत असेल तर त्याला ती जरूर मिळावी आणि जो सुरूवातीस मोटारीमधून चालला होता तो नंतर आपल्या अपात्रतेमुळे लंगडा होऊन राहील तर राहील.
इस्लाम फक्त इतकेच इच्छित नाही की सामूहिक जीवनामध्ये ही आर्थिक संघर्ष खुली व निरंकुश असावा तर तो हेही इच्छितो की या मैदानामध्ये संघर्ष करणारे एक-दुसऱ्या बरोबर निर्दय व निष्ठुर असू नयेत. त्यांनी एक दुसऱ्याबरोबर सहानुभूती बाळगावी व एक दुसऱ्याचे साहाय्य करावे. तो एकीकडे आपल्या नैतिक शिकवणीने लोकांमध्ये ही विचारसरणी निर्माण करतो की आपल्या निराधार व लाचार बांधवांना आसरा द्यावा तर दुसरीकडे त्याची निकड ही आहे की समाजामध्ये कायम स्वरूपाची अशी एक संस्था असावी जी समर्थ व निराधार लोकांचे आश्रयस्थान राहील, जे लोक आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास असमर्थ असतील ते या संस्थेचा फायदा घेतील. जे लोक काळाच्या दुर्घटनेमुळे या स्पर्धेत पडतील त्यांना या संस्थेने उठवून पुन्हा चालण्यास समर्थ केले पाहिजे आणि ज्या लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आधाराची गरज असेल त्यांना या संस्थेकडून आधार मिळावा. या उद्दिष्टासाठी इस्लामने कायद्याने हे ठरविले आहे की देशातील सर्व एकत्रित मिळकतीवर वार्षिक अडीच टक्के आणि याचप्रकारे साऱ्या व्यापारी भांडवलावरसुद्धा वार्षिक अडीच टक्के जकात वसूल केला जावा. साऱ्या पिकाऊ शेतीच्या पिकावर दहा टक्के किंवा पाच टक्के हिस्सा घेतला जावा. गुराढोरांच्या एका विशिष्ट संख्येवर ठराविक प्रमाणात वार्षिक जकात घेतली जावी आणि ही सर्व धनदौलत गरीब, अनाथ आणि गरजवंताच्या साहाय्यासाठी वापरली जावी. हा एक असा सार्वजनिक विमा आहे ज्याच्या उपस्थितीत इस्लामी समाजामध्ये कोणीही व्यक्ती जीवनासाठी अत्यावश्यक अशा गरजांच्या बाबतीत कधीही वंचित राहू शकत नाही कोणी कष्ट करणारी व्यक्ती कधी इतकी विवश होऊ शकत नाही की उपासमारीच्या भयाने नोकरीच्या त्या अटी मंजूर करील ज्या कारखानदार व जामिनदार घालू इच्छित असेल. कोणत्याही व्यक्तीची शक्ती किमान पातळीच्या खाली येऊ शकत नाही जी आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक आहे.
व्यक्ती आणि समाजामध्ये इस्लाम असा समन्वय प्रस्थापित करू इच्छितो की ज्यामध्ये व्यक्तीचे आणि तिचे स्वातंÍय अबाधित राहावे आणि सार्वजनिक हितासाठी त्यांचे स्वतंÍय हानीकारक न ठरता ते एकमेकांना पूरक ठरावेत. इस्लाम अशा कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक संघटनेला पसंत करत नाही जी व्यक्तिला समाजामध्ये मिसळवून टाकते आणि तिच्यासाठी ती स्वतंत्रता ठेवीत नाही जी तिच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहे. एखाद्या देशाच्या उत्पादनाच्या सर्व साधनांचे राष्ट्रीयीकरण करणे याचा अनिवार्य परिणाम हा होतो की देशातील सर्वजण समाजाच्या तावडीत सापडतात अशा स्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संरक्षण करणे व ते कायम राखणे अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्य आहे. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे राजकीय व सामाजिक स्वातंÍय आवश्यक आहे त्याप्रमाणे आर्थिक स्वातंÍयही फार मोठ्या मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. आम्ही जर व्यक्तित्वाचे अगदी समूळ उच्चाटन करू इच्छित नसलो तर आमच्या सार्वजनिक जीवनात इतकी मोकळीक अवश्य असली पाहिजे की अल्लाहच्या कोणाही दासाला आपली आजीविका स्वतंत्रपणे प्राप्त करून आपल्या सद्‌सद्‌विवेक बुद्धीला स्थिर राखता आले पाहिजे आणि आपल्या मानसिक व नैतिक शक्ती¨चा आपल्या प्रवृत्तीनुसार विकास घडवून आणता आला पाहिजे. ठराविक प्रमाणात दिले जाणारे अन्न जरी ते भरपूर असले तरी जर त्याच्या किल्ल्या दुसऱ्याच्या हाती असतील तर ते अन्न उचित नाही कारण त्यामुळे उÈाणाला जी गवसणी बसते त्याची भरपाई शारीरिक लÇपणा कधीही करू शकत नाही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget