Latest Post

पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे,
"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वत:ला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

मद्याचा त्याग
तुम्ही ऐकले असेल की अरबस्थानात मद्यपानाचा किती जोर होता. स्त्री व पुरुष, तरुण व म्हातारे सर्वांनाच दारूचे वेड होते. वास्तविकतः मदिरेवर त्यांचे प्रेम होते. तिच्या प्रशंसेचे ते गीत गात असत आणि तिच्यावर प्राण देत होते. हेदेखील तुम्हाला ज्ञात असेल की दारूची सवय लागल्यावर ती सुटणे किती दुष्कर आहे. मनुष्य प्राण द्यावयास तयार होतो पण दारू सोडण्याची त्याची तयारी नसते. जर दारूड्याला दारू मिळाली नाही तर त्याची स्थिती आजारी माणसापेक्षा अधिक वाईट होते. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे का की जेव्हा पवित्र कुरआनमध्ये ती निषिद्ध केल्याची आज्ञा आली तेव्हा काय घडले? तेच अरब लोक जे दारूवर प्राण देत होते. ही आज्ञा ऐकताच त्यांनी स्वत:च्या हाताने दारूचे माठ फोडून टाकले. मदीना शहराच्या गल्ल्यांमधून दारू अशी वाहत होती जणू पावसाचे पाणी वाहत आहे. एका मैफिलीत काही लोक बसून दारू पीत होते, जेव्हा प्रेषित (मुहम्मद स.) यांच्याकडून दिली गेलेली दवंडी ऐकली की दारू निषिद्ध ठरविली गेली आहे, तेव्हा ज्याचा हात जेथे होता तेथेच राहिला. ज्याने तोंडाला पेला लावला होता त्याने लगेच तो दूर केला आणि त्यानंतर एक घोटसुद्धा घशात जाऊ दिला नाही. असा आहे वैभवशाली ईमान! यालाच म्हणतात अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या आज्ञेचे पालन!

अपराधाची कबुली

काय तुम्हाला कल्पना आहे की व्यभिचाराची शिक्षा किती कठोर ठेवली गेली आहे? उघड्या पाठीवर शंभर कोडे, ज्यांची कल्पना केल्यास माणसाच्या अंगावर शहारे यावेत आणि जर व्यभिचारी विवाहित असेल तर दगडांचा वर्षाव करून ठार करण्याची शिक्षा आहे. अशा कठोर शिक्षेचे नाव ऐकूनच माणसाचा थरकाप होईल. परंतु तुम्हालाही कल्पना तरी आहे का की ज्यांच्या हृदयात ईमान होते त्यांची स्थिती कशी होती? एका माणसाकडून व्यभिचाराचे कृत्य घडले. कोणीही न्यायालयापर्यंत पकडून नेणारा नव्हता. पोलिसांना बातमी देण्यास कोणीही नव्हता. केवळ हृदयात ईमान (विश्वास) होते की ज्याने त्या माणसाला सांगितले, “जर तू अल्लाहच्या कायद्याविरूद्ध स्वत:च्या मनाची वासना पूर्ण केली आहेस तर आता जी शिक्षा अल्लाहने त्यासाठी ठरविली आहे ती भोगण्यास तयार हो.” नंतर तो मनुष्य स्वतः प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या सेवेत हजर झाला आणि म्हणाला, “हे प्रेषित (मुहम्मद स.)! मी व्यभिचार केला आहे. मला शिक्षा द्या.” प्रेषितांनी तोंड फिरवून घेतले तेव्हा दुसऱ्या बाजूला येऊन त्याने तीच गोष्ट सांगितली. प्रेषितांनी पुन्हा तोंड फिरवले तेव्हा त्याने पुन्हा समोर येऊन शिक्षेची याचना केली, “जे पाप मी केले आहे त्याची मला शिक्षा द्या." याला म्हणतात ईमान! ज्याच्या हृदयात ईमान आहे त्याच्यासाठी उघड्या पाठीवर शंभर कोरडे सहन करणेच नव्हे तर दगडांच्या वर्षावात मृत्यु स्वीकारणेसुद्धा सोपी गोष्ट आहे परंतु अवज्ञाकारी म्हणून अल्लाहसमोर हजर होणे कठीण आहे.
तुम्हाला माहीत आहे की माणसाला आपल्या नातेवाईकांपेक्षा कोणीही अधिक प्रिय नसतो. विशेषत: वडील, भाऊ, मुले तर इतके प्रिय असतात की त्यांच्यावरून सर्वकाही ओवाळून टाकण्यात मनुष्य धन्यता मानतो. परंतु आपण बद्र व उहुदच्या युद्धांचा थोडा विचार करा की त्यात कोण कोणाच्या विरूद्ध लढला होता. बाप मुस्लिमांच्या सेनेत आहे तर मुलगा अनेकेश्वरवाद्यांच्या सैन्यात. किंवा मुलगा इकडे आहे तर बाप दुसरीकडे. एक भाऊ इकडे आहे तर दुसरा भाऊ तिकडे. अगदी जवळचे आप्तेष्ट एकमेकांविरूद्ध युद्धात आले आणि अशा प्रकारे लढले की जणू हे एकमेकाला ओळखतसुद्धा नाहीत. त्यांच्यातील हा जोश काही रुपये-पैसे अथवा जमिनीसाठी भडकलेला नव्हता, काही वैयक्तिक शत्रुत्वसुद्धा नव्हते, तर केवळ या कारणासाठी ते स्वत:च्या रक्त-मांसाविरूद्ध लढले की ते अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यासाठी बाप, मुलगा, भाऊ व संपूर्ण कुटुंबाला त्यागण्याचे अथवा बळी देण्याचे सामर्थ्य बाळगत होते.

जुनाट रुढी-परंपरांना मूठमाती

आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की अरबस्थानात जितक्या जुनाट रुढी-परंपरा होत्या, इस्लामने जवळजवळ त्या सर्वांचाच बीमोड केला. सर्वांत मोठी प्रथा म्हणजे मूर्तीपूजा होती. ही प्रथा शेकडो वर्षांपासून होती. इस्लामने सांगितले की या मूर्तीना सोडून द्या. दारू, व्यभिचार, जुगार, चोरी आणि वाटमारीची अरबस्थानात सर्रास प्रथा होती. इस्लामने या सर्वांचा त्याग करण्यास सांगितले. स्त्रिया उघड्या फिरत असत. इस्लामने आज्ञा दिली की पडदा पद्धतीचा अवलंब करा. स्त्रियांना वारसाहक्क दिला जात नसे. इस्लामने सांगितले की वारसा संपत्तीत त्यांचादेखील हिस्सा आहे. दत्तकपुत्राला तोच दर्जा दिला जात असे जो औरस पुत्राला असतो. इस्लामने सांगितले की तो सख्ख्या पुत्राप्रमाणे नाही तर जर दत्तक पुत्राने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्याशी विवाह केला जाऊ शकतो. थोडक्यात कोणतीही अशी जुनी पद्धत नव्हती की जी मोडण्याची आज्ञा इस्लामने दिली नसेल.
परंतु तुम्हाला कल्पना आहे की ज्यांनी अल्लाह व प्रेषितांवर ईमान धारण केले होते त्यांची कार्यपद्धती कशी होती? शेकडो वर्षांपासून ज्या मूर्तीची ते आणि त्यांचे वाडवडील पूजा-अर्चना व नवस करीत असत त्यांना या ईमानधारकांनी आपल्या हाताने फोडले. शेकडो वर्षांपासून घराण्याच्या ज्या प्रथा चालत आल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पूर्णत: नष्ट केले. ज्या वस्तूंना ते पवित्र मानीत असत त्यांना अल्लाहची आज्ञा आल्यावर पायाखाली तुडवून टाकले. ज्या गोष्टींना ते घाणेरड्या मानीत असत अल्लाहची आज्ञा येताच त्यांना धर्मानुकूल समजू लागले. ज्या वस्तु शेकडो वर्षांपासून शुद्ध समजल्या जात असत त्या अकस्मात अशुद्ध ठरल्या आणि ज्या अशुद्ध समजल्या जात असत त्या एकाएकी शुद्ध झाल्या. अनेकेश्वरत्वाच्या ज्या पद्धतीत आमोद-प्रमोद व लाभाची सामुग्री होती अल्लाहची आज्ञा येताच तिचा त्याग केला आणि इस्लामच्या ज्या आज्ञांचे पालन माणसाला दुष्कर वाटते त्या सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. याचे नाव आहे ईमान व याला म्हणतात इस्लाम. त्या वेळी जर अरब लोकांनी असे सांगितले असते की अमुक गोष्ट आम्ही मान्य करीत नाही, कारण त्यात आमचे नुकसान आहे आणि अमुक गोष्ट आम्ही अशासाठी सोडत नाही की त्यात आमचा फायदा आहे; अमुक काम आम्ही अवश्य करू कारण वाडवडिलांपासून हेच होत राहिले आहे, रोमन लोकांच्या अमुक गोष्टी आम्हाला पसंत आहेत आणि इराणी लोकांच्या अमुक गोष्टी आवडतात. अरबस्तानातील लोकांनी अशाच प्रकारे इस्लामची एक-एक गोष्ट रद्द केली असती तर आपण कल्पना करू शकता की आज एकसुद्धा मुस्लिम जगात आढळला नसता. 

अल्लाहच्या प्रसन्नतेचा मार्ग
बंधुनो, पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे, __"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

१) मनाची गुलामी
 जर एखाद्या माणसाने असे म्हटले की अल्लाह व पैगंबर (स.) यांचा आदेश असा आहे, तर असू द्या. माझे मन ते मान्य करीत नाही. मला तर यात नुकसान दिसते. म्हणून मी  अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे न ऐकता मी माझ्या मते चालीन, तर अशा माणसाचे मन ईमान (विश्वास) पासून रिक्त असेल. तो मुसलमान नव्हे तर तो ढोंगी आहे जो तोंडाने  तर सांगतो की मी अल्लाहचा दास व पैगंबरांचा अनुयायी आहे. परंतु वास्तविकतः तो आपल्या मनाचा गुलाम व आपल्या मनाचा अनुयायी आहे.

२) रीति रिवाजांचे बंधन

. अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य असे सांगतो की अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा काहीही असो, परंतु अमुक गोष्ट तर वाड-वडिलांपासून चालत आली आहे. ती कशी सोडता येईल?  अथवा अमुक कायदा तर माझ्या घराण्यात अथवा भाऊकीत ठरविला आहे तो कसा मोडता येईल? तर अशा माणसाची सुद्धा ढोंगी लोकांत गणना होईल, मग नमाज पढून पळून त्याच्या  कपाळावर कितीही मोठा घट्टा पडलेला का असेना आणि दर्शनी त्याने कितीही धर्मानुकूल चेहरा बनविला का असेना, त्याला कारण असे की धर्माच्या मूळ तथ्यांनी त्याच्या हृदयाचा ठाव  घेतला नाही. रुकूअ (वाकलेल्या स्थितीत गुडध्यावर हात ठेऊन थांबणे), सिजदे (जमिनीवर मस्तक टेकणे) आणि उपवास व हजचे नाव धर्म नव्हे. त्याशिवाय माणसाचा चेहरा व त्याच्या  पोषाखात सुद्धा धर्म असत नाही तर मुळात अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञापालन करण्याचे नाव धर्म (दीन) आहे. जो मनुष्य आपल्या बाबतीत अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या  आदेशांचे पालन करण्यास नकार देतो, खरे पाहता त्याचे हृदय धर्मापासून रिक्त आहे. त्याची नमाज, त्याचा उपवास व त्याचा धर्मानुकूल चेहरा एक फसवणुकीशिवाय अन्य काही नाही.

३) दुसऱ्या जातींचे अनुकरण
अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबराच्या आदेशांची पर्वा न करता म्हणत असेल की मी अमुक गोष्टीचा अशासाठी अवलंब केला की ती इंग्रज लोकांत रूढ  आहे आणि अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की तमुक जातीची प्रगती त्यामुळे होत आहे. तसेच अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की अमुक मोठा माणूस तसे म्हणत आहे. तर  अशा माणसाने सुद्धा आपल्या ईमानची चिंता बाळगणे आवश्यक आहे. या गोष्टी ईमानशी जुळणे शक्य नाही. जर आपण मुसलमान आहात व मुसलमान राहू इच्छिता तर त्या प्रत्येक  गोष्टीला फेकून द्या जी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाविरूद्ध आहे. जर तुम्ही असे करू शकत नाही तर इस्लामचा दावा तुम्हाला शोभा देत नाही. तोंडाने तर सांगावयाचे की  आम्ही अल्लाह व पैगंबरांना मानतो, परंतु आपल्या जीवनाच्या बाबतीत प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या बोलण्यापुढे अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे रद्द करीत राहणे हे इमानही नाही व इस्लामही नाही. तर याचे नाव ढोंगीपणा आहे.

पवित्र कुरआनच्या अठराव्या पाऱ्यात (भागात) महान अल्लाहने स्पष्ट शब्दात फर्माविले आहे-
आम्ही उघड करून करून सत्य व असत्यामधील फरक विशद करणाऱ्या आयती उतरविल्या आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो या आयतींच्याद्वारे सरळ मार्ग दाखवितो. लोक म्हणतात की आम्ही अल्लाह आणि  त्याच्या पैगंबरावर ईमान आणले आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली. मग त्यानंतर त्यांच्यापैकी काही लोक आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवितात. असले लोक ईमानदार नाहीत. आणि जेव्हां त्यांना अल्लाह व  पैगंबराकडे बोलविले जाते जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय द्यावा तेव्हां त्यांच्यापैकी काही लोक तोंड फिरवितात. तथापि जेव्हां गोष्ट त्यांच्या फायद्याची असेल तेव्हां ती मान्य करतात. काय त्या  लोकांच्या हृदयात रोग आहे अथवा ते शंकेत पडले आहेत किंवा त्यांना अशी भीती आहे की अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) त्यांचा हक्क मारतील कोणत्याही परिस्थितीत, कारण कांहीही असले तरी, हे लोक स्वतःच  आपल्यावर जुलुम करणारे आहेत. वास्तविकतः जे ईमानदार आहेत त्यांची पद्धत तर अशी आहे की जेव्हां त्यांना अल्लाह व त्याच्या पैगंबराकडे बोलाविले जाईल जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय  द्यावा तेव्हां त्यांनी म्हणावे की आम्ही ऐकले आणि आज्ञेचे पालन केले. असलेच लोक मोक्ष प्राप्त करणारे आहेत आणि जो कोणी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञेचे पालन करील आणि अल्लाहला भीत राहील व  त्याच्या अवज्ञेपासून दूर राहील बस्स तोच सफल होईल.
- सूरतुन्नूर - ४६-५२
ह्या आयतीत ईमानची जी व्याख्या सांगितली आहे त्यावर विचार करा. मुळात ईमान असा आहे की स्वतःला अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाच्या स्वाधीन करावे. जी आज्ञा तेथून मिळेल तिच्या समोर  नतमस्तक आणि तिच्यापुढे कुणाचेही ऐकू नका, स्वतच्या मनाचेही नको, घराण्यातील लोकांचेही नको आणि जगातील लोकांचेही नको. अशी स्थिती ज्या माणसाची होईल तोच मोमिन व मुसलमान आहे - आणि ज्याची अशी स्थिती नसेल त्याची दशा ढोंगीपेक्षा अधिक नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘आजाऱ्याजवळ विचारपूस करण्याच्या बाबतीत गोंधळ घालू नये आणि अल्पकाळ बसणे ‘सुन्नत’ (पैगंबर मुहम्मद (स.)  यांची परंपरा) आहे.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
हा उपदेश सामान्य आजाऱ्यांसाठी आहे परंतु जर  एखाद्याचा जीवाभावाचा (संकोच न बाळगणारा) मित्र आजार पडला आणि त्याला असा अंदाज वाटत असेल की तो बसला तर त्याला  आवडेल तेव्हा तो बसून राहू शकतो.

मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी (यानंतर ते जगातून निघून गेले.) लोकसमुदायाला उद्देशून म्हटले, ‘‘ऐका!  अल्लाहने तुमचे रक्त, संपत्ती व अब्रू प्रतिष्ठित बनविली आहे. ज्याप्रकारे तुमचा हा दिवस, हा महिना आणि हे शहर प्रतिष्ठित आहे. ऐका, मी तुमच्यापर्यंत पोहोचविला?’’ लोकांनी  उत्तर दिले, ‘‘होय, पैगंबरांनी पोहोचविले.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह, तू साक्षी राहा की मी लोकसमुदायापर्यंत तुझा संदेश पोहोचविला.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीन वेळा उच्चारले. मग  म्हणाले, ‘‘ऐका! पाहा, माझ्यानंतर तुम्ही आपसांत मुस्लिम असूनदेखील एकमेकांच्या माना कापण्याइतपत सत्य नाकारणारे बनू नका.’’ (हदीस : बुखारी)

माननीय जरीर बिन अब्दुल्लाह (रजि.) यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातावर वचन दिले (बैअत केली) की नियमानुसार नमाज अदा करीन, जकात अदा करीन आणि प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशी चांगुलपणाने वागेन.’’ (हदीस  : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘बैअत’चा मूळ अर्थ आहे विक्री करणे. म्हणजे मनुष्य ज्याच्या हातावर ‘बैअत’ करतो मुळात तो या गोष्टीचे वचन देतो की मी जीवनभर हे वचन पाळीन. माननीय जरीर (रजि.) यांनी  पैगंबर मुहम्मद (स.) यांना तीन गोष्टींचे वचन दिले, नमाजला तिच्या सर्व अटींनुसार अदा करणे, जकात देणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुस्लिम बंधुंशी कोणताही धोक्याचा  व्यवहार न करणे, त्यांच्याशी कृपेने, सहानुभूतीने आणि दयेने वर्तणूक करणे. या हदीसवरून माहीत होते की मुस्लिमांनी आपसांत कशाप्रकारे राहिले पाहिजे. माननीय नुअमान बिन  बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू मुस्लिमांना आपसांत सहानुभूतीने वागताना, प्रेम करताना आणि एकमेकांकडे झुकताना पाहशील, जशी  शरीराची स्थिती होते जेव्हा एका अवयवाला रोग होतो तेव्हा शरीराचे इतर अवयव सुंध होतात आणि तापाबरोबर त्याची साथ देतात.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शरीराचे उदाहरण देऊन मुस्लिमांनी शरीराच्या अवयवांसारखे असायला हवे असे न सांगता मुस्लिमांच्या एका निरंतर राहणाऱ्या गुणवैशिष्ट्यादाखल सांगतात  की जेव्हा जेव्हा तू त्यांना पाहशील तेव्हा ते एकमेकांशी कृपा व सहानुभूती बाळगणारेच आढळून येतील.

Makkah
मुस्लिमांना हे सांगितले जात आहे की, एकेश्वरत्व काय आहे आणि त्यांना समजून घ्यावे लागत आहे की एकेश्वरत्व हा आहे. तसे पाहिले असता स्वत:ची सामान्य स्थिती पाहता मी सांगू शकतो की मी मुस्लिम आहे. मी मुस्लिम मातापित्याच्या घरी जन्मलो. माझे आई-वडील मुस्लिम होते. माझ्या कानातसुद्धा 'ला इलाहा इल्लल्लाहु' (अर्थात-अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही.) चा ध्वनी पोचला. मला एकेश्वरत्व मान्य आहे कारण एकच अल्लाहला मी मानतो. व्यवहाराची गोष्ट मी करीत नाही, धार्मिक जीवनात माझ्यात व त्या व्यक्तीच्या दरम्यान उल्लेखनीय फरक आहे, जी एकेश्वरत्वाला मानीत नाही. ती आपल्या देवी-देवतांची पूजा करते आणि मी अल्लाहचे नाव घेतो, जेव्हा ईश कृपा होते, तेव्हा मी पवित्र कुरआनचेच पठन करतो आणि गीता अथवा बायबल अथवा तौरेतचे करीत नाही. या पवित्र कुरआनमध्ये काय लिहिलेले आहे? हे तर धर्मपंडितच जाणतात. मी तर याचे पठन करतो. जेव्हा शपथ घेण्याचा प्रसंग ओढवतो तेव्हा मी अल्लाहची आणि पवित्र कुरआनचीच शपथ घेतो, दुसऱ्या कुणाची नाही कारण मी मुस्लिम आहे, एकेश्वरवादी आहे. जेव्हा एखादे नवस करतो तेव्हा कोणत्याही देवी अथवा देवताच्या स्थानावर नाही, मुस्लिम संतांच्या समाधीवर जातो. याच प्रकारच्या वारसाने मिळालेल्या इस्लामने हा प्रश्न उभा केला आहे की, एकेश्वरत्व काय आहे? आणि कदाचित याच इस्लामला पाहून कवि हालीने म्हटले होते -
करे गैर गर बुत की पूजा तो काफिर, जो ठहराए बेटा खुदा का तो काफिर।
झुके आगपर बहर सजदा तो काफिर, कवाकिब में माने करिश्मा तो काफिर॥
मगर मोमिनोंपर कुशादा हैं रहे परस्तिश करे शौक से जिसकी चाहे।


अर्थात - इतर कुणी मूर्तीपूजा केली तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. जसे हिंदू, जर कुणी एखाद्याला (येथे संदर्भ येशू ख्रिस्त) ईश्वराचा पुत्र मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा. जर कोणी (येथे संदर्भ अहुरमज्दला मानणारा अग्निपूजक पारशी समाज) अग्नीसमोर नतमस्तक झाला तर तो अल्लाहचा इन्कार करणारा मानला जातो. तर एखाद्याने तेजस्वी ताऱ्यामध्ये चमत्कार असल्याचे मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. परंतु श्रद्धावंतांसाठी (मुस्लिमांसाठी) सर्व मार्ग मोकळे आहेत. त्यांनी आपल्या इच्छेनुसार कोणतीही पूजा करावी.
याच्या पुढे जाऊन एकेश्वरत्व असा आहे की, आराधना आणि अर्चना अल्लाहची करा आणि आज्ञापालन त्या शक्तीचे करा, ज्याची आज्ञा काळावर चालत असेल. याशिवाय त्याचे आज्ञापालन कराल तर अल्लाहचे भय बाळगून करा. अल्लाहच्या भीतीसारख्या स्थितीत सेवा, सैतानाच्या आज्ञेचे पालन अथवा त्या शक्तीच्या आज्ञेचे पालन करा जी काळावर आपला हुकूम चालवीत आहे. जर तिला भिऊन तिची सेवा कराल तर या गोष्टीचा मेळ एकेश्वरत्वाशी बसत नाही. असे नव्हे तर अल्लाह ज्याची आज्ञा पूर्णपणे पाळली जाते, असे मानून अल्लाहच्याच भयाने थरथरत त्याच्या द्रोहींची सेवा व आज्ञापालन करू नका, कारण तुम्ही एकेश्वरवादी आहात. एकेश्वरत्वाच्या विरुद्ध त्या गोष्टीपासून तरी स्वत:ला वाचवा ज्या पुरातन काळापासून अनेकेश्वरत्व म्हणून ओळखल्या जातात. परंतु जे अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान आहेत, ज्यांना सामान्यत: अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान नाही तर शासक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचे जग वेगळे आहे आणि आमचे वेगळे. जर असे कराल तर ही ऐहिकता ठरेल जी धार्मिकतेच्या विरुद्ध आहे.

जगाच्या प्रत्येक धर्मात ईश्वराची कल्पना आहे. उपासनेची कल्पना आहे. शुद्धतेचे काही समान असलेले प्रकार प्रत्येक धर्मात आढळतात. प्रत्येक धर्मात आपल्या मानलेल्या उपास्यांसमोर नमले जाते, मस्तक टेकले जाते, त्याच्याच नावे बळी दिला जातो, त्याच्याचसाठी उपाशी राहिले जाते, नजराणे दिले जातात. इस्लाम या सर्व प्रकारांना एका ईश्वरासाठी निश्चित करतो. तो म्हणतो “हे पर्वत, या नद्या, हे चंद्र, हा सूर्य, ही दूध देणारी जनावरे, हे चावणारे सर्प, विंचू, हे सर्व तुमच्यापेक्षा निम्नतर आहेत. त्यांना तुमच्या सेवेसाठी निर्मिले आहे. त्यांच्यापैकी कोणासमोर तुमचे हात पसरणे, तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाचे नमणे; तुमच्या मस्तकाचा अपमान आहे, कृतघ्नता आहे, नीचपणा आहे, अनेकेश्वरत्व आहे. तुमच्यासमोर फरिश्त्यांना (देवदूतांना) नतमस्तक करविले गेले. तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाला ही गोष्ट शोभा देते की, त्याने कुणासमोर कदापि नमू नये आणि आपल्या निर्मात्या व स्वामीसमोर अवश्य नमावे. जर तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आपल्या एकमेव ईश्वर ज्याचा कोणीही सहभागी नाही. अशा अल्लाहच्या समोर नम्र राहाल तर त्याच अर्थाने स्वत:देखील अद्वितीय व्हाल."
या दृष्टिकोनाने म्हणजे ईमान (श्रद्धा) व उपासनेच्या वर्तुळात मुस्लिमांची फार मोठी संख्या एकेश्वरत्वाच्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. ते संतुष्ट आहेत आणि समजतात की, “आम्ही एकेश्वरत्वाच्या निकडी पूर्ण करीत आहोत." तर खात्रीने या वर्तुळाच्या सीमेपर्यंत त्यांचा संतोष अगदी बरोबर आहे. यात कोणतीही मतभिन्नता नाही. निश्चितपणे या दृष्टिकोनाने म्हणजे श्रद्धा व उपासनेत ते एकेश्वरत्वाच्या निकडी श्रद्धापूर्वक पूर्ण करीत आहेत. वाणीने व कृतीनेसुद्धा. परंतु जसे प्रारंभीच सांगितले आहे मानवाच्या अस्तित्वाचा आणखी एक दृष्टिकोन आहे.
मानव हा एका समुदायाचा अंश, एक सामाजिक अस्तित्व आहे. तो एकटा जन्माला तर आला आहे; परंतु एकटा राहत नाही आणि राहूही शकत नाही. जेथे एकाचे दोन झाले की समाजरचना सुरू झाली आणि सामूहिकतेच्या निकडीसमोर येऊ लागल्या. आपापसातील प्रेम, दयाभाव, समदुःखीभाव, ऐक्य व प्रेम, सहानुभूती व दुःख, विमोचन, त्याग व निष्ठा, यासारखे गुण एका चारित्र्यसंपन्न समाजासाठी आवश्यक व उत्तम गोष्टी होत. परंतु आणखी एक गोष्ट सामूहिकतेसाठी आवश्यक आहे आणि ती म्हणजे अत्याचार! मानवाची खुद्द आपली सामूहिक आवश्यकता आहे की, एखादी शक्ती अशी असावी जिने मानवाच्या हक्क व सीमांची निश्चिती करावी आणि त्यांना सामर्थ्य व शक्तीनिशी ठरवलेल्या सीमांचे पालन करणारे ठेवावे. जर अशी एखादी शक्ती विद्यमान नसेल तर मानवाचा अजाणपणा, त्याची इच्छा आणि त्याचा स्वार्थ दुसऱ्यांच्या सीमेवर अतिक्रमण करील. जी व्यक्ती तुलनेने अधिक शक्तिमान असेल ती विनावेसणीच्या बैलाप्रमाणे ज्या हिरव्या शेतात इच्छिल त्यात तो घुसेल आणि त्याला रोखणारा कुणीच असणार नाही. लोकांची न अब्रू सुरक्षित राहील, न प्राण न वित्त, यालाच अराजकता असे म्हणतात. इतिहासात एखादासुद्धा दिवस असा आढळत नाही की, एखादा मानवी समाज अशा अराजकतेच्या अवस्थेत राहिला असेल. प्रत्येक काळात सुसंस्कृत मनुष्य कोणा न कोणा शक्तीच्या आधीन राहिलेला आहे. कोणती न कोणती शासक शक्ती त्याला सामर्थ्य व शक्तीनिशी ठरलेल्या सीमेच्या बंधनांत ठेवणारी राहिली आहे. मग ती शासक शक्ती एखाद्या मानवी समाजातून वर आलेली असो अथवा कुठून बाहेरून येऊन आच्छादली असो. यापेक्षा वेगळी स्थिती अर्थात अराजकता अव्यवहार्यच नव्हे तर अकल्पनीय आहे. साम्यवादी तत्त्वज्ञानात अवश्य एका अशा स्थितीचे स्वप्न पाहिले अथवा दाखविले गेले आहे की, जेव्हा शक्तीने आर्थिक समानता आणली जाईल तेव्हा मानवी मूल्ये बदलतील आणि स्वार्थ व चुकीच्या इच्छांना मूठमाती मिळेल. त्यानंतर मनुष्याला याची गरज भासणार नाही, की एखाद्या शक्तीने त्याला बळजबरीने आपल्या सीमेत ठेवावे आणि ही शक्ती जिचे दुसरे नाव शासन आहे, वाळलेल्या पानाप्रमाणे गळून पडेल. परंत ही एक काल्पनिक गोष्ट आहे व मी या अर्थाने तिला साम्यवादी तत्त्वज्ञान म्हटले आहे की ही कल्पना जगतातील एक कल्पनेची भरारी आहे. व्यावहारिक जगताशी याचा काडीमात्र संबंध नाही. एवढेच नव्हे, तर साम्यवादी व्यवस्थेने तर आणखीनच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, मनात स्वत: आपल्या नैसर्गिकतेच्या दृष्टीने या गोष्टीचा मोताद आहे की, त्याचे एखादे आश्रय स्थान असावे, ज्याप्रमाणे स्त्रीच्या नैसर्गिकतेची गरज आहे की तिला एक छत्रछाया असावी, एक पांघरून असावे की, ज्याच्या छायेत राहून तिने शांतता प्राप्त करावी. याच झाकणाला ‘पती' म्हणून संबोधतात. अगदी याचप्रमाणे मानवी समाजाची आवश्यकता, त्याच्या स्वभावाला एका पतीची आवश्यकता आहे, ज्याच्या छायेत त्याने निश्चिंत होऊन राहावे, ज्याचे आज्ञापालन करावे. एवढेच नव्हे तर महिलांमध्ये अशी उदाहरणे सापडतात की, एखाद्या मागासलेल्या अथवा प्रगत महिलेने कोणत्या न कोणत्या प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य पतिविना व्यतीत करावे. परंतु मानवी समाज एखाद्या शासक शक्तीविना एक दिवससुद्धा जीवित राहू शकत नाही. असे एखादे उदाहरण वर्तमान काळात मिळत नाही, न इतिहासात, न मानवी बुद्धी अशा स्थितीची कल्पना करू शकते. मानवी समूहाची ही आवश्यकता विविध काळांत आणि विविध प्रदेशांत विविध पद्धतींनी पूर्ण होत राहिली आहे.

लेखक - डॉ. युसुफ़ करज़ावी


भाषांतर - नौशाद उस्मान


हे पुस्तक दोन भागात संकलित आहे. पहिल्या भागात भारताशी संबंधित माहिती दिली गेली आहे आणि येथील मुस्लिम शासकांच्या इतर देशबांधवाप्रती व्यवहारासंबंधी वर्णन केलेले आहे. संपुर्ण माहिती अल्लामा (आचार्य) शिबली नोमानी (रह.) चा संग्रह “मकालाते शिबली" आणि "औरंगज़ेब आलमगीर पर एक नज़र", अल्लामा (आचार्य) सैयद सुलैमान नदवी यांचा संग्रह “मकालाते सुलैमानी", सैयद सबाहुद्दीन अब्दुर्रहमान यांचे पुस्तक 'हिंदुस्तान के सलातीन उलमा और मशाएख पर एक नज़र' आणि 'बाबरी मस्जिद', सैयद मुहम्मद मियाँ यांचे पुस्तक 'उलमा-ए-हिंद का शानदार अतीत' आणि उडीसाचे माजी राज्यपाल श्री. बी. एन. पांडे यांचे 'खुदाबख्श ओरियंटल पब्लिक लाइब्रेरी' चे प्रसिध्द वार्षिक अभिभाषण "इस्लाम और इंडियन कल्चर" या पुस्तकांतून घेतलेली आहे.
सदर पुस्तकाचा दुसरा भाग इस्लामी जगताचे प्रसिध्द लेखक अल्लामा युसूफ करज़ावी, यांचे अरबी भाषेतील पुस्तक 'गौरूल मुस्लिमीन फ़िल मुज्नमईल-इस्लामी' चे भाषांतर आहे. या पुस्तकात लेखकांनी कुरआन हदीस (पैगंबर साहेबांची वचने) व प्रामाणिकधर्मशास्त्रीय मीमांसा यांच्या दाखल्यांसहीत सिध्द करण्याचा प्रयत्न केलाआहे. इस्लामी समाजात देशबांधवांना (अन्य धर्मियांना) किती आणि कोण-कोणते हक्क प्राप्त आहेत, त्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी (हक्कांना प्राप्त करण्यासाठी) काय - काय कर्तव्ये आहेत, त्यांच्यावर कोण-कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. इस्लामने किती महान सहिष्णुतेची शिकवण दिली आहे, इतर धर्म-समुदायांसोबत इस्लामचा तुलनात्मक अभ्यास काय सिध्द करतो आणि इतिहासकाय साक्ष देतो?
या गैरसमजूतीच्या वातावरणात हे पुस्तक लोकांसमोर वास्तविकता प्रगट करण्यात यशस्वी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश्य आहे.
 



आयएमपीटी अ.क्र. 87   पृष्ठे - 145      मूल्य - 30      आवृत्ती - August 2004

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8gyrqnz0z7286tkjgwrz5ij4joc9lnbx

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget