महिला उत्पीडन

अर्थ तंत्राशिवाय सामाजिक जीवनाच्या अन्य क्षेत्रांची प्रगतीसुद्धा नैतिक मूल्यांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, मानव वेग पारस्पारिक संबंधांचा पाया जोपर्यंत आपसातील प्रेम आणि सहयोगावर आधारित नसेल तर प्रत्येक प्रगती प्रकोप बनून जाते आणि सुधारणेचे प्रत्येक पाऊल उपद्रवाचे कारण बनून जाते. पारिवारिक जीवन सुधारासाठी जे पाऊल कठोर कायद्याच्या रूपात उचलले जाते, ते न्यायाऐवजी स्वतः हा अन्यायाचा बहाणा बनत असतो.
स्त्री शतकांपासून शक्तीहीन राहिली आहे. तिला ती साधनेसुद्धा उपलब्ध नाहीत जी पुरुषांना आज प्राप्त आहेत. यासाठी ती आपल्या अधिकारांसाठी फक्त हातपाय मारीत आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहचणे तिला फार दुष्कर झाले आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या समस्त दाव्यांच्या अस्तिवासहित भारतीय महिला आज ही शक्तीहीन आणि अत्याचारपीडित आहे. तिचे प्रदत्त अधिकार त्याच वेळेस परिणामकारक होऊ शकते. जोपर्यंत असे नैतिक वातावरण उत्पन्न केले जाईल की ज्यात तिला पुरुषांचे अधीन समजले जाणार नाही, प्रेम आणि परस्पर सहयोगाची भावना वाढीस लागेल.
पारिवारिक जीवनाच्या सुरक्षेसाठी ख्रिश्चन समाजात एका काळापर्यंत घटस्फोटास जवळजवळ असंभव बनवून टाकले होते. परंतु यामुळे सामाजिक सुदृढता तर काय येईल, अत्याचार आणि शोषणाचे विभिन्न मार्ग विस्तृत झाले. पती-पत्नी स्वाभाविक संबंधांच्या जागी चुकीच्या आणि अनैतिक पध्दती स्वीकारल्या गेल्या.
भारतात पतीच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी घटस्फोटानंतर पोटगीची जबाबदारी लागू करून दिली गेली. परंतु संख्या दाखविते की घटस्फोटानंतर पोटगी प्राप्त करण्यासाठी शक्तीहीन आणि असहाय स्त्रीला न्यायालयांचे इतक्या फेर्यामाराव्या लागतात की अंततः अधिकतर महिला नाराज होऊन जातात.
राजनैतिक जीवनात दलित वर्गांसाठी जी पाऊले उचलली गेली आहेत, ती बहुआयामी आहेत, परंतु हे असूनसुद्धा त्यांचे अत्याचार आणि दमन समाप्त झालेले नाही. त्यांच्या स्त्रियांसोबत बलात्कार आणि अत्याचारांच्या घटना दररोज वर्तमानपत्रातून येत असतात. त्यांच्या वस्त्या आजही उजाडल्या जातात, त्यांची प्राण-संपत्ती नष्ट केली जाते. आज यांना समाजात हीन दृष्टीने पाहिले जात असते आणि त्यांना व्यवहारातः आजसुद्धा समानतेचे स्थान समाजात प्राप्त होऊ शकले नाही. परंतु विडंबना आहे की इतर व दलीत नेता त्यांच्या पाठीवर स्वार होऊन त्यांच्या वाईट परिस्थितीची खिल्ली उडवीतात. आपले जग सुधारण्यासाठी त्या शक्तीहीनांच्या वाईट परिस्थितीला राजनीतिक शक्तीचे माध्यम बनवित असतात.
व्यापक नैतिक पतन
हे नैतिक पतन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभावी आहे. याचा बिघाड इतका व्यापक आणि याचा अंधार इतका गडद आहे की सर्वसामान्यांशिवाय विशिष्ट जनसुद्धा त्रस्त आहेत. सामाजिक जीवनात चारित्रिक आचरणाचा जो विकार उत्पन्न आहे. त्याच्या व्याख्येची आवश्यकता नाही. परंतु काही महत्त्वपूर्ण नैतिक विकार असे आहेत, ज्यांचा उल्लेख करणे प्रासंगिक ठरेल.
सामाजिक विकृती
सर्वांत प्रमुख विकृती आपल्या समाजात मानव-जीवन आणि मानसन्मानाचे हनन आहे. हिसा आणि उपद्रव आहे. ज्या कोणा जवळ शक्ती आणि संसाधने आहेत, तो आपल्या उद्देशाला प्राप्त करण्यसाठी हिसेला कायद्यावर वरिष्ठता देत असतो. आधी हे काम ते लोक करीत असत, ज्यांचा पेशा अपराध आणि मादक पदार्थ होता आणि त्यांचे समाजात कोणतेही स्थान नव्हते. परंतु आता ही रूची त्या लोकांमध्येसुद्धा निर्माण होत आहे जे स्वतःला सुसभ्य आणि शिक्षित म्हणत असतात. इथपर्यंत की किशोरवयीन मुले आणि मुलींमध्येसुद्धा हिसा आणि अपराधाची वृत्ती गतीने पसरत आहे. नेतागण आणि त्यांचे सहयोगीसुद्धा दुस्साहसाने हत्या करतात आणि करवितात, ज्यांचा पुरावा निवडणुकीतील हिसा आहे. अपराध(गुन्हेगारी) आणि हिसेला आपल्या समाजात आता सन्मान मिळायला लागलेला आहे. याचे एक रुप हे आहे की विभिन्न राजनैतिक दल निवडणुकांच्या वेळी अपराधींना आणि हत्यार्यांना केवळ तिकिट देतात असे नाही तर त्यांना मंत्रीपदावर आसीनसुद्धा करून टाकत असतात.
अहवालानुसार, उत्तर प्रदेशांच्या मंत्रीमंडळात अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यावर हत्या आणि दंग्यांचे अनेक दावे(प्रकरणे) चालत आहेत. हत्या आणि दंगे आता धार्मिक उपद्रवाचेसुद्धा कारण बनले आहेत. जसे स्टेन्स आणि त्यांच्या दोन अबोध मुलांची हत्या, आताच एका ख्रिश्चन पादरीची हत्या, सांप्रदायिक दंग्यांच्या स्थळांवर आणि बाबरी मस्जिद विध्वंसानंतर मुंबई आणि अन्य स्थळांचे दंगे या सर्व घटना मानव जीवनाच्या अवमाननेचे ठोस पुरावे आहेत.
वैवाहिक जीवनात हत्येच्या घटना आता सार्वत्रिक होत चालल्या आहेत. यांच्यामधून काही प्रसारमाध्यमांमुळे समोर येत असतात. आता काही वर्षांआधी एका राजनैतिक पक्षाचे युवा नेता सुशील शर्माने आपली पत्नी नैना साहनीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून तंदुरभट्टीत फेकून दिले. या जघन्य अपराधासाठी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समाजात हिसा आणि हत्येची शिकार अधिकतर अत्याचारपीडित महिला होत आहेत. कितीतरी दलित महिला अशा आहेत, ज्यांची इज्जतअबू लुटल्यानंतर त्यांची हत्या करून टाकण्यात आली.
मानव जीवनाच्या अवमाननेचा सर्वांत दुःखदायक भाग हा आहे की आता हत्येसारखा घोर अपराध आपल्या भौतिक आणि राजनैतिक हितांच्या पूर्तीसाठीचा सार्वत्रिक मार्ग समजून घेतला गेलेला आहे. धन संपत्ती आदिसाठी हत्या पूर्वीसुद्धा होत होत्या परंतु ही प्रवृत्ती इतकी प्रगती करून गेलेली आहे की विचारांचे मतभेदसुद्धा याच प्रकारे हत्या करून सोडविले जात असतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दिल्लीमध्ये दोन युवा मित्र कोणत्या मुद्दयावर चर्चा करीत होते. की एकाने दुसर्याची हत्या करून टाकली. रेल्वेमध्ये बैठकीचे भांडण आणि चित्रपटाचे तिकीट घेण्यावर भांडणसुद्धा कधीकधी हत्येचे कारण बनून जात असतात.(हिन्दुस्थान २७ जानेवारी २००४(दिल्ली) अनुसारष्ट प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतण्या महेंद्र कुमारांचे पुत्र मनीष तथा अन्य दोन युवकांना २४-१-०४ च्या सायंकाळी विलासपूरहून दिल्ली जाणार्या एक ट्रेनमधून कोसीजवळ चालत्या गाडीतून काही लोकांनी काही विवादावरून खाली फेकून दिले. या दुर्घटनेवरूनसुद्धा नैतिक संकटाचा अनुमान लावला जाऊ शकतो.)

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget