एक सर्वश्रेष्ठ क्रांतिकारी

मानवी इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्व हे तात्कालीन सामाजिक वातावरणाने व परिस्थितीने प्रभावित झालेले असतात. परंतु या व्यक्तीची शान काही औरच आहे. त्याला घडविण्यात तात्कालीन परिस्थितीचा काहीच वाटा नाही. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होऊ शकत नाही की अरबाची तात्कालीन स्थिती त्या वेळी ऐतिहासिक रूपात अशा व्यक्तीच्या जन्माची मागणी करीत होती. ओढून ताणून तुम्ही असे म्हणू शकता की ऐतिहासिक कारण अशा नेत्याची मागणी करीत होते ज्याद्वारा तात्कालीन अव्यवस्था व भिन्नता नष्ट करून एक राष्ट्र बनवून इतर देशांना पराजित करून अरबांना समृद्ध करील. असा राष्ट्रवादी अरबी वैशिष्ट्याने परिपूर्ण नेता अन्याय, निर्दयता, रक्तपात, धोकाधडी करून अरब देशाला संपन्न करून साम्राज्याची निर्मिती करील आणि उत्तराधिकाऱ्यांसाठी हा वारसा सोडून जाईल. याशिवाय त्याकाळची अरबी इतिहासाची दुसरी मागणी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. हेगेल (Hegel)व माक्र्स (Marx)यांच्या इतिहासाच्या भौतिक व्याख्येनुसार तिथे एक राष्ट्र आणि एक साम्राज्य बनविणारा निर्माण होणे काळाची गरज होती. परंतु हेगेल व माक्र्सचे तत्त्वज्ञान या घटनेची व्याख्या करूच शकत नाही की त्या वेळी त्या स्थितीत एक असा मनुष्य जन्माला आला जो उत्तम नैतिक शिकवण देणारा, मानवतेला सावरणारा, आत्म्यांना शुद्ध करून त्यांना विकसित करणारा आणि अज्ञानाच्या अंधविश्वासांना व पक्षपातीपणाला नष्ट करणारा होता. अशा महात्म्याची दृष्टी जातीपाती, वंश, देशाच्या सीमा तोडून संपूर्ण मानवतेवर फैलावली, ज्याने आपल्या समाजासाठीच फक्त नव्हे तर मानवतेसाठी एक नैतिक आध्यात्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक व्यवस्थेचा पाया घातला. ज्याने आर्थिक व्यवहार, लोक राजकीय व आंतरराष्ट्रीय संबंधांना कल्पनाविश्वात नव्हे तर प्रत्यक्षात नैतिक आधारावर स्थापित करून दाखविले आणि आध्यात्मिकता व नैतिकतेचा संतुलित समावेश केला जे आजसुद्धा ज्ञान, तत्त्वज्ञान व बुद्धीची तशीच मुख्य कृती आहे जशी त्या वेळी होती. काय अशा व्यक्तीला अरब अज्ञानाच्या वातावरणाची उपज म्हणू शकाल?

असेच फक्त नाही की ही व्यक्ती तात्कालीन परिस्थितीची निर्मिती नाही तर जेव्हा आम्ही तिच्या किर्तीवर विचार करतो तर माहीत होते की काळ व स्थानाच्या बंधनांनी मुक्त आहे. तिची नजर स्थान व काळाच्या बंधनांना तोडत हजारो वर्षांच्या (Milleniums) पडद्यांना चिरून पुढे जाते. तो मनुष्याला प्रत्येक युगात व वातावरणात पाहतो आणि त्याच्या जीवनासाठी असे नैतिक व व्यावहारिक मार्गदर्शन करतो जे प्रत्येक स्थितीत योग्य ठरते. तो त्या विभुतिंपैकी नाही ज्यांना इतिहासाने गतकालीन करून ठेवले आहे. ते त्यांच्या काळातील एक चांगले नेता होते असेच आपण इतरांसाठी म्हणू शकतो. परंतु हा विश्वनेता असा आहे जो संपूर्ण मानवतेचा मार्गदर्शक आहे, जो काळाबरोबर प्रगती करत जातो आणि प्रत्येक युगात आधुनिक सिद्ध होतो जसा मागील युगात होता.

लोक ज्यांना उदारतेने इतिहास घडविणारे (Makers of History) अशी पदवी देतात ते खरे तर इतिहासाने घडविलेले असतात. (Creatures of History) खरे तर इतिहास घडविणारे संपूर्ण मानवी इतिहासात हेच एकमेव व्यक्तित्व आहे. या जगातील जेवढ्या नेत्यांनी इतिहासात क्रांती घडविली, त्यांच्या वृत्तांतावर विवेचनात्मक दृष्टी टाकल्यास कळून येते की पूर्वीपासून तिथे क्रांतीची कारणे उत्पन्न होत होती आणि ती कारणे स्वतः त्या क्रांतीची दिशा व मार्ग निश्चित करीत होती, ज्याच्या येण्याची ते मागणी करीत होते. क्रांतिकारी नेत्याने फक्त इतकेच केले की स्थितीच्या मागणीच्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी त्या अभिनेत्याची भूमिका पार पाडली ज्यासाठी स्टेज व कर्म पूर्वीपासून निश्चित होते. 

परंतु इतिहास घडविणारे व क्रांती करणाऱ्यांपैकी हेच एक असे व्यक्तिमत्त्व आहे की जिथे क्रांतीची कारणे नव्हती. तिथे त्याने स्वतः क्रांतीची कारणे निर्माण केली. जिथे त्या क्रांतीचे ‘बी’ (स्पिरीट) व व्यावहारिक योग्यता लोकांमध्ये नव्हती तिथे त्याने स्वतः उद्देशानुसार मनुष्य घडविले. स्वतःच्या व्यक्तित्वाला विरघळवून हजारो लोकांच्या मनात उतरविले आणि त्यांना तसेच बनविले जसे तो बनवू इच्छित होता. त्याच्या संकल्प सामर्थ्याने व बळाने स्वतःच क्रांतीची सामुग्री निर्माण केली, तिला आकार दिला आणि समयगतीला त्या मार्गावर चालविले ज्या मार्गावर तो चालवू इच्छित होता. वैभवशाली इतिहास घडविणारा आणि असा महान क्रांतिकारी मानवी इतिहासात तुम्हाला कुठे सापडतो?

सज्जड पुरावा
आता आपण या प्रश्नावर विचार करू या की, चौदाशे वर्षांपूर्वीच्या अंधकारमय जगात अरबसारख्या घोर अंधकारमय देशाच्या एका कोपऱ्यात एक मेंढपाळ, निरक्षर मरुस्थळवासी व्यक्तीच्या अंतरंगात इतके ज्ञान, इतके प्रकाश, बळ, इतके चमत्कार, इतकी प्रबळ व परिपूर्ण शक्ती-सामर्थ्य उत्पन्न होण्याचे कोणते साधन होते? लोक म्हणतात की ते सर्व त्याच्या मन व मस्तिष्काची उपज होती. माझे असे म्हणणे आहे की जर हे त्याच्या मन व मस्तिष्काची निर्मिती होती तर त्याला ईश्वर होण्याचा दावा करावयास हवा होता. त्याने जर असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्या जगाने कृष्णाला भगवान म्हणण्यात संकोच केला नाही, ज्याने बुद्धाला पूज्य बनविले आणि ज्या जगाने ईसा मसीह (अ.) यांना स्वेच्छेने खुदाचा पुत्र बनविले, तसेच ज्या जगाने हवा, पाणी, अग्निचीसुद्धा पूजा केली, त्या जगाने अशा महान कीर्तिमान व्यक्तीला ईश्वर मान्यच केले असते. परंतु पाहा तो स्वतः काय सांगत आहे. तो त्याच्या किर्ती व चमत्कारांपैकी एकाचेसुद्धा क्रेडीट स्वतः घेत नाही. तो म्हणतो, ‘‘मी एक मनुष्य आहे, तुमच्याचसारखा मनुष्य, माझ्याजवळ माझ्या स्वतःचे काहीच नाही, सर्वकाही ईश्वराचे आहे आणि ईश्वराकडूनच आहे. ही वाणी ज्याच्यासारखी दुसरी वाणी निर्माण करण्यात मानव असमर्थ आहे, ही माझी वाणी नाही? माझ्या बुद्धीची उपज नाही. या वाणीचा शब्द न शब्द ईश्वराकडून माझ्याकडे आला आहे. यासाठीची सर्व प्रशंसा ईश्वरासाठीच आहे. हे कार्य जे मी स्वतः केले, जे कायदेकानू मी बनविले, हे सिद्धान्त जे मी तुम्हाला शिकविले यापैकी काहीएक मी स्वतः घडवलेले नाही. मी स्वतःच्या योग्यतेने काहीसुद्धा निर्मित करण्याचे सामर्थ्य ठेवत नाही. मी प्रत्येक गोष्टीत ईश्वराच्या मार्गदर्शनाचा (Divine Guidance) मोहताज (आश्रित) आहे. ईश्वराकडून जे अवतरित होते तेच सांगतो व करतो.’’

पाहा, हे कशा प्रकारचे आश्चर्यजनक सत्य आहे! कशा प्रकारची सत्यता व सत्यवादिता आहे! खोटारडा व्यक्ती मोठा बनण्यासाठी दुसऱ्यांच्या कीर्तिचे क्रेडीटसुद्धा घेण्यात संकोच करीत नाही आणि त्याविषयी सहज माहीत होते की हे त्याने कोठून घेतले आहे. परंतु हा व्यक्ती त्या कीर्तिचा संबंधसुद्धा स्वतःशी जोडत नाही ज्याला तो स्वतःची कीर्ति (महानता) घोषित केली असती तर कोणी त्यास खोटा म्हटले नसते कारण कोणाजवळ त्याच्या वास्तविक उगमस्त्रोतापर्यंत पोहचण्याचे साधनमात्र नव्हते. सत्यतेचा यापेक्षा अधिक स्पष्ट पुरावा आणखीन कोणता असू शकतो? त्या व्यक्तीपेक्षा अधिक सच्चा आणखीन कोण असू शकतो ज्याला एका अत्यंत गुप्त साधनाद्वारा (दिव्यप्रकटन) असे अनुपम चमत्कार प्राप्त होतात आणि तो निःसंकोचपणे सांगतो की हे चमत्कार त्याला कोठून प्राप्त झाले? आता सांगा, का म्हणून आम्ही त्या व्यक्तीला सच्चा म्हणू नये?

पाहा, हे आहे आम्हा सर्वांचे नायक, संपूर्ण जगाचे पैगंबर (प्रेषित) मुहम्मद (स.)! त्यांच्या प्रेषित्वाचे उघड प्रमाण त्यांची सत्यता आहे. त्यांचे महान कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांचा पवित्र जीवनवृत्तांत, सर्वकाही इतिहाससिद्ध आहे. जो व्यक्ती शुद्धहृदयी, सत्यप्रियता आणि न्यायसंगत त्यांच्या जीवनाचे अध्ययन करील, त्याचा आत्मा साक्ष देईल की हेच ईश्वराचे पैगंबर-प्रेषित आहेत. ती वाणी जी त्यांनी सादर केली तो हाच कुरआन आहे ज्याचे तुम्ही अध्ययन करता. या अनुपम ग्रंथाचे जो कोणी खुल्या मनाने अध्ययन करील, त्याला मान्यच करावे लागेल की, हा ग्रंथ अवश्य ईशग्रंथच आहे. कोणीही अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती करू शकणार नाही.


Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget