प्रेषितांच्या शिकवणी

कुरआनोक्ती आहे,
‘‘तो आपल्या इच्छेने बोलत नाही, हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो. त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.’’ (कुरआन ५३: ३-५)
जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित जे काही शिकवतात ते सर्व अल्लाहकडून असते. हे म्हणण्याला विस्तृत अर्थ आहे.
ही शिकवण दोन प्रकारची आहे.
१) अल्लाह प्रत्यक्ष अथवा दूताकरवी प्रेषितांना देतो.
२) प्रेषित दिव्य प्रकटनानुसार अथवा दिव्यबोधनुसार काही नीतिनियम तयार करीत असत.
पहिल्या प्रकारची शिकवण मूळ स्वरुपाची आणि अल्लाहने प्रत्यक्ष अवतरित केलेली आहे तर दुसरी अप्रत्यक्ष आणि प्रेषितांनी दिव्यबोधच्या प्रकाशात तयार केलेली आहे. परंतु हेतु आणि पावित्र्यात दोन्ही शिकवणी सारख्या आहेत.
निष्पापपणा आणि प्रेषित
प्रेषित निष्पाप आहेत. त्यांच्या हातून धार्मिक-प्रकारची चूक न होणे अटळ आहे. त्यांची इच्छा, आकांक्षा, वागणूक, विचार, आचार हे सर्वप्रकारच्या वाईटांच्या विरोधातील पुरावेच होत. ते धर्मबाह्य बाबतीत चूक करणे शक्य आहे, परंतु याचा त्यांच्या प्रेषित्वावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचा निष्पापपणा दर्शवितो की दिव्य प्रकटनाचा अर्थबोध घेताना त्यांच्याकडून चूक होणे अशक्य आहे. तसेच दिव्यबोधाच्या प्रकाशात नीतिनियम तयार करताना अथवा ईशादेश आचरणात आणताना त्यांच्याकडून हलगर्जीपणा अथवा एखादी चूक अजिबात होणार नव्हती. म्हणून त्यांच्या इतर बाबींसाठी (धर्मबाह्य) त्यांच्या निष्पापपणावर काहीच परिणाम होणार नव्हता.
प्रेषित हे विचार करीत नाहीत अथवा चूक करीत नाहीत म्हणून निष्पाप होते असे मुळीच नाही तर वस्तुस्थिती वेगळी आहे. इतर मानवांसारखेच प्रेषितांच्या हातून चूक होणे सहाजिक आहे. परंतु प्रेषितांची ही चूक करण्याची पात्रता कधीच घडून येत नसे, कारण त्यांचे विचार आणि दृष्टी त्यांच्या नैतिकतेइतकीच परिपूर्ण अशी होती. एकीकडे प्रेषित मुहम्मद (स) दिव्य प्रकटनाचा उद्देश जाणून होते आणि त्या प्रकाशात ते नीतिनियम बनवित असत. दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या ‘स्व’वर पूर्ण नियंत्रण होते. त्यांचे नैतिक अधिष्ठान, अल्लाहचे भय आणि परलोकाविषयीचे ज्ञान अतिउच्च दर्ज्याचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या हातून पापकर्मे घडतील अशी कधीच भीती नव्हती. हे त्यांच्या निष्पापपणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते.
पण हे फक्त एकमेव वैशिष्ट्य प्रेषित मुहम्मद (स) यांच्या निष्पापपणाचे नाही. त्यांना निष्पापपणाचा उच्च दर्जा प्राप्त होण्यास दिव्यबोध आणि त्यांचे आत्मिक निरीक्षण हेसुध्दा कारणीभूत आहे. खरे तर हे दिव्य निरीक्षणच त्यांना बौध्दिक आणि नैतिक चुकांपासून दूर ठेवत होते. प्रेषितांच्या हातून चूक अशी होतच नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांच्या हातून चुका घडत होत्या, परंतु जेव्हा असे घडत तेव्हा त्यांना अल्लाहकडून सावधानतेचा इशारा त्वरित मिळत असे. दुसऱ्यापर्यंत ही चूक पोहचण्याअगोदर त्यास दिव्यबोधाद्वारे अगदी दुरूस्त केले जात असे. जेव्हा त्यांना काही विपरीत (चूक) आपल्या हातून घडावे असे मनोमन वाटे तेव्हा त्यांची अतिउच्च दर्ज्याची नैतिकशक्ती त्या अइच्छेला गाडून टाकत असे. कुविचार आणि अनाचाराबरोबर दोन हात करताना त्यांची उच्च दर्ज्याची नैतिक शक्तीच फक्त मुकाबला करीत नसे, तर त्याबरोबर दिव्यबोधसुध्दा लढाईत सामील होत असे आणि त्या कुविचाराचा तथा दुष्टकर्माचा कायमचाच नाश करीत असत.
प्रेषितांचा निष्पापपणा हा प्रेषितशृंखलेच्या महान कार्यासाठी अत्यावश्यक होता. प्रेषित जर खोटे बोलत असतील. पूर्वग्रहदूषितता आणि दिव्यप्रकटनाचे चुकीचे अर्थ लावत असतील तर त्यांच्यावर कोण वेडा विश्वास ठेवणार होता? लोक अशा व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवणार की तो अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत ढवळाढवळ करून पोहोचवित आहे? असा मनुष्य मानवी चारित्र्याचा अनुकरणीय असा आदर्श जगापुढे ठेऊ शकत नाही कारण त्याचे स्वतःचेच चारित्र्य हे हीन दर्जाचे आणि दुसऱ्याला उपदेश करण्यालायक नसते. प्रेषित्व पूर्णतः असफल ठरते जर ते प्रेषित या महान कार्यासाठी दिव्यप्रकटनापुढे पूर्णपणे आज्ञाकित होण्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यास असमर्थ ठरणार होते.
प्रेषित हे निष्पाप होते म्हणजे ते व्यक्ती म्हणूनसुध्दा निष्पाप होते. बौध्दिक आणि शारीरिक भ्रष्ट आचारांचा (भ्रष्टाचार) तिटकारा त्यांना होता. हे अशामुळे की ते अल्लाहचे खास उफत केलेले दास होते. दुसऱ्या कोणाला हा दर्जा प्राप्त होऊच शकत नाही. भले तो कितीही धार्मिक, नैतिक का असेना. मनुष्याचे विचार आणि आचार हे निष्पापपणाला पोहचू शकतील, पण हे अशक्य आहे की त्याची नैतिकता चूक करण्यापलीकडील आणि विचाराने दैवी बोधाचा अचूकपणे अर्थ काढण्याचे बौध्दिक सामर्थ्य प्राप्त करणारी आहे, हे अशक्य कोटीचे आहे. म्हणून हा शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत व्यक्ती हे जाणून घेत नाही की प्रेषित मुहम्मद (स) हेच फक्त निष्पाप आहेत आणि हे सत्य त्या व्यक्तीच्या हृदयात खोलवर जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती प्रेषितांवर मनापासून प्रेम करूच शकत नाही आणि त्यांचा खरा अनुयायी आणि अज्ञांकित बनून राहू शकत नाही. अशा स्थितीत प्रेषितांबरोबर कोणी भागीदार ठरविण्याचे पाप त्या व्यक्तीकडून अनायासे घडून जाते.

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget