नव्या युगातील नवीन ईश्वर

चारित्र्य व आचरणाच्या दृष्टीने जग आज ज्या ठिकाणी आहे तसेच ते चौदा शतकांपूर्वी याच ठिकाणी व याच स्थितीत होते. त्या वेळी इस्लामनेच त्याला खोट्या देवदेवतांपासून मुक्त केले होते. आजच्या खोट्या ईश्वरापासून इस्लामच मानवतेची सुटका करु शकतो. या ईश्वरांनी, हुकूमशाही, बादशाही, साम्राज्यशाही व भांडवलशाहीचे बुरखे घेतलेले आहेत. एकीकडे पाषाणहृदयी भांडवलदार गरीब मजुरांचे रक्त शोषण करुन आपल्या तिजोऱ्या भरीत आहेत, तर दुसरीकडे श्रमिकवर्गाच्या हुकूमशाहीच्या नावावर काही लोक आपल्या ईश्वरत्वाचा देखावा थाटून बसले आहेत. हे लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचे स्वातंत्र्य चिरडून टाकीत आहेत. परंतु त्यांच्या तोंडी भाषा अशी असते की ते जनतेच्या इच्छेची पूर्ती करीत आहेत.

एक शंका व तिचे उत्तर

इस्लाम मानवासाठी स्वातंत्र्याचा संदेश आहे ही गोष्ट ऐकून काही लोकांच्या मनात असा प्रश्न उभा राहण्याचा संभव आहे की मग इस्लाम खुद्द मुस्लिमांनाच या जुलमी व अत्याचारी हुकूमशहांच्या पंजातून का सोडवीत नाही. ज्यांनी आज पूर्ण मुस्लिम जगाला स्वातंत्र्यापासून वंचित करुन साखळदंडाने बांधून ठेवलेले आहे आणि जे इस्लामच्या नावाखाली मुस्लिमांना हीन, दीन, नीच दर्जाचे बनवीत आहेत. या शंकेच्या उत्तरात आम्ही असे सविनय सांगू की हे खरेखुरे हुकूमशहा, जरी इस्लामच्या नावाचा वापर करीत असले तरी खरी वास्तवता अशी आहे की त्यांच्या शासनामध्ये इस्लामला कुठलेही अधिकार, स्थान प्राप्त नाही. तसेच त्यांच्या जीवनामध्ये वा आसपास इस्लामची एखादी झलकसुद्धा दृष्टीस पडत नाही हे तथाकथित मुस्लिम त्या मानवी समूहाशी संबंध बाळगतात ज्याच्यविषयी स्वतः अल्लाहची आज्ञा आहे की,

‘‘आणि जे लोक अल्लाहने दिलेल्या कायद्याप्रमाणे न्याय करणार नाहीत हे अत्याचारी होत.’’ (५:४४)

‘‘हे मुहम्मद ! तुमच्या पालनकर्त्यांची शपथ ! जोवर आपापसातील मतभेदांचा निवाडा करण्यासाठी तुम्हाला नेमत नाहीत, तोपर्यंत हे लोक ‘श्रध्दावंत’ होऊच शकत नाहीत. नंतर तुम्ही असा न्याय करा की त्यावर कोणालाही कमतरतेची जाणीव होऊ नये व त्या निवाड्याचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करुन तो मानावा.’’ (४:६५)

ज्या इस्लामकडे आम्ही आज लोकांना बोलावितो आणि अशी इच्छा करतो की त्यांनी इस्लामला आपल्या जीवनात मार्गदर्शक बनवावे त्याचा त्या ‘इस्लाम’शी काडीचाही संबंध नाही, ज्याचा भूतकाळातील मुस्लिम शासकांनी अंगीकार केला आहे. या शासकांच्या मनात ईश्वरी कायद्याविषयी कसलाही आदर असल्याचे आढळून येत नाही. ज्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या आदेशांना बाजूला सारुन टाकतात व मन मानेल तसे करतात व असे करताना त्यांना क्षणभरसुद्धा खंत वाटत नाही. प्रकाश व मार्गदर्शनाकरीता त्यांना आपल्या जीवनात त्याच्यापासून सहाय्य घेण्याची गरज भासत नाही. तसेच त्यांच्या निष्ठाही फक्त त्यांच्या पुरत्याच विशेष नाहीत. ते जेव्हा आपल्या पसंतीची एखादी वस्तु प्राप्त करतात तिचा ते अंगीकार करतात. मग भलेही युरोपच्या कुठल्याही देशाचे कायदे असोत अथवा शरीअतचे आदेश असोत. जी वस्तु वा जी गोष्ट त्यांच्या इच्छेविरुद्ध किवा त्यांच्या हिताविरुद्ध असते, तिला उचलून दूर फेकून देतात. हे लोक माणसाशीही निष्ठावान नाहीत, तसेच अल्लाहशीही नाहीत. ती माणसे व ईश्वर या दोहोंचे अतिरेक व अशिष्ठपणा, तसेच अमर्यादा करणारे आहेत, कारण त्यांच्या अंगीकाराची वा दूर झटकून टाकण्याची कसोटी, सत्य व न्याय यावर आधारलेली नसून त्यांची स्वतःची मते व त्यांच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा व स्वार्थावर आधारभूत आहेत.

आम्ही जो इस्लाम जाणतो, तो अभिमानी, अहंकारी बादशहांचे, तसेच घमंडी व जुलमी शासकांचे अस्तित्व सहन करीत नाही. सामान्यजनाप्रमाणेच तो या शासकांनाही ईश्वरी कायद्यांच्या शृंखलांनी बांधून ठेवतो. त्यासाठीच जर हे शासक राजी नसले तर त्यांना तो कायमचे नष्ट करुन टाकतो कारण,

‘‘जो (समुद्राच्या पाण्यावरील) फेस असतो तो उडून जातो व जी वस्तु माणसांना लाभप्रद आहे ती पृथ्वीवर स्थिरावते, शिल्लक राहते.’’ (१३:१७)

Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget