Latest Post

अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे. म्हणूनच त्यांच्यात हे आकर्षण फक्त तितकेच ठेवले गेले आहे, जितके प्रत्येक जात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावात अशी नियंत्रणशक्ती ठेवली गेली आहे, जी त्यांना कामसंबंधात त्या ठराविक मर्यादेचे उल्लंघन करू देत नाही. या उलट माणसांत ही अभिरुचि असीमित, अनियंत्रित आणि सर्व इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यासाठी वेळ आणि काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या स्वभावात अशी कोणतीही नियंत्रणशक्तीसुद्धा नाही जी त्याला एका विशिष्ट मर्यादेवर मज्जाव करील. पुरुष व स्त्रीमध्ये एकमेकासाठी स्थायी आकर्षण असते. त्यांच्यात एकमेकाला आकर्षित करण्याचे अपरिमित साधने एकत्रित केली गेली आहेत. त्यांच्या हृदयात विरूद्ध लिग-जातीबद्दल प्रेम व अनुरक्ततेची एक प्रबळ प्रेरणा ठेवली गेली आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि त्याचा डौलदारपणा, रंग-रूप आणि त्याचा स्पर्श व त्याच्या अंग-प्रत्यांगात विरुद्ध लिग-जातीसाठी आकर्षण उत्पन्न केले गेले आहे. त्यांचा आवाज, गती, चाल प्रत्येक गोष्टीत आकर्षित करण्याची शक्ती भरली गेली आहे. सभोवतालच्या जगातसुद्धा असली असंख्य साधने निर्माण केली गेली आहे जी दोघांच्या लैंगिक प्रेरणांना गतिमान करतात आणि त्यांना एकमेकाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. वार्याचे घोंगावणे, पाण्याचा प्रवाह, गवताची हिरवळ, फुलांचा सुगंध, चिमण्यांची चिवचिव, आकाशातील मेघ, चांदण्या रात्रीचे माधुर्यः तात्पर्य असे की, निसर्गाच्या सौंदर्याची लोभनीय शैली आणि ब्रह्मांडाच्या सौदर्याचे चित्र प्रत्यक्ष अथवा परोक्ष रूपाने त्या प्रेरणा गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय माणसाच्या शारीरिक व्यवस्थेचे निरीक्षण केल्यास कळते की यात जो शक्तीचा मोठा खजिना ठेवला गेला आहे, त्यात एकाच वेळी जीवनशक्ती आणि कार्यशक्तीसुद्धा आहे व कामसंबंधी शक्तीसुद्धा. याच ग्रंथी ज्या त्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उत्पन्न करतात.

त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे. 

निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
संस्कृतीरचनेवर याचा परिणाम-
हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच माणसात विरुद्ध लिग-जातीविषयी आकर्षण, त्याच्या यथार्थ काम-शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ठेवले गेले आहे. जर त्याच प्रमाणात, नव्हे तर एकास-दहाच्या प्रमाणात त्याने संततीला जन्म दिला, तर त्याचे आरोग्य बिघडेल आणि दीर्घ आयुष्याला पोहचेपर्यंत त्याची शारीरिक शक्ती संपुष्टात येईल. या गोष्टीचे हे उघड प्रमाण आहे की, मनुष्य परलिग-जातीच्या आकर्षणाच्या आधिक्याचा अर्थ असा नाही की, त्याने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक संभोग करावा, तर याचा अर्थ असा आहे की, स्त्री व पुरुषाची एकमेकाशी बांधिलकी असावी आणि त्यांच्या पारस्परिक संबंधात स्थायित्व व दृढता उत्पन्न केली जावी.
म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे. 

म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे. 

म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठी
इच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-
यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो. 

जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.

वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट या चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट, कीचकट आणि नाजुक होत गेला. या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरुपात इस्लाम धर्माची सुद्धा एक स्पष्ट भूमिका आहे. ही भूमिका आधुनिक काळाने प्रेरित नसून ती इस्लामच्या प्रारंभी पासूनच होती. आजही आहे व जग संपेपर्यंत जशीच्या तशीच राहणार. ही इस्लामी भूमिका त्या भूमिकेच्या अगदी विरोधात होती. जी शतकानुशतके जनमानसांत रूजलेली व मान्य करण्यात आलेली होती. या मध्ये स्त्रीच्या वयोमानानुसार पुरुषाच्या संबंधाच्या स्वरूपानुसार प्रेम व सहानुभूती आणि सहकार्य, समानता, तसेच तिच्या स्थायी व्यक्तीमत्वाची स्वीकृती आहे. यात तिचा जीव, संपत्ती व विनयाचे संरक्षण आले. शिवाय तिचे अर्थिक, सामाकिड व राजनैतिक अधिकार आहेत. असे म्हणावयास हरकत नाही की, या मध्ये तिच्या व्यक्तीमत्वा च्या परिपूर्णतेची सर्व साधन-सामग्री उपलब्ध आहे. ही अतिशय स्पष्ट, प्रमाणित व कणखर भूमिका आहे. या भूमिकेमुळे ते सर्व प्रश्न सुटतात जे वर्तमान काळाच्या भुमिकेने समाज जीवनात निर्माण करून ठेवलेत.
इस्लाम धर्माच्या बाबतीत काही लोकांची भूमिका अज्ञानी व पक्षपाती असते. ते त्यांच्या विशेष धार्मिक व राजनैतीक विचारसरणीमुळे इस्लाम धर्माच्या कोणत्याच विशेषत्वास पचवू शकत नाहीत. हे लोक स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या सकारात्मक भूमीकांकडे काना डोळा करतात. म्हणजेच द्वेष आणि शत्रुत्वाची सूड भावनाच माणसाला सत्यापासून दूर ठेवते. जो मनुष्य या क्लिष्ट मानसिक रोगास बळी पडतो तो महा महीम वास्तवांना पाहु शकत नाही. व पाहिल्यावर सुद्धा त्यांना न पाहण्याचे ढोंग करीत असतो. परंतु सत्य लपविल्याने व डोळे मिटवून घेतल्याने लपत नसते. ते आपले अस्तित्व प्रखरपणे प्रकाशमयरित्या मान्य करण्यास भाग पाडते. जो पर्यंत या भूतलावर दिव्य कुरआन व हदीसची स्पष्ट शिकवण अस्तित्वात आहे, ज्या नुसार शतकानु शतके संपूर्ण जगामध्ये निर्णय व त्यावर कार्य होत राहिल, स्त्री वरील इस्लामच्या उपकारांना नाकारता येत नाही.
काहींना वाटते की इस्लाम-पूर्व काळात स्त्रिची जी दयनीय अवस्था होती. इस्लामने त्यात सुधारणा अवश्य केली व काही अधिकार सुद्धा दिलेत ज्यापासून ती वंचित होती. परंतु स्त्री बरोबर परिपूर्ण न्याय करण्यात आला नाही. पुरुषाला मिळालेल्या अधिकारापेक्षा स्त्रिला मिळालेले अधिकार तुलनात्मक दुष्टया खूप कमी आहेत. व ही तफावत अजूनही बाकी आहे जी पूर्वी ‘स्त्रि-पुरुषांत’ अधिकारांच्या बाबतीत होती. दुसऱ्यां शब्दांत इस्लामने पुरुष व स्त्रिला समान दर्जा दिला नाही व त्यांच्या दरम्यान परिपूर्ण समानता प्रस्थापित केली नाही.
इस्लामने स्त्रीला जे अधिकार दिले आहेत. त्यावर विषमतेच्या या दृष्टिकोनानुसार पुष्कळ आक्षेप व हरकती घेण्यात येतात. हे असे म्हणता येते की इस्लाम मध्ये पुरुष श्रेष्ठत्वाची कल्पना आहे. पुरुष घराचा स्वामी व मालक आहे. तो एका पेक्षा जास्त विवाह करू शकतो. त्याला तलाक (घटस्फोट) देण्याचा अधिकार आहे. वारशात स्त्री पेक्षा दुप्पट अधिकार पुरुषाला आहे. साक्ष, बदला आणि दैयत (भरपाई) च्या कायद्यात स्त्रिवर अन्याय झालेला आहे. असे व अशा प्रकारच्या कीतीतरी हरकती व आक्षेप घेणारे इस्लामी कायद्यात बदल घडविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांची मागणी आहे की पुरुषाचे अधिकार संपुष्टात आणावे. स्त्रिला खाजगी जीवनात पुरुषांना मिळालेले.डछएकअङ सर्व अधिकार देण्यात यावे. दोघांचे अधिकार समान असावेत. वारसा हक्कात दोघांचा समान वाटा असावा. पतीला तलाक देण्याचा अधिकार स्त्रिला सुद्धा असावा. तिला जेव्हा वाटल्यास पती पासून विभक्त होण्याचा अधिकार असावा. पुरुषाने तलाक दिल्यास आजीवन घटस्फोटित स्त्रिला पोटगी द्यावी. पुरुषाला एक पत्नी घरात असताना दुसऱ्या लग्नाची परवानगी नसावी. कधी-कधी तर जीभ एवढी अवाक्या बाहेर जाते की पुरुषांना असलेल्या बहुपत्नीत्वाच्या अधिकारा प्रमाणेच स्त्रिलाही बहुपतीत्वाचा अधिकार मिळावा. अशा प्रकारे स्त्रिला पण पुरुषांना मिळालेले, सर्वच राकडीय व सामाकिड अधिकार मिळावेत. हे सर्व आक्षेप इस्लाम विषयी अज्ञानाचे कडू फलीत आहेत. दुर्दैवाने या अज्ञानी मंडळी मध्ये बरेचसे जण सुशिक्षित आहेत व विचारवंत देखील आहेत. इस्लाम धर्माने जीवनाची जी विस्तारित आणि परिपूर्ण कल्पना सादर केली आणि ज्या प्रमाणे व्यक्तीगत व सामुहिक जीवनाची त्याने उभारणी केली. याच्या प्रकाशात हे आक्षेप आपोआप लोप पावतात.
हे आक्षेप काही नवीन नाहीत. हे फार जुने आहेत. या मुदतीत विविध अगांनी त्यांचे समाधान करण्यात आले. परंतु ही गोष्ट कीती आश्चर्याची व खेदजनक आहे की प्रत्येक वेळी या आक्षेपांना अगदी नवीन व आधुनिक स्वरूपात सादर करण्यात येते. आणि याचा प्रचार करण्यात येतो की ही समस्या जग निर्मिती पासून आज पर्यंत पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आली व इस्लामी विद्वांनाजवळ यांचे उत्तरच नाही. या त्यांच्या नीतीमुळे असे सहसा वाटते की यांच्यात इस्लाम धर्म समजण्याची भावना कमी आणि टिके चे लक्ष्य बनविण्याचीच भावना जास्त आहे. गरज याची आहे की ज्या आक्षेपांची उत्तरे त्यांना मिळालीत त्यावर त्यांनी गंभीरपणे विचार करावा आणि त्यातही त्रुटी आढळल्यास स्पष्ट करावे. या मुळे आकलन व विवेकशीलतेचे मार्ग मिळतील. गैरसमजुती दूर होतील आणि इस्लामच्या वास्तव स्वरूपाचे आकलन होईल.
हे सर्व आक्षेप अशा प्रकारचे लोक घेतात ज्यांच्या विचारांवर व बुद्धींवर स्त्रि-पुरुषांचा पाश्चात्यांनी दिलेला विषमतेचा पगडा बसलेला आहे. या पगड्याच्या विळख्यात ते स्वतः विवश आहेत. ही विचारसरणी आता केवळ विचारसरणी राहीलेली नसून तिला मोठ्या प्रमाणात आजमावण्यात आले आहे. आणि परिणामी लैंगिक स्वैराचार आणि परिवारांच्या विघटनाच्या स्वरूपात भीषणता ओढवून घेण्यात आली. (याचे तपशील वार वर्णन ‘स्त्रि स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना’ या लेखात आपल्या समोर मांडण्यात आले आहे.) परंतु या भीषण परिणामांकडे काना-डोळा करून त्याचा अशारितीने पुरस्कार करण्यात येतो की ती केवळ उपयुक्त विचार सरणी नसून स्त्रिची मुक्ती आणि उत्तुंग यशाची गुरुकील्ली आहे. इस्लामने या विचारसरणीचा पुरस्कार केला नाही तर विवेकशीलतेची मागणी आहे की इस्लामलाच नेहमी करिता घटस्फोट देण्यात यावा. वस्तुस्थिती अशी आहे की स्त्रिच्या बाबतीत इस्लामने दिलेल्या विचारसरणीची उपयुक्तता व मोल आणि पावित्र्य इतिहासात सिद्ध झाले आहे. जेव्हा केव्हा पश्चिमच्या स्त्रि-पुरुष समानतेच्या कल्पनेत सुधारणा घडवून आणण्यात येईल व त्यातील विषमतेस दूर करण्यात येईल तेव्हा ती कल्पना इस्लामी-विचारसरणी च्या जास्त जवळ येईल. एवढेच नाही तर हे सांगणे अयोग्य होणार नाही की इस्लामच्याच माध्यमाने त्यात सुधारणा घडवून त्याच्या त्रूट्या संपविण्यात येतील.
स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या भुमिकेवर विरोधकांकडून टीकांची झोड उठविण्यात आली व सतत हल्ले होत आलेत. हे हल्ले एवढे तीव्र आहेत की बरेचसे इस्लामचे नाव घेणारे सुद्धा खूप प्रभावित झालेत आणि त्यांना इस्लामी शिकवणीत मोठ्या चुका व त्रुट्या आढळून येऊ लागल्या.
या न्यूनगंडाचेही भरपूर प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना निश्चित करणे सोपे नाही. काही मंडळी मग ते तोंडी दावा करो अथवा न करो, परंतु इस्लाम धर्माच्या कायद्यापासून मुक्त होऊ इच्छितो. त्यांच्या दृष्टिकोनात वर्तमान काळात स्त्रिचे लक्ष्य इस्लाम धर्माने नव्हे तर पाश्चात्यांनी निश्चित केले आहे. ती इस्लामच्या बंधनात अडकून स्वतःचा विकास करू शकत नाही. यासाठी तिला त्या मुक्त वातावरणामध्ये बागडावयास हवे जे पाश्चिमात्यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाले आहेत. त्याच्या या कामना व प्रयत्नांना एक मुस्लिम तो मुस्लिम असे पर्यंत तरी साथ देऊ शकत नाही. कारण त्या मुस्लिमांसाठी शरीयतच्या त्या मर्यादा आहेत ज्यांचे उल्लंघन करण्याची त्याला परवानगी नाही. यदाकदाचित त्याच्या कडून अशी चूक घडली तरी तो स्वतःला अपराधी आणि ईश्वरासमोर उत्तरदायी असण्याची जाणीव बाळगेल व तात्काळ ‘शरीयत’ च्या मर्यादा कक्षेत येण्याची धडपड करील. हीच त्याच्या श्रद्धेची मागणी आहे. यावेळी शरीयतचे संपूर्ण आदेश चर्चेत घेतलले नाहीत. केवळ पारिवारिक जीवन विषयक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आदेशांना दिव्य कुरआनने विविध ठिकाणी ‘ईश्वरीय मर्यादा’ च्या शब्दाने ने संबोधित केले आहे. आणि या मर्यादांचे उल्लंघन करण्यास सक्तीने बंदी घातली आहे. एका ठिकाणी ‘तलाक’ च्या कायद्याच्या उल्लेखा संबंधी दिव्य-कुरआनने सांगितले की,
‘‘ईश्वराने निश्चित केलेल्या या मर्यादा आहेत. त्यांचे उल्लंघन करू नका. जे लोक त्यांचे उल्लंघन करतील, तेच अत्याचारी आहेत.’’ (सुरह-ए-बकरा : २२९)
सुर-ए-तलाक मध्ये सुद्धा तलाकचे नियम वर्णन करण्यात आले आहेत. त्यांच्या नंतर तात्काळ नंतर सांगितले की,
‘‘कित्येक वस्त्या अशा आहेत ज्यांनी आपला पालनकर्ता आणि त्याच्या प्रेषितांच्या आज्ञे विरुद्ध दुर्लक्ष केले तर मी (स्वयं ईश्वराने) त्यांचा सक्तीने हिशोब घेतला आणि त्यांना कठोर शिक्षा दिली. त्यांनी त्यांच्या कर्मांची फळे चाखली आणि त्यांची कार्यपरिणती तोटाच तोटा आहे. ईश्वराने (परलोकात) त्यांच्यासाठी तीव्र प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. म्हणून ईश्वराच्या प्रकोपाचे भय बाळगा. हे बुद्धीमान लोक हो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. ईश्वराने तुमच्याकडे एक आदेश अवतरला आहे.’’ (सुरह-ए-तलाक : ८ ते १०)
मग कोणतीही मुस्लिम व्यक्ती या मर्यादा आणि ताकीद व तंबी नंतर स्त्रिचे अधिकार किवा आदेश अथवा कोणत्याही शरीयतच्या कायद्याचा विरोध करण्याची कल्पनाच कशी करणार?
काही जणांच्या बुद्धी व विचारांवर पाश्चात्यांचा एवढा पगडा व प्रभाव नाही की ते कुरआन च्या नियमांना प्राचीन विधी समजून व प्राचीन परंपरा समजून रद्द बातल ठरवतील. परंतु त्यांना असे वाटते की, इस्लामी विधी ज्या परिस्थितीत अवतरली होती. ती परिस्थिती आता पार बदलून गेली आहे. बदलत्या परिस्थितीत शतकानुशतके प्राचीन नियम व कायदे आणि परंपरा वर कार्यरत असण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. हा काळ स्पर्धेचा काळ आहे. इस्लामने स्त्रि विषयी जी भुमिका घेतली आहे. त्या भुमिकेवर ठाम राहून वर्तमान काळातील स्पर्धात्मक जीवनांत ती वावरू शकत नाही. स्त्रिच्या इतरांबरोबरील स्पर्धेत मागे पडण्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण समाज व राष्ट्रच मागे राहील. या करिता इस्लामी कायद्यात सुधारणा करून वर्तमान काळाशी साम्य साधण्याची नितांत आवश्यकता आहे. या मंडळीच्या दृष्टिकोनात हे आवश्यक झाले आहे. जे लोक असे पुनरुज्जीवन करण्याची भाषा करीत नाहीत त्यांच्यावर हे परिवर्तनवादी लोक परिस्थिती बद्दल अज्ञानी, पुरातनवादी व अगतीक असण्याचे आरोप करीत असतात.
काही मंडळी याही पुढे जाऊन मोठ्या साधेपणाने व भोळसुद पणाने असे म्हणतात की इस्लाम एक आधुनिक धर्म आहे. त्याने स्त्रिला आधुनिक युगातील संपूर्ण अधिकार बहाल केले आहेत. परंतु या पुरातन वादयांना कुरआन आणि हदीसचा अर्थच अशा प्रकारे वर्णन केला की गुलामगिरीच्या काळातील आठवण यावी. करिता इस्लाम धर्माचे आधुनिक व विकासवादी वर्णन करण्याची गरज आहे. कोण आहे जो या आकलन शक्ती आणि दूरदर्शिता व उच्च विचारांची दाद देणार ?
जे लोक इज्तेहाद (साकल्लयाने केलेला विचार) च्या नावावर इस्लामी कायद्यात सुधारणेचे इच्छूक आहेत ते कदाचित इस्लामी कायद्यांना मानव निर्मित कायदा समजतात की जो कायदा मानव निर्माण करतो व तो गरज भासल्यास त्याच्या मर्जीनुसार त्यात बदल करीत जातो. इस्लामी कायदा हा मानव निर्मित नसून ईश्वराने स्वतः अवतरित केलेला आहे. या करिता कोणत्याही व्यक्तीस त्यात सुधारणा व परिवर्तन करण्याचा अजिबात अधिकार नाही. हा अधिकार त्याने प्रेषितास सुद्धा दिला नाही ज्याच्यावर ‘शरीयत’ अवतरली. कारण दिव्य कुरआनात आहे की,
‘‘जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकविल्या जातात तेव्हा ते लोक जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करीत नाहीत म्हणतात, याच्या ऐवजी एखादा अन्य कुरआन आणा अथवा यांच्यात काही बदल करा.’’ हे पैगंबर (स) त्यांना सांगा, ‘‘माझे हे काम नव्हे की मी आपल्या कडून याच्यात काही फेर बदल करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचे अनुसरण करणारा आहे, जे माझ्याकडे पाठविले जाते. मी जरी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे.’’ (सूरह-ए-युनूस : १५)
दुसरी गोष्ट अशी की मानवाने निर्माण केलेले कायदे वेळ आणि परिस्थितीचे द्योतक असतात. ते काळ आणि परिस्थितीच्या प्रभावा पासून मुक्त नसतात. त्यांच्यात मोठी लवचिकता असते. ते काळानुसार बदलत असतात. मानवीय कायद्यांत लवचिकता असणे म्हणजे ती त्यातील त्रुटी आहे जी बदलत्या काळात त्यावर कर्म करण्यास अपात्र बनविते. परंतु ज्याने इस्लामचा शुद्ध अंतःकरणाने अभ्यास केला आहे तो या वास्तवास कधीच नाकारू शकत नाही की दिव्य कुरआनाने स्वतःस एका कायम स्वरुपी धर्माच्या स्वरुपात सादर केले व ज्या मध्ये कयामत (महाप्रलय) पर्यंत परिवर्तन घडणे शक्य नाही. इज्तेहाद (विचार साकल्य) म्हणजे कुरआनच्या नियमांना बदलण्याचे नाव नसून या नियमांना बदलत्या परिस्थितीवर लागू करण्याचे कौशल्य व त्याच्या प्रकाशात व मार्गदर्शनात नवीन नियमांचा शोध लावणे आहे. हे काम स्वतंत्र विचारसरणी व स्वैर विचारसहीत शक्य नसून त्या नियमांच्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे जे इस्लामने निर्माण केले आहेत.
येथे एक प्रश्न राहून-राहून डोक्यात येतो, तो म्हणजे शेवटी या सुधारकांना स्त्रीचे अधिकार आणि मुस्लिमांची सामाकिड सुधारणेची एवढी काळजी का लागली? मुस्लिमांमध्ये भरपूर बिघाड आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ही आणि कार्याबाबतीतही बिघाड आहेत. त्याच प्रमाणे नैतिक आणि व्यवहारिक बिघाड आहेतच. परंतु हा सुधारक या सर्व बिघाडांना दूर करण्याऐवजी मुस्लिम स्त्रि वर होत असलेल्या अत्याचार व अन्यायावरच का चितित आहे?
या मंडळीच्या बुद्धी व विचारधारेचे निरिक्षण केल्यास याचे एक कारण लक्षात येते की त्यांच्या विचारा नुसार मानवाच्या जीवनाचे उद्दिष्ट व त्याचे लक्ष्य हे पाश्चात्यांनी निश्चित केलेले उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे. म्हणून त्यांनीच निश्चित केलेला मार्ग यांनी स्वीकारला आहे. त्यांचे एक स्पष्ट वैशिष्टय हे की धर्म एक निरर्थक बाब आहे व त्याचा आपल्या जीवनाशी सुतराम संबंध नाही. कोणाला जर रस असलाच तर त्याने धर्माला केवळ त्याच्या व्यक्तिगत जीवना पर्यंतच मर्यादित ठेवावे. सामुहिक जीवन त्या पासून मुक्त असावे. जो पर्यंत मानव धर्माच्या बंधनात जखडलेला आहे. भुतकाळाच्या अंधकारमय युगात पडलेला असेल आणि विकासाचे मार्ग त्याच्यासाठी बंद असतील. आजच्या काळात त्याला जगण्याचा अधिकार नाही.
हे संपूर्ण इस्लामी अनुयायांना याच मार्गावर चालविण्याचे इच्छूक आहेत. या करिता प्रथम पाऊलाच्या स्वरूपात कदाचित ते ‘समाज-सुधारणे’ स जास्त लाभकारी समजतात आणि मुस्लिम स्त्रिच्या अधिकाराच्या माध्यमाने त्यांना या क्षेत्रात यशस्वितेची जास्त आशा आहे. कारण की जो पर्यंत मुस्लिम स्त्रि धर्माच्या प्राचिन कल्नपेच्या ‘दलदली’ मध्ये फसलेली आहे व नवीन पिढीला ईश्वर आणि प्रेषिताचे दास्यत्व आणि त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची शिकवण देत आहे तो पर्यंत धर्माची बंधने इतकी सैल होणार नाहीत की इस्लामच्या अनुयायांना त्यांच्यात हजारो दुष्कर्म असूनही त्यांच्या मार्गाची दिशा बदलणे शक्य होईल. त्यांची दिशा बदलणे केवळ अशा प्रसंगीच शक्य होईल जेव्हा स्त्रिच धर्मांच्या दिशेत असलेले तिचे तोंड वळवील. व आपले अधिकार मिळविण्यासाठी धर्माविरुद्ध रणशिग फुंकेल. वस्तुस्थिती अशी आहे की विरोधक त्यांच्या उद्दिष्टात यशस्वी झालेले नाहीतच आणि त्यांना यशस्वी होण्याची आशा बाळगण्याची गरज सुद्धा नाही. याचाच संताप आणि राग ते धार्मिक नेत्यांवर काढतात व त्यांना अज्ञानी, प्राचीनवादी व पुरातनवादी आणि मूलतत्ववादी सारख्या संबोधनांद्वारे संताप व्यक्त करीत असतात. त्यांच्या मुखाद्वारे व लेखणी द्वारे निघालेला प्रत्येक शब्द ‘प्रमाण-पत्र’ आहे आणि आधुनिक काळाने त्यास विस्तारण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न विकास आणि संस्कृतीच्या नावावर मोठ्या बिनधास्तपणे विस्तारीत करण्यात येत आहे.
काही जण स्वतः धार्मिक वृत्तीचे आहेत. आणि पाश्चात्य संस्कृतीच्या कटू अनुभवांपासून दहा पावले दूर राहू इच्छितात. परंतु चारही बाजूंनी या संस्कृतीचा विळखा एवढा घट्ट आहे की ते तिच्या प्रभावापासून सुरक्षित राहू शकत नाहीत. हळू-हळू त्यांच्या समाज जीवनात बदल होत आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचा विळखा घट्ट होत आहे. परंतु अजूनही ते या बाबतीत समाधानी व आनंदित आहेत की, पार्चिमात्यांच्या अनुकरणाच्या स्पर्धेत सामील होऊन सुद्धा तिच्या वाईट प्रभावापासून त्यांचे समाज जीवन सुरक्षित आहे व यापुढे सुद्धा असेच सुरक्षित राहील. परंतु हे खोटे समाधान व गैरसमज आहेत जे जास्त काळ टिकू शकणार नाही. अद्याप पर्यंत त्यांना पाश्चात्यांचे कडू फलित भोगावे लागले नसतील तरी हे केवळ इस्लामचे परिणाम आहेत जे या संस्कृतीच्या परिणामांना प्रगट होऊ देत नाहीत. जेव्हा हे परिणाम संपतील तेव्हा पाश्चात्य संस्कृती तिच्या संपूर्ण दुष्कर्मांसहीत त्यांच्या घरांत नांदणार आहे. वादळाच्या पूर्वानुमानांना पाहून जो माणुस सावध होणार नाही व आपल्या घराचे संरक्षण करणार नाही. त्याचे घर वादळाच्या एका तडाख्याने नेस्तनाबुद होईल. आणि कोणीही त्यास वाचविण्यासाठी येणार नाही.

इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो. अशा समाजाची इस्लामशी जोड कशी लावली जाऊ शकते, जेथे मुलींना ‘कॉल गर्ल’ केले जाते, तिला नागडी करून नाचायला लावले जाते आणि पुरुषांच्या कामवासनेची पूर्तता करणारी भोग्य वस्तू, असे तिला मानले जाते. पाश्चिमात्यांच्या नैतिक मापदंडात इस्लामी महिला कशा बसू शकतात बरे? इस्लामने महिलांना जे हक्क व अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार कोठे कोठे त्यांना मिळत नाहीत, ही गोष्ट काही अंशी खरी आहे. त्यामुळे महिलांना त्रासही होत असतो. हेही एक मर्यादेपर्यंत ठीक आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपले इस्लामी अधिकार कोणते आहेत व आपली कर्तव्ये कोणती आहेत, हे पूर्णपणे जाणत नाही अथवा ते पूर्णपणे आचरणात आणत नाहीत.
इस्लामने पुरुषांना व महिलांना समान हक्क दिलेले आहेत. आपला समाज आज सुद्धा कन्यांना डोक्यावर असणारे ओझे समजतो. इस्लाम पुत्र व कन्या यांच्यात कसलीही फरक करीत नाही. मानवाच्या तत्त्वाने दोहोंना समान मानतो. शारीरिक व मनोवैज्ञानिक दर्जाने त्या दोहोंमध्ये मोठाच फरक असतो. तो प्राकृतिक फरक दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या हक्कांची व अधिकारांची तसेच त्यांच्या कर्तव्यांची यादी तयार करतो. हा फरक लक्षात घेऊन, महिलांना जे विशेष स्थान व दर्जा मिळणे आवश्यक आहे, ते सर्व महिलांना इस्लाम देतो, त्यांचे संरक्षणही करतो. महिलांना तो पुरुषांच्या दया-कृपेवर सोडून देत नाही. इस्लामची अशी इच्छा आहे की महिलांवर त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक भार टाकला जाऊ नये. पुरुषांना महिला बनणे आणि महिलांनी पुरुष होणे ही गोष्ट प्रकृतीविरूद्ध आहे आणि इस्लामला ती स्वीकारार्ह नाही.
‘‘पत्नीशी चांगली वागणूक करण्याबाबतची माझी ताकीद स्वीकार करा.’’- बुखारी, मुस्लिम
कुरआनचे फर्मान आहे,
आणि त्यांच्याशी चांगली वागणूक करा - सूरह : निसा-१९
पत्नींचे अधिकार व हक्क जसे त्यांच्या पतीवर तितकेच उघड व स्पष्ट आहेत, तसेच पतीला पत्नीवरही अधिकार आहेत. पतींना एक दर्जा अधिक प्राप्त आहे.- सूरहः बकरा - २२८
विवाह व तलाक
महिलासंबंधी आणखी एक महत्त्वाचा विषय विवाह आणि तलाकचा आहे. विवाहाला ‘निकाह’ म्हटले जाते. एक पुरुष व एक महिला आपल्या स्वतंत्र मर्जीनुसार एकमेकाजवळ पति व पत्नीच्या स्वरूपात निर्णय घेतात. त्यासाठी तीन अटी आहेत. एक अशी की पुरुषाने वैवाहिक जीवनाच्या जबाबदार्या स्वीकारण्याची शपथ घ्यावी. आपसात विचार-विनिमयाने मान्य झालेली एक निर्धारित रक्कम, मेहेरच्या स्वरूपात पतीने पत्नीला द्यावी आणि या नव्या शरीरसंबंधाची उघडपणे घोषणा केली जावी. असे केल्याविना कोणाही स्त्री-पुरुषाने एकत्रित राहाणे आणि लैंगिक संबंध ठेवणे; अगदी चूक आहे, इतकेच नाही तर तो एक मोठा अपराध आहे.
हा वैवाहिक संबंध दोघंपैकी एकाच्या इच्छेनुसार संपुष्टातही आणला जाऊ शकतो आणि तो अधिकार इस्लाम देतो. याचेच नाव ‘तलाक’ अथवा घटस्फोट आहे. महिलेसाठी आणि पुरुषासाठी तलाकचा एक नियम व एक पद्धत अशी आहे की त्यांच्यापैकी कोणीही वैवाहिक जीवनापासून असंतुष्ट असेल आणि त्यांचे एकत्रित राहाण्याची जर शक्यताच राहिली नसेल, तर दाखवून दिलेल्या पद्धतीने, टप्प्याटप्प्याने त्यांनी वेगळे व्हावे आणि त्यांना वाटल्यास त्यांनी दुसरा विवाह करून घ्यावा. तलाक ही काही चेष्टा किवा मस्करी नाही. त्याकडे जर एखाद्याने गंभीरपणे पाहिले नाही, तर तो दोष त्या व्यक्तीचा असेल, नियमाचा दोष नाही.
अगदी अपरिहार्य व अनिवार्य स्थितीमध्येच तलाकची परवानगी दिलेली आहे. त्याच्या दुष्परिणामांकडे पाहाता पुरुषाला तलाकपासून रोखण्यात आलेले आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद(स.) यांचे फर्मान आहे,
‘कोणीही ‘मोमीन’ पतीने आपल्या पत्नीचा तिरस्कार करू नये. तिचा एखादा गुण किवा सवय त्याला पसंत नसेल, तर तिचा दुसरा एखादा गुण अथवा सवय त्याला आवडू शकते.’’- मुस्लिम
पती-पत्नींनी तलाक देण्याचा निश्चयच केला असेल तर इस्लामने अशी पद्धत ठरवून दिली आहे की तलाकचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नवर्याकडील एक-दोन माणसे व पत्नीकडील एकदोन माणसे एकत्र बसून बोलणी करावी आणि असा एखादा मार्ग शोधून काढावा, ज्यामुळे दोघातील मिलाफ वाढेल, त्यांची मने पुनः जुळतील आणि तलाक देण्याची वेळच येणार नाही. इतकेच करून जर समझोता होऊच शकला नाही आणि तलाकशिवाय दुसरा पर्यायच नसेल त्यावेळी पतीने एकच वेळ तलाक द्यावा व म्हणावे ‘मी तुला तलाक दिला आहे,’ दोन न्यायनिष्ठ साक्षीदारासमक्ष तलाक द्यायला हवा. ‘तुहर’(मासिक पाळी संपल्यानंतरच्या काळातील स्थितीत) च्या अवस्थेत तलाक दिला जावा, ज्यात पतीने पत्नीशी शैय्यासोबत केलेली नसावी. तलाकनंतर त्या स्त्रीला ‘इद्दत’ चा काळ म्हणजे एक ठराविक कालावधी काढावा लागेल. त्या मुदतीत पुरुष पुनः तिचा अंगिकार करू शकतो. तीचा स्वीकार करण्यास पुरुष जर राजी नसेल, तर स्त्री पूर्णपणे विभक्त होईल. त्यांची इच्छा असल्यास ते पुनः निकाह करू शकतात.
इस्लाममध्ये तलाकची हीच अचूक पद्धत आहे. त्याचा विचार करायला पुरुषाला पुरेसा अवधी मिळतो. स्त्रीच जर पुरुषापासूनच विभक्त होऊ इच्छित असेल, तर तिला पुरुषाकडून ‘खुलअ’(पत्नीने मागितलेला घटस्फोट) करून घेऊ शकते.

अर्थ तंत्राशिवाय सामाजिक जीवनाच्या अन्य क्षेत्रांची प्रगतीसुद्धा नैतिक मूल्यांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, मानव वेग पारस्पारिक संबंधांचा पाया जोपर्यंत आपसातील प्रेम आणि सहयोगावर आधारित नसेल तर प्रत्येक प्रगती प्रकोप बनून जाते आणि सुधारणेचे प्रत्येक पाऊल उपद्रवाचे कारण बनून जाते. पारिवारिक जीवन सुधारासाठी जे पाऊल कठोर कायद्याच्या रूपात उचलले जाते, ते न्यायाऐवजी स्वतः हा अन्यायाचा बहाणा बनत असतो.
स्त्री शतकांपासून शक्तीहीन राहिली आहे. तिला ती साधनेसुद्धा उपलब्ध नाहीत जी पुरुषांना आज प्राप्त आहेत. यासाठी ती आपल्या अधिकारांसाठी फक्त हातपाय मारीत आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहचणे तिला फार दुष्कर झाले आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या समस्त दाव्यांच्या अस्तिवासहित भारतीय महिला आज ही शक्तीहीन आणि अत्याचारपीडित आहे. तिचे प्रदत्त अधिकार त्याच वेळेस परिणामकारक होऊ शकते. जोपर्यंत असे नैतिक वातावरण उत्पन्न केले जाईल की ज्यात तिला पुरुषांचे अधीन समजले जाणार नाही, प्रेम आणि परस्पर सहयोगाची भावना वाढीस लागेल.
पारिवारिक जीवनाच्या सुरक्षेसाठी ख्रिश्चन समाजात एका काळापर्यंत घटस्फोटास जवळजवळ असंभव बनवून टाकले होते. परंतु यामुळे सामाजिक सुदृढता तर काय येईल, अत्याचार आणि शोषणाचे विभिन्न मार्ग विस्तृत झाले. पती-पत्नी स्वाभाविक संबंधांच्या जागी चुकीच्या आणि अनैतिक पध्दती स्वीकारल्या गेल्या.
भारतात पतीच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी घटस्फोटानंतर पोटगीची जबाबदारी लागू करून दिली गेली. परंतु संख्या दाखविते की घटस्फोटानंतर पोटगी प्राप्त करण्यासाठी शक्तीहीन आणि असहाय स्त्रीला न्यायालयांचे इतक्या फेर्यामाराव्या लागतात की अंततः अधिकतर महिला नाराज होऊन जातात.
राजनैतिक जीवनात दलित वर्गांसाठी जी पाऊले उचलली गेली आहेत, ती बहुआयामी आहेत, परंतु हे असूनसुद्धा त्यांचे अत्याचार आणि दमन समाप्त झालेले नाही. त्यांच्या स्त्रियांसोबत बलात्कार आणि अत्याचारांच्या घटना दररोज वर्तमानपत्रातून येत असतात. त्यांच्या वस्त्या आजही उजाडल्या जातात, त्यांची प्राण-संपत्ती नष्ट केली जाते. आज यांना समाजात हीन दृष्टीने पाहिले जात असते आणि त्यांना व्यवहारातः आजसुद्धा समानतेचे स्थान समाजात प्राप्त होऊ शकले नाही. परंतु विडंबना आहे की इतर व दलीत नेता त्यांच्या पाठीवर स्वार होऊन त्यांच्या वाईट परिस्थितीची खिल्ली उडवीतात. आपले जग सुधारण्यासाठी त्या शक्तीहीनांच्या वाईट परिस्थितीला राजनीतिक शक्तीचे माध्यम बनवित असतात.
व्यापक नैतिक पतन
हे नैतिक पतन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभावी आहे. याचा बिघाड इतका व्यापक आणि याचा अंधार इतका गडद आहे की सर्वसामान्यांशिवाय विशिष्ट जनसुद्धा त्रस्त आहेत. सामाजिक जीवनात चारित्रिक आचरणाचा जो विकार उत्पन्न आहे. त्याच्या व्याख्येची आवश्यकता नाही. परंतु काही महत्त्वपूर्ण नैतिक विकार असे आहेत, ज्यांचा उल्लेख करणे प्रासंगिक ठरेल.
सामाजिक विकृती
सर्वांत प्रमुख विकृती आपल्या समाजात मानव-जीवन आणि मानसन्मानाचे हनन आहे. हिसा आणि उपद्रव आहे. ज्या कोणा जवळ शक्ती आणि संसाधने आहेत, तो आपल्या उद्देशाला प्राप्त करण्यसाठी हिसेला कायद्यावर वरिष्ठता देत असतो. आधी हे काम ते लोक करीत असत, ज्यांचा पेशा अपराध आणि मादक पदार्थ होता आणि त्यांचे समाजात कोणतेही स्थान नव्हते. परंतु आता ही रूची त्या लोकांमध्येसुद्धा निर्माण होत आहे जे स्वतःला सुसभ्य आणि शिक्षित म्हणत असतात. इथपर्यंत की किशोरवयीन मुले आणि मुलींमध्येसुद्धा हिसा आणि अपराधाची वृत्ती गतीने पसरत आहे. नेतागण आणि त्यांचे सहयोगीसुद्धा दुस्साहसाने हत्या करतात आणि करवितात, ज्यांचा पुरावा निवडणुकीतील हिसा आहे. अपराध(गुन्हेगारी) आणि हिसेला आपल्या समाजात आता सन्मान मिळायला लागलेला आहे. याचे एक रुप हे आहे की विभिन्न राजनैतिक दल निवडणुकांच्या वेळी अपराधींना आणि हत्यार्यांना केवळ तिकिट देतात असे नाही तर त्यांना मंत्रीपदावर आसीनसुद्धा करून टाकत असतात.
अहवालानुसार, उत्तर प्रदेशांच्या मंत्रीमंडळात अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यावर हत्या आणि दंग्यांचे अनेक दावे(प्रकरणे) चालत आहेत. हत्या आणि दंगे आता धार्मिक उपद्रवाचेसुद्धा कारण बनले आहेत. जसे स्टेन्स आणि त्यांच्या दोन अबोध मुलांची हत्या, आताच एका ख्रिश्चन पादरीची हत्या, सांप्रदायिक दंग्यांच्या स्थळांवर आणि बाबरी मस्जिद विध्वंसानंतर मुंबई आणि अन्य स्थळांचे दंगे या सर्व घटना मानव जीवनाच्या अवमाननेचे ठोस पुरावे आहेत.
वैवाहिक जीवनात हत्येच्या घटना आता सार्वत्रिक होत चालल्या आहेत. यांच्यामधून काही प्रसारमाध्यमांमुळे समोर येत असतात. आता काही वर्षांआधी एका राजनैतिक पक्षाचे युवा नेता सुशील शर्माने आपली पत्नी नैना साहनीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून तंदुरभट्टीत फेकून दिले. या जघन्य अपराधासाठी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समाजात हिसा आणि हत्येची शिकार अधिकतर अत्याचारपीडित महिला होत आहेत. कितीतरी दलित महिला अशा आहेत, ज्यांची इज्जतअबू लुटल्यानंतर त्यांची हत्या करून टाकण्यात आली.
मानव जीवनाच्या अवमाननेचा सर्वांत दुःखदायक भाग हा आहे की आता हत्येसारखा घोर अपराध आपल्या भौतिक आणि राजनैतिक हितांच्या पूर्तीसाठीचा सार्वत्रिक मार्ग समजून घेतला गेलेला आहे. धन संपत्ती आदिसाठी हत्या पूर्वीसुद्धा होत होत्या परंतु ही प्रवृत्ती इतकी प्रगती करून गेलेली आहे की विचारांचे मतभेदसुद्धा याच प्रकारे हत्या करून सोडविले जात असतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दिल्लीमध्ये दोन युवा मित्र कोणत्या मुद्दयावर चर्चा करीत होते. की एकाने दुसर्याची हत्या करून टाकली. रेल्वेमध्ये बैठकीचे भांडण आणि चित्रपटाचे तिकीट घेण्यावर भांडणसुद्धा कधीकधी हत्येचे कारण बनून जात असतात.(हिन्दुस्थान २७ जानेवारी २००४(दिल्ली) अनुसारष्ट प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतण्या महेंद्र कुमारांचे पुत्र मनीष तथा अन्य दोन युवकांना २४-१-०४ च्या सायंकाळी विलासपूरहून दिल्ली जाणार्या एक ट्रेनमधून कोसीजवळ चालत्या गाडीतून काही लोकांनी काही विवादावरून खाली फेकून दिले. या दुर्घटनेवरूनसुद्धा नैतिक संकटाचा अनुमान लावला जाऊ शकतो.)

उम्मुद्दरदा अल हुजैमा
(माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते. त्यांच्यापैकी ज्या थोरल्या होत्या त्या (महिला) सहाबी होत्या आणि धाकट्या सहाबींच्या शिष्या. थोरल्या पत्नीचे नाव खैरा व धाकट्या पत्नीचे हुजैमा होते. तहजीबुल असमाइवल्लुगात - २ : ३५९-३६०.) उस्मान बिन अबुल आतिका आणि उम्मे जाबिर म्हणतात की, उम्मे दरदांचे संगोपन अबू दरदांनी केले होते. त्या लहानशा होत्या तेव्हा बुर्नस (लांब सदरा, ज्याने डोकेदेखील झाकले जाते.) परिधान करून माननीय अबू दरदांच्या समवेत येत-जात असत. पुरुषांच्य रांगेत नमाज अदा करण्यासाठी उभ्या राहत असत. पवित्र कुरआनचे पठन करणाऱ्या मंडळीत बसत. जेव्हा वयात आल्या तेव्हा माननीय अबू दरदां त्यांना म्हणाले की, ‘‘तुम्ही स्त्रियांच्या रांगेत सामील व्हा.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६६)
त्यांच्या ज्ञानाच्या आवडीची कल्पना औफ बिन अब्दुल्लाह यांच्या एका निवेदनावरून येते. ते म्हणतात, ‘‘आम्ही माननीय उम्मे दरदांच्या जवळ बसलो होतो.
जेव्हा बरीच वेळ झाली, तेव्हा आम्ही सांगितले की, आम्ही आपल्याला खूप त्रास दिला. आपल्याला कंटाळा आला असेल नाही का ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘माझा प्रत्येक कामात अल्लाहची उपासना हा उद्देश्य राहिलेला आहे. परंतु ज्ञानी मंडळींच्या संगतीत बसल्याने व त्यांच्याशी चर्चा व संभाषण केल्याने जितके संतोष व समाधान प्राप्त होते तितके कोणत्याही अन्य गोष्टीने प्राप्त होत नाही.’’ मग त्या पडद्याआड गेल्या आणि एका व्यक्तीला कुरआनचे पठन करावयास सांगितले. त्याने ‘व लकद वस्सलना लहुमुल कौलु’ या आयतींचे पठन केले. त्या म्हणाल्या, ‘‘सर्वश्रेष्ठ ज्ञान तर अल्लाहला ओळखणे होय.’’
अबु रब्बह त्यांच्याजवळ शिकत होते. ते म्हणतात, एके दिवशी पाटीवर त्यांनी असे लिहिले -
‘‘बालपणातच विवेक व शहाणपण शिका. मोठे होऊन इतरांना शिकवाल.’’
‘‘प्रत्येक शेतकरी जे काही त्याने चांगले किवा वाईट पेरले आहे ते तो अवश्य कापील.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०-३६१)
त्यांनी माननीय अबू दरदा, सलमान फारसी (र), फुजाला बिन उबैद (र), अबू हुरैरा (र), कअब बिन आसिम (र) आणि आयेशा (र) कडून हदीसचे कथन केले आहे. हाफज इब्ने हजर (र) यांनी त्यांच्याकडून हदीस ऐकणारे व कथन करणाऱ्या १९ धर्मपरायण व्यक्तींच्या उल्लेखानंतर लिहिले आहे की, त्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीसुद्धा त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६५-४६६)
इमाम नबवींचे कथन आहे -
‘‘त्यांच्याकडून महान ताबिईनच्या एका मोठ्या संख्येने हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०)
इमाम जहबी (र) यांनी त्यांचा उल्लेख या शब्दांत केला आहे -
‘‘त्या धर्मशास्त्रपंडित, विद्वान, उपासिका, रूपवान, लावण्यवती, विस्तृत ज्ञानी आणि मोठ्या बुद्धिमान होत्या.’’ (तज्किरतुल हुफ्फाज - १ : ५०)
आयेशा बिन्ते तलहा
यांच्या माता, माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री उम्मे कुलसूम होत्या. त्यांनी माननीय आयेशा (र) द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्याकडून त्यांचे पुत्र तलहा बिन अब्दुल्लाह, हबीब बिन अम्र, त्यांचे पुतणे तला बिन यहया, एक अन्य पुतणे मुआबिया बिन इसहाक, मूसाबिन उबैदुल्लाह, मिनहाल बिन अम्र, अता बिन अबी रिबाह आणि अम्र बिन सईद यांनी कथन केली आहेत.
इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात की, त्या विश्वसनीय व पुराव्यास पात्र आहेत. अजली व इब्ने हिब्बान यांनीसुद्धा त्यांची विश्वसनीय विद्वानांस गणना केलेली आहे. अबू जुआर् दमिश्कीसारख्या हदीसतज्ज्ञांचे म्हटले आहे -
‘‘लोकांनी त्यांच्या ज्ञान, प्रतिष्ठा, विनम्रता व सदाचारामुळे त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६ - ४३७)
आयेशा बिन्ते साद बिन अबी वक्कास (र)
यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी सहा पवित्र पत्नींना पाहिले होते. त्या म्हणतात, ‘‘बालपणात मी जेव्हा त्यांच्यापैकी कोणाकडे जात असे तेव्हा त्या मला मांडीवर बसवीत असत आणि उत्कर्षाचा आशीर्वाद देत असत.’’ असे दिसते की लोकांत त्यांच्याविषयी फार श्रद्धा होती. हबीब बिन मर्जूक म्हणतात की, ‘‘मी मस्जिदच्या बाहेर एका महिलेला पाहिले. त्यांच्याबरोबर आणखी काही स्त्रिया होत्या आणि दिवा जळत होता. चौकशी केल्यावर असे कळले की त्या माननीय साद बिन अबी वक्कास यांच्या सुकन्या आयेशा (र) आहेत.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४६७-४६८)
त्यांनी आपले वडील माननीय साद बिन अबी वक्कास (र) आणि उम्मे जर द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्या उल्लेखावरून कथन करणाऱ्यांत जईद बिन अब्दुर्रहमान, अय्यूब सुख्तियानी, हकम बिन उतैबा, खुजैमा, अबुज्जिनाद, मुहाजिर बिन मिस्मार, उबैदा बिन्ते नाबिल आणि इमाम मालिकसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. खलील म्हणतात, ‘‘इमाम मालिक (र) यांनी त्यांच्याशिवाय कोणत्याही अन्य महिलेकडून कथन केले नाही. इब्ने हिब्बान यांनी ‘सिकात’ नामक पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आहे. ‘आजली’ यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय मानले आहे. हिजरी सन ११७ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६)
हफ्सा बिन्ते सीरीन
बारा वर्षांच्या वयात त्यांनी पवित्र कुरआनचे शिक्षण पूर्ण केले. यहया बिन सीरीन, अनस बिन मालिक (र), उम्मे अतिया अन्सारिया (र), उम्मुर्राइह, अबुल आलिया, अबू जुबियान, रबीअ बिन जयाद आणि माननीय हसन बसरी यांच्या मातोश्री खीरह यांच्याकडून त्यांनी हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून मुहम्मद बिन सीरीन, कतादा, आसिमुल अहवल, अयुब सख्तयानी, खालिदुल खुदाअ, इब्ने औन, हिश्शाम बिन हयानसारख्या विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे.
इमाम इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात,
‘‘त्या विश्वसनीय व युक्तिपूर्ण आहेत.’’ इब्ने हिब्बाननेसुद्धा त्यांना ‘सिकात’ अर्थात - विश्वसनीय - विद्वानांच्या पंक्तीत बसविले आहे.
अयास बिन मुआविया म्हणतात,‘‘मी कोणत्याही अशा व्यक्तीस पाहिले नाही जिला हफ्सा बिन्ते सीरीनपेक्षा श्रेष्ठ म्हणावे.’’ हिजरी सन १०१ मध्ये त्या स्वर्गवासी झाल्या. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४०९ - ४१०)
अमरा बिन्ते अब्दुर्रहमान
माननीय आयेशा (र) यांनी त्यांचे पालनपोषण केले होते आणि त्यांच्या खास शिष्यांपैकी होत्या. हिजरी सन ९८ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. त्यांनी माननीय आयेशा (र) यांच्याशिवाय उम्मे हिशाम बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते सहल आणि माननीय उम्मे हबीबा, हिम्ना बिन्ते जहशकडूनसुद्धा हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून तत्कालीन महान विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे. त्या मंडळींत इमाम जुहरी, अब्दुल्लाह बिन अबू बकर बिन हज्म, यहया बिन सईद अन्सारी, उर्वा बिन जुबैर, सुलैमान बिन यसार आणि उमरु बिन दीनार यांसारख्या इमामांचा (धर्माचार्यांचा) समावेश होता.
त्यांच्या ज्ञानविषयक महानतेची कल्पना त्या मतावरून येते जी मोठमोठ्या मुहद्दिसीननी (महान हदीसतज्ज्ञ) त्यांच्यासंबंधी व्यक्त केली आहेत. इब्ने मुईन म्हणतात,
‘‘त्या विश्वसनीय व सयुक्तिक आहेत.’’ (ही हदीसच्या कलेची एक परिभाषा आहे. अशा प्रकारच्या परिभाषेचा पूर्ण अर्थ भाषांतराने देणे शक्य नाही.)
अहमद बिन मुहम्मद म्हणतात की, मी इब्ने मुईन यांना फारच चांगल्या शब्दांत त्यांचा उल्लेख करताना ऐकले आहे. ते म्हणाले की, माननीय आयेशाकडून कथन करणारे भरवशास योग्य व विश्वसनीय लोकांत त्यांची गणना होते. इब्ने हिब्बान आणि अजली यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय म्हटले आहे. इब्ने हिब्बान म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्या हदीस कथनाचे सर्वांत अधिक ज्ञान त्यांनाच होते. माननीय सुफियान सौरी म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्याकडून कथन करणाऱ्यांत अमरा बिन्ते अब्दुर्रहमान, कासिम बिन मुहम्मद आणि उर्वा बिन जुबैर सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत. अब्दुर्रहमान बिन कासिम यांच्यासंबंधी उल्लेख आहे की, ते माननीय आयेशा (र) यांची कथने त्यांना विचारीत असत. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी मुहम्मद बिन अब्दुर्रहमान यांना लिहून कळविले की, माननीय आयेशा (र) यांच्या कथनांचे त्यांच्यापेक्षा अधिक ज्ञान असणारा कोणीही नाही. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३८-४३९)
इब्ने साद म्हणतात, ‘‘त्या विद्वान स्त्री होत्या. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी अबू बकर बिन मुहम्मद बिन हज्म यांना त्यांच्या हदीसी लिहिण्याची आज्ञा दिली होती.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४८०)

– सीमा देशपांडे
मुक्ती (निजात) म्हणजे मनुष्याची सुटका किंवा नरकापासून संरक्षण म्हणून परिभाषित करतो. ज्याला हिंदूमधे मुक्ती व इस्लाममधे निजात संबोधतात.
  आज मनुष्य हा मनुष्य राहिला नसून भौतिकतेचे एक चालते-फिरते यंत्रच झाले आहे. त्याची सर्व धावपळ ही आपल्या स्वैर इच्छांची पूर्तता आणि भौतिकवाद व चंगळवादापर्यंत मार्गाचा अवलंब करुन जीवनातील भोगवस्तू प्राप्त करण्यासाठी पिसाट लांडग्याप्रमाणे सैरावैरा धावतच सुटला आहे. पण मृत्यू म्हटले की त्याचा थरकाप उठतो आणि तो सतत ह्याच संभ्रमात असतो की त्याला वाटत की दुसऱ्याला मृत्यू येऊ शकतो पण मला नाही. त्यामुळे त्याला मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची साधी आठवणसुद्धा होत नाही. तो हे पण विसरु लागला आहे की ईश्वरच मनुष्याला जन्म देतो, तो या जगात वावरताना ईश्वरच त्याची परीक्षा घेतो आणि ईश्वरच त्याला मृत्यू पण देतो.  मग मृत्यू हे अटळ सत्य आहे तर मृत्यूनंतर काय? मनुष्याच्या परीक्षेचा निकाल कुठे लागेल? मनुष्याला मुक्ती कशी मिळेल? चला तर प्रत्येक धर्माचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे... पुनर्जन्म हा समज की गैरसमज काही लोक हे मानतात की हेच जीवन मूळ व अंतिम असून मृत्यू जीवनाचा अंत होय. पण... हेच अंतिम जीवन मानणारे लोक इतकेच सांगू शकतात की आम्हाला अजिबात हे माहीत नाही की मृत्यूपश्चात जीवन आहे की नाही! मात्र तो छातीठोकपणे असे मुळीच सांगू शकत नाही, आम्हाला माहीत आहे की मृत्यूपश्चात जीवनच नाही.
काही लोकाना वाटते की मृत्यूनंतर परलोक जीवन आहे आणि त्यात स्वर्गप्राप्तीसाठी अशी श्रद्धा ठेवावी की समस्त मानवजात ही जन्मजात गुन्हेगार व पापी आहे. मात्र मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित्त स्वत: ईश्वरपुत्राने सुळावर आपल्या प्राणाचा बळी देऊन केले आणि तिला पापातून मुक्त केले. म्हणून या ईश्वरपुत्रावर श्रद्धा ठेवावी, तर निश्चितच स्वर्गप्राप्ती होईल. पण... ईश्वर निराकार असताना ईश्वर पुत्र कसा धरतीवर येईल बर? मग  तो सर्व मानवजीतीला पाप मुक्त करुन गेला तर त्याना धर्माची गरज काय? आणि जनावर व मनुष्यात काय असमानता आढळून येईल जेणेकरुन फक्त मनुष्यालाच पारलौकिक जीवन लाभेल.
काही लोकाना वाटते की मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नव्हे! मनुष्य या ऐहिक जीवनातील चांगल्या व वाईट कर्माचे अथवा पाप-पुण्याचे फळ भोगण्यासाठी वारंवार या सृष्टीत जन्म घेतो. तो कधी कृमी-कीटक तर कधी पशु-पक्षी, कधी झाडे-झुडपे आणि कधी तो ८४ लक्ष योनीतून भ्रमण केल्यानंतर मनुष्य योनीत जन्म घेतो. पण... माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याचा पुनर्जन्म होत असेल तर हे समजणे आवश्यक आहे ईश्वराने कुठल्या ग्रंथात हे नियम नमूद केले आहेत का की कोणत्या पुण्यकर्माच्या पुरस्कारापोटी कोणाचा जन्म (पशु-पक्षी, कृमी-कीटक, वनस्पती) मिळतो आणि कोणत्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी कोणता जन्म मिळतो? तसेच, आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने किवा शास्त्रज्ञाने मनुष्याचे मृत शरीराची चाचणी करुन हे सांगू शकले का की तो पूर्वी कुठल्या रुपात जन्मला होता किंवा पुढे कोणत्या रुपात जन्म घेणार आहे.  
एक विचारसरणी अशीदेखील आहे की ऐहिक जीवन प्रत्येक मनुष्यासाठी परीक्षा आहे त्यासाठी आपल्या एकमेव निर्मात्याने (ईश्वर) मानवास बुद्धी व विवेकसामथ्र्य दिले आहे. त्याद्वारे मानवाने मृत्यूनंतरचा (स्वर्ग किंवा नरक) विचार करुन ऐहिक जीवन व्यतीत करावे. म्हणजेच जर मानवाने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली आणि त्याच्या नियमावालीनुसार जीवन व्यतीत केले तर त्याला स्वर्गप्राप्ती होईल आणि याउलट एका ईश्वराला न मानता नियमाचे उल्लंघन केले तर त्याला नरकप्राप्ती होईल. पण... या चारपैकी चौथी विचारसरणी सत्याच्या खूप जवळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. ती सांगत आहे की मृत्यू म्हणजे आपल्या जीवनाचा अंत नाही; आपल्या वास्तविक जीवनाची ही सुरुवात आहे. कारण आपल्या भावी नशिबाचा(स्वर्ग-नरक) आपल्या सध्याच्या मानवी जीवन कामकाजाच्या आधारावर निर्णय घेतला जात आहे, आपण परलोकात स्वत:साठी योग्य स्थान (स्वर्ग) मिळवण्यासाठी पृथ्वीवरील एका ईश्वरावर श्रद्धा व  ईशनियमावलीनुसार जीवन व्यतीत करू शकतो, किंवा आपण त्यांना दूर पेâवूâन देऊन आपल्यास नरकात शिक्षा म्हणून दोषी ठरवू शकतो. 
यावरुन हे नक्कीच लक्षात येते की, मृत्यू अंतिम नाही आहे परंतु ते या जगाच्या जीवनातून नंतरच्या जीवनाचे संक्रमण आहे. ज्याला परलोक जीवन म्हणतात. 
परलोक जीवन हे नंतरच्या जीवनाच्या प्रवेशद्वारासारखे आहे आणि स्वर्ग किंवा नरक प्राप्त करणे हे ईश्वराच्या (अल्लाह) एकत्वामध्ये शुद्ध विश्वास आणि ईश्वराची (अल्लाह) मंजुरी ही ह्या जीवनात आपली आचारसंहिता व वर्तणूक ह्यावर अवलंबून आहे. 
‘‘सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’ (कुरआन ३:१८५)
मनुष्याला परलोकाची गरज का?
जसे... ऐहिक जीवनात एकाने जर एकाचा खून केला तरी एकदाच फाशीची शिक्षा होईल आणि दहा जणांचा खून केले तरी एकदाच शिक्षा होईल पण त्याला नऊ जणांच्या खुनाची शिक्षा कुठे मिळेल?
माणसाचे विचार, क्रिया व हालचाली, आवाज सुरक्षित ठेवण्याचे कारण काय? 
चोराला शिक्षा मिळाली तर त्याचे दु:ख घरच्यांना होते मग फक्त चोरालाच शिक्षा कुठे मिळणार? 
प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया होत असते, जसे एका व्यक्तीने दुसऱ्याला मारले तर तो जखमी होतो, उपाशी व्यक्तीने जेवण केले तर त्याची भूक मिटते, रोगीने औषध पिले तर बरा होतो. मात्र काही क्रिया अशादेखील असतात ज्यांची प्रतिक्रिया दिसून येत नाही जसे आपण एका आंधळ्याला मार्ग दाखविला, स्वत: उपाशी राहून भुकेल्याला भोजन दिले. गरजुंना दान दिले. मग अशा कामांच्या प्रतिक्रिया का दिसून येत नाहीत?
दुष्कर्म करणारा श्रीमंत माणूस गरीब होत नाही व सत्कर्म करणारा गरीब माणूस श्रीमंत होत नाही असे का? 
मग.. हा प्रत्येक मनुष्यासाठी परिपूर्ण न्याय आहे का? आणि हा न्याय ऐहिक जीवनात मिळणे शक्य आहे का? 
मनुष्याच्या कर्माचा न्याय कुठे होतो?
सर्वच नाती अथवा सबंधांचे खास केंद्र असते. जसे, डॉक्टर-पेशंट भेटण्याचे ठिकाण दवाखाना, वकील अर्जदाराच्या भेटण्याचे ठिकाण न्यायालय, शिक्षक-विद्याथ्र्याचे ठिकाण शाळा.. तसे ईश्वर-मानवाचे भेटण्याचे ठिकाण कोणते? ते ठिकाण दुसरे कोणते नसून परलोकच होय.
कुरआन काय सांगतो..
आणि हे ऐहिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते. (कुरआन २९:६४)
त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही..(कुरआन २:२८१)
जन्म-मृत्यू प्रवास
१. पवित्र जग जेथे ईश्वराने सर्व आत्मे बनविले.
जेव्हा तुझ्या पालनकत्र्याने दूतांना सांगितले, ङ्गमी मातीपासून एक मानव बनविला आहे, मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा! (कुरआन ३८:७१-७२) 
२. गर्भाशय जेथे आत्मा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो. 
जसे सर्वानाच माहीती आहे की आपण ऐहिक जीवनाचा प्रवास आपल्या मातेच्या गर्भाशयातून सुरू करतो. जेव्हा स्त्री गर्भवती राहली की घरचे व स्वत: ती पण मुलगाच पाहिजे म्हणून आतोनात नवस, ज्योतिष्य, डॉक्टरकडे वेगवेगळे उपचार यासारखे विविध उपाय करत राहतात. आणि स्वत:ची इच्छा पूर्ण झाली नाही की मात्र स्त्रीलाच दोष देतात. तसेच काहीजण १२० दिवसानंतर चाचणी करुन तपासतात मुलगा की मुलगी  आणि मुलगी असेन तर गर्भपात करतात. पण सत्य हे आहे की आईच्या गर्भात काय आहे हे फक्त ईश्वरच जाणतो.
तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा आकार हवा तसा घडवितो, त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही. (कुरआन ३:६) 
३. ऐहिक जीवन 
जिथे आपण सर्व मर्यादित वेळेसाठी जगतो. हे जीवन आपले परीक्षाकाळ आहे. ईश्वर आपल्याला इथे अजमावून पाहणार आहे की आपण ईशमार्गाने जीवन व्यतीत केले की भौतिक जीवनाप्रमाणे...  
ह्यावर कुराआन काय सांगतो:
ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे. आणि तो जबरदस्तही आहे आणि क्षमाशीलदेखील(कुरआन ६७:२) 
प्रत्येक मनुष्य फक्त स्वैर इच्छांची पूर्तता करणे हेच जीवनाचे ध्येय घेऊन बसलाय पण हे कितपत त्याच्या कामाला येईल व ह्या भोगवस्तूंचा कितपत आनंद लुटेन? 
आपला हा समज असतो की समाजाला लपून काही वाईट कृत्य (अनैतिक संबंध, लाच खाणे, गरजुंचे पैसे लुबाडणे, चोरी करणे, खोटे बोलणे, मानवांची हत्या करणे इत्यादी) केले तर काहीच फरक पडत नाही. असे केल्याने ते समाजापासून स्वत:ला वाचवू शकतील पण ईश्वरापासून कसे वाचतील?
४. मृत्यू
 मृत्यू हे अंतिम जीवन नसून ते फक्त ह्या जीवनातुन पुढील जीवनात संक्रमण आहे. ह्यावर कुराआन काय सांगतो:
प्रत्येक जीवितास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रुजू व्हायचे आहे. (कुरआन २१:३५) 
मग मृत्यूनंतर काय?
५. बरजख (पित्रलोक)
हा टप्पा म्हणजे मृयूनंतर व पुनरुत्थानाच्या आधीचा कालावधी. बरजखमधील पहिले ठिकाण कबर आहे. कबरमधे आस्तिकाच्या मृत शरीराचा सुगंध येतो तर काफिर (अविश्वासु) चा दुर्गंध येतो. जेव्हा आस्तिकचा आत्मा जीवित केला जातो तेव्हा तो सहजपणे बाहेर येतो पण काफिर (अविश्वासु) चा आत्मा बाहेर येण्यास प्रचंड वेदना होतात जणू काही त्याचे जीवितपणे आतडे ओढून काढत आहे.
तेथे मृत व्यक्तीचा आत्मा दोन देवदूतांसह (मुनकिर व नाकिर) भेटतो. देवदूत आस्तिकाना (मोमिन/विश्वासु) रेशीम वस्त्रे परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा तो आत्मा ईश्वराची स्तुती करत येतो. देवदूत काफिर (अविश्वासु) ला  अंगावर काळी रग परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा त्याला शाप देतात. 
मग प्रत्येक मनुष्याला त्याच्या श्रद्धेबद्दल प्रश्नावली करतात. आणि इतर प्रश्न पुनरुत्थानाच्या दिवशी सोडले जातात. 
मात्र काफिरसाठी (अविश्वासु) स्वर्गाचे दार उघडले जाणार नाही. उलट त्यासाठी नरकचे दार उघडले जाईल आणि न्यायाच्या दिवसापर्यंत त्याला नरकाच्या शिक्षाला सामोरे जावे लागेल.असे का?
बरजखचे प्रकार: 
१. प्रथम गट: अविश्वासु व अत्याचारी जे अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानाच्या दिवसावर ऐहिक जीवनावर विशास ठेवत नाहीत. ते स्वत:ला मुक्त समजले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले आणि कोणत्याही वाईट गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबविले नाही व दुसऱ्याला ते करण्यापासून परावृत्त केले. त्यांना बरजखांममध्ये खूप कठीण जीवन मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दंड दिला जाईल. परंतु ते नरकाच्या शिक्षांच्या तुलनेत काहीच नाही.
२. दुसरा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला होता आणि ज्यांनी त्यांच्या धार्मिक कर्तव्यांचा अवलंब केला आणि प्रतिबंधित कृत्यांपासून निर्भय केला. त्यांना बरजखांमधे एक चांगले जीवन मिळेल आणि त्यांना आशीर्वाद दिला जाईल, जे नंदनवनात त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांचे एक नमुना असेल.
३. तिसरे गट: जे लोक सर्वशक्तिमान अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवत होते आणि त्यांच्या धार्मिक कर्तव्ये पार पाडतात; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु ते मरणापर्यंत त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि माफी मागितली. त्यांना बरजखमध्येही शिक्षा होणार नाही.
४. चौथा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला आणि त्यांची धार्मिक कर्तव्ये पार पाडली; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून आणि दैवी क्षमा मिळविण्याशिवाय मरण पावले. ते त्यांच्या पापांप्रमाणेच बरजखमध्ये शिक्षा करतील आणि त्याद्वारे ते शुध्द होतील. न्यायाच्या दिवशी ते पवित्र प्रेषित आणि पवित्र इमामांच्या (त्याप्रमाणे) मध्यस्थी घेऊन पश्चात्ताप करतील आणि मग त्यांच्या कर्मांच्या हिशोबाप्रमाणे ते नंदनवनात पाठविले जातील.
विश्वासू (मोमिन) चा असा गैरसमज आहे की त्याने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली की काही केल्या तो स्वर्गात जाणार... नाही कदापि नाही. जोपर्यंत त्याचे कृत्य आणि श्रद्धा ईश्वराच्या नियमावलीची पूर्तता करत नाही ( ईमान, कुरआन वाचणे व त्याला समजून दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी करणे, लोकांशी भेदभाव न करता करुणामय वर्तणूक ठेवणे आणि लोकाना हक्क, संयम याचे उपदेश देऊन एका ईश्वराकडे आमंत्रण देणे) आणि चुकलेच तर त्याची जाणीव होऊन मरण्यापूर्वी ईश्वराची माफी मागत नाही तोपर्यंत कोणीही स्वत:चे नरकापासून संरक्षण करु शकत नाही मग तो विश्वासू (मोमिन) असो वा अविश्वासू (काफिर).
६ प्रलय (कयामत)
कयामत म्हणजे हे जग बुडणे जेथे आपण आज निवांत जगत आहोत. कयामतचे चिन्हे म्हणजे एक रणशिंग फुंकणे आहे. कुरआननुसार, जग बुडणाच्या शेवटी व कयामत घटनेपूर्वी, रणशिंग दोनदा उडेल आणि हे महत्वाचे प्रसंग म्हणजे कयामत ची निशाणी जवळ आहे.
रणशिंग कसे दोनदा उडेल? प्रथम जगातील सर्व लोक मरतील आणि बरजखच्या जगात प्रवेश करतील. आणि दुसऱ्यांदा बरजखमधील सर्वजण कयामतसाठी पुन्हा जिवित केले जातील.
प्रलयाच्या दिवशी पूर्ण सौर यंत्रणा विस्कळीत होईल.
७ परलोक जीवन  (न्यायाचा दिवस)
पुनरुत्थनाचा दिवस हा एक मनुष्याची नवीन जीवनाची सुरुवात होईल ज्याचा कधीही अंत होणार नाही. हा दिवस न्यायाचा दिवस आहे. 
‘‘हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल.’’ (कुरआन ८२:१९)
त्या दिवशी, सर्व लोक जीवित होतील व त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आणि कर्मांनुसार त्यांना ईश्वराकडून बक्षीस देण्यात येईल.
सर्व ईश्वरासमोर नमस्तक होऊन एकत्र उभे राहतील, तेव्हा ईश्वर (अल्लाह) देवदूतांना आदेश देईल की प्रत्येक मनुष्याच्या कर्माचे पुस्तक उघडा. मग देवदूत पुस्तक उघडतील जेथे मनुष्याच्या ऐहिक जीवनाच्या कर्माची नोंदणी असेल ज्याला अरबीमधे किरामन कतिबीन (सन्मानीय निरीक्षक) असे म्हणतात.
स्वर्गामधील फळ हे सत्कर्म करणार्या व ईशभीरू लोकांचे शांतीचे स्थळ आहे. कुरआनात ईश्वराने वचन दिले आहे– ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’ (कुरआन ३:१९५)
आज आपण कळत-नकळत पणे हे सत्य विसरुन जात आहेत कारण आपण कुरआन विसरुन जात आहे जी अल्लाह (ईश्वर) ने आपल्याला देणगी दिलेली आहे. आज आपण वाडवडील, विद्वान काय म्हणत आहेत तेच अनुसरण करत आहेत पण कुरआनप्रमाणे काय चूक आणि काय बरोबर हे बघतच नाही. या जगात दर दिवशी १५१,००० पेक्षा जास्त लोक मृत्यू पावतात. आपण अत्यंत आभारी आहोत अल्लाहचे (ईश्वर) की तो आपणास अजूनही वेळ देत आहे आपल्या मुक्तीसाठी जेणेकरुन आपण आपल्यात सुधारणा करु. 
जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील की, ‘‘आम्ही अल्लाहचेच आहोत, आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे.’’ (कुरआन २:१५६)
चला तर मग आपण सर्व स्वत:ला व आपल्या परिवाराला व आपल्या भाऊ-बहिणीना अल्लाह (ईश्वर) च्या क्रोधापासून वाचवू आणि अर्थातच इन्शाअल्लाह स्वत:ला व या समाजाला स्वर्गाच्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन करु. ‘‘काळाची शपथ, मानव वस्तुत: तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.’’ (कुरआन १०३:१-३)

माननीय उसामा बिन जैद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आणला जाईल आणि आगीत पेâकला जाईल. त्याच्या आतड्या आगीत बाहेर निघून पडतील. मग त्या आगीत अशाप्रकारे घेऊन फिरेल जसे गाढव आपल्या चक्कीभोवती फिरतो. तेव्हा दुसरे नरकवासी लोक त्याच्याजवळ जमा होतील आणि विचारतील की हे अमक्या, ही तुझी काय अवस्था आहे? तू तर आम्हाला जगात पुण्यकर्म करण्यासाठी सांगत होतास? आणि दुष्कर्म करण्यापासून रोखत होतास? (असे पुण्यकर्म करूनसुद्धा तू येथे कसा काय आलास?) तो मनुष्य म्हणेल की मी तुम्हाला पुण्यकर्म करण्यास सांगत होतो आणि स्वत: त्यांच्या जवळदेखील जात नव्हतो आणि दुष्कर्मांपासून तुम्हाला रोखत होतो मात्र स्वत: करीत होतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी मेराजच्या रात्री काही लोकांना पाहिले की त्यांचे ओठ आगीच्या कातरीने कापले जात होते. मी जिब्रिल (अ.) यांना विचारले की हे कोण लोक आहेत? जिब्रिल (अ.) म्हणाले की हे पैगंबरांच्या जनसमुदायाचे भाषण करणारे लोक आहेत. हे लोकांना पुण्यकर्म आणि ईशभिरूतेचा आदेश देत होते आणि स्वत:ला विसरत होते.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय हरमला (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘आपण मला कोणती गोष्ट करण्याचा आदेश देत आहात?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सदाचाराने वागा आणि दुराचारापासून अलिप्त राहा आणि पाहा, तू सभेतून उठून बाहेर गेल्यानंतर तुझी लोकांनी चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी असे तुला वाटत असेल तर तू स्वत:मध्ये चांगली गुणवैशिष्ट्ये निर्माण कर आणि तुझ्या गैरहजेरीत लोक तुझ्या बाबतीत काही म्हणतील जे तुला आवडत नाहीत, त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेव.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीरकण : लोकांनी आपली चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी, असे मनुष्याला वाटत असेल तर त्याने तसलीच कामे करावयास हवीत आणि लोकांनी आपली वाईट गुणवैशिष्ट्यांमुळे आठवण करावी असे मनुष्यास वाटत नसेल तर त्याने अशा वाईट गुणवैशिष्ट्यांपासून दूर राहिले पाहिजे.
एका मनुष्याने माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांना म्हटले, 
‘‘मला दीनचे काम करायचे आहे. सत्कर्म करण्यास सांगू इच्छितो आणि दुष्कर्म करण्यापासून रोखू इच्छितो.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचला आहात?’’ तो म्हणाला, ‘‘होय, आशा आहे.’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘कुरआनच्या तीन आयती तुम्हाला अपमानित करतील याची तुम्हाला भीती वाटत असेल तर अवश्य दीनचे काम करा.’’ तो म्हणाला, ‘‘त्या कोणत्या आयती आहेत?’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, पहिली आयत ही आहे–
‘‘तुम्ही लोकांना सत्कर्माचा आदेश देता आणि स्वत:ला विसरता?’’ (अल बकरा)
इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
दुसरी आयत ही आहे–
‘‘तुम्ही ती गोष्ट का सांगता जी स्वत: करीत नाही?’’
इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
आणि तिसरी आयत ही आहे–
शुऐब (अ.) आपल्या जनसमुदायाला म्हणाले, ‘‘ज्या वाईट गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो, त्या हिरिरीने स्वत: कराव्यात अशी माझी इच्छा नाही. (तर मी त्यांच्यापासून खूप दूर राहीन. माझ्या कथनी व करणीमध्ये तुम्हाला फरक आढळणार नाही.)’’ (सूरह हूद)
इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ तेव्हा इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जा, अगोदर तुम्ही स्वत:ला सत्कर्माचा आदेश द्या आणि दुष्कार्म करण्याची मनाई करा. हे दीनचा काम करणाऱ्याचे पहिले लक्ष्य आहे.’’ (हदीस)
स्पष्टीकरण : हा मनुष्य स्वत:ला विसरला होता आणि दुसऱ्यांना दीनच्या गोष्टी सांगण्याची हौस बाळगत होता. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी योग्य सद्यस्थितीचा अंदाज लावून चांगला सल्ला दिला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget