Latest Post

इस्लाम वस्तुतः ईशआज्ञा-पालनाचेच नाव आहे, मनुष्य ईश्वराच्या आज्ञेचे पालन करू शकत नाही जोवर त्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत ते ज्ञान दृढविश्वासाच्या दर्जाप्रत वृद्धिंगत होत नाही.
सर्वप्रथम माणसाला ईश्वराच्या सत्तासामर्थ्यावर परिपूर्ण विश्वास असावयास हवा, त्याच्या अस्तित्वावरच जर विश्वास नसेल तर त्याच्या आज्ञांचे पालन तो कसा करू शकेल? त्याचबरोबर ईश्वराच्या गुणवैशिष्ट्यांचे संपूर्ण ज्ञान असावयास हवे. ईश्वर एकच आहे आणि ईशत्वामध्ये त्याचा कोणीही सहभागी नाही, हेच ज्याला माहीत नाही तो इतरासमोर मान झुकविण्यापासून व हात पसरविण्यापासून दूर कसा राहू शकतो? ईश्वर सर्व काही पाहणारा आहे, सर्व ऐकणारा आहे व सर्वज्ञ आहे, या गोष्टीवर ज्याचा विश्वास नाही. तो ईश्वराची अवज्ञा करण्यापासून स्वतःला कसा रोखू शकतो? या बाबीवर जेव्हा तुम्ही चिंतन कराल तेव्हा तुम्हाला असे आढळून येईल की विचारधारणा, आचार व कर्म या बाबतीत इस्लामच्या मार्गाने जाण्यासाठी माणसामध्ये काही गुणवैशिष्ठ्ये असणे आवश्यक आहेत; ती सर्व गुणवैशिष्ट्ये त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, जोपर्यंत त्याला ईश गुणवत्तेचे व त्याच्या वैशिष्ठ्यांचे नीट ज्ञान प्राप्त होत नाही. हे ज्ञान केवळ कळण्यापुरतेच मर्यादित असून चालत नाही तर त्याची रुजवणूक दृढविश्वासपूर्वक अंतःकरणात व्हावयास हवी. त्यामुळे माणसाचे मन त्याविरुद्ध विचार करण्यापासून व त्याचे जीवन त्याच्या ज्ञानाविरुद्ध कृती करण्यापासून सुरक्षित होते.
त्यानंतर मनुष्याला हे ही कळणे आवश्यक आहे की, ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? ईश्वराला काय आवडते ज्याचा आम्ही अंगीकार करावा? त्याला काय नापसंत आहे की ज्याचे आम्ही पथ्य पाळावे. या गरजेपोटी माणसाला ईशनियमांचे व विधिचे पुरेपूर ज्ञान असते. जे ईश नियम व विधि आहेत यावर त्याचा पुरेपूर विश्वास असतो. त्याचे पालन केल्यानेच ईश्वराची प्रसन्नता लाभू शकते, त्याचे कारण असे की ज्याला मुळातच त्याचे ज्ञान नसेल तर तो आज्ञापालन कशाची करेल? ज्ञान आहे परंतु त्यावर पूर्ण विश्वास नसेल किंवा हे नियम व विधिंबरोबरच अन्य नियमही यथोचित व योग्य आहे असा समज असेल तर तो मनुष्य ईश-नियमांचे काटेकोर पालन कसा करू शकेल?
तसेच माणसाला या गोष्टीचेही ज्ञान असणे अत्यंत जरुरीचे आहे की, ईश्वरेच्छेनुसार आचरण न केल्यास तसेच ईश्वराच्या विधी व नियमांचे पालन न केल्यास कोणते परिणाम होतात आणि त्याच्या आज्ञापालनाचे इनाम काय आहे? यासाठी अत्यावश्यक आहे, की आखिरत (परलोक) च्या जीवनावर, ईशन्यायालयात हजर होण्यावर, अवज्ञांबद्दल शिक्षा मिळण्यावर व आज्ञापालनाचा पुरेपूर मोबदला मिळण्यावर अढळ विश्वास, श्रद्धा व त्याचे ज्ञान असणे अगत्याचे आहे. जी व्यक्ती ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) च्या जीवनाशी अपरिचित आहे, ती आज्ञापालन व अवज्ञा या दोहोंना निरर्थक समजत असते. त्याची समजूत तर अशी असते की आज्ञापालन करणारा व आज्ञापालन न करणारा, या दोघांची अवस्था शेवटी सारखीच असेल कारण दोघेही मातीत मिसळून जातील. या जगात ज्या पापांपासून व दुष्कृत्यापासून कसलीही हानी होण्याचे त्याला भय नाही त्यापासून तो कसा वाचेल व आज्ञापालनांची बंधने व त्रास सहन करण्याचा तो कसा स्वीकार करील? अशी आशा त्याच्याकडून कशी केली जावू शकते? अशी श्रद्धा व विश्वास असल्यास, मनुष्य ईशआज्ञेचे पालन करणारा कधी होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे, आज्ञापालन करण्यात, असा माणूसही अढळ राहू शकत नाही ज्याला आखिरतचे जीवन व ईशन्यायालयात हजर होण्याचे ज्ञान तर आहे परंतु त्यावर अढळ श्रद्धा व विश्वास नाही. याचे कारण असे की शंका व द्विधा मनःस्थितीच्या अवस्थेत मनुष्य एखाद्या गोष्टीवर ठामपणे राहू सकत नाही. एखादे कृत्य लाभकारक आहे अशी तुमची मनोमन खात्री व विश्वास असला तरच ते काम तुम्ही मनःपूर्वक करू शकता. तसेच एखादे कृत्य हानिकारक आहे असा तुमचा ठाम विश्वास असेल तेव्हाच त्यापासून पथ्य पाळणे तुम्ही अविचलपणे करू शकता. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की एखाद्या पद्धतीचे आज्ञापालन व अनुकरण करण्यासाठी तिच्या परिणामाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ते ज्ञान दृढ विश्वासाच्या व नितांत श्रद्धेच्या स्वरुपाचे असणेही आवश्यक आहे.
ज्ञानप्राप्तीचे साधन
ईशआज्ञापालनासाठी ईमानची आवश्यकता आता तुम्हास माहीत झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, ईशगुण व त्याला प्रिय असणारे नियम व आखिरतच्या जीवनाबद्दल (पारलौकिक जीवन) अचूक व खरे ज्ञान कोणत्या मार्गाने प्राप्त होऊ शकते?
याआधी आम्ही हे वर्णन केलेलेच आहे की विश्वामध्ये सर्वत्र ईश्वराच्या कारगिरीची, कौशल्याची चिन्हे व निशाण्या पसरलेल्या आहेत. ते सर्व या सत्यतेचा पुरावा सादर करतात की या प्रचंड विश्वरूपी कारखान्याचा निर्माता व नियंता एकच एक ईश्वर आहे. तोच त्याचा चालकही आहे या सर्व चिन्हात व पुराव्यात समस्त ईशगुणांची छबी दृष्टीस पडते. त्याची तत्त्वदर्शिता त्याचे ज्ञान, त्याचे सामर्थ्य, त्याचा दयाळूपणा, त्याची पालनक्रिया, त्याचा प्रकोप या सर्व गोष्टी दृष्टीस पडतात. अशी कोणती गुणवत्ता राहते जिची शान या पुराव्यांतच स्पष्ट होत नाही? माणसाची बुद्धी व त्याची पात्रता या गोष्टींना पाहण्यात व समजण्यात बहुधा चूक करीत आली आहे. हे सर्व पुरावे डोळ्यांसमोर आहेत. असे असतानासुद्धा कोणी म्हणतो की ईश्वर दोन आहेत. अन्य कोणीतरी म्हटले की ते तीन आहेत. काहींनी अगणित ईश्वर मानले आहेत, काहींनी ईशत्वाचेच विभाजन केले आणि असे म्हटले की एक पर्जन्याचा देव आहे, एक वायूचा देव आहे व एक अग्निदेव आहे. तात्पर्य हे की प्रत्येक गुणवत्तेचा व शक्ती-सामर्थ्याचा वेगवेगळा देव आहे आणि एक ईश्वर या सर्वांचा प्रमुख (महादेव) आहे. अशा तऱ्हेने ईश्ववराची सत्ता व त्याची गुणवत्ता समजून घेण्यास माणसाची बुद्धी व मती अनेकदा फसली आहे ज्याचे सविस्तर विवरण करण्याची ही वेळ नाही.
आखिरत अर्थात पारलौकिक जीवनासंबंधी माणसांनी, पुष्कळसे गैरसमज व विचार दृढ करून घेतले आहेत. कोणी म्हणतात की मेल्यानंतर मनुष्य मातीत मिसळून जाईल व तद्नंतर कोणतेही जीवन नाही. कोणी म्हणतात की मनुष्य पुन्हा पुन्हा अनेकदा या जगात जन्म घेईल व आपल्या कर्मांनुसार शिक्षा किंवा पुरस्कार प्राप्त करील.
ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्यासाठी ज्या नियमांचे पालन आवश्यक आहे ते नियम स्वयंबुद्धीने निर्धारित करणे तर आणखी अधिक बिकट काम आहे.
माणसाजवळ अत्यंत उचित बुद्धी असली व त्याची ज्ञानक्षमता ही उच्च कोटीतील असली तरी वर्षानुवर्षाचे अनुभव व विचार-चिंतन केल्याने तो एका विशिष्ठ मर्यांदेपर्यंत आपले मत बनवू शकतो. आपण सत्य पूर्णपणे जाणले आहे असा पुरेपूर विश्वास त्याला त्यावेळीसुद्धा नसतो. ज्ञान व बुद्धीची खरी परीक्षा तर अशा रीतीने होऊ शकत होती की, माणसाला कसल्याही मार्गदर्शनाखेरीज मोकळे सोडून दिले असते. मग जो आपल्या प्रयत्नामुळे व योग्यतेमुळे सत्य व वास्तवाप्रत पोहोचेल तोच सफल होईल. जो पोहोचू शकला नाही तो असफल राहील. परंतु ईश्वराने आपल्या दासांना अशा कठीण परीक्षेत टाकलेले नाही. त्याने दयाळूपणाने खुद्द माणसातूनच अशी माणसे जन्माला घातली ज्यांना त्याने आपल्या सर्व गुणवत्तेचे यथार्थ ज्ञान दिले. ती जीवनपद्धतीसुद्धा दिली ज्याद्वारा मनुष्य या जगात ईश्वराच्या इच्छेनुसार जीवन-यापन करू शकतो. पारलौकिक जीवनासंबंधीसुद्धा यथार्थ ज्ञान दिले, तसेच जीवनाच्या बाबतीतही खरेखुरे ज्ञान त्यांना प्रदान केले व त्यांना आदेश दिला की सर्व मानवांना हे ज्ञान व आदेश पोहोचवावे. हेच ते अल्लाहचे प्रेषित आहेत. ज्या साधनाद्वारा अल्लाहने त्यांना ज्ञान प्रदान केले त्याला ‘वही’ (दिव्य प्रकटन) म्हणतात. ज्या ग्रंथाद्वारा त्यांना हे ज्ञान दिले त्याला ईशग्रंथ-ईशवाणी असे म्हणतात. आता माणसाच्या बुद्धीची व त्याच्या क्षमतेची कसोटी येथे आहे की, जो प्रेषितांचे सोज्वळ व पवित्र जीवन व त्यांच्या उच्च शिकवणीवर विचार-चिंतन केल्यावर त्यांच्यावर ईमान-दृढविश्वास व श्रद्धा धारण करतो किंवा नाही ही खरी कसोटी आहे. जो सत्यनिष्ठ व सत्यप्रिय असेल तर सत्य गोष्ट व सत्यनिष्ठ माणसांच्या शिकवणुकीचा स्वीकार करील व या कसोटीत उतरेल. जर त्याने हे मान्य केले नाही तर त्याचा नकाराचा अर्थ असा होईल की तो सत्य व कसोटीला जाणण्याची व त्याचा स्वीकार करण्याची क्षमता व पात्रता गमावून बसला आहे. असा इन्कार त्याला कसोटीत असफल होण्यास कारणीभूत ठरेल. ईश्वर व त्याचे नियम तसेच पारलौकिक जीवनासंबंधी तो कदापिही खरे ज्ञान प्राप्त करू शकणार नाही.

अम्र बिन अनसा (रजी.) यांचे निवेदन आहे की, मी प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ मक्का येथे प्रेषित्वाच्या सुरूवातीच्या काळात गेलो. मी विचारले की, आपण काय आहात. ह.  मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, मी अल्लाहचा प्रेषित आहे. मी म्हणालो, प्रेषित काय असतो? प्रेषितांनी (स.) यांनी सांगितले, अल्लाहचा संदेश त्याच्या भक्तांपर्यंत पोहोचविणारा  प्रेषित असतो. मी विचारले, कोणता संदेश देऊन अल्लाहने आपणास पाठविले आहे? प्रेषित (स.) यांनी सांगितले, मला सर्वश्रेष्ठ अल्लाहने या हेतूने पाठविले आहे की, मी लोकांना नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याची शिकवण द्यावी, मुर्तीपूजा नष्ट करावी आणि अल्लाहची एकेश्वरता अंगिकारली जावी, त्याच्यासह दुसऱ्या कोणास सहभागी न केले जावे. (हदीस - मुस्लीम)

भावार्थ-
हे हदीस वचन प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या आवाहनाचे मुलभूत तत्त्व दर्शविते. आवाहन हे आहे की ईश्वर आणि दासांच्या संबंधांना उचीत आधारावर कायम केले जावे. अर्थात  ईश्वराच्या सत्ताधिकारात कोणाला सहभागी न केले जावे, आणि फक्त ईश्वराचीच उपासना केली जावी. फक्त त्याचेच आज्ञापालन केले जावे. मानवांच्या दरम्यान उचीत संबंधांचा  आधार विश्वबंधुत्व आहे. म्हणजे समस्त मानव एकाच मातापित्याची संतती आहे, आणि सत्यार्थाने हे सर्व आपसात बांधव आहेत. सख्ये भाऊ यास्तव सर्वांनी एकमेकांशी सहानुभूती  राखली पाहीजे. एकमेकांचे दु:ख दूर केले पाहीजे. निराधार व लाचार बांधवांची मदत केली पाहीजे. एखाद्यावर अन्याय, अत्याचार होत असेल तर सर्वांनी मिळून अत्याचाऱ्याविरूद्ध उठून  उभे राहिले पाहीजे. कोणी अचानक संकटात सापडल्यास इतरांच्या हृदयात वेदना उठली पाहीजे, त्याच्या संकटाचे निवारण करण्यासाठी धाव घेतली पाहीजे.
प्रेषित आवाहनाचे दोन मुलाधार आहेत. एक म्हणजे ‘एकेश्वरवाद’ अर्थात एका ईश्वराची उपासना, आज्ञापालन करणे. दुसरे ‘सार्वत्रीक दया’. इथे ही गोष्ट दृष्टीआड होता कामा नये की  मूळ तत्त्व ‘एकेश्वरवाद’ आहे. दुसरा आधार तर एकेश्वरवादाची आवश्यक निकड आहे. जो ईश्वरांशी प्रेम करेल, तो त्याच्या दासांशी (मानवांशी) ही प्रेम राखेल. कारण ईश्वरानेच आपल्या दासांशी (अर्थात सर्व मानवांशी) प्रेम राखण्याचा आदेश दिला आहे.
अर्थात इस्लामचा आधार व मध्यवर्ती बिंदू, ज्याविना धर्माचा कोणताही भाग उत्तम स्थितीत राहू शकत नाही, तो हा की माणसाने साक्ष द्यावी की, अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही  (म्हणजे एकेश्वरवाद) आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहे. (प्रेषितत्त्व). आणि अल्लाहतर्फे आलेल्या विधी नियमाला (अर्थात पवित्र कुरआनला) आत्मसात करणे. ईश्वराची मूळ शिकवण आहे की, माणसाला माणसाच्या दास्यत्वातून मुक्त करून, ईश्वराच्या दास्यत्वात आणले जावे. अन्याय, अत्याचारपूर्ण जीवन व्यवस्थेतून बाहेर काढून इस्लामच्या न्यायपूर्ण छत्रछायेखाली आणावे. तात्पर्य, अल्लाहने आम्हाला आपला जीवनधर्म (इस्लाम) प्रदान करून जगात पाठविले आहे. यासाठी समस्त मानवांना ईश धर्माकडे, जीवन पद्धतीकडे बोलवावे.

- मकबूल अहमद फलाही
इस्लाममध्ये स्त्रीला कोणते स्थान देण्यात आले आहे आणि तिला इस्लाममध्ये कोणता दर्जा प्राप्त आहे, या विषयी या पुस्तिकेत संक्षिप्त वर्णन आले आहे. यावरून इस्लामने स्त्रीला समाजात तिचे योग्य स्थान दिले आहे, हे कळून येते.
आज इस्लामच्याच प्रभावामुळे स्त्रीच्या पूर्वीच्या दासत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे धाडस आज कुणीही करू शकत नाही.

आयएमपीटी अ.क्र. 82     -पृष्ठे - 12   मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/cdoob7tesepjplo8afzlrqyaju1126xi

इस्लामी जीवनपद्धती स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत? ते आता आपण पाहू या.
आपणास हे कळून चुकले आहे की या जगात चहुकडे ईशप्रभुत्वाच्या निशाण्या पसरलेल्या आहेत. विश्वाच्या एका परिपूर्ण व्यवस्थेनुसार व एका अनिवार्य नियमानुसार चालणारा हा विराट कारखाना खुद्द याच गोष्टीचा साक्षात पुरावा आहे की त्याच्या निर्माणकर्ता व त्याला कार्यान्वित करणारा एक अमर्याद शक्तिमान शासक आहे. त्याच्या शासनाविरुद्ध कोणतीही वस्तू डोके वर करू शकत नाही. संपूर्ण विश्वाप्रमाणेच मनुष्याची प्राकृतिक अवस्थाही अशीच आहे की ईश्वराच्या आज्ञेचे पालन व्हावे तद्नुसार
नकळत ते रात्रंदिवस त्याचे आज्ञापालन करीतच आहे. कारण त्याच्या प्राकृतिक नियमांचे उल्लंघन करून तो जिवंत राहूच शकत नाही.
परंतु ईश्वराने मनुष्याला ज्ञानाची क्षमता, विचार व आकलन शक्ती व चांगले वाईट यांची पारख देऊन इच्छायोजना व अधिकार याबाबतीत थोडेसे स्वातंत्र्यसुद्धा बहाल केले आहे. या स्वातंत्र्यातच वास्तविक मनुष्याची परीक्षा आहे, त्याच्या विचार-विवेकाची कसोटी आहे. तसेच त्याला जे स्वातंत्र्य दिले गेले आहे त्याचा तो कशा रीतीने वापर करतो, या गोष्टीचीही परीक्षा आहे. या परीक्षेकरिता कुठलाही एक मार्ग स्वीकारण्यासाठी त्याला विवश केले गेलेले नाही. कारण विवश केल्याने परीक्षेचे मूळ उद्दिष्ट नष्ट होते. एखाद्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट उत्तर देण्यास विवश केले गेले तर अशा परीक्षेपासून कोणताही लाभ होणार नाही, हे तुम्ही जाणू शकता. तुमची खरी क्षमता त्याच वेळी दिसून येईल जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर लिहिण्याचा अधिकार व मोकळीक असेल. तुम्ही बरोबर उत्तर दिले तर यशस्वी व्हाल व आगामी प्रगतीचीद्वारे तुमच्यासाठी उघडली जातील. उत्तर बरोबर दिले नाही तर अयशस्वी व्हाल व आपल्या अयोग्यतेमुळे खुद्द स्वतःच्याच प्रगतीचा व उन्नतीचा मार्ग बंद करून घ्याल. ठीक याच तऱ्हेने आपल्या परीक्षापद्धतीमध्ये अल्लाहने मनुष्यालासुद्धा त्याला हवी ती पद्धत अंगीकार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.
आता एक मनुष्य असा आहे की तो खुद्द स्वतःची तसेच या विश्वाच्या नैसर्गिक प्रकृतीशी अनभिज्ञ आहे. आपल्या निर्मात्याचे अस्तित्व व त्याची महान गुणवता ओळखण्यात तो चूक करतो आणि परिणामतः त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा अनुचित फायदा घेऊन तो अवज्ञा व बंडखोरीचा मार्ग अवलंबतो. असा मनुष्य ज्ञान, बुद्धी, विवेक व कर्तव्यनिष्ठेच्या कसोटीत नापास झाला. प्रत्येक बाबतीत तो एक हलक्या दर्जाचा आहे असे त्याने स्वतःच सिद्ध केले. म्हणून वरीलप्रमाणेच त्याला परिणामाचे फळ मिळावयास हवे.
त्याच्या तुलनेत दुसरा एक मनुष्य या परीक्षेत सफल ठरला आहे. त्याने आपल्या ज्ञान व बुद्धीचा उचित वापर करून ईश्वरास जाणले व त्याचा स्वीकार केला. वास्तविकपणे असे करण्यास तो बांधलेला नव्हता. त्याने चांगले व वाईट यांची पारख करण्यात कसलीही चूक केली नाही. आपल्या स्वतंत्र निवडीने त्याने भलेपणा व चांगुलपणासच आपलेसे केले. खरे तर कुमार्गाकडे व वाईटपणाकडेही वळण्याचे त्याला अधिकार व स्वातंत्र्य होते. त्याने आपल्या प्रकृतीला जाणले. आपल्या ईश्वरास ओळखले व अवज्ञेचे स्वातंत्र्य असतानाही त्याने ईश्वराचे आज्ञाधारकत्वच पत्करले. अशा माणसाला परीक्षेमध्ये सफलतेचे भाग्य अशासाठीच लाभले की त्याने आपल्या बुद्धीकडून योग्य कार्य करून घेतले. डोळ्यांनी नीट पाहिले, कानांनी नीट ऐकले, बुद्धीने योग्य निर्णय घेतला व अंतःकारणाने योग्य असलेल्या गोष्टीचे अनुकरण करण्याचे ठरविले. सत्याला जाणून व ओळखून त्याने असेही सिद्ध करून दाखविले की तो सत्य ओळखणारा आहे. सत्यापुढे नतमस्तक होऊन त्याने असे दाखवून दिले की तो सत्याचा उपासक आहे.
अशा तऱ्हेचे गुण असणारा माणूस, या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफल झालाच पाहिजे हे उघड आहे.
तो ज्ञानाच्या तसेच आचरणाच्या प्रत्येक बाबतीत योग्य मार्गाचाच स्वीकार करतो. कारण तो मनुष्य ईश्वराचे अस्तित्व ओळखतो व त्याची महान गुणवत्ता जाणतो, तो खऱ्या अर्थाने ज्ञानाचा आरंभही जाणतो व त्याचा शेवटसुद्धा जाणतो. असा मनुष्य कधीही वाट चुकणार नाही. त्याचे पहिले पाऊलही उचित तऱ्हेने पडले आहे. शेवटी ज्या इष्ट स्थानाप्रत त्याला जाणे आहे, त्याचीही त्याला विश्वासपूर्वक जाणीव आहे. आता तो तात्त्विक रीतीने चिंतन व अभ्यास करून विश्वातील दडलेली रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु एखाद्या विद्रोही (काफीर) प्रमाणे तो कधी संदेह व शंकाकुशंकाच्या कोड्यात पडत नाही. तो विज्ञानाद्वारा निसर्गाचे नियम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मांडात दडलेल्या अपरंपार खजिन्याचा शोध घेतो. ज्या शक्ती पृथ्वीमध्ये व खुद्द माणसाच्या अस्तित्वामध्ये ईश्वराने ठेवलेल्या आहेत त्या सर्वांचा जातीने शोध घेतो व ते जाणून घेतो. पृथ्वी व आकाशांत ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्वाचा वापर व उपयोग करण्यासाठी उत्तमोत्तम पद्धती शोधून काढतो. परंतु ईश्वर परिचय (ईशपरायणता) त्याला प्रत्येक वेळी विज्ञानाच्या दुरूपयोग करण्यापासून परावृत्त करतो. सर्व साधनांचा मीच धनी आहे असा गैरसमज त्याच्यात कधीही होत नाही.
मी निसर्गावर विजय मिळविला आहे, मी माझ्या फायद्यासाठी विज्ञानाचे सहाय्य घेईन, जगाला उद्ध्वस्त करून टाकीन आणि रक्तपात व लूटमार करून संबंध जगावर आपल्या सामर्थ्याचा दरारा निर्माण करीन, असे कृत्य एका विद्रोही (काफिर) वैज्ञानिकाचे आहे.(१) मुस्लिम वैज्ञानिक जितक्या जास्त प्रमाणात विज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करतो तितक्याच जास्त प्रमाणात ईश्वरावर त्याचा विश्वास व श्रद्धा वृद्धिंगत करतो आणि त्याच प्रमाणात तो ईश्वराचा अधिकाधिक आभारी दास बनतो. त्याची विश्वासधारणा व श्रद्धा अशी होते की माझ्या प्रभुने माझ्या सामर्थ्यांमध्ये व माझ्या ज्ञानामध्ये जी भर घातली आहे, तिच्यापासून मी स्वतःच्या व सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत राहील. हेच त्याचे खरे आभार प्रदर्शन ईश्वराप्रति आहे.
(काहीशी अशीच आजची परिस्थिती आहे ज्याचा सामना आज मनुष्य करीत आहे. डॉ. जोड (Dr. Joad) यांनी स्पष्टपणे सत्य सांगितले आहे, -
‘‘विज्ञानाने आम्हाला अशा शक्ती प्रदान केलेल्या आहेत ज्या देवतांना प्राप्त होणे योग्य आहेत आणि आम्ही त्यांच्या उपयोगात शाळकरी विद्यार्थी आणि अयोग्य व्यक्तीप्रमाणे मनोवृत्ती व बुद्धीने काम घेत आहोत.’’
१) मनुष्याने आजपर्यंत जे काही पाहिले आहे ते ईश्वराच्या साम्राज्याचा अतिलहानसा भाग आहे.
विश्वविख्यात तत्त्वज्ञ बरट्रान्द रसेल (Bertrand Russel) लिहितो,
‘‘ढोबळमानाने म्हटले तर आम्ही एक अशा शर्यतीच्या मध्यभागी आहोत जिचे साधन तर मानवी कौशल्य व बुद्धी आहे आणि जिचा अंत मानवी मूर्खता वर होतो. त्यास प्राप्त करण्याची इच्छित कुशाग्रतेतील प्रत्येक वृद्धी वाईट परिणामाकडे नेत आहे. मानवजातीच्या या शर्यतीने अज्ञानता व अनिपुणतेच्या विरोधात जगात जगण्यासाठी संघर्ष केला आहे. परंतु मूर्खतामिश्रित प्राप्त ज्ञान व कुशलतेमुळे मानवी जीवनाला अविश्वासी बनविले आहे. ज्ञान शक्ती आहे परंतु ही शक्ती वाईटासाठीसुद्धा तितकीच खर्च केली जाऊ शकते जितकी चांगल्यासाठी व मानवी कल्याणासाठी केली जाते.
यावरून निष्कर्ष निघतो की मनुष्याने जर तत्त्वदर्शितेत तितकीशी उन्नती केली नाही जितकी तो ज्ञान वृद्धीत करतो तर ती ज्ञानवृद्धी खरेतर दुःखात वृद्धी सिद्ध होते.’’ (40 Impact of Science on Society - P. P. 120-121)
दुसऱ्या एका तत्त्वज्ञाचे कथन आहे,
‘‘आम्ही आकाशात पक्षाप्रमाणे उडणे आणि समुद्रात माशाप्रमाणे संचार करणे अवगत केले आहे, परंतु आम्हाला हे माहीत नाही की पृथ्वीवर कशा प्रकारे जीवन जगावे.’’ (Qouted by Joad in Counter Attack from the East. page - 28)
याचप्रमाणे इतिहास, अर्थशास्त्र, राजनीती, विधी व अन्य सर्व विद्या व कला यामध्ये आपल्या संशोधन व प्रयत्नांच्या दृष्टीने एक मुस्लिम कोणाही विद्रोहीच्या तुलनेत कमी पडणार नाही. तरीसुद्धा या दोहोंच्या दृष्टिकोनात मोठे अंतर आहे. मुस्लिम प्रत्येक विद्येचा अभ्यास उचित दृष्टीने करतो. उचित उद्दिष्टांसाठी करतो व यथार्थ निष्कर्षाप्रत जाऊन पोहोचतो. इतिहासापासून तो माणसांच्या गतानुभवाचा उचित व योग्य धडा व बोध घेतो. गतकाळातील भिन्न भिन्न जातीवंशाच्या उन्नतीची तसेच त्यांच्या अवनतीची कारणे जाणून घेतो. त्यांच्या संस्कार संस्कृतिमधील लाभकारक गोष्टी शोधून त्यांच्यापासून लाभ प्राप्त करतो. त्यांच्यातील सज्जन लोकांच्या स्थितीचा लाभ घेतो व गतकाळातील जातीवंशाचा ज्या ज्या गोष्टीमुळे नाश झाला, त्या सर्व गोष्टींपासून दूर राहतो. अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती मिळविण्याच्या तसेच तिचा विनियोग करण्याच्या अशा पद्धती शोधून काढतो की ज्यापासून सर्व मानवजातीचे कल्याण होईल. एकाचाच लाभ होईल व अनेकांचे नुकसान होईल अशा पद्धतीचा अंगीकार करणार नाही. राजकारण करण्यात त्याचे संपूर्ण लक्ष याच गोष्टीवर केंद्रित असते व कार्यरत होते की सर्व जगात शांतता, न्याय, सदाचार व सभ्यपणा यांचेच अधिपत्य व्हावे. कोणाही व्यक्तीने अगर समूहाने ईश्वराच्या दासांना आपला दास बनवू नये. शासन व तिच्या सर्व सामर्थ्याला, ईशअनामत (ठेव) मानली जावी व तिचा वापर ईश्वराच्या दासांच्या कल्याणासाठी केला जावा. कायदा करताना तो अशा दृष्टीने विचार करील की, काटेकोर न्यायनिष्ठतेने लोकांचे हक्क ठरविले जावेत व कोणाही व्यक्तीवर अन्याय होणार नाही.
एका मुस्लिामाच्या आचरणांत, ईशभय व सत्यनिष्ठा व सरळपणा असतो. जगात तो अशी जाणीव बाळगून राहतो की सर्व वस्तूंचा धनी ईश्वरच आहे. माझ्याजवळ व सर्व मानवाजवळ जे काही आहे, ते सर्व ईश्वरानेच दिलेले आहे. कोणत्याही वस्तुंचा किंबहुना माझ्या स्वतःच्या देहाचा व त्यातील शारीरिक सामर्थ्याचाही मी मालक नाही. हे सर्व काही ईश्वराची अनामत असून या अनामतीचा वापर करण्याचे जे अधिकार मला आहेत त्यांचा वापर ईश्वरी इच्छेनुसारच केला जाईल. एके दिवशी ईश्वर माझ्याकडून ही अनामत परत घेईल त्यावेळी मला प्रत्येक वस्तुचा हिशेब द्यावा लागेल.
ही जाणीव बाळगून जी व्यक्ती जगात राहील त्याच्या सदाचरणाची जरा कल्पना करा! तो आपले अंतःकरण कुविचारापासून निर्मळ राखील. तो त्याच्या बुद्धीला वाईट गोष्टीच्या चिंतनापासून दूर ठेवील. तो त्याच्या नेत्रांना वाईट दृष्टीपासून रोखून धरील, तो त्याच्या कानांना कुश्रवणापासून परावृत्त करील. तो त्याच्या जिभेचे अशा रितीने रक्षण करील की तिच्या द्वारा सत्याविरुद्ध कसलाही शब्द निघणार नाही. तो निषिद्ध मार्गाने आपले पोट भरण्याऐवजी उपाशीपोटी राहणे पसंत करील. अत्याचारासाठी तो त्याच्या हातांचा कधीही उपयोग करणार नाही. कुमार्गावर त्याचे पाय कधीही जाणार नाहीत. त्याचा शिरच्छेद जरी केला तरी असत्यासमोर तो कधीही नतमस्तक होणार नाही. त्याची कसलीही इच्छा व गरजेची पूर्तता तो अन्याय व अत्याचारांद्वारा करणार नाही. तो मूर्तिमंत सत्य व सदाचार असेल. सत्यनिष्ठेपेक्षा इतर कोणतीही गोष्ट त्याला अधिक प्रिय असणार नाही. त्यासाठी स्वतःच्या प्रत्येक हिताचे, प्रत्येक इच्छा आकांक्षेचे किंबहुना स्वतःचेही तो बलिदान करील. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जुलुम व अन्याय यांचा तो अधिक तिरस्कार करील. कसल्याही लाभाच्या आमिषाने व लालसेने अगर कसल्याही हानिच्या भयाने तो असत्याच्या पाठीशी राहणार नाही. या जगातील यशाचा वाटाही त्यालाच लाभेल.
सर्व जगात त्याच्याइतका कोणीही सदाचारी व आदरणीय असणार नाही, कारण की त्याचे मस्तक ईश्वराखेरीज इतरांपुढे कधीही वाकणार नाही, त्याचे हात ईश्वराशिवाय अन्य कोणापुढे पसरणार नाही. अशा व्यक्तीनजीक अवमान कसा फिरकू शकेल?
या जगात त्याच्याइतका अन्य कोणीही सामर्थ्यवानही असणार नाही, कारण त्याच्या अंतःकरणात ईश्वराखेरीज कोणाचेही भय असणार नाही, तसेच ईश्वराखेरीज अन्य कोणाकडून त्याला देणगी अथवा बक्षिसाची लालसाही असणार नाही. अशा व्यक्तीला सत्य व न्यायाच्या मार्गापासून पथभ्रष्ट करू शकणारी अशी कोणती शक्ती आहे? आणि कोणती अशी धलदौलत आहे जी अशा व्यक्तीचे ईमान विकत घेऊ शकते?
त्याच्यापेक्षा या जगात अन्य कोणीही धनसंपन्न व उदार असणार नाही कारण तो विलासप्रिय नाही. आपल्या इच्छा वासनांचा तो गुलाम नाही, तो लोभी नाही. आपल्या
श्रमाच्या घामाने जे धन मिळवितो, त्यातच तो समाधानी असतो. निषिद्ध मार्गाने मिळणाऱ्या धनाच्या राशी जरी त्याच्यासमोर मांडल्या तरी तो तुच्छतेने त्यांना लाथाडून टाकतो. हे संतोषाचे धन असून त्यापेक्षा मोठे कसलेच धन असू शकत नाही.
त्याच्याइतका लोकप्रिय व आवडताही अन्य कोणी असणार नाही. कारण तो प्रत्येक माणसाचा न्याय हक्क त्याला देईल. कोणाचाही हक्क तो हिरावून घेणार नाही. प्रत्येकाशी तो सत्व्यवहार करील व कोणाशीही तो कुव्यवहार करणार नाही. प्रत्येकाच्या कल्याणासाठी व भल्यासाठी तो झटेल व त्या मोबदल्यात तो निरपेक्ष असेल. अशा माणसाकडे लोकांची मने आपोआपच आकर्षित होतील व प्रत्येकजण त्याला प्रेम व आदर देण्यास विवश होईल.
त्याच्याइतका अन्य कोणीही विश्वसनीय असणार नाही, कारण तो कोणाच्याही अनामत ठेवीचा अपहार करणार नाही. सत्यापासून तो आपले तोंड कधीही फिरविणार नाही. आश्वासनपूर्ती करण्यात तो कधीही चुकणार नाही. तसेच आपल्या व्यवहारात तो सचोटीने वागणारा असेल व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाणारा साक्षीदार असला किंवा नसला तरी ईश्वर तर सर्वज्ञ व सर्वसाक्षी आहे; ही जाणीव मनात बाळगूनच तो प्रत्येक व्यवहार प्रामाणिकपणे व सचोटीने करील. अशा माणसाची पत, विश्वसनियता याबद्दल काय बोलावे! त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असा कोण असेल?
एका मुस्लिमाचे चारित्र्य तुम्ही जर नीट जाणून घेतले तर तुमची अशी खात्री होईल की मुस्लिम जगामध्ये अवमानित, शासित तसेच प्रभावाधीन होऊन कधीही राहणार नाही. तो सतत प्रभावशाली व शासकच होऊन राहील. कारण त्याच्यामध्ये इस्लाम जी वैशिष्ट्ये निर्माण करतो त्याच्यावर कोणतीही शक्ती प्रभाव पाडू शकत नाही.
जगामध्ये अशा तऱ्हेने आदरयुक्त व गौरवपूर्ण जीवन व्यतीत केल्यानंतर आपल्या ईश्वरासमोर तो जेव्हा हजर होईल तेव्हा ईश्वर त्याच्यावर आपल्या कृपाप्रसादाचा व इनामांचा वर्षाव करील. कारण जी अमानत जगात त्याच्या स्वाधीन केली गेली होती तिचा त्याने यथायोग्य वापर केला. उज्वल यश मिळवून सफल झाला. ही अशी एक शाश्वत सफलता आहे जी या जगापासून पारलौकिक जीवनापर्यंत सतत गतिशील असते व तिची परंपरा कोठेही खंडित होत नाही.
हा इस्लाम आहे. असा हा इस्लामच मनुष्याचा प्राकृतिक व स्वाभाविक धर्म आहे. तो कोणत्याही एखाद्या जातीवंशापुरता अगर एखाद्या राष्ट्रापुरता मर्यादित नाही. प्रत्येक युगात व प्रत्येक जातीवंशात व राष्ट्रात जे काही ईश्वराची जाण असणारे व सत्यप्रिय लोक होऊन गेले ते सर्व मुस्लिमच होते. मग त्यांच्या भाषेत या धर्माचे नाव इस्लाम असो वा अन्य काही.

पारा १ - भाग १


पारा १ - भाग २


पारा १ - भाग ३


पारा २ - भाग १


पारा २ - भाग २


पारा २ - भाग ३


पारा ३ - भाग १


पारा ३ - भाग २


पारा ३ - भाग १


पारा ३ - भाग ३


पारा ४ - भाग १


पारा ४ - भाग २


पारा ४ - भाग ३


पारा ५ - भाग १


पारा ५ - भाग २


पारा ५ - भाग ३


पारा ६ - भाग १


पारा ६ - भाग २


पारा ६ - भाग ३


पारा ७ - भाग १


पारा ७ - भाग २


पारा ७ - भाग 3


पारा ८ - भाग १


पारा ८ - भाग २


पारा ८ - भाग ३


पारा ९ - भाग १


पारा ९ - भाग २


पारा ९ - भाग ३


पारा १० - भाग १


पारा १० - भाग २


पारा १० - भाग ३


पारा ११ - भाग १


पारा ११ - भाग २


पारा ११ - भाग ३


पारा १२ - भाग १


पारा १२ - भाग २


पारा १२ - भाग ३


पारा १३ - भाग १


पारा १३ - भाग २


पारा १३ - भाग ३


पारा १४ - भाग १


पारा १४ - भाग २


पारा १४ - भाग ३


पारा १५ - भाग १


पारा १५ - भाग २


पारा १५ - भाग ३


पारा १६ - भाग १


पारा १६ - भाग २


पारा १६ - भाग ३


पारा १७ - भाग १


पारा १७ - भाग २


पारा १७ - भाग ३


पारा १८ - भाग १


पारा १८ - भाग २


पारा १८ - भाग ३


पारा १९ - भाग १


पारा १९ - भाग २


पारा १९ - भाग ३


पारा २० - भाग १


पारा २० - भाग २


पारा २० - भाग ३


पारा २१ - भाग १


पारा २१ - भाग २


पारा २१ - भाग ३


पारा २२ - भाग १


पारा २२ - भाग २


पारा २२ - भाग ३


पारा २३ - भाग १


पारा २३ - भाग २


पारा २३ - भाग ३


पारा २४ - भाग १


पारा २४ - भाग २


पारा २४ - भाग ३


पारा २५ - भाग १


पारा २५ - भाग २


पारा २५ - भाग ३


पारा २६ - भाग १


पारा २६ - भाग २


पारा २६ - भाग ३


पारा २७ - भाग १


पारा २७ - भाग २


पारा २७ - भाग ३


पारा २८ - भाग १


पारा २८ - भाग २


पारा २८ - भाग ३


पारा २९ - भाग १


पारा २९ - भाग २


पारा २९ - भाग ३


पारा ३० - भाग १


पारा ३० - भाग २


पारा ३० - भाग ३

जो उपजत मुस्लिम आहे आणि संपूर्ण आयुष्यभर अजाणतेपणे मुस्लिम राहिला. परंतु आपल्या ज्ञानशक्ती व बुद्धीचे सहाय्य घेऊन त्याने आपल्या ईश्वराला ओळखले नाही आणि आपल्या ऐच्छिक कार्यक्षेत्रात त्याने ईश्वराच्या आज्ञा झुगारुन दिल्या. हा मनुष्य काफीर (विद्रोही, श्रद्धाहीन, सत्याचा इन्कार करणारा) आहे. ‘कुफ्र’ चा खरा अर्थ लपविणे, झाकणे असा आहे. अशा माणसाला विद्रोही (काफीर) अशासाठी म्हटले जाते की त्याने आपल्या प्राकृतिक स्वभावावर नादानीचे पांघरूण घातले आहे. तो इस्लामी प्रकृतीवर जन्माला आला आहे. त्याचा संपूर्ण देह व देहाचे सर्व अवयव इस्लामी प्रकृतीनुसार कार्यरत आहेत. त्याच्या सभोवार सर्व सृष्टी इस्लामवरच कार्यान्वित आहे. परंतु त्याच्या बुद्धीवर पडदा पडलेला आहे. सर्व सृष्टीचा तसेच त्याचा स्वतःचा प्राकृतिक स्वभाव त्याच्यापासून दडलेला आहे. त्याची विचारधारणा त्याच्या उलट आहे आणि त्याविरुद्ध आचरण करण्यास तो प्रवृत्त होतो. जो मनुष्य ‘विद्रोही (काफीर)’ आहे तो किती मोठ्या प्रमाणात पथभ्रष्ट झाला आहे, हे तुम्ही पाहू शकता.
‘कुफ्र’ पासून होणारे नुकसान
‘कुफ्र’ एक घोर अज्ञान आहे, किंबहुना खरे अज्ञान ‘कुफ्र’ च होय. मनुष्य ईश्वराशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान आणखी कोणते असू शकते? एक मनुष्य विश्वाच्या या प्रचंड व्यापार प्रबंधाला अहोरात्र कार्यान्वित असलेला डोळ्यांनी पाहतो परंतु या प्रचंड व्यवस्थेचा निर्माता व चालक कोण आहे, हे तो जाणत नाही. ज्याने कोळसा, लोह, कॅल्शियम, सोडियम इत्यादी काही घटकांच्या मिश्रणाने अनुपम मानवनिर्मिती केली तो निर्माता कोण आहे? हे ही तो जाणत नाही.
एक मनुष्य सृष्टीमध्ये चहुकडे अशा वस्तु व असे कार्य होत असताना पाहातो ज्यामध्ये अप्रतिम कौशल्य व कारागिरी आहे. गणिती ज्ञान व रसायन शास्त्रज्ञान परिपूर्णपणे भरलेले आहे. तसेच सर्व परमकोटीची निपुणता व चमत्कार त्यामध्ये दृष्टीस पडतात परंतु ते सर्वज्ञ व निपुणता असणारे व ज्याने विश्वामध्ये हे सर्व कार्य निर्माण केले आहे ते अस्तित्व कोणते आहे? हे तो जाणत नाही!! ज्याला ज्ञानरूपी साखळीची पहिली कडीच सापडली नाही, अशा माणसाला खऱ्याखुऱ्या ज्ञानाची कवाडे कशी उघडली जाऊ शकतात? तो कितीही विचार व चिंतन करो किंवा कितीही संशोधन करो, त्याला कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाचा सरळ व उचित मार्ग आढळणार नाही कारण सुरवातीलाच अज्ञानरूपी अंधकारच त्याच्या दृष्टीस पडेल आणि शेवटीही अंधारातच तो चाचपडत असेल.
‘कुफ्र’ एक अत्याचार आहे किंबहुना सर्वांत मोठा अत्याचार ‘कुफ्र’च होय. अत्याचार कशाला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही वस्तुचा वापर तिच्या प्राकृतिक व नैसर्गिक स्वभाव धर्माविरुद्ध करणे हाच अत्याचार होय. आता तुम्हाला हे कळून चुकले आहे की सृष्टीतील सर्व चराचर वस्तु अल्लाहच्या आदेशाच्या अधीन आहेत व त्यांची प्रकृतीच ‘इस्लाम’ आहे. म्हणजेच ईशनियमांचे आज्ञापालन होय. खुद्द माणसाचा देह व त्याचा प्रत्येक अवयव, याच प्रकृतीनुसार उत्पत्ती पावलेला आहे. ईश्वराने या अवयवावर तसेच वस्तुवर अधिकार बाळगण्याचे थोडेसे स्वातंत्र्य माणसाला अवश्य दिले आहे. परंतु प्रत्येक वस्तूची प्रकृती असे इच्छिते की तिचा वापर ईशइच्छेनुसार केला जावा. परंतु जो मनुष्य ‘कुफ्र’ करतो, तो या सर्व वस्तुंचा वापर त्यांच्या प्रकृतीविरुद्ध करीत असतो. तो आपल्या हृदयात इतरांचा आदर, प्रेम व भयरुपी मूर्तीची प्रतिस्थापना करतो.
वास्तविकपणे हृदयाची प्राकृतिक हाक अशी आहे की त्यामध्ये केवळ अल्लाहची महानता, प्रेम व भय यांनाच स्थान असावे. मनुष्य आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचा व सृष्टीतील त्याच्या अधिकारा खालील सर्व वस्तूंचा वापर व उपयोग मात्र ईशइच्छेविरुद्ध करतो. खरेतर प्रत्येक वस्तुची प्राकृतिक धारणा अशी आहे की तिचा वापर केवळ ईशनियमानुसार केला जावा. तुम्हीच सांगा की अशा माणसापेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी व प्रत्येक वस्तुवर येथपर्यंत की खुद्द आपल्या अस्तित्वावरही अत्याचार करीत असतो?
‘कुफ्र’ केवळ अत्याचारच नसून तो विद्रोह, कृतघ्नपणा व नमकहरामीपणासुद्धा आहे. थोडासा विचार करा की मनुष्यापाशी आपली स्वतःची अशी कोणती वस्तू आहे? त्याचा मेंदू त्याने स्वतः निर्माण केला आहे की ईश्वराने? त्याचे हृदय, डोळे, जीभ, हातपाय व सर्व अवयवांची निर्मिती त्याने स्वतः केली आहे की ईश्वराने? त्याच्या सभोवताली जितक्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता तो स्वतः आहे की ईश्वर? या सर्व वस्तुंना माणसासाठी उपयुक्त बनविणे व कार्यान्वित करण्याची कृती त्याची स्वतःची आहे की ईश्वराची? तुमचे उत्तर हेच असेल की या सर्व वस्तू ईश्वराच्याच आहेत. त्यानेच त्याना निर्माण केले. ईश्वरच त्यांचा स्वामी आहे व ईश्वराच्याच देणगीने या सर्व वस्तू माणसाला प्राप्त झाल्या आहेत. खरी वस्तुस्थिती ही आहे पण मनुष्य ईश्वराने प्रदान केलेल्या बुद्धीचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध विचार करण्यासाठी करतो. ईश्वराने प्रदान केलेल्या हृदयात ईश्वराविरुद्ध धारणा बाळगतो. ईश्वराने जे डोळे, जीभ, हात व पाय व इतर वस्तू प्रदान केलेल्या आहेत त्यांचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध करतो. अशा माणसापेक्षा बंडखोर कोण असेल? एखाद्या सेवकाने आपल्या धन्याचे मीठ खाऊन जर त्याच्याशी बेईमानी केली, तर त्याला तुम्ही नमकहराम म्हणता.
एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने त्याला शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर जर शासनाविरुद्ध केला तर तुम्ही त्याला द्रोही म्हणता, एखाद्या उपकारकर्त्याशी जो दगाबाजी करतो तर त्याला तुम्ही कृतघ्न म्हणता. परंतु माणसाविरुद्ध माणसाची नमकहरामी, द्रोह व कृतघ्नपणाची वास्तवता काय आहे? मनुष्य दुसऱ्या माणसाला कोठून उपजीविका देतो? ती ईश्वराने प्रदान केलेली उपजीविका होय. शासन आपल्या कर्मचाऱ्यांना जे अधिकार देते ते कोठून आलेले आहेत? ईश्वरानेच शासनाला ही सत्ता प्रदान केलेली आहे. कोणीही उपकारकर्ता दुसऱ्या व्यक्तीवर कसा उपकार करू शकतो? ते सर्वकाही ईश्वरानेच तर दिलेले आहेत. माणसावर सर्वांत जास्त हक्क त्याच्या मातापित्याचा आहे. परंतु मातापित्याच्या हृदयात आपल्या अपत्याबद्दलचे प्रेम कोणी निर्माण केले? मातेच्या वक्षस्थळात दुधाची निर्मिती कोणी केली? पित्याच्या मनात अशी भावना कोणी प्रविष्ट केली की आपल्या श्रमाच्या घामाने मिळविलेली संपत्ती मांसाच्या एका निरुपयोगी गोळ्यासाठी आनंदाने उधळावी व त्याच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी व संस्कारासाठी आपला वेळ आपला पैसा व आपले सर्व सुखसमाधान अर्पण करावे. आता तुम्ही सांग जो ईश्वर माणसाचा खराखुरा उपकारकर्ता आहे, वास्तविक स्वामी आहे, सर्वांत मोठा पालनकर्ता आहे, त्याच्याशीच माणसाने जर ‘कुफ्र’ केले, त्याला ईश्वर मानले नाही. त्याची बंदगी करण्यास नकार दिला व त्याचे आज्ञापालन करण्यापासून तोंड फिरविले तर हे किती मोठे बंड व द्रोह आहे! किती मोठा कृतघ्नपणा व नमकहरामीपणा आहे!!
कोणी असा समज करून घेऊ नये की ‘कुफ्र करून मनुष्य ईश्वराचे काही वाकडे करतो. त्या सम्राटाचे राज्य इतके विशाल आहे की मोठ्यात मोठी दुर्बिण लावून आम्ही पाहिले तरी अद्यापपर्यंत आम्ही हे जाणू शकलो नाही की त्याच्या राज्याचा आरंभ कोठून होतो व त्याचा शेवट कोठे आहे. ज्या सम्राटाची शक्ती इतकी जबरदस्त व प्रचंड आहे की आपली पृथ्वी, सूर्य, मंगळ व अशाच प्रकारचे कोट्यवधी ग्रह त्याच्या इशाऱ्यावर चेंडूप्रमाणे भ्रमण करीत आहेत. त्या सम्राटाची संपत्ती इतकी अगणित आहे की समस्त विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व त्याचेच आहे आणि त्यामध्ये अन्य कोणीही त्याचा वाटेकरी नाही. तो सम्राट असा निरिच्छ व निरपेक्ष आहे की, सर्व चराचर सृष्टी त्याचीच गरजू व कृपाभिलाषी आहे. बरे तर, माणसाची अवस्था व त्याचा दर्जा तरी असा काय आहे की त्याच्या स्वीकृतीने किंवा अस्वीकृतीने अशा सम्राटाचे काही नुकसान व्हावे? त्याच्याशी ‘कुफ्र’ व अवज्ञा करून मनुष्य त्याची काहीही हानि करीत नाही तर उलट मनुष्य स्वतः आपल्या विनाशाची तरतूद करतो.
‘कुफ्र’ व अवज्ञा करण्याचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्य स्वतः नेहमीसाठी अयशस्वी व विफल होतो. अशा माणसाला ज्ञानाचा सरळ मार्ग कधीही
सापडणार नाही कारण जे ज्ञान आपल्या निर्मात्यालाच जाणत नाही ते कोणत्या वस्तूला खऱ्या अर्थाने जाणू शकते? त्याची मति सतत कुमार्गानेच जाईल कारण जी बुद्धी आपल्या निर्माणकर्त्यालाच ओळखण्यात चूक करते ती दुसऱ्या कोणत्या वस्तूला खरे जाणून घेऊ शकते? तो आपल्या जीवनातील सर्व व्यवहारामध्ये सतत ठेचा खात राहील. त्याचे चारित्र्य बिघडेल, त्याची संस्कृती व संस्कार बिघडेल, त्याचा समाज बिघडेल, त्याची उपजीविकेची अर्थव्यवस्था भ्रष्ट व विकृत होईल, त्याचे शासन व राजकारण वाईट व दोषपूर्ण असेल. तो जगात अशांतता पसरविल, रक्तपात करील, इतरांचे हक्क ओरबडून व हिसकावून घेईल, जुलूम व अत्याचार करील व आपल्या कुविचारामुळे, खोडसाळपणामुळे व आपल्या दुष्कृत्यामुळे तो स्वतःचे जीवन स्वतःसाठीच कटू व अप्रिय करून घेईल. नंतर जेव्हा तो इहलोकातून परलोकात जाऊन पोहचेल तेव्हा आयुष्यभर त्याने ज्या ज्या वस्तूंवर अत्याचार केला त्या सर्व वस्तू त्याच्या विरुद्ध तक्रार करतील. त्याचा मेंदू, त्याचे हृदय, त्याचे नेत्र, त्याचे हात-पाय किंबहुना त्याच्या शरीरातील प्रत्येक रोम न रोम अल्लाहच्या न्यायालयात त्याच्याविरुद्ध असा दावा करतील की या अत्याचारी मनुष्याने तुझ्याविरुद्ध बंड व द्रोह केला व त्या द्रोहात त्याने आमच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. ज्या भूमीवर तो अवज्ञा करीत फिरला, राहिला, जी संपत्ती त्याने अनुचित तऱ्हेने मिळविली, जे धन त्याने निषिद्ध साधनाद्वारे मिळविले व निषिद्ध हेतूसाठी खर्च केले, बंडखोर होऊन त्याने ज्या ज्या वस्तूवर कब्जा केला व त्याचा गैरवापर केला, ती सर्व साधने व उपकरणे ज्यांचा त्याने आपल्या बंडखोरीत वापर केला; हे सर्व त्याच्याविरुद्ध फिर्यादी रुपात उभे ठाकतील. ‘अल्लाह’ जो वास्तविक न्याय देणारा आहे तो या पीडितांची कैफियत ऐकून घेईल व त्या बंडखोराला अपमानजनक शिक्षा ठोठावील.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget