Latest Post

ह. जाबीर (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वोत्कृष्ट वाणी अल्लाहचा ग्रंथ (कुरआन) आणि सर्वोत्कृष्ट चारित्र्य मुहम्मद (स.) यांचे चारित्र्य होय.’’  (हदीस - मुस्लिम)
मा. अनस (रजी.) यांचे निवेदन आहे, मला प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या प्रिय मुला! जर तू अशाप्रकारे जीवन पार पाडू शकशील की, तुझ्या मनात कोणाचे अनिष्ट चिंतन  नसावे तर असेच जीवन व्यतीत कर. मग फर्माविले, ‘‘आणि हीच माझी पद्धती आहे. (की माझ्या मनात कोणासाठी खोट नाही) आणि ज्याने माझ्या आचरण शैलीशी प्रेम राखले तर  नि:संशय त्याने माझ्याशी प्रेम राखले आणि ज्याने माझ्याशी प्रेम राखले, तो जन्नतमध्ये माझ्या सोबत राहील. (हदीस - मुस्लिम)

प्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे....
मा. अब्दुल्ला यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित (स.) यांच्याजवळ आला आणि तो प्रेषित (स.) यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘जे  तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हंटले की ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या  बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्याच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी, पुरापेक्षा जास्त वेगाने  सरसावून येतात. (हदीस - तिर्मिजी)

भावार्थ
एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्याच्या पसंतीस आपली पसंत, आणि त्याच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. ‘प्रिय’ ज्या  मार्गावरून चालतो त्यास आपला जीवनमार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे. आणि बलिदानासाठी, प्राणार्पण करण्यासाठी सदैव तत्पर असावे.  प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ त्यांचे एक एक पाऊलचिन्ह व प्रत्येक मार्ग चिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार चालावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन  केले, त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ ही प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे आणि ‘बद्र व हुनेन’ देखील त्यांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर  चालण्याचा परिणाम स्रfरद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टीचा मारा होईल. आर्थिक आघात हा सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी  प्रेमाने केला जाऊ शकतो. इमानधारक मनुष्य अशा वेळी हा विचार करतो की अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही, आणि शेवटी मी एक गुलाम  आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे, अशा प्रकारचे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करते. सैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम  करून टाकते. प्रेषित (स.) यांनी असे सांगितले की, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य (अपेक्षित दर्जाचा) ईमानधारक होऊ शकत नाही, जो पर्यंत मी त्याच्या नजरेत, त्याचा पिता, त्याचे  पूत्र, आणि सर्व माणसापेक्षा अधिक प्रिय न व्हावे. (हदीस - बुखारी, मुस्लीम)
मनुष्य इतर सर्वांचे प्रेम आणि निकडींना बाजूला सारून केवळ प्रेषित (स.) यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार होईल, तेव्हा समजून घ्या की तो खऱ्या अर्थाने मोमीन  (ईमानधारक) आहे.

आपण ज्या घरात वास्तव्य करतो त्या घराला घरपण स्त्रीच बहाल करते. एखाद्या व्यक्तीची साधी झोपडी आहे, तिला घरपण एक सुशील सुसंस्कृत स्त्री निर्माण करून देते, तर एखाद्या महालरूपी घराला संस्कारहीन स्त्री ’घर’ राहू देत नाही. म्हणून घराचे घरपण निर्माण होते ते स्त्रीमुळे आणि घरपणाचे अस्तित्व संपुष्टात येते तेदेखील स्त्रीमुळेच. पण इस्लाम सांगतो की स्त्रीने घराला घरपण बहाल केलेच पाहिजे आणि ते तिचे कर्तव्य आहे. एखादे घर बाहेरून प्रचंड शोभिवंत असेल, पण आतमध्ये वास्तव्य करणारे जर सैतानी वृत्तीचे असतील तर त्याला घर म्हणता येत नाही. म्हणून घर म्हणजे नेमके काय आणि ते कोणामुळे निर्माण होते याविषयी थोडे पाहू या.
    ”घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
    तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.”
    या काव्यपंक्तीवरून चार भिंतीचे घर होत नाही तर त्याच घराची माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह यांचा वावर असायला पाहिजे. पोकळ नाती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्या नात्यांमध्ये प्रेमाची उब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची उब मिळत नाही, वात्सल्याची शितलता सुखावत नाही, नात्यांतील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा सुखवत नाही, त्याला घर कसे म्हणायचे? घर भिंती बांधल्याने तयार होत नाही, तर घर त्या घरातील स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांशी असणार्‍या सद्वर्तनाने तयार होते. कारण पूर्णवेळ घराची देखभाल करणारी मुख्य स्त्री घराच्या संसाराचा कणा असते. जसा माणूस त्याच्या पाठीच्या कण्यावर उभा असतो, तसा संसाराचा कणा स्त्री आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याचा आजार झाला तर ती व्यक्ती खाली वाकून चालते अगदी, तसेच स्त्री जर दुबळी, अज्ञानी, अशिक्षित असेल तर प्रपंचही तसाच चालतो. म्हणूनच म्हटले आहे, ”शिकलेली आई घराला पुढे नेई.” इस्लामने तर शिक्षण अनिवार्य केले आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. कसलाही भेदभाव न करता शिक्षण देणे हे अनिवार्य केले आहे. मुलींसाठी शिक्षण व स्त्रीचा फार मोठा सन्मान इस्लामने हजारो वर्षांपूर्वी केला आहे.  अशा अनेक प्रकारे स्त्रियांचा इस्लामने सन्मान केला.
    स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरूद्ध व स्त्रियांच्या गुलामीविरोधात सर्वप्रथम इस्लामने आवाज उठविला. जगात स्त्रियांना उच्च स्थान देणारा अरबस्थान हा सर्वप्रथम देश ठरला. इस्लामच्या तत्वज्ञानात स्त्री-पुरूष दोघांमध्ये थोडाही फरक केला नाही. पुण्य करणारे सर्वच स्वर्गात जातील त्यात कोणताही भेदभाव होणार नाही किंवा अन्याय होणार नाही, मग ती स्त्री असो वा पुरूष. इस्लामने दानधर्म (जकात)  याला महत्त्व दिले आहे. इस्लाममध्ये जी व्यक्ती आपली विधवा व घटस्फोटित मुलीचा सांभाळ करते ते सर्वात मोठे दान आहे. कारण विधवा व घटस्फोटित स्त्रीला आपल्या पित्याशिवाय कोणीही दूसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत तर त्या विधवा, घटस्फोटित सत्रीचा (मुलीचा) सांभळ केल्यास ते सर्वात मोठे दान (पुण्य) ठरते. घटस्फोटित स्त्री वडिलाशिवाय दुसर्‍या कोणाकडे जाऊच शकत नाही. अशा वेळी तिला आधार देण्यासाठी व तिचा सांभाळ करण्यासाठीच या कार्याला पुण्यकार्य म्हटले आहे.
    ”एखाद्या सद्वर्तनी, सुशील (पतिव्रता) स्त्रीवर व्याभिचाराचा तसेच चारित्रहीनतेचा आरोप करणे म्हणजे माणसाला संपविणार्‍या सात गुन्ह्यांपैकी एक आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणार्‍या इसमास कोणत्याही प्रकारची साक्ष गृहीत न धरता 80 फटके मारावेत.” वरील विवेचनावरून हे लक्षात येते की आपल्या स्वार्थासाठी अथवा राग-मत्सरासाठी एखादी व्यक्ती स्त्रीची बदनामी करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करील अथवा आपली मनिषा (इच्छा) पूर्ण करण्यासाठी स्त्रीची बदनामी करून आपला स्वार्थ साधेल, अशा प्रकारचे किस्से होऊ शकतात व एखाद्या चारित्र्य संपन्न, सुशील, सुसंस्कृत निरपराधी स्त्रीची अवहेलना, बदनामी, चारित्र्यहीनता होत असेल किंवा एखादी व्यक्ती तसे भासवत असेल तर त्याला त्याने सादर केेलेली कोणतीही साक्ष मान्य न करता 80 फटके (चाबकाने) मारावेत. ही शिक्षा फर्मावत असताना ज्या स्त्रीवर आरोप कला आहे ती स्त्री सद्वर्तनी (पतिव्रता) आहे का, ते पाहणे जरूरीचे आहे. इस्लामने स्त्री व पुरूषाचे कार्यक्षेत्र जरी वेगवेगळे ठेवले असले तरी स्त्रीला कार्य करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. धर्माच्या मर्यादेत राहून कार्य करणे म्हणजे आपले कार्य नीतीमत्तेला धरून असावे, तसेच ते आपल्या चारित्र्यात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलेे आहे. म्हणून स्त्रियांना कुरआनने शिक्षण अनिवार्य केले आहे. जर एखाद्या स्त्रीने कुरआनचे शिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केले आणि ती म्हातारी होऊन मरण पावली तर ती स्वर्गात गेल्यानंतर तरूण होईल, असे प्रतिपादन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आहे. याच्याच उलट जी स्त्री आपल्या मिळालेल्या आयुष्यात (मृत्यू पश्‍चाताच्या जीवनाची परीक्षा) दांभिकपणे वागेल, बदवर्तन करेल, तिला अंतिम महाप्रलयाच्या दिनी (न्यायनिवाड्याच्या दिवशी) शिक्षा होणारच, यात सुतभरदेखील शंका नाही. एवढेच नाही तर अनेक देवांची उपासना करणे हेदेखील नरकयातनेचे आमंत्रण ठरविले आहे. म्हणून इस्लामने (स्त्री-पुरूष) फक्त आणि फक्त इस्लाम धर्मास मानावे, इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना मानावे, तसेच त्यांचे धर्मांचे आणि मानवजातीस योग्य असणारे सर्व विचार सर्व लोकांपर्यंत पोहचवावेत (फक्त मुस्लिम लोकांपर्यंत नाही), असे करणे पुण्यकर्म समजले जाते. याशिवाय इतर देवांची आराधना करणे, अनेकेश्‍वरत्व जोपासने हेदेखील दांभिक कृत्याच्या बरोबरीचे कृत्य आहे. इस्लाम जसा स्त्रीचा सन्मान करतो तसाच तो त्यांना काही मर्यादादेखील घालतो. सर्व बाबतीत इस्लामने स्त्री-पुरूषांना समान दर्जा देऊनसुद्धा दोघांत स्त्रीचे स्थान उच्च समजावले आहे. आणि जो पुरूष स्त्रीशी अत्यंत आदराने वागतो तो उत्तमोत्तम पुरूष होय. जसे पुरूषांना स्त्रियांशी आदराने वागावयास सांगतो, तसेच स्त्रीलाही दुसर्‍या स्त्रीशी सन्मानाने वागण्याची ताकीद केली आहे. मग ती स्त्री कितीही गरीब वा कितीही श्रीमंत असो, तिने इतर स्त्रियांची टिंगल (चेष्टा) करू नये. आपसात बोलताना टोमने मारू नयेत. एकमेकींचा वाईट नावाने उल्लेख करू नये (शिव्या-शाप), तसेच एकमेकीचीं चहाडी-चुगली करू नये, असे वागणार्‍या स्त्रीचा इस्लाम विरोध करतो. इस्लामने स्त्रीला बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या व वृद्धापकाळात पुत्राच्या संरक्षणात राहण्यास सांगून त्यांच्यासमोर आपली मते मांडण्यास मुभा दिली, तर त्यास पुरूषांनी स्वातंत्र दिले. तसेच तिला गृहकार्यात मुबलक प्रमाणात अधिकार दिले. सर्वच स्त्रिया कपटी, पापी, दोषी, दुर्गुणी असतात असे नाही. त्याचबरोबर विवाह करताना स्त्रीचे वय पुरूषापेक्षा कमीच असले पाहिजे असाही धर्माचा काही संकेत नाही. याचे उदाहरण म्हणजे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे पहिल्या विवाहाच्या वेळी वय 25 वर्षे तर त्यांची पत्नी माननीय खदीजा यांचे वय 40 वर्षे होते. या विवाहामध्ये वधू वरापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठी होती. त्या विवाहास गैर समजले नाही. सारांश, सध्या मुस्लिमांमध्ये (फक्त भारतात) वधू वरापेक्षा लहानच असायला पाहिजे असा जो गैरसमज पसरला आहे तो साफ चुकीचा आहे. कारण वय कमी अधिक असले तरी चालते, मात्र ते संबंध विवाहाच्या माध्यमातून मान्य झालेले असावेत.
    विवाहाने दोघांना (पती पत्नींना) काही अधिकार प्राप्त होतात व ते बजावणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. म्हणजेच स्त्री-पुरूषांचे एकमेकांवर अधिकार आहेत. तसेच वैवाहिक संबंधातूनच झालेली संतती इस्लाम वैध समजतो. संततीचे संगोपन करीत असताना त्या संततीत ईशपरायणता आणि परलोकीचे सृष्टीच्या प्रति शुभचिंतक बनून वृद्धींगत व्हावी. मुलाचे पालनपोषण, संगोपन मुलांशी संवाद करा, त्यांना सदाचार शिकवा, मुलांना रागाऊ नका, त्यांना ताकीद आहे की प्राण्यांनादेखील अपशब्द वापरू नका. मुलांच्या खोट्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करू नका, मुलांना खोटे बोलू देऊ नका, स्वतःही कोणाशी खोटे बोलू नका, मुलांना मारू-झोडू नका, त्यांना शिक्षा करू नका, मुलांवर आरोप करू नका, असे वर्तन आपण आपल्या मुलांशी केले तर ती बिघडणार नाहीत तर चांगलीच घडतील. हे सर्व मुलांना अगदी लहान वयापासून शिकवावे लागते व लहान मुल जास्त काळ आईजवळ असतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियांची आहे. म्हणजे पुरूषांनी काहीही जबाबदारी स्वीकारायची नाही असे नाही.
    सुशील स्त्रीच्या चारित्र्यावर (व्यभिचाराचा) जसा आरोप करायचा नाही याची सूचना इस्लामने केली तसेच स्त्रीने आपले चारित्र्य सांभाळावे. व्याभिचाराचा विचारदेखील मनात यायला नको. व्याभिचार म्हणजे स्त्री-पुरूष यांनी विवाह न करता वैवाहिक जीवन (शारीरिक संबंधासह) जगणे म्हणजेच व्याभिचार होय. व्यभिचार ही अत्यंत वाईट बाब आहे. ती धार्मिकदृष्ट्या पापाची व दुष्कृत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या बाबीला समाजाची मान्यता नाही. उलट ही बाब लज्जास्पद आहे. म्हणून इस्लामने समाजाला व्याभिचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामने विवाह एक धार्मिक विधी जरी समजले असले तरी तो एक करार असून दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. याची सुरूवात सर्वात अगोदर इस्लामने केली आहे.

- सय्यद अबुल आला मौदूदी
    या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो.
    इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि संन्यास सत्यधर्माच्या विरुद्ध आहे आणि जगात त्यामुळे बिघाड आणि विकृती येते. इस्लामचे अनुयायी उपद्रवांना घाबरून वन आणि पर्वताकडे पळ काढीत नाही, उलट अल्लाहच्या मार्गात जिहाद करून त्यांचा मुकाबला करतात.

आयएमपीटी अ.क्र. 126   -पृष्ठे - 16   मूल्य - 08         आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/vl4d8z5tdyljfzglg9894duplfutzu14

इस्लामने अगदी स्पष्ट आदेश जकात कशी जमा करावी आणि कशी खर्च करावी याबद्दल दिलेले आहेत. जकातव्यतिरिक्त दानधर्म करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य जकातसाठी दिले गेलेले नाही. या बाबतीत जकातचे व्यवस्थापन हे नमाज सामुदायिकरित्या कायम करण्यासारखे आहेत. ही सामुदायिक व्यवस्था आहे. इस्लामी शासन आपल्या महसूल खात्यातर्फे जकात गोळा करते आणि गरजूंना त्याचे वाटप करते. शासनाला जकात देणे अनिवार्य आहे. कुरआन जकात कुणासाठी खर्च करावी हे तपशीलाने सांगत आहे आणि जकातच्या खर्चाचा खातेवाटप स्पष्ट देत आहे. जे जकातसाठी काम करतात त्यांचा विशेष उल्लेख कुरआन करीत आहे. कुरआनच्या स्पष्टीकरणानुसार जकात गोळा करणे आणि वाटप करणे ही शासनाची धार्मिक जबाबदारी आहे आणि हे इस्लामी व्यवस्थेचे एक महत्त्वाचे अंग आहे. हदीसमध्ये अनेक वेळा याबाबत उल्लेख आलेला आहे.
जकातची सामुदायिक व्यवस्था खालील कारणांमुळे आवश्यक आहे.
१) हे इस्लामच्या तत्त्वानुसार आहे. इस्लाम स्वभावतः सामुदायिक आहे. इस्लाम जगाला जे देऊ इच्छितो, ते त्याच्या सामुदायिक व्यवस्थेतूनच शक्य आहे. यामुळे मुस्लिम समाज एक शिस्तबध्द आणि योजनाबध्द जीवन कंठत राहतो.
२) गरीबांची मदत करून त्यांचे कल्याण करणे, इस्लामचे रक्षण इ. अत्यावश्यक गोष्टी आहेत, परंतु श्रीमंत लोकांचा या बाबींकडे हलगर्जीपणा नजरेआड करता येण्यासारखा नाही. म्हणूनच जकात गोळा करण्याची जबाबदारी शासनाकडे देऊन इस्लाम या हक्कांची अंमलबजावणी पूर्ण रूपात करू इच्छितो.
जेथे इस्लामी शासन नाही तेथे सामुदायिक व्यवस्था यासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. नमाजला कायम करणे, विशेषतः जुमा (शुक्रवार) आणि दोन ईदच्या वेळी नेतृत्व हे त्या नमाजचे शासनकर्त्याने करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की नेता गैरहजर असल्यास प्रत्येकाने नमाज स्वतंत्र्यरित्या अदा करावी. समाजातील लोकांनी एखादा इमाम नियुक्त करून अशा स्थितीत सामुदायिक नमाज अदा करावी. जकातसाठीसुध्दा हीच अट आहे. इस्लामी शासन अस्तित्वात जरी नसले तरी जकातची व्यवस्था सामुदायिकरीतीने होणे आवश्यक आहे. मशिद बांधण्यासाठी मुस्लिम समाज जसा एकत्र येतो आणि नमाजसाठी इमाम नियुक्त करून सामुदायिक नमाज अदा केली जाते त्याचप्रमाणे त्यांनी जकात गोळा करण्यासाठी आणि जकात वितरण करण्यासाठी सामुदायिक व्यवस्था करावी. त्यासाठी ‘‘बैतुलमाल’’ (लोककोषागार) स्थापन करून मुस्लिम समाजात जकातचे व्यवस्थापन करावे. इस्लामी शासन जेथे नसेल तेथे अशा संस्था जकातचे हेतु साध्य करण्यास सहाय्यक ठरतात. अशी व्यवस्था ज्या मुस्लिम समुदायात केली नसेल तर ते सर्वजण चूक करत आहेत. एक धार्मिक अपराध करीत आहेत.
जकातसाठी शब्दावली: धार्मिक शब्दावलीत जकातसाठी आणखी दोन संज्ञा (नाव) वापरात आहेत. एक ‘‘सदका’’ (दान) आणि ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’- अल्लाहच्या नावाने खर्च करणे. या दोन्हींचा येथे विचार करू या. ‘सदका’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘सिदक’ या शब्दाने झालेली आहे. ज्याचा अर्थ सदाचार व देण्यासाठी गंभीर असा होतो. हे दोन्ही गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत हे सिध्द होते. तसेच ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’म्हणजे अल्लाहच्या नावाने म्हणजे अल्लाहच्या सेवेत खर्च करणे. जकात आणि दान देण्याचे अंतिम ध्येय अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे आहे. जकात अल्लाहच्या नावानेच दिली जाते हे त्याच्या मूळ हेतूमुळे कळून येते. म्हणून ही तिन्ही शब्दावली एकाच वास्तवतेची असून त्याचे हे तीन घटक आहेत.
कुरआनने मात्र ही तिन्ही नावं एकाच अर्थाने वापरली आहेत. जकात, सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे इ. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. हे गौण आहे की तिन्हींपैकी एखाद्या रूपात खर्च केला जात असेल. म्हणून कुरआन आणि हदीसमध्ये खर्च करण्याच्या हेतु आणि ध्येय यावर लक्ष दिले गेले आहे आणि वैधानिकतेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. इस्लामच्या कायद्यानुसार जकात देणे सधन मनुष्यासाठी आवश्यक आहे आणि कायद्याने बंधनकारक आहे. परंतु सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे ऐच्छिक आहे.

- मतीन तारिक बागपती
    या पॉकेट साईझ पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आला आहे. या गोष्टींद्वारा मुलांना सुबोध होऊन विचार करण्यास प्रेरणा सुद्धा मिळते.
    या पुस्तिकेत अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप, सदाचाराचा बदला, स्वकर्म महाकर्म, सदाचारी कोळी, तीन भाऊ, बाबरचे मानवता प्रेम आणि काम चुकारपणा वाईट आहे इ. गोष्टी आल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 123     -पृष्ठे - 12      मूल्य - 10    आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqgn6lgzu8hqlsmlcym6kxc5glqqfyj0


सर्वप्रथम अल्लाहचे आभार ज्याने रमजान सारखा पवित्रोत्तम महिना दिला. अन्य सर्व महिन्यांपेक्षा या महिन्याचे विशेष हे की याचे आगमन व गमन दोहोंसाठी मुसलमान उत्कंठेने   वाट पहात असतात आणि उत्कंठाही लाभाशिवाय थोडीच असते. तेव्हा हे असे लाभ तरी कोणते हे पाहणे उद्बोधक ठरते. या महिन्यातील लक्षवेधी बाबी – १) कुरआनचे नाजिल होणे,  २) रोजे, ३) शबे कद्र, ४) तरावीह आणि ५) जकात. या पाचमधील जकातचे महत्त्व ‘सलातुज्जकात’ या शब्दातूनच स्पष्ट होते. म्हणजेच नमाजबरोबरच जकातचे महत्त्व अल्लाहनेच  स्पष्ट केले आहे. तर रोजास मी जबाबदार आहे असे स्पष्ट करून कोणासही या बीबत कसलाही फरक करण्यास वाव नाही, भले हज जीवनात शक्य होवो न होवो हजचे महत्त्वही सारखेच.
येथे विचार प्रस्तुत आहे तो रमजानचे रोजे, जकात यांचा आइ म्हणून रमजानचे विशेषत्व वर स्पष्ट केले. नंतर काहीसे रोजाकडे वळावेरोजापासून आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते हे
सर्वश्रुत आहे, सर्वमान्यही आहे. आरोग्य ही बाब केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून त्याला सामाजिक महत्त्व आहे आणि ते म्हणजे चारित्र्य. मुसलमान चारित्र्यवान असतील आणि   म्हणूनच त्यास अल्लाहने बरगुजीदा कौम म्हणून घोषित करतानाच अशा चारित्र्यासाठी त्याने एक मंत्रही दिला तो तत्तकुन म्हणून अर्थात तकवा. एकदा का हा तकवा आत्मसात केला  की जीवन मग ते या भूतलावरील असो की मरणोत्तर ते यशस्वी असाच खुलासा कुरआनात आढळतो आणि तो मान्य असण्यास कोणतीही अडचण असू नये असे वाटते. कारण तकवा  म्हणजे अल्लाहप्रती प्रेम व भीती. म्हणजेच जे मी करत आहे, बोलत आहे, जो विचार माझ्या मनात चालला आहे, या सर्वांना अल्लाह जाणत असतो. सृष्टीतील प्रत्येक चीजवस्तूचा तो  मालक आहे. यात मानवही आलाच.
मानवाचा मालक अल्लाह व मानव हा त्याचा बंदा. आपण कोठेही नोकरी करत असलो किंवा इतर कोणताही धंदा-उद्योग, अल्लाहचे भय असेल तर भ्रष्टाचार होणे नाही. भ्रष्टाचार  म्हणजे तरी काय जो आचार भ्रष्ट तो भ्रष्टाचार! तो या तकवामुळे टळत असतो. असा हा तकवा उपलब्ध होण्यासाठीच हे रोजे. मी चुकून खायचे प्यायचे म्हटले तरी ते शक्य होत  नाही. अल्लाह हे जाणतो व आपला बंदा आपल्या कसोटीला उतरला याची नोंद बंद्याचे आमालनाम्यात एकदा का झाली की माझ्या कौमचा हा विश्वासू आपला अनुयायी खास जाणून  शिफारसयोग्य ठरतो. कारण त्याने चारित्र्य जपबले आहे. चारित्र्याचे सर्टिफिकेट जसे या भूतलावर लागते तसे ते दुसऱ्या जगतात म्हणजे मरणोत्तर ठिकाणी पाहिजे असते आणि ते  सर्वांनी येथूनच प्राप्त करून घ्यायचे असते. असे हे प्रमाणपत्र साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोजा होय. ज्यातून तकवाही लाभतो व चारित्र्याचे प्रमाणपत्रही लाभते. यापेक्षा  कोणास अधिक ते काय हवे.
सर्टिफिकेट कोणतेही असो ते प्राप्त करण्यापोटी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात आणि आपण अशा प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचे सिद्धही करावे लागते. अशी सिद्धता आपण तकवा  धारण केल्यास आपले काम सोपे होते. जसे रोजामुळे खोटे बोलणे विसरून जातो, कुविचारांना, कुकर्मांना थारा देत नसतो. साहजिक आपले मनावर हळूहळू का होईना ताबा मिळविणे  शक्य होते.सतत महिनाभर रोजाचे हेच कारण आहे. मात्र केवळ रोजे ठेवायचे म्हणून ठेवले तर अल्लाह यश न देता आपण उपाशी राहण्याचे, तहान सोसण्याचेच काम केले, जे  निरर्थक ठरते. आपला तकवा तसे करू देत नाही. अल्लाहच्या बंद्याचे भल्यासाठीच हे रोजे आहेत हे यावरून स्पष्ट व्हावे. याच महान मानवाने आपले बजेट सुनिश्चित करावे व  त्यानुसार अल्लाहला अपेक्षित असलेला त्याग मग तो पैशांच्या रूपात असो की धान्य-कपड्यांच्या, गरजूंना अशा त्यागातून मुक्त करण्याची संधी साधतानाच आपले चारित्र्याचे प्रमाणपत्र  साध्य करण्यासही भरीव मदत मिळते. हे कार्य करताना तसेच रोजे करताना आपण आपले नातलग याचे रोजे व्हावेत त्याचे जीवन उंचावे याचाही विचार मनी असतो. जो इस्लामचा   एक अविभाज्य घटक आहे. अर्थात सामान्यत: आपण रोजासाठी उठलो, शेजारी काय स्थिती आहे हे पाहतोच ना! सहरी-इफ्तारसाठी जी देवाणघेवाण होते ती प्रेम व ऋणानुबंधाचे  वाढीसाठीच असते. आणि हेच ऋणानुबंध सामाजिक बंधुता, एकोपा यासही दृढ करते. शबे कद्रचे महत्त्व तर न्यारेच. कारण या एका रात्रीचे इबादतीस एकहजार रात्रींच्या इबादतीचे  इनाम यांतून ते स्पष्ट होते. वर नमूद केलेल्या बाबींबरोबरच आम्हाला हे ज्याद्वारे प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो तो कुरआन आणि कुरआन नाजिल झाले तो महिना रमजान आणि  म्हणून रमजान व त्यातील रोजे हे अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच जकातही. आपण हे ज्या महिन्यात मिळते तो महिना रमजान. म्हणून त्याचे आगमनासाठीही उत्कंठा आणि हे जे प्राप्त झाले त्याचे आभार मानण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी लगतच ईदच्या चंद्रदर्शनाची तेवढीच उत्कंठा. याच उत्कंठेतून समस्त बांधवांस  रमजान मुबारकबरोबरच ईद मुबारक!

-बशीर मोडक, रत्नागिरी

रमजानमध्ये स्वत:ची थुंकीसुद्धा गिळायची नसती का हो? दिवसभर पाणीसुद्धा पित नाही का तुम्ही? तुम्ही लोकं रात्रभर खात असता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रमजान महिन्यात  अमुस्लिम बांधवाकडून हमखास विचारली जातात. हे ऐकून थोडीशी चिडचीड होते, तरीही गैरसमज दूर करण्यासाठी अनिच्छेनं अशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कधीकधी उत्तरं  देताना स्वत:बद्दल लाज वाटू लागते. कारण, रमजानच्या बाबतीत असलेले गैरसमज अजूनही अमुस्लिमांमधून काढू शकलेलो नाही. तर उलटपक्षी केवळ शिरखुर्मा आणि खाऊच्या  व्यंजनापुरता रमजान माहिती असतो. क्वचित एखादाच असतो जो मोहल्ल्यात येऊन रमजान समजून घेतो. तसं सध्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाण- घेवाण झपाट्यानं वाढलीय.  त्यामुळे रमजान, बकरईद, मुहर्रमचं महत्त्व सांगणारी मॅसेज् सिझनवारी मोबाईलची मेमरी व्यापत असतात. त्यामुळे माहितीत भर पडलीय. याआधी फक्त जाडजूड पुस्तकातच ही  माहिती धूळ खात पडायची. या माहितीजालानं अनेकांच्या माहितीत मोठी भर टाकलीय. अजुनही माहिती स्वपुरतीच मर्यादित आहे.
महिनाभरात मोहल्ल्यात आनंदाचं वातावरण असतं. या महिन्यात घरांत महिला मंडळाचं काम बरंच वाढतं. भल्या पहाटे तीनच्या सुमारास घरातल्या महिलांचा दिवस सुरू होतो.  मध्यरात्री होणाऱ्या ‘तहज्जुद’च्या नमाजनंतर महिला सहरीच्या कामाला लागतात. सहरी म्हणजे, रोजा ग्रहण करण्यापूर्वीची न्याहरी किंवा जेवण. त्यासाठी प्रॉपर स्वयंपाक केला जातो.  स्वयंपाक तयार होताच गाढ झोपलेल्या मंडळींना उठवायची जबाबदारीदेखील गृहणीच सांभाळते. आंघोळीब्रश आटोपल्यानंतर सहरीचं जेवण घेतलं जातं. आमच्या लहाणपणी सहरी   आटपायला फजरची अजान व्हायची. अर्थात फजरची अजान ही सहरी संपवण्याची प्रमाणवेळ समजली जायची. आता मात्र, रमजानचे विशेष टाईम-टेबल कार्ड पहिल्याच दिवशी वितरीत केले जातात. त्यात सहरी आणि इफ्तारची प्रमाणवेळ दिलेली असते. योग्य वेळेवर सहरी आणि इफ्तार व्हावीत असा पायंडा आहे.. साधारण साडे-चार पावणेपाचपर्यंत सहरीची वेळ  असते. गाढ झोपेतून उठल्यावर जेवण जातं का? हादेखील प्रश्न असतो. त्यामुळे अपरिहार्यपणे सहरी करावीच लागते. झोप आवरली नाही आणि सहरीची वेळ संपली की उपाशीपोटीच  रोजा ग्रहण करावा लागतो. मेट्रो शहरात हे टाईमटेबल जरासं वेगळं असतं.. शहरी व्यस्तता लक्षात घेता वेळेत आठ-दहा मिनिटाचा फरक असतो. फजरच्या नमाजनंतर दिवस  सूर्यास्तापर्यंत कुरआनचं पठण केलं जातं. महिनाभरात जास्तीतजास्त वेळा कुरआनचं अध्ययन व्हावं असा अलिखित नियमच असतो. महिनाभरात साधारण तीन ते चार वेळा अख्खं  कुरआन वाचलं जातं. तसंच नमाजही किमान पाच वेळा तरी पठण केली जावी.. यालाच इबादत म्हणतात. आमच्या लहानपणी मित्रांत जास्तीतजास्त इबादत कोण करेल याची स्पर्धा   लावली जायची. आजही घरची ज्येष्ठ मंडळी मुलांमध्ये धार्मिकता रुजवण्यासाठी अशी स्पर्धा लावतात.
घरातली जी मंडळी रोजा नाही त्यांच्यासाठी सकाळचा चहा-नाष्टा वेळेवर देणं ही घरातल्या गृहिणीची जबाबदारी.. तसेच त्यांच्यासाठी दुपारचं जेवणही गृहिणींना वेळेवर तयार करावं  लागतं. नसता सासू-सासऱ्याची दिवसभर कटकट सुरू असते. संध्याकाळ सरता इफ्तारची तयारी गृहिणीलाच करावी लागते. इफ्तारच्या अखेर वेळेपर्यंत गृहिणी किचनमध्ये स्वयंपाक  करत असते. इफ्तारला कच्च्या (पेंड) खजूराला जास्त महत्त्व असते. दिवसभराचा रोजा गोड खाऊनच इफ्तार करायचा असतो. खजूर नसले की काहीतरी हलकं खाऊन इफ्तार केला  जातो. एखादं खजूर खाऊन दोन घोट पाणी पिणं. त्यानंतर काहीतरी न्याहरी घेणं हा इफ्तारीचा बेसिक नियम आहे. अन्यथा बकाबका खाल्यानं अपचणाचे त्रास सुरू होतात. तसेच  रिकाम्या पोटी जास्त पाणी पिल्यानं उलट्या व मळमळ होते. इफ्तारनंतर एखाद्या तासानं व्यवस्थित जेवायचं असतं. इफ्तारनंतर जेवणाची तयारी शेवटी घरातल्या स्त्रीचीच  जबाबदारी.. रात्री तरावीह म्हणजे विशेष नमाज होते. या नमाजमध्ये ३० दिवसात कुरआनचे दोन ते तीन सिपारे पठण केले जातात. त्यामुळे ही नमाज साधारण तासभर  चालते.  नमाजनंतर घरातली सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर महिलांना खरकटं स्वच्छ करुन झोपण्यास रात्रीचे बारा वाजतात. मग परत सकाळी उठून सहरीची तयारी.. उफ्फ किती ही मरमर एका स्त्रीची..!
महिनाभर आधीच रमजानची तयारी सुरू असते. घरातल्या सर्व वस्तू घासून-पुसून स्वच्छ केल्या जातात. घरातलं धुणं काढलं जातं. घर-दुकानाला रंग-रंगोटी केली जाते. महिनाभर  घरखर्चासाठी हात थोडासा सैलच केला जातो. घरात या महिन्यात बाहेरुन येणाऱ्यास आदरातिथ्य करण्यास मोठं महत्त्व आहे. घरात येणारा प्रत्येक पाहुणा आणि आप्तस्वकीयांना  इफ्तार करवल्याशिवाय जाऊ न देणं हे रमजानचं वैशिष्ट्य आहे. या महिन्यात खातीरदारी वा मेहमान नवाजीचं वेगळं महत्त्व असतं. असं सांगितलं जातं की, रमजान महिन्यात  उपाशींना जेवू घालणं मोठ्या सत्कर्माचं काम आहे. रोजेदारांना इफ्तार करवणं म्हणजे मोठं पुण्य समजलं जातं. असं म्हंटलं जातं की, घरात येणारा प्रत्येकजण रिज्क घेऊनच येतो.  त्यामुळे महिनाभर इफ्तार पाट्र्या रंगत असतात. बड्या प्रशस्त हॉटेलपासून ते एखाद्या टुरीस्ट हबला जाऊन इफ्तार पाट्र्या दिल्या जातात. घरात इफ्तारच्या मोठ्या जेवणावळी आणि  पंगती बसवल्या जातात. मोठ्या आत्मियतेनं रोजेदारांना इफ्तार करवला जातो. इफ्तारनंतर जेवण आणि अनेकदा सहरीचीसुद्धा व्यवस्था केली जाते. सहरी आणि इफ्तार करवणं   बरकतीचं अर्थात पुण्याचं मानलं जातं. महिनाभर मोहल्ल्यातून मस्जिदीमध्ये रोजेदारांसाठी पकवानाच्या थाळ्या पाठवल्या जातात. यात अमुस्लिमांची संख्यादेखील मोठी असते. महिनाभर घराघरातलं वातावरण आधात्मिक होऊन जातं. घरातली मनोरंजनाची साधनं याकाळात बंद केली जातात. घरात प्रत्येकजण कुरआन आणि सिपारेंचं पठण करत असतो.  (कुरआन ३० दीर्घ खंडांमध्ये विभागले आहे. यातून ३० छोटी-छोटी पुस्तिका तयार केली आहेत. याला सिपारे म्हणतात. सिपारे वाचायला आणि हाताळायला कुरआनपेक्षा सोयीचे असते.)  घरातली ज्येष्ठ मंडळी हातात तसबीरी घेऊन अल्लाहचा जप करत असतात. मोहल्ल्यातल्या मस्जिदी नमाजच्या पाचही वेळा भरुन जातात. रमजान काळातले शुक्रवार विषेश महत्त्वाची  मानले जातात. यादिवशी छोट्या ईदसारखं वातावरण असतं. जुमाला सामूहिक नमाजनंतर शांती आणि भरभराटीसाठी विशेष दुआ केली जाते. रमजान हा केवळ रोजा म्हणजे उपाशी  राहण्याचा महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा महिना समजला जातो. महिनाभर अन्न-पाणी वर्ज्य करुन स्वत:चीच परीक्षा घेतली जाते. उपाशी राहणं हे केवळ रमजानचा हेतू नाही.
तर रोजा ग्रहण करुन अल्लाहची आराधना करावी. उपाशी राहून आपल्या इंद्रिय शक्ती आटोक्यात आणता याव्यात. आपल्या नफ्स अर्थात उमाळ्या मारणऱ्या इच्छांना तिलांजली देता  यावी, त्यावर विजय मिळवता यावा. यासाठी रमजानचं विशेष महत्त्व आहे.
महिनाभरात सदाचार ग्रहण करावेत. वाईट विचार आणि कर्मांना थारा न देता चांगले आचरण करावं, हा सुप्त हेतू रमजानचा आहे. रोजा स्थितीत केवळ उपाशी राहून झोपा काढणे किंवा आराम करण्यास मनाई करण्यात आलीय. रोजा स्थितीतही आपली दिनचर्या थांबू न देता कामं करत राहावीत. असा नियम घालण्यात आला आहे. आपण वर्षभर बकाबका खातच  असतो, किमान महिनाभर तरी शरीरातील अवयवांना आराम मिळावा हादेखील शास्त्रीय हेतू रमजानमागे असतो.
रमजानच्या शेवटच्या दहा दिवसाचं खूप महत्त्व आहे. या काळात इबादतचा कालावधी वाढवला जातो. तसेच रोजे मीस होऊ नये याची विषेश काळजी घेतली जाते. २० दिवसांत  आध्यात्मिक वातावरण तयार झाल्यानं, महिना संपतोय याची रुखरुख जाणवायला लागते. त्यामुळे महिन्याचे खास क्षण राखून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्ऌप्त्या योजल्या जातात. या  दिवसात कुटुंबातले परगावी असलेले सदस्य मुळगावी परत येतात. नातवं आणि मुलींना खास बोलावणं पाठवून आणलं जातं. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचं खास सेलेब्रेशन  सुरू होतं. खरेदी आणि हॉटेलिंगची आठवडाभर धूम असते. कुटुंबातील अनेक जण जमा झाल्यानं सहरी आणि इफ्तारी कौटुंबिक मेळावाच असतो. अलिकडे हॉटलिंगचं फॅड वाढलं तसं  इफ्तारच्या पद्धतीदेखील बदलल्या आहेत. सुरवातीला फक्त हे फॅड महानगरापुरतं मर्यादित होतं. पण आता हे फॅड छोट्या शहरापर्यंतही येऊन पोहचलंय. छोट्या शहरात व्हेजनॉनव्हेज  खानावळी इफ्तारीचं 'खास इंतजाम' करतात. त्यात इस्लामी ढंगाच्या खानावळीत तर रुबाबच वेगळा असतो. इफ्तारीसाठी हॉटेलची खास सजावट केली जाते. मित्र-मंडळी तसेच घरातलं  अख्ख कुटुंब इफ्तार पार्टीसाठी हॉटेलला जातात. तसेच फँक्शन हॉलमध्ये खास इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. मित्र-परिवार आणि नात्यातल्या मंडळींना खास मेजवानी दिली जाते.  तसेच मदरसा आणि आश्रमशाळेतील मुलांना इफ्तारी आणि सहरीची सोय केली जाते. ईदनंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी अख्ख कुटुंब ‘बासी ईद’  साजरी केली जाते. त्यासाठी संपूर्ण कुटुंब टूरिस्ट हब किंवा शहरातील सार्वजनिक गार्डनला जातात. यातून कौटुंबिक आनंद मिळवणं हाच हेतू असतो. मुस्लिम राष्ट्रात तर रमजानसाठी  महिनाभराची सुट्टी जाहीर केली जाते. आपल्याकडे तर खास रमजानसाठी उर्दू शाळांची वेळ अध्र्यावर आणली जाते. रमजान महिना खाऊच्या वेगवेगळ्या पदार्थासाठीदेखील ओळखला  जातो. घरात तर महिनाभर खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, भोपाळ, लखनऊ, मुंबई, म्हैसूर ही शहरं रमजानच्या विशेष खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहेत.. चवीष्ठ नॉनव्हेजची असंख्य प्रकार रमजान महिन्यात विशेष आकर्षणं असतात, हैदराबादला हरीस आणि हलीम, औरंगाबादला फालुदा, मुंबईला मालपोवा, दिल्लीला पराठे रात्रभर  ग्राहकांच्या सेवेत रुजू असतात. हॉटेलमध्ये सहरीची खास सोय केलेली असते. दिल्लीला चांदणी चौक, मुंबईला महंमद अली रोड, औरंगाबादला बुढ्ढी लेन, हैदराबादला चारमिनार अशी  प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं खवैय्यांसाठी विशेष मेजवानी असते. दुसरीकडे मार्केटची रमजानला वेगळी तयारी सुरू असते. खरेदीदाराच्या पसंती व आवडीनिवडी लक्षात घेता मार्केट  सजवलं जातात. खाद्यवस्तु, कपडे आणि दागीण्यांची रेलचेल ग्राहकांना मार्केटकडे खुणावत असते. ईदला नवा कपडा घालणं सुन्नत समजलं जातं. सुन्नत म्हणजे शुभ, तसं नवीन  कपडे घालावी अशी सक्ती किंवा अट नाहीये. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार कपड्यांची खरेदी करतो. त्यामुळे घरात ईदला लग्नघरासारखी कपड्यांची खरेदी होते. पुरुष मंडळी  पठाणी, शेरवानी, कुडता-पायजमाला पसंती देतात. तर महिलांकडून जरीदार आणि टिकल्यांच्या वस्त्रांची मुख्यत्वे निवड केली जाते. पंजाबी ड्रेस आणि साडी या महिलांसाठी सदाबहार  वस्त्रे मानली जातात. यासह रोज वापरण्यासाठी एखाद-दुसरा ड्रेस हमखास ईदला घेतला जातो. घरात-दुकानावर तसेच ऑफीसवर काम करणारे एकूण सर्व सव्र्हंटलादेखील रमजानमध्ये  कपडे घेतली जातात. जाळीदार टोप्या, उच्च दर्जाची अत्तरं रमजानचं खास आकर्षण असते. हजारो रुपये टोप्या आणि अत्तरांवर खर्च केली जातात.
रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केला जातो. वर्षभरातील जकात या महिन्यात काढली जाते. जकात काढणे म्हणजे, आपल्या कमाईतून गरीबांसाठी विषेश समभाग काढला  जातो. दर माणसी विशिष्ट ठराविक रक्कम जकात म्हणून काढली जाते. पैसा, कपडे, स्रfगणे, धान्य आणि गरजेच्या वस्तु या स्वरुपात ही जकात काढली जाते. जकात काढण्याचं एक  महत्त्वाचं कारण म्हणजे, समाजातील आर्थिक दुबळ्या गटांना इद साजरी करण्याचा आनंद मिळावा. त्यासाठी प्रत्येकांनी आपल्या कमाईचा विशिष्ट भाग आर्थिक दुबळ्या गटांसाठी  काढायचा असतो. ही जकात स्थावर मालमत्ता, रोकड आणि स्रfगण्यांच्या मार्केट व्यॅल्यूएशनवर ठरवली जाते. ईद-उल-फितरची नमाज होण्यापूर्वी जकात आर्थिक दुबळ्या गटांपर्यत पोहचवणं बंधनकारक असते.
शिरखुर्मा हे ईदचं वेगळंच आकर्षण असतं. शत्रूता विसरुन सर्वांना ईदच्या भेटीगाठी घेतल्या जातात. जुनी विखुरलेली नाती ईदला सावरली जातात. नवी नाती जुळवण्यासाठीदेखील ईदची  निवड केली जाते. घरातल्या बच्चेकंपनी आणि लहान बहिणींना ईदी म्हणजे भेटवस्तु दिल्या जातात. ईदला पाहुणे आणि मित्र-मंडळींना आग्रहानं बोलावलं जातं. त्यांचा विशेष पाहुणचार  केला जातो. घरात बोलावून शिरखुर्मा, गुलगुले आणि लज्जतदार फुड खाऊ घातले जातात. तसेच येणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या व्हरायटीची अत्तरं लावली जातात. महिनाभर रोजा  असल्यानं अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा घालवण्यासाठी शिरखुर्म्यात मुख्यत्वे ड्रायफ्रूटचा वापर केला जातो. दोन तीन वाट्या शिरखुर्माचं शरबत घेतल्यास तरतरी वाटायला लागते.  ईदच्या दिवशी मित्र आणि पाहुण्यांना विशेष जेवणावळीदेखील दिल्या जातात.

-कलीम अजीम, अंबाजोगाई

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget