Latest Post

इस्लाम हा अखिल मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने दिलेली एक अनुपम भेट आहे. इस्लाम अखिल मानव जातीसाठी एकमेव ईश्वरी धर्म आहे. हा नुसता धर्मच नसून एक परिपूर्ण  ईश्वरी जीवनव्यवस्था आहे. एक अशी व्यवस्था जी मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाविषयी तसेच अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, सामाजिक व्यवस्था व  न्यायव्यवस्था इत्यादी सर्वच बाबीबद्दल सखोल चर्चा आणि परिपूर्ण मार्गदर्शन करणारी एकमेव संतुलित आणि आदर्शव्यवस्था आहे.
इस्लाम हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ शांती, पावित्र्य आणि संपूर्ण जीवन ईश्वरी नियमानुसार जगणे म्हणजेच इस्लाम होय. आणि जो संपूर्ण ईश्वरी नियमानुसार जीवन जगतो तो  मुस्लिम आहे. मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे की, 1) माणसाने आपल्या अंतःकरणाने अल्लाहाच्या अस्तित्वाला एक मानने. 2) अल्लाहाच्या प्रेषितांवर म्हणजेच आदरणीय  आदमअलैह सलाम पासून ते अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) पर्यंत ही प्रेषितांची शृंखला होती त्याला मान्य करणे. आणि अल्लाहाच्या अंतिम प्रेषितावर जी परिपूर्ण ईश्वरी  जीवनव्यवस्था अवतरित झाली होती त्याला मान्य करणे.

इस्लामचे मुलभूत पंचतत्व :- इस्लाम ही एक संपूर्ण जीवनव्यवस्था असल्याकारणाने साहजिकच या जीवनातील प्रत्येक कर्म इस्लामच्या दृष्टीने इबादत (सत्कर्म, उपासना, प्रार्थना)  ठरते. उपासनेचे काही प्रकार असे आहेत जे सर्वांना बंधनकारक व अनिवार्य आहेत. ते मूलतः पाच आहेत. ज्यांना इस्लामचे आधारस्तंभ म्हटले जाते. हेच पाच स्तंभ ईश समर्पित 
जीवनाची रूपरेखा निर्धारित करतात.

1) इमान (श्रद्धा) :- हे मान्य करणे ही की सृष्टी आपोआप अस्तित्वात आलेली नाही आणि असेही नाही की या सृष्टीचे अनेकानेक स्वामी, निर्माते व शासक असावेत. या संपूर्ण  विश्वाचा स्वामी, निर्माता, शासक, नियंत्रक, सामर्थ्यवान, प्रभूत्वशाली एकमेव एकच अल्लाह (ईश्वर) आहे. अर्थात इमानने अभिप्रेत आहे की, साक्ष देणे की, अल्लाह (ईश्वर) शिवाय  कोणीही नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांना अंतिम प्रेषित म्हणून मान्य करण्याचा अर्थ हा आहे की, जीवनाच्या प्रत्येक  क्षेत्रात ईश्वरांने जी परिपूर्ण आणि अंतिम जीवनव्यवस्था अंतिम प्रेषितावरती अवतरित केली. तयला मान्य करून त्यानुसार संपूर्ण जीवनात त्याचे अनुसरण करावे.

2) नमाज (प्रार्थना) : प्रत्येक मुस्लिमावर एक अनिवार्य कर्तव्य म्हणून दिवसातून पाच वेळा सामुहिक नमाज अदा करणे बंधनकारक आहे. नमाजच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्तीचा  अल्लाहशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. नमाजमध्ये अल्लाह समोर नतमस्तक होताना माणसांतील गर्विष्ठपणा संपुष्ठात येतो. नमाजमुळे संपूर्ण समाजात समता प्रस्थापित होते. नमाज  माणसाच्या चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहचविते. नमाज माणसाचे अंतः करण शुद्ध करते व त्याला दुराचार व निर्लज्जतेपासून परावृत्त करते.

3) रोजा (उपवास) - रोजा प्रत्येक मुस्लिमावर रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. याचा उल्लेख कुरआनमध्ये असा करण्यात आला आहे. ’’या अय्युहल्लजीना आमनु कुतिबा  अलैकुमस् सियामु कमा कुतिबा अलल-लजीना निकबलिकुम लाअल्लक्कुम तत्तकून. (सुरे अलबकरा : आयत क्र. 183.)

अर्थ : हे श्रद्धावंतांनों! तुम्हावर उपवास त्याच प्रमाणे अनिवार्य करण्यात आले आहेत, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वीच्या उम्मतींच्या अनुयायांवरती अनिवार्य केले गेले होते. जेणेकरून  तुम्हामध्ये तकवा (संयम, ईशपरायणता, चारित्र्यसंपन्नता) निर्माण व्हावा.
रोजा केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हटले ’’ जो रोजा ठेवूनही खोटे बोलणे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काहीच गरज नाही.’’ पवित्र कुरआनने इशपरायणता हाच रोजांचा खरा उद्देश आहे. असा उल्लेख केला आहे. जो वरील आयातींमध्ये दर्शवितो, ’’तकव्याचा अर्थच आहे  ईशपराणता, ईश-भीरूता, आचार-विचारांची शुद्धता चारित्र्य संपन्नता. ज्याचा परिपूर्णपणे संपूर्ण जीवनावरती परिणाम असावा.

4) जकात : प्रत्येक धनसंपन्न मुस्लिामासाठी त्याच्या पवित्र कमाईतून संपत्तीच्या 2.5 प्रतिशत वर्षा अखेरच्या हिशोबांती ठरवून दिलेली रक्कम होय. जकात ही श्रीमंत लोकांच्या  संपत्तीवरती ज्याचे प्रमाण 52.5 तोळे चांदी (595 ग्रॅम) व 7 तोळे सोने (70 ग्रॅम) यांच्या किमती बरोबरच्या व त्या अतिरिक्त रक्कमेवर सुद्धा 100 रू. वर 2.5 पैसे म्हणजेच 2.5  प्रतिशत यानुसार श्रीमंत लोकांचा संपत्तीवरचा गरीबांचा काढलेला वाटा होय. जकात नियोजन सामुहिकरित्या व्हावे असे निर्देश आहेत. जकातचा उपयोग समाजातील दीन-दुबळ्यांसाठी,  प्रवासी, गुलामांना व कैद्यांना मुक्त करण्यासाठी, सदाचाराच्या संवर्धनासाठी व दृष्टकृत्यांच्या निर्मुलनासाठी, इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी व ईशमार्गात केला जावा, असे संकेत पवित्र  कुरआनात आहेत.

5) हज :- आर्थिक व शारीरिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिमावर आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे. हजमध्ये मक्का येथील पवित्र काबागृहाची प्रदक्षिणा (तवाफ) व हजच्या  इतर  विधिंचा समावेश होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण (तमाम) मुस्लिम बांधव हजसाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वांचा एकच पोशाख - एहरामच्या दोन पांढऱ्या  शुभ्र चादरी ! विश्वबंधूत्व व समतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा आगळा वेगळा, डोळे दिपवून टाकणारा असा हा महान सोहळा ! इस्लामची वरील पाचही अनिवार्य कर्तव्ये पुरूष व स्त्रिया  दोघांना सारखेच लागू आहेत. हे येथे विषद करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीपासूनच इस्लामने स्त्रियांनाही मानाचे स्थान दिले आहे. ईमान, नमाज, रोजे, जकात, हज इत्यादी स्त्रियांसाठी 
बंधनकारक आहे.
जीवनाचा उद्देश :-
अल्लाहने या सृष्टीत व्यर्थ अशी कोणतीही वस्तू निर्माण केली नाही, मग ती कितीही क्षुल्लक का असेना. मग या सृष्टीतील सर्वात महान असलेल्या मानवाची निर्मिती का व्यर्थ असेल?  कदापि नव्हे! हे जीवन प्रत्येक माणसासाठी परीक्षा आहे. साधन-सामुग्री देवून पात्रता देवून, आचार-विचारांचे स्वातंत्र्य देवून, सन्मार्ग व वाम मार्ग स्पष्ट करून येथे प्रत्येकाची वेगवेगळ्या  स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. की कोण स्वेच्छेने ईश सन्मार्गाची निवड करतो कोण वाममार्गाची निवड करतो हे जीवन खरे तर ईश अज्ञांचे अनुपालन करण्यासाठी आहे.  अल्लाहशी कृतज्ञ राहण्यासाठी आहे, कृतघ्नतेसाठी नव्हे.

प्रत्येक व्यक्ती उत्तरदायी :-
सद्य जीवन नाशिवंत असून प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. तद्वतच या संपूर्ण सृष्टिचाही एक ठराविक वेळी अंत होईल. तत्पश्चात समस्त मानवजातीला पुन्हा जीवंत केले जाईल.  न्याय-निवाडा होईल. प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. ज्यांनी ईशसंदेशाचा स्वीकार करून त्यानुसार कर्म केले, त्यांना पुरस्कृत केले जाईल व ज्यांनी ईश-संदेश  धुडकावून वाममार्ग अंगीकारला, अन्याय-अत्याचार केला व केवळ चंगळवादी जीवन जगले त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. मृत्यू पश्चातचे हे जीवन अविनाशी, निरंतर, आनंत व  शाश्वत असेल.

पवित्र कुरआनातील या सर्वांगीण मार्गदर्शनानुसार प्रेषित मुहम्मदांनी (स.) एक आदर्श राष्ट्र निर्माण केले. कुरआन : अल्लाहने पवित्र कुरआनला दिव्य प्रकरटनाद्वारे (वह्य) प्रेषित मुहम्मदांवर (सल्ल.) अवतरित केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अशिक्षित होते. त्यांना ना लिहिता येत होत न वाचता येत होते. त्यांच्या अनुयायांनी पवित्र कुरआनला मुखोदत करून व  लिपीबद्ध करून सुरक्षित ठेवले हे कार्य प्रेषितांच्या देखरेखीत त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. ज्या पवित्र कुरआनच्या आधारे प्रेषित मुहमम्मद (सल्ल.) यांनी एक आदर्श राष्ट्र उभे केले. तो  कुरआन आजही अगदी त्याच मूळ स्वरूपात, तंतोतंत जसाच्यातसा उपलब्ध आहे. त्यात यत्कींचितही हेराफेरी झाली नाही. आणि हा पवित्र संदेश अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक  आहे. जगातल्या बहुतेक भाषेमध्ये त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत.

हदीस : प्रेषित मुहम्मद सल्ल. उपदेशांना हदीस म्हणून संबोधले जाते. मोठी सतर्कता व सावधगिरी बाळगून त्यांच्या अनुयायांनी हदीसचे संकलन केले. कुरआन हा ईशग्रंथ असून हदीस  हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. इस्लामच्या दृष्टीकोनातून सदाचार म्हणजे केवळ नमाज, रोजा, जकात व हज यात्राच नव्हे. तर जीवनातील प्रत्येक पवित्र कार्य हे सदाचार होय. अल्लाह  जवळ प्रार्थना आहे की, तो आम्हा सर्वांना व अखिल मानवजातीला त्याच्या नियमावरती पूर्णपणे सत्यावरती आधारित जीवन जगण्याची सद्बुद्धी देवो व पारलौकीक (मरणोत्तर) जीवनातील यश प्राप्ती होवो. आमीन! सुम्मा आमीन!

- शेख मु. जुबैर अहमद, लातूर

ह. जाबीर (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वोत्कृष्ट वाणी अल्लाहचा ग्रंथ (कुरआन) आणि सर्वोत्कृष्ट चारित्र्य मुहम्मद (स.) यांचे चारित्र्य होय.’’  (हदीस - मुस्लिम)
मा. अनस (रजी.) यांचे निवेदन आहे, मला प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या प्रिय मुला! जर तू अशाप्रकारे जीवन पार पाडू शकशील की, तुझ्या मनात कोणाचे अनिष्ट चिंतन  नसावे तर असेच जीवन व्यतीत कर. मग फर्माविले, ‘‘आणि हीच माझी पद्धती आहे. (की माझ्या मनात कोणासाठी खोट नाही) आणि ज्याने माझ्या आचरण शैलीशी प्रेम राखले तर  नि:संशय त्याने माझ्याशी प्रेम राखले आणि ज्याने माझ्याशी प्रेम राखले, तो जन्नतमध्ये माझ्या सोबत राहील. (हदीस - मुस्लिम)

प्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे....
मा. अब्दुल्ला यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित (स.) यांच्याजवळ आला आणि तो प्रेषित (स.) यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘जे  तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हंटले की ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या  बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्याच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी, पुरापेक्षा जास्त वेगाने  सरसावून येतात. (हदीस - तिर्मिजी)

भावार्थ
एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्याच्या पसंतीस आपली पसंत, आणि त्याच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. ‘प्रिय’ ज्या  मार्गावरून चालतो त्यास आपला जीवनमार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे. आणि बलिदानासाठी, प्राणार्पण करण्यासाठी सदैव तत्पर असावे.  प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ त्यांचे एक एक पाऊलचिन्ह व प्रत्येक मार्ग चिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार चालावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन  केले, त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ ही प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे आणि ‘बद्र व हुनेन’ देखील त्यांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर  चालण्याचा परिणाम स्रfरद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टीचा मारा होईल. आर्थिक आघात हा सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी  प्रेमाने केला जाऊ शकतो. इमानधारक मनुष्य अशा वेळी हा विचार करतो की अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही, आणि शेवटी मी एक गुलाम  आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे, अशा प्रकारचे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करते. सैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम  करून टाकते. प्रेषित (स.) यांनी असे सांगितले की, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य (अपेक्षित दर्जाचा) ईमानधारक होऊ शकत नाही, जो पर्यंत मी त्याच्या नजरेत, त्याचा पिता, त्याचे  पूत्र, आणि सर्व माणसापेक्षा अधिक प्रिय न व्हावे. (हदीस - बुखारी, मुस्लीम)
मनुष्य इतर सर्वांचे प्रेम आणि निकडींना बाजूला सारून केवळ प्रेषित (स.) यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार होईल, तेव्हा समजून घ्या की तो खऱ्या अर्थाने मोमीन  (ईमानधारक) आहे.

आपण ज्या घरात वास्तव्य करतो त्या घराला घरपण स्त्रीच बहाल करते. एखाद्या व्यक्तीची साधी झोपडी आहे, तिला घरपण एक सुशील सुसंस्कृत स्त्री निर्माण करून देते, तर एखाद्या महालरूपी घराला संस्कारहीन स्त्री ’घर’ राहू देत नाही. म्हणून घराचे घरपण निर्माण होते ते स्त्रीमुळे आणि घरपणाचे अस्तित्व संपुष्टात येते तेदेखील स्त्रीमुळेच. पण इस्लाम सांगतो की स्त्रीने घराला घरपण बहाल केलेच पाहिजे आणि ते तिचे कर्तव्य आहे. एखादे घर बाहेरून प्रचंड शोभिवंत असेल, पण आतमध्ये वास्तव्य करणारे जर सैतानी वृत्तीचे असतील तर त्याला घर म्हणता येत नाही. म्हणून घर म्हणजे नेमके काय आणि ते कोणामुळे निर्माण होते याविषयी थोडे पाहू या.
    ”घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
    तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.”
    या काव्यपंक्तीवरून चार भिंतीचे घर होत नाही तर त्याच घराची माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह यांचा वावर असायला पाहिजे. पोकळ नाती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्या नात्यांमध्ये प्रेमाची उब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची उब मिळत नाही, वात्सल्याची शितलता सुखावत नाही, नात्यांतील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा सुखवत नाही, त्याला घर कसे म्हणायचे? घर भिंती बांधल्याने तयार होत नाही, तर घर त्या घरातील स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांशी असणार्‍या सद्वर्तनाने तयार होते. कारण पूर्णवेळ घराची देखभाल करणारी मुख्य स्त्री घराच्या संसाराचा कणा असते. जसा माणूस त्याच्या पाठीच्या कण्यावर उभा असतो, तसा संसाराचा कणा स्त्री आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याचा आजार झाला तर ती व्यक्ती खाली वाकून चालते अगदी, तसेच स्त्री जर दुबळी, अज्ञानी, अशिक्षित असेल तर प्रपंचही तसाच चालतो. म्हणूनच म्हटले आहे, ”शिकलेली आई घराला पुढे नेई.” इस्लामने तर शिक्षण अनिवार्य केले आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. कसलाही भेदभाव न करता शिक्षण देणे हे अनिवार्य केले आहे. मुलींसाठी शिक्षण व स्त्रीचा फार मोठा सन्मान इस्लामने हजारो वर्षांपूर्वी केला आहे.  अशा अनेक प्रकारे स्त्रियांचा इस्लामने सन्मान केला.
    स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरूद्ध व स्त्रियांच्या गुलामीविरोधात सर्वप्रथम इस्लामने आवाज उठविला. जगात स्त्रियांना उच्च स्थान देणारा अरबस्थान हा सर्वप्रथम देश ठरला. इस्लामच्या तत्वज्ञानात स्त्री-पुरूष दोघांमध्ये थोडाही फरक केला नाही. पुण्य करणारे सर्वच स्वर्गात जातील त्यात कोणताही भेदभाव होणार नाही किंवा अन्याय होणार नाही, मग ती स्त्री असो वा पुरूष. इस्लामने दानधर्म (जकात)  याला महत्त्व दिले आहे. इस्लाममध्ये जी व्यक्ती आपली विधवा व घटस्फोटित मुलीचा सांभाळ करते ते सर्वात मोठे दान आहे. कारण विधवा व घटस्फोटित स्त्रीला आपल्या पित्याशिवाय कोणीही दूसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत तर त्या विधवा, घटस्फोटित सत्रीचा (मुलीचा) सांभळ केल्यास ते सर्वात मोठे दान (पुण्य) ठरते. घटस्फोटित स्त्री वडिलाशिवाय दुसर्‍या कोणाकडे जाऊच शकत नाही. अशा वेळी तिला आधार देण्यासाठी व तिचा सांभाळ करण्यासाठीच या कार्याला पुण्यकार्य म्हटले आहे.
    ”एखाद्या सद्वर्तनी, सुशील (पतिव्रता) स्त्रीवर व्याभिचाराचा तसेच चारित्रहीनतेचा आरोप करणे म्हणजे माणसाला संपविणार्‍या सात गुन्ह्यांपैकी एक आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणार्‍या इसमास कोणत्याही प्रकारची साक्ष गृहीत न धरता 80 फटके मारावेत.” वरील विवेचनावरून हे लक्षात येते की आपल्या स्वार्थासाठी अथवा राग-मत्सरासाठी एखादी व्यक्ती स्त्रीची बदनामी करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करील अथवा आपली मनिषा (इच्छा) पूर्ण करण्यासाठी स्त्रीची बदनामी करून आपला स्वार्थ साधेल, अशा प्रकारचे किस्से होऊ शकतात व एखाद्या चारित्र्य संपन्न, सुशील, सुसंस्कृत निरपराधी स्त्रीची अवहेलना, बदनामी, चारित्र्यहीनता होत असेल किंवा एखादी व्यक्ती तसे भासवत असेल तर त्याला त्याने सादर केेलेली कोणतीही साक्ष मान्य न करता 80 फटके (चाबकाने) मारावेत. ही शिक्षा फर्मावत असताना ज्या स्त्रीवर आरोप कला आहे ती स्त्री सद्वर्तनी (पतिव्रता) आहे का, ते पाहणे जरूरीचे आहे. इस्लामने स्त्री व पुरूषाचे कार्यक्षेत्र जरी वेगवेगळे ठेवले असले तरी स्त्रीला कार्य करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. धर्माच्या मर्यादेत राहून कार्य करणे म्हणजे आपले कार्य नीतीमत्तेला धरून असावे, तसेच ते आपल्या चारित्र्यात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलेे आहे. म्हणून स्त्रियांना कुरआनने शिक्षण अनिवार्य केले आहे. जर एखाद्या स्त्रीने कुरआनचे शिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केले आणि ती म्हातारी होऊन मरण पावली तर ती स्वर्गात गेल्यानंतर तरूण होईल, असे प्रतिपादन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आहे. याच्याच उलट जी स्त्री आपल्या मिळालेल्या आयुष्यात (मृत्यू पश्‍चाताच्या जीवनाची परीक्षा) दांभिकपणे वागेल, बदवर्तन करेल, तिला अंतिम महाप्रलयाच्या दिनी (न्यायनिवाड्याच्या दिवशी) शिक्षा होणारच, यात सुतभरदेखील शंका नाही. एवढेच नाही तर अनेक देवांची उपासना करणे हेदेखील नरकयातनेचे आमंत्रण ठरविले आहे. म्हणून इस्लामने (स्त्री-पुरूष) फक्त आणि फक्त इस्लाम धर्मास मानावे, इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना मानावे, तसेच त्यांचे धर्मांचे आणि मानवजातीस योग्य असणारे सर्व विचार सर्व लोकांपर्यंत पोहचवावेत (फक्त मुस्लिम लोकांपर्यंत नाही), असे करणे पुण्यकर्म समजले जाते. याशिवाय इतर देवांची आराधना करणे, अनेकेश्‍वरत्व जोपासने हेदेखील दांभिक कृत्याच्या बरोबरीचे कृत्य आहे. इस्लाम जसा स्त्रीचा सन्मान करतो तसाच तो त्यांना काही मर्यादादेखील घालतो. सर्व बाबतीत इस्लामने स्त्री-पुरूषांना समान दर्जा देऊनसुद्धा दोघांत स्त्रीचे स्थान उच्च समजावले आहे. आणि जो पुरूष स्त्रीशी अत्यंत आदराने वागतो तो उत्तमोत्तम पुरूष होय. जसे पुरूषांना स्त्रियांशी आदराने वागावयास सांगतो, तसेच स्त्रीलाही दुसर्‍या स्त्रीशी सन्मानाने वागण्याची ताकीद केली आहे. मग ती स्त्री कितीही गरीब वा कितीही श्रीमंत असो, तिने इतर स्त्रियांची टिंगल (चेष्टा) करू नये. आपसात बोलताना टोमने मारू नयेत. एकमेकींचा वाईट नावाने उल्लेख करू नये (शिव्या-शाप), तसेच एकमेकीचीं चहाडी-चुगली करू नये, असे वागणार्‍या स्त्रीचा इस्लाम विरोध करतो. इस्लामने स्त्रीला बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या व वृद्धापकाळात पुत्राच्या संरक्षणात राहण्यास सांगून त्यांच्यासमोर आपली मते मांडण्यास मुभा दिली, तर त्यास पुरूषांनी स्वातंत्र दिले. तसेच तिला गृहकार्यात मुबलक प्रमाणात अधिकार दिले. सर्वच स्त्रिया कपटी, पापी, दोषी, दुर्गुणी असतात असे नाही. त्याचबरोबर विवाह करताना स्त्रीचे वय पुरूषापेक्षा कमीच असले पाहिजे असाही धर्माचा काही संकेत नाही. याचे उदाहरण म्हणजे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे पहिल्या विवाहाच्या वेळी वय 25 वर्षे तर त्यांची पत्नी माननीय खदीजा यांचे वय 40 वर्षे होते. या विवाहामध्ये वधू वरापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठी होती. त्या विवाहास गैर समजले नाही. सारांश, सध्या मुस्लिमांमध्ये (फक्त भारतात) वधू वरापेक्षा लहानच असायला पाहिजे असा जो गैरसमज पसरला आहे तो साफ चुकीचा आहे. कारण वय कमी अधिक असले तरी चालते, मात्र ते संबंध विवाहाच्या माध्यमातून मान्य झालेले असावेत.
    विवाहाने दोघांना (पती पत्नींना) काही अधिकार प्राप्त होतात व ते बजावणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. म्हणजेच स्त्री-पुरूषांचे एकमेकांवर अधिकार आहेत. तसेच वैवाहिक संबंधातूनच झालेली संतती इस्लाम वैध समजतो. संततीचे संगोपन करीत असताना त्या संततीत ईशपरायणता आणि परलोकीचे सृष्टीच्या प्रति शुभचिंतक बनून वृद्धींगत व्हावी. मुलाचे पालनपोषण, संगोपन मुलांशी संवाद करा, त्यांना सदाचार शिकवा, मुलांना रागाऊ नका, त्यांना ताकीद आहे की प्राण्यांनादेखील अपशब्द वापरू नका. मुलांच्या खोट्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करू नका, मुलांना खोटे बोलू देऊ नका, स्वतःही कोणाशी खोटे बोलू नका, मुलांना मारू-झोडू नका, त्यांना शिक्षा करू नका, मुलांवर आरोप करू नका, असे वर्तन आपण आपल्या मुलांशी केले तर ती बिघडणार नाहीत तर चांगलीच घडतील. हे सर्व मुलांना अगदी लहान वयापासून शिकवावे लागते व लहान मुल जास्त काळ आईजवळ असतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियांची आहे. म्हणजे पुरूषांनी काहीही जबाबदारी स्वीकारायची नाही असे नाही.
    सुशील स्त्रीच्या चारित्र्यावर (व्यभिचाराचा) जसा आरोप करायचा नाही याची सूचना इस्लामने केली तसेच स्त्रीने आपले चारित्र्य सांभाळावे. व्याभिचाराचा विचारदेखील मनात यायला नको. व्याभिचार म्हणजे स्त्री-पुरूष यांनी विवाह न करता वैवाहिक जीवन (शारीरिक संबंधासह) जगणे म्हणजेच व्याभिचार होय. व्यभिचार ही अत्यंत वाईट बाब आहे. ती धार्मिकदृष्ट्या पापाची व दुष्कृत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या बाबीला समाजाची मान्यता नाही. उलट ही बाब लज्जास्पद आहे. म्हणून इस्लामने समाजाला व्याभिचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामने विवाह एक धार्मिक विधी जरी समजले असले तरी तो एक करार असून दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. याची सुरूवात सर्वात अगोदर इस्लामने केली आहे.

- सय्यद अबुल आला मौदूदी
    या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो.
    इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि संन्यास सत्यधर्माच्या विरुद्ध आहे आणि जगात त्यामुळे बिघाड आणि विकृती येते. इस्लामचे अनुयायी उपद्रवांना घाबरून वन आणि पर्वताकडे पळ काढीत नाही, उलट अल्लाहच्या मार्गात जिहाद करून त्यांचा मुकाबला करतात.

आयएमपीटी अ.क्र. 126   -पृष्ठे - 16   मूल्य - 08         आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/vl4d8z5tdyljfzglg9894duplfutzu14

इस्लामने अगदी स्पष्ट आदेश जकात कशी जमा करावी आणि कशी खर्च करावी याबद्दल दिलेले आहेत. जकातव्यतिरिक्त दानधर्म करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य जकातसाठी दिले गेलेले नाही. या बाबतीत जकातचे व्यवस्थापन हे नमाज सामुदायिकरित्या कायम करण्यासारखे आहेत. ही सामुदायिक व्यवस्था आहे. इस्लामी शासन आपल्या महसूल खात्यातर्फे जकात गोळा करते आणि गरजूंना त्याचे वाटप करते. शासनाला जकात देणे अनिवार्य आहे. कुरआन जकात कुणासाठी खर्च करावी हे तपशीलाने सांगत आहे आणि जकातच्या खर्चाचा खातेवाटप स्पष्ट देत आहे. जे जकातसाठी काम करतात त्यांचा विशेष उल्लेख कुरआन करीत आहे. कुरआनच्या स्पष्टीकरणानुसार जकात गोळा करणे आणि वाटप करणे ही शासनाची धार्मिक जबाबदारी आहे आणि हे इस्लामी व्यवस्थेचे एक महत्त्वाचे अंग आहे. हदीसमध्ये अनेक वेळा याबाबत उल्लेख आलेला आहे.
जकातची सामुदायिक व्यवस्था खालील कारणांमुळे आवश्यक आहे.
१) हे इस्लामच्या तत्त्वानुसार आहे. इस्लाम स्वभावतः सामुदायिक आहे. इस्लाम जगाला जे देऊ इच्छितो, ते त्याच्या सामुदायिक व्यवस्थेतूनच शक्य आहे. यामुळे मुस्लिम समाज एक शिस्तबध्द आणि योजनाबध्द जीवन कंठत राहतो.
२) गरीबांची मदत करून त्यांचे कल्याण करणे, इस्लामचे रक्षण इ. अत्यावश्यक गोष्टी आहेत, परंतु श्रीमंत लोकांचा या बाबींकडे हलगर्जीपणा नजरेआड करता येण्यासारखा नाही. म्हणूनच जकात गोळा करण्याची जबाबदारी शासनाकडे देऊन इस्लाम या हक्कांची अंमलबजावणी पूर्ण रूपात करू इच्छितो.
जेथे इस्लामी शासन नाही तेथे सामुदायिक व्यवस्था यासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. नमाजला कायम करणे, विशेषतः जुमा (शुक्रवार) आणि दोन ईदच्या वेळी नेतृत्व हे त्या नमाजचे शासनकर्त्याने करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की नेता गैरहजर असल्यास प्रत्येकाने नमाज स्वतंत्र्यरित्या अदा करावी. समाजातील लोकांनी एखादा इमाम नियुक्त करून अशा स्थितीत सामुदायिक नमाज अदा करावी. जकातसाठीसुध्दा हीच अट आहे. इस्लामी शासन अस्तित्वात जरी नसले तरी जकातची व्यवस्था सामुदायिकरीतीने होणे आवश्यक आहे. मशिद बांधण्यासाठी मुस्लिम समाज जसा एकत्र येतो आणि नमाजसाठी इमाम नियुक्त करून सामुदायिक नमाज अदा केली जाते त्याचप्रमाणे त्यांनी जकात गोळा करण्यासाठी आणि जकात वितरण करण्यासाठी सामुदायिक व्यवस्था करावी. त्यासाठी ‘‘बैतुलमाल’’ (लोककोषागार) स्थापन करून मुस्लिम समाजात जकातचे व्यवस्थापन करावे. इस्लामी शासन जेथे नसेल तेथे अशा संस्था जकातचे हेतु साध्य करण्यास सहाय्यक ठरतात. अशी व्यवस्था ज्या मुस्लिम समुदायात केली नसेल तर ते सर्वजण चूक करत आहेत. एक धार्मिक अपराध करीत आहेत.
जकातसाठी शब्दावली: धार्मिक शब्दावलीत जकातसाठी आणखी दोन संज्ञा (नाव) वापरात आहेत. एक ‘‘सदका’’ (दान) आणि ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’- अल्लाहच्या नावाने खर्च करणे. या दोन्हींचा येथे विचार करू या. ‘सदका’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘सिदक’ या शब्दाने झालेली आहे. ज्याचा अर्थ सदाचार व देण्यासाठी गंभीर असा होतो. हे दोन्ही गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत हे सिध्द होते. तसेच ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’म्हणजे अल्लाहच्या नावाने म्हणजे अल्लाहच्या सेवेत खर्च करणे. जकात आणि दान देण्याचे अंतिम ध्येय अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे आहे. जकात अल्लाहच्या नावानेच दिली जाते हे त्याच्या मूळ हेतूमुळे कळून येते. म्हणून ही तिन्ही शब्दावली एकाच वास्तवतेची असून त्याचे हे तीन घटक आहेत.
कुरआनने मात्र ही तिन्ही नावं एकाच अर्थाने वापरली आहेत. जकात, सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे इ. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. हे गौण आहे की तिन्हींपैकी एखाद्या रूपात खर्च केला जात असेल. म्हणून कुरआन आणि हदीसमध्ये खर्च करण्याच्या हेतु आणि ध्येय यावर लक्ष दिले गेले आहे आणि वैधानिकतेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. इस्लामच्या कायद्यानुसार जकात देणे सधन मनुष्यासाठी आवश्यक आहे आणि कायद्याने बंधनकारक आहे. परंतु सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे ऐच्छिक आहे.

- मतीन तारिक बागपती
    या पॉकेट साईझ पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आला आहे. या गोष्टींद्वारा मुलांना सुबोध होऊन विचार करण्यास प्रेरणा सुद्धा मिळते.
    या पुस्तिकेत अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप, सदाचाराचा बदला, स्वकर्म महाकर्म, सदाचारी कोळी, तीन भाऊ, बाबरचे मानवता प्रेम आणि काम चुकारपणा वाईट आहे इ. गोष्टी आल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 123     -पृष्ठे - 12      मूल्य - 10    आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqgn6lgzu8hqlsmlcym6kxc5glqqfyj0


सर्वप्रथम अल्लाहचे आभार ज्याने रमजान सारखा पवित्रोत्तम महिना दिला. अन्य सर्व महिन्यांपेक्षा या महिन्याचे विशेष हे की याचे आगमन व गमन दोहोंसाठी मुसलमान उत्कंठेने   वाट पहात असतात आणि उत्कंठाही लाभाशिवाय थोडीच असते. तेव्हा हे असे लाभ तरी कोणते हे पाहणे उद्बोधक ठरते. या महिन्यातील लक्षवेधी बाबी – १) कुरआनचे नाजिल होणे,  २) रोजे, ३) शबे कद्र, ४) तरावीह आणि ५) जकात. या पाचमधील जकातचे महत्त्व ‘सलातुज्जकात’ या शब्दातूनच स्पष्ट होते. म्हणजेच नमाजबरोबरच जकातचे महत्त्व अल्लाहनेच  स्पष्ट केले आहे. तर रोजास मी जबाबदार आहे असे स्पष्ट करून कोणासही या बीबत कसलाही फरक करण्यास वाव नाही, भले हज जीवनात शक्य होवो न होवो हजचे महत्त्वही सारखेच.
येथे विचार प्रस्तुत आहे तो रमजानचे रोजे, जकात यांचा आइ म्हणून रमजानचे विशेषत्व वर स्पष्ट केले. नंतर काहीसे रोजाकडे वळावेरोजापासून आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते हे
सर्वश्रुत आहे, सर्वमान्यही आहे. आरोग्य ही बाब केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून त्याला सामाजिक महत्त्व आहे आणि ते म्हणजे चारित्र्य. मुसलमान चारित्र्यवान असतील आणि   म्हणूनच त्यास अल्लाहने बरगुजीदा कौम म्हणून घोषित करतानाच अशा चारित्र्यासाठी त्याने एक मंत्रही दिला तो तत्तकुन म्हणून अर्थात तकवा. एकदा का हा तकवा आत्मसात केला  की जीवन मग ते या भूतलावरील असो की मरणोत्तर ते यशस्वी असाच खुलासा कुरआनात आढळतो आणि तो मान्य असण्यास कोणतीही अडचण असू नये असे वाटते. कारण तकवा  म्हणजे अल्लाहप्रती प्रेम व भीती. म्हणजेच जे मी करत आहे, बोलत आहे, जो विचार माझ्या मनात चालला आहे, या सर्वांना अल्लाह जाणत असतो. सृष्टीतील प्रत्येक चीजवस्तूचा तो  मालक आहे. यात मानवही आलाच.
मानवाचा मालक अल्लाह व मानव हा त्याचा बंदा. आपण कोठेही नोकरी करत असलो किंवा इतर कोणताही धंदा-उद्योग, अल्लाहचे भय असेल तर भ्रष्टाचार होणे नाही. भ्रष्टाचार  म्हणजे तरी काय जो आचार भ्रष्ट तो भ्रष्टाचार! तो या तकवामुळे टळत असतो. असा हा तकवा उपलब्ध होण्यासाठीच हे रोजे. मी चुकून खायचे प्यायचे म्हटले तरी ते शक्य होत  नाही. अल्लाह हे जाणतो व आपला बंदा आपल्या कसोटीला उतरला याची नोंद बंद्याचे आमालनाम्यात एकदा का झाली की माझ्या कौमचा हा विश्वासू आपला अनुयायी खास जाणून  शिफारसयोग्य ठरतो. कारण त्याने चारित्र्य जपबले आहे. चारित्र्याचे सर्टिफिकेट जसे या भूतलावर लागते तसे ते दुसऱ्या जगतात म्हणजे मरणोत्तर ठिकाणी पाहिजे असते आणि ते  सर्वांनी येथूनच प्राप्त करून घ्यायचे असते. असे हे प्रमाणपत्र साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोजा होय. ज्यातून तकवाही लाभतो व चारित्र्याचे प्रमाणपत्रही लाभते. यापेक्षा  कोणास अधिक ते काय हवे.
सर्टिफिकेट कोणतेही असो ते प्राप्त करण्यापोटी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात आणि आपण अशा प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचे सिद्धही करावे लागते. अशी सिद्धता आपण तकवा  धारण केल्यास आपले काम सोपे होते. जसे रोजामुळे खोटे बोलणे विसरून जातो, कुविचारांना, कुकर्मांना थारा देत नसतो. साहजिक आपले मनावर हळूहळू का होईना ताबा मिळविणे  शक्य होते.सतत महिनाभर रोजाचे हेच कारण आहे. मात्र केवळ रोजे ठेवायचे म्हणून ठेवले तर अल्लाह यश न देता आपण उपाशी राहण्याचे, तहान सोसण्याचेच काम केले, जे  निरर्थक ठरते. आपला तकवा तसे करू देत नाही. अल्लाहच्या बंद्याचे भल्यासाठीच हे रोजे आहेत हे यावरून स्पष्ट व्हावे. याच महान मानवाने आपले बजेट सुनिश्चित करावे व  त्यानुसार अल्लाहला अपेक्षित असलेला त्याग मग तो पैशांच्या रूपात असो की धान्य-कपड्यांच्या, गरजूंना अशा त्यागातून मुक्त करण्याची संधी साधतानाच आपले चारित्र्याचे प्रमाणपत्र  साध्य करण्यासही भरीव मदत मिळते. हे कार्य करताना तसेच रोजे करताना आपण आपले नातलग याचे रोजे व्हावेत त्याचे जीवन उंचावे याचाही विचार मनी असतो. जो इस्लामचा   एक अविभाज्य घटक आहे. अर्थात सामान्यत: आपण रोजासाठी उठलो, शेजारी काय स्थिती आहे हे पाहतोच ना! सहरी-इफ्तारसाठी जी देवाणघेवाण होते ती प्रेम व ऋणानुबंधाचे  वाढीसाठीच असते. आणि हेच ऋणानुबंध सामाजिक बंधुता, एकोपा यासही दृढ करते. शबे कद्रचे महत्त्व तर न्यारेच. कारण या एका रात्रीचे इबादतीस एकहजार रात्रींच्या इबादतीचे  इनाम यांतून ते स्पष्ट होते. वर नमूद केलेल्या बाबींबरोबरच आम्हाला हे ज्याद्वारे प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो तो कुरआन आणि कुरआन नाजिल झाले तो महिना रमजान आणि  म्हणून रमजान व त्यातील रोजे हे अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच जकातही. आपण हे ज्या महिन्यात मिळते तो महिना रमजान. म्हणून त्याचे आगमनासाठीही उत्कंठा आणि हे जे प्राप्त झाले त्याचे आभार मानण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी लगतच ईदच्या चंद्रदर्शनाची तेवढीच उत्कंठा. याच उत्कंठेतून समस्त बांधवांस  रमजान मुबारकबरोबरच ईद मुबारक!

-बशीर मोडक, रत्नागिरी

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget