Latest Post

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे माननीय उमर (रजि.) आले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला यहुद्यांच्या (ज्यूंच्या) काही गोष्टी योग्य वाटतात,  यावर आपले काय मत आहे? त्यापैकी काही गोष्टी आम्ही लिहून घ्याव्यात काय?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जसे ज्यू आणि खिश्चन लोक आपले ग्रंथ सोडून खड्ड्यात पडले  तसे तुम्हीदेखील मार्गभ्रष्टतेच्या खड्ड्यात पडू इच्छिता? मी तुमच्याजवळ तो धार्मिक कायदा आणला आहे जो सूर्यासम प्रकाशमान आणि आरशासम स्पष्ट आहे आणि जर आज मूसा  (अ.) जिवंत असते तर त्यांनादेखील माझे आज्ञापालन करावे लागले असते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान बाळगल्यानंतर आवश्यक आहे की मनुष्याने आपली इच्छा, आपली आकांक्षा आणि आपल्या मनोकामनांना पैगंबरांनी आणलेल्या उपदेशाच्या अधीन करावी, पवित्र कुरआनच्या हातात आपल्या इच्छेची लगाम द्यावी, असे न केल्यास पैगंबरांवर ईमान बाळगण्यास काहीही अर्थ उरत नाही.

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य मोमिन (ईमानधारक) होऊ शकत नाही जोपर्यंत मी त्याच्या दृष्टीने  त्याचा पिता, त्याचा पुत्र आणि सर्व मानवांपेक्षा अधिक प्रिय होत नाही.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मोमिन तेव्हाच बनतो जेव्हा पैगंबर आणि त्यांनी आणलेल्या ‘दीन’ (जीवनधर्म) वरील आस्था इतर सर्व आस्थांपेक्षा  अधिक असेल. पुत्राचे प्रेम वेगळ्याच मार्गावर जाण्यास सांगते, पित्याचे प्रेम वेगळ्या मार्गावर जाण्यास सांगते आणि पैगंबर मुहम्मद (स.) दुसऱ्या मार्गावर चालण्यास सांगतात. मग  जेव्हा मनुष्य सर्व आस्थांना अमान्य करून फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यास तयार होतो तेव्हा समजा की तो सच्चा मोमिन (ईमानधारक) आहे, पैगंबरांवर प्रेम करणारा  आहे. असाच मनुष्य इस्लामला हवा आहे आणि असेच लोक जगाचा इतिहास घडवितात. अपूर्ण ईमान पत्नी व मुले आणि पिता व भावाच्या प्रेमांवर कात्री कशी चालवू शकेल!

माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वुजू केली (हात-पाय-तोंड धुवून शुचिर्भूत होणे) तेव्हा पैगंबरांचे काही सहकारी  पैगंबरांच्या वुजूचे पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावरून फिरवू लागले, तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही असे करण्यास उद्युक्त झालात?’’ लोकांनी म्हटले, ‘‘अल्लाह  आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर प्रेम करण्याने जे खूश होतात त्या लोकांनी सत्य बोलावे आणि जेव्हा त्यांच्या ठेवण्यात आलेली  ठेव सुरक्षितपणे तिच्या मालकाला परत करावी आणि शेजाऱ्यांशी सद्व्यवहार करावा.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वुजूचे पाणी घेऊन पवित्रतेसाठी आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर मळणे पैगंबरांवरील प्रेमापोटी होते. हे काही वाईट कृत्य नसल्यामुळे पैगंबरांनी त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच नाही. पैगंबरांनी त्यांना सांगितले की प्रेमाचे श्रेष्ठत्व यात आहे की अल्लाह आणि पैगंबरांनी जे आदेश दिले आहेत त्यांच्या अवलंब करावा. पैगंबरांनी जो जीवनधर्म  सांगितला आहे त्यास आपल्या जीवनाचा धर्म बनवावा. पैगंबरांचे आज्ञापालन करणे पैगंबरांवरील प्रेमाचे सर्वांत उच्च स्थान आहे, अट एवढीच की ते पैगंबरांशी अतीव आसक्तीसह करावे.

एकाच अल्लाहवर, प्रेषित आणि पारलौकिक जीवनावर विश्वास, श्रद्धा ही मुक्तीची गुरुकिल्ली आणि इस्लामच्या भक्कम इमारतीचा पाया आहे. यानंतर पाच बाबी अशा आहेत की, त्या मूलभूत आधारस्तंभ बनतात, ज्यावर इस्लामची इमारत उभी आहे.
या पाच बाबी (स्तंभ) म्हणजे
    • एकेश्वरत्व आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे,
    • नमाज प्रस्थापित करणे,
    • जकात अदा करणे,
    • रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे,
    • काबागृहाची पवित्र यात्रा/हज करणे
एकेश्वरतत्व व प्रेषितत्व: यांची साक्ष देणे म्हणजे जाणीवपूर्वक, श्रद्धेने, विश्वासपूर्वक पवित्र कलिम्याची (इस्लामी धर्मसुत्राची) कृतीमध्ये अंमलबजावणी करणे. अल्लाहची गुलामी, भक्ती, प्रसन्नताप्राप्ती व प्रेषितांचे आज्ञापालन हे जीवनामध्ये उन्नती, उत्कर्ष व कायमस्वरुपी पवित्र क्रांती घडवून आणणे आणि ही क्रांती वरील गोष्टींशिवाय शक्य नाही. याकरिता त्यांची अंमलबजावणी, एवढेच नव्हे तर नमाजसुद्धा एक पुढचे पाऊल आहे.

नमाज: प्रस्थापित करण्याचा उद्देशच हा आहे, की मानवाला जाणीवपूर्वक, श्रद्धेने आणि विश्वासाने अल्लाहचे स्मरण व्हावे. गुलामी व आज्ञाधारकता यांची वचनपूर्ती अल्लाहप्रती व्हावी. आंतरबाह्य गोष्टींची पूर्तता करुन अल्लाहसमोर असहायतेने, लाचारीने, अजीजीने मान तुकवावी. नमाज दिवसातून पाच वेळा अनिवार्य आहे. नमाज मानवाला अल्लाहचा सच्चा दास बनविते. त्याला ईश्वरी कोपापासून व अवज्ञेपासून वाचविते. त्याला एक उत्तम आदर्श मानव बनविते. नमाजमुळे ईश्वराशी जवळीक साधली जाते. त्याची भक्ती व उपासना करण्यासाठी इतर कोणत्याही माध्यमाची जरुरी नाही. नमाज अदा करणारी प्रत्येक व्यक्ती ईश्वराच्या प्रेषिताने दाखविलेल्या मार्गाने स्वतः सन्मार्गामार्फत थेट संबंध प्रस्थापित करू शकते. सामूहिक नमाज (सर्व समावेशकपणे) श्रद्धाळू दासांकरिता सामूहिक बल, शिस्त आणि बंधुत्व निर्माण करण्याकरिता आहे. नमाजकरिता जागेची कोणतीही अट नाही, परंतु ती जागा स्वच्छ, पवित्र असली पाहिजे. मस्जिद ही शिस्त व सामूहिकता निर्माण करण्याकरिता आणि मंगल व कर्तव्यपरायणतेचे वातावरण निर्माण करण्याकरिता आहे. सुन्नत व नवाफल नमाज (प्रेषितांच्या आचरण पद्धतीनुसार व अतिरिक्त नमाज) सामायिक पद्धतीने अदा न करता स्वतंत्र व्यक्तिशः अदा करतात. इस्लामची शिकवण आहे की, मुस्लिमाने अल्लाहची स्तुति, आठवण, स्मरण, कुरआनचे पठन आणि इतर अधिक नमाजच्या सहाय्याने आपल्या घराचे वातावरण पवित्र व मंगलमय करावे. नमाज प्रत्येक स्त्री-पुरूषाला अनिवार्य आहे. तथापि स्त्रियांनी घरी नमाज अदा करणे श्रेयस्कर आहे.

मस्जिद व्यक्तिगत मालकीची किंवा खानदानी मिळकत नसते. अल्लाहच्या (ईश्वराच्या) उपासनेचे ते प्रार्थनाघर आहे. मस्जिदमध्ये श्रीमंत-गरीब, राजा-प्रजा, ज्ञानी-अडाणी, शहरी-खेडूत, भांडवलदार-मजूर, काळा-गोरा सर्व एकाच ओळीमध्ये उभे राहून, खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात. याप्रमाणे नमाज अल्लाहच्या गुलामीबरोबरच शिस्तबद्धता, उपासना, बंधुत्व, समानता, उत्तमोत्तम आचरण, कर्तव्यपरायणता यांची शिकवण देते. इस्लाम धर्माचे उत्तम ज्ञान असणारा आणि बहुसंख्याकांचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र असणारा नमाजचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिकार बाळगतो. नेतृत्वाकरिता कोण्या वंशाची किंवा खानदानाची अट नाही. प्रत्येक मुस्लिम इमाम (नेता) बनू शकतो. नमाज अरबी भाषेत होते. कारण वेगवेगळी भाषा बोलणारे मनुष्य, उपासनेची एक भाषा बोलणारे असणे आवश्यक आहे आणि म्हणून साऱ्या विविधतेच्या व फरकांच्या दलदलीतून निघून समानतेच्या व बंधुत्वाच्या कडीमध्ये एकत्र गुंफले जावेत ही यामागची भावना आहे. नमाज ही अल्लाहचे प्राचीन उपासनाघर ‘काबागृह’कडे तोंड करुनच अदा केली जाते, जेणेकरून श्रद्धाळू व भक्तांमध्ये विश्वबंधुत्व व समानता निर्माण व्हावी आणि ते पूर्णतः इस्लामी एकतेच्या केंद्रबिदूत सामावले जावेत.

जकात: अदा करणे ज्याच्याजवळ साडेबावन तोळे चांदी किंवा त्या किमतीएवढी अतिरिक्त रोख रक्कम किंवा धंद्याचा माल आहे, अशा प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुषाने वर्षातून एकदा अडीच टक्के (२.५%) माल किंवा किमत वेगळी करुन अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी गरिबाला मदत म्हणून दान केली पाहिजे. पूर्ण जकात गोळा करुन सामूहिकरितीने लाचार, मजूर आणि गरीब लोकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरली पाहिजे. हे तरी किमान केलेच पाहिजे. एका सच्च्या मुस्लिमाला धर्मप्रचार व प्रसार, उन्नती व प्रगतीकरिता, गरीब, लाचार व असहाय यांच्या मदतीकरिता आपल्या संपत्तीमधला जास्तीत जास्त वाटा खर्च करण्याचा उद्देश हा आहे. संपत्ती व ऐहिक सुख, भौतिक प्रेमजे साऱ्या वाईटाचे, दुष्कर्मांचे मूळ आहे, ते आपल्या मनातून, हृदयातून निघून जावे आणि अल्लाह व ईशधर्म-इस्लाम आणि पारलौकिक जीवनाविषयी ओढ व प्रेम सर्व सत्कर्म व सन्मार्गाचे उगमस्थान असलेल्या हृदयामध्ये वसावे. जे लोक अल्लाहच्या मार्गामध्ये आपली संपत्ती खर्च करतील त्यांना पारलौकिक-मरणोत्तर जीवनामध्ये त्याचा मोबदला अनंत पटीने मिळेल आणि ऐहिक जगामध्येसुद्धा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या देणग्यांनी व उपकारांनी त्यांना प्रसन्न करेल.

इस्लाम धर्माच्या शिकवणूकीचे क्षेत्र कौटुंबिक आणि सामाजिक समस्यापर्यंत विस्तारित पावले आहे. ही धारणा ज्या गोष्टींच्या परिणामस्वरूप निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घेणे प्रथम आवश्यक आहे. ही कारणे पवित्र कुरआनमधील मौलिक धारणामध्ये दिसून येतात. पवित्र कुरआनमध्ये, अल्लाह, धर्म आणि उपासनेसंबंधी विवेचन करण्यात आले आहे. यातील धारणाशिवाय प्रत्येक धारणा चूकीची किवा अज्ञानमूलक किवा असत्य आहे. त्यासंबंधी आवश्यक स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे.
अल्लाहने सर्व सृष्टीला निर्माण केले आहे. तो सर्व सजीवांचा पालनकर्ता, ईश्वरी गुणानी युक्त, न्याय करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता, दया, शक्ती ज्ञान इत्यादि वैशिष्ठयानी परिपूर्ण आहे. तो जसा सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता तसाच त्याचा व्यवस्थापकही आहे. तो मालक आणि ईश्वर सुद्धा आहे. तो स्वामी आणि शासकही आहे. तो कायदा देणारा सुद्धा आणि कायदा बनविणारा सुध्दा आहे. तो उपास्य आणि रक्षकही आहे. त्याच्या या वैशिष्टयांमध्ये, या योग्यतामध्ये आणि त्याच्या या अधिकारामध्ये कोणीही सहभागी नाही. म्हणून आराधना योग्य फक्त तोच आहे आणि आज्ञा पालनाचा खरा अधिकारी सुद्धा तोच आहे.
अल्लाहच्या या उपदेशांचा, आदेशांचा आणि कायद्याच्या संग्रहाचे नाव धर्म(इस्लाम) आहे. सरळ मार्ग दाखविण्यासाठी, सत्त्याच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि खरी सफलता मिळवून देण्यासाठी आणि ठरलेल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा धर्म अल्लाहने मानवास प्रदान केला आहे. अल्लाह न्यायी, शासक, पालक आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याने मानवाला नैतिक, आध्यात्मिक आणि भौतिक जीवनासाठी सर्वकाही उपलब्ध करून दिले आहे.
अन्यथा त्याची बुद्धीमत्ता, शासन व्यर्थ सिद्ध झाले असते, ईश्वर म्हणवून घेण्याचा हक्क त्याला राहिला नसता. आपल्या जीवनाचा उद्देश्य आणि त्या उद्देश्याच्या प्राप्तिसाठी, यथार्थ मार्गासाठी सावधान करण्याची मानवास अत्यंत आवश्यकता होती जेणेकरून भ्रम, दुष्ट बुध्दी आणि भावनांच्या काळोखात भरकटत न जाता जीवनाच्या उद्देश्यपूर्तीसाठी सरळ मार्ग उपलब्ध व्हावा. धर्माचा(इस्लामचा) उद्देश्य आणि हेतुही हाच होता की ते मानवाच्या पूर्ण नैतिक जीवनाचे अधिष्ठान व्हावे शासक आणि सर्व मानवजातीचा ईश्वर असण्यासाठी त्याने मानवी जीवनाचे सर्व पैलू व्यापून टाकले आहेत. कोणताही पैलू त्याच्या आवाक्या बाहेर नाही. मानवी जीवनातील कोणत्याही बाबी किवा व्यवहाराच्या नैतिक बाजू संबंधी चांगल्या व वाईट गोष्टींची चर्चा उद्भवू शकते. म्हणून अल्लाहकडून कोणत्याही बाबतीसंबंधी उपदेश आणि मार्गदर्शनास मानव वंचित राहता कामा नये. म्हणून अल्लाहचा हा अंतिम धर्म म्हणजे इस्लाम एक एक करून सर्व समस्यावर चर्चा करतो. उपासना गृहापासून सामुदायिक जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक बाबीसंबंधी उपदेश करतो. या सर्व उपदेशांच्या सर्व समावेशक संग्रहाचे नांव इस्लाम धर्म(परिपूर्ण जीवनपद्धती) आहे आणि त्याची प्रत्येक बाब धर्माचा अंश असते.
इस्लामच्या दृष्टीने पूजा, उपासना, आराधना आणि तपस्या यांच्या पेक्षा ‘‘इबादत’’ खूप विकसित आहे. ईश्वराची आराधना आणि त्याचे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे, परंतु परिपूर्ण भक्ती नाही. इस्लामनुसार, अल्लाहने दिलेल्या संपूर्ण आदेशांचे पालन करणे ही परिपूर्ण भक्ती आहे. कोणत्याही भेदभाव आणि विभाजना शिवाय पूर्ण निष्ठेने आणि खर्या भक्ती भावाने आणि मनःपूर्वक आज्ञापालनासह केलेली भक्ती ही ‘‘इबादत’’ आहे. अल्लाहने पाठविलेला हा धर्म सर्वसमावेशक उपदेशांचा आणि आदेशांचा संग्रह आहे, हा धर्म समस्त मानवजातीसाठी आहे, हे लक्षात ठेवून इस्लामच्या संपूर्ण शिकवणीतील प्रत्येक लहान सहान बाबीसह सर्व अमंलात आणून संपूर्ण जीवनाला समर्पित केल्याशिवाय ‘‘इबादत’’ परिपूर्ण होत नाही.
इस्लाम आणि पवित्र कुरआननुसार परमेश्वर, धर्म आणि भक्ती यांच्या जर या व्याख्या असतील तर माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधीत गोष्टीबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. चर्चा केली गेली तरी ती इस्लाम धर्म, ईश्वर भक्ती यात त्याचा समावेश होणार नाही, कौटुंबिक आणि सामाजिक बाबी या सुद्धा मानवी जीवनाचाच एक भाग आहे. मग परमेश्वरी धर्म या बाबीना दृष्टीआड कसा करू शकेल? याबाबतीत उपदेश किवा आदेश कसा न देईल? सत्य आणि न्याय यांची आवश्यकता कशी नसेल? जे आदेश किवा उपदेश याबाबतीत दिले असतील त्याना धार्मिक महत्व कां नाही? त्यांचे पालन करणे सक्ती केले असते काय? त्यांचे अमलात आणणे किवा न आणणे याचा मुस्लिम असणे किवा नसणे यावर काहीच परिणाम झाला नसता काय?
ईश्वर, धर्म आणि उपासना याबाबतच्या काही लोकांच्या धारणा वेगळ्या असू शकतात. नव्हे तर अधिकांश लोकांच्या या धारणा वेगळ्याच आहेत. अशा लोकांना इस्लामी व्यक्तिगत कायद्याच्या धार्मिक प्रतिष्ठेचे आकलन होणे आणि त्यांची योग्यायोग्यता ठरविणे फारच कठीण आहे. परंतु येथे योग्यायोग्यतेचा ही प्रश्न उद्भवत नाही. तथापि मूळ प्रश्न वास्तवतेचा आहे आणि वास्तवता ही आहे की हे कायदे धार्मिक प्रतिष्ठेचे असून ते धर्माचाच एक अविभाज्य भाग आहेत, यास कोणत्याही प्रकारे नाकारता येत नाही. पवित्र कुरआनची शिकवणुक, इस्लामची धर्मविषयक आणि ईश्वर विषयक धारणेशी सुसंगत असून इस्लामचे व्यक्तिगत कायदे इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे.
सामुदायिक आणि सांस्कृतिक महत्व
मुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या प्रतिष्ठेची योग्यता आणि मौलिक महत्व उपरोक्त विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. त्या विषयी अधिक खुलासा करण्याची आवश्यकता दिसत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीच्या आवश्यकते नुसार, या कायद्याची धार्मिक प्रतिष्ठा तात्पुरती बाजुला ठेवून त्या कायद्याच्या केवळ सांस्कृतिक व सामुदायिक दृष्टीकोनातून त्याच्या महत्वाच्या बाबतीत परिक्षण करू. या जेणे करून कोणत्याही कारणाने त्यांची धार्मिक प्रतिष्ठा समजण्यास जे असमर्थ असतील, त्यांच्याही हे लक्षात यावे की मुस्लिम आपल्या व्यक्तिगत कायद्यांना का कवटाळून बसले आहेत आणि त्याना तसे करणे का अपरिहार्य आहे?

इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.
हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))
एक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये?’’ प्रेषित उत्तरले,
‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))
अबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)
माननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ५५)
हज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.
जबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).
माननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
एक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)
आणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद - २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : ९९)
अशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
स्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय ? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का ? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’
माननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,
‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ?’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
धर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
हजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय? त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,
जो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत एक लेख आहे इ.स. 1962 साली हजच्या प्रसंगी इस्लामी जगताच्या विद्वतजनांसमोर वाचण्यात आला होता.
    यात इस्लाम आणि सामाजिक न्याय, सत्याच्या रूपात असत्य, सामाजिक न्याय फक्त इस्लाममध्येच आहे, न्याय हेच इस्लामचे उद्दीष्ट आहे, इस्लामी न्याय, सामाजिक सेवा, व्यिक्त स्वातंत्र्य, सामाजिक संस्था आणि त्यांची सत्ता, भांडवलशाही व समाजवादाच्या त्रुटी, समाजवाद हे सामुहिक अत्याचाराचे अंतिम टोक इ. विषयावर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 140   -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/oimmruwz0affdhqxrjlc6ugeaeq50hu6

शेगाव येथे मस्जिद परिचय


शेगाव (शोधन सेवा)
इस्लाम धर्मातील रूढी, परंपराची अन्य धर्मियांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी. तसेच मस्जिदमध्ये नेमके काय चालते हे समजून  घेण्यासाठी शेगाव येथे मस्जिद परिचय हा उपक्रम रविवार, 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
संतनगरी शेगाव येथील जामा मस्जिदमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील हूड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश  दळवी, हभप शास्त्री , इस्लामचे विचारवंत इश्तीयाक अहेमद, मुहम्मद अमीन, मुहम्मद हारून यांच्यासह जमाअते इस्लामी हिंदचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
जो सर्व समाजाला एकत्र आणतो, सर्वांना सोबत घेऊन चालतो तो खरा धर्म. या तत्वाला समोर ठेवून जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. मस्जिद  पाहण्यासाठी आलेल्या सर्वधर्मीय लोकांचे मस्जिद ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी करून मस्जिदीसंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली.  त्यात वजू कशाला म्हणतात, नमाज कशी अदा करतात इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. कितीवेळेस नमाज होते, शुक्रवारच्या नमाजचे महत्वही यावेळेस समजावून सांगण्यात  आले. प्रास्ताविक मुहम्मद जाकीर यांनी केले. मुफ्ती अनिस आणि हिदायत शेख यांच्या व्याख्याना पश्चात नमाजचे प्रात्यक्षिकही दाखविले गेले. अनेक मुस्लिमेत्तर बांधवांनी जोहरच्या   नमाजामध्ये सामील होऊन सामुहिक नमाजचा अनुभव घेतला. काहींनी गॅलरीत बसून नमाजचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेतले. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शेगाव  शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल हुड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश दळवी, हभप शास्त्री यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमातून शहरातून मोठा प्रतिसाद  मिळाला. आपसामध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम स्थान म्हणजे मस्जिद. अशी भावना म्हणजे अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार पत्रकार फहीम  देशमुख यांनी मानले. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जमाअते इस्लामी हिंदचे स्थानिक सदस्यांचाही समावेश होता. यावेळेस  जमाअततर्फे दोन कुरआन करून 20 पुस्तिका मुस्लिम्मेत्तर बांधवांना जमाअततर्फे देण्यात आले.

बकर ईद म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या देशात जो उत्सव प्रचलित आहे त्याचं खरं नाव ईद उल अज़हा आहे. ईद उल अज़हा म्हणजे आहुती देण्याचा सण होतो. याला त्यागोत्सव  देखील म्हटलं जाऊ शकतो. हा एक संस्कार आहे. आज आपण एका जनावराची आहुती देतोय, पण उद्या सत्यासाठी, मानवी समाज व देशासाठी प्राणाची, मालमत्तेची, वेळ व  कलागुणांची आहुतीही द्यावी लागली तरी त्यासाठी आपण तयार असण्याची त्यागाची मानसिकता या संस्कारातून निर्माण होते. हा कोणताही नवस किंवा बळी देण्याचा अंधश्रद्धेचा प्रकार  नाहिये. उलट मटणाची भाजी खाल्याने पाप लागते, विटाळ होतो, हीच एक अंधश्रद्धा आहे. हीच अंधश्रद्धा अस्पृश्यतेच्या आणि मॉब लिंचिंगच्या मूळाशी आहे. हा खाद्य विटाळ दूर होणे  आज आवश्यक आहे...
हज यात्रेचे सर्व सोपस्कार मक्का शहर व त्याच्या भोवताल परिसरातच पूर्ण केले जातात. दर दरवर्षी अरबी वॅâलेंडरमधील जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला प्रत्यक्ष हजला सुरूवात  होते, तर पुढील पाच दिवस हाजी लोकांचे विविध सोपस्कार केले जाऊन बारा तारखेला त्याची सांगता होते.
खाली लुंगीसारखं एक कापड गुंडाळून आणि वर एका कपड्यानं अंग झाकलं जातं. त्याला अहेराम म्हणतात. पण फक्त या दोन कपड्यांनाच अहेराम म्हटले जात नाही, तर अहेराम ही  एक अवस्था आहे. या अवस्थेत काही विशिष्ट गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या आहेत. जसे शिवलेले कपडे नेसणे, उंच बूट नेसणे, सुगंधीत अत्तर किंवा इतर क्रिम वगैरे लावणे, शरीर- संबंध करणे, शरीरसंबंधांविषयी शृंगारिक चर्चा करणे, विषारी जीवांव्यतिरीक्त इतर जीवांची शिकार करणे, भांडणं करणे, केसं कापणे, नखं कापणे इत्यादी गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या  असून त्यावर या अवस्थेत प्रतिबंध लागू होतात. म्हणूनच अहेराममध्ये पुरूषांनी फक्त दोन कपडे नेसायचे असतात. पायात साधी स्लीपर घालायची असते.
महिलांचा अहेराम म्हणजे फक्त चेहऱ्याला कपडा लागू द्यायचा नाही. त्यामुळे बऱ्याच महिला तिथे एकतर चेहरा उघडा ठेवतात किंवा एक हॅटसारखी टोपी नेसतात आणि त्या टोपीला  एक कपडा जोडून तो खाली लोंबकळता सोडून देतात. महिला अहेरामच्या व्यस्थतीत साधे कपडे नेसू शकतात. त्यावर बुरखा नेसू शकतात. असा अहेराम नेसून मक्का शहरातील  मस्जिद-एहराम येथे भाविक प्रवेश करतात. या मशिदीच्या सर्वसाधारपणे मध्यभागी काबागृह आहे.
हजयात्रेचा केंद्रबिंदू म्हणजे काबागृह. याविषयी कुरआनातील अध्याय क्रमांक ३ मधील श्लोक क्रमांक ९६ मध्ये अल्लाह सांगतो - ‘‘निसंशय (जगातलं) सर्वात पहिलं उपासनागृह (धर्मस्थळ) जे मानवांकरिता बांधण्यात आले आहे, ते (म्हणजे जे) मक्का शहरी विद्यमान आहे.’’
इथे ‘मानवांकरिता’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्लाह अन् त्याच्या प्रेषितांशी इमान राखणारा कुणीही तिथं जाऊ शकतो, उपासना करू शकतो, मग तो कोणत्याही जातीपातीत जन्मलेला का असेना, कारण हे धर्मस्थळ मानवांकरिता बांधलेलं आहे. परंतु फक्त पर्यटन म्हणून, मौज मजा करण्याकरिता तीथं जाता येत नाही.
काबागृहाची चारही टोकं ज्या देशांच्या दिशेने आहेत, त्या देशांवर आधारित त्यांची नावं दिलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे काबागृहाच्या पुर्वेकडे म्हणजे भारताच्या दिशेने असलेल्या कोपऱ्याला चक्क ‘रूवन-उल-हिंद (भारताकडचा कोपरा)’ असे नाव आहे. ही आम्हा भारतीयांसाठी अभिनास्पद बाब आहे. या काबागृहाच्या भोवती विविध देशांतून आलेले अल्लाहचे  भाविक भक्त जेंव्हा गोलाकार रांगेत नमाज पढण्याकरिता उभे राहतात, तेंव्हा जागतिक मानवी एकात्मता अक्षरश: आपण डोळ्याने पाहू शकतो. त्या वेळी एक अश्वेत वर्णीय आफ्रीकन  हा गौरवर्णिय प्रेंâच माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. एक रशियन हा अमेरिकन माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. विविध भाषा बोलणारे इथे एकाच भाषेत  मंत्रोच्चार करतात. हा एक सांस्कृतिक चमत्कारच म्हणावा लागेल. इथे येऊन सगळे वर्णभेद, सगळे जातीभेद, सगळा प्रांतवाद, सगळे राष्ट्रभेद लोकं विसरून जातात. अशा प्रकारे काबा 
हे आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मतेचे केंद्र आहे. ईदच्या दिवशी याच एकात्मेच्या दुधात मानवी प्रेमाची साखर पडते आणि जगभरात बंधुत्त्वाच्या भावनेने ओतप्रोत असं एक उत्साहाचं वातावरण पसरतं.
काबागृहावर नजर पडतातच ही प्रार्थना म्हटली जाते- ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर व ला इलाहा इल्लाहो व अल्लाहु अकबर’’ याचा भावानुवाद असा होतो - अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहशिवाय कुणीही उपासना करण्यास लायक नाही, अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे.  याशिवाय आणखीही काही दुआ येथे म्हटल्या जातात. त्यानंतर काबागृहाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. नमाज पढली जाते. जवळच असलेल्या सफा व मर्वा या दोन  टेकड्यां दरम्यान धावत पळत सात फेऱ्या मारल्या जातात. याला ‘सई’ म्हणतात. या सईची पाश्र्वभूमीदेखील बोधप्रद आहे. ती पाश्र्वभूमी जाणून घेण्याकरिता आपल्याला प्रेषित इब्राहीम (अ.)   यांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.
प्रेषित इब्राहीम (अ.) यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेला सुरूवात केली. चळवळीच्या कामानिमित्त प्रेषित इब्राहीम (अ.) हे ईश्वरी कार्याकरिता  पॅलेस्टीनला जात असताना त्यांची पत्नी हाजरा व त्यांचं तान्हं बाळ (प्रेषित इस्माईल अ.) यांना एकटेच सोडून गेले होते. त्या वेळी मक्का शहर हे पूर्णपणे विराण झालेलं होतं. प्रेषित  नूह यांच्या काळात आलेल्या महाजलप्रलयात कस्रfचत ही वस्ती त्या वेळी उद्ध्वस्त झालेली असणार बहुतेक. त्यामुळे प्रेषित इब्राहीम (अ.) आले त्यावेळी मक्का हे शहर वसलेलं  नव्हतं. काबागृहाचाही जिर्णोद्धार अजून व्हायचा होता. चोहीकडे भयाण प्रचंड वाळवंटी प्रदेश. आजूबाजूला सफा व मर्वा नावाच्या दोन टेकड्या होत्या. आदरणीय हाजरा यांचं लेकरू एकदा  तहानेने रडत होतं. आपल्या लेकराला पाणी पाजण्याकरिता त्या इकडं तिकडं पाहू लागल्या. तेंव्हा त्यांना दूरवरच्या सफा टेकडीवर पाणी दिसू लागलं. हाजरा त्या दिशेने धावत गेल्या.  पण टेकडीवर पोहचल्यावर त्यांना तिथं पाणी सापडलं नाही. वाळवंटी भागात जमिनीतून निघणारी वाफ ही दुरून पाणीच दिसते. याला ‘मृगजळ’ म्हणतात. हाजरांना मृगजळ दिसत  होतं. सफा टेकडीवरून पाहिलं असता त्यांना मर्वा टेकडीवर पाणी असल्याचा भास झाला. म्हणून त्या तिकडेही धावत सुटल्या. पण तिथंही पाणी नव्हतं. तेदेखील मृगजळच होतं. अशा  प्रकारे तहानेने कासाविस झालेल्या आपल्या लेकरासाठी भर उन्हात उजाड- वैराण वाळवंटी सफा-मर्वा टेकड्यांदरम्यान त्या सैरावैरा धावत होत्या. लेकरासाठी धावपळ करणाऱ्या त्या  आईवर अल्लाहला दया आली. हाजरांचं लेकरू ज्याठिकाणी रडत होतं, तिथून अल्लाहने एक झरा फोडला. त्या झऱ्याच्या पाण्याला हाजरांनी वाळूने अडवलं आणि ‘‘ज़म़जम (थांब-थांब)’’  म्हटलं. अशाप्रकारे त्या झऱ्याला ज़म़जम नाव पडलं. आज त्या झऱ्याचं पाणी पाइपद्वारे दूरदरपर्यंत नेण्यात आलं. मस्जिद-एहराममध्ये जागोजागी नळांद्वारे या झऱ्याचं पाणी उपलब्ध  आहे. अतिशय चवदार, पवित्र, आरोग्यदायी व शुद्ध असं पाणी. नेहमी वाहतं पाणीच शुद्ध असते. एका जागी तुंबलेलं पाणी हे शुद्ध असूच शकत नाही. पण ज़म़जम याला अपवाद आहे.   एकाच ठिकाणी साठलेलं हे पाणी हजारों वर्षांपासून शंभर टक्के शुद्ध असल्याचं वैज्ञानिक प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आदरणीय हाजरा यांनी आपल्या तहानलेल्या लेकरासाठी पाणी  आणण्याच्या आशेने सफा व मर्वा या दोन टेकड्यांदरम्यान धावाधाव केली होती. त्या माऊलीची ती धावपळ अल्लाहला इतकी आवडली की, जगाच्या शेवटपर्यंत या दोन टेकड्यांदरम्यान  धावणे हजसाठी येणाऱ्यांकरीता अनिवार्य करून टाकलं. या धावण्याला ‘सई’ म्हणतात. हा अल्लाहने अशा महिलांचा केलेला सम्मान आहे, ज्यांचे पती किंवा वडिल हे सामाजिक  परिवर्तनाच्या चळवळीत गुंतले असल्यामुळे महिलांना कुटुंबाचं आकाश पेलावं लागतं आणि असा संघर्ष करावा लागतो. माता हाजरांच्या त्या लेकींना सलाम! सई केल्यानंतर मस्जिद- ए-हरामच्या बाहेर निघून केसांचं मुंडन केलं जाते आणि अहेराम काढून नेहमीचे कपडे नेसले जातात. या संपूर्ण सोपस्काराला उमरा म्हणतात. हजपूर्वी हा उमरा करावा लागतो. हजचे एकूण सोपस्कार पाच दिवसांत पूर्ण केले जातात. जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला म्हणजे हजच्या पहिल्याच दिवशी अहेराम धारण करून मक्का शहराच्या बाहेर ‘मीना’ नावाच्या  एका मैदानात भाविक एक दिवस व एक रात्र मुक्काम करतात. या दिवशी भावीक भक्त तंबूत राहून नमाज पढतात, यथाशक्ती अल्लाहचं नाम:स्मरण करतात, कुरआन पठन करतात,  तर काही जन आरामही करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला यात्रेकरू ‘अराफात’ मैदानात जाण्याकरिता निघतात. सर्वसाधारणपणे सूर्य डोक्यावरून ढळण्यापूर्वीच या मैदानात  भाविक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या मैदानात सूर्यास्तापर्यंत थांबले जाते. भाविक इथे नमाज पढतात. इमामचे प्रवचन ऐकतात. आपल्या पापांची क्षमा मागतात, अल्लाहची करूणा भाकतात.
भूतलावरील पहिले मनुष्य व इस्लामचे पहिले प्रेषित आदम (अ.) यांना अल्लाहने जन्नतमधून खाली भूतलावर अवतरीत केले. तिथे जन्नतमधूनच आलेल्या त्यांच्या पत्नी व भूतलावरील प्रथम महिला हव्वा यांच्याशी त्याच मैदानात भेट झाली. त्या दोघांनी त्या मैदानात प्रार्थना केली. नंतर ते लगतच्या ‘मुजदलफा’ मैदानात जाऊन तिथे त्यांनी मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ते मीना नावाच्या मैदानात आले आणि नंतर आज जिथे मक्का शहर आहे, तिथे आले. काबागृहाचा जिर्णोद्धार करून त्याला सात प्रदक्षिणा घातल्या. अशाप्रकारे मक्का  शहरातून निघून अराफातमध्ये थांबणे, नंतर मुजदलफा येथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मीना येथे जाऊन तिथे आणखी काही सोपस्कार पूर्ण करून पुन्हा मक्का शहरात परत  येणे आणि काबागृहाला सात प्रदक्षिणा घालणे हे सोपस्कार आजही हजयात्रेत केले जातात. म्हणून हज हा मानवी इतिहासाचा सर्वात जुना धार्मिक संस्कार मानला जातो. तसेच ईद उल  ज़ोहा हादेखील मानवी  इतिहासाचा सर्वात जुना उत्सव मानला जातो. अराफात मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. या मैदानात आज जमतात तसं क़यामत (महाप्रलया)च्या दिवशी असंच  सगळे माणसं याच मैदानात एकत्रित जमणार आणि केल्यासवरल्याचा हिशेब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होऊन सगळी माणसं मरणार आणि ‘हश्र’च्या   दिवशी सगळी माणसं जीवंत होऊन अल्लाहसमोर ज्या मैदानात उपाqस्थत केले जाणार, त्या मैदानाचा केंद्रबिंदू हेच मैदान राहणार असल्याची माहिती इस्लामी ग्रंथात आपल्याला  मिळते. खरंच, एक ना एक दिवस सर्वांना मरण अटळ आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होणारच असल्याचं विज्ञानदेखील मानते. माणूस मेल्यानंतर ़कयामतच्या दिवशी  पुन्हा कसा  काय परत जीवंत होणार याविषयी अल्लाह कुरआनाच्या अध्याय क्रमांक १९ मधील श्लोक क्रमांक ६६ मध्ये सांगतो-
‘‘मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो  काहीच नव्हता?’’
माणूस आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठं असतो? आईवडिलांच्या शरीरातील दोन भिन्न तत्त्वांच्या मिश्रणातून माणूस जन्म घेतो, ते तत्त्व कुठून येते? ते जे अन्न खातात त्यातून. ते  अन्न कुठून येते? जमिनीतून, पाण्यातून. म्हणजे जमीनीतली माती, पाणी, हवा, प्रकाश व इतर तत्त्वे मिळून एक माणूस उत्पन्न होतो. त्यापूर्वी तो कुठेच नसतो. तो मोठा होतो.  मरतो. मरून त्याची माती होते किंवा राख होते. हाडं उरतात. तो जेंव्हा काहीही नसताना अल्लाह (ईश्वर) त्याला उत्पन्न करू शकतो, तेंव्हा त्याचे काहीतरी अवशेष शिल्लक असताना  का नाही त्याला पुन्हा जीवंत करू शकत? त्याला हे शक्य आहे. एक खून करणाऱ्या आणि शंभर खून करणाऱ्यालाही या जगात फक्त एकदाच फाशी दिली जाऊ शकते. तेंव्हा इतर ९९  खुनांची शिक्षा केंव्हा मिळणार? मग ईश्वर जर न्यायी आहे, तर मग तो न्याय केंव्हा करणार? यासाठी नक्कीच तो एक दिवस सर्वांना जमा करून हिशेब घेणारच आहे, यावर इमान  ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेऊन परलोक नाकारणे, हिशेबाचा दिवस नाकारणे म्हणजे त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उत्पन्न करून त्याचा घोर अपमान करणे होय.   अशा ईशद्रोही लोकांना तो नरकात टाकणार. म्हणून मेल्यानंतर जीवंत होऊ, यावर प्रत्येकाला इमान राखणे गरजेचं आहे. अशाप्रकारे आपण मेल्यानंतर पुन्हा जीवंत होऊन याच मैदानात  येणार आहोत, याची तीव्र जाणीव या मैदानात होते. या अरफातच्या मैदानात पहिले मानव आदम व हव्वा यांची भेट होऊन मानवी समाजाच्या लौकिक कर्मकलापाची सुरूवात इथेच  झाली होती आणि मानवी कर्मांचा हिशेब होऊन लौकिक जीवनाचा शेवटदेखील इथेच, याच मैदानात होणार आहे, इन्शाल्लाह! या ईदच्या दिवशी हजयात्रेकरू व्यतिरिक्त जगभरातील  सक्षम मुसलमान जनावरांची कुरबानी करत असतो. ईदच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दोन दिवसांतही कुरबानी केली जाऊ शकते. या कुरबानीची जी सामाजिक पाश्वभूमी आहे,  तीदेखील समजून घेणे गरजेचे आहे. कुरबानीचा उद्देश एखाद्या जनावराचा जीव घेणे नाही. एखादा नवस फेडण्याकरिता कुरबानी केली जात नाही की फक्त पार्टी करून मौज मजा  करण्याकरिता कुरबानी केली जात नाही. अल्लाह कुरआनात अध्याय क्रमांक २२, श्लोक क्रमांक ३७ मध्ये सांगतो -
‘‘अल्लाहप्रत त्यांचं (जनावरांचं) मांस किंवा रक्त पोचत नसते तर त्यामागची तुमची निष्ठा पोचते.’’
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेल्या आदेशावरून कुरबानीच्या मटणाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वत:साठी अन् स्वत:च्या कुटुंबियांकरिता, दुसरा भाग हा आपले नातेवाईक   व मित्रांकरिता पण मटनाचा तीसरा भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारे या कुरबानीच्या निमित्ताने ज्या गोरगरिबांना मटण  हे महिनोगिणती  डोळ्याने पाहायलाही मिळत नाही, अशांना या ईदनिमित्त ते खायला मिळते. म्हणून बळी व कुरबानीत फरक आहे. माणसाच्या नावाने देवासाठी बळी दिला जातो, तर अल्लाहच्या  नावाने माणसासाठी कुरबानी दिली जाते, गोरगरिबांसाठी कुरबानी दिली जाते. फक्त जनावरांचं मांस पाहून नव्हे तर गरिबांची रिकामी खळगी भरलेली पाहून अल्लाह प्रसन्न होत  असतो. त्यासोबतच सामाजिक क्रांतीकरिता आपली व आपल्या कुटुंबियांची कुरबानी देण्यासही ही कुरबानी प्रेरणा देत असते, ही ईद प्रेरणा देत असते. अशा त्याग व कुरबानीचा उत्सव असणाऱ्या ईद-उल-़जोहाच्या आपल्या सर्वांना सदिच्छा!
ईद मुबारक!

- नौशाद उस्मान

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget