Latest Post

पाश्चात्य साम्राज्यांनी मध्ययुगीन कालखंडापासून जिहाद विरूद्ध प्रचंड प्रचार केला, जिहादचे भयानक चित्र रेखाटले आणि लोकांची मते कलुषित करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. हे सर्व अशा वेळी झाले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच अत्याचारांनी अर्धे जग पीडित बनले होते. आजसुद्धा युरोप आणि अमेरिका स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय हितासाठी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे बाँबफेकी विमाने व आधुनिक शस्त्रास्त्रानिशी वाटेल त्या देशावर हल्ला करून तुटून पडतात. त्यांचे तसे कृत्य अगदी तर्कसंगत व योग्य आहे, असे सभ्य व शिष्ट शब्दात जगाला पटविण्याचे प्रयत्न केले जातात पण इस्लाम व जिहाद हे शब्द त्यांच्या कानांवर पडल्याबरोबर दुष्प्रचाराची ‘टेप रेकॉर्ड’ लगेच सुरू केली जाते.
‘जिहाद’ हा अरबी भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अखंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणे’असा आहे ‘भगिरथ प्रयत्न’ हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो. त्या प्रयत्नात कसलीही उणीव राहू नये, अगदी त्यासाठी प्राण पणाला लावण्याची गरज पडली, तरी मागे हटू नये. जिहाद केवळ रणांगणांवरच होतो, असे नसून अल्लाहच्या ‘दीन’(जीवनव्यवस्था) चा प्रसार करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी, दुष्कर्मापासून निर्मळ असा सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर केल्या जाणार्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाला ‘जिहाद’ असे नाव देतात. अशा प्रयत्नात एखादे वेळी हातात शस्त्र घेण्याची गरज पडू शकते, परंतु मूलतः जिहाद केवळ शस्त्रांनीच केला जातो असे नाही. कुरआनमध्ये कित्येक वेळा जिहादची आवाहने केली आहेत, ती केवळ प्राण पणाला लावण्यासाठीच नव्हती, तर आपल्या धनसंपत्तीचे बलिदान करायला सांगितले गेले. इस्लाम जेव्हा आपल्या अनुयायींना जिहादचे आवाहन करतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो, की धरणीवर होत असलेला कलह, अन्याय व अत्याचार नष्ट करण्यासाठी, आपले सर्वस्व पणाला लावून शिकस्तीचे प्रयत्न केले जावेत.
इस्लाम व न्याय
इस्लाम हे काही विशिष्ट धार्मिक विधी व ठराविक उपासना करण्याचे नाव नाही, तर ती एक संपूर्ण जीवनव्यवस्था आहे, ही गोष्ट स्पष्ट झालीच आहे. इस्लामची प्रस्थापना करण्यात पैगंबरासमोर जे उद्दिष्ट होते, त्याचा गाभा अथवा केंद्रबिदू ‘न्याय’ स्थापन करणे, हाच होता. अन्याय व शोषण यापासून मुक्त समाज निर्माण करणे, हेच तर इस्लामचे उद्दिष्ट आहे. न्याय स्थापन करण्याचे आदेश कुरआनने वारंवार दिले आहेत. प्रेषित मुहम्मद(स.) यांचीही तीच ताकीद होती. त्यांचे संपूर्ण जीवन न्यायस्थापनेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
इस्लाममध्ये न्यायाची अर्धवट कल्पना नाही. प्रत्येक व्यक्तीला कुरआनचे फर्मान आहे की तिने दृढतेने न्यायीपणावर राहावे. केवळ सामाजिक न्यायच नव्हे, तर व्यक्तिगत न्यायही प्रस्थापित केला जावा. माणसांनी आपल्या सर्व संबंधात व व्यवहारात न्यायाची कास सोडू नये. कुरआनचे फर्मान आहे,
हे ईमानधारकांनो! न्यायाचे ध्वजधारक व्हा आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. मग तो न्याय व ती साक्ष तुमच्या स्वतःच्या विरूद्ध, तुमच्या माता-पित्याच्या विरूद्ध अथवा तुमच्या नातलगांच्या विरूद्ध का असेना.- सूरह : आले इमरान - १३५
निःसंशय अल्लाह न्याय व भलाई करण्याचा व नातेवाइकांना(त्यांचा हक्क) देण्याचा आदेश देत आहे आणि अश्लील कृत्ये, दुष्कृत्ये व शिरजोरीपासून रोखत आहे. हे ईमानधारकांनो! अल्लाहखातर न्यायावर दृढतेने टिकून राहाणारे बना. न्यायाची साक्ष देताना, एखाद्या गटाशी असलेल्या वैराने तुम्हाला न्याय सोडण्यास उद्युक्त करावे, असे कदापि होता कामा नये. न्याय करा. तीच धर्मपरायणतेशी अनुकूल गोष्ट आहे.- सूरह : माईदा-८
इस्लाम केवळ त्या न्यायाची गोष्ट बोलत नाही, जो न्यायालयात मिळत असतो, किबहुना तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, अशी व्यवस्था करतो. राजकारणाच्या बाबतीत, अर्थकारणाच्या बाबतीत तसेच माणसाच्या कौटुंबिक जीवनात तो न्याय स्थापन करतो. त्या न्यायाचा लाभ बालकांना, महिलांना, श्रमिकवर्गाला, गोरगरिबांना व समाजातील पीडित व शोषित माणसांपर्यंत पोचत असतो.
इस्लाम व गुन्हेगारी
उजेड व काळोख जसा एका ठिकाणी राहू शकत नाही, त्याचप्रमाणे इस्लामच्या उपस्थितीत गुन्हेगारी आपला तळ टाकू शकत नाही. इस्लामी कानून अशी नैतिक व आर्थिक व्यवस्था प्रदान करतो जी माणसाला गुन्हे करण्यापासून रोखते, त्याला परावृत्त करते. शिवाय इस्लाम असे सामाजिक वातावरण निर्माण करतो, ज्यात गुन्हा करण्याला कमीत कमी अवसर उरतो. त्यानंतरही घडलेल्या गुन्ह्यांसाठी अशी कडक सजा देण्याचा इस्लाम आदेश देतो, ज्यामुळे गुन्हेगारांना जरब बसावी.
इस्लामने निर्धारित केलेल्या कडक शिक्षांवर पाश्चिमात्य जगात फार मोठी ओरड व टीका केली जाते. ती सजा क्रूर व कठोर असल्याचे म्हटले जाते. वास्तवता अशी आहे की गुन्ह्याचे स्वरूप व सजा यामध्ये संतुलन राखले गेले आहे. जसा गुन्हा असेल तशी सजा दिली जाते. जघन्य व निर्घृण गुन्ह्यांबाबत शिक्षा दिली जाऊ नये, तर काय केले जावे? निर्घृण गुन्ह्यांसाठी कठोर सजा दिल्याने माणुसकीची बाजू दुर्बल पडत नाही, उलट ती प्रबळ बनते व एक स्वस्थ व अपराधविरहित समाजाच्या निर्मितीसाठी ती साहाय्यभूत ठरते. खून, बलात्कार, चोर्या-दरोडे यासारखे गुन्हे प्रत्येक कालखंडात होत आले आहेत, परंतु या तथ्याला इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा एखादा इस्लामी समाज स्थापन झाला, तेव्हा तेव्हा त्याने निर्घृण गुन्ह्यांचे पूर्ण निर्मूलन करून सोडले. अमेरिकेचे उदाहरण घ्या. तेथे प्रत्येक सेकंदाला चोरी होते, काही मिनिटांच्या अंतराने खून होतो आणि बलात्कार तर आता गुन्हा राहिलेलाच नाही. त्याच्या तुलनेत सौदी अरबस्तानाचे उदाहरण घ्या. खरे तर तेथेही संपूर्ण इस्लाम लागू नाही, पण इस्लामी शिक्षेचा नियम नक्कीच आहे. तेथे चोरीची घटना क्वचितच कधी तरी घडते आणि खून तर वर्षभरात क्वचित घडून येतो.

- सय्यद अबुल आला मौदूदी
    या ग्रंथात वाचकाला नीती शास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील नीतीमत्ते संबंधी एकमेव योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही. ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने स्वत:मध्ये नैतिकता निर्माण करावी. नैतिकते विषयीचे सर्व मूलभूत प्रश्न असा स्थितीत त्याच्यासाठी अनुत्तरित झाले आहेत.
    मानवी नैतिकता निर्मितीसाठी इस्लामने आम्हाला देऊ केलेले काही मुलाधार आहेत. कारण इस्लाम विशिष्ट जातीची संपत्ती नाही तर अखिल मानवजातीची सामुहिक संपत्ती आहे.

आयएमपीटी अ.क्र. 156    -पृष्ठे - 28    मूल्य -10      आवृत्ती - 1 (2009)







डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/7ttdn2kfhotm6l1i1n4twnp89ypv5n1p

युरोपमध्ये धर्माविरुद्ध जी प्रतिक्रिया झाली ती वास्तविकपणे तेथील चर्चच्या व्यवस्थेतील दोषांचे स्वाभाविक फळ होते, हे यावरुन स्पष्ट होते. इस्लाममध्ये अशा तऱ्हेची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच त्यात ख्रिश्चन धर्माप्रमाणे कसलेही कूट प्रश्न नाहीत ज्यायोगे माणसांत धर्मविन्मुखतेची भावना निर्मांण होऊन त्यांचा कल निरिश्वरवादाकडे झुकतो. इस्लाममध्ये कसलेही चर्च आढळत नाही. केवळ अल्लाह आहे जो समस्त जिवांचा व सृष्टीचा एकमेव निर्माता आहे. मृत्यूनंतर सर्व लोक त्याच्याच समोर हजर केले जातात. ही इतकी स्पष्ट व उघड श्रद्धा आहे की निसर्गवादी व नास्तिक मंडळींनी ती आहे असे सिद्ध करण्याचे ठरविले तरी विनासायास (व प्रामाणिकपणे) तसे सिद्ध करु शकत नाहीत.
धर्माच्या मक्तेदारीचा शेवट
इस्लाममध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंच्या वर्गांप्रमाणे एखादा वर्ग आढळत नाही. तसेच धर्मावर कोणाही एका व्यक्तीचे अगर समूहाचे प्रभुत्व अथवा एकाधिकार नसतो. उलट ती सर्व मानवाची सार्वजनिक संपत्ती असून प्रत्येकास आपल्या प्राकृतिक, आध्यात्मिक व मानसिक कुवतीनुसार त्यापासून लाभ घेण्याचा समान हक्क असतो. इस्लामच्या दृष्टीने सर्व मानव एकमेकासमान आहेत. त्यांच्यात जो काही फरक आहे तो त्यांच्या कर्मानुसार वा कृत्यानुसार आहे. जे संयम करणारे असतात तेच आदरास प्राप्त आहेत मग व्यवसायाने ते इंजिनीयर असोत की प्राध्यापक असोत तसेच साधा मजूर असो की कारागीर. धर्म या विविध व्यवसायापैकी एक व्यवसाय नाही, की व्यावसायिक धार्मिक व्यक्तींच्या (ख्रिश्चन धर्मगुरुप्रमाणे) एखाद्या वर्गाला इस्लाम असे म्हटले जाऊ शकत नाही. इस्लामी उपासना करण्यास कोणत्याही ख्रिश्चन धर्मगुरूसारखी आवश्यकता नसते, त्याचे हेच कारण आहे. समाजात सामाजिक नियमांचे व तत्त्वांचे तज्ञ असण्याची गरज असते. इस्लामी धर्मशास्त्राचा तसेच इस्लामी कायदातज्ञांचा दर्जा इतर देशांत तशा तज्ञांचा सामान्यत जसा दर्जा असतो तसाच येथेही असतो. इतरांच्या तुलनेत त्यांना कसलेही प्राधान्य नसते व काही विशेष सवलती अगर संरक्षणही नसते. कायदातज्ञाच्या रुपाने ते राज्याचे सल्लागार म्हणून काम करतात. उदाहरण द्यायचे झाले तर जामिया अजहर एक धार्मिक संस्था आहे. परंतु युरोपियन चर्चप्रमाणे तिला विरोधकांना जिवंत जाळण्याचा अधिकार नाही किवा त्यांचा निर्घृणपणे छळ करून त्यांना नष्ट करून टाकण्याचाही अधिकार नाही. लोकांच{ तार्किक चर्चा करुन तिच्या चुका दाखवू शकतात. कारण इस्लामवर कोणाही व्यक्तीचा अगर वर्गांचा एकाधिकार नसून ज्यांना धर्माचे संपूर्ण ज्ञान प्राप्त आहे व जे जीवनातील व्यवहारी समस्या सोडविण्यासाठी आपली आवडनिवड बाजूला ठेवून निःपक्षपातीपणाने धार्मिक दृष्टिकोन व्यक्त करु शकतात, अशाच व्यक्तींना धर्माच्या संबंधात अधिकार प्राप्त असतो.
इस्लामी व्यवस्थेत उलेमांना म्हणजे इस्लामी कायदेतज्ञांना प्रभुत्व असेल व ते सर्व उच्च पदावर आरुढ असतील असा इस्लामी व्यवस्थेचा अर्थ कदापिही नाही. इस्लामी व्यवस्था स्थापन झाल्याने जो मुख्य बदल निर्माण होतो तो केवळ इतकाच की इस्लामी शरिअत अथवा ईश्वरी कायद्याच्या मूळ पायावरच शासन पद्धत उभारलेली असते. याखेरीज अन्य कसलाही बदल होत नाही. इंजिनीयर व डॉक्टर आपले काम पुरेपूर रीतीने करीत असतात. तसेच अर्थशास्त्रज्ञही आपल्या क्षेत्रात क्रियाशील असतात. होय एक फरक नक्कीच होतो, तो म्हणजे त्याच्या आर्थिक उलाढालींच्या मर्यादा, इस्लामी अर्थपद्धतीच्या प्रकाशात ठरविल्या जातात व त्याच्याच सहाय्याने ते आपल्या आर्थिक नीतीच्या रुपरेषा आखत असतात.
इतिहास या गोष्टीस साक्ष आहे की इस्लामी श्रद्धा व इस्लामी राज्य आणि विज्ञान व त्याचे सिद्धान्त लागू करण्याच्या बाबतीत कधीही टक्कर अथवा झुंज झाली नाही. इस्लामी इतिहासात, कोणाही विज्ञानशास्त्राला एखाद्या संशोधनाकरिता कधीही जिवंत जाळले गेले नाही व कोणालाही अशा अपराधाखातर कठोर यातना दिल्या गेल्या नाहीत. विज्ञान व इस्लामच्या या मूलभूत श्रद्धेच्या दरम्यान या संपूर्ण सृष्टीचा निर्माता केवळ एक ईश्वर आहे ही गोष्ट खोटी नाही. म्हणूनच इस्लाम मानवाला आकाश (अंतरिक्ष) व जमीन याचे अवलोकन व अभ्यास करण्याचे पुन्हा पुन्हा आवाहन करतो जेणेकरुन आपल्याला सान्निध्य मिळवावे. या सृष्टीनिरीक्षणामुळेच पश्चिमेतील अनेक असे वैज्ञानिक जे सुरुवातीला ईश्वराचे अस्तित्व मानत नव्हते आता ईश्वराचे अस्तित्व मान्य करतात.
आपल्या अनुयायांना निरीश्वरवादाकडे झुकण्यास भाग पाडणारी युरोपियन चर्चप्रमाणे कोणतीही व्यवस्था इस्लामध्ये नाही, हे आम्ही वर सांगितलेलेच आहे. असे असतानाही काही लोक जेव्हा इस्लामी देशात निरीश्वरवादाचा प्रचार करताना दिसतात, तेव्हा आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की, शेवटी या लोकांना हवे तरी काय? हे लोक खरे तर आपल्या भूतपूर्व वसाहतवादी धन्याचे अंधानुकरण करणारे लोक आहेत. असे अंधानुकरण करताना धर्मावर व धार्मिक उपासनांवर उलटसुलट टीका-टिपणी करण्याचे व मुस्लिमांना धर्मविन्मुख बनविण्याचे उघड स्वातंत्र्य दिले जावे, असे त्यांना हवे आहे. यालाच ते विचारस्वातंत्र्य असे गोंडस नाव देतात.
याचकरिता तर युरोपवासियांनी आपल्या धर्माविरुद्ध लढा दिला होता की त्यांना धर्माच्या दडपणापासून व त्याने पसरविलेल्या अंधविश्वासातून त्यांची सुटका व्हावी व त्यांना खऱ्या अर्थाने वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त व्हावे. अशा रितीने ते लोक आपल्या कार्यांत काही अंशी बाजूला होते व तसे करण्यास विवश होते. इस्लाममध्ये चर्चप्रमाणे दडपशाही करणारी यंत्रणा नाही, तसेच अंधविश्वासालाही वाव नाही. पुढे जाऊन तर तो माणसाला अशी सर्व स्वातंत्र्ये देतो जी त्याच्यासाठी आवश्यक आहेत. ज्याच्या नावाने आमचे हे तथाकथित प्रगतिवादी इतका आरडाओरडा करताना दिसतात, शेवटी याचे कारण तरी काय? इस्लामवर हे लोक इतके रुष्ट का झाले आहेत?
विचारस्वातंत्र्याचा ध्वज धारण करणाऱ्या या कथित लोकांना, कसलेही विशेष स्वारस्य नाही, हीच गोष्ट सत्य आहे. त्याच्या आडून समाजात नैतिक अधःपतन घडवून आणून स्वैर लैंगिक अराजकतेचा रोग लावणे हा त्यांचा वास्तविक उद्देश आहे. आपले घृणास्पद उद्दिष्ट झाकण्यासाठीच ते आपल्या विचार स्वातंत्र्याची घोषणा जोरजोरात देत असतात. धर्म व नीती यांच्या विरुद्ध या लोकांनी जो घृणास्पद लढा सुरू केला आहे त्यामध्ये विचारस्वातंत्र्याच्या घोषणेचा हेतू केवळ इतरांची फसगत करण्याचा आहे. इस्लाम मानवाच्या विचारावर बंधने घालतो म्हणून हे लोक इस्लामचा विरोध करीत आहेत असे नाही. धर्म मानवजातीला खालच्या दर्जाच्या व नीच विकारवादापासून व विचारांच्या दास्यत्वातून मुक्त करु इच्छितो. हीच गोष्ट या उनाड प्रवृत्तीच्या प्रेमिकांना पसंत नाही व तेच त्यांच्या धर्मविरोधाचे मूळ कारण आहे.
इस्लामवर हुकूमशाहीचा आरोप
विचारस्वातंत्र्याचे समर्थन करणारे असाही आरोप करीत असतात की इस्लामची राजकीय पद्धत वास्तवात एक हुकूमशाही पद्धत आहे. त्यात राज्याला व्यापक अधिकार असतात व राज्य अशा अधिकाराचा धर्माच्या नावाखाली निस्संकोचपणे उपयोग करीत असतो व धर्मांधपणामुळे अविचाराने लोक स्वतःला ईश्वरी कायद्यांच्या स्वाधीन करुन टाकतात. इस्लामी राज्याच्या हातात सत्तेचे असे केंद्रीकरण झाल्याने हुकूशाहीचा जन्म होतो. त्यामुळे एक अशी व्यवस्था आस्तित्वात येते ज्यामध्ये जनतेचा दर्जा गुलामापेक्षा अधिक काही नसतो. जनतेला आपल्या बऱ्यावाईटाबद्दल विचार करण्याचा, समजण्याचा तसेच आपले मत सांगण्याचा व एखादा निर्णय घेण्याचा अधिकार मुळातच प्राप्त नसतो. त्यांचे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेतले जाते व त्यानंतर शासनाच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्यच कोणात उरत नाही. एखाद्या दुर्दैवी माणसाने तसा प्रयत्न केलाच तर त्याला धर्माविरुद्ध व ईश्वराविरुद्ध बंड करणारा असे म्हणून गप्प केले जाते.
या आरोपातील तथ्यांश
या निराधार आरोपाचे सर्वोकृष्ट उत्तर खुद्द कुरआननेच दिले आहे. एकेठिकाणी असे सांगितले गेले आहे,
‘‘त्यांची प्रत्येक कृती आपापसात सल्लामसतीने ठरविली जाते.’’ (कुरआन ४२:३८)
एकेठिकाणी असे आले आहे,
‘‘व जेव्हा तुम्ही लोकांमध्ये निर्णय घ्याल तेव्हा न्यायाने करा.’’ (कुरआन ४:५८)
पहिले खलीफा माननीय अबू बक्र सिद्दीक (र) यांनी सांगितले की, ‘व मी जर अल्लाहची व प्रेषित मुहम्मद (स) यांची अवज्ञा केली तर माझ्या आज्ञेचे पालन करणे तुमच्यावर बंधनकारक नाही.’
दुसरे खलीफा माननीय उमर (र) यांनी जेव्हा म्हटले, ‘जर तुम्हाला माझ्यात कसलाही दोष दिसला तर तो दुरुस्त करा’
यावर एका व्यक्तीने म्हटले की, ‘ईश्वराची शपथ! आम्हाला तुमच्यात कसलाही दोष आढळला असता तर आमच्या तलवारीने तो आम्ही दुरुस्त करुन टाकला असता.’
इस्लामच्या अशा शिकवणीमध्ये व त्याच्या अनुयायांच्या अशा उघड उदाहरणांमध्ये या निराधार आरोपात कसलेही तथ्य असल्याचे आढळून येते काय?
धर्मांच्या नावावर अनेकवेळा दडपशाही करण्यात आली हा इतिहास आहे व आजसुद्धा त्याच्या नावाने अनेक जुलूम केले जात आहेत. परंतु हे सर्व जुलूम व अत्याचार खरोखरच धर्मांसाठी केले जात आहेत काय? हिटलरची हुकूमशाही धर्मावर आधारलेली होती काय? स्टालिन एक जुलमी व अत्याचारी हुकूमशहा होता व त्याचे शासन एक सैनिकी राज्य होते ही गोष्ट आज रशियात उघडपणे मान्य केली जाते. मग स्टालिनचे शासन धर्माधिष्ठित होते काय? माऊत्सेतुंग असो की फ्रॅन्को, दक्षिण आफ्रिकेचा डॉक्टर म्लान असो की राष्ट्रवादी चीनचा चँग-कै-शैक असो. हे सर्व हुकूमशहा धर्मांच्या आधारावर सत्तारुढ होते काय? सत्य असे आहे की विसाव्या शतकातील माणसाने आध्यात्मिक क्रूरपणा पासून तर सुटका करून घेतली आहे पण अजूनही तो हुकूमशाहीच्या व दडपशाहीच्या अतिभयानक व घृणास्पद अशा स्वरुपाला बळी पडला आहे. त्यावर माणसांची दिशाभूल करण्यासाठी व त्यांना मूर्ख बनविण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गोंडस नावांची लेबले लावली गेली आहेत. एकेकाळी धर्मांना जे पावित्र्य होते तसे पावित्र्य आजही त्यांना प्राप्त आहे.
कोणीही बुद्धिवान माणूस हुकूमशाहीचे समर्थन करु शकत नाही व ती योग्य आहे असेही समजू शकत नाही. उत्तमातील उत्तम कायद्यांनाही विकृत करून व त्यांच्यात दोष निर्माण करुन स्वतःच्या स्वार्थांसाठी व उद्दिष्टांसाठी, यंत्रासारखा त्याचा वापर केला जाऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की दोष त्या कायद्यांचा नसून त्या स्वार्थांध व्यक्तींचा आहे जे आपले घृणास्पद हेतू झाकण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करतात.
फ्रान्सच्या क्रांतीच्या वेळी स्वातंत्र्याच्या नावाने अतिघृणास्पद व हिडीस अत्याचार केले गेले. आम्ही अशा अत्याचारांचा आडोसा घेऊन संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीस विरोध करावा, असा याचा अर्थ कदापिही होत नाही. याचप्रमाणे इतिहासात कायदा व घटना या नावावर शेकडो निरपराध लोकांना अनेकवेळा तुरुंगात डांबले गेले, त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठेचून काढण्याचा व दडपण्याचा प्रयत्न केला गेला, पण या सर्व गोष्टी, कायदा व घटना निरर्थक असून त्यांना नष्ट करु टाकण्यात यावे, असे म्हणण्यास पुरेशा आहेत काय? त्याचप्रमाणे जर एखाद्या देशात धर्माच्या नावाखाली दडपशाही चालली असेल तर केवळ एवढ्यासाठी आम्ही जीवनातून धर्म बाजूला काढून फेकून द्यावयास हवा काय? एखादा धर्म जर अन्याय, अत्याचार व क्रूरपणावर आधारलेला असेल तर अशा धर्माचा निस्संशयपणे त्यागच करणे अधिक चांगले आहे. पण इस्लामप्रमाणे जो धर्मन्याय शिकवितो व सर्व प्रकारचे अत्याचार नष्ट करु इच्छितो, तर त्याचा विरोध करण्यात कसले औचित्य आहे? इस्लामने केवळ मुस्लिमांमध्येच न्यायाची श्रेष्ठ व पवित्र उदाहरणे घालून दिली असे नाही तर, इस्लामने त्याच्या कट्टर शत्रूंच्या बाबतीतही न्यायाची अशी तेजस्वी परंपरा स्थापन केली आहे की त्यासारखे उदाहरण शोधूनही सापडत नाही.
दडपशाहीवर सर्वोत्तम उपाय
लोकांच्या मनामध्ये अल्लाहवरील इमान व श्रद्धा निर्माण करणे हा दडपशाहीला तोंड देण्याचा सर्वांत उत्कृष्ठ मार्ग आहे. तसेच त्यांना इतरांच्या स्वातंत्र्याचा (हक्काचा) आदर करण्यास शिकविले जावे. त्यांच्या रक्षणाची हमी खुद्द धर्मानेच दिली आहे. अशा प्रकारच्या ईश्वरवादी समाजातील व्यक्ती शासनाला आपल्या मर्यादांचे उल्लंघन करुन इतरांवर अत्याचार करण्याची परवानगी देऊच शकत नाहीत. इस्लामने जशी न्यायपूर्ण जीवनपद्धत स्थापन करुन दडपशाहीच्या विरोधावर भर दिला आहे, या प्रकारचे उदाहरण अन्य जीवनपद्धतीत आढळत नाही. इस्लाम जनतेवर हे कर्तव्य सोपवितो की शासनाने त्यांच्यावर जुलूम, अत्याचार केले तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावयास हवा.
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे असे सांगणे आहे, ‘‘तुम्हापैकी कोणी वाईट कृत्य पाहिले तर ते सुधारून टाका.’’ (बुखारी, मुस्लिम)
आणखी एकेसमयी प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘जुलमी शासकासमोर सत्य गोष्ट बोलणे, अल्लाहसमीप सर्वांत मोठे जिहाद आहे.’
जीवनातील हेच ते बहूमूल्य नियम होते, जे समजून घेतल्यानंतर लोकांना तिसरे खलीफा माननीय उस्मान (र) यांच्या संबंधात ते सरळ मार्गापासून ढळल्याचे जेव्हा लोकांना समजून आले तेव्हा ते त्यांच्याविरुद्ध उठले. त्यांनी केलेल्या या उठावामुळे बिघाडात आणखी वाढच झाली, ही गोष्ट वेगळी आहे.
शेवटी आम्ही आमच्या प्रगतिवादी मित्रांना हे सांगू इच्छितो की वास्तविक स्वातंत्र्य धर्माचा त्याग करण्यात नसून त्याचा समावेश आम जनतेमध्ये अन्याय व अत्याचार सहन न करण्याची भावना निर्माण करण्यात आहे. तसेच कोणी तसे करताना आढळल्यास त्याची सुधारणा करण्यात आहे. क्रांतीची हीच भावना इस्लामचा एक विशिष्ट गुण आहे.

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   
    पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा स्वीकार करीत नाही.
    परलोकावरील ईमानचा आमच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि जीवनाच्या सर्वांगाणा ते व्यापून आहे. परलोक वरील ईमान अल्लाहवरील ईमान अधिक दृढ करते, याचे ज्ञान ही पुस्तिका वाचल्याने कळून येते.

    आयएमपीटी अ.क्र. 155     -पृष्ठे - 24     मूल्य - 16                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/py7ez8j1hegc2icvzfg7lobk701ltq7b


(हे भाषण मौलाना अबुलआला मौदूदी यांनी रोटरी क्लब लाहोरमध्ये दिले होते. हे भाषण जनाब खलील हामिदीसाहेब यांनी लिहून काढले आहे.)
आम्हा मुसलमानांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्या लोकांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्राकार्टापासून प्रारंभ झाला असेल. परंतु आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला.
वस्तुतः ही काहीशी आश्चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्न उत्पन्न होत राहिला आहे की त्याचे मौलिक अधिकार काय आहेत? मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्वात वसत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्न उत्पन्न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की चे अधिकार निश्चित केले जावेत.
तितकीच आश्चर्याची गोष्ट ही सुध्दा आहे की या विश्वातील कोणतेही सजातीय अशे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे. जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आम्ही पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.
निसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो! कोणताही हिस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करुन त्यांची थप्पी लावत असेल. खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्याशी करतो. संभवतः हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे, जो महान अल्लाहने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे! माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे.
सिहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्या महायुध्दात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे. आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुतः मानवी अधिकारांची निश्चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.
वर्तमान काळात मानवी अधिकारांच्या जाणिवेचा उदय
हे योग्य आहे की मानवी अधिकारांच्या इस्लामी जाहीरनाम्याच्या मुद्यावर चर्चा करण्यापूर्वी वर्तमानकाळात मानवी अधिकारांच्या जाणिवेच्या इतिहासावर संक्षिप्त दृष्टी टाकली जावी.
  1. इंग्लंडमध्ये किग जॉनने इ.स.१२१५ मध्ये जो मॅग्नाकार्टा जारी केला होता तो मुळात त्याच्या उमरावांच्या(Barons) दबावाचा परिणाम होता. त्याचा दर्जा बादशाह व त्याच्या उमरावामध्ये झालेल्या करारासारखा होता. आणि तो जास्त करून उमरावांच्या फायदा तयार केलेला होता. आम जनतेच्या अधिकारांचा त्यात प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतरच्या लोकांनी त्यातून असा अर्थ काढला की जर तो अर्थ त्याच्या मूळ लेखकांच्या समोर सांगितला असता तर ते आश्चर्यचकित झाले असते. सतराव्या शतकातील वकिली पेशाच्या लोकांनी त्यात असे वाचले की पंचांच्या समोर अपराधाची चौकशी(Trial By Jury), बेकायदेशीर तुरुंगांत डांबून ठेवण्याच्या विरुध्द दाद मागण्याचा अधिकार(Right Of Habeascorpus)आणि कर लावण्याच्या अधिकारावर नियंत्रणाचे हक्क इंग्लंडच्या जनतेला यामध्ये दिले गेले आहेत.
  2. टॉम पेन(Tom Paine) १७३७ ते १८०९ यांची पुस्तिका(Pamphlet) ‘मानवी अधिकार’(human Rights) ने पाश्चिमात्य लोकांच्या विचारावर फार मोठा क्रांतिकारी प्रभाव टाकला आणि त्यांच्याच पुस्तिकेने(१७९१ ई.) पाश्चिमात्य देशांमध्ये मानवी हक्कांच्या संकल्पनेला आम प्रसिद्धी दिली. हा गृहस्थ ईश्वरी आदेशाद्वारे धर्म प्राप्त झाल्याचे मान्य करीत नसे. तसे पाहिले तर तो काळच मुळी ईश्वरी आदेशाद्वारे प्राप्त झालेल्या धर्माच्या विरुध्द बंडांचा काळ होता. म्हणून पाश्चिमात्य लोकांना असे वाटले की ईश्वरी आदेशांद्वारे प्राप्त झालेल्या धर्मात मानवी अधिकाराची संकल्पना नाही.
  3. फ्रेंच क्रांतीच्या कथानकातील सर्वात महत्वाचे पृष्ठ म्हणजे ‘मानवी अधिकारांचा जाहीरनामा’(Declaration of the Human Rights) होय, जो १७८९ ई. मध्ये जाहीर झाला. हे अठराव्या शतकाच्या सामुहिक तत्त्वज्ञान व विशेषतः रूसोच्या सामाजिक कराराच्या(Social Contract Theory) दृष्टिकोनाचे फळ होते. यात समाजाची सर्वंकष सत्ता, स्वातंत्र्य, समानता आणि संपत्तीच्या नैसर्गिक हक्कांचे समर्थन केले गेले होते. यात मताधिकार, कायदा करणे आणि कर बसविण्याच्या अधिकारावर आम लोकांच्या मतावर नियंत्रण, पंचांच्या समोर अपराधांची चौकशी(Trial by Jury) वगैरेंचे समर्थन केले गेले.
या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास फ्रान्सच्या घटनापरिषदेने फ्रान्सच्या क्रांतीच्या काळात संग्रहित केले होते. जेव्हा घटना तयार केली जाईल तेव्हा तिच्या सुरवातीस हा जाहीरनामा लिहिला जावा आणि घटनेत त्याच्या आत्म्याचा विचार होईल असा हेतु होता.
  1. अमेरिकेच्या(U.S.A.) दहा दुरुस्तीसूचनेत बहुतांशी त्या सर्व अधिकारांचा समावेश केला गेला आहे जे ब्रिटिश लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित होऊ शकत होते.
  2. मानवी हक्क व कर्तव्यांचा तो जाहीरनामा सुद्धा फार महत्वाचा आहे, जो बगोटा परिषदेत अमेरिकी राज्यांनी १९४८ मध्ये मंजूर केला.
  3. नंतर लोकशाही तत्त्वावधानांत युनो(UNO) ने क्रमाक्रमाने अनेक निश्चित आणि अनेक संरक्षण हक्कासंबंधी ठराव पास केले आणि अखेरीस जागतिक मानवी हक्कांचा जाहीरनामा सर्वांसमोर आला.
डिसेंबर १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेने एक ठराव पास केला, ज्यात मानवाच्या वंश निर्मूलनाला आंतरराष्ट्रीय कायद्याविरुध्द एक गुन्हा ठरविले.
मग डिसेंबर १९४८ मध्ये वंश निर्मूलनाला प्रतिबंध आणि शिक्षा देण्यासाठी एक ठराव मंजूर केला गेला. व १२ जानेवारी १९५१ ई. ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यात वंश निर्मूलनाची व्याख्या करताना म्हटले आहे की निम्नलिखित कृत्यांपैकी एखादे कृत्य या उद्देशाने करणे की एखाद्या जमात, वंश अथवा वांशिक समूह(Group) अथवा त्याच्या एका भागाला नष्ट केले जावे.
  1. असल्या एखाद्या समूहाच्या व्यक्तींना ठार करणे.
  2. त्यांना भयंकर प्रकारची शारीरिक अथवा मानसिक इजा करणे.
  3. त्या समूहावर हेतुपुरस्पर जीवनाची अशी स्थिती लादणे जी त्याच्या शारीरिक अस्तित्वासाठी पूर्णतः किवा अंशतः विनाशकारी ठरेल.
  4. त्या समूहात जबरीने जननप्रक्रिया रोखण्यासाठी पावले उचलावीत.
  5. जबरीने त्या समूहाच्या संततीला एखाद्या अन्य समूहात बदलणे.
१० डिसेंबर १९४८ ला जो ‘जागतिक मानवी अधिकारांचा जाहीरनामा’ मंजूर केला गेला होता, त्याच्या प्रस्तावनेत सामान्यतः अन्य उद्देश्यांबरोबर एक उद्देश्य असादेखील व्यक्त केलेला आहे की ‘मानवी मौलिक अधिकारांत व्यक्तीची प्रतिष्ठा व महत्वात पुरुष आणि स्त्रियांच्या समान अधिकारांवरील श्रध्देला विश्वसनीय बनविण्यासाठी’ तसेच त्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्देश्यांपैकी या एकाचा उल्लेख केला गेला होता की ‘मानवी हक्कांचा आदर दृढ करण्यासाठी व वंश आणि लिग अथवा भाषा धर्माचा फरक केल्याशिवाय सर्व माणसांना मौलिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करणे.’ अशा प्रकारेच कलम ५५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या या जाहीरनाम्यात सांगितले आहे - ‘संयुक्त राष्ट्रसंघाची सभा मानवी अधिकार आणि सर्वांसाठी मौलिक स्वातंत्र्याची विश्वव्यापी प्रतिष्ठा आणि त्यांच्या संरक्षणात वाढ करील.’
या संपूर्ण जाहीरनाम्याच्या कोणत्याही भागाशी कोणतेही मतभेद कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिनिधीने दर्शविले नाहीत. मतभेद न दर्शविण्याचे कारण असे होते की ही केवळ सामान्य तत्त्वांची घोषणा व प्रकटन होते. कोणत्याही प्रकारचे बंधन कोणावरही येत नव्हते. हा काही करार नव्हे की ज्यामुळे सही करणार्या सर्व सरकारांनी त्याची अम्मलबजावणी करण्यास बाध्य व्हावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी येत असेल. त्याच्यात असे स्पष्ट केलेले आहे की एक आदर्श आहे. तेथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय काही देशांनी त्याच्या बाजूने अथवा त्याच्याविरुद्ध मत देण्यात अलिप्तता स्वीकारली.
आता पहा की या जाहीरनाम्याच्या अगदी छत्रछायेत मानवतेच्या अगदी प्रारंभिक अधिकारांची जगात आम कत्तल होत आहे आणि ती सुद्धा खुद्द सर्वात सुसंस्कृत आणि नेतृत्व करणार्या आणि तो मंजूर करणार्या देशांत होत आहे.
या संक्षिप्त निवेदनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्रथम तर पाश्चिमात्य जगतात मानवी हक्कांच्या कल्पनेचा दोन तीन शतकांपूर्वीच्या काहीही इतिहास नाही. दुसरे असे की जरी आज या हक्कांची चर्चा केलीही जात आहे, तरी त्याच्या पाठीमागे कोणताही अधिकार आणि अंमलबजावणी करणारी शक्ती नाही, तर या केवळ गोंडस इच्छा आहेत. या उलट इस्लामने मानवी अधिकारांचा जो जाहीरनामा पवित्र कुरआनमध्ये दिला आहे आणि ज्याचा खुलासा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अंतिम हजच्या प्रसंगी प्रसारित केला तो याच्यापेक्षा अधिक प्राचीन आहे. इस्लामला मानणार्या जमातीसाठी श्रद्धा, नीति व धर्म म्हणून ज्याचे अनुकरण अनिवार्य सुद्धा आहे. या अधिकारांना कृतीने स्थापन करण्याची अनुपमेय उदाहरणे सुद्धा प्रेषित मुहम्मद(स.) आणि धर्म भीरू खलीफांनी आपल्या पाठीमागे ठेवली आहेत.
आता मी त्या हक्कांचा संक्षिप्त उल्लेख येथे करतो जे इस्लामने मानवाला दिलेले आहेत.
सजीवाची प्रतिष्ठा अथवा जिवंत राहण्याचा हक्क
पवित्र कुरआनमध्ये जगातील सर्वप्रथम हत्येचे वर्णन केले गेले आहे. ही मानवाच्या इतिहासातील सर्वप्रथम दुर्घटना होती. त्यात एका माणसाने दुसर्या माणसाला ठार केले. त्यावेळी पहिल्यांदाच अशी गरज भासली की माणसाला माणसाच्या जिवाची प्रतिष्ठा करण्यास शिकविले जावे. त्याला समजावून द्यावे की प्रत्येक माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. या घटनेचे वर्णन केल्यानंतर पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की -
ज्याने एखाद्या माणसाला नाहक अथवा पृथ्वीवर उपद्रव माजविल्याच्या कारणाविना ठार केले, त्याने जणू सर्व लोकांची हत्या केली आणि ज्याने एका माणसाचे प्राण वाचविले तर त्याने जणू समस्त मानवांना जीवदान दिले.(५ : ३२)
या आयत(ईश वचन) मध्ये पवित्र कुरआनने एका माणसाला ठार करण्याला जगाला ठार करणे म्हटले आहे आणि त्या उलट एका माणसाचे प्राण वाचविण्यास संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचविण्यासारखे ठरविले आहे. ’अहया’ चा अर्थ आहे जिवंत करणे. दुसर्या शब्दात असे म्हणता येईल की जर एखाद्या माणसाने मानवी जीवन वाचविण्यासाठी प्रयत्न केला तर त्याने मानवजातीला जिवंत करण्यासारखे आहे. हा प्रयत्न एवढे मोठे पुण्य आहे की त्याला संपूर्ण मानवजातीला जिवंत करण्याच्या बरोबरीचे ठरविले आहे.या नियमाला दोन स्थिती अपवाद आहेत.
पहिली स्थिती अशी की एखादा मनुष्य खुनाचा अपराधी असेल आणि तो सूड(किसास) म्हणून ठार केला जाईल. दुसरी स्थिती अशी की एखाद्या माणसाने पृथ्वीवर उपद्रव माजवावा आणि त्याला ठार केले जावे. या दोन स्थिती शिवाय मानवी जीवाला व्यर्थ जाऊ देणे शक्य नाही.
अधिक पहा आयत - ला तकतुल्लन्नफसल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिलहक्क-(१७ : ३३)
मानवी जीवाच्या रक्षणाचा हा नियम महान अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभिक काळात स्पष्ट केलेला होता. मानवासंबंधी असा विचार करणे चुकीचे आहे की तो अंधारात जन्मलेला आहे आणि आपल्या सजातीयांना ठार करता करता त्याला एखाद्या टप्प्यावर असा विचार आला की माणसाला ठार करू नये. हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे आणि महान अल्लाहसंबंधी गैरसमजावर आधारित आहे. पवित्र कुरआन आम्हाला सांगतो की महान अल्लाहने सुरवातीपासूनच मानवाचे मार्गदर्शन केले आहे आणि याच मार्गदर्शनात ही गोष्ट सुद्धा समाविष्ट आहे की त्याने मानवाला मानवाच्या अधिकाराने परिचित केले.
विकलांग व निर्बलांचे संरक्षण
दुसरी गोष्ट जी पवित्र कुरआनवरून कळते आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या आदेशावरून स्पष्ट होते ती अशी आहे की स्त्रिया, मुले, म्हातारे, जखमी आणि आजार्यांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला करणे धर्मसम्मत नाही. मग ते आपल्या जमातीशी संबंधित असोत अथवा शत्रू-जमातीचे असोत. याला अपवाद असा की युद्ध परिस्थितीत हे लोक स्वतः लढत असावेत. नाहीतर दुसर्या प्रत्येक स्थितीत त्यांच्यावर हल्ला करण्याची मनाई आहे. हा नियम आपल्या विशिष्ट जमातीसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी हाच नियम लागू आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी या बाबतीत अत्यंत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ईशभीरू खलीफांची स्थिती अशी होती की ते जेव्हा शत्रूशी सामना करण्यासाठी सेना पाठवीत असत, तेव्हा संपूर्ण सेनेला अशा स्पष्ट आज्ञा देत असत की, शत्रूवर हल्ल्याच्या वेळी कोणत्याही स्त्री, मुले, म्हातारे, जखमी व आजार्यांवर हात टाकू नये.
स्त्री-शीलाचे रक्षण
आणखी एक महान अधिकार ज्याचे ज्ञान आम्हाला पवित्र कुरआनमधून मिळते आणि हदीस(पैगंबरांची वचने) मध्ये सुद्धा याचा तपशील आहे. तो म्हणजे महिलेचे शील कोणत्याही परिस्थितीत आदरपात्र आहे. युद्धात शत्रूंच्या स्त्रियांशी संफ आला तर कोणत्याही मुसलमान सैनिकासाठी हे धर्मसम्मत नव्हे, की त्याने त्यांच्यावर अत्याचार करावा. पवित्र कुरआननुसार व्यभिचार पूर्णतः धर्मविरोधी आहे. मग तो कोणत्याही स्त्रीशी केलेला असो. याचा विचार न करता की ती स्त्री मुसलमान आहे की अन्य धर्मिय, आपल्या जमातीची आहे की अन्य जमातीची, मित्रराष्ट्राची आहे की शत्रूराष्ट्राची.
आर्थिक रक्षण
एक मौलिक नियम असा आहे की, उपाशी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीस पात्र आहे ही त्याला भाकरी दिली जावी. नग्न कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीला पात्र आहे की त्याला कपडे दिले जावेत. जखमी आणि आजारी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत याला पात्र आहे, की त्याला औषधोपचाराची सवलत उपलब्ध करून दिली जावी. याचा विचार न करता की तो उपाशी, नग्न, जखमी अथवा रोगी व्यक्ती शत्रू आहे की मित्र. हा त्रिकालाबाधित(Universal) हक्कांपैकी आहे. शत्रूशी देखील आम्ही असाच व्यवहार करू जर शत्रूराष्ट्राची एखादी व्यक्ती आमच्याजवळ आली तर आमचे कर्तव्य राहील की त्याला उपाशी, नग्न राहू देऊ नये आणि जखमी अथवा आजारी असेल तर औषधोपचार करावा.
व फी अमवालिहिम हक्कुल्लिसाइलि वलमहरुमु -(१९-५१) तसेच आयत - व युतमिऊनत्त आम अला हुब्बिही मिसकीन व यतीम व असीरा.-(७६-८)
न्यायाधिष्ठित निर्णयप्रणाली
पवित्र कुरआनचा हा अटळ नियम आहे की माणसाशी न्याय केला जावा. महान अल्लाहचा आदेश आहे -
एखाद्या समूहाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासुन तोंड फिरवावे. न्याय करा हे ईशपरायणतेच्या अधिक जवळ आहे.(५ : ८)
या आयतीत इस्लामने हा नियम ठरवून दिला की माणसांशी एका व्यक्तीबरोबर सुद्धा आणि एका जमातीबरोबर सुद्धा कोणत्याही परिस्थितीत न्यायाचा विचार करावा लागेल. इस्लामच्या दृष्टीने हे कदापि योग्य नाही की मित्राबरोबर तर न्याय करावा आणि शत्रूबरोबर या नियमाला दृष्टी आड करावे.
पुण्य कार्यात सहकार्य आणि पाप कर्मात असहकार
आणखी एक नियम जो पवित्र कुरआनने निश्चित केला आहे तो असा आहे की पुण्य आणि हक्क मिळवून देण्याच्या बाबतीत प्रत्येकाशी सहकार्य केले जावे आणि वाईट बाब व जुलुमाच्या बाबतीत कोणाशीही सहकार्य केले जाऊ नये. अफत्य भाऊ जरी करीत असेल तरी सुद्धा आम्ही त्याच्याशी सहकार्य करता कामा नये आणि पुण्यकर्म शत्रू जरी करीत असेल तरी त्याच्यासाठी सहकार्याचा हात पुढे करावा. महान अल्लाहचा आदेश आहे -
जे कर्म पुण्य व ईशपरायणतेचे आहेत त्यात सर्वांशी सहकार्य करा आणि जे पाप कर्म आहेत, त्यात कोणाशी सहकार्य करू नका.(५ : २)
‘बिर्र’ चा अर्थ केवळ पुण्यच नव्हे तर अरबी भाषेत ‘अधिकार मिळवून ईशपरायणता व इंद्रीयनिग्रहामध्ये आम्ही प्रत्येकाला सहकार्य द्यावे’ असा सुध्दा आहे. पवित्र कुरआनचे हे कायमस्वरुपी तत्त्व आहे.
समानतेचा अधिकार
आणखी एक तत्त्व ज्याचा पवित्र कुरआनने मोठा उद्घोष केला आहे तो असा की, सर्व माणसे समान आहेत. एखाद्याला श्रेष्ठत्व प्राप्त असेल, तर ते चारित्र्याच्या आधारे होय या बाबतीत पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे,
हे लोकहो, आम्ही तुम्हाला एक पुरुष आणि एक स्त्रीपासून निर्माण केले आणि तुम्हाला समुदाय आणि कुटूंबात विभाजित केले जेणेकरून तुम्ही एक दुसर्याला ओळखावे. निःसंशय तुमच्यापैकी अधिक प्रतिष्ठित तो आहे जो अधिक ईशपरायण आहे.(४९ : १३)
यात पहिली गोष्ट अशी सांगितली आहे की, संपूर्ण मानवजातीचे एकच मूळ आहे. हे निरनिराळे वंश, निरनिराळे रंग, निरनिराळ्या भाषा वस्तुतः मानवी जगाच्या विभाजनासाठी हे काही योग्य कारण नव्हे.
दुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की, आम्ही लोकसमुदायाचे हे विभाजन ओळखीसाठी केलेले आहे. दुसर्या शब्दांत, एक भाऊकी, एक जमात आणि एका कुटुंबाला दुसर्यापेक्षा गर्व करण्याचे व श्रेष्ठत्वाचे काहीही कारण नाही की त्यांनी आपल्या हक्कांना वाढवून चढवून ठेवावे आणि दुसर्यांचे कमी करावेत. अल्लाहने जितकी भिन्नता केली आहे, चेहरे एक दुसर्यापेक्षा भिन्न बनविली आहेत अथवा भाषा एक दुसर्यापासून वेगळ्या ठेवल्या आहेत. या सर्व गोष्टी गर्व करण्यासाठी नव्हेत; तर केवळ अशासाठी आहेत की, आपापसांत फरक करावा सर्वच माणसे एकसमान असती, त्यांच्यात फरक करणे अशक्य झाले असते. अशा प्रकारे हे विभाजन नैसर्गिक आहे. आणि दुसर्यांचे अधिकार हडप करणे या अनाठायी फरक करण्यासाठी नाहीत. प्रतिष्ठा आणि अभिमानाचा पाया चारित्र्याची स्थिती आहे. हे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी एका दुसर्या पद्धतीने सांगितली आहे. त्यांनी मक्का विजयानंतर जे भाषण केले, त्यात म्हटले आहे,
एखाद्या अरबाला एखाद्या अरबेतरावर कोणतेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही आणि एखाद्या अरबेतराला अरबावर सुद्धा नाही, न एखाद्या गौरवर्णियाला कृष्णवर्णियावर आणि कृष्णवर्णियाला गौरविर्णयावर. ईशपरायणते व्यतिरिक्त वंशाच्या पायावर कोणतेही श्रेष्ठत्व नाही.
म्हणजे श्रेष्ठत्व प्रामाणिकपणा व ईशपरायणते वर अवलंबून आहे. अशातली गोष्ट नाही की, एखादी व्यक्ती चांदीने निर्माण केली आहे आणि कोणी दगडाने व कोणी मातीने, तर सर्व लोक एकसमान आहेत.
फिरऔनच्या राज्यव्यवस्थेला पवित्र कुरआनने ज्या कारणास्तव खोटे ठरविले आहे, त्यांपैकी एक असे होते की- ‘‘इन्न फिरऔना अला फिल अर्जि व ज अला अहलहा शैए यस्तज इफु ताइफत म्मिन्नहुम.’’ - २८.४ म्हणजे इस्लामला याची इच्छा नाही की एखाद्या समाजात माणसांना उच्च आणि नीच अथवा शासक आणि शासित वर्गात विभाजित केले जावे.
पापापासून अलिप्ततेचा अधिकार
आणखी एक तत्व असे आहे की एखाद्या व्यक्तीला पाप करण्याची आज्ञा दिली जाऊ शकत नाही. कोणासाठीही हे आवश्यक नाही अथवा त्याच्यासाठी हे धर्मसम्मत नव्हे की त्याला पापाची आज्ञा दिली गेली तर त्याने त्याचे पालन करावे. पवित्र कुरआनच्या आदेशानुसार, जर एखाद्या अधिकार्याने आपल्या हाताखालच्या कर्मचार्याला धर्मसम्मत नसलेली कामे करण्याची आज्ञा दिली अथवा एखाद्यावर व्यर्थ अत्याचार करण्याची आज्ञा दिली तर त्या कर्मचार्यासाठी या बाबतीत आपल्या अधिकार्याची आज्ञा पाळणे धर्मसम्मत नाही. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा आदेश आहे,
ज्या गोष्टींना सृजनकर्त्याने अयोग्य ठरविले आहे आणि पाप म्हटले आहे, कोणालाही अधिकार नाही की त्याने त्या गोष्टी करण्याची आज्ञा कोणाला द्यावी. तसेच आज्ञा देणार्यासाठी पापकर्माची आज्ञा देणे योग्य नव्हे आणि एखाद्या दुसर्या व्यक्तीसाठी असल्या आज्ञेचे पालन करणे देखील योग्य नव्हे.
अत्याचारीची आज्ञा पाळण्यास नकार देण्याचा अधिकार
इस्लामचे एक वैभवशाली तत्व असे आहे की, कोणत्याही अत्याचारीची आज्ञा पाळण्याचा अधिकार नाही. पवित्र कुरआनमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा अल्लाहने हजरत इब्राहीम(अ.) यांना मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आणि फर्माविले की,
‘‘माझ्या संततीसाठी देखील हाच वायदा आहे का?
तेव्हा अल्लाहने उत्तरादाखल म्हटले,
माझा वायदा अत्याचार्यासंबंधी नाही. ‘अहद’ चा शब्द येथे अशा अर्थाने प्रयुक्त झालेला आहे जसा इंग्रजी भाषेत ‘Letter of appointment' ‘नियुक्तिपत्रा’चा अर्थ आहे. उर्दूत ‘परवान-ए-अमर’(कार्य करण्याची परवानगी) म्हणता येईल.’’ पवित्र कुरआन - २-१२४.
या आयतीत अल्लाहने स्पष्ट केले आहे की अत्याचारींना अल्लाहकडून कोणतीही अशी कार्ये करण्याची परवानगी नाही, जेणेकरून त्यांनी दुसर्याकडून आज्ञापालनाची अपेक्षा करावी. म्हणून इमाम अबू हनीफा(रह.) फर्मावितात की कोणताही अत्याचारी या गोष्टीस पात्र नाही की, त्याने मुसलमानांचे मार्गदर्शक असावे. जर एखादा असा माणूस मार्गदर्शक बनला तर त्याचे आज्ञापालन करणे आवश्यक नाही. त्याला केवळ सहन केले जावे.
अधिक या स्पष्ट आयती डोळ्यासमोर ठेवावीत.
  1. ला तुतीअ अमरल मुसरिफीन - २६-१५१.
  2. वला तुतीअ मन अगफलना कल्बहू अन् जक्रिना - १८-२८.
  3. वजतनिबुत्तागूत - १६-३६.
  4. व तिलक आदुन जहदू बिआयाति रब्बिहिम व असौ रुसुलहू क्तबऊ उमर कुल्लि जब्बारिन अनीद - ११.५९
राजनीतिक प्रक्रियेत भागीदाराचा अधिकार
मानवाच्या मौलिक अधिकारापैकी एक मोठा अधिकार इस्लामने हा ठरविला आहे की समाजातील सर्व लोक राज्य शासनात भागीदार आहेत. सर्व लोकांच्या सल्ल्याने शासन बनले पाहिजे. पवित्र कुरआनने म्हटले, पवित्र कुरआन - २४.५१
महान अल्लाह त्यांना म्हणजे ईमानधारकांना पृथ्वीवर खलीफा पद बहाल करील.
येथे अनेकवचनी शब्दप्रयोग केला आहे आणि म्हटले आहे की आम्ही काही लोकांना नाही तर संपूर्ण जमातीला खिलाफत देऊ. शासन एका व्यक्तीचे अथवा एका कुटूंबाचे अथवा एका वर्गाचे नव्हे, तर संपूर्ण ईमानधारक जमातीचे असेल. ते सर्व लोकांच्या सल्ल्याने अस्तित्वात येईल. पवित्र कुरआनचा आदेश आहे,
पवित्र कुरआन - ४२-३८, तसेच आयत - ‘‘व शाविरहुम फिलअम्रि’’ - ३-१५९.
हे राज्य आपापसातील सल्ल्याने चालेल.
या बाबतीत हजरत उमर(र.) यांचे स्पष्ट आदेश आहेत. कोणालाही हा अधिकार पोचत नाही की त्याने मुसलमानांवर त्यांच्या सल्ल्याविना राज्य करावे. मुसलमान तयार असतील तर त्यांच्यावर राज्य केले जाऊ शकते आणि तयार नसतील तर केले जाऊ शकत नाही. या आज्ञेनुसार इस्लाम लोकशाही व सल्लागार मंडळाच्या शासनाचे तत्त्व ठरवितो. ही दुसरी बाब आहे की आमच्यावर इतिहासाच्या विभिन्न काळात दुदैंवाने राजेशाही लादली गेली आहे. इस्लामने आम्हाला अशा प्रकारच्या राजेशाहीची परवानगी दिलेली नव्हती. पण ही आमच्या मूर्खपणाची फळे होत.
स्वातंत्र्याचे रक्षण
आणखी एक तत्त्व असे आहे की कोणत्याही माणसाचे स्वातंत्र्य न्याय-निर्णय झाल्याशिवाय हिरावून घेता येत नाही. हजरत उमर(र.) यांनी स्पष्ट शब्दांत फर्माविले की,
इस्लाम मध्ये कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेतले जावू शकत नाहीत.
या कथनानुसार न्यायाची कल्पना निश्चित होते. ज्याला वर्तमान परिभाषेत ‘कायदेशीर न्यायालयीन कार्यवाही’ म्हणतात. म्हणजे एखाद्याचे स्वातंत्र्य हरण करावयाचे असेल तर त्याच्यावर आरोप ठेवणे, खुल्या न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवावा आणि त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेपूर संधी द्यावी. त्याशिवाय कोणत्याही कार्यवाहीवर निकाल लागू करणे अशक्य आहे. ही अगदी सामान्य बुद्धीची गोष्ट आहे की आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय न्याय-निकाल होऊ शकत नाही. इस्लाममध्ये अशा घटनेला स्थान नाही की एखाद्या माणसाला अटक करण्यात यावी आणि त्याला आपली बाजू मांडण्यास संधी दिल्याशिवाय तुरुंगात डांबले जावे. इस्लामी राज्य व न्याय पालिकेसाठी न्यायाची निकड पुरी करणे पवित्र कुरआनने आवश्यक ठरविले आहे.
आयत - ‘‘व इजा हकमतुम बैनन्नासि अन तहकुम बिलअद्ल’’ - ४.५८
संपत्तीचे संरक्षण
एक मौलिक अधिकार असा आहे की पवित्र कुरआन स्पष्टपणे वैयक्तिक संपत्तीची संकल्पना पुढे मांडतो अल्लाहचा आदेश आहे,
तुम्ही खोट्या मार्गाने एक दुसर्याची मालमत्ता गिळंकृत करू नका.(२ : १८८)
पवित्र कुरआन व हदीस आणि धर्मशास्त्राचे अध्ययन केले गेले तर असे स्पष्ट कळते की दुसर्याची मालमत्ता खाण्याचे कोण कोणते प्रकार चुकीचे आहेत. इस्लामने या पद्धती संदिग्ध ठेवलेल्या नाहीत. या तत्वानुसार कोणत्याही माणसाकडून अयोग्य पद्धतीने कोणतीही मालमत्ता संपादन केली जाऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला अथवा कोणत्याही सरकारला हा अधिकार नाही की तिने कायदेभंग करून आणि त्या ठराविक स्थितीशिवाय जी खुद्द इस्लामने स्पष्ट केली आहे, एखाद्याच्या संपत्तीवर कब्जा करावा.
प्रतिष्ठेचे रक्षण
मानवाचा हा देखील मौलिक अधिकार आहे की त्याच्या प्रतिष्ठा व अब्रूचे रक्षण केले जावे. सूरह ‘हुजरात’ मध्ये या अधिकाराचा पूर्ण तपशील आहे. उदाहरणार्थ अल्लाहचा आदेश आहे,
तुमच्यापैकी कोणत्याही समूहाने दुसर्या समुहाची टिगल करू नये.
आणि तुम्ही एक दुसर्याला वाईट टोपणनावाने बोलवू नका.
आणि तुम्ही एकमेकाची पाठीमागे निदा करू नका.(४९ : ११-१२)
म्हणजे जितके काही प्रकार माणसाच्या प्रतिष्ठा व अब्रूवर हल्ला करण्याचे होऊ शकतात त्या सर्वांना मनाई केली गेली आहे. असे स्पष्टपणे सांगितले आहे की माणूस हजर असो वा नसो त्याची टिगल केली जाऊ नये. वाईट टोपण नांव दिले जाऊ शकत नाहीत आणि त्याची निदा केली जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा हा कायदेशीर अधिकार आहे की कोणीही त्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करू नये व हाताने अथवा जिभेने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नये.
पहा आयत - ‘‘कुन्तुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नासि ता अमुरून बिलमा अरुफि व तनहौना अनिल मुनकरि.’’ - ३.११०
व्यक्तिगत जीवनाचे रक्षण
इस्लामच्या मौलिक अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला म्हणजे वैयक्तिक जीवनाला(Privacy) सुरक्षित करण्याचा अधिकार आहे. या संबंधी सूरह ‘नूर’ मध्ये स्पष्टीकरण केले गेले की,
आपल्या घराशिवाय अन्य लोकांच्या घरात प्रवेश करू नका, येथ पावेतो की त्यांच्याशी संबंध वाढविले जावेत.
सूरह ‘हुजरात’ मध्ये म्हटले गेले,
हेरगिरी करू नका.
प्रेषित मुहम्मद(स.) चे वचन आहे की,
‘‘एखाद्या व्यक्तीला हा अधिकार नाही की आपल्या घरातून दुसर्या व्यक्तीच्या घरात त्याने डोकवावे. एखाद्या व्यक्तीला पुरेपूर घटनात्मक अधिकार आहे की, त्याने आपल्या घरात दुसर्यांच्या कोलाहलापासून, दुसर्यांच्या डोकावण्यापासून आणि दुसर्यांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित व शांतीपूर्वक रहावे. त्याच्या घरातील निःसंकोचपणा आणि पडदापद्धती टिकून राहिली पाहिजे. त्याउपर असे की कोणाला दुसर्याचे पत्र वरून दृष्टी टाकून पाहण्याचा सुद्धा अधिकार नाही. ते वाचण्याचा तर मुळीच नाही.’’
इस्लाम माणसांच्या गोपनीयतेचे पुरेपूर रक्षण करतो आणि स्पष्ट मनाई करतो की दुसर्याच्या घरांत डोकावू नका. इस्लाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाचे पुरेपूर रक्षण करतो आणि इतरांच्या घरांत डोकावण्यास पूर्णपणे मज्जाव करतो. आणि कोणाचे पत्र पाहू नये. जोपर्यंत एखाद्या व्यक्तिबद्दल विश्वसनीय सूत्राद्वारे ही सूचना मिळत नाही की तो एखादे घातक काम करीत आहे, तो पर्यंत विनाकारण कोणाच्या स्थितीबद्दल चौकशी करणे इस्लामी धर्म कायद्यानुसार धर्मसम्मत नाही.
अत्याचाराविरुद्ध निदर्शनाचा अधिकार
इस्लामच्या मौलिक अधिकारांपैकी एक माणसाला अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार आहे. अल्लाहचा आदेश आहे की,
अल्लाह ही गोष्ट पसंत करीत नाही की माणसाने निदेसाठी तोंड याशिवाय उघडावे की एखाद्यावर अत्याचार केले गेले असेल. म्हणजे अत्याचारपीडिताला हा अधिकार आहे की त्याने अत्याचार्याविरुद्ध आवाज बुलंद करावा.(४ : १४८)
मत स्वातंत्र्य
आणखी एक महत्वाची गोष्ट जिला हल्ली ‘मतस्वातंत्र्य’ म्हटले जाते. पवित्र कुरआनने तिला दुसर्या भाषेत व्यक्त केले आहे. परंतु तुलनात्मक दृष्टीने पाहिले तर पवित्र कुरआनची कल्पना किती उच्च कोटीची आहे हे लक्षात येईल. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘चांगल्या गोष्टीची आज्ञा करणे’’१ आणि ‘‘वाईट गोष्टीपासून रोखणे’’ व केवळ माणसाचा अधिकार आहे तर हे त्याचे कर्तव्य सुद्धा आहे. पवित्र कुरआन नुसार व हदीसच्या आदेशानुसार सुद्धा मानवाचे हे कर्तव्य आहे की, त्याने सदाचाराचा प्रसार करावा आणि दुराचारापासुन रोखावे. दूराचार घडत असेल तर केवळ असेच नव्हे की त्याच्याविरुद्ध फक्त आवाज उठवावा, तर त्याच्या निर्मूलनाचे प्रयत्न करणे सुद्धा कर्तव्य आहे. जर त्याच्याविरुद्ध आवाज उठविला जात नसेल आणि त्याच्या प्रतिबंधाची चिता केली जात नसेल तर हे उलट पाप आहे. मुसलमानाचे कर्तव्य आहे की त्याने इस्लामी समाजाला स्वच्छ ठेवावे. या बाबतीत मुसलमानांचा आवाज बंद केला गेला तर यापेक्षा मोठे पाप काही होऊ शकत नाही. एखाद्याने सदाचार पासून रोखले तर त्याने न केवळ एक मौलिक अधिकार हिरावून घेतला तर एका कर्तव्य पालनापासून रोखले. समाजाचे आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक आहे की माणसाला प्रत्येक स्थितीत हा अधिकार असला पाहिजे. पवित्र कुरआनने बनी इस्त्राईलच्या अधोगतीची कारणे सांगितली आहेत. त्यांच्यापैकी एक कारण असे सांगितले आहे की,
ते वाईट गोष्टीपासून एक दुसर्याला रोखत नसत.(५ : ७९)
म्हणजे एखाद्या समजात अशी स्थिती उत्पन्न झाली की दूराचारा विरुद्ध आवाज उठविणारा कोणी नसेल तर अंततःहळू हळू दृष्टता संपूर्ण समाजात पसरते. तो समाज नासलेल्या फळांच्या टोपलीप्रमाणे बनतो. तिला उचलून फेकून दिले जाते. असा समाज ईश्वरी कोपास पात्र होण्यास कोणतीच कसर उरत नाही.
सद्सद्विवेकबुद्धी व श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा अधिकार
इस्लामने ‘‘इस्लामी जीवन पध्दती मध्ये जोरजबरदस्ती नाही’’(२ : २५६) चे तत्व मानवजातीला दिले आणि त्याच्याखाली प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले की तिने नास्तिकता व आस्तिकता पैकी अथा इतर हवा तो मार्ग स्वीकारावा. शक्तीचा प्रयोग इस्लाममध्ये असेल तर ते दोन आवश्यकतेसाठी एक असे की इस्लामी राज्याचे अस्तित्व व त्याच्या स्थैर्याच्या सुरक्षिततेसाठी धर्मयुद्धाच्या भूमीत शत्रूचा सामना केला जावा आणि दुसरे असे की व्यवस्था व शिस्तपालन आणि सुखशांतीच्या सुरक्षेसाठी गुन्हे व दंगे निपटून काढण्यासाठी न्यायालयीन व प्रशासनिक पावले उचलली जावीत.
तो सद्सद्विवेकबुद्धी व श्रद्धेच्या स्वातंत्र्याचा मौल्यवान अधिकार होता, जो प्राप्त करण्यासाठी मक्केतील तीस वर्षांच्या कसोटीकाळात मुसलमानांनी अतोनात कष्ट झेलून अधिकार मंत्राचा(कलमा-ए-हक) उद्घोष केला आणि अंततः हा अधिकार सिद्ध होऊन राहिला. मुसलमानांनी हा अधिकार ज्या प्रकारे आपल्यासाठी प्राप्त केला तसा दुसर्यासाठी सुद्धा पूर्णपणे मान्य केला. इस्लामी इतिहास या गोष्टीपासून रिक्त आहे की मुसलमानांनी कधी आपल्या मुस्लिमेतर प्रजेला इस्लाम स्वीकारण्यासाठी विवश केले नाही. अथवा एखाद्या जमातीला हाणून मारून मुसलमान केले नाही.
धार्मिक मनःक्लेशापासून रक्षणाचा अधिकार
इस्लाम या बाबतीत उदार नाही की विविध धार्मिक समुदायांनी एक दुसर्याच्या विरुद्ध तोंडसुख घ्यावे आणि एक दुसर्याच्या धर्मप्रमुखांवर चिखलफेक करावी. पवित्र कुरआनमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या धर्मिक श्रद्धा आणि त्याच्या धर्मप्रमुखांचा मान राखण्यास शिकविले आहे. आदेश असा आहे,
त्यांना बरे-वाईट म्हणू नका, ज्यांना हे लोक अल्लाहला सोडून आराध्य दैवत बनवून त्यांचा धावा करतात.
म्हणजे विविध धर्म आणि श्रद्धांवर पुराव्यानिशी चर्चा करणे आणि योग्य पद्धतीने समीक्षा करणे अथवा मतभेद प्रकट करणे तर मतस्वातंत्र्याच्या अधिकारात समाविष्ट होतात. परंतु मनःक्लेश देण्यासाठी निदेचे हत्यार उचलणे योग्य नव्हे.
सम्मेलनस्वातंत्र्याचा अधिकार
मतस्वातंत्र्याचा परिणाम म्हणून सम्मेलनस्वातंत्र्याचा अधिकार समोर येतो. मतभेद निर्माण करणार्यांना मानवी जीवनाचे एक अटळ सत्य म्हणून पवित्र कुरआनने पुन्हा पुन्हा प्रस्तुत केले आहे. तेव्हा या गोष्टीला आळा घालणे कोठे शक्य आहे की, एक प्रकारची मते धारण करणारे लोक सुसंगत असावीत? एकाच तत्व आणि दृष्टिकोनावर एकत्र होणार्या जमातीत सुद्धा विविध विचारसरणी असू शकतात आणि त्यांच्याशी संबंधित लोक कोणत्याही परिस्थितीत आपापसांत अधिक निकट असतील. पवित्र कुरआनचा आदेश असा आहे.
आणि तुमच्यापैकी एक समूह तर असा जरूर असावयास पाहिजे ज्याने चांगुलपणाकडे बोलवावे. सदाचाराची आज्ञा द्यावी व दुराचाराला रोखावे.(३ : १०४)
यात जेव्हा ‘मांगल्य’ चांगुलपणा आणि ‘दुष्टते’ च्या कल्पनांच्या तपशीलात फरक येतो तेव्हा जमातीचे तात्विक ऐक्य टिकून देखील त्यात वेगवेगळ्या विचारसरणी स्वरूप धारण करतात. हे अपेक्षित दर्जापेक्षा कितीही खालच्या कोटीची का असेना टोळ्या आणि पक्ष प्रकट होत आहेतच. म्हणून येथे काव्यात सुद्धा, इस्लामी धर्मशास्त्र व कायद्यात सुद्धा आणि राजनीतिक दृष्टिकोनात सुद्धा मतभेद आले. त्याचबरोबर निरनिराळे समुदाय(संप्रदाय) अस्तित्वात आले. प्रश्न असा आहे की इस्लामी राज्य घटना व अधिकारांच्या जाहिरनाम्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे मतभेद दर्शविणार्यांना सम्मेलनस्वातंत्र्याचा अधिकार आहे काय? हा प्रश्न सर्वप्रथम हजरत अली(र.) यांच्यासमोर ख्रवारिजांच्या(खारजी संप्रदायाचे लोक हजरत अली(र.) यांना खलीफा मानीत नव्हते.) उदयाने उद्भवला आणि हजरत अली(र.) यांनी त्यांच्याकरिता सम्मेलनस्वातंत्र्याच्या अधिकाराला मान्य केले. ते खारजियांना म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही तलवार घेऊन जबरदस्ती आपला दृष्टिकोन लोकांवर लादत नाही तो पर्यंत तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य राहील.’’
दुसर्याच्या कृत्याच्या जबाबदारीतून मुक्तता
इस्लाममध्ये मनुष्य केवळ आपल्या कृत्य व अपराधासाठी जबाबदार आहे. दुसर्यांच्या कृत्यासाठी आणि दुसर्याच्या अपराधासाठी त्याला जबाबदार धरणे शक्य नाही. पवित्र कुरआनने हा नियम ठरविला आहे.आणि एखादा ओझे उचलणारा एखाद्या दुसर्याचे ओझे उचलणार नाही.(६ : ६३)
इस्लामी कायद्यात याला वाव नाही की चोराला सोडून सन्याशाला फाशी द्यावी.
शंकेच्या आधारे कारवाईला मनाई
इस्लाममध्ये प्रत्येक व्यक्तीला हे संरक्षण आहे की चौकशीविना तिच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. यासंबंधी पवित्र कुरआनचा स्पष्ट आदेश आहे की,एखाद्याच्या विरुद्ध बातमी मिळाल्यास चौकशी करा, जेणेकरून असे होऊ नये की एखाद्या समुदाया विरुद्ध न कळत तुम्ही काही कारवाई करावी.(४९ : ६)
याशिवाय पवित्र कुरआनने असा आदेश सुद्धा दिला आहे
हे लोक हो, ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, अधिक शंका घेण्यापासून दूर रहा कारण काही बाबतीत शंका घेणे पाप आहे.(४९ : १२)
थोडक्यात हे आहेत ते मौलिक अधिकार जे इस्लामने मानवास प्रदान केले आहेत. यांची कल्पना अगदी स्पष्ट व परिपूर्ण आहे. ती मानवी जीवनाच्या आरंभीच मानवाला सांगितली गेली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की हल्ली सुद्धा जगात मानवी हक्कांची जी घोषणा(Declaration of Human Rights) झाली आहे तिला कोणतेही प्रमाणपत्र व अंमलबजावणीचे सामर्थ्य प्राप्त नाही. केवळ एक उच्च आदर्श प्रस्तुत केला गेला आहे. या आदर्शाच्या अंमलबजावणीस कोणतेही राष्ट्र बाध्य नाही. आणि कोणताही असा प्रभावी तह नाही ज्या योगे या अधिकारांना मान्यता सर्व राष्ट्रांकडून मिळेल. मुस्लिम जगत अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या प्रेषिताच्या आदेशांशी बांधलेले आहेत. अल्लाह आणि पैगंबर(स.) यांनी मौलिक अधिकारांचे पूर्णतः स्पष्टीकरण केलेले आहे. जो देश इस्लामी राष्ट्र बनू इच्छितो त्याला हे अधिकार अनिवार्यतेने द्यावे लागतील. मुसलमानांना सुद्धा हे अधिकार दिले जातील आणि दुसर्यांना सुद्धा. या बाबतीत एखाद्या अशा कराराची गरज पडणार नाही की अमुक समुदाय जर आम्हाला असे अधिकार देईल तर आम्ही त्याला देऊ. तर मुसलमानांना कोणत्याही परिस्थितीत हे अधिकार द्यावे लागतील. मित्रांना सुद्धा आणि शत्रूंना सुद्धा.

माझी गणना आपले वाईट चिंतणार्‍यांमध्ये होईल जर का मी स्पष्टपणे आपल्याला हे नाही सांगितले की, आपल्या जीवनातील खरी समस्या काय आहे? माझ्या मते आपले वर्तमान आणि भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आपण त्या मार्गदर्शनासोबत कसा व्यवहार करताय, जे मार्गदर्शन आपल्यापर्यंत प्रेषित (सल्ल.) यांच्या मार्फत पोहोचलेले आहे. ज्यामुळेच आपल्याला मुसलमान म्हटले जात आहे. आणि त्या मार्गदर्शनाशी तुमच्या असलेल्या संबंधामुळे तुम्हाला आवडो किंवा न आवडो जगामध्ये तुम्हाला इस्लामचे प्रतिनिधी मानले जात आहे. जर आपण या ईश्‍वरीय मार्गदर्शनाची खरी अंमलबजावणी व वकिली केली, आणी आपल्या वाणी व वर्तनाने ती खरी असल्याची साक्ष दिली, शिवाय आपले सामुहिक चारित्र्य इस्लामचे खरे-खुरे प्रतिनिधीत्व करत गेले तर आपण जगातच नव्हे तर आखिरतमध्येही यशस्वी व्हाल. आणि भीती, दुःख, अपमान, निर्धणता, गुलामी आणि पराधिनतेचे हे काळे ढग जे आज आपल्यावर आलेले आहेत, काही वर्षाच्या आत निघून जातील.
    सत्याकडे (सत्यधर्म अर्थात इस्लामकडे) आपले बोलावणे लोकांच्या बुद्धी आणि मनाला मोहित करत जाईल. आपला सन्मान जगात वाढत जाईल. न्यायाची अपेक्षा आपल्याकडून केली जाईल. विश्‍वास आपल्यावर केला जाईल. पुरावा आपण बोललेल्या गोष्टीचा दिला जाईल. कल्याणाची आशा आपल्याकडून केली जाईल. धर्मविरोधी नेत्यांचा सन्मान आपल्या तुलनेत क्षुल्लक होऊन जाईल. त्यांचे सर्व निर्णय राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून आपल्या खर्‍या आणि सत्याच्या आवडीच्या तुलनेमध्ये खोटे आणि फोल सिद्ध होतील. आणि त्या शक्ती ज्या आज त्यांच्या गोटामध्ये दिसत आहेत लवकरच त्यांच्यापासून विलग होवून इस्लामच्या गोटात येताना दिसतील. इथपर्यंत की एक वेळ अशी येईल जेव्हा साम्यवाद मास्कोमध्ये आपल्या रक्षणासाठी भटकताना दिसेल. भांडवलशाही स्वतः वॉश्िंगटन आणि न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या रक्षणासाठी व्याकूळ असल्याचे दृश्य दिसेल. भौतिकवादी आणि नास्तीक (लोक) लंडन आणि पॅरिसच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यामध्ये असमर्थ ठरतील. वंशवादी आणि राष्ट्रवादी लोकांना ब्राह्मण आणि जर्मन लोकांमधून सुद्धा आपले समर्थक मिळणार नाहीत. त्यांचा काळ इतिहासामध्ये केवळ एक बोधकथेच्या रूपामध्ये शिल्लक राहील आणि हे ही नमूद केले जाईल की इस्लामचे समर्थक जागतिक आणि विश्‍वविजयी शक्तीचे प्रतिनिधी कधीकाळी इतके मूर्ख होऊन गेले होते की, मुसा (अलै.) ची काठी त्यांच्या बगलेमध्ये होती आणि खाली पडलेल्या लाठ्या आणि दोर्‍यांकडे पाहून त्यांचा थरकाप उडत होता.
    हे भविष्य तर आपले त्यावेळेस होईल ज्यावेळी आपण इस्लामचे खरे समर्थक आणि खरे साक्षीदार व्हाल. मात्र जर का याच्या विपरित आपले वर्तन राहिले आणि ईश्‍वराने पाठविलेल्या या मार्गदर्शनावर आपण सापासारखे वेटाळा घालून बसाल, न स्वतः त्याचा फायदा घ्याल न दुसर्‍यांना घेउ द्याल. स्वतःला मुस्लिमांच्या प्रतिनिधीच्या रूपाने जगासमोर सादर कराल, परंतु आपली सामुहिक कथनी आणि करनी यातून जी साक्ष जाईल ती अज्ञानतेची, शिर्क, चंगळवादी आणि नैतिक अधःपतनाची जाईल.
    कुरआन घरात उंच जागी ठेवलेला आहे आणि मार्गदर्शनासाठी आपण धर्मभ्रष्ट नेते आणि पथभ्रष्ट करणार्‍या प्रत्येकाशी संपर्क जोडत आहात. आपण दावा अल्लाहच्या बंदगीचा करता आणि प्रत्यक्ष बंदगी सैतान आणि अल्लाहशिवाय इतरांची केली जात आहे. मित्रत्व आणि शत्रूत्व व्यक्तिगत लाभ समोर ठेवून केले जात आहेत. आणि या प्रकारे आपल्या जीवनाला आपण इस्लामच्या आशिर्वादापासून वंचित ठेवत आहात आणि जगालाही इस्लामकडे आकृष्ट करण्याऐवजी त्याला दूर करत आहात. मग अशा परिस्थितीत आपले हे जीवन यशस्वी होईल ना पारलौकिक जीवन. याचा परिणाम तर ईश्‍वरीय नियमानुसारच होईल, जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात आणि शक्यता तर हीच आहे की, आपले भविष्य या वर्तमानापेक्षाही वाईट असेल.
    यापेक्षा इस्लामची मुद्रा उतरवून उघडपणे आपण काफीर (इस्लामचा इन्कार करणारा) होवून जा. म्हणजे किमान आपले हे जीवन तरी तसे बनून जाईल जसे की अमेरिका, रशिया आणि ब्रिटनमध्ये राहणार्‍यांचे बनलेले आहे. मात्र मुस्लिम असूनसुद्धा मुस्लिमासारखे ना राहणे आणि अल्लाहच्या धर्माचे खोटे प्रतिनिधीत्व करून जगातील इतर लोकांच्याही मार्गदर्शनाचा मार्ग बंद करणे एक असा अपराध आहे जो की, आपल्याला या जगामध्ये समृद्ध होऊ देणार नाही. या गुन्ह्याची शिक्षा जी कुरआनमध्ये लिहिलेली आहे आणि जिचा प्रत्यक्ष नमुना ज्यू समाज आपल्यासमोर प्रत्यक्षात दिसत आहे त्या शिक्षेला आपण टाळू शकणार नाही. मग आपण संयुक्त राष्ट्रीयतेच्या दोन वाईट वैशिष्ट्यांपैकी कमी वाईट वैशिष्ट्याला जवळ कराल किंवा आपली वेगळी राष्ट्रीयता असल्याचे बिंबवून ते सर्व मिळवाल जे की, मुस्लिम राष्ट्रीयतेचे समर्थक प्राप्त करू इच्छितात. या शिक्षेला टाळण्याचा फक्त एकच मार्ग आहे तो हा की आपण हा गुन्हा सोडून द्यावा.

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्यालय दिल्लीच्या अबुल फजल इन्क्लेव्ह जामिया नगर भागात असून, एका विस्तीर्ण अशा भूखंडावर मुख्यालयातील अनेक इमारती डौलाने उभ्या आहेत. या ठिकाणी दि. 8 ते 14 सप्टेंबर 2019 या कालावधीत एका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या प्रशिक्षण शिबिराच्या महत्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे वाटल्याने हा लेखन प्रपंच केला आहे.
परिसर
    नांदेड येथून विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 सप्टेंबरच्या रात्री 01.00 वाजता पोहोचताच भव्य असे विमानतळ पाहून डोळयाचे पारणे फिटले. देशाच्या राजधानीला साजेशे असे हे विमानतळ असून, तेथून टॅक्सीने जमाअत-ए-इस्लामीच्या मुख्यालयात पोहोचविण्यासाठी टॅक्सीवाल्याने तब्बल 1400 रूपये घेतले. येणेप्रमाणे दिल्लीमध्ये पहिला आर्थिक झटका टॅक्सीवाल्याने दिला.
हॉटेल रिव्हर व्यूव्ह च्या बाजूला जामिया नगर परिसरात असलेल्या जमाअत-ए-इस्लामी हिंद मुख्यालयाची प्रवेशद्वार भव्य असून, तेथे पोहोचताच खाजगी सुरक्षा गार्डनी माझी ओळख पटवून मला प्रवेश दिला. रिसेप्शनवर पोहोचताच तेवढ्या रात्रीही एका तरूणाने अतिशय आत्मीयतेने माझी चौकशी केली आणि माझ्या निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सोबत माणूस दिला. ही जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या मुख्य कार्यालयाची तीन मजली इमारत होती. दुसर्‍या मजल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींची राहण्याची सोय करण्यात आलेली होती.
    9 सप्टेंबरला सकाळी 8.30 वाजता न्याहारी करून 9.00 वाजता मुख्य कार्यालयाच्या शुरा हॉलमध्ये पोहोचलो.  त्या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. ठीक 9.00 वाजता कुरआन पठणाने या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर भारताच्या अनेक राज्यातून अनेक राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या परिचयाचा कार्यक्रम झाला.
    यानंतर कार्यक्रमाचे संयोजक मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही (सचिव प्रशिक्षण विभाग) यांनी या प्रशिक्षणामागचा उद्देश सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘मानवतेचे कल्याण हा इस्लामचा मुख्य उद्देश असून, ते साध्य करण्यासाठी कार्यकर्ते तयार करावेत हे या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाचे उद्देश्य आहे.’ त्यानंतर अमीर जमात-ए-इस्लामी हिंद सय्यद सआदत्तुलाह हुसैनी यांचे प्रमुख भाषण झाले. त्यात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करून सांगितले की, ”या प्रशिक्षणादरम्यान सात मुद्यांवर तुम्हा सर्वांना प्रशिक्षण घेऊन आपापल्या ठिकाणी जावून जमाअतच्या इतर सदस्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे.
1. जाणीवपूर्वक इमानधारण करून इस्लामी श्रद्धेची प्रत्यक्ष अमलबजावणी करून आपल्या समाजाची व देशबांधवांची सेवा करणे.
2. अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या विषयीचे प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेणे.
3. इस्लामी इबादती ह्या जाणीवपूर्वक करणे विशेषतः नमाज या महत्त्वाच्या इबादतीमध्ये कुठलीही बारीक सारीक उणीवसुद्धा राहणार याची काळजी घेणे. जेणेकरून तुमचे चारित्र्य उंचावेल.
4. माणसाच्या छोट्या-मोठ्या चुका ज्या अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांच्या नजरेमध्ये गुन्हे आहेत त्यांना सोडणे, कारण अल्लाहचा नूर (प्रकाश बोध) गुन्हेगाराच्या अंतःकरणामध्ये उज्ज्वलता पसरवित नाही. फर्ज आणि सुन्नत नमाजाशिवाय शक्यतेवढ्या जास्त नफ्ल नमाज अदा करण्याचा प्रयत्न करावा.
5. कुठल्याही परिस्थितीत भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवायची नाही, कारण भ्रष्ट कमाईने खाललेल्या अन्नामुळे दुआ स्विकारली जात नाही, मन साफ होत नाही, त्यामुळे चांगल्या कामामध्ये माणसाचे मन रमत नाही.
6. सातत्याने आपल्या मृत्यूची आठवण ठेवावी. काहीही केले तरी मृत्यू सोडणार नाही, मग वाईट करून आखिरत बर्बाद करून घेण्यापेक्षा चांगले काम करून पुण्य कमवून आखिरतच्या जीवनामध्ये यशस्वी होणे कधीही चांगले. म्हणून मृत्यूची सातत्याने आठवण ठेवा.
7. जास्त खाणे, जास्त बोलणे आणि जास्त झोपणे टाळा.
    त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यात कर्नाटकहून आलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने कुरआनचा परिचय करून दिला. त्यानंतर तद्बरूल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना हामीद अली फलाही (पश्‍चिमी उत्तर प्रदेश) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मारेफुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना मोहम्मद शर्फ अली कास्मी (तेलंगना) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफसीरे उस्मानी या कुरआनच्या भाष्यावर मुबारक अली (राजस्थान) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफहीमुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर श्रीमती शहेनाज बतुल (कर्नाटक) यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेगवेगळ्या कुरआन भाष्यांवर विचार व्यक्त करण्यात आल्यावर त्या सर्वांचा आढावा मौलाना नईमुद्दीन इस्लाही (व्हा. चान्सलर जामियतुल फलाह, आझमगढ) यांनी घेतला.
    त्यानंतर जोहरची नमाज अदा करून जेवण करण्यासाठी सुट्टी देण्यात आली. ठीक 3 वाजता वाचनालयामध्ये सर्वांना एकत्रित बोलावून इस्लामवरील वेगवेगळ्या विषयावरील प्रत्येकी 4 पुस्तके भेट देण्यात आली व त्यातील हदीसच्या पुस्तकाचा एक तास अभ्यास करून घेण्यात आला. त्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज या संस्थेमध्ये नेवून त्या संस्थेच्या कामकाजाचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर असरच्या नमाजची सुट्टी देण्यात आली. त्यानंतर सामुहिक अभ्यास, परत मगरीबची नमाज, त्यानंतर कुरआनच्या सुरह मरियमचा सामुहिक अभ्यास करण्यात आला. 9 वाजता इशाच्या नमाजसाठी सुट्टी देण्यात आली. नमाजनंतर जेवण करून लगेच झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण दुसर्‍या दिवशी परत पहाटे 3.30 पासून दुसर्‍या दिवसाची दिनचर्या सुरू होणार होती. त्यात तहाज्जुदची नमाज, तजवीदचा क्लास, फजरची नमाज आणि त्यानंतर तज्ज्ञ शिक्षकांकडून योगाचे वर्ग घेण्यात येणार होते. आठवडाभर सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले.
    दुसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर महत्त्वाच्या विषयांमध्ये ’दुआ’ या विषयावर आबीद अन्वर फारूकी (बिहार) त्यानंतर ’हया’ (लज्जा) या विषयावर मुहम्मद अहेमद (पंजाब) त्यानंतर ’आर्थिक स्थैर्य’ यावर शेख अन्वर (मुंबई) व त्यानंतर ’वैवाहिक जीवन ’ या विषयावर श्रीमती फय्याजुन्निसा (तेलंगना) त्यानंतर ’हदीसचा अभ्यास आणि महिलांची कामगिरी’ या विषयावर मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही यांनी आपले विचार व्यक्त केले.
    तिसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकण्यात आला. त्यात प्रथमतः ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नेतृत्व’ यावर जावेद मुहम्मद (पूर्व उत्तरप्रदेश) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे राज्य’ यावर मुन्नवर पाशा (कर्नाटक), त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नियोजन’ यावर मुहम्मद बशीरोद्दीन (तेलंगना) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि संगोपनातील कौशल्य’ या विषयावर श्रीमती नफिसा अतीक (महाराष्ट्र), त्यानंतर ’प्रेषित सल्ल. यांच्या जीवनावर असलेल्या दुर्लभ पुस्तकांचा परिचय’ या विषयावर एस.अमीनुल हसन (उपाध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद) यांनी तर ’कायद्याविषयी जागरूकता’ या विषयावर माझे (एम.आय.शेख,लातूर-महाराष्ट्र)) भाषण झाले. त्यानंतर दुपारून  जमाअतच्या प्रकाशन विभागातील ’रेडियन्स’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचे अवलोकन करण्याची संधी मिळाली.
    चौथ्या दिवशी कुरआन पठणानंतर प्रोजेक्टरद्वारे एक व्हिडीओ दाखविण्यात आला, ज्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी जमाअतला 29 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जे भाषण दिले होते तो युट्यूबर उपलब्ध असलेला ऑडिओ ऐकवण्यात आला. त्यानंतर ’जमाअत-ए-इस्लामी हिंदचा इतिहासाचा परिचय ’ नुसरत अली (अध्यक्ष, शैक्षणिक बोर्ड) यांनी करून दिला. तद्नंतर दुपारून इस्लामी साहित्य ट्रस्ट द्वारे चालवल्या जाणार्‍या मधूर संदेश संगम या संस्थेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे इतर नियमित कार्यक्रम पार पडले.
    पाचव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’इस्लामची आत्मचिंतनाची पद्धती’ या विषयावर मौलाना रजिऊल इस्लाम नदवी यांचे भाषण झाले. त्यानंतर चार विषयावर ग्रुप डिस्कशन (सामुहिक चर्चा) घडवून आणण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांचे चार गट करण्यात आले. पहिल्या गटाला, ’ दिल की दुनिया कैसे बदले?’ दुसर्‍या गटाला ’हम अपनी सलाहियतों को कैसे पहेचाने?’ तिसर्‍या गटाला ’गौर और फिक्र की आदत कैसे पैदा करें?’ आणि चौथ्या गटाला ’तआल्लुक बिल्लाह को कैसे मजबूत करें?’ या विषयावर चर्चा घडविण्यात आली.
    सहाव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’भारतीय राजकारण’ या विषयावर राजकीय विश्‍लेषक रिजवान एहसन यांचे भाषण झाले. त्यानंतर ’हिंदू सनातन धर्माचा परिचय’ या विषयावर स्वामी लक्ष्मीशंकर आचार्य यांचे भाषण झाले. त्यानंतर ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन व्हिजन 2026 या संस्थेला भेट देऊन संस्था देशभरात करत असलेल्या समाजकार्याची माहिती देण्यात आली.   
    सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी कुरआन पठणानंतर ’मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांचा परिचय’ या विषयावर जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचे प्रा. जावेद अहेमद खान यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक आश्‍चर्यकारक खुलासे केले. 1930 च्या दशकात ब्रिटीश अभियंत्यांना सउदी अरबच्या जमिनीमध्ये तेल असल्याचा अंदाज आला. त्यावर त्यांनी शोध करून काळेकुट्ट बेंदाडासारखा एक पदार्थ शोधून काढला. एका बॅरेलला दोन डॉलर रॉयल्टी देउन त्यांनी सउदी राजाला खुश केले. दोन अमेरिकी डॉलर प्रती बॅरल बेंदाडाचे मिळत असल्याचे पाहून सउदी राजा आनंदीतच नव्हे तर संतुष्ट झाला आणि त्याने ’अहलन सहलन मरहबा’ म्हणत ब्रिटीशांचे स्वागत केले. या गोष्टीचा अंदाज येताच अमेरिकनही सउदी अरबमध्ये पोहोचले आणि मोठ्या प्रमाणात क्रुड ऑईलचे साठे शोधून काढले. जवळ- जवळ 1973 पर्यंत अमेरिका आणि ब्रिटीश लोकांनी 2 डॉलर रॉयल्टीवर अमाप क्रुडतेलाचा साठा उपसून आपल्या देशात नेला आणि युरोप आणि अमेरिकेची जी प्रगती आज दिसते आहे, ती याच काळात जवळ-जवळ फुकटात मिळालेल्या तेलाच्या बळावर झालेली आहे.
    दरम्यानच्या काळात सउदी तरूण युरोप आणि अमेरिकेमध्ये भ्रंमतीसाठी जावू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडून जे बेंदाडवजा रसायन हे लोक घेवून येत आहेत ते सोन्यापेक्षाही जास्त मुल्यवान असे पेट्रोलियम पदार्थ आहेत. तेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांनी ओपेकचे गठन केले. मग 1974 ला दोन डॉलर रॉयल्टी स्विकारण्यास त्यांनी इन्कार केला आणि क्रुड ऑईलची विक्री सुरू केली. तेव्हा दोन डॉलर प्रती बॅलर तेलाची किंमत एकदम 100 डॉलर प्रती झाली आणि येथून सउदी अरब सहीत खाडीच्या देशांच्या आर्थिक प्रगतीला सुरूवात झाली. त्यानंतर सउदी अरब व्यतिरिक्त खाडीच्या इतर देशांमध्येही तेलाचे साठे शोधण्यास सुरूवात झाली आणि इराक, इराण, सीरिया, लेबनान इत्यादी मुस्लिम देशांमध्ये प्रचंड तेलाचे साठे मिळून आले. आणि जगाने त्या हदीसला प्रत्यक्ष रूपाने प्रकट होताना याची देही याची डोळा पाहिले की, ज्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भाकित केले होते की, ”एक दिन सरजमीने अरब सोना उगलेगी”
    मात्र तेलाच्या या अमुल्य अशा खजीन्यावर युरोप आणि अमेरिकेने नियंत्रण मिळविले होते. ते आजही काही प्रमाणात तसेच आहे. जेव्हा खाडीच्या अरब देशांनी अमेरिका आणि युरोपच्या पंजातून आपल्या तेलाची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भोळ्या अरबांना आपसात लढवून अमेरिकेने अनेक सशस्त्र गट त्यांच्यात तयार केले. इराक आणि इराण मध्ये युद्ध घडवून आणले. इराक आणि लिबिया यांना उध्वस्त करून टाकले. तेलावर नियंत्रण मिळविण्याच्या रणनितीचा हा एक भाग होता.
    या भाषणानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव कथन करण्यात आले, त्यात एकतास प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. शेवटी अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांच्या समारोपाच्या भाषणाने प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. याप्रसंगी अमीरे जमाअत यांनी आपल्या दुआमध्ये देश आणि देशातील सर्व लोकांच्या प्रगतीची कामना केली.
    एकंदरित प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देण्यात आले. त्यात सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय विषयांचा समावेश असल्याने अतिशय समर्पक अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या. सातत्याने पहाटे तहाज्जुदची नमाज अदा केल्यामुळे तसेच कुरआनच्या विविध पैलूंवर नियमित प्रकाश टाकला गेल्यामुळे एका प्रकारचा अध्यात्मिक आनंद मिळाला. आत्मिक उन्नती झाल्याचा अनुभव आला.

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget