Latest Post

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी व्याज खाणाऱ्याची, व्याज देणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साक्षीदारांची आणि व्याजव्यवहार लिहून  ठेवणाराची निर्भत्सना केली आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली आहे ते पाप किती मोठे असेल हे आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर निसाई हदीसकथनानुसार जाणूनबुजून व्याज घेणे, देणे, साक्ष देणे   आणि लिहून ठेवणाऱ्यांची अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) निर्भत्र्सना करतील. अर्थात अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा लोकांसाठी (जर पश्चात्ताप न करता मरण  पावले) पापमुक्ती नव्हे तर निर्भत्सना करतील.

लाच
माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यांचा आणि लाच घेणाऱ्यांचा धिक्कार असो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यावर आणि ती घेणाऱ्यावरदेखील अल्लाहचा धिक्कार असो. (हदीस : मुन्तका)

स्पष्टीकरण
लाच दुसऱ्यांच्या हक्काधिकारांचे हनन करून स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी शासनाच्या लिपिकांना आणि अधिकाऱ्यांना दिली जाणाऱ्या वस्तू किंवा रकमेस ‘लाच’ म्हणतात. आपला  वैध हक्क प्राप्त करण्यासाठी खोटारड्या राज्य प्रशासनाच्या धोकेबाज कमचाऱ्यांना, मनाच्या पूर्ण द्वेषासह आपल्या खिशातून ठराविक रक्कम काढून देणे भाग पडते, त्याशिवाय आपला  हक्क प्राप्त होत नाही. या कारणास्तव हा आज्ञाधारक (मोमिन) अल्लाहने इच्छिले तर त्याच्याकडून धिक्कारला जाणार नाही. अशा स्थितीत आणखीन अधिक मागणी करतात की  अल्लाहच्या ‘दीन’ला वर्चस्व व प्रभुत्व प्राप्त होवो.

संदिग्धतेपासून दूर राहणे
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘वैधही स्पष्ट आहे आणि निषिद्धही, परंतु या दोन्हींदरम्यान काही गोष्टी अशा आहेत  ज्या संदिग्ध (संशयास्पद) आहेत. जो मनुष्य संदिग्ध गोष्टांपासून स्वत:चा बचाव करील तो त्यापेक्षा अधिक उघड पापांपासून वाचेल. तसेच जो मनुष्य संदिग्ध पापकृत्ये करण्यात  बहादुरी दाखवील तर उघड पापकृत्यांमध्ये तो मागे पडण्याची शक्यता आहे आणि पापकृत्ये करण्यापासून अल्लाहने त्याला रोखले आहे. (ज्यात कोणाला जाण्याची परवानगी नाही आणि  त्यात परवानगीशिवाय घुसणे अपराध आहे.) जे जनावर मनाई करण्यात आलेल्या विभागाभोवती चरते, त्याचे मनाई करण्यात आलेल्या विभागात जाऊन पडण्याची शक्यता खूपच  अधिक आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की जी वस्तू निषिद्ध असल्याचे अजिबात माहीत होत नाही आणि वैध असल्याचे स्पष्टपणे कळत नाही, अशा वस्तूचे काही पैलू  वैध वाटत असतील आणि काही निषिद्ध दिसत असतील तर त्याच्याजवळ न फिरकणे हेच मोमिनचे (अल्लाहच्या आज्ञाधारकाचे) काम आहे. जो संदिग्ध वस्तूंपासून दूर जातो, तो उघड  निषिद्ध कर्म कसे करू शकतो? जर एखादा मनुष्य संदिग्ध वस्तूंना निषिद्ध समजूनदेखील त्या घेत असेल तर त्याचा परिणाम असा होईल की मन उघड निषिद्ध वस्तू घेण्यात बहादूर व  धाडसी बनेल आणि ही  मनाची अतिशय भयानक स्थिती आहे, हे उघड आहे. माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार,

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा मनुष्य अल्लाहच्या सदाचारी दासांच्या यादीत येऊ शकत नाही जोपर्यंत पापकृत्य घडण्याच्या भीतीने ती गोष्ट सोडत नाही ज्यात कसलेही  पाप नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

इस्लामी शिकवणींच्या आधारे माणसाने स्वतः प्रेरित होऊन अपराधी कर्मांपासून दूर राहण्यासाठी होय. आपण अशा उपायांसंबंधी चर्चा करू या, जे इतरांतर्फे होणार्या संभावित गुन्हेगारींचे निर्मूलन करतात. निश्चितच माणूस हा स्वतःही अपराध करतो आणि इतरांकडून होणार्या गुन्हेगारींचेही भोग भोगतो. या दोन्ही स्वरुपांच्या समस्यांचे समाधान झाले तरच खर्या अर्थाने गुन्हेगारीचे पूर्णतः निर्मूलन शक्य आहे. म्हणजेच माणसाने स्वतःही अपराध करू नये आणि इतरांनाही अशी संधी उपलब्ध होऊ देऊ नये. या ठिकाणी प्रत्यक्ष इस्लामी कायद्याने दिलेल्या गुन्हेगारी निर्मूलनाचे उपाय आपण पाहणार आहोत.
आक्रमक हल्ल्यापासून बचावाचे उपाय
जणू हा काळच आक्रमक हल्ले आणि रक्तपाताचा दिसतो. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रश्न असा आहे की एखादा गुन्हेगार हा अतिरेकी पद्धतीचा अवलंब का करतो? इतरांच्या रक्ताची आणि प्राणाची त्याच्याकडे काहीच किंमत नसावी काय? याचे एक मूळ कारण द्वेष, वैरभाव, क्रोधाग्नी, ईर्ष्यालूवृत्ती व मत्सर असल्याचे दिसते. या अतिरेकी भावनांचे मूळ विभिन्न प्रकारच्या सामाजिक आणि मानसिक समस्यांत दडलेले आहे. याच समस्यांतून या भावना जन्मास येतात. म्हणूनच इस्लामने अशी प्रेरणाद दिली आहे की, माणसाने स्वतःहून अशा अपराधी कर्मांपासून दूर राहावे. त्याचप्रमाणे क्रोध, क्षोभ, हेवा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैरभावासारख्या भावना इतरांतही निर्माण करणारी परिस्थिती उद्भवू न देण्याचे उपायसुद्धा योजले आहेत.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की, ‘‘तुम्ही श्रद्धावंत(अर्थात सच्चे मुस्लिम) होऊ शकत नाहीत, जोपर्यंत(मानवजातीप्रति) प्रेम आणि स्नेहाची भावना ठेवत नाहीत. तुम्हाला असा उपाय दाखवू का, ज्यामुळे आपसात प्रेम व स्नेहाची भावना निर्माण होईल?‘‘
‘‘होय! अवश्य दाखवा!‘‘ अनुयायांनी म्हटले.
‘‘तर तुम्ही आपसात एक दुसर्यांना ‘सलाम‘(शुभ चिंतनाची प्रार्थना) करा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
सलाम करणे म्हणजे आपल्या मानवबंधुविषयी ईश्वरदरबारी शांती व सुरक्षेची प्रार्थना करणे होय. त्याचप्रमाणे याचा अर्थ असाही होतो की ज्याला तुम्ही सलाम करता, त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा वैरभाव नसल्याचे जणू प्रमाणपत्रच आहे. म्हणजेच दोघेही एकमेकांचे हितचिंतक आहेत. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सलाम करण्याबरोबरच एकदुसर्यांना भोजन देण्याची, भेटवस्तु देण्याचीसुद्धा शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा माणसातील स्नेहसंबंध वाढीस लागतात, मनातील मळ नाहीसा होतो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका प्रत्येकाकडून होतच असतात. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी आपल्या मानवबंधुच्या चुका माफ करून उदारपूर्ण वर्तन करण्याचीही शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा द्वेश, मत्सर, हेवा आणि वैरभावाने प्रदूषित झालले वातावरण निवळते.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी, मौत्ता)
कधीकधी माणूस अशी चूक करून बसतो की ती सहसा कोणी माफ करायला तयार होत नाही. म्हणूनच इस्लामने माणसाला संयम आणि धीर राखण्याची शिकवण दिली. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयमाबरोबरच न्यायपूर्ण वर्तनाचीसुद्धा शिकवण दिली. त्यांनी म्हटले की,
‘‘तुम्ही एखाद्यावर प्रेम करताना इतकेही भावूक होता कामा नये की सत्य आणि न्यायाचे भान हरवून बसावे. त्याचप्रमाणे तुमचा क्रोध इतका अविवेकी असू नये की तुम्ही एखाद्यास त्याच्या अपराधापेक्षाही जास्त शिक्षा द्यावी.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच या दोन ओळींमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयम आणि धैर्याची परिपूर्ण व्याख्या मानवजगतासमोर मांडली.
अतिरेकी भावनांचे एक मोठे कारण शोषण आणि मानवाधिकारांची पायमल्ली आहे. म्हणूनच मामसाला असे वाटत असेल की आपणाला इतरांपासून त्रास होऊ नये, इतरांच्या अतिरेकास आपण बळी पडू नये तर यासाठी त्याने इतरांचे वैध अधिकार देऊन टाकावे. इतरांचे अधिकार पूर्ण करणे म्हणजे काही इतरांवर उपकार करणे नव्हे. ते सानंद पूर्ण करावेत आणि इतरांचे शोषण करू नये. म्हणजेच आपण इतरांकडून सुरक्षित राहू शकतो.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्या पुरुषाने आणि त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने आपल्या वयाची साठ वर्षे अल्लाहच्या  उपासनेत व्यतीत केली, मग त्यांच्या मृत्यूची घटिका जवळ येते तेव्हा मृत्यूपत्राद्वारे वारसांना नुकसान होत असेल तर त्या दोघांकरिता नरक निश्चित होते.’’ त्यानंतर हदीसचे  कथनकार अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या समर्थनार्थ या आयतचे पठण केले, ‘मिम्बअदि वसिय्यतिन’ पासून ‘ज़ालिकल फ़ौजुल अ़जीम’पर्यंत. (हदीस : मुसनद अहमद)

स्पष्टीकरण
सदाचारी मनुष्यदेखील आपल्या नातेवाईकांवर नाराज होतो आणि त्याला वाटू लागते की संपत्तीपैकी त्याच्या नातेवाईकांना काहीही मिळू नये. त्याच्या मृत्यूसमयी संपूर्ण संपत्तीमधून  एकाही नातेवाईकाला काहीही प्राप्त होऊ नये असे मृत्यूपत्र तयार करून घेतो. खरे तर अल्लाहचा ग्रंथ आणि पैगंबरांनी सांगितलेल्या उपदेशानुसार त्या नातेवाईकांना संपत्तीमधून त्यांचा  वाटा मिळायला हवा होता. अशाप्रकारच्या पुरुष आणि स्त्रीबाबत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते साठ वर्षांपर्यंत अल्लाहची उपासना करूनदेखील शेवटी नरकावासी बनतात.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या कथनाच्या समर्थनार्थ ज्या आयतीचे पठण केले ती ‘सूरह निसा’च्या दुसऱ्या रुकूमध्ये आहे. यात अल्लाहने नातेवाईकांचा वाटा निश्चित  केल्यानंतर सांगितले, ‘‘हे वाटे मयत व्यक्तीच्या मूत्यूपत्रानुसार संपत्तीचे वाटप आणि कर्जफेड केल्यानंतर वारसांना देण्यात येतील.’’ त्यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘खबरदार! मृत्यूपत्र  करून वारसांना नुकसान पोहोचवू नका, हा अल्लाहचा आदेश आहे आणि अल्लाह ज्ञान व बुद्धी बाळगतो. त्याने बनविलेला हा कायदा चुकीचा नसून ज्ञानावर आधारित आहे आणि त्यात  बुद्धिमत्ता कार्यरत आहे. अन्याय व अत्याचाराचा थांगपत्ताही नाही, म्हणूनच हा कायदा मन:पूर्वक मान्य करा.’’ यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा आहेत  आणि जे लोक अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकतील त्यांना अल्लाह अशा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल करील ज्याच्या खालून झरे वाहत असतील आणि ज्यात ते निरंतर  वास्तव्य करतील आणि हीच मोठी सफलता आहे आणि जे लोक अल्लाह आणि पैगंबरांची अवज्ञा करतील आणि अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन करतील त्यांना नरकात  दाखल करील, ज्यात ते कायमस्वरूपी राहतील आणि त्यांच्यासाठी अपमानित करणारी शिक्षा असेल.’’ माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,  ‘‘जो आपल्या वारसाला संपत्तीपासून वंचित करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला स्वर्गाच्या संपत्तीपासून वंचित करील.’’ (हदीस : इब्ने माजा)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कोणा एका वारसाच्या नावे करण्यात आलेले मृत्यूपत्र दुसऱ्या वारसांच्या इच्छेविरूद्ध जारी होणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय सअद बिन  अबू वक्कास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी आजारी होतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मला पाहण्यासाठी आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही मृत्यूपत्र केले आहे काय?’’  मी म्हटले, ‘‘होय!’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘किती संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाहच्या मार्गात मी आपल्या संपूर्ण संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे.’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘मग तुम्ही आपल्या मुलांसाठी काय ठेवले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘ते श्रीमंत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘नाही! असे करू नका. अल्लाहच्या मार्गात  आपल्या संपत्तीच्या दहाव्या भागाचे मृत्यूपत्र करा.’’ सअद बिन अबू वक्कास (रजि.) म्हणतात की मी एकसारखे सांगत होतो की हे पैगंबर! हे खूपच कमी आहे, त्यात आणखी वाढ  करावी.’’ शेवटी पैगंबर म्हणाले, ‘‘बरे! आपल्या संपत्तीच्या एक तृतियांश भागाचे मृत्यूपत्र करा आणि हे खूप आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

Book
भांडवलवादी साम्राज्याजवळ स्त्रियांच्या शोषणाचे आणखी एक क्षेत्र, सौंदर्य वाढविणारे उत्पादन आणि फॅशन आहे़ यामुळे जगभराच्या भांडवलदारांना दरवर्षी 19 अब्ज डॉलरचा नफा होतो़ यासाठी ते जुलूम, अत्याचार, छल-कपटाच्या सर्व मार्गांचा उपयोग करतात़  सौंदर्य स्पर्धा, फॅशन परेड, ख्यातनाम व्यक्तींची संस्कृती, इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन क्रमांकाचे पृष्ठ (पेज 3), स्त्रियांची असंख्य नियतकालिके, टी़व्ही़शोज्, रियालिटी) शोज् इत्यादी त्या चलाखीचे लबाडीचे काही प्रकार आहेत़ वर्तमानपत्र आणि टी़व्ही़ वरील जाहिरातींतील एक मोठा भाग या फायदेशीर उद्योगाला समर्पित असतो़ या फसवाफसवीने भरलेल्या खेळास बळी पडून स्त्रिया आपले आरोग्य, शांती आणि समाधान या सर्वांचा नाश करतात़ प्रसिद्ध मानसशास्त्रीय नियतकालिक ‘सायकॉलॉजी टूडे’ ने एक मानसिक रोग ‘बॉडी मानिया’ची ओळख केली आहे़ या रोगाला स्त्रिया बळी पडत आहेत़ ज्या (स्त्रिया) आपल्याला सुंदर बनविण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होतात़
     भांडवलदारवर्ग सर्वप्रथम सौंदर्य स्पर्धा, प्रख्यात व्यक्ती आणि ‘पेज थ्री’ मार्फत काही सुंदर स्त्रियांना मॉडेलच्या स्वरूपात प्रस्तुत करून जगभराच्या तरूण स्त्रियांना, त्यांच्यासारखे बनण्याचे वेड आणि उन्माद निर्माण करतो़ हे वेड भांडवलदार वर्गाची सर्वांत मोठी कार्यसिद्धी असते़ या वेडाच्या आधारावर भांडवलदारांच्या अब्जावधी डॉलरच्या उद्योगाची भांडवलवादी इमारत उभी राहते़ सुरूवातीला स्पष्ट स्वरूपात हानिकारक असल्याची जाणीव न होणारे क्रीमस्, जेली इत्यादी सौंदर्य वाढविणारी उत्पादने होत़ असंख्य प्रकारचे लोशन, तेल, क्रीम, पावडर, लिपीस्टिक, फाउंडेशन्स, पॉलिश, शॅम्पू, डी़ओ़, कन्डीशनर, वॅक्स इत्यादी उत्पादने स्त्रियांना विकली जातात़ फक्त अमेरिकेमध्ये 8 अब्ज डॉलरच्या कॉस्मेटिक्सची (सौंदर्य प्रसाधने) विक्री होते़ या रकमेच्या तीन चतुर्थांश भागाद्वारे (6 अब्ज डॉलर) जगातल्या सर्व अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था करता येऊ शकते़ ही सौंदर्य प्रसाधने बनविणार्‍या भांडवलदारांना स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या प्राणांची असुरक्षितता यांच्याशी काही देणे घेणे नसते़
    अमेरिकेहून येणार्‍या वस्तूंची कोणतीही परीक्षा किंवा तपास न करता त्या आपल्या देशात स्वीकारल्या जातात़ अमेरिकेमध्ये सौंदर्यप्रसाधनांची परीक्षा करण्याचे आणि त्यांचा आरोग्यावर होणार्‍या प्रभावाचा शोध घेण्याचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नाही़ फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जी औषधांची परीक्षा व तपास करते तिच्या कार्यक्षेत्रात ही उत्पादने (सौंदर्य प्रसाधने) येत नाहीत आणि त्यांची परीक्षा आणि तपास करण्याची कोणतीही वैकल्पिक व्यवस्था नाही़
    अमेरिकेचीच एक संस्था इ़डब्ल्यू़ जी़ च्या अहवालानुसार या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कित्येक विषारी घटक असतात़ एवढेच नसून कॅन्सर निर्माण करणारे रासायनिक पदार्थसुद्धा त्यात आढळले आहेत़
     या संस्थेने अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांतील तरूण मुलीचे सर्वेक्षण केले, त्यानुसार त्या मुलींच्या रक्तात आणि लघवीमध्ये सौंदर्यप्रसाधनात उपयोग केले जाणारे विषारी रासायनिक घटक (मस्कस, पॅराबेन्स, ट्रिकलोसन, पॅथालेटस) असून या घटकामुळे कॅन्सर होतो, तसेच हार्मोन्समधील बदल असे गंभीर रोग निर्माण करतात़ या मुली दररोज सरासरीने 17 सौंदर्य प्रसाधने वापरत असत. त्यांच्या शरिरात हार्मोन्स परिवर्तन करणारे सरासरी 13 रासायनिक घटक आढळून आले आहेत़ हे रासायनिक घटक, तारूण्यात हार्मोन्समध्ये परिवर्तन, मानसिक आरोग्य, जननक्षमता, हाडे वाढणे यासारख्या बाबींवर प्रभाव पडतो़
अमेरिकेच्याच एका दुसर्‍या संस्थेने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी हानिकारक रासायनिक घटकांनी बनलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा एक डेटाबेस तयार केला आहे़ या डेटाबेसमध्ये ज्या कंपन्यांची नावे आहेत त्यात ले ऑरेल, प्रॉक्टेट अँड गॅम्बल, कॉम्बी आयएनसी इ. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे, त्यांची उत्पादने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर विकली जातात़

शरीअत अर्थात इस्लामी कायद्याने गुन्हेगारीवरील उपायाची तीन स्वरुपे दाखविली आहेत. पहिले स्वरुप हे अपराधाची ‘हद‘ लागू करणे होय. अर्थातच गुन्हेगाराने पूर्ण शर्तीने गुन्हा केलेला असेल तर स्वतः ईश्वराने ही शिक्षा निश्चित केलेली आहे. यात मुळीच बदल करता येत नाही. म्हणूनच या प्रकारच्या शिक्षा-उपायास शरीअतच्या परिभाषेत ‘हद‘ जारी करणे असे म्हणतात. दुसर्या उपायाचे स्वरुप म्हणजे ‘कसास‘ होय. कसास म्हणजे बदल्याची शिक्षा होय. अर्थात गुन्हेगाराने कोणास शारीरिक हानी पोचविली असेल तर जेवढी हानी पोचविली तेवढाच बदला घेण्याची शिक्षा देणे होय. उदाहरणार्थ, हात कापला असेल तर गुन्हेगाराचा हात कापण्यात येईल, डोळा फोडला असेल तर डोळा फोडण्यात येईल, हत्या केली असेल तर गुन्हेगारास मृत्यूदंड देण्यात येईल. या शिक्षेतही मुळीच बदल करता येणार नाही. तिसरा प्रकार हा ‘ताजीर‘चा होय. म्हणजेच ज्या अपराधांवर शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत, मात्र आवश्यक शतर्चिी पूर्तता होत नसेल, तर अशा परिस्थितीत गुन्हेगारास गरजेनुसार ‘ताजीर‘(म्हणजे निश्चित केलेल्या शिक्षेपेक्षा थोडी कमी शिक्षा) करण्यात येईल. या तिन्ही स्वरुपांच्या शिक्षांवर आपण वेगवेगळी चर्चा करु या.
‘हद‘ स्वरुपाची शिक्षा
ही शिक्षा
  1. व्यभिचार,
  2. व्यभिचाराचा आरोप लावणे,
  3. चोरी करणे,
  4. दारू पिणे,
  5. इस्लामचा त्याग करणे,
  6. डकाईती करणे आणि
  7. बंडखोरी करणे या अपराधांवर लागू करण्यात आली आहे.
 
1. व्यभिचार आणि त्याची व्याख्या
व्यभिचार म्हणजे काय? याविषयी इस्लामने अशी व्याख्या केली आहे की, पत्नीव्यतिरिक्त अगर पतीव्यतिरिक्त अनुक्रमे इतर कोणाही स्त्री अगर पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्यभिचार होय. हा संभोग करताना वीर्यस्खलन होवो अथवा न होवो, या संभोगाला व्यभिचार असे म्हणतात.
व्यभिचारसिद्धीच्या अटी व शर्ती
‘शरीअत‘ म्हणजेच इस्लामी कायद्याने कोणताही गुन्हा सिद्ध करण्याच्या शर्ती आणि अटी निश्चित केल्या आहेत. याप्रमाणेच व्यभिचाराचा अपराध सिद्ध करण्याच्या वा होण्याच्यासुद्धा अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत. याकरिता तीन पद्धती ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम अशी की, व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराने स्वतःहून इस्लामी न्यायालयात गुन्हा केल्याची कबुली द्यावी. दुसरे असे की, व्यभिचारी व्यक्तीस व्यभिचार करताना पाहिल्याचे साक्षीदार असावेत आणि तिसरे असे की, संकेत आणि परिणामावरुन व्यभिचार केल्याचे सिद्ध व्हावे. याबाबतीत आपण थोडक्यात चर्चा करु या.
पहिली पद्धत
शरीअतमध्ये व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराकडून गुन्हा केल्याची कबुली विश्वसनीय समजण्यात आली आहे. मात्र यासाठी गुन्हेगाराची मानसिक आणि बौद्धिक परिस्थिती चांगली व ठणठणीत असावी. अर्थातच मानसिक वा बौद्धिक स्वास्थ्य ठणठणीत असावे, शिवाय त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली न्याय-परिषदेत द्यावी. गुन्हेगार प्रौढ असावा.
दुसरी पद्धत
व्यभिचारानंतर संकेत आणि परिणाम स्पष्ट व्हावेत. उदाहरणार्थ, स्त्रीला गर्भधारणा व्हावी, अथवा वैद्यकीय तपासणीतून संभोग झाल्याचे निष्पन्न व्हावे.
तिसरी पद्धत
साक्षीदार असावेत. शरीअतमध्ये सामान्य प्रकरणात दोन साक्षीदार पुरेसे असतात, मात्र व्यभिचार सिद्ध करण्यासाठी कमीतकमी चार साक्षीदारांची आवश्यकता असते. हे साक्षीदारसुद्धा परिपूर्ण आणि प्रौढ व सबळ असावे लागतात. त्यांना व्यभिचाराचा वृत्तान्त सांगण्याचे सामर्थ्य असावे लागते. अर्थात ते मुके आणि बहिरेही नसावेत, मद्यपानाचे व्यसन जडलेलेही नसावेत. ते न्यायप्रिय, सदाचारी व ईशपरायण मुस्लिम असावेत. व्यभिचार करणार्या गुन्हेगारांशी कोणत्याही प्रकारचा तंटा-बखेडा अगर प्रकरण नसावे. कोणत्याही कारणावरून गुन्हेगाराशी वैर नसावे. त्याचप्रमाणे स्त्रीची साक्ष स्वीकारण्यात येणार नाही. हे चारही साक्षीदार एकाच प्रसंगी न्यायपरिषदेत, हजर करण्यात येऊन त्यांच्या साक्षी तपासण्यात येतील.
व्यभिचाराची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचार करण्याच्या तीन प्रकारच्या शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत.
  1. कोरडे ओढणे
  2. शहारतून तडीपार करणे
  3. दगडाने ठेचून वध करणे
यापैकी व्यभिचारी गुन्हेगार अविवाहित असेल तर शंभर कोरडे मारण्याची आणि शहराबाहेर तडीपार करण्याची शिक्षा देण्यात येईल आणि गुन्हेगार विवाहित असेल तर दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात येईल. कुरआनात म्हटले आहे,
‘‘अविवाहित व्यभिचारी स्त्री आणि अविवाहित व्यभिचारी पुरुषाला प्रत्येकी शंभर कोरडे मारावेत आणि त्यांच्यावर दया करता कामा नये, जर तुम्ही ईश्वर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास ठेवीत असाल तर त्याचप्रमाणे त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रद्धावंतांचा(अर्थात मुस्लिमांचा) एक समूह तेथे हजर असावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नूर - २)
त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कोणत्याही मुस्लिमाची, जो एकेश्वरवाद आणि परलोकावर विश्वास ठेवतो, हत्या करणे वैध नाही, केवळ ते लोक सोडून की जे विवाहित असून व्यभिचार करतात, ज्याने इतराचा वध केला असेल आणि जो मुस्लिम समुदायाबरोबर पडला(अर्थात धर्मभ्रष्ट झाला) असेल. या तीन प्रकारच्या गुन्हेगारांशिवाय इतर कोणाचाही वध करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या शासनकाळात विवाहित लोकांनी व्यभिचार केल्यास त्यांना ‘रजम‘ म्हणजेच दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की,
‘‘अविवाहित तरूण-तरुणींनी व्यभिचार केल्यास त्यांना प्रत्येकी शंभर कोरडे ओढावेत आणि एका वर्षासाठी पुरुषाला शहरातून तडीपार करावे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे हे महापाप असून याची शिक्षा लागू करण्याच्या निम्नलिखित अटी व शर्ती ठरविण्यात आल्या आहेत.
  1. खोटा आरोप लावणारा वेडा, वयात न आलेला मद्याच्या नशेत नसलेला असावा.
  2. खोटा आरोप लावणारा हा मुखत्यार असावा म्हणजेच स्वतःच्या मर्जीने व कोणाच्या दबाव अगर आमिषाला बळी पडून खोटा आरोप करणारा नसावा.
  3. खोटा आरोप लावणारा हा पिता नसावा. अर्थात एखाद्या पुरुषाने म्हटले की, तू माझी संतती नाही तर त्या आरोप लावणार्याला शिक्षा देण्यात येणार नाही.
  4. खोटा आरोप लावणार्या आणि ज्यावर आरोप लावण्यात येत आहे त्याच्यात पती-पत्नीचे नाते नसावे. कारण पती-पत्नीसाठी आरोपाचा वेगळा कायदा आहे. त्या कायद्यास शरीअतच्या परिभाषेत ‘लआन‘ चा कायदा असे म्हणतात.
  5. ज्याच्यावर खोटा आरोप लावण्यात येत आहे, तो स्वावलंबी आणि मुखत्यार असावा.
  6. तो मुस्लिम असावा.(अपराधी मुस्लिमेतर नसावा)
  7. खोटा आरोप लावणारा अपराधी स्वतंत्र असावा. अर्थात कोणाचा गुलाम अथवा दास नसावा.
  8. तो सज्जन आणि सुशील असावा. कारण आरोप लावणार्याचा आरोप सिद्ध झाल्यास प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळेल.
  9. ज्यावर आरोप करण्यात आला, त्याच्याविरुद्ध प्रकरण दाखल करणारा असावा. अन्यथा शिक्षा होणार नाही.
  10. खोटा आरोप लावणार्याने स्पष्ट शब्दांत आरोप लावलेला असावा. सांकेतिक पद्धती अगर इशार्याने आरोप लावल्यास दखल घेतली जाणार नाही.
  11. खोटा आरोप लावणार्यास आरोप सिद्ध करण्याकरिता चार साक्षीदार हजर करणे शक्य नसावे.
या अटींवर खोटा आरोप लावणार्या गुन्हेगारास शरीअतनुसार शिक्षा देण्यात येईल.
व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याच्या दोन शिक्षा ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम मूळ शिक्षा आणि दुसरी अतिरिक्त वाढीव शिक्षा. त्या अशा प्रकारे होय.
  1. एशी कोरडे मारणे आणि
  2. नेहमीसाठी त्याची साक्ष स्वीकार न करणे होय. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘जे लोक चारित्र्यवान आणि सुशील स्त्रियांवर व्यभिचाराचा खोटा आरोप लावतात, मग चार साक्षीदारांसमक्ष आरोप सिद्ध करू शकत नाहीत, त्यांना एशी कोरडे मारावेत आणि त्यांचा साक्ष देण्याचा अधिकार नेहमीसाठी हिरावून घेण्यात यावा कारण ते स्वतः गुन्हेगार आणि दुराचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-नूर - ४)
2. इस्लामी कायद्यामध्ये चोरी आणि चोरीचा अपराधसिद्ध होण्याच्या अटी
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये चोरी करण्याच्या अपराधालासुद्धा ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात आली आहे. चोरीचा अपराध सिद्ध होण्याच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
  1. चोर हा वयात आलेला असावा. वयात न आलेल्या, मानसिक संतुलन ठिकाणावर नसलेल्या चोरावर ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
  2. चोर हा विवश नसावा. परिस्थितीने विवश होऊन चोरी करणार्यास ‘हद‘ ची शिक्षा देता येणार नाही.
  3. भुकेने आणि तहानेने तसेच रोगाने व्याकूळ होऊन गरजपूर्तीसाठी चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
  4. मुलाच्या संपत्तीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
  5. ‘बैतुल माल‘ अर्थात सरकारी जनकल्याणनिधीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही. कारण या संपत्तीमध्ये त्याचासुद्धा वाटा आहे.
  6. चोरी करणारा धर्मयुद्धाच्या परिस्थितीत नसावा.
  7. चोरी ही किंमती वस्तु उदाहरणार्थ, सोने, चांदी, पैसा, द्रव्य वगैरेंची असेल तरच ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येईल. दगड-माती व यासारख्या क्षुल्लक वस्तुंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
  8. हराम मालाची अर्थात डुक्कर, दारू, गांजा व यासारख्या मालाची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
  9. लवकर खराब होणार्या व सडणार्या वस्तुंची अर्थात पाले-भाज्या, फळे वगैरेंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
  10. चोरी करण्यात आलेला माल दुसर्याची मिळकत असावी. स्वतःच्या संपत्तीतून चोरीची शिक्षा नाही.
  11. सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेल्या संपत्तीतून झालेल्या चोरीवरच ‘हद‘ची शिक्षा लागू करण्यात येईल. रस्त्यावर अथवा इतरस्त्र पडलेल्या वस्तुंची चोरी ही चोरीच्या परिभाषेत बसत नाही.
चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे
शरीअतमध्ये चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे म्हणजे चोराचे हात कापणे होय. वरील अटी आणि शर्ती पूर्ण झाल्याशिवाय ही शिक्षा देता येणार नाही. कुरआनात म्हटले आहे,
‘‘चोरी करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो, त्या व्यक्तीस हात कापण्याची शिक्षा द्यावी, हा त्यांच्या कमाईचा बदला आहे आणि ईश्वराकडून बोध घेण्यासारखी शिक्षा आहे. ईश्वराचे प्रभुत्व सर्वांवर आहे आणि तो जाणणारा आणि पाहणारा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ३८)
इस्लामी कायद्यानुसार पहिल्यांदा चोरी केल्यास चोराचा उजवा हात कोपरापर्यंत कापण्यात येईल आणि दुसर्यांदा केल्यास चोराचा डावा पाय घोट्यापर्यंत कापण्यात येईल.
3. इस्लामी कायद्यामध्ये डकाईती अगर दरोडा
चोरी म्हणजे इतरांच्या नजरेआड लपून छपून करण्यात येणारे कर्म असते. मात्र डकाईती अगर दरोडा हा बळाचा वापर करून संपत्ती हिसकावणे वा त्यावर ताबा मिळविणे होय. चोरीचा माल चोराच्या ताब्यात आल्याशिवाय चोराला शिक्षा देता येणार नाही, मात्र दरोडा टाकल्यावर दरोडेखोराच्या ताब्यात संपत्ती आली नसली तरी, त्याला शिक्षा देण्यात येईल असा इस्लामी कायद्याचा नियम आहे. दरोड्याचे प्रामुख्याने चार स्वरुप आहेत.
  1. डकाईत हा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघाला मात्र त्याला संपत्तीही मिळाली नाही आणि त्याच्याकडून कोणाचा खूनही झाला नाही.
  2. दरोडा टाकून संपत्ती लुटली मात्र कोणाचा खून झाला नाही.
  3. दरोडा टाकण्यासाठी निघाला मात्र माल हाती लागला नाही आणि त्याच्या हातून खून झाला.
  4. दरोडा टाकून संपत्ती लुटली आणि खूनही केला.
दरोडेखोरीचा गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी
दरोडा एकट्याने टाको अगर सामूहिकरित्या टाकण्यात येवो, तो दरोड्याच्याच परिभाषेत मोडतो. दरोडेखोर स्त्री असो वा पुरुष, दोघेही समान अपराधी आहेत.
दरोडा टाकण्याची शिक्षा
शरीअतमध्ये दरोड्याच्या चार प्रकारच्या शिक्षा तजवीज करण्यात आल्या आहेत.
  1. दरोडेखोराची हत्या करणे,
  2. फाशी देणे,
  3. हात कापणे आणि
  4. देशाबाहेर काढणे. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘जे लोक ईश्वर आणि त्यांच्या प्रेषितांशी युद्ध करतात आणि धरतीवर उपद्रव माजवितात, त्यांची शिक्षा ही आहे की त्यांना ठार मारावे, सुळावर चढवावे अथवा परपस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापावेत अथवा देशाबाहेर काढावे. हा अपमान तर या जगात आहेच, शिवाय मरणोत्तर जीवनात यापेक्षाही भयानक शिक्षा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ३३)
या बाबतीत इस्लामी कायदा असा आहे की या चार स्वरुपाच्या शिक्षा अपराधाच्या गांभीर्याच्या प्रमाणानुसार आहेत. उदाहरणार्थ, ज्याने केवळ दहशथ निर्माण केली, त्यास देशाबाहेर काढण्यात येईल, ज्याने केवळ संपत्ती लुटली, त्याचे हात-पाय विरुद्ध प्रमाणात कापण्यात येतील, ज्याने संपत्ती न लुटता खून केला असेल, त्याची हत्या करण्यात येईल आणि ज्याने संपत्तीही लुटली आणि खूनही केला, त्यास फाशी देण्यात येईल. याशिवाय इस्लामी शासकाला या गोष्टीचा अधिकार आहे की, त्याने या चारपैकी कोणती शिक्षा द्यावी.
4. चोरी-डकाईतीपासून बचावाचा इस्लामी उपाय
अपूर्ण अर्थार्जन, जीवनावश्यक गरजा सहसा पूर्ण न होण्यासारखे कामाचे मानधन देणे, आर्थिक शोषण करणे आणि आपल्या संपत्तीचे व वैभवाचे प्रदर्शन करणे, हेसुद्धा चोरी आणि डकाईतींची मुख्य कारणे होय. म्हणूनच इस्लामने इतरांना त्यांच्या कामाचा पुरेपूर, समाधानकारक व तत्काळ मोबदला देण्याची जबरदस्त ताकीद केली आहे. याशिवाय आपल्या वैभव आणि संपत्तीचेही प्रदर्शन करण्याची सक्तीने मनाई केली आहे. कारण संपत्तीचा व्यर्थ आणि फाजील अभिमान हे सर्व माणसाला करण्यास भाग पडतो. यामुळे इतरांच्या मनात ईर्ष्या आणि वैफल्याच्या भावना निर्माण होतात. यासाठी आपल्या संपत्ती आणि वैभवाचे प्रदर्शन इतर सामान्यजनांसमोर करण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मनाई केली आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे, ‘‘ईश्वर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्याकडे मुळीच कृपादृष्टी टाकणार नाही, जो गर्व आणि अहंकाराच्या झिंगेत आपली वस्त्रे लोळवित चालत असतो.”(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
शिवाय माणूस स्वतःच्या छोट्याशा इच्छेपायी अगर व्यर्थ कामनेपायी पैशांची स्वैर उधळपट्टी करतो, मात्र गोर-गरीब, गरजवंत आणि दीन-दलितांसाठी पाच पैसे खर्च करण्याची माणुसकी दाखवित नाहीत. या कृत्यामुळेसुद्धा सामान्यजन द्वेषाच्या भावनेने पिसाळून चोरी-डकाईतीसारखे अपराध करतात. म्हणूनच इस्लामने कंजुसी आणि संकूचितपणाचा तीप धिक्कार केला. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कंजूसपणा आणि संकुचितवृत्तीपासून दूर राहा. कारण यामुळेच तुमच्या पूर्वीचे जनसमुदाय नष्ट झालेत. या कारणामुळेच त्यांनी आपसात रक्तपात केला आणि रक्तसंबंध नष्ट केलेत आणि अन्याय व अत्याचार हे अंतिम निवाड्याच्या दिवशी तिमिर काळोख आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

- मुहम्मद अफजल अहमद
अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवितो. तोच त्यांचा शासक आहे.
    या पुस्तिकेत इस्लाम धर्म, कलिमा (पवित्रवचन), कलिमा शहादत, एकेश्वरत्व व प्रेषित्वाची साक्ष इ. विषयावर वर्णन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 184    -पृष्ठे -16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/003g6zfneah7lhgvsk1e6e3acv6857hd


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget