Latest Post

लेखक
मुहम्मद जैनुल आबिदीन मन्सुरी
डॉ. मुहम्मद अहमद
डॉ. सय्यद शाहिद अली

अनुवादक
सय्यद जाकिर अली

मानवासमोर असे काही प्रश्न आहेत, ज्यांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- जीवन काय आहे? जीवनाचा दााष्टा कोण आहे? आपल्याकडून त्यास  काय अभिप्रेत आहे? त्याने आपल्याला हे जीवन कशासाठी दिले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हाच जीवनाचा अंत आहे काय? की मृत्यूनंतरही जीवन आहे? जर जीवन आहे तर यात सफल  होण्याचा कोणता मार्ग आहे? अथवा या पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी या ऐहिक जीवनात काय करावे लागेल?
वाचकगणांस पुस्तकाच्या अध्ययनामुळे जीवनाच्या या मूळ आणि महत्त्वपूर्ण सत्याला समजण्यासाठी तसेच त्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासंबंधी पूर्ण मदत मिळेल.

आयएमपीटी अ.क्र. 200      पृष्ठे - 40    मूल्य - 20                आवृत्ती - 2 (Jan 2016)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vuvnwe6wkofsoxi7wax6eolw5pd4ltj1

Muhammad
मुहम्मद (स.) यांचे आगमन केवळ अरबस्तानापुरते नव्हते, ते सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. झरतुष्ट्र, मोझेस, खिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे माजली होती. सत्य धर्म लोपला होता. खिश्चन धर्म आपापसातील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांती देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्तानाकडेही निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. पुन्हा हिंदूधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसात झगडत होते. शाक्तमते पुढे येत होती. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झाले. कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला. आणि बौद्धधर्म हिंदुस्तानाबाहेर सर्वत्र होता. त्याचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बौद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्धधर्म कोणास पटणार?बुद्धालाच त्यांनी देव केले!

स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दु:ख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळात मुहम्मद (स.) आले. त्यांचे येणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहम्मद (स.) यांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहम्मद (स.) यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंद मिळाला.
कोठे जन्मला हा महापुरुष? अरबस्तानात जन्मणाऱ्या पैगंबर मुहम्मद (स.) यांस दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानी जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळात तो जन्मलेला असावा. मुहम्मद (स.) यांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबागृहाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश, त्यांच्या घराण्यात जन्मले.

मक्का शहर अरबस्तानचे वेंâद्र होते. धर्माचे व व्यापाराचे उत्तर-दक्षिण दरीत ते वसले होते. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेही उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबागृहाचे पवित्र प्रार्थनागृह, प्रार्थनागृहाजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरे तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असे हे भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांततापूर्ण व्यक्ती हिंडताना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती व्यक्ती दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रूमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेले असे. कोण ती व्यक्ती? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्याचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत आणि डोके कसे आहे पाहा. भव्य विशाल डोके! आदरणीय डोके! तोंड जरा लांबट, पिंगट रंगाचे, तांबुस छटेचे आणि भुवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत! आणि दोन भुवयांच्या मध्ये ती पाहा एक ठसठशीत शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे आणि डोळेही काळेभोर, मोठे. ते डोळे काहीतरी शोधीत आहेत. कोठेतरी पाहत आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकही बाकदार व मोठे आहे आणि दात पहा किती स्वच्छ शुभ्र! दातांची फारच काळजी घेतो वाटते हा?आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे आणि हात पाहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. पोशाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पाहा. वाटेत मुले भेटली तर त्यांच्याजवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष राहत नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचे राज्य असते. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेही त्याच्यावर प्रेम होते. ती त्यांच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारात मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीनदीनाचा का असेना.

कोण होता तो? लोक त्याला ‘अल्-अमीन’ म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे, सन्माननीय असे होते की सर्वांना त्याच्याविषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे का पाहत आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेने का पाहत आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला वेडा म्हणू लागले. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतीरिवाज सोडा असे सांगत होता. हा हट्टी, माथेफिरू क्रांतिकारक आहे, असे आता लोक म्हणत व तो जाऊ लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का पैगंबर मुहम्मद (स.)? होय. होय, तेच ते शांतपणे रस्त्यातून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहम्मद (स.) होते. कुरैशांच्या कुळात, काबागृहाच्या उपाध्यायांच्या कुळात जन्मले होते.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि अल्लाहु तआला अनहु) (रजि.) निवेदन करतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
इस्लामचे आधारस्तंभ पाच आहेत. १. अल्लाहशिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही व मुहम्मद (स.) हे त्याचे दास व प्रेषित आहेत, या वस्तुस्थितीची साक्ष देणे.
“अशहदु अला ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलूहु."
(मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि प्रेषित आहेत.) २. नमाज कायम करणे. ३. जकात देणे. ४. हज करणे. ५. रमजानचे रोजे करणे.
(बुखारी-मुस्लिम) प्रेषितांनी इस्लामला इमारतीची उपमा देऊन तिचे आधारस्तंभ कोणते हे येथे स्पष्ट केले आहे.
इस्लाममध्ये सर्वप्रथम श्रद्धेला महत्त्व आहे. अल्लाह एक आहे, त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही आणि प्रेषित मुहम्मद (स.) हे त्याचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत, या सत्याचा स्वीकार करून तशी प्रतिज्ञा करणे म्हणजे श्रद्धा बाळगणे. माणसाच्या आचार, विचार व उच्चारावरून ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की, तो अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही ईश्वर मानीत नाही. त्याचप्रमाणे तो प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित मानतो.
अल्लाहला एकमेव ईश्वर मानणे याचा अर्थ अल्लाह हा एकटा साऱ्या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, नियंता, शास्ता, त्राता आहे. तोच जीवन-मृत्यूचा आणि शेवटच्या निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. त्याचीच उपासना, प्रार्थना, स्तुती व याचना केली पाहिजे. भक्ती व आज्ञापालन त्याचेच केले पाहिजे. त्याशिवाय कोणीही भक्ती व आज्ञापालनास पात्र नाही.

आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत यावर श्रध्दा ठेवणे म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे. अल्लाहने मानवाच्या शिकवण व मार्गदर्शनासाठी जी एक जागतिक व्यवस्था केली आहे त्यामधील ते शेवटचे प्रेषित आहेत. त्यांची शिकवण व त्यांचे मार्गदर्शन माणसावर बंधनकारक आहेत. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणे इस्लाम आहे.
इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळची नमाज (प्रार्थना) माणसावर बंधनकारक आहे. १. पहाटेची-फज्र २. दोनप्रहरची -जोहर ३. सायंकाळपूर्वीची-असर ४. सूर्यास्तावेळची-मगरिब व ५. रात्रीची-इशा. नमाज कायम करणे म्हणजे नमाजची व्यवस्था कायम करणे. स्वत: नियमितपणे जमाअतीबरोबर पाच वेळा नमाज अदा करणे आणि इतरांना नमाज अदा करण्यास प्रवृत्त करणे. नमाजीसाठी मसजिदींची व अन्य व्यवस्था करणे होय.
त्यागाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनत नाही. मालमत्तेबद्दल वाटणारे प्रेम व तिची हाव माणसाला सदाचारापासून दूर ठेवते आणि म्हणून अल्लाहने 'जकात' देणे माणसावर बंधनकारक ठरविले आहे. ठरविण्यात आलेल्या हिशोबाप्रमाणे माणसाने आपल्या मालमत्तेवर दरवर्षी जकात दिली पाहिजे. त्याचप्रमाणे ईशकार्यात सढळ हाताने खर्च केला पाहिजे. गोरगरिबांना व दीनदुबळ्यांना दानधर्म केला पाहिजे. माणसाने या सत्याचे स्मरण ठेवले पाहिजे की, त्याला जे काही लाभते ते अल्लाहच्या कृपेमुळेचलाभते.
प्रवासखर्चाची ऐपत असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने आयुष्यातून एकदा हिजरी सनाच्या जिल्हज महिन्यात अरबस्थानातील मक्का शहरी जाऊन बैतुल्लाहचे-अल्लाहच्या काबागृहाचे दर्शन घेतले पाहिजे. त्याची जियारत करून सई, तबाफ करणे, अरफातला जाणे, कुरबानी करणे वगैरे विधी केले पाहिजेत. याला हज करणे म्हणतात.
पाचवे कर्तव्य हे आहे की, प्रत्येक स्त्री-पुरुषाने दरवर्षी रमजान महिन्यात महिन्याचे पुरे रोजे केले पाहिजेत. भल्या पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी वगैरे काहीही न घेता केला जाणारा उपवास म्हणजे रोजा.
अल्लाहने श्रद्धा बाळगल्यानंतर नमाज, जकात, हज व रमजानचे रोजे व चार धार्मिक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. ही कर्तव्ये योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक पार पाडली तर ती माणसाला आज्ञाधारक व सदाचारी बनवितात.
नमाज अल्लाहचे सतत स्मरण घडविते व त्यामुळे माणसास सरळमार्गावर राहण्यास मदत होते. जकात त्यागाची शिकवण देते. माणूस ईश्वराने दिलेले धन ईशकार्यात खुशीने खर्च करतो आणि त्याचे धन व मन निर्मळ होते. हजमध्ये माणसाला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. त्याला खर्चही करावा लागतो. आपल्या मुलाबाळांपासून व कारभारापासून निव्वळ अल्लाहच्या आज्ञेवरून तो दूर जातो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला दिव्यत्वाची प्रचिती घडते. रोजा, मनोनिग्रह घडवितो व अल्लाहचे भय बाळगून माणूस वाईट आचारविचारापासून दूर राहतो.

इस्लाम हा निसर्गाचा धर्म आहे. इस्लामने मानवतेला नैसर्गिक गरजा आणि उद्दिष्टांमध्ये मूलभूत तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केले आहे. त्याच जीवनावश्यक गरजांमध्ये पर्यावरण हेदेखील आहे, ज्यावर जैवविविधतेचे अस्तित्व अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्तीच्या विनाशामुळे पर्यावरण प्रदूषित होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे अज्ञान आणि ईश्वराची भीती नसणे होय. अज्ञानामुळे पर्यावरणाला हानिकारक बाबींची ओळख पटत नाही, पर्यावरणाचा Nहास झाल्याने कोणती हान्ी होते हे माहीत होत नाही, याची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे. स्वार्थ आणि मनात ईशभय नसल्याकारणाने एखादी व्यक्ती समाजहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देतो. जे काही तो करीत आहे त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे माहीत असूनसुद्धा वैयक्तिक हितांचा पाठलाग करताना तो त्यांच्यावर खूश असतो, अशी परिस्थिती आहे.
जर मनामध्ये ईशभय असते तर स्वार्थापोटी इतरांना हानी पोहोचविली नसती. खरे तर दुदैवाने प्रदूषणाला लोकांनी वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, माती प्रदूषण आणि घाणेरडेपणापर्यंतच मर्यादित करून ठेवले आहे. नैतिक प्रदूषण, धार्मिक प्रदूषण, आर्थिक प्रदूषण, राजकीय प्रदूषण, शैक्षणिक प्रदूषण आणि सामाजिक प्रदूषण याकडे फारच थोड्या लोकांचे लक्ष आहे. विशेषत: काही लोकांनी त्यात फक्त पहिल्या भागाचाच समावेश केला आहे, मात्र ते तसे नाही. पर्यावरणावरणाला हानी मानसिक व नैतिक आणि दुसरा शारीरिक. जेव्हा आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आणि असमान असते, घरची परिस्थिती चांगली नसते, मानवाला मूलभूत गरजांची पूर्तता होत नसते, समाजाची नैतिक स्थिती ढासळते तेव्हा मानसिक आणि नैतिकदृष्ट्या मनुष्यावर वातावरणाचा नकारात्मक परिणाम होतो. चोहीकडे आढळणाऱ्या घाण व प्रदूषणामुळे माणसाला जीवन असह्य होऊन बसते. जेथे योग्य आहार उपलब्ध नाही, जेथे योग्य अशा कपड्यांची उपलब्धता नाही, राहाण्यासाठी छत उपलब्ध नाही, स्वच्छतेची व्यवस्था नाही, सर्वत्र घाणीचे ढीगच ढीग आढळतात आणि दुर्गंधयुक्त पाण्याचे तलाव आणि घाणीने भरलेले नाले दिसतात अशा परिस्थितीत मानवावर शारीरिक व मानसिकदृष्ट्या वाईट परिणाम होतो.
म्हणूनच इस्लामने सर्व प्रकारचे वातावरण स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा आदेश दिला आहे, जेणेकरून माणूस त्यात मानसिक, नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी दिसू शकेल आणि ही काही वर्षे सुखात जगेल.
इस्लाम (जो स्वाभाविक स्वरूपात कुरआन आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आचरणपद्धतींचा आहे) ने मानवास एक शांत आणि सुखमय वातावरण प्रदान करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. परंतु इस्लामने आंतिरक आणि मानसिक शुद्धतेसह पर्यावरणाच्या स्वच्छतेची सुरूवात केली आहे. त्याला प्रथम मनुष्याचे हृदय आणि मन सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून मुक्त पाहू इच्छितो आणि त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे मानवी हृदय आणि मन सकारात्मक व नकारात्मक विचारांचे मिश्रण आहे. जर हे चांगल्या कल्पाना व सद्विचारांचे पालन करीत असतील तर चांगले आणि सत्कर्म मनुष्यांच्या हातून होत राहातील, परिणामत: हृदयाची व मनाची शांतता लाभेल. म्हणूनच इस्लामने मानवी मन व हृदय चांगल्या व पवित्र विचार आणि कल्पनांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी योग्य अशी व्यवस्था केली आहे आणि असे करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वासाची आवश्यकता असते. जी माणूस खरी श्रद्धा व विश्वास योग्यरित्या बाळगतो त्याला ‘मोमीन’ (श्रद्धावंत) म्हणतात. आणि जो एकमेव अल्लाहवर श्रद्धा व विश्वास बाळगतो तोच खरोखरच श्रद्धावंत असतो. अर्थात तो एकच ईश्वर आहे, संपूर्ण सृष्टीचा तो निर्माणकर्ता, मालक आणि पालनकर्ता आहे. मृत्यू आणि जीवन त्याच्याच हातात आहे. तो मान आणि अपमान देतो. ज्याला एक कठीण गरज आहे. तोच इच्छा पूर्ण करणारा ईश्वर आहे.
(भाग १) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
मो. : ८९७६५३३४०४

व्यापारात इस्लामी नैतिकतेचा परिचय करून देणारे व इस्लामसाठी सर्वाधिक संपत्ती खर्ची करणारे तीसरे खलीफा
सरे खलीफा हजरत उस्मान बिन ति अफ्फान रजि. यांचा जन्म इ.स.576 मध्ये मक्का शहरात झाला. त्या काळी  मक्का शहरात कुरैश जमातीचे एकूण 10 कूळ गट होते. त्यापैकी दोन कुळ गट एक बनू हाशम व दोन बनू उम्मैय्या हे मातब्बर म्हणू ओळखले जात. ह. उस्मान रजि. यांचा जन्म बनू उम्मैय्या कुळ गटात झाला होता. त्यांचे वडील हजरत अफ्फान हे मक्का शहरातील मूठभर साक्षर लोकांपैकी एक होते. ते मक्का शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबात जन्म होवूनही हजरत उस्मान रजि. हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. वयात येताच त्यांनी वडिलांचा व्यापार सांभाळण्यास सुरूवात केली. आपल्या मधूर स्वभावामुळे ते अल्पावधीतच एक लोकप्रिय व प्रामाणिक ताजीर (व्यापारी) म्हणून नावारूपास आले.  त्यांचे व्यापार कौशल्य एवढे जबरदस्त होते की, ते कोणत्याही वस्तूंचा व्यापार लिलया करत. म्हणून त्यांची श्रीमंती इतकी वाढली  की लोक त्यांना  ’गनी’ (धनाढ्य)  म्हणून ओळखू लागले. त्याकाळी
श्रीमंत अरबांमध्ये असणाऱ्या  मदीरा आदी छंदापासून ते चार हात लांब राहत. त्यांनी कधीही मद्य प्राशन केले नाही, मात्र ते अनेकेश्वरवादी होते आणि मूर्तीपूजा करत. व्यापारा निमित्त अबेसिनीया, सिरीया, यमन इत्यादी देशात त्यांचे दौरे होत असत. इ.स. 610 मध्ये सिरीयामध्ये असताना  एका रात्री त्यांना दृष्टांत झाला की, मक्कामध्ये एक नवे प्रेषित उदयास आलेले आहेत तुम्ही त्यांचे शिष्यत्त्व पत्करा. त्यावरून त्यांनी आपला दौरा आटोपता घेत मक्का शहर गाठले. मक्का येथे येताच त्यांनी  शहरातील दूसरे प्रसिद्ध व्यापारी हजरत अबुबकर रजि. यांची भेट घेऊन इस्लामसंबंधी माहिती जाणून घेतली व आपल्याला झालेल्या दृष्टांताचा त्यांच्यासमोर खुलासा केला. तेव्हा ह. अबुबकर रजि. त्यांना इस्लामबद्दल  सविस्तर माहिती देऊन त्यांना इस्लाम स्विकारण्याचा सल्ला दिला. ह.अबुबकर रजि. यांच्याशी झालेल्या चर्चेवरून समाधान झाल्याने त्यांनी थेट प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाऊन त्यांच्या  हातावर हात ठेऊन इस्लाम स्विकारला.

इस्लाम स्विकारल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती
त्यांच्या सारख्या श्रीमंत व्यक्तीने इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मक्का शहरामध्ये एकच गहजब उडाला. त्यांचासारखा व्यक्ती इस्लाम स्विकारतो म्हणजे इस्लाम हाच सत्य धर्म असावा, असा एक प्रबळ विचार आम जनतेत पसरला. सर्वात तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या स्व:च्या बनी उम्मैय्या या कुळ गटातून उमटली. त्याचे कारण प्रेषित मुहम्मद सल्ल. हे त्यांच्या प्रतिस्पर्धी कुळ गटातील म्हणजे बनी हाशम मधून येत होते. हजरत उस्मान रजि. यांनी इस्लाम स्विकारून बनी हाशम गटाचे वर्चस्व मान्य केले असा समज बनी उम्मैय्यामध्ये पसरला. त्यांना आपल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या आईसहीत अन्य नातेवाईकांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे चुलते व बनी उम्मैय्या कुळाचे कुलपती हकम बिन आस यांनी तर ह. उस्मान रजि. यांचे हातपाय बांधून त्यांना जबर मारहाण सुद्धा केली. परंतु ते आपल्या निश्चयापासून जरासुद्धा विचलित झाले नाहीत. उलट आपल्याच कुळ गटातील दोन मातब्बर घराण्यातील आपल्या दोन पत्नींना त्यांनी इस्लाम स्विकारण्यास नकार दिल्याने घटस्फोट देऊन आगीत तेल ओतल्यासारखी कृती केली. त्यामुळे तर बनी उम्मैय्या कुळातील लोक अधिकच खवळले. परंतु हजरत उस्मान रजि. यांना कशाचीच परवा नव्हती. त्यांचे चित्त इस्लामवर स्थिर झालेले होते व त्यांना त्यातून उर्जा मिळत होती. म्हणून त्यांना स्व:च्या जीवाचीही परवा नव्हती.
इस्लामी श्रद्धेश्वर दृढ निश्चय असेल तर सुरूवातील भरपूर त्रास होतो. परंतु त्रास सहन केला व श्रद्धेवर ठाम राहीला की प्रत्येकाला अल्लाहची छुपी मदत येते व श्रद्धावान व्यक्ती यशस्वी होतो हा प्रत्येक मुसलमानाचा अनुभव आहे. हजरत उस्मान रजि. चेही असेच झाले. हर प्रकारे प्रयत्न करूनही जेव्हा हजरत उस्मान रजि. हे इस्लामपासून मागे फिरणे तर दूर साधे विचलितही होत नाहीत, हे पाहून अल्पावधीतच बनू उमैय्यावाल्यांनी त्यांचा नाद सोडला.
त्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली कन्या हजरत रूकैय्या रजि. यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. त्यानंतर इ.स.615 मध्ये प्रेषित सल्ल. यांच्या आदेशावरून या जोडप्याने अबेसेनिया येथे हिजरत करून तेथे स्थायिक झाले. पुढे प्रेषित सल्ल. यांनी हिजरत करताच हे जोडपेही मदीना येथे पोहोचले व इस्लामीक पद्धतीने मदीना शहरात व्यापार सुरू केला.

इस्लामी व्यापाराचा एकाधिकार
हजरत उस्मान रजि. यांनी मदीनाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी बाजारपेठेवर ज्यू व्यापाऱ्यांचा एकाधिकार होता. ते मनाला येईल तेव्हा दुकाने उघडत मनाला येईल तेव्हा बंद करीत. मनाला येईल त्या किमती ठेवत. कायम चढ्या दराने माल विकत. लोकांच्या गरजा पाहून किमती वाढवत. वजन काट्यामध्ये सुद्धा फरक ठेवत. मालाची गुणवत्ता सुद्धा लपवून ठेवत. खोट्या शपथा घेऊन हलका माल भारी असल्याचे ग्राहकांना पटवून देत. बाजारपेठेतील सर्व व्यवहार व्याजावर आधारित होते. मोठे व्यापारी छोट्या व्यापाऱ्यांना व्याजावर माल देऊन त्यांची पिळवणूक करीत होते. त्यामुळे छोटे ज्यू व्यापारीसुद्धा मोठ्या ज्यू व्यापाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे वैतागून गेले होते.
हजरत उस्मान रजि. यांनी बाजारेपेठेतील ज्यू व्यापाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून शुद्ध इस्लामी पद्धतीने व्यापार सुरू केला. मालाची गुणवत्ता स्पष्ट करण्याची पद्धत सुरू केली. हलका माल व भारी माल वेगवेगळा ठेवला. सुका माल आणि ओला माल वेगवेगळा ठेवला व त्यांच्या किमतीही गुणवत्तेप्रमाणे कमी अधिक ठेवल्या. तसेच मक्काहून येतांना त्यांनी स्व:ची प्रचंड अशी संपत्ती सोबत आणलेली असल्यामुळे त्यांचे मूळ भांडवल बिनव्याजी असल्यामुळे त्यांनी ठेवलेल्या किमती ज्यू लोकांच्या व्याजी किमतीच्या पेक्षा तुलनेने कमी राहू लागल्या. खोट्या शपथा खाणे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याने खरे तोलून त्यांनी व्यापार सुरू केला. दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आदेशाप्रमाणे मुस्लिमांचा व्यापार प्रामाणिकपणे सुरू झाला. प्रेषित सल्ल. यांनी सुचविलेल्या अशाच अनेक सुधारणांमुळे व त्यांना हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि. व इतर मुस्लिम व्यापाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याने अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेचा नूर पालटला व ज्यू व्यापाऱ्यांच्या एकाधिकाराला हादरे बसू लागले. हजरत उस्मान रजि. यांनी मक्क्याहून आणलेल्या आयत्या संपत्तीचा ओघ मदिनाच्या बाजारपेठेत वाढल्याने व ती संपत्ती बिनव्याजी बाजारात फिरू लागल्याने त्याचा फायदा मुस्लिम व्यापाऱ्यांसह छोट्या ज्यू व्यापाऱ्यांना व सर्वधर्मीय ग्राहकांनाही मिळू लागला. येणेप्रमाणे अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेची सुत्रे ज्यू व्यापाऱ्यांकडून स्थलांतरित होऊन आपसुकच ह.उस्मान यांच्याकडे आली. हजरत उस्मान रजि. यांचे दातृत्व त्यांचे दातृत्व सर्व विधित होते. त्यांनी अनेक छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन बाजारपेठेत उभे केले. प्रेषित सल्ल. यांच्या मस्जिदीसाठी हजरत अबुबकर रजि. यांनी जो जमिनीचा तुकडा खरेदी केला होता त्यावर मस्जिदीच्या बांधकामाचा सर्व खर्च व त्यानंतर सहा वर्षांनी तिच्या विस्ताराचा सर्व खर्च त्यांनी स्व:उचलला. अनेक लढायांमध्ये त्यांनी सढळ हाताने संपत्ती खर्च केली. एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’इस्लामच्या विस्तारामध्ये ह. उस्मान रजि. यांच्या संपत्तीचा मला जेवढा उपयोग झाला तेवढा कोणाच्याच संपत्तीचा झाला नाही.’’ यावरून त्यांच्या दातृत्वाची वाचकांना कल्पना यावी.
मदिनामध्ये एक विहीर अशी होती की जीचे पाणी गोड होते व ती कधीच आटत नव्हती. मात्र तिच्यावर मुस्लिमांना मुक्त प्रवेश नव्हता. ती विहीर एका ज्यू व्यापाऱ्याच्या खाजगी मालकीची होती. हजरत उस्मान रजि. यांनी लोकांच्या पाण्याची अडचण पाहून ती विहीर 10 हजार दिरहम घेऊन खरेदी करून सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच प्रसिद्ध झाले.

प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींशी विवाह
इसवी 624 मध्ये हजरत रूकैय्या रजि. यांचे अल्प: आजाराने निधन झाले तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी आपली दूसरी कन्या उम्मे कुलसूम रजि. ज्या विधवा झाल्या होत्या त्यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांच्या दोन कन्यांशी विवाह करण्याचे अपवादात्मक सौभाग्य लाभलेले ते पृथ्वीवरील एकमेव पुरूष होत.

तृतीय खलीफा पदी निवड
द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांनीही आपल्या पूर्वीचे खलीफा हजरत अबुबकर रजि. यांच्याप्रमाणेच आपल्या पुत्राला खलीफा न बनविता आपल्या हयातीतच सहा लोकांची एक निवड समिती गठित केली होती जिच्यावर तृतीय खलीफाच्या निवडीची जबाबदारी टाकली होती. आपसात सल्लामसल्लत करून या सहापैकी कोणा एकाला त्यांनी आपल्यानंतर खलीफा म्हणून निवडावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. हे सहाही सहाबी रजि. आशरा-ए-मुबश्शरा (जीवंतपणीच ज्यांना स्वर्ग मिळणार असल्याची भविष्यवाणी  अल्लाहकडून झाली होती.) पैकी होते. एकापेक्षा एक विद्वान आणि सरस आणि :स्पृह असे हे सहाबी होते. एवढेच नव्हे तर ह. उमर रजि. यांनी हे ही म्हटले होते या सहा व्यतिरिक्त कोणी सातवा व्यक्ती खलीफा बनण्यासाठी पुढे आला तर त्याचे मुंडके छाटून टाकावे. त्या सहा सहाबींची नावे खालीलप्रमाणे होत -
1. ह.उस्मान रजि. 2. हजरत अली रजि. 3. हजरत जुबैर रजि. 4. हजरत तलहा रजि. 5. हजरत सआद बिन वकास रजि. आणि 6. हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि.
या समितीने आपसात विचार विनिमय करून हजरत उस्मान रजि. यांची तृतीय खलीफा म्हणून निवड केली. ज्या दिवशी ते खलीफा झाले त्या दिवशी त्यांचे वय 70 वर्षे होते. ते सन 24 हिजरी ते सन 35 हिजरी म्हणजे 12 वर्षे खलीफा म्हणून राहिले. त्यांच्या काळात इस्लामी राज्याच्या सीमांचा बराच विस्तार झाला. एकंदरित अतिशय यशस्वी खलीफा म्हणून ते गणले जात. परंतु दुर्दैवाने त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत बसरा आणि कुफा (इरान) व सीरिया मधून आलेल्या दोन हजार मुस्लिमांच्या एका बंडखोर गटाने मदिनामध्ये घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना शहीद केले. इन्नलिल्लाही व इन्ना इलैही राजेऊन.

- एम.आय.शेख

Allah
जर तुम्हाला कुणी असे सांगितले की ही रेल्वे, जी हजारो प्रवाशांची ने-आण करते, आपोआपच तयार झाली आणि आपोआपच चालते, वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने थांबते आणि वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने पुढच्या स्थानकाकडे रवाना होते, तर तुम्हाला विश्वास तरी होईल काय? तुम्ही म्हणाल की.... मी रेल्वे तयार करणाऱ्यास पाहिले नसले तरी मी तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही की रेल्वे कुणीही न बनविता आपोआपच तयार झाली आणि कुणीही न चालविता आपोआपच चालते.
रेल्वे तर खूप मोठी बाब आहे. तुम्ही तर हेदेखील मान्य करणार नाही की एखादे घर, एखादी खुर्ची, एखादे पेन अगर अशीच एखादी वस्तू कुणीही तयार न करता आपोआपच तयार झाली असावी. आता याच अनुषंगाने या जगाकडे पाहावे. ही पृथ्वी जिच्यावर आपण वास्तव्य करतो, हा चंद्र आणि हा तळपणारा सूर्य, ज्यांमुळे आपल्याला प्रकाश मिळतो, हे कोट्यवधींच्या संख्येत जगमगणारे तारे, हा प्रचंड समुद्र, हा वारा, हे विविध तऱ्हेचे प्राणी, चिवचिवणाऱ्या चिमण्या आणि हे खळखळणारे झरे याबरोबरच आपण सर्व मानव.... हे सर्वकाही आपोआपच तयार झाले आहेत काय? आणि कुणी सांगितलेच की होय! हे सर्व आपोआपच तयार झाले, तर तुमचा विश्वास तरी बसेल काय?
सूर्य हा पृथ्वीपेक्षा लाखो पटीने मोठा असून त्या विश्वात आणखीनही बरेच सूर्य आहेत आणि ते आपल्या या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहेत. शिवाय आकाशगंगेत असंख्य तारे आपापल्या भ्रमणकक्षेत व्यवस्थितरित्या फिरत आहेत. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक तारा अगदी नियोजित कक्षेत आणि नियोजित गतीने नियोजित वेळेनुसार भ्रमण करीत असून त्यात तिळमात्र फरक पडत नाही. सूर्याच्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, हे बाष्प वारा पुढे घेऊन जातो आणि मग परत नियोजित वेळेवरच हेच बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात बरसते. जणू हे त्यांचे निश्चित ठरवून दिलेले कार्यच! जणू आपापल्या कर्तव्याशी कुणीही तिळमात्र कुचराई करीत नाही.
पाऊस आपल्या जीवनाचा मुख्य सहारा आहे. पाऊस पडतो आणि सर्वत्र वनराई हिरवी होते. तऱ्हे-तऱ्हेची पिके, फुले, फळे, आपल्याला आणि प्राण्यांना प्राप्त होतात. पाऊसच जर पडला नाही तर काय-काय घडू शकते, याची कल्पना न केलेलीच बरी. असे स्पष्टपणे दिसते की ही प्रचंड सृष्टी आणि यातील प्रत्येक घटना अगदी नियोजनबद्धरित्या घडते. जणू हे प्रचंड विश्व एक प्रचंड मोठा कारखानाच आहे.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की हे कारखानारूपी प्रचंड मोठे विश्व आणि यातील या नियोजनबद्ध घटना-कार्य आपोआपच सुरू आहे काय? हे सर्वकाही चालविणारा आणि सांभाळणारा वा निगराणी करणारा कोणी आहे की नाही? तर वस्तुस्थिती अशी आहे की या विश्वाची निर्मिती करणारा निर्माता असून त्याच्याच आदेशाने हे संपूर्ण विश्व कार्यरत आहे. येथे जे काही होत आहे, ते त्याच निर्मात्या आणि संचालकाच्या मर्जीने होत आहे. येथे एक कणसुद्धा स्वत:हून अस्तित्वात आलेला नसून कोणतीही घटना व कार्य आपोआप घडत नाही.
आता आपण स्वत:लाच पाहावे. आपल्याला किती सुंदर आणि सुरेख शरीर मिळालेले आहे. या शरीरात कशा विविध शक्ती व सामर्थ्य आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण केवळ आपली जीभ, कंठ आणि ओठांना कार्यरत करतो आणि मग वाटेल तसा आवाज शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडतो. या शब्दांना काही अर्थ असतो. जी भावना अगर विचार आपल्या मनात असते, ती शब्दांच्या माध्यमाने इतरांपर्यंत पोचवितो. हे कार्य प्रत्येकजण करू शकतो आणि हे करण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाही. म्हणूनच आपले याकडे कधी लक्षदेखील जात नाही की हे बोलणे किती मोठी बाब आहे. आपण असे लोकसुद्धा पाहिलेत, ज्यांना बोलता येत नाही. ते जन्मजात मुके असतात. आजपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा शोध लागला नाही, ज्यामुळे जन्मजात मुक्या व्यक्तीस बोलता येणे शक्य व्हावे.
आपण आपल्या कर्णेंद्रियांनी ऐकतो, याचा अर्थ असा की इतरांच्या आवाजाचा ध्वनी कानांवर आदळतो आणि आपणास समजते की कोण काय बोलत आहे अथवा कोणते पशु-पक्षी कसला आवाज काढत आहेत, अथवा ढोल-ताशा कशा प्रकारे वाजत आहे. आपण हेसुद्धा जाणतो की जे लोक जन्मजात बहिरे असतात अथवा काहीजण नंतरच्या काळात बहिरे होतात, मात्र हरविलेली अथवा जन्मजात नसलेली दृकशक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रदान करू शकत नाही. याच प्रकारे इतर ज्ञानेंद्रियांची अवस्था आहे. अर्थात पाहणे, वास घेणे, विचार करणे, स्पर्श करणे वगैरे हे सर्वकाही अत्यंत आश्चर्यकारक कर्म आहेत की यासाठीची इंद्रियशक्ती एकदा हरविली की जगात कोणातही ही शक्ती देण्याचे सामर्थ्य नाही.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की असा हा बोलणारा, पाहणारा, ऐकणारा गंध घेणारा, विचार करणारा आणि अशा ना-ना प्रकारचे सामर्थ्य असणारा हा विलक्षण आणि विचित्र माणूस, जो असे कार्य करतो, असे प्रताप दाखवितो की माणसाची अक्कल दंग होते. अर्थातच माणसाच्या शरीराचा एकेक अवयव हेच स्पष्ट करतो की हे संपूर्ण मानवी शरीर, हे विलक्षण सामर्थ्यशाली शरीर आपोआपच तयार झालेले नसून ते अत्यंत कौशल्यवान आणि प्रचंड कला-सामर्थ्य असलेल्या, हाडाचा कारागीर असलेल्या अत्यंत बुद्धिमान निर्मात्याने निर्माण केलेले असून त्याच्यासम इतर कोणताही कारागीर असूच शकत नाही. आपल्याला हेदेखील चांगलेच माहीत आहे की माणूस मातेच्या पोटात अथवा गर्भाशयात तयार होतो. मात्र खरे सांगायचे झाले तर मातेच्या गर्भाशयाच्या अथवा माणूस तयार करणाऱ्या या कारखान्याच्या कार्यात मातेचा वाटा नसतो. अखत्यार नसतो. आपण असे म्हणू शकत नाही की आईच मुलाची निर्माती असते. याचप्रमाणे मुलाचा पितादेखील या निर्मितीकार्यात सहभागी नसतो. अर्थात मुलाचे निर्माते माता-पिता नसतातच मुळी. एका लहानशा गर्भाशयात प्रवेश करणारा अत्यंत सूक्ष्म जीव (Sperm) याला मातेच्या रक्तातून पोषक घटक प्राप्त होतात. मग खरे पाहता हे पोषक घटक पुरविणारे रक्त माता स्वत: तयार करते काय? तिला तर हेदेखील माहीत नसते की बाळाला किती प्रमाणात रक्त मिळत आहे आणि त्याची वाढ कशी होत आहे. स्त्री जे काही खाते-पिते, त्यातूनच निर्माण होणारे रक्त हळूहळू मानवी शरीराचे स्वरूप धारण करते. मग असे कोण आणि कशाच्या आधारावर म्हणू शकतो की स्वत: आई हे कार्य करीत आहे?
थोड्याशा काळात या रक्ताचा गोळा शरीराचे स्वरूप धारण करू लागतो. डोळ्यांच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, हृदयाच्या ठिकाणी हृदय, मेंदूच्या ठिकाणी मेंदू, कानाच्या ठिकाणी कान, यकृताच्या ठिकाणी यकृत, जठराच्या ठिकाणी जठर, फुफुसाच्या ठिकाणी फुफुस, धमण्याच्या ठिकाणी धमण्या आणि मानवी शरीरास आवश्यक असणारे समस्त अवयव अगदी व्यवस्थित व नीटनेटके आपापल्या ठिकाणी तयार होतात. मग या परिपूर्ण शरीरात प्राण येतो आणि मानवात मानवी सामर्थ्य येते. मग मातेचे गर्भाशय अर्थात मानव तयार करणारा हा विलक्षण कारखाना नऊ महिन्यांनंतर बरोबर वेळेवर या अर्भकास बाहेर फेवूâन देतो. बाहेर येताच त्याचे सर्व अवयव कार्यरत होतात. पूर्वीच तयार झालेले आईच्या छातीतील दूध जे स्वत: आई तयार करीत नसते, बाळ गुटू-गुटू प्यायला लागते, श्वास घ्यायला लागते. अशाप्रकारे कोट्यवधी लोक या जगात तयार होत असतात आणि प्रत्येकाचा चेहरा-मोहरा व स्वरूप वेगळे व परस्पर भिन्न असते. प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न असते, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो, प्रत्येकाचा विचार, आवड-निवड, शक्ती, सामर्थ्य कौशल्य, पात्रता आणि भावना भिन्न असतात. या विषयावर जेवढा विचार करण्यात येईल, तेवढेच आश्चर्याचे डोंगर वाढत जाईल आणि आपल्या अंत:करणातून साद निघेल की अशा प्रकारचे विलक्षण कार्य एक प्रचंड कौशल्य-सामर्थ्य असणारा निर्माताच करू शकतो. हा निर्माता तोच अल्लाह ज्याने समस्त जगाची निर्मिती केली असून यात इतर कोणीही त्याचा भागीदार व वाटेकरू असू शकत नाही.
आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती अशी की या जगात लहान वा मोठे कोणतेही कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागत नाही. याच्या पूर्ततेकरिता एकावरच याची जबाबदारी असते. कोणत्याही राज्याला दोन राज्यपाल, दोन मुख्यमंत्री, कोणत्याही देशाचे दोन पंतप्रधान, दोन राष्ट्राध्यक्ष कधीच असू शकत नाहीत आणि अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. कारण असे असेल तर कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र आणि कोणताही देश चालू शकत नाही. कारण कर्ताधर्ता आणि जबाबदार केवळ एकच असू शकतो. आता जर आपण आपल्या सभोवतालच्या या अतिविशाल आणि विलक्षण सृष्टीवर नजर टाकली आणि यावर जर विचार केला की ही सृष्टी कशी निर्माण झाली व कशी कार्यरत आहे, आकाशातून होणारी वर्षा, यामुळे फुलणारी, हिरवीगार होणारी वनराई, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून पाण्याचे होणारे बाष्पीभवन, हे बाष्प वाहून नेणारे वारे, रात्रंदिवस उजाडणारी ही पृथ्वी आणि ग्रह-ताऱ्यांची भ्रमणावस्था, हे सर्वकाही घडत आहे. वैज्ञानिकांनी हेसुद्धा सांगितले आहे की वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असलेली पोषक माती तयार करण्यासाठी सूक्ष्म कृमी-कीटक कार्य करीत आहेत. ते हवेतून नायट्रोजन प्राप्त करून वनस्पतींना पुरवितात. अर्थातच जमिनीत पेरण्यात आलेले बी मोठे झुडुप आणि वृक्ष होण्यासाठी या विश्वातील समस्त ग्रह-तारे, सूर्य, चंद्र, समूह, पवन, कृमी-कीटक आणि अशा असंख्य वस्तूंना कार्य करावे लागते आणि तेदेखील अगदी वेळेवर, विनातक्रार, व्यवस्थित व नीटनेटके. जणू हे संपूर्ण कार्य एकाच शक्तिशाली सत्तेच्या इशाऱ्यावर चालू आहे.
जरा या विस्तीर्ण आकाशाकडे पाहा, निरखून पाहा. सूर्य हा अगदी निश्चित पद्धतीनुसार कार्य करीत आहे. दिवस आणि रात्र अगदी वेळेवर होत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा वेळेवर होत आहे. चंद्राचे कार्य नेमक्या पद्धतीनुसारच सुरू आहे. त्याच्या भ्रमण गतीमध्ये कसलाही फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर आकाशातील समस्त ग्रह आणि तारे जे कोट्यवधींच्या संख्येत आहेत, अगदी व्यवस्थितपणे आपापले कार्य करीत आहेत. आपापल्या भ्रमणकक्षा सोडून इतरांच्या भ्रमणकक्षेला किंचित स्पर्शसुद्धा करीत नाहीत. नसता एक-दुसऱ्यांची टक्कर होऊन छिन्नविछिन्न झाले असते. असे वाटते जणू हे सर्व ग्रह-तारे एखाद्या यंत्राच्या भागांप्रमाणे आपापले कार्य व्यवस्थितपणे करीत आहेत.
विचार करण्यासारखी बाब आहे की शेवटी हे काय प्रकरण आहे की जमिनीतून वनस्पती उगविण्यासाठी अथवा पिके उगविण्यासाठी व ती वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडत आहेत, समस्त वस्तू परस्पर सहकार्याने कार्य करीत आहेत. यापैकी एकही वस्तू आपले कार्य किंचितही सोडायला तयार नाही वा मुळीच हलगर्जी करीत नाही. शेवटी हे काय प्रकरण आणि कोणते गूढ आहे की या प्रचंड आणि विलक्षण विश्वरूपी कारखान्याचे समस्त कार्य वस्तूंच्या परस्पर सहकार्यातून सुरळीपतणे चालू आहे. या प्रश्नाचे केवळ एकच उत्तर असू शकते आणि ते असे की हे पूर्ण कार्य कोण्या एकाच सम्राट आणि प्रभुच्या इशाऱ्यावर होत आहे. केवळ एकाच व्यवस्थापक अर्थात अल्लाहच्या आदेशाने हे विश्व कार्यरत आहे. जर या विश्वाचे संचालक एकापेक्षा जास्त असते तर या कार्यात परस्पर सहयोग आणि सहकार्य शक्यच झाले नसते.

- सानेगुरूजी

साने गुरूजी यांच्या `इस्लामी संस्कृती'या पुस्तकातील संकलन ही पुस्तिका आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अल्पजीवन चरित्र त्यात देण्यात आले आहे. मुहम्मद (स.) यांचे आगमन सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात जगात सर्वत्र धार्मिक अवनती झाली होती. त्याकाळी हिंदुस्थानात सुद्धा अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला होता. नाना देवतांची पुराणे रचली जाऊ लागली. निरनिराळया देवतांचे उपासक आपसात झगडत होते. खरा धर्म लोप पावला होता, सर्वत्र दु:ख होते.
    अशा काळात मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले. त्यांचे येणे आकस्मात नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धीशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले.

आयएमपीटी अ.क्र. 199      -पृष्ठे - 32    मूल्य - 18                आवृत्ती - 4 (2013)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/gbvde8iyrafv7gprvnz17ue1w06ccdiv





statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget