Latest Post

mother child

जगातील सगळ्यात कठीण काम लहान मुलांचे संगोपन करणे हे आहे. बाळाला जन्माला घालणे आणि त्याचे संगोपन करणे हा एक फुलटाईम मदर्स जॉब आहे. हे काम जगातील सर्वात महत्वाचे काम आहे. 

कारण हे काम व्यवस्थित झाले तर भविष्यात आदर्श समाज निर्माण होतो आणि जर का हे काम व्यवस्थित नाही झाले तर भविष्यात निर्माण होणारा समाज हा दिशाहीन होऊन जातो. सर्वशक्तीमान अल्लाह ने या महान कार्यासाठी स्त्रीची निवड केलेली आहे. तिची मानसिक आणि शारीरिक रचना या कामाच्या अनुरूप केलेली आहे. या कामाचे महत्व समजाऊन सांगताना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीचा दर्जा हा पुरूषापेक्षा तीन पटीने मोठा असल्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र ही गोष्ट सुशिक्षित/उच्च शिक्षित जाहील (अडाणी) लोकांच्या लक्षात येणार नाही. कोणी स्त्री वेतन घेऊन आईचे कर्तव्य बजावेल, अशी अपेक्षा करणेच मुदलात मुर्खपणाचे लक्षण आहे. 

साधारणपणे नौकरी करणाऱ्या स्त्रीया एकतर बाळ जन्माला घालायला उत्सुक नसतात. जन्माला घा-तलेच तर बाळाला प्ले ग्रुपमध्ये टाकून किंवा घरी एखादी महिला नोकरीला ठेवून बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून निघून जातात. बाळाला सांभाळ करण्याची कठीण जबाबदारी थोड्याश्या वेतनावर करतांना अशा महिलांच्या नाकी नऊ येते. मग त्या बाळांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. कधी मारहाण करतात, कधी झोपेच्या गोळीचा तुकडा त्यांना खाऊ घा-लतात, कधी अफू तर कधी अल्कोहलयुक्त खोकल्याचे औषध त्यांना पाजवितात. एकदा बाळ झोपलं की मग अशा स्त्रीया मस्त टि.व्ही. पाहत बसतात. बाळाच्या आईला परत आल्यानंतर सकृतदर्शनी बाळ व्यवस्थित दिसते. पण नियमितपणे झोपेची गोळी, अफू,अल्कोहोल युक्त खोकल्याचे औषध इत्यादी दिल्यामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धीक वाढ खुंटते. ही गोष्ट मूल मोठं झाल्यावर लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आईने आईची जबाबदारी कुठल्याही कारणासाठी टाळू नये. मग लाखो रूपयांच्या वेतनाची नोकरीही बाळाच्या स्वास्थ्यापुढे महत्वहीन ठरते. याचा महिलांनी विचार करणे खारघरच्या या घटनेनंतर आवश्यक झालेले आहे. 

इस्लामने बाळाच्या संगोपणाची महान  जबाबदारी आईवर अशीच नाही सोपविली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटंले आहे की, माँ की गोद बच्चे की पहली  दर्सगाह होती है. अर्थात आईच्या कुशीत बाळाची पहिली शाळा असते. एवढेच नव्हे तर विज्ञानाने हे सिद्ध झालेले आहे की, आईच्या शरिराचा संपर्क आणि स्नेह बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यावश्यक असतो. नोकरी करणाऱ्या स्त्रीचा स्पर्श हा आईच्या स्पर्श आणि स्नेहाची बरोबरी करूच शकत नाही, हे या सुशिक्षित अडाणी लोकांच्या लक्षातच येत नाही. यांनी आपल्या गरजा एवढ्या उंचीवर नेवून ठेवलेल्या आहेत की, महिलांना काम केल्याशिवाय, त्यांची पूर्तताच होऊ शकत नाही. 

घराची कामे करणे आजकाल काही घराण्यांमध्ये हलकेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त नोकरपेशा महिलाच नव्हे तर उच्च उत्पन्न गटातील काही गृहिणी सुद्धा घरातील काम करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजतात. म्हणून अशा घरांमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाक व इतर कामांसाठी एक किंवा एकापेक्षा जास्त महिलांना नोकरीवर ठेवले जाते. अशा नोकरपेशा महिला/ पुरूषांमुळे अनेक कुटुंबांना अनेक वेळेस अपरिमित नुकसान सोसावे लागलेले आहे. अशा नोकरांकडून टीप दिली गेल्याने अनेकवेळेस घरावर डाके पडलेले आहेत. वृद्धांची हत्या झालेली आहे. अनेक महिलांवर बलात्कार झालेले आहेत.  लहान मुले किडनॅप झालेली आहेत. कमी वेतनामुळे नाराज कामगार महिला अशी कृत्य करतात. 

स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या महिलांनी पूर्वगृह बाजूला ठेवून इस्लामने महिलांना कोणते अधिकार दिलेले आहेत व त्यांचे कोणते कर्तत्व सांगितलेले आहे याचा अभ्यास करावा आणि आपल्या बाळाची देखभाल स्वतः करावी, हीच अपेक्षा. 



- प्रा. दत्तप्रसन्न साठे

या पुस्तिकेत प्रा. दत्तप्रसन्न साठे, यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अल्पसा परिचय वाचकास करून दिला जेणेकरून अंतिम पैगंबराविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

आपल्या ओघवत्या भाषाशैलीत प्रा. दत्तप्रसन्न साठे यांनी पवित्र जीवनाचा अल्पसा आढावा घेतला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील घटनाक्रम देऊन मोठ्या प्रभावीपणे जीवनपट डोळयांसमोर चित्रीत केला आहे. यासाठी लेखक महोदयांनी कुरआन व हदीससंग्रहाचा आधार घेतलेला दिसून येतो.     

आयएमपीटी अ.क्र. 231   -पृष्ठे - 48    मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/e83d72myewt935jr3uwacuf1e1y6zc9u







माननीय अनस (रजि.) यांच्याकडून निवेदन आहे,

पैगंबर मुहम्मद (स.) यांना वाटेत एक खजूर पडलेली दिसली (सापडली) तेव्हा ते म्हणाले, ‘‘जर मला आशंका नसती की ही खजूर दानपुण्य केलेली नाही तर मी ही खजूर खाल्ली असती.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे मला शंका आहे की ही खजूर दान केलेल्या खजुरींपैकी आहे आणि कुणाच्या हस्ते नेताना रस्त्यात ही खजूर पडली असावी. म्हणून ही खजूर खाणे माझ्यासाठी वैध नाही अन्यथा या खजुरीला उचलून घेऊन खाण्यात काहीच वाईट नव्हते. ती खजूर दान केलेल्या खजुरींपैकीच असेल, असे नव्हे परंतु ही खजूर दान केलेल्यापैकी (सदका) असू शकते म्हणून हिला न खाणे हेच योग्य आहे.

माननीय सौदा (रजि.) कुरैशच्या (कबिल्यातील) घराण्यातील होत्या. त्यांच्या आईचे नाव समूस बिन्ते कैस होते त्या अन्सार (मदीनावासी) च्या बनू नज्जार या खानदानातील होत्या. माननीय सौदा (रजि.) यांचे पहिले लग्न त्यांचे चुलतभाऊ माननीय सकरान बिन अमरौ (रजि.)यांच्याशी झाले होते.

अल्लाहने सौदा (रजि.) यांना चांगल्या गुणधर्मांनी युक्त केले होते. जेव्हा पैगंबरानी इस्लामचा प्रचार सुरू केला, तेव्हा त्यांनी `लब्बैक' म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यांच्या पतीनेही त्याचा स्वीकार केला. हबशाच्या (अबीसीनीया) दुसऱ्या देशांतरात (स्थलांतर) सौदा (रजि.) व त्यांचे पती ही सामील होते. अनेक वर्षे तेथे राहून मक्का येथे परत आले. काही काळानंतर सकरान (रजि.) यांचा मृत्यु झाला. सौदा (रजि.) विधवा झाल्या.

या सुमारासच माननीय खदीजा (रजि.) यांचे निधन झाले होते. मातृविहीन चार मुलींना पाहून पैगंबर (स.) फार दु:खी होत असत. खुला (रजि.) नामक एक सहाबीया यांनी पैगंबरांना विनंती केली, ``हे पैगंबर (स.)! खुदीजा (रजि.) च्या निधनानंतर आपण नेहमी दु:खी दिसता.'' ``होय'' पैगंबर म्हणाले, ``घराची व्यवस्था आणि मुलींची देखभाल त्या करीत असत.'' खुला (रजि.) म्हणाली, ``आपल्याला एका पत्नीची गरज आहे. मी यासाठी प्रयत्न करू का?'' त्यांची परवानगी घेऊन माननीय सौदा (रजि.) जवळ तिने निकाहचा प्रस्ताव पाठविला. सौदा (रजि.) व त्यांच्या पित्याने तो मान्य केला व ४०० दिरहम (महर) देऊन पित्याने सौदा (रजि.) यांचा विवाह पैगंबरांशी लाऊन दिला. सौदा (रजि.)चा भाऊ जो मुसलमान नव्हता, त्याला हे कळल्यावर त्याने फार शोक केला. काही काळानंतर तो मुस्लिम झाला व आपल्या वागणुकीचा त्याला शेवटपर्यंत पश्चात्ताप होत राहिला. पैगंबरांना पैगंबरी मिळाल्यावर दहा वर्षांनी हा विवाह झाला.

सकरान (रजि.) यांच्या घरी नांदत असताना माननीय सौदा (रजि.) यांना एक स्वप्न पडले की त्या उशी घेऊन पहुडल्या असताना एकाएकी आकाश फाटले व चंद्र त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांनी हे स्वप्न आपले पती सकरान (रजि.) यांना सांगितले. त्यांनी स्वप्नफल सांगितले, ``मला लवकरच मृत्यु येईल व तुम्ही अरबचे चंद्र पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी बनाल.'' आणि खरोखरच तसे घडले.

पडदा पद्धतीचे मार्गदर्शन येण्याअगोदर माननीय उमर (रजि.) यांचे म्हणणे होते की पैगंबरांच्या घरातील स्त्रियांनी बाहेर येऊ नये. माननीय सौदा (रजि.) त्या काळात घराबाहेर प्रातर्विधी इ. साठी जात असत. एके दिवशी त्या जंगलाकडे यासाठीच जात असताना रस्त्यात माननीय उमर (रजि.) यांनी त्यांना पाहिले. त्यांच्या मजबूत देहयष्टीमुळे त्यांना ओळखून उमर (रजि.) म्हणाले, ``हे सौदा (रजि.) मी तुला ओळखले आहे.'' ऐवूâन त्यांना वाईट वाटले. त्यांनी पैगंबरांना जाऊन सांगितले. परंतु ते गप्प राहिले. त्यानंतर पडदासाठी दिव्य आयत अवतरली व स्त्रियांवर पडदा लागू झाला.

सौदा (रजि.) स्वभावाने कडक परंतु हास्यविनोदात रमणाऱ्या होत्या. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांच्यावर अत्यंत खूश होते. त्या अत्यंत दयाळू आणि दानशूर होत्या. गरजूंना त्या नेहमी दानधर्म करीत असत. त्या कलाकुसरीतही प्रविण होत्या. कातडी कमावण्याचे काम करीत व त्यापासून जी प्राप्ती होई ती गरीबांमध्ये वाटून टाकीत. माननीय उमर (रजि.) यांनी दिरहम भरलेली थैली त्यांच्याकडे पाठविली तेव्हा त्यांनी त्या दिरहमाचे गरीबांना दान दिले. त्यांच्यात ते वाटून टाकले. माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ``पैगंबरा (स.) समवेत राहण्याचे वेड असलेली दुसरी स्त्री मी पाहिली नाही. माझा आत्मा जर त्यांच्या शरीरात असता तर किती बरे झाले असते.''

भाग ४

माननीय सौदा (रजि.) १० हिजरीमध्ये पैगंबरासमवेत हजला गेल्या. लठ्ठपणामुळे त्यांना भरभर चालता येत नव्हते. म्हणून पैगंबर (स.) यांनी त्यांना मुज्दल्फाकडे आधीच रवाना केले... `हज्जतुल विदा' च्या वेळी पैगंबरांनी आपल्या पत्नींना सांगितले, ``या हजनंतर तुम्ही घरीच राहा.'' त्यांच्या निधनानंतर त्यांची कोणतीही पत्नी घराबाहेर पडली नही. सौदा (रजि.) म्हणत, ``मी हज आणि उमरा दोन्हीही केलेले आहेत. आता मी त्यासाठी बाहेर पडणार नाही.'' माननीय सौदा (रजि.) यांचे निधन २२ हिजरीमध्ये झाले. माननीय सकरान (रजि.) या पहिल्या पतीपासून त्यांना अब्दुलरहमान (रजि.) नावाचा मुलगा होता; जो माननीय उमर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या काळात जलूला येथील युद्धात मारला गेला. पैगंबरांपासून सौदा (रजि.) यांना मुलबाळ वगैरे झाले नाही.


 

wedding

मुस्लिमांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाम मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही.

जर मुस्लिमांनी आपल्या मुलां-मुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या समाजाला कन्याभ्रुणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही. 

इस्लाममध्ये विवाह म्हणजे एक सामाजिक करार आहे. त्यात दोन व्यक्ती, दोन साक्षीदार, एक वकील आणि एक आलीम एवढेच लागतात. मुलाकडील लोकांना मुलगी पसंद पडली (इजाब), मुलीकडील लोकांना मुलगा पसंद पडला (कुबूल) की लग्न ठरते. दोन साक्षीदार आणि एक वकीलासमोर खुत्बा-ए-निकाह (विवाहाची विधी) अदा केला की विवाह संपतो. या विवाहात फक्त महेरचीच आर्थिक देवाण-घेवाण होते. वराकडून आपल्या होणाऱ्या पत्नीला भेट म्हणून जी रक्कम दिली जाते तिला मेहर म्हणतात. ती दोन्ही पक्षाकडील लोकांच्या संमतीने ठरविली जाते. ही रक्कम नवऱ्यामुलाच्या ऐपतीप्रमाणे ठरविली जाणे अपेक्षित आहे. निकाह अर्थात विवाह मस्जिदीमध्ये केला जातो. विवाहाला यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नसते. जगातील सगळ्यात सुलभ अशी लग्नाची ही पद्धत आहे. मात्र या पद्धतीचे विकृतीकरण करून मुस्लिमांमध्ये खर्चिक विवाह करण्याची परंपरा अलीकडे रूढ झालेली आहे. विवाहाच्या वेळी मुलीच्या परिवाराकडून नवऱ्या मुलाच्या परिवाराला थोडासा पाहुणचार करणे समजण्यासारखे असते. मात्र आजकाल या पाहुणचाराला इव्हेंटचे स्वरूप देण्यात आलेले आहे. हीच बाब चिंतेची आहे. खर्चिक विवाहाचा परिणाम कन्याभ्रूण हत्येच्या रूपाने समोर येतो हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. मुस्लिमांमध्येही आता लिंगपरीक्षण करून कन्याभ्रूण हत्या होण्यास सुरूवात झाल्यास नवल वाटून घेण्याची गरज नाही. इतर समाजाप्रमाणे मुस्लिमही आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत आहेत. या खर्चामुळे अनेकांचे विवाह रखडलेले आहेत. 30-35 वर्षाच्या वयाची अविवाहित मुलं आणि मुली मुस्लिम समाजामध्येही आजकाल ठळकपणे दिसून येतात. अशी कोणती गोष्ट आहे, जी त्यांना एवढ्या वयापर्यंत लग्नापासून रोखून ठेवते?  स्पष्ट आहे, लग्नातील अवाढव्य मागण्या, शोभेचा खर्च, मोठमोठ्या जेवणावळी, हुंडा, दागदागिने, मंडप, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी मिळून मुस्लिम समाजामध्येही विवाह करणे अवघड झालेले आहे. 

लग्नाच्या घरी दावत हा  प्रकार मुस्लिमांमध्ये कधीच नव्हता. आजही मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये  लग्नाच्या दिवशी पाहुण्यांना जेवण दिले जात नाही. मात्र भारतामध्ये लग्नाच्या दिवशी वधूपक्षाकडून शेकडो लोकांना जेवण देण्याची परंपराच रूढ झालेली आहे. यात हजारो नव्हे लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे. मोठ्या शहरांमध्ये 2 लाख जेवणाचे व 2 लाख फंक्शन हॉलचे वेगळे काढून ठेवावे लागतात. तेव्हाच लग्न करणे शक्य होते. त्यानंतरचा इतर खर्च वेगळा. साहजिकच एक साधारण लग्न 6 ते 10 लाखाच्या घरात जाते. एवढी रक्कम तेच लोक खर्च करू शकतात, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे चांगले-वाईट, मोठे स्रोत असतात. याचा परिणाम सर्वसामान्य मुस्लिमांवर होत आहे. प्रत्येकजण असे लग्न करू पाहत आहे, की तसे लग्न त्या वस्तीमध्ये त्यापूर्वी कोणाचेच झालेले नाही.

एकदा काही बदू (खेडूत  मुस्लिम) चर्चा करीत होते की, त्यांच्यापैकी कोणाचा कबिला (घराणे) श्रेष्ठ आहे. प्रत्येकजण आपला कबिला श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगत होता. बघताबघता प्रकरण चिघळले व हातघाईवर आले. तेव्हा एका बुजुर्ग बदूने सांगितले की, प्रेषित मुहम्मद (स.) आपल्यामध्ये हयात  असताना आपण असे आपसांत भांडणे योग्य नाही. ते आपल्या सर्वांना ओळखतात. आपण त्यांनाच हा प्रश्न विचारू की आमच्यापैकी कोणता कबिला श्रेष्ठ आहे? त्यांनी दिलेल्या उत्तरावर आपल्याला सर्वांना राजी व्हावे लागेल. सर्वांनी या सल्याप्रमाणे प्रेषित (स.) यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे मांडले व त्यांना विनंती केली की त्यांनी सांगावे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले व उत्तर दिले की, तुमच्यापैकी तो कबिला सर्वश्रेष्ठ आहे ज्या कबिल्यामध्ये विवाह सुलभ आणि व्यभिचार कठीण आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की हे एक सूत्र आहे जे प्रेषितांनी मुस्लिमांना दिलेले आहे. आज या सूत्रावर आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मुस्लिमांच्या अत्यंत

महत्त्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर  वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाममार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने तसे घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी मुस्लिम समाजावर राहील. कुठलाही समाज आदर्श तेव्हा होतो, जेव्हा त्यातील विवाह आणि अन्य सोपस्कार सुलभ असतात. मुस्लिमांना शरियतने अत्यंत सुलभ अशी विवाहाची पद्धत आखून दिलेली आहे. मात्र आपल्या बडेजावाच्या तोऱ्यात आपण सर्वांनी त्या पद्धतीला हरताळ फासलेला आहे. यामुळे नको तेवढी अडचण निर्माण झालेली आहे. या प्रश्नाला सोडवायचे असल्यास व समाजाला जीवघेण्या खर्चिक विवाहातून बाहेर  काढावयाचे असल्यास समाजातील श्रीमंत लोकांना पुढे यावे लागेल. जेव्हा मुस्लिमांतील श्रीमंत लोक कुठलाही बडेजाव न दाखविता साधेपणाने आपल्या पाल्यांचे लग्न करतील तेव्हा समाजातील मध्यम आणि गरीब वर्गातील लोकसुद्धा साधेपणाने लग्न करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम लग्न मस्जिदीमध्ये करून मुलीच्या घरी दिल्या जाणाऱ्या शाही मेजवाणीवर प्रतिबंध आणावा लागेल. आजकाल अनेक लग्न मस्जिदीमध्ये होतात परंतु, लग्न होताच मस्जिदीमध्येच घोषणा होते की, अमुकअमुक फं्नशन हॉलमध्ये पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ही पद्धत बंद केल्यास जेवणाचा प्रचंड खर्च, फं्नशन हॉलचे भाडे वाचेल व लग्नाच्या अर्ध्या खर्चाला या ठिकाणी आळा बसेल. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे मुलींसोबत महागड्या  वस्तू देण्याची प्रथा बंद पाडावी ला- गेल. दहेज-ए-फातमी या नावाखाली आज मुस्लिमांमध्ये नको त्या लाखो रूपयांच्या महागड्या वस्तू मुलींसोबत देण्याची फॅशन रूढ झालेली आहे. यात हजरत फातेमा (रजि.) आणि हजरत अली (रजि.) यांच्या विवाहामध्ये दिल्या गेलेल्या काही वस्तूंचा  हवाला दिला जातो. यासंबंधी सत्य असे आहे की, अली (रजि.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासोबतच लहानाचे मोठे झाले व त्यांच्याबरोबरच राहिले. म्हणून त्यांचे स्वतःचे घर किंवा स्वतःच्या कुठल्याही वस्तू नव्हत्या. जेव्हा प्रेषितांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांचा वर म्हणून स्वीकार केला तेव्हा अली (रजि.) यांच्या घोड्याची जर्रा (घोड्याच्या पाठीवर ठेवण्याचे चामड्याचे आसन) विकून थोडी मातीची भांडी, एक मिश्कीजा (चामड्याची पाणी भरण्याची पिशवी), नारळाच्या केसरची एक गादी एवढ्या गोष्टी देण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा दुरूपयोग मुस्लिमांनी इतका केला की, त्या नावाखाली आपल्या मुलींना कार, फ्रीज, टी.व्ही., लाखोंचे दागिने, भांडी, ब्रँडेड वस्तू, देऊन त्यांना सासरी पाठविण्याची प्रथा रूढ केली. हा फार मोठा अपराध या लोकांनी केलेला आहे. जहेज-ए-फातमीच्या नावाखाली एवढा प्रचंड खर्च करणे कुठल्याही इस्लामी चारित्र्यसंपन्न मुस्लिमाला शोभण्यासारखे नाही. विवाहानंतर तआम-ए-वलीमा नवऱ्या मुलाकडून देणे अनिवार्य असते. यातही दोन चुकीचे प्रकार समाजात रूढ झालेले आहेत. एक तर तआमे वलीमा दिला जात नाही. दुसरे हे की वलीमा हा अत्यंत महागड्या स्वरूपात दिला जातो. या दोन्ही रूढी या इस्लामला धरून नाहीत. कुठल्याही पद्धतीने केला गेलेला अवास्तव खर्च इस्लामला मान्य नाही. जर मुस्लिमांनी आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. आपल्या समाजाला कन्या भ्रूणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह आम्हा सर्वांना आपापल्या पाल्यांची लग्ने इस्लामी शरियत (आचार संहिते)प्रमाणेच करण्याची सद्बुद्धी देवो. (आमीन.)


फेरोजा तस्बीह- 

(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी) 



- तालिबुल हाशमी

या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या महिला अनुयायींचा उल्लेख आला आहे. ही पुस्तिका लिहिण्याचा उद्देश प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला ह्या पवित्र अनुयायी महिलांची माहिती देऊन त्यांस तसे आचरण करण्याची प्रेरणा मिळावी.

पाश्चात्य स्त्रीमध्ये आज स्त्रीत्व उरले नाही. तिला आज केवळ विषय उपभोगाची वस्तू समजले जाते. खेदाने म्हणावे लागते की आज संपूर्ण जग त्यांचे अनुकरण करीत आहेत. त्या संस्कृतीत आज स्त्री-पुरुष संबंधाविषयी स्वैराचार माजला आहे. जगातील स्त्रिया त्या मार्गावर चालून मानवजातीचे कोणते भले करणार आहेत. म्हणूनच ही पुस्तिका वाचून एखादी स्त्रीसुद्धा लाभान्वित झाली तरी कष्टाचे सार्थक होईल, असे लेखकाचे मत आहे.


आयएमपीटी अ.क्र. 230   -पृष्ठे - 64    मूल्य - 30  आवृत्ती - 1 (2014)

 डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3py91r8al9rw6zz550kw99lsjnx1qgjg




 माननीय जाबिर बिन समुरह (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी मौन पाळत असत.’’ (हदीस : सहरहुस्सुन्नह)

स्पष्टीकरण

अर्थ होतो की मौन व मितभाषिता हे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रमुख गुण होते. अनावश्यक गोष्ट त्यांच्या तोंडून कधीही निघत नसे. जेव्हा कधी आवश्यक वार्ता असल्यासच पैगंबर बोलत असत अन्यथा मौन पाळत असत. दुसऱ्यांसाठी त्यांची हीच शिकवण होती, ‘‘जो कोणी अल्लाह व पारलौकिक जीवनावर ईमानधारक आहे त्याला मुखातून चांगलेच बोलले पाहिजे अन्यथा गप्प राहिले पाहिजे.’’

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget