Latest Post


- नसीम गाज़ी फलाही

नसीम गाझी फलाही यांनी या पुस्तिकेत शरीर आणि शरीरासंबंधी इतर वस्तूंची स्वच्छता, शुचिर्भूतता आणि पावित्र्यासंबंधी इस्लामच्या मूलभूत शिकवणींना प्रस्तुत केले आहे.

स्वच्छता आणि पावित्र्याविषयीचे इस्लाममधील महत्त्व विषद केले आहे. अल्लाहची उपासना, नमाज इ. साठी त्यास अत्यावश्यक ठरविले आहे. आणि स्वच्छता व पावित्र्याविषयी निष्काळजी असणाऱ्यास पारलौकिक जीवनातील शिक्षेपासून सावधान केले आहे.

ही पुस्तिका वाचल्यानंतर वाचकास स्वच्छता व पावित्र्याविषयीची खरी माहिती उपलब्ध होते. शरीर व आत्मा दोन्ही आरोग्यसंपन्न, स्वच्छ व सुचिर्भूत ठेवून निरामय समाजनिर्मिती करण्यासाठी इस्लामी शिकवणीनुसार आचरण आवश्यक आहे.

आयएमपीटी अ.क्र. 232  -पृष्ठे - 48    मूल्य - 22  आवृत्ती-1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/r5f7q39qx5afiu2remgbakehwbyu6oey



माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे,

तुफैल बिन अम्र (रजि.) अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाले आणि सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दौस कबिल्याच्या लोकांनी अवज्ञा केली आणि नाकारले म्हणून तुम्ही त्या लोकांना शापित करावे, असा लोकांचा विचार आहे.’’ यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! दौसच्या लोकांना मार्गदर्शन प्रदान कर आणि त्यांना माझ्याजवळ पाठव.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे हे अल्लाह, मी प्रार्थना करतो की दौस कबिल्याच्या लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि ते सर्व तुझे आज्ञाधारक मुस्लिम बनून जावेत आणि त्या लोकांनी माझी अवज्ञा करू नये.

पैगंबरांची सर्वश्रेष्ठ अभिलाषा हीच असते की मार्गभ्रष्ट लोकांनी सन्मार्गावर मार्गस्थ व्हावे आणि मार्गदर्शनरुपी संपत्ती त्यांच्या नशिबी यावी जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ईशदासांचा कल्याणभाव पैगंबर व नबींच्या हृदयात सामावलेला असतो. खरे तर हे ईशप्रेमाचे प्रतीक तसेच ईशप्रेमाची अपेक्षा असते की ईशदासांशी घनिष्ट संबंध तुमचा असावा. त्यांच्याशी प्रेम करावे आणि त्यांच्या भल्यासाठी व कल्याण करण्यासाठी सतत कार्यरत राहावे.


हुमेरा आणि सिद्दीका यांची उपाधी उम्मे अब्दुल्लाह. अब्दुल्लाहची आई आएशा (रजि.) होती. या कुरैश खानदानातील बनू तैइम या कबिल्यातील होत्या. आईचे नाव उम्मे रुमान बिन्ते आमीर (रजि.) होते. त्या एक महान माननीय साहबीया होत्या. पैगंबरांना पैगंबरी मिळून चार वर्षे झाली, तेव्हा शव्वाल महिन्यात त्या जन्मल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचे बालपण माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्या छत्रछायेत गेले. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान व चाणाक्ष होत्या. बालपणीची प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती. तेवढी स्मरणशक्ती इतर साहबी साहबीयांची नव्हती.

पैगंबरांशी विवाह होण्यापूर्वी माननीय आएशा (रजि.) यांचे लग्न जूबेर बिन मतआम यांच्या मुलाशी ठरले होते. परंतु त्या मुलाच्या आजीच्या सांगण्यावरुन हा विवाह जुबेरने मोडला. कारण माननीय अबू बकर (रजि.) यांचे सर्व कुटुंबीय मुस्लिम झाले होते. खुला बिन्ते हकीम (रजि.) यांनी पैगंबरासाठी आएशा (रजि.) यांना विवाह करण्याबाबत संदेश दिला. अबू बकर (रजि.) यांनी आश्चर्याने विचारले, ``मी त्यांचा मानलेला भाऊ आहे. भावाच्या मुलीबरोबर लग्न होऊ शकते काय?'' पैगंबरांना (स.) येऊन खुला (रजि.) ने विचारले असता पैगंबर म्हणाले, ``अबू बकर (रजि.) माझे धर्मबंधु आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीशी विवाह होऊ शकतो.'' ऐवूâन अबू बकर (रजि.) खूश झाले. आपली मुलगी पैगंबरांची पत्नी होणार याचा त्यांना आनंद झाला. हा विवाह पार पडला. पाचशे दिरहम महर देऊन अबू बकर (रजि.) यांनी स्वत:च निकाह पढवून हा विवाह संपन्न केला.

एकदा अरबस्तानात शव्वाल महिन्यात प्लेग पसरला व त्याने वस्त्या उजाड झाल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचा विवाह याच महिन्यात झाला व काही वर्षांनंतर याच महिन्यात सासरी त्यांची पाठवणी केली गेली. तेव्हापासून या महिन्याला अशुभ समजणे बंद झाले. माननीय आएशा (रजि.) यांच्याशी विवाहाची शुभवार्ता पैगंबर (स.) यांना   स्वप्नात दिली गेली होती. स्वप्नात त्यांनी पाहिले की एकजण रेशमी कपडात गुंडाळलेली एक वस्तु पैगंबरांना दाखवीत म्हणाला, ``ही वस्तु तुमची आहे.'' पैगंबर (स.) यांनी ती उघडली तर त्यात माननीय आएशा (रजि.) यांचा चेहरा दिसला. हा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. त्या म्हणत, ``मी मैत्रिणीबरोबर खेळत होते तेव्हा माझ्या आईने घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करेपर्यंत मला त्या विवाहाची काहीच कल्पना नव्हती.'' जेव्हा त्या जन्मल्या तेव्हा आई-वडील मुस्लिम होते. त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच इतर धर्माचे संस्कार त्यांना मिळाले नाहीत.


mother child

जगातील सगळ्यात कठीण काम लहान मुलांचे संगोपन करणे हे आहे. बाळाला जन्माला घालणे आणि त्याचे संगोपन करणे हा एक फुलटाईम मदर्स जॉब आहे. हे काम जगातील सर्वात महत्वाचे काम आहे. 

कारण हे काम व्यवस्थित झाले तर भविष्यात आदर्श समाज निर्माण होतो आणि जर का हे काम व्यवस्थित नाही झाले तर भविष्यात निर्माण होणारा समाज हा दिशाहीन होऊन जातो. सर्वशक्तीमान अल्लाह ने या महान कार्यासाठी स्त्रीची निवड केलेली आहे. तिची मानसिक आणि शारीरिक रचना या कामाच्या अनुरूप केलेली आहे. या कामाचे महत्व समजाऊन सांगताना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीचा दर्जा हा पुरूषापेक्षा तीन पटीने मोठा असल्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र ही गोष्ट सुशिक्षित/उच्च शिक्षित जाहील (अडाणी) लोकांच्या लक्षात येणार नाही. कोणी स्त्री वेतन घेऊन आईचे कर्तव्य बजावेल, अशी अपेक्षा करणेच मुदलात मुर्खपणाचे लक्षण आहे. 

साधारणपणे नौकरी करणाऱ्या स्त्रीया एकतर बाळ जन्माला घालायला उत्सुक नसतात. जन्माला घा-तलेच तर बाळाला प्ले ग्रुपमध्ये टाकून किंवा घरी एखादी महिला नोकरीला ठेवून बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून निघून जातात. बाळाला सांभाळ करण्याची कठीण जबाबदारी थोड्याश्या वेतनावर करतांना अशा महिलांच्या नाकी नऊ येते. मग त्या बाळांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. कधी मारहाण करतात, कधी झोपेच्या गोळीचा तुकडा त्यांना खाऊ घा-लतात, कधी अफू तर कधी अल्कोहलयुक्त खोकल्याचे औषध त्यांना पाजवितात. एकदा बाळ झोपलं की मग अशा स्त्रीया मस्त टि.व्ही. पाहत बसतात. बाळाच्या आईला परत आल्यानंतर सकृतदर्शनी बाळ व्यवस्थित दिसते. पण नियमितपणे झोपेची गोळी, अफू,अल्कोहोल युक्त खोकल्याचे औषध इत्यादी दिल्यामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धीक वाढ खुंटते. ही गोष्ट मूल मोठं झाल्यावर लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आईने आईची जबाबदारी कुठल्याही कारणासाठी टाळू नये. मग लाखो रूपयांच्या वेतनाची नोकरीही बाळाच्या स्वास्थ्यापुढे महत्वहीन ठरते. याचा महिलांनी विचार करणे खारघरच्या या घटनेनंतर आवश्यक झालेले आहे. 

इस्लामने बाळाच्या संगोपणाची महान  जबाबदारी आईवर अशीच नाही सोपविली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटंले आहे की, माँ की गोद बच्चे की पहली  दर्सगाह होती है. अर्थात आईच्या कुशीत बाळाची पहिली शाळा असते. एवढेच नव्हे तर विज्ञानाने हे सिद्ध झालेले आहे की, आईच्या शरिराचा संपर्क आणि स्नेह बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यावश्यक असतो. नोकरी करणाऱ्या स्त्रीचा स्पर्श हा आईच्या स्पर्श आणि स्नेहाची बरोबरी करूच शकत नाही, हे या सुशिक्षित अडाणी लोकांच्या लक्षातच येत नाही. यांनी आपल्या गरजा एवढ्या उंचीवर नेवून ठेवलेल्या आहेत की, महिलांना काम केल्याशिवाय, त्यांची पूर्तताच होऊ शकत नाही. 

घराची कामे करणे आजकाल काही घराण्यांमध्ये हलकेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त नोकरपेशा महिलाच नव्हे तर उच्च उत्पन्न गटातील काही गृहिणी सुद्धा घरातील काम करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजतात. म्हणून अशा घरांमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाक व इतर कामांसाठी एक किंवा एकापेक्षा जास्त महिलांना नोकरीवर ठेवले जाते. अशा नोकरपेशा महिला/ पुरूषांमुळे अनेक कुटुंबांना अनेक वेळेस अपरिमित नुकसान सोसावे लागलेले आहे. अशा नोकरांकडून टीप दिली गेल्याने अनेकवेळेस घरावर डाके पडलेले आहेत. वृद्धांची हत्या झालेली आहे. अनेक महिलांवर बलात्कार झालेले आहेत.  लहान मुले किडनॅप झालेली आहेत. कमी वेतनामुळे नाराज कामगार महिला अशी कृत्य करतात. 

स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या महिलांनी पूर्वगृह बाजूला ठेवून इस्लामने महिलांना कोणते अधिकार दिलेले आहेत व त्यांचे कोणते कर्तत्व सांगितलेले आहे याचा अभ्यास करावा आणि आपल्या बाळाची देखभाल स्वतः करावी, हीच अपेक्षा. 



- प्रा. दत्तप्रसन्न साठे

या पुस्तिकेत प्रा. दत्तप्रसन्न साठे, यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अल्पसा परिचय वाचकास करून दिला जेणेकरून अंतिम पैगंबराविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

आपल्या ओघवत्या भाषाशैलीत प्रा. दत्तप्रसन्न साठे यांनी पवित्र जीवनाचा अल्पसा आढावा घेतला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील घटनाक्रम देऊन मोठ्या प्रभावीपणे जीवनपट डोळयांसमोर चित्रीत केला आहे. यासाठी लेखक महोदयांनी कुरआन व हदीससंग्रहाचा आधार घेतलेला दिसून येतो.     

आयएमपीटी अ.क्र. 231   -पृष्ठे - 48    मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/e83d72myewt935jr3uwacuf1e1y6zc9u







माननीय अनस (रजि.) यांच्याकडून निवेदन आहे,

पैगंबर मुहम्मद (स.) यांना वाटेत एक खजूर पडलेली दिसली (सापडली) तेव्हा ते म्हणाले, ‘‘जर मला आशंका नसती की ही खजूर दानपुण्य केलेली नाही तर मी ही खजूर खाल्ली असती.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे मला शंका आहे की ही खजूर दान केलेल्या खजुरींपैकी आहे आणि कुणाच्या हस्ते नेताना रस्त्यात ही खजूर पडली असावी. म्हणून ही खजूर खाणे माझ्यासाठी वैध नाही अन्यथा या खजुरीला उचलून घेऊन खाण्यात काहीच वाईट नव्हते. ती खजूर दान केलेल्या खजुरींपैकीच असेल, असे नव्हे परंतु ही खजूर दान केलेल्यापैकी (सदका) असू शकते म्हणून हिला न खाणे हेच योग्य आहे.

माननीय सौदा (रजि.) कुरैशच्या (कबिल्यातील) घराण्यातील होत्या. त्यांच्या आईचे नाव समूस बिन्ते कैस होते त्या अन्सार (मदीनावासी) च्या बनू नज्जार या खानदानातील होत्या. माननीय सौदा (रजि.) यांचे पहिले लग्न त्यांचे चुलतभाऊ माननीय सकरान बिन अमरौ (रजि.)यांच्याशी झाले होते.

अल्लाहने सौदा (रजि.) यांना चांगल्या गुणधर्मांनी युक्त केले होते. जेव्हा पैगंबरानी इस्लामचा प्रचार सुरू केला, तेव्हा त्यांनी `लब्बैक' म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यांच्या पतीनेही त्याचा स्वीकार केला. हबशाच्या (अबीसीनीया) दुसऱ्या देशांतरात (स्थलांतर) सौदा (रजि.) व त्यांचे पती ही सामील होते. अनेक वर्षे तेथे राहून मक्का येथे परत आले. काही काळानंतर सकरान (रजि.) यांचा मृत्यु झाला. सौदा (रजि.) विधवा झाल्या.

या सुमारासच माननीय खदीजा (रजि.) यांचे निधन झाले होते. मातृविहीन चार मुलींना पाहून पैगंबर (स.) फार दु:खी होत असत. खुला (रजि.) नामक एक सहाबीया यांनी पैगंबरांना विनंती केली, ``हे पैगंबर (स.)! खुदीजा (रजि.) च्या निधनानंतर आपण नेहमी दु:खी दिसता.'' ``होय'' पैगंबर म्हणाले, ``घराची व्यवस्था आणि मुलींची देखभाल त्या करीत असत.'' खुला (रजि.) म्हणाली, ``आपल्याला एका पत्नीची गरज आहे. मी यासाठी प्रयत्न करू का?'' त्यांची परवानगी घेऊन माननीय सौदा (रजि.) जवळ तिने निकाहचा प्रस्ताव पाठविला. सौदा (रजि.) व त्यांच्या पित्याने तो मान्य केला व ४०० दिरहम (महर) देऊन पित्याने सौदा (रजि.) यांचा विवाह पैगंबरांशी लाऊन दिला. सौदा (रजि.)चा भाऊ जो मुसलमान नव्हता, त्याला हे कळल्यावर त्याने फार शोक केला. काही काळानंतर तो मुस्लिम झाला व आपल्या वागणुकीचा त्याला शेवटपर्यंत पश्चात्ताप होत राहिला. पैगंबरांना पैगंबरी मिळाल्यावर दहा वर्षांनी हा विवाह झाला.

सकरान (रजि.) यांच्या घरी नांदत असताना माननीय सौदा (रजि.) यांना एक स्वप्न पडले की त्या उशी घेऊन पहुडल्या असताना एकाएकी आकाश फाटले व चंद्र त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांनी हे स्वप्न आपले पती सकरान (रजि.) यांना सांगितले. त्यांनी स्वप्नफल सांगितले, ``मला लवकरच मृत्यु येईल व तुम्ही अरबचे चंद्र पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी बनाल.'' आणि खरोखरच तसे घडले.

पडदा पद्धतीचे मार्गदर्शन येण्याअगोदर माननीय उमर (रजि.) यांचे म्हणणे होते की पैगंबरांच्या घरातील स्त्रियांनी बाहेर येऊ नये. माननीय सौदा (रजि.) त्या काळात घराबाहेर प्रातर्विधी इ. साठी जात असत. एके दिवशी त्या जंगलाकडे यासाठीच जात असताना रस्त्यात माननीय उमर (रजि.) यांनी त्यांना पाहिले. त्यांच्या मजबूत देहयष्टीमुळे त्यांना ओळखून उमर (रजि.) म्हणाले, ``हे सौदा (रजि.) मी तुला ओळखले आहे.'' ऐवूâन त्यांना वाईट वाटले. त्यांनी पैगंबरांना जाऊन सांगितले. परंतु ते गप्प राहिले. त्यानंतर पडदासाठी दिव्य आयत अवतरली व स्त्रियांवर पडदा लागू झाला.

सौदा (रजि.) स्वभावाने कडक परंतु हास्यविनोदात रमणाऱ्या होत्या. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांच्यावर अत्यंत खूश होते. त्या अत्यंत दयाळू आणि दानशूर होत्या. गरजूंना त्या नेहमी दानधर्म करीत असत. त्या कलाकुसरीतही प्रविण होत्या. कातडी कमावण्याचे काम करीत व त्यापासून जी प्राप्ती होई ती गरीबांमध्ये वाटून टाकीत. माननीय उमर (रजि.) यांनी दिरहम भरलेली थैली त्यांच्याकडे पाठविली तेव्हा त्यांनी त्या दिरहमाचे गरीबांना दान दिले. त्यांच्यात ते वाटून टाकले. माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ``पैगंबरा (स.) समवेत राहण्याचे वेड असलेली दुसरी स्त्री मी पाहिली नाही. माझा आत्मा जर त्यांच्या शरीरात असता तर किती बरे झाले असते.''

भाग ४

माननीय सौदा (रजि.) १० हिजरीमध्ये पैगंबरासमवेत हजला गेल्या. लठ्ठपणामुळे त्यांना भरभर चालता येत नव्हते. म्हणून पैगंबर (स.) यांनी त्यांना मुज्दल्फाकडे आधीच रवाना केले... `हज्जतुल विदा' च्या वेळी पैगंबरांनी आपल्या पत्नींना सांगितले, ``या हजनंतर तुम्ही घरीच राहा.'' त्यांच्या निधनानंतर त्यांची कोणतीही पत्नी घराबाहेर पडली नही. सौदा (रजि.) म्हणत, ``मी हज आणि उमरा दोन्हीही केलेले आहेत. आता मी त्यासाठी बाहेर पडणार नाही.'' माननीय सौदा (रजि.) यांचे निधन २२ हिजरीमध्ये झाले. माननीय सकरान (रजि.) या पहिल्या पतीपासून त्यांना अब्दुलरहमान (रजि.) नावाचा मुलगा होता; जो माननीय उमर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या काळात जलूला येथील युद्धात मारला गेला. पैगंबरांपासून सौदा (रजि.) यांना मुलबाळ वगैरे झाले नाही.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget