Latest Post


पती-पत्नींत, भावा-भावात, भाऊ-बहीणीत, बहिणी-बहीणीत, आईवडील-मुलांत, सासु-सुणेत, शेजारी-शेजारी राष्ट्रांमध्ये भांडण लावणारा कोण आहे तो? कोण आहे तो माणसाला धर्म, जातपात मध्ये विभाजीत करणारा? कोण आहे तो माणसामध्ये धर्माच्या मोठ-मोठ्या भिंती उभी करणारा? कोण आहे तो धर्माचा नाव होऊन माणसात भांडण लावणारा? कोण आहे तो माणसाला निर्दयी, पापी, दुष्ट बनविणारा? कोण आहे तो दारू पिण्यास, गुटखा खाण्यास, बिडी, सिगारेट, तंबाखू, गांजा, चरस, जुगाराचे व्यसन लावणारा?

भ्रष्टाचार, व्याभिचार, सामुहिक, बलात्कार, आत्महत्या, व्याजाचे व्यवहार या सर्व गोष्टी करण्यास माणसास प्रवृत्त करणारा कोण आहे तो? न दिसणारा, पण आपल्या शरीरात रक्तासारखा भ्रमण करणारा, आपल्या मनात, डोक्यात विविध प्रकारचे वाईट विचार आणणारा कोण आहे तो? समस्त मानवजातींचा शत्रू कोण आहे आहे ते त्याला आपला हेवा आहे, मत्सर आहे, इर्शा आहे. त्याला आपण चांगले राहिलेले पहावत नाही आणि आपणही दुःखी, नाऊमेद झाल्यास तो खूप आनंदीत होतो. तो आपल्याला स्वर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्याची मनोकामना आहे की आपण त्याच्यासोबत नर्कात जावेे. 

पवित्र रमजान महिन्यात तो बंदीस्त होता आता परत रमजान समाप्त झाले की तो सुटला आहे त्याचे अनुयायी आपल्या सोबत आहेत. होय तो सैतान आहे!   

शैतानाच्या प्रमुखाचे नाव इब्लीस आहे. ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अलैसलाम) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून ते सुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तीमत्व धारण केलेले  अस्तित्व आहे म्हणून कुरआन खुलासा करतो की शैतान, जिन्नपैकी होता जे इशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. 

मानवाच्या निर्मिती अगोदर अल्लाहने फरिश्ते (इशदूत) आणि जिन्न यांची निर्मिती केली होती. आदम आणि हव्वा (अलैसलाम) यांच्या सत्य घटनेस नाकारणे म्हणजे येणाऱ्या पिढीने कोरोनाला नाकारणे होय. 

जगातील तीन मोठे धर्मांचे अनुयायी म्हणजेच  ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामचे अनुयायी आदम आणि ईव्ह च्या घटनेला सत्य मानतात. एखादी गोष्ट आपल्यासमोर नाही घडली की त्याला नाकारायचेच का? आदम आणि इवचे अस्तित्व नाकारणे म्हणजे आपले आई-वडिलांना नाकारने आपले अस्तित्वच त्यांचा पुरावा आहे. 

कुरआनमधील सुरे अलऐराफ (11-25) मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे की,

11) आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिले मग दुतांना सांगितले की,  आदम समोर नतमस्तक व्हा (सज्दा करा) या आज्ञेनुसार सर्व नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

12) विचारले, ’’तुला कोणत्या गोष्टीने नतमस्तक होण्यासून रोखले. जेव्हा मी तुला आज्ञा दिली होती? ’’म्हणाला’’ मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तू मला अग्नीपासून निर्माण केले व त्याला मातीपासून. 13) फरमाविले, असे होय, तर तू येथून खाली उतर, तुला, अधिकार नाही येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो, की वस्तूतः  तू त्यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात. 

14)  तो म्हणाला, ’’ मला त्या दिवसापर्यंत सवलत दे, जेव्हा हे सर्व दुसऱ्यांदा उपस्थित केले जातील. 15. फर्माविले, ’’ तुला सवलत आहे.  16. म्हणाला, ’’ बरे तर ज्या तऱ्हेने तू मला मार्गभ्रष्ट केले आहेस, मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर असलेल्या या मानवाच्या पळतीवर राहीन.  17. पुढून आणि मागून, उजवीकडून व डावीकडून चोहोबाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. 18. फर्माविले, चालता हो येथून, अपमानित व धिःकारित. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझे अनुकरण करतील तुझ्यासहीत त्या सर्वांनिशी नरक भरून टाकीन. 

19. आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघे या स्वर्गामध्ये रहा. येथे जी वस्तू खाण्याची तुमची इच्छा असेल खा, परंतु, त्या वृक्षाच्या जवळ फिरकू नका, नाहीतर अत्याचाऱ्यांपैकी व्हाल. 

20. मग शैतानने त्यांना बहकाविले जणेकरून त्यांचे गुप्तांग जे एकमेकांपासून लपविले गेले होते त्यांच्या समोर उघड झाले. त्याने त्या दोघांना सांगितले. ’’ तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृत्ताची जी मनाई केली आहे त्याचे कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेस तुम्ही देवदूत बनू नये अथवा तुम्हाला अमरत्व लाभू नये.

21. आणि त्याने शपथ घेउन त्यांना सांगितले की मी तुमचा खरा हितचिंतक आहे. 

माणूस आपल्या हितचिंतकावर खूप विश्वास करतो आणि कोणी शपथ घेउन सांगतो तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. 

22. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्याने हळूहळू आपल्या वळणावर आणले. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे झाले आणि ते आपल्या गुप्तांगाना स्वर्गातील पानांनी झाकू लागले तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना पुकारले, ’’काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखले नव्हते आणि म्हटले नव्हते की शैतान तुमचा उघड शत्रू आहे? 

23. दोघे बोलते झाले, ’’हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू’’ 24. फर्माविले, ’’ चालते व्हा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवर निवासस्थान व जीवनसामग्री आहे. 25. आणि फर्माविले, तेथेच तुम्हाला जगणे व तेथेच मरणे आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशवेटी काढले जाईल. 

या आयातींमधून आपल्याला स्पष्ट होते की कसं शैतानाने अहंकार आधीन जाऊन अल्लाहची अवज्ञा केली व अल्लाहच्या मार्गावर मानवाला चालू न देण्याची जणू शपथच घेतली आहे. आधी समस्त मानवजात एक अल्लाहच्या मार्गावर होती शैतानने मार्गभ्रष्ट करून माणसांत धर्म-जात-पात निर्माण केली. 

सैतानच्या चाली (ट्रिक्स)

1. लोकांना त्यांच्या परमेश्वर (अल्लाहच्या) उपासनेपासून रोखणे.

2. वाईट गोष्टींना चांगले करून दाखविणे जसं की मेकअप केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो पण तो काही वेळासाठीच. मेकअप हा पूर्णपणे उणीवांना भरत नाही तर फक्त वरवरच चांगले भासवितो. तसेच शैतान व्याजाला नफा (इंट्रेस्ट) नाव देऊन कधी ... म्हणून त्याला चांगले करून दाखवतो, दारूला हेल्थ आणि बॉडी बिल्डींगचे आणि दुःख विसरण्याचे साधन म्हणून दाखवितो. 

3. दारू, जुगार मार्फत लोकांत शत्रूत्व घालतो. अ‍ॅक्सीडेंट, बलात्कार आणि गुन्ह्यांमागे दारूच असते. जॅकपॉट, कॅसिनो हे स्टँडर्ड जुगार आहेत.

4. अल्लाहची आठवण (जिक्र)पासून माणसाला रोखतो. 5. नमाज खराब करण्यासाठी सैतानचा स्पेशल टाईप आहे त्याचे नाव ’’खिनझीब’’ आहे हा नमाजमध्ये येऊन माणसाला बहकावितो. सर्व पेंडिंग कामाची आठवण करून देतो. 

6. रागात आणणे : आज कारागृहात जे लोक आहेत अधिकांश त्यांच्यातले रागामध्ये येऊनच गुन्हे केलेले आहेत. राग आल्यावर उभे असाल तर बसा, बसलेले असाल तर झोपा, राग आल्यानंतर पाणी अवश्य पिले पाहिजे कारण सैतान अग्नीपासून बनलेला आहे आणि पाणी अग्नीला विझवते. अल्लाहची शरण घेणे. आऊजू बिल्लाही मिनश्शैतानी निर्रजिम (मी अल्लाहची शरण घेतो शैतान धिःकारलेल्यापासून) चे पठण करणे. 7. शैतान आपल्याला चेहऱ्यांमध्ये बदल करायला लावतो. (प्लास्टिक सर्जरी, आयब्रोट्रिमिंग) आणि दातांमध्ये गॅप बनविण्यास लावतो. 8. आई-वडिलांचे आज्ञापालन करू न देणे. आई-वडिलांचे आज्ञापालन न करणारा नरकात जाणार आहे आणि हेच शैतान इच्छितो. 9. नातेवाईकांचे हक्क न अदा करण्यास प्रवृत्त करतो. एकमेकांविषयी वाईट विचार मनात घालतो. 10. वायफळ खर्च करणारे शैतानचे बंधू असतात. विनाकारण मॉलमध्ये जाऊन वायफळ खर्च केला जात आहे आजकाल तो शैतानच्या मोटीव्हेशन मुळेच. 12. गर्भपात करण्यास प्रोत्साहित करतो. संततीला ओझे आहे असे दाखवितो. लिव्हिंग स्टँडर्ड हाय करायचा असेल तर त्यांना मारून टाकावे जास्त संततीचे पालनपोषण कसे करावे? अश्या निगेटीव्ह थॉट्स माणसाच्या मनात घालतो, अल्लाह सुरे बनी इसराईल मध्ये फरमावितो की आपल्या संततीला दारिद्रयाच्या  भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा, वस्तुतः त्यांना ठार करणे एक मोठे अपराध आहे. 

13. व्याभिचार : शैतान माणसाला व्याभिचारासाठी प्रोत्साहित करतो आणि अल्लाहचा फरमान आहे की, व्याभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. हा आदेश प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा आहे आणि संपूर्ण समाजासाठी सुद्धा आहे. केवळ व्याभिचार कार्यापासूनच नाही तर त्याला प्रोत्सहन देणाऱ्या गोष्टींपासून व उत्प्रेरकांपासून. 14. शैतान खोट्या इच्छा आकांक्षा आणि आशा दाखवून आपल्या फेऱ्यात अडकवितो. 15. भयानक स्वप्न शैतानाकडूनच असतात म्हणून पैगंबरांचा आदेश आहे की भयानक स्वप्न आल्यास डाव्या बाजूला धुतकारून, आडंग बदलून झोपावे व 3 दिवस कोणाला सांगू नये. 16. माणसाला माणसावर जादू टोणे, करणी-धरणी करायला लावतो. 17. अश्लील गाणींद्वारा माणसाला इंन्टॉक्सीकेट करतो. 

शैतानची कमजोरी (निगेटीव्ह पॉईंटस्)

1. अल्लाह समोर सज्द-ए-तिलावत केल्यास शैतान रडतो, आदमच्या संतानला सजद्याच्या हुकूम झाला. त्यांनी केला आणि स्वर्गात जाणार, मलाही हुकूम झाला होता मी नाही केला आणि नर्कात जाणार. 

2. दुपारी थोडावेळ झोपणे (कैलूला करणे). सैतान कैलूला करत नाही. 

3. पाप झाल्यास अल्लाहकडे क्षमा मागितल्यासही शैतान चिडतो. आणि अल्लाह परम दयाळू, कृपाळू आणि क्षमा करणारा आहे. तो कितीही वेळा माफ करायला तैय्यार आहे, त्याला आवडते की माणसाने गुन्हा केल्यास त्याची क्षमा मागावी, ’’सर्वात चांगले गुन्हेगार ते आहेत की जे पटकन झालेल्या चुकांची माफी मागतात आणि परत न करण्याच्या निश्चय करतात. 

सैतानापासून बचाव कसं करावे?

1. कधीही राग आला, निगेटीव्हीटी आली. उदासीनता झाली तर अल्लाहच्या शरणी जा (अऊझुबिल्लाही मिनशैतानी निर्रजीम) म्हणत दररोज सकाळी 10 वेळा 3 सायंकाळी 10 वेळा.

2. कोणत्याही कामात जलदबाजी, घाई, गडबड न करणे केलेल्या गुन्ह्यांची माफी मागणे. 

3. अल्लाहशी संबंध मजबूत ठेवणे, 

4.कुरआन पठाण करणे. 

5. मृत लोकांची, आत्म्यांची भिती मनात न ठेवणे कारण मेल्यानंतर आत्मा परत येत नाही ती ’बरजख’ मध्ये असते. 6. संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळी लेकरांना घरात घेऊन ’’ बिस्मील्लाह’’ म्हणून घराचा दार लावून घ्या अन्यथा शैतान घरात शिरतो आणि बिसमिल्लाह न बोलून जेवण केल्यास खूप आनंदीत होतो की राहण्यासोबत जेवण्याचीही सोय झाली. कारण अल्लाहचा नाव न घेता खाणे ही शैतानच्या पोटात जाते आणि जेवूनही न जेवल्यासारखे वाटतेे.

 7. कपडे बदलनाता बिस्मील्लाह म्हणणे, वॉशरूमचे दार नेहमी बंद ठेवणे आणि वॉशरूम जाण्याआदीही बिसमिल्लाह म्हणणे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात बिस्मील्लाहने केली की तेे लवकर पूर्ण होतेे. 

8. शक्यतो रागावर नियंत्रण ठेवणे. पैगम्बर सल्ल. ने सांगितले आहे की, खरा बहादूर (शूर) व्यक्ती तो असतो जो रागाच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवतो. 

9. परस्त्री सोबत एकांतात बसू नये. 

10. एकट्या स्त्रीने लांबचे प्रवास करू नये. जेव्हा एकटी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा शैतान तिचा मागे लागतो तिला टक लावून पाहतो. 

11. सूरे अलबकराची नित्याने तिलावत करणे. ज्या घरात या सुरहची तिलावत केली जाते सैतान त्या घरात शिरूच शकत नाही. 

12. आयतुल कुर्सींची तिलावत करणे. 

13. जांभळी आल्यानंतर तोंडावर डाव्या हाताच्या पाठीमागचा भाग ठेऊन लाहोलवला कुवता म्हणणे. 

14. शैतानाच्या प्लानींग लोकांना समजून सांगणे. 

15. शिवीगाळ करू नये. शिव्या दिल्याने शैतान खूश होतो. इस्लामची शिकवण आहे की कुणाला शिवी देऊ नये. शैतानालाही शिवी देऊ नये. तर माणसाला शिवी द्यायचा विचारही करू नये. 

16. सैतान आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्याला बहकविण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सावधान अल्लाह सर्वांचा शेवट चांगला करो. सैतानापासून आपले रक्षण करावे. 

आमीन. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



जेंव्हा बुद्धीमान माणसे या ब्रह्मांडांच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, या ब्रह्मांडाची रचना अतिशय गणिती पद्धतीने तयार केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की ज्या ईश्वराने मानवाला बुद्धी देऊन विचार करण्याची शक्ती दिली त्या मानवाला बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती त्याने दिली नसेल. आज जगात बहुसंख्य लोक स्वतःच्या बुद्धीने वाईट मार्गाचा अवलंब करत असल्यामुळे संपूर्ण मानववंश संकटात सापडलेला आहे. 

कोविड-19 हे एक षडयंत्र असून, त्याद्वारे जागतिक लोकसंख्या कमी करून एक न्यू वर्ल्ड लागू करण्याचा अंतरराष्ट्रीय शक्तींची योजना आहे अशी एक थिअरी मांडली जात आहे, ज्यात मुठभर श्रीमंत देशांचा एकाधिकार असेल व ते आपल्या मनाप्रमाणे जगाची सुत्रे हलवतील. खरे तर यूएसएसआर (युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक)च्या पाडावानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली  भांडवलशाही देशांनी अशा एका न्यू वर्ल्ड ऑर्डरची घोषणा केलेलीच आहे. त्यांनी वर्ल्ड बँक, आयएमएफ सारख्या वित्तीय संस्था उभ्या करून आपल्या शर्तींवर गरीब देशांना कर्ज देऊन त्यांना आपले बटिक बनविलेलेच आहे. याच व्यवस्थेला अधिक सुदृढ करून कोविडनंतरच्या काळात नव्याने लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे जी की पूर्णपणे भांडवलशाही व्यवस्थेवर आधारित आहेत. 

न्यू वर्ल्ड ऑर्डरची सुत्रे अमेरिका, युरोप आणि इजराईलच्या हातात आहेत. ही सर्व राष्ट्रे ज्यू आणि ख्रिश्चन वंशाची आहेत म्हणून मुस्लिमांचा या न्यू वर्ल्ड ऑर्डरला विरोध आहे असे मुळीच नाही. उलटपक्षी ज्यू आणि ख्रिश्चन या लोकसमुहांना मुस्लिम,’’अहले किताब’’ समजतात व त्यांच्या पवित्र ग्रंथांना (तौरात आणि बायबल) ईश्वरीय ग्रंथ मानतात. त्यांच्या प्रेषितांना म्हणजेच सुलैमान अलै. (सॉलोमन) आणि ईसा अलै. (जीजस ख्राईस्ट) यांना ईश्वराचे प्रेषित मानतात. मुस्लिमांचे ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांशी मतभेद यासाठी नाहीत की ते वेगळ्या धर्माचे आहेत तर मतभेद आणि विरोध त्यांच्या धर्मद्रोही वर्तणुकीला आहे. 

अनेक वाईट प्रवृत्ती ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये खोलपर्यंत रूजलेल्या आहेत, त्यात त्यांना आनंद येत आहे. इस्लाम त्या प्रवृत्तींना संपवू इच्छितो आणि ते लोक त्यांना संपवू देत नाहीत. उदा. फ्री सेक्सचे शिक्षण तौरात किंवा बायबलमध्ये तर दिलेले नाही पण यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. व्याज, जमाखोरी, नफाखोरी, भ्रष्टाचार, समलैंगिकता तसेच  अश्लिलतेचे शिक्षण त्यांच्या धार्मिक ग्रंथांनी दिलेले नाही मात्र त्यांनी त्याला सामाजिक मान्यता दिलेली आहे. मुस्लिमांचा त्यांच्या या प्रवृत्तीला विरोध आहे. या लोक समुहांनी आपल्या धार्मिक ग्रंथांच्या तरतुदींची अवहेलना केली म्हणून तर ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर कुरआनचे अवतरण करून वर नमूद अपप्रवृत्तीचा नायनाट करण्याची जबाबदारी त्यांच्या व त्यांच्या अनुयायांवर टाकली आहे. प्रेषितांचे वारसदार म्हणून मुस्लिमांना या लोकांच्या खलप्रवृत्तींचा नायनाट करून एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापन करावा लागेल, ज्या योगे पृथ्वीवर राहणाऱ्या 7 अब्ज लोकांचे हित साधले जाईल. 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्द वाचून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटत असेल मात्र ही काही नवीन संकल्पना नाही. प्रेषित सल्ल. यांच्यावर कुरआन अवतरित करून याची घोषणा 1442 वर्षांपूर्वीच करण्यात आलेली आहे.

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हटल्याबरोबर जगातील गरीब देशांना आर्थिकदृष्ट्या गुलाम करून, त्यांच्या संसाधनांची लूट करून सैन्य शक्तीने जगावर सत्ता गाजविण्याचे  चित्र डोळ्यासमोर येते. मात्र इस्लामिक न्यू ऑर्डरमध्ये या गोष्टींना स्थान नाही. लोकांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगून, तार्किकदृष्या वादविवाद करून, अत्यंत प्रेमाने त्यांचे मन परिवर्तन करून मानवकल्याणासाठी त्यांना प्रेरित करणे हा या न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरचा उद्देश आहे. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचाही हाच उद्देश होता, ज्याचा त्यांना विसर पडला. आपल्या धार्मिक आस्थेला उध्वस्त करून त्यांनी राक्षसी आकाराची आणि प्रवृत्तीची भौतिक प्रगती साधली आहे. आता हीच प्रगती त्यांना नष्ट करू पाहत आहेत. कोविड-19 मुळे या नष्टचर्येची सुरूवात झालेली आहे हे नष्टचर्य एवढ्यावरच थांबणार नसून कोविड-19 पेक्षाही खतरनाक व्हायरसचा लवकरच जगाला सामना करावा लागेल असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनी याच आठवड्यात भाकित केलेले आहे. कोविड-19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा चालू असतांनाच गुटेरस यांचे हे भीतिदायक वक्तव्य पुढे आलेले आहे. 

भांडवलशाही व्यवस्थेच्या आधीन देशांनी आपल्या सैतानी कृत्यांनी पृथ्वीला प्रचंड नुकसान पोहोचवलेले आहे. अवाजवी आणि अवाढव्य औद्योगिकरण करून ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढवून पृथ्वीचे हिरवेपन ओरबडून घेतले आहे. अणुऊर्जेचा दुरूपयोग करून महाविनाशक युद्धास्त्रे तयार करून जगाला विनाशाच्या टोकावर आणून ठेवलेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ केलेला आहे. साधे जीवन सोडून किचकट जीवनाकडे लोकांना बोलावून त्यांचे जीवन तणावग्रस्त केलेले आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मानवी लैंगिक प्रवृत्तीचे बाजारीकरण करून लोकांना स्वैराचाकडे प्रवृत्त करून कुटुंब व्यवस्था उध्वस्त केलेली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आसमानी असो का सुलतानी असो अनेक संकटे पृथ्वीवर एकानंतर एक कोसळत आहेत. या मागचा ईश्वरी मन्सुबा लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये मुलभूत परिवर्तन आणून ईश्वराला अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. आताही सावध झालो नाही तर गुटेरस यांनी केेलेल्या भाकीतासारखे अनेक भाकीते त्यांना करावी लागतील आणि लोकांचा असाच विनाश होत राहील. 

कुरआन प्रणित आदर्श समाज रचनेची मुलभूत तत्वे

आदर्श समाज हा, ’’समाज को बदल डालो’’ अशा घोषणा दिल्याने बनत नाही. त्यासाठी कुरआनने दिलेल्या तत्वांची जाणीवपूर्वक जोपासना करून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशात ती तत्वे कोणती? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. ती तत्वे खालीलप्रमाणे-

1.आदर्श समाजनिर्मितीचा पाया कुठलाही वंश, राष्ट्र, भाषा, त्वचेचा रंग आणि लिंगावर आधारित ठेऊन जमणार नाही. जगातील सर्व माणसं आपसात भाऊ-बहीण आहेत. या एकाच मुलभूत तत्वावर आदर्श समाजाची पायाभरणी केली जाऊ शकते. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1. ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.’’ (सुरह अन्नीसा : आयत नं.1)

2. ’’अल्लाहशिवाय कोणाचीच भक्ती करू नका, माता पित्यांशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.83). 

3. ’’जे लोक राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत.’’ (संदर्भ : आलेइमरान आयत नं. 134).

4. ’’जी संपत्ती अल्लाहने तुम्हाला दिलेली आहे त्यापासून मरणोत्तर जीवन बनविण्याची काळजी घ्या आणि जगातीलही आपला वाटा विसरू नका. उपकार करा ज्याप्रमाणे अल्लाहने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. आणि जमीनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नका, अल्लाहला उपद्रवी (लोक) आवडत नाहीत.’’ (सुरे अलकसस आयत नं. 77). 

5. ’’अहंकार करू नका’’ (सुरह अल नहल आयत नं.23). 6. ’’लोकांच्या चुका माफ करा, त्यांच्याकडे कानाडोळा करा, काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे ’’ (सुरे अन्नूर आयत नं.22) .

7.’’लोकांशी नम्रतेने बोला. सर्वात वाईट आवाज गाढवाचा आहे’’ (सुरह लुकमान आयत नं.19) 8. ’’आपसात एकमेकांना टोमणे मारू नका. आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावाने करू नका.’’ (सुरे अलहुजरात आयत नं.11)

9. आई-वडिलांची सेवा करा (बनी ईसराईल आयत क्र. 23) 

10. आई-वडिलांना ब्र सुद्धा म्हणू नका (बनी ईसराईल आयत क्र. 23)

11. आई-वडिलांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या खोलीत प्रवेश करू नका. (सुरे नूर आयत क्र. 58). 

12. देवाणघेवाणीच्या व्यवहाराचा दस्त तयार करत चला. (सुरे बकरा : 282)

13. कुणाचेही अंधानुकरण करू नका. (बनी इसराईल, आयत नं. 36). 

14. जर कर्जदार अडचणीत असेल तर त्याला मुदतवाढ द्या. (सुरे बकरा 280). 

15. व्याज घेऊ नका. (सुरे बकरा 278). 

16. लाच घेऊ नका. (सुरे मायदा : 42). 

17. वचनभंग करू नका (सुरे अर्रराद : 20). 

18. दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. (सुरे हुजरात आयत नं.12). 

19. सत्यात- असत्याची भेसळ करू नका. (सुरे बकरा : आयत नं. 42).

20. लोकांमध्ये न्याय प्रस्थापित करा. (सुरे स्वॉद : 26). 

21. सत्यासाठी ताकदीने उभे रहा. (सुरे निसा : 135). 

22. मयताच्या वारसांमध्ये त्याची संपत्ती वाटून टाका. (सुरे निसा आयत नं.8). 

23. महिलांचाही मयताच्या संपत्तीमध्ये वाटा आहे. (सुरे निसा : 7). 

24. अनाथांच्या मालमत्तेवर कब्जा करू नका. (सुरे निसा : आयत नं.2). 

25. अनाथांचे संरक्षण करा (सुरे निसा : 127). 

26. दुसऱ्यांची संपत्ती गरजेशिवाय खर्च करू नका. (सुरे निसा : 6)

27. लोकांची आपसात तडजोड करत चला. ( सुरे हुजरात : 10). 

28. गैरसमज करून घेऊ नका. (सुरे हुजरात 12). 

29. चहाड्या लावू नका (सुरे हुजरात 12). 

30. लोकांचे रहस्य शोधत फिरू नका (सुरे हुजरात : 12)

31. दान करत चला. (सुरे बकरा : आयत नं. 271). 

32. गरीबांना जेवू घाला. (सुरे : मुदस्सीर : 44). 

33. गरजवंतांना शोधून त्यांची मदत करा. (सुरे बकरा : 273). 

34. वायफळ खर्च करू नका. (सुरे फुरकान आयत नं.67)

35. दान केल्यावर उपकार केल्यासारखे वागू नका. (सुरे बकरा : 262).

36. पाहुण्यांचा सन्मान करा. (सुरे अलजारियात : 24, 27)

37. अगोदर स्वतः पुण्य कर्म करा त्यानंतर लोकांना सांगा (सुरे बकरा : 44). 

38. जमिनीवर वाईट गोष्टींचा प्रसार करू नका. (सुरे  अनकबूत : आयत क्र. 36). 

39. लोकांना मस्जिदमध्ये जाण्यापासून रोखू नका. (सुरे बकराः 114)

40. फक्त त्यांच्याशी लढा जे तुमच्याशी लढतील. (सुरे बकरा : 190) 

41. युद्धाच्या दरम्यान शिष्टाचाराचे पालन करा. (सुरे बकरा 190). 

42. युद्ध समयी पाठ दाखवून पळून जावू नका. (सुरे अनफाल आयत नं. 15).

43. धर्माच्या बाबतीत कठोरता नाही. (सुरे बकरा : 256). 

44. सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवा (सुरे निसाः 150). 

45. मासीकपाळदरम्यान पत्नीशी लैंगिक संबंध स्थापन करू नका. (सुरे अलबकरा : 222). 

46. बाळाला दोन वर्षापर्यंत आईचे दूध पाजवा (सुरे बकरा : 233)

47. लैंगिक दुराचारापासून दूर रहा. (बनी ईसराईल : 32). 

48. पात्र लोकांना सत्ताधारी बनवा. (सुरे बकरा : 247). 

49. कोणावरही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादू नका (सुरे बकरा : 286). 

50. दांभिकतेपासून लांब रहा. (सुरे बकरा : 14-16). 

51. ब्रह्मांडाच्या रचना आणि आश्चर्यांवर सखोल विचार करा. (सुरे आलेइम्रान : 190). 

52. स्त्री-पुरूषांना आपापल्या कृत्यांचा बरोबर मोबदला दिला जाईल. (सुरे आलेइम्रान : 195).

53. काही नातेसंबंधांमध्ये लग्न निषिद्ध आहेत. (सुरे निसा : 23). 

54. पुरूष कुटुंबाचा प्रमुख आहे. (सुरे निसा : 34). 

55. कंजुशी करू नका. (सुरे निसा : 37). 

56 इर्ष्या करू नका. (सुरे निसा : 54). 

57. एकमेकाची हत्या करू नका (सुरे निसा : 29). 

58. चुकीच्या माणसाची वकीली करू नका (सुरे निसा : 135). 

59. गुन्हेगारी आणि अत्याचारीं लोकांची मदत करू नका. (सुरे मायदा : 2). 

60. चांगल्या कामामध्ये एकमेकांची मदत करा. (सुरे मायदा : 2.) 

61. बहुसंख्यांक म्हणजे सत्याची कसोटी नव्हे. (सुरे मायदा : 100). 

62. चांगल्या मार्गावर रहा. (सुरे अनआम : 153). 

63. गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवा (सुरे मायदा : 38). 

64. गुन्हेगारी आणि अत्याचार संपविण्यासाठी प्रयत्नशील रहा.  (सुरे अनफाल : 39). 

65. मेलेले जनावराचे व वराहाचे मांस तसेच रक्त निषिद्ध आहे. (सुरे मायदा : 3). 

66. दारू आणि इतर अमली पदार्थापासून दूर रहा (सुरे मायदा : 90). 

67. जुगार खेळू नका (सुरे मायदा : 90). 

68. हेराफेरी करू नका. ((सुरे एहजाब : 70). 

69. चहाडी करू नका. (सुरे हमजा : आयत क्र. 1). 

70. खा आणि प्या मात्र वायफळ खर्च करू नका. (सुरे अलआराफ : 31). 

71. नमाजच्या वेळेस चांगले कपडे परिधान करा. (सुरे आराफ : 31). 

72. तुमच्याकडे जे लोक मदत मागतील किंवा संरक्षण मागतील त्यांना ते द्या. (सुरे तौबा :6). 

73. स्वच्छता कायम राखा. (सुरे तौबाः 108). 

74. ईश्वराच्या कृपेपासून निराश होवू नका. (सुरे अलहज्र : 56). 

75. अनावधानाने झालेल्या चुकांना ईश्वर क्षमा करतो. (सुरे निसा : 17). 

76. लोकांना बौद्धिकतेकडे आणि चांगल्या उपदेशाद्वारे ईश्वराकडे बोलवा.  (सुरे नहलः125). 

77. कोणीही कोणाच्या दुष्कृत्यांचे ओझे वाहनार नाही. (सुरे फातीर : 18)

78. दारिद्रयाला घाबरून आपल्या संततीची हत्या करू नका. (सुरे नहेल :31).

79. ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही त्या संबंधी चर्चा करू नका. (सुरे नहेल : 36).

80. कोणाचाही मागोवा काढत फिरू नका. (सुरे हुजरात : 12). 81. परवानगीशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका. (सुरे नूर :27)

82. ईश्वर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे संरक्षण करतो. (सुरे युनूस 103). 83. जमीनीवर नम्रतेने चाला. (सुरे फुरकान : 63).

84. स्वतःच्या वाट्याचे काम स्वतःच करा. (सुरे तौबा : 105). 85. अल्लाहसोबत कोणाला सामील करू नका. (सुरे कहफ : 110 )

86. सत्याची साथ द्या, असत्यापासून लांब रहा. (सुरे तौबा 119). 87. स्त्रीयांनी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नये. (सुरे नूर : 31 )

88. अल्लाह शिर्क व्यतिरिक्त इतर गुन्हे माफ करू शकतो. (सुरे निसा : 48). 

89. अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. (सुरे जमर : 53). 

90. वाईट गोष्टींचा नायनाट चांगल्या गोष्टीने करा. (सुरे हामीम सज्दा : 34). 

91. आपसात चर्चा करून मग निर्णय करा. (सुरे शुरा : 38)

92. तुमच्यापैकी तो जास्त प्रतिष्ठित आहे जो जास्त चारित्र्यवान आहे. (सुरे हुजरात :13)

93. इस्लाममध्ये वैराग्याला मान्यता नाही. (सुरे हदीद :27). 

94. अल्लाह ज्ञानी लोकांना महत्त्व देतो. (सुरे अल मुजदला : 11). 

95. मुस्लिमेत्तरांसोबत उदारता आणि शिष्टाचाराने वागा. (सुरे अल मुमतहेना : 8). 

96. स्वतःला लालसेपासून दूर ठेवा. (सुरे निसा : 32)

97. अल्लाहकडे क्षमा मागत चला. तो मोठा क्षमाशील आहे. (सुरे बकरा : 199). 

98. ज्याने भिक्षा मागितली त्याला झिडकारू नका. शक्य असेल तेवढे त्याला द्या. (सुरे अलजही : 10). 

99. मरणोत्तर जीवनामध्ये यशस्वी होणे ईश्वराकडे चारित्र्यवान लोकांसाठी आहे. (सुरे  अज्जुख्रुफ आयत 35). 

100. निर्विवादपणे अल्लाह चारित्र्यवान लोकांना पसंत करतो. (सुरे तौबा : 07).

तसे पाहता कुरआनमधील सर्व निर्देशांची अंमलबजावणी आदर्श समाजरचनेसाठी त्यातील 100 निर्देश मी वाचकांच्या सोयीसाठी या ठिकाणी उधृत केलेले आहेत. या तत्वांशिवाय दुसऱ्या कुठल्याच तत्वांवर आदर्श समाजाची रचना शक्य नाही. बुद्धिजीवी लोकांनी नक्कीच वरील तत्वांचा विचार करावा. हा केवळ एका लेखकाचा कल्पना विलास आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करू नये. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, आम्हा सर्वांना आदर्श समाजरचनेसाठी पुढाकार घेण्याची सन्मती दे. आमीन. 

- एम.आय.शेख



प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.

प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.

मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.



माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)



माननीय मुगीरा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) रात्री अतिजास्त काळ नमाजमध्ये उभे राहिले. ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. पैगंबरांना यावर विचारण्यात आले, ‘‘तुमच्या तर मागील पुढील सर्व उणिवांना अल्लाहने माफ केलेले आहे तेव्हा तुम्ही नमाज अदा करताना इतका त्रास का घेता?’’

यावर पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी एक कृतज्ञ दास बनू नको?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम, इब्ने माजा)


स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) दीर्घकाळ नमाजमध्ये उभे राहिले, ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. ते उपासनेत असाधारण कष्ट घेत होते. त्यांना विचारण्यात आले, ‘‘इतके कष्ट का उचलता? जे अतिकष्ट तुम्ही उचलता त्याची तर आवश्यकताच नाही.’’ पैगंबरांच्या मागील-पुढील सर्व उणिवांना माफ करण्यात आलेले आहे. ‘कुरआनच्या सूरह अल फतह, आयत नं. २’नुसार सांगितले गेले आहे.

या प्रश्नाचे जे उत्तर पैगंबरांनी दिले त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा अल्लाहने इतके असीम उपकार त्यांच्यावर केले तेव्हा त्यांचे कर्तव्य ठरते की पैगंबरांनी अल्लाहचे कृतज्ञ दास बनावे आणि अधिकाधिक ईशप्रसन्नतेचे इच्छुक व्हावे. या हदीसद्वारा माहीत होते की अल्लाहप्रति कृतज्ञ बनण्यासाठी आवश्यक आहे की दासाने ईश्वराचे अधिकाधिक सान्निध्य प्राप्त करावे आणि अल्लाहशी अधिकाधिक संबंध व्यक्त करावेत. यासाठी सर्वोत्तम साधन नमाज आहे आणि सजदा करणे (नतमस्तक होणे) तर विशेषरूपाने ईशसान्निध्यप्राप्तीचे साधन आहे, नव्हे तर सान्निध्यस्थितीचे दुसरे नाव आहे.



- मुहम्मद अहसन

- डोनाल्ड आर. हिल्ल

- अहमद वाय. अल-हस्सान


संकलन

- सय्यद इफ्तिखार अहमद

- प्रा. अब्दुर्रहमान शेख


आयएमपीटी अ.क्र. 260       -पृष्ठे - 80 मूल्य - 70      आवृत्ती - 1 (DEC 2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3ll9vdl7abav30f51lnzn03v2lijp26k




statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget