मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.
पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असे. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
म्हणजे एखादी अप्रिय व स्वभावाशी प्रतिवूâल गोष्ट पाहिल्यास लज्जाशीलतेमुळे तोंजाने जरी पैगंबर मुहम्मद (स.) काही सांगत नसत, परंतु त्या अप्रियतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असत.
पडद्यात (बुरखा) असणाऱ्या कुमारिका अति लज्जाशील व लाजाळू असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात लज्जाशीलता त्यांच्यापेक्षासुद्धा अधिक होती.
५७) माननीय अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस (रजि.) सांगतात,
‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वभावात अश्लीलता नव्हती आणि कोणतेच अश्लील कृत्य ते करत नसत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
- सय्यद इफ्तिखार अहमद
- सय्यद इफ्तिखार अहमद
प्रथम आवश्यकता - ज्ञान
जे उत्तर तुम्ही द्याल त्यावरून आपोआपच हे स्पष्ट होते की इस्लाम प्रथमत: ज्ञानाचे नाव आहे आणि ज्ञानानंतर कर्म अथवा कृतीचे नाव आहे. एखादा मनुष्य ज्ञानाशिवायसुद्धा ब्राह्मण असू शकतो, कारण त्याचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला आहे आणि तो ब्राह्मणच राहील. एखादा मनुष्य ज्ञान नसतानाही जाट असू शकतो, कारण तो जाट म्हणून जन्मला आहे आणि तो जाटच राहील. परंतु एखादा मनुष्य ज्ञानाशिवाय मुस्लिम असू शकत नाही कारण मुस्लिम जन्मत: मुस्लिम असत नाही तर तो ज्ञानाने मुस्लिम बनतो. जोपर्यंत त्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणती शिकवण दिली आहे हेज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तो त्यावर ईमान धारण कसे करू शकेल? आणि त्यानुसार कसे कर्म करू शकेल? आणि जर त्याने समजून उमजून ईमान धारण केले नसेल तर तो कसा मुस्लिम होऊ शकेल? म्हणून अज्ञानासह मुस्लिम असणे आणि मुस्लिम म्हणून राहणे अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य ज्याने मुस्लिमाच्या घरी जन्म घेतला आहे, ज्याचे नाव मुस्लिमासारखे आहे, जो मुस्लिमासारखे वस्त्र परिधान करतो आणि जो स्वत:ला मुस्लिम म्हणवितो, वास्तविकत: तो मुस्लिम नाही. खऱ्या अर्थाने मुस्लिम तर केवळ तो मनुष्य आहे जो इस्लामचे ज्ञान बाळगतो आणि समजून उमजून त्याला मानतो. एक अनेकेश्वरवादी व एक मुस्लिमात मौलिक अंतर नावाचे नाही. तो रामप्रसाद आहे आणि हा अब्दुल्लाह आहे, म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम. अशाप्रकारे एक अनेकेश्वरवादी व एका मुस्लिमात मौलिक फरक पोषाखाचासुद्धा नाही की तो धोतर नेसतो आणि हा विजार घालतो म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम! तर मूळ फरक या दोहोंमध्ये ज्ञानाचा आहे. तो अनेकेश्वरवादी अशासाठी आहे की त्याला माहीत नाही की अल्लाहचा त्याच्याशी व त्याचा अल्लाहशी काय संबंध आहे? त्याला माहीत नाही की सृजनकर्त्याच्या इच्छेनुसार या जगात जीवन व्यतीत करण्याचा सरळमार्ग कोणता आहे? अशीच स्थिती एखाद्या मुस्लिमाच्या मुलाचीसुद्धा असेल, तर तुम्हीच सांगा की त्याच्यात आणि एक अनेकेश्वरवाद्यामध्ये कोणत्या आधारे फरक कराल आणि म्हणाल की तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम आहे?
बंधुनो! हे मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत मनाने यावर विचार करा. हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे की अल्लाहची ही सर्वांत मोठी देणगी आहे ज्यावर तुम्ही आभार व कृतज्ञता व्यक्त करता ती प्राप्त होणे अथवा प्राप्त न होणे, हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान नसेल तर ही देणगी त्याला प्राप्तच होऊ शकत नाही. समजा थोडी बहुत प्राप्तसुद्धा झाली तर अज्ञानामुळे सदैव ही भीती असते की ही वैभवशाली देणगी त्याच्या हातातून निसटून जाईल. केवळ अज्ञानामुळे तो स्वत:ला मुस्लिम समजत राहील, वास्तविकत: तो मुस्लिम नसेल. ज्या माणसाला ही जाणीवच नसेल की इस्लाम व अनेकेश्वरवादात काय फरक आहे आणि इस्लाम व बहुदेववादात काय अंतर आहे, त्याची स्थिती तर अगदी अशी आहे जणू एखादा मनुष्य अंधारात एखाद्या पायवाटेवरून चालत आहे. सरळ रेषेवर चालता चालता स्वत: त्याचे पाय एखाद्या अन्य मार्गाकडे वळणे शक्य आहे आणि त्याला सरळ मार्गावरून भटकल्याची कल्पनासुद्धा येत नाही. असेसुद्धा शक्य आहे की मार्गात एखादा धोकेबाज उभा असेल आणि त्याने म्हणावे की तुम्ही अंधारात मार्गावरून भटकला आहात, या मी तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचवितो. बिचारा अंधारातून प्रवास करणारा स्वत:च्या डोळ्याने पाहू शकत नाही की सरळमार्ग कोणता आहे. म्हणून तो अज्ञानाने आपला हात त्या धोकेबाजाच्या हातात देईल आणि तो त्याला मार्गभ्रष्ट करून कोठल्या कोठे घेऊन जाईल. त्या माणसाला या अडचणी तर अशासाठी येतात की त्याच्या स्वत:जवळ कोणताही प्रकाश नाही आणि तो स्वत: आपल्या मार्गावरील खुणा पाहू शकत नाही. त्याच्याजवळ प्रकाश असता तर हे स्पष्ट आहे की तो मार्गही चुकला नसता आणि त्याला दुसरा कोणी मार्गभ्रष्टही करू शकला नसता. बस्स! याच्यावरूनच कल्पना करा की मुस्लिमासाठी सर्वांत मोठा जर कोणता धोका असेल तर हाच आहे की तो स्वत: इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ आहे, स्वत:ला हे माहीत नाही की पवित्र कुरआन काय शिकवितो आणि प्रेषित मुहम्मद (स.) कोणता आदेश देऊन गेले आहेत? या अज्ञानामुळेच तो स्वत:ही मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि दुसरे धोकेबाजसुद्धा त्याला मार्गभ्रष्टकरू शकतील. परंतु त्याच्यापाशी ज्ञानाचा प्रकाश असेल तर तो जीवनाच्या प्रत्येक पावलावर इस्लामचा सरळमार्ग पाहू शकेल, प्रत्येक पावलावर अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, मार्गभ्रष्टता, दुष्कृत्य आणि दुराचाराचे जे वक्र-मार्ग मध्ये येतील ते ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहू शकेल, जो कोणी मार्गभ्रष्ट करणारा रस्त्यात त्याला आढळेल त्याचे ऐवूâनच तो या निष्कर्षाप्रत पोहचेल की हा मनुष्य मार्गभ्रष्ट करणारा आहे, याचे अनुयायित्व स्वीकारणे चुकीचे आहे.