Latest Post


माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’

साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.

मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.

 


तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, ``(नेहमी) सत्य बोला.'' हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ``कर्मांची भिस्त कशावर आहे?'' नंतर पैगंबर (स.) यांनी आपली जीभ पकडून सांगितले, ``याला आपल्या काबूत ठेवा.'' (हदीस : तिर्मिजी, इब्नेमाजा, मुसनद अहमद)

आणखी एके ठिकाणी म्हटले,

``जी व्यक्ती मला मुख आणि गुप्तांगाच्या (वाईट बोलण्यापासून आणि व्यभिचारी कर्मांपासून) संरक्षणाची हमी देईल, त्यास मी स्वर्ग-प्रवेशाची हमी देतो.'' (हदीस : तिर्मिजी, इब्ने माजा, मुसनद अहमद)

आणखी एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, 

``जी व्यक्ती अल्लाहवर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवते, तिने फक्त सत्यच बोलावे अन्यथा गप्प बसावे.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)

वास्तविकता अशी आहे की, अल्लाहच्या आणि मानवाच्या हक्कांची जितकी अधिक पायमल्ली मुखावाटे होते, अन्य अवयवाद्वारे क्वचितच होते आणि कधी कधी मनुष्याला याचे ज्ञान नसते. भांडण-तंट्याची सुरवात जिभेनेच होते. जेव्हा आम्ही कमी बोलू, विचारांति बोलू, अपराधात्मक बोलणार नाही आणि तोंडाद्वारा इतराना दु:ख देणार नाही आणि नेहमी भले व सत्य बोलू तेव्हाच घरातील व बाहेरील जीवन आनंददायी बनेल.



माननीय इब्ने अब्बास (रजि.) हे वर्णन करतात. 

पैगंबर मुहम्मद (स.) बद्रच्या युद्धाप्रसंगी एका राहुटीत खालीलप्रमाणे प्रार्थना (दुआ) करत होते. ‘‘हे अल्लाह मी तुझ्यापाशी तुझ्या आश्रयासाठी याचना करतो आणि तुझे वचन पूर्ण व्हावे याची याचना करतो. हे अल्लाह! तू जर इच्छिले की (मुस्लिम नष्ट व्हावेत) तर आजनंतर तुझी इबादत (भक्ती) होणार नाही.’’

यावर अबू  बकर (रजि.) यांनी पैगंबरांचा हात धरून विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! बस, इतके पर्याप्त आहे. तुम्ही अत्यंत द्रवणशीलतेसह व रुदनभाविभोर होऊन प्रभुशी याचना केली आहे.’’

यानंतर पैगंबरांनी चिलखत परिधान केले आणि तंबूतून त्वरित बाहेर आले आणि पुढील आयतचे ते पठण करीत होते, ‘‘सत्यविरोधकाचा हा दल लवकरच पराजित होईल आणि हे पाठ दाखवून पळत सुटतील.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना वचन दिले होते,

‘‘आणि स्मरण करा जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन दलांपैकी एक दल तुमच्या स्वाधीन केला जाईल.’’ (दिव्य कुरआन, ८:७) 

अल्लाहच्या या वचनाचा हवाला देऊन पैगंबर दुआ (प्रार्थना) करीत होते. अल्लाहच्या वचनावर विश्वासाव्यतिरिक्त दासाचे कर्तव्य आहे की त्याने प्रभुशी प्रार्थना व विनयपूर्वक याचना करण्याकडे दुर्लक्ष करू नये. दासाचे दास्यत्व व अल्लाहच्या महानतेची हीच मागणी आहे की दासाने अतिद्रवित भावनेसह प्रभुशी प्रार्थना करत राहावी. या प्रार्थनेमुळे इस्लामी सैन्याच्या मनाला बळ प्राप्त झाले आणि त्यांच्या उत्साहात अपार वृद्धी झाली होती.

पैगंबर चिलखत परिधान करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या जिव्हेवर कुरआनची ही आयत होती जिचा उल्लेख वर आला आहे. या आयतद्वारा पैगंबर ईमानधारकांना अल्लाहकडून शुभसूचना देत होते की शत्रूवर मुस्लिमांना विजय प्राप्त होणार आहे.



- माईल खैराबादी

या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी सांगण्यात आले आहे.

त्यांचे व्यिक्तमत्व, पोषाख, भोजन, स्वच्छता, दिनचर्या, संभाषणशैली, अल्लाहवर दृढ विश्वास, समानता, लाजाळूपणा, सत्यवचनी, धैर्यशील, वचनपूर्ती, वाईटाच्या बदल्यात चांगुलपणा, लहान मुलांशी प्रेम, मृदुस्वभावी, क्षमाशील इ.वर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 255      -पृष्ठे - 32 मूल्य - 18        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/grjz0jk5g7447o81ql1zqlnoehrvskqc








- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

जगातील संसाधनावर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे  गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रुपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो.

साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठ्या कंपन्या घेतात. जी राष्ट्रे भांडवलदारांविरुद्ध अडथळा निर्माण करतात, त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करुन त्यांना नष्ट केले जाते. याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे. शेवटी इस्लामची पर्यायी आर्थिक व्यवस्थेवर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 254     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vtyf385cmpqphc7qr8yu0wea3ugygw3q






dua

इस्लाम म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानणे होय. परंतु जोपर्यंत मनुष्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही व त्यावर त्याचा विश्वास असत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा आज्ञाधारक होऊच शकत नाही.

सर्वप्रथम मनुष्याला परमेश्वर आहे हा विश्वास असला पाहिजे. त्याला हे ही माहित असले पाहिजे की परमेश्वर फक्त एकच आहे जेणेकरून तो दुसऱ्यासमोर हात जोडणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत आहे व ऐकत आहे हा विश्वास ज्याला असेल तो त्या परमेश्वराची आज्ञाभंग करणार नाही. इस्लामवर चालण्यासाठी ज्या विचारांची व कर्मांची आवश्यकता आहे ते परमेश्वराला ओळखल्याशिवाय व्यक्तीत येणार नाहीत व तो वाईट विचारांनी व परमेश्वराच्या मर्जीविरूद्ध काम करण्यापासून तो स्वतःला वाचवेल.

यानंतर मनुष्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा मार्गही माहित असायला हवा. कुठल्या गोष्टी करायला हव्यात व कुठल्या गोष्टींपासून दूर रहायला हवे हे माहित पाहिजे.

यासाठी त्याला परमेश्वराने मानवांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्याला जर नियमच माहित नसतील तर तो पालन कशाचे करणार? मनुष्याला परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे फळ काय मिळणार आहे व आज्ञाभंगाची काय शिक्षा मिळणार आहे हे पण माहित असायला हवे. त्यासाठी त्याचा पारलौकीक जीवनावर परमेश्वराच्या न्यायालयात सादर होण्यावर, आज्ञाधारकतेच्या बक्षीसावर व आज्ञाभंगाच्या शिक्षेवर विश्वास असला पाहिजे. ज्याला आखिरतच्या जीवनावर विश्वास नाही तो आज्ञाधारक राहणार नाही. त्याच्यासाठी आज्ञाधारक व्यक्ती व आज्ञाभंग करणारा व्यक्ती दोन्ही समान आहेत. दोन्ही मातीत मिळणार आहेत. काही व्यक्तींना आखिरत (पारलौकिक) चे ज्ञान असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते भटकलेले आहेत. 

ईमान म्हणजे काय?

वरील भागात आपण ज्ञान व विश्वास पाहिला ते म्हणजेच ईमान. ईमान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती परमेश्वराच्या एक असण्यावर आणि त्याच्या नियमांना जाणतो व त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो मोमिन (ईमान असणारा) असतो आणि ईमान असणारा व्यक्ती ’मुस्लिम’ म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञाधारक बनतो.

ईमान असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मुसलमान बनू शकत नाही. ईमान हे मुसलमानरूपी झाडाचे बीज आहे. ईमान व इस्लामच्या दृष्टीने मनुष्याचे चार प्रकार पडतात. 

1. जे ईमान राखतात आणि परमेश्वराच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात हे सच्चे मुस्लिम आहेत.

2. जे ईमान तर राखतात पण पूर्णपणे परमेश्वराचे आज्ञाधारक नसतात हे मुसलमान तर आहेत पण गुन्हेगारसुद्धा आहेत. 

3. ज्यांच्याकडे ईमान असत नाही पण त्यांचे कर्म परमेश्वराच्या नियमाप्रमाणेच असतात हे लोक बंडखोर आहेत.

4. जे ईमान राखत नाहीत व वाईट कृत्ये करतात हे लोक सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. हे बंडखोर तर आहेतच तसेच समाजात अशांतता पसरविणारे सुद्धा आहेत. 

ज्ञान मिळवण्याचे मार्ग

परमेश्वराने निसर्गातच आपल्या असण्याचे संकेत दिलेले आहेत. पण मनुष्याची बुद्धी व त्याचे कौशल्य बहुदा त्या संकेतांना समजण्यात चुका करतो. कोण म्हणतो ’आनंद’ देव आहेत, कोण म्हणतो ’अग्नीचा’ देव वेगळा, ’हवेचा’ देव वेगळा म्हणजे वेगवेगळ्या शक्तींचे वेगवेगळे देव व त्या देवांचा एक वेगळा देव. हे लोक अज्ञानी आहेत. 

आखिरतच्या जीवनासंबंधीही बरेचसे गैरसमज आहेत. काही म्हणतात मृत्यूनंतर पुन्हा जीवन नाही. काही म्हणतात मनुष्य पुन्हा पुन्हा या धरतीवर जन्म घेईल व त्याला त्याच्या कृत्याचे फळ मिळेल.

परमेश्वराने आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेउन आपली कठोर परीक्षा घेतली नाही. परमेश्वराने मनुष्यांमध्येच असे मनुष्य जन्माला आणले ज्यांनी परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्याला दिले. मनुष्य म्हणजेच अल्लाहचे पैगंबर किंवा अल्लाहचे नबी. अल्लाहने त्यांना जे ज्ञान दिले त्याला ’वह्य’ असे म्हणतात आणि ज्या पुस्तकात अल्लाहने हे ज्ञान दिले ते पुस्तक (कुरआन ग्रंथ) अल्लाहचा संवाद आहे. आता मनुष्याची खरी परीक्षा आहे की तो पैगंबरांच्या पवित्र जीवनाला व त्यांच्या उच्च ज्ञानाला बघून त्यांच्यावर ईमान आणतो की नाही. जो मनुष्य सतप्रवृत्तीचा आहे तो पैगंबरावर ईमान आणेल पण ज्याने सद्सद्विवेकबुद्धीचा त्याग केला आहे तो यापासून वंचित राहील. 

परोक्षावर ईमान

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते तेव्हा आपण ज्ञान असणाऱ्याचा शोध घेतो व त्याने सांगितलेल्या गोष्टी पाळतो. आपण आजारी असतो तेव्हा डॉ्नटरांकडे जातो. त्याने दिलेले औषध घेतो. आपल्याला त्या औषधांबद्दल काही माहित नसते तरी आपण डॉ्नटरावर विश्वास ठेवून ते औषध घेतो. याचाच अर्थ असा की आपल्याला पृथ्वीच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी कोण्या जाणकारावर ईमान ठेवावा लागतो व त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे लागते यालाच परोक्षावर ईमान असणे किंवा गैबवर ईमान असणे म्हणतात. परोक्षावर ईमान असणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही व आपण ती गोष्ट जाणणाऱ्यांवर विश्वास ठेवतो. आपल्याला परमेश्वराबद्दल काही माहित नाही, आपल्याला परमेश्वर खुश होईल असे जीवन जगण्याचा मार्ग माहित नाही. आखिरतच्या जीवनाबद्दल माहित नाही. या गोष्टींचे ज्ञान आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला एक असा व्यक्ती मिळते जी सतप्रवृत्ती असणारी, परमेश्वराला मानणारी व पवित्र असतेे. तिला परमोच्च ज्ञान असते. त्या व्यक्तीला बघून आपल्याला हा विश्वास बसतो की, ही व्यक्ती जे बोलेल ते सत्य बोलेल. हे विश्वास करणे म्हणजेच परोक्षावर ईमान असणे विश्वास असणे. अल्लाहच्या आज्ञा पाळण्यासाठी व त्याच्या ईच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परोक्षावर ईमान आवश्यक आहे. पैगंबराशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळू शकणार नाही व आपण इस्लामच्या मार्गावर चालू शकणार नाही. (संदर्भ : दीनियात)


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल

लातूर 

9860551773


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget